Sunday, 29 November 2020

सौमावाद्यान्नो भूमिका घ्या ! सामाजिक कार्यात उतरताना

सौमावाद्यान्नो भूमिका घ्या ! 

सामाजिक कार्यात उतरताना पहिला संघर्ष सुरु होतो तो स्वताशी तुकोबाराय म्हनाले होते रात्रंनदिन आम्हा युद्धाचा प्रसंग
खरे आहे.
अंतर्मनात युद्धच चालु असते. 
संघर्ष चालु होतो,तो असा की व्यवस्थेशी जी जी व्हयजी म्हनत जगावं की प्रत्येक गोस्टीला प्रश्न करत बंडखोरी करावी.स्वताची पायवाट निर्माण करावी की भाऊगर्दीत सामील व्हावे.विचारधारेचा कार्यकर्ता बनण्याआधी स्वताचा संघर्ष पुर्ण केल्याशिवाय आपण परिपूर्ण होत नसतो.स्वताच्या मनावर विजय मिळविल्यानंतरच महावीर बुद्ध बनता येते.यशोधरेला आणि राहुलला बघत ग्रहत्याग बुद्धच करु शकतो आपल्याला तर आर्ध्या कार्यक्रमातून उठून जावे लागते कारण आपण गेल्याशिवाय बायको जेवत नाही म्हणून. 
कार्यकर्ता म्हणून आपली एक भूमिका असावी.भुमीकांच्या जोरावरच तुमची व्यवस्था उभी रहाते.एक स्पष्ट भुमीका घेवुनच तुम्हाला नवी व्यवस्था उभी करायची असते.भुमीकेची स्पष्टता नसेल तर तुम्ही आहे त्या व्यवस्थेत विरघळून,मिसळून जाता.प्रस्थापित जातवर्गीय व्यवस्था तुमचे पोतेरे करते.ठोस भुमीकावाल्यांनी कित्तेक साम्राज्ये  सहज कोसळवलीत,आणि ठोस भुमीकांच्या जोरावरच नव्या राज्यव्यवस्था कार्यरत झाल्याचे आपल्याला दिसेल.भुमीकाहिन माणसे दुसऱ्याच्या आलीशान बंगल्यासमोरील अंगणातील पायपोसने असतात.जिथे भूमिका मृतप्राय होते तिथे जी,जी, व्हय जी ही वृत्ती सर्वोच्च टोकाची लाचारीची लाळ गाळाताना दिसते.यात आनखी एक असे की लेचिपेची भूमिका सुद्धा तडजोडीची इतकी सवय लावते की आयुष्य हुजरेगिरी करण्यासाठीच उरते.म्हणून भूमिका स्पष्ट आणि ठोस असावी.
तुम्हाला सौमावादी व्हायचे आहे तर ढसाळ व्हा.व्यवस्थेला कोलणारा किंवा मग ओशो व्हा.अंतर्मनात किंतूपरंतु न ठेवता झोकुन द्या स्वताला सामाजिक चळवळीत.
कोण काय म्हनेल ? माझ्या रोझीरोटीचे काय होइल ? लगीन व्हइल की नाही ? समाज भाऊकी काय म्हनेल ? कुनाला हे अवडेल की नाही ? हे सगळे फाट्यावर मारा झोकून द्या एका सामाजिक कार्यात.गरज आहे तुमच्या त्यागाची.गरज आहे तुमच्या या वेळेची.
 तुमच्या त्याग आणि समर्पनाला आज महत्व आहे.तो तुम्ही केला पाहिजे.उंटावरून शेळ्या हाकुन जमनार नाही.
आम्ही वाट पहात आहोत त्यागी आणि समर्पित व्यक्तिची जो अंतर्मनातील संघर्ष मिटवून मुक्त जगायला निर्भयपणे पुढे येइल.
सौमावाद्यान्नो 
नितीन सावंत परभणी 
9970744142

