Friday, 9 December 2022

ब्राम्हणी (परंपरागत) बुद्धीजीवींचा तोरा - भाग एक

 ब्राम्हणी (परंपरागत) बुद्धीजीवींचा तोरा - भाग एक 

                      काळाच्या पटलावर समस्या जोखून त्यासाठी उपाययोजना देनारा खाऱ्या अर्थाने बुद्धीजीवी असतो.त्यालाच विचारवंत , तत्वज्ञही म्हणता येइल. तो जनसमुदायात वावरतो , समाजात जातो. तिथे समस्यांचा क्रम लक्षात घेतो.प्रथम प्राधान्याच्या समस्येला तो केंद्र बनवतो आणि त्यावर क्रांतीशस्त्रे तयार करतो.
                      
                           बुद्ध भारतभर फिरले आणि त्यांनी वर्णांतांच्या क्रांतीचे तत्वज्ञान दिले.शाळेसाठी लेकरे आणण्यासाठी फुले अस्पृश्य वास्त्यांत फिरले त्यातून त्यांनी जात्यान्तक क्रांतीचा शस्त्रागार तयार करायला सुरुवात केली.डॉ बाबासाहेब आंबेडकर लढे,मोर्चे उभे करत करत अस्पृश्यता ही प्रथम प्राधान्याची समस्या जागतिक पटलावर नेताना दिसतात. म्हणजे हे महापुरुष जनतेत जावुन समस्या जोखतात आणि त्या समस्येला धरुन क्रांतीशस्त्रे तयार करतात.म्हणून ते मुक्तीदाते ठरतात.                    
                             आजचे सांप्रत पुस्तकी विचारवंत स्वताला सर्वहरांचे बुद्धीजीवी म्हणून घेवुन घोर फसवणूक करताना दिसत आहेत.यांचे पुस्तकी ज्ञान हे जातवर्गीय समाजव्यवस्थेत केवळ आणि केवळ भागीदारी मिळवण्यासाठी, काहीतरी पदरात पाडुन घेण्यासाठी असते.पुस्तकी विचारवंत हे एकांगी बनले आहेत.त्यांनी आधिक प्रगल्भ आणि व्यापक बनण्याऐवजी ते तुसडे ,साचेबद्ध बनले आहेत. ते कधीही समाजव्यवस्थेत गेलेले नाहीत , किंवा जायला तयार नसल्यामुळे त्यांना आजच्या समस्या चर्चेच्या पटलावर आनता आलेल्या नाहीत.समाजव्यवस्थेला त्यांना निट समजून न घेता आल्याने त्यांच्या कलासाहित्यात सर्वहरांच्या समाजव्यवस्थेचे प्रतिबिंबही आपल्याला दिसत नाही .                   
                            यांची साहित्यकृती आणि बुद्धीमत्ता जर सर्वहारांच्या मुक्तीचा मार्ग देऊ शकत नसेल. त्यांचे संघर्षमय जीवन सुखकर करु शकत नसेल तर हे बुद्धीजीवी ब्राम्हणी (परंपरागत) बुद्धीजीवी आहेत.

                          आज घडीला सर्वहारांच्या शोषण पिडणाच्या , गुलामीच्या बेड्या आधिकाधिक घट्ट होत आहेत.देश रसातळाला जात आहे. आशावेळेला विचारवंत , बुद्धीजीवी म्हणवून घेनारे केवळ साहित्तिक कंड शमवत असतील तर ते ब्राम्हणी बुद्धीजीवी ठरतात, परंपरागत बुद्धिजीवी ठरतात.

गरज आहे जैविक बुद्धिजीवीची, चळवळीच्या लढ्यातून निर्माण बुद्धिजीवीची. 

नितीन सावंत परभणी 
9970744142

Sunday, 6 November 2022

ll सांडोनिया सुखाचा वाटा ... ll

 ll  सांडोनिया सुखाचा वाटा ... ll 
      
               संत भौतिक जगताप्रती अगदी एकजीव होते.त्यांना इहलोकीचेच जीवन हवे होते.इहलोकीचे जीवनच सुखकर , सुंदर बनवण्यासाठी त्यांनी हयात घालवली.तसा इतरांना संदेशही त्यांनी दिला. हे जे जीवन आपल्या वाट्याला आले आहे ते पुरेपूर जगा हे संतांचे सांगणे होते.निसर्ग , सौंदर्य संतांच्या मनाला भावाचे , आवडायचे.म्हणूनच सुफी संत बघा अगदीच ते उंचावर किंवा निसर्गरम्य ठिकाणी राहत असत.
              वारकरी परंपरेतील संत तुकोबाराय सुद्धा जगण्याचे आणि जीवनाचे महत्त्व सांगताना म्हणतात " सुखाचा वाटा सोडुन मुक्ती मागणारा किती करंटा आसेल ? " ह्या जीवणात आपल्या वाट्याला आलेले सुख उपभोगले पाहिजेत ते सोडून मुक्तीच्या मागे लागु नये.हातचे सोडुन पळत्याच्या मागे लागणाऱ्याला करंटाच म्हनावे लागेल. 
         वैदिक ग्रंथ आणि ब्राम्हण मंडळी , धर्मपुरोहीत काहीही म्हनो, आम्ही मात्र इहलोकीचेच जीवन सुंदरतेने जगण्याचा प्रयत्न करनार आहोत.आम्ही का बर जन्म घ्यायचा नाही ? आम्ही जन्म घेनारच. जन्माला येने , जीवन जगणे वाईट नव्हे.वैकुंठास जावुन काय मिळते ? तिथे समता आहे का ? दही भात आहे का ? समतेचा गोपालकाला आहे का वैकुंठात ? आमच्याकडे आम्ही एका ताटात समतेचा काला जेवतो.ते तुमच्या वैकुंठात नाही. त्यामुळे आम्हाला मुक्ती , मोक्ष , सायुज्यता नको.इहलोकीचे जीवन आणि त्यात वाट्याला आलेले सुख आम्ही उपभोगनार आहोत. वाट्याला आलेले क्षण आम्ही जगणार आहोत.

सांडुनि सुखाचा वांटा । मुक्ति मागे तो करंटा ॥१॥
कां रे न घ्यावे हे जन्म । काय वैकुठा जाऊन ॥ध्रु.॥
येथें मिळतो दहीं भात । नाहीं वैकुंठीं ते मात ॥२॥
तुका म्हणे मुक्ती नलगे । राहेन संतांची संगे॥३॥

नितीन सावंत परभणी 
9970744142

Thursday, 20 October 2022

ll शहिद सरमद ll

 ll  शहिद सरमद ll           

मर्ग अस्त दर ईं बादिया दुंबाल तुरा।
ई अस्त मआले-कार अज माल तुरा।
अब्बल मिहनत ओ आखिरश हसरत अस्त ,
ई माल कुनद हमेशा पामाल तुरा l 

( ज़रा सोचकर देख कि जिन्दगी का अंजाम मौत है। धन कमाने में दुःख सहना पड़ता है और इसके चले जाने पर भी दुःख होता है। धन-दौलत इनसान की बर्बादी का कारण बन जाती है। )
         
                  महाबलाढ्य जुलमी जेत्यांच्या उन्मत्त आणि विलासी जीवनावर थुंकणारे, त्यांच्या तोंडावर कडवे नग्न सत्य जगजाहीर करणारे अवलिये इतिहासाच्या पानापानावर जागोजागी ताठमानेने स्वाभिमान शिकवत उभे आहेत. यांच्याशिवाय इतिहास म्हणजे निरस कथांचा समुच्चय.असा एकांगी, स्वाभिमानहीन इतिहास कुनाला आवडेल ? 
                  सॉक्रेटिस, चार्वाक , मंसुर , सरमद किंवा चक्रधर घ्या, राजेमहाराज्यांच्या तोंडावर नग्न सत्य सांगताना यांनी थोडीही मान तुकविली नाही.मरने बेहत्तर पण माघार नाही असा यांचा रिवाज. 
                   असाच एक अवलिया म्हणजे सरमद.विलासी जीवन जगणार्यांच्या काळजावर घाव घालनारा.महाद्वारावर निस नागवा होऊन प्रस्थापितांच्या व्यवस्थेचे नग्न धिंडवडे काढनारा सरमद. 
                   कौरवांचा नरसंहार करुन पांडव नगरात प्रवेश करत असताना महाद्वारावर चार्वाक उभा होता.त्याने प्रश्न केला "धर्मराजा ( युधिष्ठिरा ) एवढा आनंदाने वाजतगाजत विजय संपादन करुन नगरात प्रवेश करत आहेस.या विजयाचे कौतुक करायला कुनी नातेवाईक तरी जीवंत ठेवलास की नाही ? " 
                   काळजाला बान मारावा तसा चार्वाकाचा प्रश्न होता.चार्वाकाला भरलेल्या धर्मसभेत सत्य बोलल्याबद्दल जीवंत जाळले गेले. दारा शिकोह सारख्या घरच्यांच्या हत्या करुन ,वडिलांना जेलात घालणाऱ्या आयत्या कमाईवर बादशाह बनलेल्या औरंगजेबाला " अंग का झाकत नाहीस ? "  या प्रश्नाला सर्मदने महाद्वारावर उत्तर दिले होते की " माझे अंग झाकले जाइल असे कुठलेही इमानदारीचे आणि स्वकामाईचे तुझे उत्पन्न नाही. " सर्मदला अनेक कारणे आणि आरोप लावुन त्याचे सर कलाम केले गेले. 
                   सर्मद शहिद झाला. पण संपला नाही .अजरामर झाला. विरुन गेला नाही. 
                   हेच नग्न प्रश्न दिल्लीच्या महाद्वारावर आजच्या  उन्मादी शासकांना विचारणारे सरमद उभे करायचे आहेत. 

नितीन सावंत , परभणी
9970744142

आकडेवाल्यांचे शास्त्र - मटका जुगार

आकडेवाल्यांचे शास्त्र 

 मोठ्या लोकसंख्येच्या गावांमधे आकड्यांची  दुकाने असतात . गावात सर्वच जन एकमेकांच्या ओळखीचे असतात . प्रत्येकाला एकमेकांच्या कुंडल्या माहिती असतात . आणि प्रत्येकचजन एकमेकांच्या समोर सोज्वळतेचा आव अनत आसतो . मी मोठा इमानदार आणि सरळमार्गी हे दाखवण्याचा प्रयत्न चालू असतो . 
म्हणून आकड्यांच्या दुकानात आकडे लावायला येनारा प्रत्येकजण चोरून आकडे लावत असतो . काहीजन तो आकडा चिठ्ठीवरच विचारपूर्वक तयार करून घेवून आलेले असतात . ती चिठ्ठी हळूच दुकानदाराकडे सरकवतात . कुठलेही संभाषण न होता दुकानदार ती चिठ्ठी घेतो . या दुकानदाराचे दुकान हा दुय्यम आणि देखाव्याचा व्यावसाय असतो मागे मात्र त्याची ही आकड्यांची दुकानदारी चालू असते . आकडे लावनार्यान्मधे एक पीएचडी करनारा वर्ग असतो . कागदावर चौकोन करून  , डब्बे मारून त्यांनी मोठा हिशोबच मांडलेला असतो आणि तासंतास त्याकडे बघत बसलेले असतात . हे आकडेशास्त्रातले मोठे तत्ववेत्तेच असतात . यांचा हा हिशोब वर्षातून एखादा आकाडा आणून देतो . हे आकडे लावून लावून काहीजन जागीच वाकडे होतात .तर काहिजनांच्या अंगावर आकडा येतो . काहीजण या क्षेत्रात आपले पाय कायमस्वरूपी रोवून धीरोदात्तपणे उभे असतात . चोरून आकडे लावण्याच्या प्रकारात तर आधी दुकानावर बाप येवून जातो आणि नंतर मुलगा . कधीतरी मुलाचा आकडा आला तर त्याच दिवसी त्याच्याबापाचेच आकडे चुकलेले असतात  . दोघांचेही आकडे एकाच दिवसी तेव्हाच येतील जेव्हा दोघेही एकत्र बसून सामोपचाराने दोघांचाही एकच आकडा लावतील . 

या क्षेत्रात थोड्याबहुत प्रमाणात महिलाही आहेत . महिला जशा तंबाखू खातात तशाच त्या आकडेही लावतात . पन त्यात व्रद्ध महिला जास्त असतात . 

या क्षेत्रात आकडे घेनारे श्रीमंत होतात . पन आकडे लावनारे श्रीमंत झाल्याचे पहाण्यात नाही . पन हे त्या आकडेशास्त्रज्ञांच्या व phd धारकांच्या लक्षात का येत नसावे . हा प्रश्न मला नेहमी पडतो . 
या अकडेशास्त्राची एक वेगळीच भाषा असते म्हणे . ती काही मला अवगत नाही आणि एकिण्यातही नाही . 
ज्या गावात या आकड्यांचे दुकान असते तिथे तिथे रस्त्याने लोळनारे चार दोन तरी सापडतात . खरे तर शुन्य आणि एक ते नऊ असे एकूण दहाच आकडे आहेत . पन हेच दहाजन आलटून पालटून आख्ख्या जगाला सतवत आसतात . आणि आपली किन्मत बदलवून घेत असतात . यामुळे आकडे लावनार्यांची मोठी पंचाईत होते . या क्षेत्रात आरक्षण आसावे काय ? या बद्दल आकडे लावनार्यांना विचारले पाहिजे . 
आकडे लावनार्यांसाठी काहीठीकाणी काही खास सुविधाही केलेल्या असतात . टेबल ,खुर्च्या , पानी ,कोरे कागद आणि पेनचीही व्यवस्था केलेली असते . जे कोनाच्याही बापाला घाबरत नाहीत आणि उजागरपने आकडे लावतात ते  बहाद्दर या सेवा सुविधांचा उपभोग आणि उपयोग घेत असतात .
आकड्यांची देवता म्हणून आपल्या ३३ कोटींमधे कुनी नाही . एखादा नविन भरम्हनुन आकडेबाबा लॉंच केला तर लॉंच करनार्यांची फुलटु कमाई होइल .हे आकडे लावनारे कुन्याही देवावर विसंबून न रहाता स्वता मेंदूचा वापर करुन आकडे लावत आसतात . हे क्रांतीकारीच म्हटले पाहिजे .

Tuesday, 18 October 2022

उत्सव बळीराजाच्या पुनरागमनाचा

 उत्सव बळीराजाच्या पुनरागमनाचा 

पुण्यवंत पाताळ लोकीं नेला ।
दरिद्री तो भाग्यवंत केला ।
चोरटयाचा बहुमान वाढविला ।
कीर्तिवानाचा अपमान केला ॥१॥
धुंद झाला तुझा दरबार ॥धृ०॥
                 - संत जनाबाई 
                 
                   आम्ही वाट पाहत आहोत ,बळीराजाच्या पुनरागमनाची. हजारो वर्षापासून आम्ही त्याला स्मरणात ठेवले आहे. तो हिरण्यकशिपुचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या, बाणासुराचा पिता आणि उषेचा आज्जोबा.भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व.सुमारे साडेतीन ते पाच हजार वर्षा पूर्वी होऊन गेलेला एक महानायक, महासम्राट,एक महान तत्ववेत्ता.
                         हजारो वर्षापासून आमच्या माय-माऊल्या दसरा दिवाळीला तुझ्या आगमनाचा उत्सव साजरा करतात बळीराजा. त्या मोठ्या आनंदाने तुझा राज्य येऊ दे म्हणतात. आज भलेही वामनाचे राज्य असो,आम्ही मात्र तुझ्याच पुनरागमनाची वर्षानुवर्षे आस लावून बसलेलो आहोत. आता आम्हाला हवा आहे, वामनाला पाताळात घालणारा बळीराजा. पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे , सर्वहारांचे अभेद राज्य उभं करणारा महासम्राट बळीराजा.शेतातील नांगराचा  सोन्याचा फाळ आणि अंगणातील सोन्याचे रांजण एवढा वैभवसंपन्न शेतकऱ्यांचा राजा आम्हाला पुन्हा हवा आहे.
दैन्य दुख दारिद्र्य दुर करणारा समतेचे राज्य उभे करनारा  बळीराजा आम्हाला हवा आहे. म्हणूनच आम्ही त्याची पुन्हा पुन्हा वाट पाहतो आहोत, नक्कीच तो एक दिवस येईल एक नवा क्रांतिकारक बनवून.... नवा नायक बनून... 
                  सुखासमाधाणाने नांदनाऱ्या बळीराज्यात एकदा वामन नावाची पिडा आली आणि कपटाने यज्ञाच्या खांबाला बांधुन आमचा बळीराजा संपवला गेला.
राजामारल्यावर त्याचे मुंडके लाथेने उडवले गेले.यज्ञदेवतेला रक्ताचा नैव्यद्य दाखवण्यात आला.नरमेध यज्ञ म्हणुन ते रक्त वैदिक पित होते.काय ही दशा केली गेली आमच्या पुर्वजांची. 
                 आम्ही आसुर कुळाचे वारसदार बळीचे वंशज वामनाची वैदिक संस्कृती कधीच माननार नाहीत. आमच्या धमण्यान्मधे बळीराच्या आसुर कुळाचे रक्त वाहात आसेल तर ते आम्ही कसे नाकारायचे.
                         होय आम्ही आसुर आहोत.आसुर सम्राट हिरण्यकश्यपचा पनतु ,प्रल्हादाचा नातु ,विरोचणचा पुत्र ,कपिल यांचा पुतण्या,बाणासुराचे पिता महासम्राट बळीराजा आमचा सख्खा पुर्वज होता.
आम्ही आमच्याच पुर्वजांचा गौरव करणार .
आम्ही बळीराजाचाच गौरव करणार...