Saturday, 7 November 2020

भगतसिंग स्टुडंट फ्रंटची भूमिका

भगतसिंग स्टुडंट फ्रंटची भूमिका 

 भारताच्या क्रांतिकारी विद्यार्थ्यांना जय भारत 


जग बदलण्याच सर्वाधिक सामर्थ्य कोणात असेल तर ते आपल्यातच(विद्यार्थ्यांत) आहे.
अन्यायाच्या विरोधात मूठ आवळून,अत्याचाराच्या विरोधात पेटून उठून विद्यार्थी जेव्हा जेव्हा रस्त्यावर उतरला तेव्हा तेव्हा क्रांती झाली मग फ्रेंच क्रांती असो की रशियन राज्यक्रांती.*
 *अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे झाल्यास इजिप्त, थायलंड ह्या देशांमध्ये जी क्रांती झाली तिला कारणीभूत विद्यार्थीच होते.* 
*सध्या हीच क्रांतीसदृश्य परिस्थिती भारतात निर्माण झालेली आहे. अन्याय अत्याचाराच्या विरोधात तरुन पेटून उठत आहेत. सध्या देशात विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत.हे कशाचे संकेत आहेत? क्रांतिचेच ना!*
*थोडक्यात विद्यार्थ्यांमध्ये (युवांमध्ये) प्रचंड शक्ती आहे. हे आपण ओळखले पाहिजे. आणि अशा समस्या सोडविण्यासाठी या शक्तीचा वापर केला पाहिजे.*
 *या देशातील काही स्वार्थी लोक विद्यार्थ्यांना जात-पात-धर्म-पंत इत्यादी विषया वर भडकवतात आणि स्वतःचा स्वार्थ साधतात. विद्यार्थ्यांच्या सामर्थ्याचा असा गैरवापर देशाच्या भविष्यासाठी अत्यंत घातक आहे.*
 *क्रांतिकारी युवकानो ही प्रस्थापित व्यवस्था किडलेली आहे, सडलेली आहे. भारतातील प्रस्थापित ब्राह्मणी भांडवली व्यवस्था सामान्य जनांचे प्रश्न न सोडवता त्यांचे शोषण करणारी आहे.*
 *शहीद भगतसिंग एकदा म्हटले होते प्रस्थापित व्यवस्था जर देशातील सामान्य जनतेच्या प्रश्न सोडण्याऐवजी त्यांचे शोषण करत असेल तर ती व्यवस्था उलथून, तेथे शेतकरी-कष्टकरी-कामगार वर्गाला न्याय मिळवून देणारी व्यवस्था स्थापन करणे हे तरुणांचे कामच आहे.*
 *आज या देशात गरीब व सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांनी शिकूच नये,अशी व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. LPG अर्थात liberalization-globalization-privatization  या गोंडस नावाखाली देशात शिक्षणाचे सरसकट खाजगीकरण करण्यात येत आहे. शिक्षण व्यवस्था प्रचंड महागडी झाली आहे.*
 *गरीबाच्या मुलामुलींना शिक्षण व्यवस्थेपासून वंचित ठेवण्याचा मोठा कट देशात चालू आहे. याविरोधात आवाज उठवणे अत्यंत गरजेचे झाले आहे.*
 *त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वाभिमान व सत्य परिस्थितीचे मन जागृत करून त्यांच्या सामर्थ्याचा वापर सर्वकष शोषण व्यवस्थेचा अंत करून या देशात पुन्हा समतावादी समाजरना स्थापण करण्यासाठी झाला पाहिजे.*
 *याच उद्देशाने #भगतसिंग_स्टुडन्ट_फ्रंट_BSF या संघटनेची स्थापना करण्यात आली. आपण सर्वांनी या परिवर्तनाच्या लढ्यातील शिलेदार होण्यासाठी भगतसिंग स्टुडन्ट फ्रंट या क्रांतिकारी संघटनेत सामील व्हा आणि बाबासाहेबांच्या संवैधानिक मार्गाने उद्ध्वस्त करा ही विषमतावादी अन्यायी व्यवस्था.* 🤝🏾✊🏾

*उठ विद्यार्थ्या जागा हो !*
*BSF चा धागा हो!*
*इन्कलाब जिंदाबाद*✊🏾 
*जय भारत*🇮🇳 
*लाल सलाम*🇻🇳

*जयेश आहेर*
*भगतसिंग स्टुडंट फ्रंट*
*प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य*
*7028719713*