वदनी कवळ घेता | नाम घ्या बळीराजाचे || 
सहज स्मरण करा |आपल्या कुळस्वामीचे ||
कृषीक्षेत्रात राबती | मायबाप दिनरात ||
करतात श्रमकरी शेतकरी |अन्नधान्याची भरभराट ||
करून स्मरण तयांचे | करावे अन्न सेवन ||
उदरभरण आहे | संपन्न होवो जीवन ||

रास्ट्रपिता जोतिराव फुले साहेब बळीराजाची बाजु घेताना म्हनतात .

आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर ||
होते रणधीर ||मरुत्यास ||
बळीस्थानी आले शूर भैरोबा ||
खंडोबा,जोतिबा || महासुभा ||१||

सद् गुणी पुतळा राजा मुळ बळी ||
दशहरा,दिवाळी ||आठविती ||२||

क्षत्रिय भार्या "इडा पीडा जाओ ||
बळी राज्य येवो "||अशा का बा ?||३||

आर्य भट आले,सुवर्ण लुटिले ||
क्षत्री दास केले ||बापमत्ता ||४||

वामन का घाली बळी रसातळी ||
प्रश्न जोतीमाळी ||करी भटा ||५||

-रास्ट्रपिता जोतीराव फुले.

जगतगुरु तुकोबाराय सुद्धा बळीराजाची बाजु घेताना म्हणतात.. 

हरि तु निष्ठुर ,निर्गुण  !
नाही माया बहु कठिण  !! 
नव्हे ते करिशी आण !
कवणे नाही केले ते !! 

बळी सर्वस्वे उदार !
जेणे उभारिला कर !!
करोनी कहर !!
तु पाताळी घातिला !!

जय बळिराजा ...

आपल्याही गावी , शहरात , वाड्यावर, वस्तीवर, तांड्यावर  ग्रामपंचायत कार्यालयात , ओट्यावर , चौकात ऑफिसात किंवा घरात चौरंगावर बळीराजाची प्रतिमा ठेवून पुजन करावे.विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे . वारकऱ्यांना घेवुन टाळ मृदंगाच्या गजरात पालखी सोहळा काढावा किंवा बैलगाडीने मिरवून काढावी. 

ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर 
9970744142

Monday, 19 September 2022

♦️श्रमाची कदर नसलेला देश

 ♦️श्रमाची कदर नसलेला देश

           नुकताच आम्ही पुर्णा तालुक्यातील सातेफळच्या कुंभार वस्तीला भेट दिली.सोबत होते महाराष्ट्र सरकारच्या मानव विकासचे आयुक्त मा.नितीन पाटील आणि त्यांचे इतर आधिकारी.विकासाच्या प्रक्रियेत न आलेल्या गरिब जाती जमातींसाठी काम करणारे हे आधिकारी कुंभार वस्तीत कुंभारकाम बघत होते.कुंभारकाम करणाऱ्या सर्व व्यावसाईकांना कशाप्रकारे मदत करता येइल जेणेकरून त्यांच्या व्यावसायात वृद्धी बरोबर नफाही जास्त कमावता येइल यासाठी सर्व आधिकारी आधिक माहिती देत होते.त्यांच्याकडील काही महत्वपूर्ण योजनाही सांगत होते.तशी चर्चाही करत होते.
                    मी अंगणात बसलेल्या एक दोन वृद्धांसोबत चर्चा करायला सुरुवात केली.बाजुला काही मडके वाळवत घातलेले होते.नवरात्रोत्सव जवळ आल्याने घटस्थापनेसाठी लागणारे ते छोटे आकाराचे गाडगे बनवले होते. मी म्हनालो " कितीला एक जाते हे मडके "
        वृद्ध आज्जोबा म्हनाले ' पाच रुपायाला एक " मी आवाक झालो फक्त पाच रुपये किंमत.हल्ली काय येतेय हो पाच रुपायाला ? "
         मी परत प्रश्न केला " यासाठी वेळ किती जातो , एक मडके बनवायला ? "
         ते म्हनाले " माती भिजवने , मुरवने , चिखल घट्ट करणे ही चार पाच दिवसाची मोठी प्रक्रिया आहे. " एक गाडग्याच्या चिखलाला आकार द्यायला विचारत असाल तर आर्धा तास जातो."
   आर्ध्या तासाच्या श्रमाचे फक्त पाच रुपये ??
ते म्हनाले " तिनशे मडके बमवायला सहा दिवस गेलेत.म्हणजे एका दिवसात ५० मडके बनवलीत.एक पाच रुपाला विकले जाते याप्रमाणे आम्हाला २५० रुपये रोज पडतो. "

मी म्हनालो " ही तर घोर निंदा आहे तुमच्या श्रमाची आणि कलेची." ते म्हनाले " साहेब या वंशाला घातलेय म्हणून करावे लागते बघा. नाहीतर कुनाला हौस आहे चिखल तुडवायची. आम्हाला पर्याय आहे का दुसरा काही , नाही ना . म्हणून हे सर्व . लोक भाव पाडून मागत्यात, उलटे रेटुन बोलतात . बरोबर वागणूक देत नाहीत. आमचे आम्हालाच माहिती आम्ही कसे जगतो ते. "

                     मी सिरिअस होतो आहे , हे लक्षात आल्यानंतर त्यांनी दुखातूनही हस्याची कमाई केलेली कला दाखवली.एक म्हातारा दुसऱ्या म्हाताऱ्याला म्हणाला " चोरी केली असती.पण आम्हाला करता येत नाही.आणि मार खाण्याजोगी तब्यतही नाही"
आम्ही सगळेचजन असलो.
तेवढ्या आपार मेहनतीतूनही ही मानसे आनंदी, सुखी रहातात.एकोप्याने रहातात.हसतात.दुख पोटात दाबुन ठेवतात.हजारो वर्षापासून अन्न खायला भांडी बनवून देनारा कुंभार आज व्यावसायाच्या रुपाने शेवटच्या घटका मोजत आहे.पाच रुपायासाठी तो चिखलाने हात भरवतो .तरी तो आनंदी रहातो. आणि इकडे नोकरदार वर्गाचा दोन महिने पगार नाही झाला तर बिपी वाढतो.

नितीन सावंत परभणी
9970744142
दिनांक २० सप्टेंबर २०२२ 

हस्तश्रमाने काम करणार्यांचे मोल करा

 "ताई कितीला दिला हा फडा?"
" भाऊ हा ५० आणि हा ६० रुपायाला"
त्यांनी उत्तर दिल्यानंतर मी परत प्रश्न केला 
"दोन्ही तर सारखेच दिसताहेत फरक काय ?" 
" भाऊ पानोळ्या,वजन सारखेच आहे फरक फक्त बांधण्यात असतो.दोरी गच्च कमी अधीक होते भाऊ म्हणून" 

मी दोनही फडे हातात घेवून बघत होतो.अगदी दोनही बाजूने.
त्या मायमाऊलीचे हृदय खालीवर होत होते.एखाद्याने मोठ्या श्रमाने हताला घाव सहन करुन एखादी सुंदर कलाकृती बनवावी आणि माझ्या सारख्याने क्षणात तिच्या उनीवा काढुन नावे ठेवून निघून जावे काय वाटत असेल त्या पोटासाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या जीवाला. 
 
रस्त्यावर संपूर्ण अंधार झालेला आहे. आणि तिला एवढा माल खपवून घरी जायचेय.फक्त दोनच फडे उरलेले आहेत.आणि ते ही मी बघत आहे. 

" भाऊ दहाविस कमी द्या,एवढे काय पहायले" 
"अहो ताई मी किंमत कमी करनार नाही " 

त्या रखुमाईला वाटले, मी किंमत करनार नाही म्हणजे आता मी निघून जातो का काय की.शेवटचा उरला सुरला माल असल्याने कदाचित मी घेनार नाही असा तिचा समज. 

परत ती म्हणाली "भाऊ मया स्वता हताने बनवलेले फडे हाइत.एक भी खराब नाही." 

"अहो मी त्या फड्याच्या पानोळ्या नाही बघत.त्या झिजूनच जानार आहेत ना.मी बघत आहे मुठ मजबूत असावी."
 "भाऊ मी स्वता बळ लाऊन आवळल्यात मुठी.. " 

" भाऊ कोनता घेता मग ? " 
"ताई दोनीबी" 
तिच्या चेहऱ्यावर हस्य उमलले. 
"हे घ्या एकशे दहा रुपये"  
भाव न करता फडे घेवून मी माझ्या घरी निघालो आणि ती तिचा पसारा आवरायला लागली .. घरी जाण्यासाठी ..

मी विचार करत होतो. कुठल्यातरी डोंगराळ भागातुन डोक्यावर भारे आना.मग त्या पानांचे बारिक बारिक पाते कट करा. त्याला एका गोलाकार पध्दतीने विना.ते कितीतरी वेळा हताला टोचते.नखात टोचल्यावर जिभाळी लागते.कुठेच जीव लागत नाही इतकी आग होते.तळहावर ते सर्व विनायचे.मग मुठीला घट्टपणे दोरी बांधायची.यावेळी स्त्रीयांना सर्व जीव एकवटून ती मुठ बांधावी लागते. त्या मुठेला नायलॉनची दोरी.मुठ ढिली असेल तर गिर्हाइक निघून जाते. 
एवढ्या बेजारीतुन त्या फड्याची किंमत किती तर 
पंन्नाससाठ रुपये.. 
आन यांच्या मॉल मधला झाडु कितीला तर एकशे दहा पासुन बोली ... 

एका दिवाळीत भाव न कमी करता तुम्ही सुद्धा एखाद्याच्या श्रमाचे मुल्य करु शकतात ... 

फार सोपी कृती आहे. करुन बघा. 
थेट शेतात पिकवलेले माळवं भाजीपाला घेवून आलेले शेतकरी पहाटेच रोडच्या कडेला बसतात.भाव न करता घ्या बर .. काय बिघडत नाय.. 

उन्हाळ्यात गरिबांचा फ्रिज घेवून बसलेले कुंभार... हंडा घेताना भाव कमी करु नका,  काय बिघडत नाय .. 

लोहाराकडुन विळा, कुऱ्हाड शेवटुन घेताना .. कुलपाची नवी चावी बनवुन घेताना भाव कमी करु नका काय बिघडत नाही ..

भाव कमी करायचा प्रयत्न मॉल मधे करुन बघा बरे .. 

दोन रु सुट्टे नाहीत म्हणून चॉकलेट का घेतो आपन .. त्याला ते दोन रुपयेच दे म्हनावे .. वाटलेच तर घेतलेले सामान वापस करा ..
दुसरीकडे घ्या ..
पन हस्तश्रमाने राबनार्यांच्या श्रमाचे मोल करा ..

नितीन सावंत परभणी 
9970744142

Saturday, 16 July 2022

कोण हे आहो सुखाचे सांगाती ? संत चोखोबाराय लेखमाला ३०

कोण हे आहो सुखाचे सांगाती ?

जन्मला देह पोशिला सुखाचा l काय भरवसा याचा आहे ll
ऐकलेची यावे ऐकलेची जावे l  हेची अनुभवावे आपणची ll
कोण हे आहो सूखाचे सांगाती। अंतकाळी होती पाठमोरे ll
चोखा म्हणे याचा न धरी भरवसा । शरण जा सर्वेशा विठोबाशी ॥

                             
                           शेवटच्या काळात संत चोखोबाराय अत्यंत एकटे पडले होते. त्यातूनच त्यांना अत्यंत करुणपणे मांडणी करणारा हा अभंग स्फुरला आहे. त्यांनी व्यक्त होने हा गुन्हा ठरला होता. त्यातून त्यांना आनखी एकटे पाडणारी परिस्थीती उद्दभवली होती. मंगळवेढ्याला वेशीच्या बांधकामासाठी त्यांना जावे लागले होते. त्यांच्या सर्व आशा, आकांक्षा स्वप्ने धुळीला मिळाली होती. त्यांचे निकटवर्ती संत मंडळ सोडून त्यांना ईच्छा नसतानाही वेठबिगारीच्या कामावर जाणे भाग पडले होते. या त्यांच्या जीवनात उद्धभवलेल्या या परिस्थीतून त्यांना हा अभंग स्फुरला आहे.
                            शेवटच्या काळात मन मारूण जगणे चोखोबारायांच्या वाट्याला आले होते. एकीकडे बडव्यांची पुरोहीतशाही तर दुसरीकडे वेठबिगारीच्या कामाला बळजबरीने नेनारी बिदरच्या राजाची सरंजामशाही, आशा दोनही व्यवस्थेचे. बळी चोखोबाराय ठरले होते.

                                आंबेडकरी चळवळीतील विद्वान आणि जेष्ठ लेखक ज. वि. पवार म्हणतात " निम्न जातीत जन्मलेल्या चोख्याने समताधिष्टीत समाजव्यवस्थेची अपेक्षा केल्यामुळे त्यांना भिंतीत चिरडून मारण्यात आले. ज. वि. पवारांसारखे अनेक दिग्गज लेखक चोखोबारायांची हत्याच झाली म्हणतात.फुले शाहु आंबेडकरी चळवळीचे लेखक, संघटक शुध्दोधन आहेर म्हणतात. " म्हणुनच चोखा डोंगा परि भाव नाही डोंगा अशी काळीज पिळवडून टाकणारी आर्त वेदना शब्दबध्द करणारा हा बंडखोर  संत मंगळवेढ्याच्या बुरुजात जिवंत गाडला गेला. संत चक्रधरांचे   शिष्यत्व पत्करणाऱ्या एका प्रवचनकार चांभाराला , देखील चुनखडीच्या खड्ड्यात बसवून आणि वरून असाहय्य वेदना, यातना देऊन ठार मारण्याची शिक्षा, देवगिरीच्या राजा रामदेवराय याच्या प्रधानाने, हेमाद्री पंडिताने दिली होती..... पुर्वास्पृश्य  चोखामेळ्याला जिवंत गाडणे सहज शक्य आहे ! आशा तर्हेने या देशातील शुद्रातिशुद्रांनी आध्यात्मिक मुक्तीदेखील रक्त सांडवूनच मिळविली आहे. "
                                आशा पध्दतीने चोखोबारायांच्या अंतकाळी कुणीच जवळ नव्हते. यातून मन मारून चोखोबाराय जंगले आणि मेले. संत चोखोबारायांचे वारसदार म्हणुन पंढरपुरात सर्वगोड यांची घरे आहेत. सर्वगोड हे आडनाव पंढरपुर सोडून अख्या महाराष्ट्रात नाही. त्या काळी चोखोबारायांसारख्या अस्पृश्य  जातींना आडनावे नव्हती. म्हणून त्याकाळी चोखोबारायांना चोखामेळा एवढेच म्हटले जाई. पुढे सर्व संतांनी त्यांचा 'चोखा चोखट निर्मळ'  म्हणून, अभंग लिहुन गौरव केला आहे. चोखोबा भक्ती परंपरेत निर्मळ आहेत. संतांच्या या गोड संबोधनाने चोखोबांच्या नावातील मेळा ( मैला ) जावून चोखोबाराय शुद्ध झाले गोड झाले, असे संतांचे म्हनने होते.संत नामदेवांनी संत चोखोबारायांचे स्मारक बांधुन चोखोबाचा शेवट गोड केला.यातूनही कदाचीत सर्वगोड हे आडनाव पुढे आले असावे. आशाच कुठल्यातरी कारणाने भविष्यात संत चोखोबारायांच्या वारसदारांना' 'सर्वगोड' हे आडनाव मिळाले असावे. सर्वगोड हे अडनाव अत्यंत गौरवशाली आहे. संत चोखोबारायांची परंपरा सांगणारे आहे. "या बाबतीत पंढरपुरतील माजी नगराध्यक्ष सुनिल सर्वगोड म्हणतात
                             "आजवर सनातनी लोकांनी देव आपल्या हातात ठेवला, संतांना छळले. माझे तर असंही म्हणणं आहे की, सनातन्यांनी चोखोबांना मारले आणि त्यांचा मृत्यू, गावकुस पडुन झाला असं सांगितले. हा अन्याय किती दिवस सहनकरायचा. त्यापेक्षा बाबासाहेबांच्या वाटेने आम्ही चाललो आहोत"  या पद्धतीने आंबेडकरी चळवळीतील दिग्गजांच्या भुमीका संत चोखोबारायांची वेस ढकलून किवा 'वेसीत गाडून हत्या केली गेली आशा स्वरूपाच्या आहेत.
                             येथील उच्चभ्रृ जातवर्गीय व्यवस्था आजुनही संत चोखोबारायांना न्याय दयायला तयार नाही. संत चोखोबारायांची झोपडी आणि त्यांनी स्वता बांधलेली दिपमाळेची जागा बळकावण्यात आली आहे. त्यांची शेवटची निषाणी सुद्धा सांभाळली गेली नाही. आजच्या पुराव्यानुसार मौजे शेगाव, सर्वे नंबर १० येथील ३० बिघ्याचे शेत चोखोबांचं होत." ती जमीन आज घडीला संत चोखोबारायांच्या वारसदारांकडे हवी होती.ती जमीन बळकावली गेली. ती चोखोबारायांच्या वारसदारांकडे नाही. इतर तिर्थक्षत्रांच्या ठिकाणी संत चोखोबारायाचे मंदिरे नाहीत.असेलच एखादे तर तेही उपेक्षीत दुर्लक्षीत आहे. " काही वारकरी म्हणवणाऱ्या काही फडांमध्ये आजही बहुजन जातीतील संतांचे अभंग घेवुन कीर्तन होत नाहीत. महिलांची प्रवचनं होत नाहीत. विठोबा बाटला म्हणून काही मोठमोठे महाराज आजही पंढरपुरच्या विठ्ठलमंदिरात जात नाहीत." ज्या अस्पृश्यतेच्या विरोधात, भेदाभेदाच्या विरोधात चोखोबारायांनी आणि सर्व संतांनी बंड केले ती अस्प्रश्यता,भेदाभेद तशीच चालू आहे.चोखोबारायांना काही न्याय मिळाला नाही.गावखेड्यातील  बरेच जन म्हणतात आता कुठे राहिला आहे जातीवाद. आशांनी गावपातळीवर लक्ष ठेवून पहावे गावात ' एक गाव एक पाणवठा झाला पण आजूनही एक गाव एक मसणवाटा'  होऊ शकलेला नाही, भेदभाव आजुनही तसाच आहे. त्या काळात संत चोखोबारायांना आपल्या सख्या पांडुरंगाची भेट घेता आली नाही. आणि आजही  गाव पातळीवर मातंग, चर्मकारांना पारावर, मंदिरात का आले म्हणून मारले जाते.मंदिराच्या आडोशाला पावसाच्या बचावासाठी उभे असलेल्या परभणी जिल्यातील आंबादास सावणेला मंदिर बाटवले म्हणून जीवे मारले जाते. आजही किर्तनातून वक्ते महाराजांच्या सारखे कीर्तनकार जाहिररित्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची टिंगलटवाळी करतात. म्हणजे संत चोखोबाराय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे  मानापसून स्विकारायचेच नाहीत असे ठरवूनच टाकले गेले आहे.
                              जग एवढे पुढे गेले आहे, तरिही भारतीयांनी जुनाट, बुरसटलेल्या संकल्पना काही सोडलेल्या नाहीत. आजुनही आम्ही आजुबाजुच्यांकडे माणुस म्हणुन  पहायला तयार नाहीत. आम्ही माणसाला जात, धर्म, वर्गाच्या  चष्म्यातून पहातो. कधी बदलणार आपण? किती चोखोबारायांनी हळहळ व्यक्त करत, निकृष्ठ जीवन जगत मरायचे ? आजही भंगी, वडार, घिसडी, पारधी, ढोर, बेलदार, पथरवट यांसारख्या कितीतरी भटक्या विमुक्त जाती अत्यंत हालाखीचे जीवन जगत आहेत.आशा जातीना गावात प्रवेश सुद्धा दिला जात नाही. "कोण्याही जीवाचा न  घडो मत्सर" ही संतांनी सांगितलेली शिकवण आपण विसरत चाललेलो आहोत का ?
                              आपल्या जगण्याचे मुख्य मूल्य माणुसकी असायला हवे.संतांनी माणुसकीच केंद्रबिंदू मानुन शिकवन दिली आहे. मग नेमकी ती माणुसकी तेवढी आपण सोडली आहे का ?
                               सर्व  संत आणि त्या संतांची शिकवण आपल्याला बरोबरीची असावी. आपला परका भेद किमान संतांमध्ये तरी करू नये. ठरवीक सतांनाच प्रसिद्धी आणि संत चोखोबारायांसारखे मात्र उपेक्षीत, हे अन्यायकारक आहे. त्यांची जातीअंताची शिकवण आपण अंगी बाळगावी. जातीभेद अस्पृश्यता, बंद हावी. त्यासाठी आपण काम केले पाहीजेत. कुणाची घृष्णा करणे, द्वेष करणे, हिंगलटवाळी करणे, हिने लेखने हे थांबले पाहिजे. गोरगरीबांत आजुबाला चोखोबारायच वावरत आहेत , असे आपल्याला वाटले पाहीजे. सर्वांना समान बंधूभावाची वागणुक आपण दिली पाहिजे. हीच खरी संत चोखोबारायांना श्रध्दांजली असेल.

                                 प्रस्तूत अभंगात संत चोखोबाराय म्हणतात " माणसाचे जीवन क्षणभंगुर आहे. माणुस कुठल्याही कारणाने ताबडतोब मरू शकतो. जगणे क्षणीक आहे. मृत्यू नग्न सत्य आहे.वास्तव आहे. माणुस जन्माला आल्यापासुन देहाचे भरणपोषण करत असतो. शरीराला सुख मिळावे म्हणून नाना प्रकार माणूस करत असतो. पण जीवनाची निश्चीती कुणाकडेच नाही."  संत चोखोबाराय हे सत्य सांगताना म्हणतात

                       "  की माणुस एकटाच येतो आणि एकटाच जातो. हे सदैव आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या वाईट प्रसंगी कुणीही साथ देत नाही अंतकाळी सर्वजन पाठमोरे उभे रहातात. लोक सुखाचे सांगाती असतात. दुख वाटुन घ्यायला कुणी नसते. म्हणुन कशाचाच आणि कुणाचाच भरोसा धुरु नये. देहाचा किंवा नातेवाईकांचा खात्रीशिर विश्वास धरू नये. सर्वांनी विठ्ठलाला शरण जावे."

                               संत चोखोबाराय वारकरी परंपरेबद्दल म्हणतात की आमचा समतेचा , माणुसकीचा हा प्रवाह आहे.कुनीही या आणि शुद्ध होऊन जा.

खटनट यावे शुद्ध होऊनी जावे l
दवंडी पिटी भावे चोखामेळा ll

नितीन सावंत परभणी
9970744142

मेहुणाराजा दर्शन संत चोखोबाराय लेखमाला २९

 मेहुणाराजा दर्शन

                                       मध्ययुगीन भारताच्या पटलावर जातीव्यस्थेने बरबटलेल्या लोकमनावर संत नामदेवांनी समतेचा, एकोप्याचा मळा फुलवायला घेतला होता. लोकांना माणुसकीचा धर्म शिकविने, भेदाभेदाच्या पलीकडे जावून एकात्म बनविणे हे नामदेवांच्या संत चळवळीचा मुख्य गाभा होता.नामदेवांच्या या कार्याचा सहवास संत चोखोबारायांच्या संपूर्ण कुटूंबाला लाभला होता.या संत नामदेवांच्या कार्याची एक शाखा संत निर्मळा आणि संत बंका महाराज हे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील मेहुणाराजा गावी चालवत होते. संत नामदेवांनी महाराष्ट्राच्या बोहर अनेक राज्यात आपल्या कार्याची छाप सोडलेले पुरावे आजही आपल्याला सापडतात. संत नामदेवांच्या शिकवणुकीचा सर्वात मोठा प्रभाव पंजाबवर आणि शिख धर्मावर आहे. संत नामदेवांप्रमाणे चोखोबारायांचा प्रभाव समाज मनावर पडला की नाही? संत चोखोबाराय ज्या भागातून जन्माला आले त्या परिसरातील समाजव्यवस्थने चोखोबारायांना स्विकारले की नाही? त्यांच्या जन्मभुमीत त्यांच्याप्रती लोकांच्या काय धारणा, भुमीका आहेत ?  हे समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. सवर्ण नामदेवांना कुठेही वावरणे आपली छाप टाकणे तितकेसे आवघड नाही परंतू अस्पृश्य मानलेल्या चोखोबांच्याप्रती भारतीय समाजमन कसे वागले, हे जगासमोर आले पाहीजे.

                    म्हणुन एकदा संत चोखोबारायांच्या जन्मभुमीला भेट देण्यासाठी अभ्यास दौराच ठेवला.स्थानिकच्या ग्रामीन लोकांच्या  गाठीभेटी घेता येतील, सहज कुठेही थांबून चर्चा करता येईल या हेतूने भोकरदनहुन दोन मोटार सायकलवरून चोखोबारांचे जन्मगाव बघायला आम्ही तिन लोकं निघालो. भोकरदन तालुक्यातील बरंजाळा लोखंडे गावचे अनिल भुतेकर, बाभुळगावचे ह. भ. प. शंकर महाराज राऊत आणि मी, असे आम्ही तिघांनी खेड्यापाड्यांचा रस्ता तुडवीत देऊळगाव राजाहून  मेहुणाराज गाठले. देउळगाव राजा ते देऊळगाव मही या दोन छोट्याशा शहरांच्या मधे मेहुणाराजा गावाची कमान रोडवरच लागते. कमानीवर " श्री संत चोखामेळा मेहुणाराजा जन्मस्थान "  असे पांढऱ्या अक्षरात रंगवलेले आहे. आम्हाला त्या भागाची माहिती देण्यासाठी देऊळगाव महीचे शिक्षक संतोष नागरे आमच्या आधीच मेहुणराजाला येऊन दाखल झाले होते. आम्ही कमानीतून गावात शिरलो गाव सुरू व्हायच्या आलिकडेच संत चोखोबारायांचे छोटेसे मंदिर आहे. समोर छोटासा सभामंडप आणि रिकामे मैदान आहे. संत चोखोबारायांच्या मंदिराच्या मागेच अगदी लागून निर्मळा नदीचे पात्र आहे.या पात्रात संत बंका महाराज आणि संत निर्मळा महाराज या दोघांच्या समाध्या आहेत.हे दोघे संत चोखोबारायांची बहिण आणि मेहुणे होत.या नदीवर आम्ही जेव्हा पोहंचलो तेव्हा तिथे दशक्रिया विधी चालू होता. स्थानिकच्या बऱ्याच लोकांकडून नवीन माहिती मिळाली. सर्वांशी चर्चा करून आम्ही मुख्य गावाची वेस, महाद्वार पहाण्यासाठी निघालो. हे गाव अत्यंत जुणे असल्याकारणाने या गावाला सर्व बाजूनी अत्यंत सुंदर अशी दगडी तड़बंदी होती. गावकरी अभय जाधव बोलताना म्हनाले की या गावाला पुर्वी १२ दरवाजे होते. आता चार दरवाजे आस्तित्वात आहेत. २०२० - २०२१ साली या गावची लोकसंख्या तिन हजार असावी असा त्यांनी अंदाज व्यक्ता केला. मेहुणाराजा गावची पाहाणी, फोटोग्राफी करून आम्ही सर्वजन संतोष नागरे यांच्या सोबत देऊळगाव महीला प्रा. कमलेश खिल्लारे यांच्याकडे निघालो. प्रा. कमलेश खिल्लारे हे संत चोखोबारायांच्या साहित्याचे अभ्यासक आहेत. संत चोबोबारायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात सरांचा मोठा सहभाग , वाटा आहे. १४ जानेवारीला दरवर्षी मेहुणाराजा गावी चोखोबारायांच्या जन्मोत्सवाला विविध कार्यक्रम असतात.त्यात सरांचे व्याख्याब व मार्गदर्शन असते. सबंध जिल्हाभर संत चोखोबारायांचे आभ्यासक म्हणून खिल्लारे सरांचा नावलौकीक आहे. खिल्लारे सरांच्या घरी गेल्यानंतर सरांनी पुस्तक देऊन छोटासा सत्कार केला. सरांच्या घरीच त्यांनी वाचनालय उभे केले. खिल्लारे सर याच भागात अनाथ , वृद्ध आणि निराधारांसाठी कबिरालय उभे करत आहेत. खिल्लारे सरांनी संत चोखोबारायांच्या संदर्भात बराचवेळ चर्चा केली. दरवर्षी होत असलेल्या चोखामेळा जन्मोत्सवाची माहिती दिली. काही क़िस्से सांगितले.राजकारणी वर्गही आता संत चोखोबारायांच्या जन्मभुमीत रमु लागला आहे. शिवाय वैचारिक , बुद्धीजीवी वर्गातील संत चोखोबारायांच्या बद्दल एक सकारात्मक चर्चा चालु आहे.असे सरांनी सांगितले.

                      बरिच चर्चा करुन प्रा. कमलेश खिल्लारे यांच्या घरून आम्ही संतोष नागरे यांच्या घरी जेवण करण्यासाठी निघालो. मी अनिल भुलेकर, ह.भ.प. शंकर महाराज राउत आदिंनी संतोष नागरे  यांकडे जेवणे केली. भुसुर चर्चा झाली. आणि "आम्ही तिघेजन पुढील प्रवासाला निघालो बुलढाण्याकडे.

                                भारतात जातीव्यवस्था अस्पृश्यता इतकी टोकाची आहे की ती माणुसकीचे काम करणाऱ्या संतांच्या बाबतीतही पाळली जाते. इतर संतांचा जेवढा जयजयकार झाला किंवा होतो आहे.त्यातुलनेत चोखोबांच्या वाट्याला अवहेलनाच आलेली दिसते आहे.इतर संतांची नावे ठेवुन वारसा जोपासाण्याची परंपरा कायम असताना चोखोबा नाव ठेवने या आजच्या जातीग्रस्त समाजव्यवस्थेला सुट होत नाही. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकोबाराय यांच्या आळंदी , देहू पेक्षा संत चोखोबारायांचे जन्मस्थाळ उपेक्षीत का ठेवले गेले असावे? सर्व संत सारखेच ना? मग मेहुणाराजा गावच्या विकासासाठी २०२० - २०२१ का  उजाडावे ? काही अपवाद सोडल्यास महाराष्ट्रभर तुम्हाला कुठेही चोखामेळा चौक , चोखामेळा संकुल,चोखामेळा कॉलेज असे काही दिसनार नाही. जातीग्रस्त समाजमान, जातीग्रस्त राज्यव्यवस्था याला जबाबदार आहे.
                                एकदा मी संत गोरोबाकाकांच्या जन्मगावी तेरला गेलो होतो.तिथेही संत गोरोबाकाकांच्या मंदिर वजा वाड्याच्या बाहेर , पायरीच्या बाजूलाच छोट्याशा मंदिरात उभी केलेल्या दगडी शेळेच्या स्वरूपात चोखोबा तिष्ठत उभा होता.आपल्या मित्राची भेट घेण्यासाठी.याही चोखोबाच्या मंदिराला रंगरंगोटी नाही.अगदी चोखामेळा मंदिर हे नाव मिटत आलेले आहे.महाराष्ट्रभर हा चोखोबा पायरीलाच उभा केला गेला. खिन्न मनाने मी चोखोबारायांचा निरोप घेतला. माझ्या समोर करुण स्वरूपात आर्त भावनेने गाणारा चोखोबा उभा राहिला.
                               
                    उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीनl
                    रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दिन ll

Friday, 15 July 2022

संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २८ वे ll विठु पाटलाला जोहार !

 ♦विठु पाटलाला जोहार ! ♦

सरंजामशाही आणि श्रौतस्मार्त धर्माविरूध्द अध्यात्मिक क्षेत्राचे बंड.

              नितीन सावंत परभणी
             मो: 9970744142

जोहार मायबाप जोहार l मी विठु पाटलाचा महार ll
हिशोब देतो ताबेदार l लंकेचा कारभार की जी मायबाप ll
                     संत एकनाथ महाराज

               भारतीय सामंतशाहीने सुरवातीला ‘प्रवाही जातीव्यवस्था’ जन्माला घातली आणि मग सरंजामशाहीने ‘बंद जातीव्यवस्था'. सरंजामशाहीत शोषित-पीडितात समान हितसंबध असते तर या सरंजामशाहीत वर्ग बनले असते.पण,या देशात जातीतही पोटजाती निर्माण झाल्याने ‘क्रमीक असमानता’ (graded inequality) जन्माला अल्याने येथे वर्ग बनु शकले नाहीत.या सरंजामशाहीच्या शोषनाच्या काळातील सर्वात महत्वाची पदे होती ती कुलकर्णी,सरदेशपांडे, सरदेसाई,देशमुख आणि पाटील यांच्याकडे.पट,पटवारी पासुन पाटील पद बनत गेल्याचा इतिहास आलीकडे उजेडात येत आहे.सुरुवातीला ही पदे ग्राम संस्कृती वसवण्यासाठी,तिचे जतन संवर्धन करण्यासाठी,शांतता,न्याय आबाधीत ठेवण्यासाठी होती.नंतर पुढे हिच पदे शोषन-पिळवणूक करणारी बनली.हे जेव्हा मध्ययुगीन काळात, शिवाजी राजांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी हे सरंजामशाहीतील चालत आलेली पदे बरखास्त करुन रोख रकमेत कारभार सुरु केला होता.रांझ्याच्या पाटलाला महाराजांनी धडा शिकवला असल्याचे आपण जानतोच. पण,शिवपुर्व काळात,या सरंजामदारांच्या विरोधात कुनालाही आवाज उठवता येत नव्हता.तसे केल्यास भिंतीत जिवंत गाडले जाई. जाहीर हत्या केली जाई.

                हे भौतिकवादी वास्तव लक्षात घेवून संतांनी आध्यात्मिक क्षेत्रात सरंजामशाही विरूध्द बंड उभे केले होते.मग हे आध्यात्मिक क्षेत्रातील बंड कुनाच्या विरूध्द होते ? तर पंढरपूरच्या विठु पाटला विरूध्द होते.यात सर्व संतांनी भूमिका अशी घेतली की आधी या विठु पाटलाला लाडिक जोहार घालून,ही सभोवतालची विषमता, भेदाभेद,अस्पृश्यता,जातीव्यवस्था, पिळवणूक लक्षात आणून द्यायचे.हे सर्व विठु पाटला समोर मांडायचे.नाही ऐकल्यास त्याच्या विरूध्द बंड करायचे.म्हणून सर्वच संतांनी आधी या विठु पाटलाला जोहार घातला.हा जोहार घालताना सर्व संत एकजात वेसकर बनले.हा लाडीक झगडा सुरु झाला तो विठु पाटलात आणि वेसकर संतांच्यात.

                     जोहार हे अभिवादन अस्पृश्य,निम्नजातीयांसाठी होते.अस्पृश्यांनी उच्चजातीयांना जोहार घालायचा असतो.आपण गुलाम, हरलेले आहोत ही त्या अभिवादनामागची भावना.आपली औकात सदैव लक्षात रहावी असे हे जोहार संबोधन.

                पण सर्वच संतांनी भेदाभेदाच्या भिंतींच मोडल्या होत्या.निम्नजातीयांचा जोहार सर्व संतांनी आनंदने स्विकारला आणि हा जोहार विठू पाटलाला घातला.सर्व संत त्या विठुपाटलाच्या दारात गेले आणि जोहार म्हनत आपले गाऱ्हाणे मांडायला लागले.जातीव्यवस्थेत जोहार घालण्याचे खरे अधिकार फक्त चोखोबांनाच, पण संत मंडळात उच्चजातीय ज्ञानेश्वर,एकनाथ यांनी सुद्धा जोहार घातला आणि समतेची वाट अधिक भक्कम केली.कुठलाही भेद ठेवला नाही.

         संत तुकोबाराय म्हणतात,
जोहार जी मायबाप जोहार I सारा साधावया आलो वेसकर ll

         संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
जोहार मायबाप जोहार l मी कृष्णाजी घरचा पाडेवार ll

          संत एकनाथ महाराजही ३० पेक्षा जास्त अभंगांतून स्वताला वेसकर संबोधतात.ते म्हणतात,

मी निर्गुणपुरीचा महार l करिती जोहार ll  एका जनार्धनी महार l पायाशी केला जोहार ll

              पण,हे संत काही जन्माने जोहार घालनारे वेसकर नव्हते की,अस्पृश्य नव्हते.पण त्यांना विठु पाटलाच्या वाड्यावर वैदिकांची फिर्याद न्यायची होती.धार्मीक दहशत मोडीत काढण्यासाठी त्यांना विठु पाटलाला समजून सांगायचे होते.सभोवतालची अस्पृश्यता,भेदाभेद लक्षात आणून द्यायची होते.धर्मपुरोहीतांचा छळ आणि देवा धर्माच्या नावे होनारी लुट संतांना विठू पाटलाच्या कानावर घालायची होती .

               इतर संतांच्यापेक्षा संत चोखोबाराय मात्र त्या व्यथा वेदना जाणणारे खरेच अस्पृश्य होते.त्यांना जोहार काय असतो हे अनुभवातून माहिती होते.म्हणून संत चोखोबारायांचा जोहार मानवी हक्कांसाठी आहे.

                  चोखोबा हे खरच वेसकर होते. जन्माने अस्पृश्य महार होते.जोहार कसा घालतात हे चोखोबांना अभंग लिहीताना अवघड गेले नसनार. चोखोबा वास्तवात जगले.संत चोखोबाराय विठु पाटलाला जोहार घालताना म्हणतात,

जोहार मायबाप जोहार l तुमच्या महाराचा मी महार ll  बहु भुकेला जहालो l तुमच्या उष्ट्यासाठी आलो ll
बहु केली आस l तुमच्या दासाचा मी दास ll
चोखा म्हने पाटी l आनिली तुमच्या उष्ट्यासाठी ll

         किंवा,विठु पाटलाचा महार l चोखा मेळ्याचा जोहार ll सकळ संतांचा कारभार l मज नाफराचे शिरी की जी मायबाप ll

              संत चोखोबारायांचा जोहार मानवी हक्कांसाठीचा आहे.अन्न, वस्त्र, निवारा या भौतिक गरजांच्या पुर्तीसाठी चोखोबा जोहार घालत आहेत. आमच्या पाटीत उष्ट्ये आन्न तरी टाका म्हनने ही मागणी अत्यंत हृदयद्रावक आहे.आता तरी विठु पाटलाला पाझर फुटायला हवा.एक विशेष असे की येथे संत चोखोबाराय अस्पृश्य असुन सर्व संतांचा कारभार बघत असल्याने निर्भयपणे सांगत आहेत.मानवी हक्कांसाठी चोखोबाराय जोहार घालत आहेत.

हा विठु पाटील कोण आहे?

               खरे तर हा विठु पाटील म्हणजे सभोतालचे जग आहे.अन्याय अत्याचार करनारी सरंजामशाही आहे.शोषण पिळवणूक करनारे श्रौतस्मार्त (श्रुती व स्मृती या धर्मग्रंथावर आधारित धर्म ) धर्माचे दलाल आहेत.त्यांच्या समोर हे संत आधी जोहार घालताहेत.त्यांना आशा आहे ही व्यवस्था बदलेन. यांना थोडातरी पाझर फुटेल पण हे जेव्हा जोहारावर शक्य नव्हते, तेव्हा संतांनी विठु पाटला विरुद्ध बंडखोरी केली.जोहार घालुनही त्याला फरक पडत नसेल.मायबाप म्हणूनही तो बदलनार नसेल तर मग आपन पुढचे पाउल उचलले पाहिजे ही नवी भूमिका पुढे आली.

        बंडाची मुख्य कळ काढुन दिली ती संत नामदेवांनी
आणि मग, संत नामदेव म्हनाले

पतीत पावन म्हणवूनी l आलो तुझिया दारा ll
पतीत पावन नव्हेसी म्हनोनी जातो माघारा ll
झेंगट घेवून हाती l दवंडी पेटवीन तिन्ही लोंकी ll
देवा पतीत पावन नव्हेसी l तु मोठा घातकी ll

             .पुढे त्यांच्या या बंडात संत गोरोबा काका,संत सावता महाराज,संत जनाबाई,संत चोखोबाराय,संत सोयराबाई,संत निर्मळा,संत बंका,संत कर्ममेळा,संत जगमित्र,संत नरहरी सोनार,संत कबिर, संत ज्ञानेश्वर महाराज आदी वेसकरांनी (संतांनी ) हिरहीरीने भाग घेतला.

     संत जनाबाई म्हनाल्या,
आरे आरे विठ्या l मुळ मायेच्या कारट्या ll
तुझी रांड रंडकी होवो l तुझे मढे बसो ll

            संत चोखोबारायांची पत्नी संत सोयराबाई म्हनाल्या,
जन्म गेला तुमचे उष्टे खाता l लाज न ये तुझ्या चिता ll

              हे विठु पाटला तुला लाज वाटत नाही का रे ? हा संत सोयराबाईचा सवाल आहे.

             पुढच्या काळात संत एकनाथ महाराज संत तुकोबाराय यांनी सुद्धा या विठु पाटलाच्या विरोधात बंड चालु ठेवले.

         संत तुकोबाराय म्हणतात,
हरी तु निष्ठुर निर्गुण l नाही माया बहु कठीन l
नव्हे ते करसी आण l कवने नाही केले ते ll
बळी सर्वस्वे उदार l जेने उभारीला कर l
करुनी कहर l तु पाताळी घातला ll

            हे विठु पाटला तु निष्ठुर आहेस. तुझ्याकडे मायादया नाही.तु बळीराजाला पाताळात घातलेस.

या विठु पाटलाशी अजुनही बंड चालु आहे.हे बंड चालु ठेवले आहे वारकरी मंडळींनी.ते सुद्धा दरवर्षी पंढरीला जावुन त्या विठु पाटलाला जोहार घालतात.आता हे बंड लाखोंच्या संख्येने उभे राहिले आहे.प्रत्येक मंदिरात सकाळी जोहार ने बंडाचा घंटानाद होतो.हे बंड सुरु आहे जातवर्गस्त्रीदास्यांतासाठी.हे बंड सुरु आहे आधुनिक विठु पाटला विरूध्द.हा विठु पाटील म्हणजे निमभांडवली निमसरंजामी जातवर्गीय ब्राम्हणी व्यवस्था.या विठु पाटलाला आता हे महागात पडनार आहे.श्रौतस्मार्त (श्रुती व स्मृती या धर्मग्रंथावर आधारित धर्म ) धर्माव्यवस्था नामोहरम होण्याच्या मार्गावर आहे.जोहारचा लोकजागर आता प्रबोधनात्मक बनला आहे.

म्हणून या सर्व संतांच्या सोबत विठू पाटलाला आमचा जोहार.



Tuesday, 12 July 2022

संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २७ वे ll संत चोखोबारायांच्या साहित्त्यातील घुसखोरी ll

संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २७ वे 
 ll संत चोखोबारायांच्या साहित्त्यातील घुसखोरी ll 

                         'अबिर गुलाल उधळीत रंग' या अभंगाचा पेटीवर परिचय देने सुरु होते.एक मोठे संगीतकार आपल्या विद्यार्थ्यांना तो अभंग वेगवेगळ्या पद्धतीने गाऊन दाखवत होते.

अबिर गुलाल उधळीत रंग l
नाथा घरी नाचे सखा पांडुरंग ll

एका विद्यार्थ्याने म्हनण्याचा प्रयत्न केला.त्याला थांबवत गुरुजी म्हनाले.अभंग चोखोबांचा आहे.भावविभोर होऊन गायला हवा.अगदी उत्कटता दिसली पाहिजे.उत्कट भाव चेहऱ्यावर आन.

पोरगा चेहऱ्यावर उत्कटता आनु पहात होता आणि मी पयारीला उत्कट भाव घेवुन उभा असलेला चोखोबा डोळ्यासमोर अनत होतो. 

उंबरठ्याशी कैसे शिवु आम्ही जातीहीन l
 रुप तुझे कैसे पाहु त्यात आम्ही दीन ll

पांडुरंगाच्या पायरीला उभा राहुन चोखोबा आर्जवं करत वास्तवाचे भान करुन देत आहे.सांग पांडुरंगा उंबरठ्याला कसे शिवु ?आम्हाला तु हिन जातीचे केलेस.सांग विठोबा तुझे रुप कसे पाहु? आम्ही दिन आहोत.गरिब आहोत.आम्हाला आत येण्याची परवानगी नाही देवा.
                                 इकडे संगीतकार गुरुजी हरकती काढत होते. आणि हरकत कशी काढावी हे खुबीने सांगत होते.आणि मी विचार करत होतो,काय हरकत होती चोखोबांना मंदिरात घेतले असते तर.जगबुडी येनार होती का ? किती निर्दयी समाजव्यवस्था होती आपली.दारात उभे असलेल्या चोखोबाला यांनी आत घेतले नाही.गुरुजी ओरडले लय सोडु नका लय.त्यांना विद्यार्थ्यांनी लय सोडलेली अवडत नव्हती आणि मला चोखोबाची ती अर्त करुणा सहन होत नव्हती.तो लय मर्यादा बळगत पायरीला उभा होता.
                                 
पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग l

                          आरे वर जा वर,उरचा स्वर घे सर ओरडले.मी ही मनात ओरडलो अरे चोखोबा जा ना वर,वर जा,घे वरची भूमिका.आरे तुझा बंका बरा शिव्या घालतो तो.काय रे ही केलवानी आर्जव.जा की वर पायरी ओलांडून मंदिरात.

वाळवंटी गाऊ आम्ही,वाळवंटी नाचु l
चंद्रभागेच्या पाण्याने आम्ही अंग अंग न्हाऊ ll

                            याला मंदिरात जा म्हनालो तर हा वाळवंटात गेला. चंद्रभागेच्या तिरी किर्तनाला.बघ ती जनी शिव्या घालते रे चोखोबा.अरे अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या.तुझी रांडरंडकी होवो,तुझे मढे बसो म्हनते ती आणि तु तर हार मानलीस.वाळवंटात गेलास तिकडे.चढ ना पायरी.कर विद्रोह,बंड.
                            सांगिताचे सरही विद्यार्थ्यांना असेच रागवले लय सोडुन गेले म्हणून. 

विठ्ठलाचे नाम घेवु होऊनी निसंग l

या चोखोबाला कोनाचाच संग नाही म्हणून हा म्हनतो होऊनी निसंग.अरे काय हे तुझे जीने.घुस ना त्या संतमंडळात.तुझ्या भक्तीबद्दल आम्हाला काहीही शंका नाही.बघ तिकडे नामदेव आहेत,जनाबाई आहेत,गोरा कुंभार आहेत,कबिर आहेत.आणि नित्संगाची भाषा करतोस.एकटा पडलास का ? खचलास का ? होऊनी निसंग म्हणजे काय ? का निसंग व्हायचेय चोखोबा ? 

आषाढी कार्तीकी भक्तजन येती l
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ll
चोखा म्हने नाम घेता भक्त होती दंग l

माझे मन लागेना,मी संगिताच्या क्लासमधुन बाहेर आलो . विचार करु लागलो,वारकरी सांप्रदायात नाथ फक्त एकनाथ महाराजांना म्हणतात.मग या अभंगातले नाथ तेच का ? 
नाथाच्या घरी पांडुरंगाने पाणी भरल्याचे,घरची कामे केल्याचे मी आइकलेय.पण तो नाचल्याचे एकले नाही.आणि नाथमहाराजांना हा नाचलेला अवडेल का ? बरे चोखोबांच्या नंतर ३०० शे वर्षांनी हे नाथ महाराज होऊन गेले.चोखोबा आधीच हे कशाला म्हनतील.म्हणजे हे ते नाथ नव्हेत. 
मग मी विचार करु लागलो,पांडूरंगाने चोखोबांचे ढोरे ओढले, त्याने जनी सोबत शेनाच्या गवऱ्या लावल्या,त्याने सज्जन कसायासोबत मांस विकले,मग तो नाचला कुणाकडे ?

अरे हो तो नामदेवांच्या किर्तनात नाचला.तो दोन जनांच्या सोबत नाचला एक मिरे सोबत पद घुंगरू बांध के आणि दुसरा नामदेवांच्या किर्तनात.
संत जनाबाईच म्हनतात 
नामदेव कीर्तन करी l पुढे देव नाचे पांडुरंग ll

                    शिवाय चोखोबा नामदेवांचे समकालीन.सोबत राहिलेले.चोखोबांनी नामदेवांची किर्तने एकलेली.म्हणजे चोखोबा नामदेवांच्याच किर्तनाच विठ्ठल नाचला असे म्हनत आहेत.
                    कोण्यातरी घुसखोराने नामा घरी नाचे सखा पांडुरंग चे नाथा घरी केले. नामा काढुन नाथा घुसवले. कारण चोखोबाराय नामदेवांना नाथ म्हनतच नव्हते.तिथे नामाच.नाथा नव्हे.काय ही दुर्दशा रे चोखोबा तुझी मरण्यापूर्वीही आणि मेल्यानंतरही.

संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २६ वे चोखोबारायांचा अनोखा वारसदार

संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २६ वे 

चोखोबारायांचा अनोखा वारसदार

" अंत्यविधी म्हणजे शेवटचा निरोप ! "
                      -  कृषीभुषण कांतराव काका देशमुख.

        झरी हे परभणी जिल्हयातील , परभणी -  जिंतूर रोडवरील  २० हजार लोकसंख्येचे गाव. झरी हे गाव म्हणजे भारताची छोटी प्रतिकृतीच. या गावात सर्व जातींचे घरे, लोकवस्त्या आहेत. या गावच्या विकासात कृषीभूषण कांतराव काका देशमुख यांचा फार मोठा वाटा मानला जातो. आज घडीला ६८ वर्ष वय असलेले काका हे अनेक चांगल्या कामांमुळे महाराष्ट्रभर लोकप्रिय आहेत. त्यात त्यांनी केलेले शेतीविषयक प्रयोग असतील, किंवा निसर्गाचे जतन संवर्धन असेल. जलसंधारणाची कामे असतील किंवा ' एक गाव एक स्मशानभुमी' ही त्यांची लोकचळवळ असेल.विधवा भगीनींची भाऊबीज घेने असो किंवा वृक्षलागवडीची चळवळ उभारणे असो.अशा अनेक गोस्टींमुळे काका लोकप्रिय आहेत.
                        त्यांच्या इतर कामावर अन्यत्र चर्चा करता येईल. आज त्यांच्या समतेच्या , बंधुभावाच्या , जातीअंतक, माणुसकीच्या कामाचा आढावा घ्यायचा आहे.
                    भारतात लोकशाही आल्यानंतर पटापटा भेदभाव अस्पृश्यता कमी होईल असे वाटले होते. पण ते तितकेसे वेगाने झाले नाही. गावगाड्यांत भेदभेद,अस्पृश्यता तसीच राहीली.जन्मभर हिनत्वदर्शक वागणूक आणि मृत्यूनंतरही प्रेतांची विटंबना होत राहिली.आजही गावोगाव भटके विमुक्त , आदिवासी आणि माजी अस्पृश्य जातींना भेदभावी वागणूक तर मिळतेच शिवाय त्यांना प्रेते जाळण्यासाठी हक्काचे , स्वच्छ मसनवाटे सुद्धा नाहीत.शेतकरी जातीतल्याही गरिब शेतकऱ्यांचे हेच हाल आहेत.गरिबांना प्रेत उचलायला खांदेकरीही मिळत नाहीत.प्रेतांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्मशानभूमीवरच्या वादांवरल्या बातम्या रोजच पेपरात झळकतात.
                    कांतराव काका देशमुख हे झरी गावचे सरपंच म्हणून वयाच्या २२ व्या वर्षी गावच्या कारभारात हस्तक्षेप करायला सुरुवात करतात.तेव्हापासून गावातील प्रत्येकाच्या सुखदुःखात न चुकता आवर्जून सहभागी होने हे त्यांचे कर्तव्य बनते.आपला गावकरी म्हणून ते प्रत्येक अंत्यविधीला जातीपातीचा विचार न करता जेव्हा हजर होतात, तेव्हा त्यांना पहायला मिळते ते जातीजातींचे स्वतंत्र मसनवाटे आणि हगंदरीत होनारी प्रेतांची विटंबना.गरिब जातीला प्रेत जाळण्यासाठी पुरेसे लाकडे मिळत नसत.घानीने भरलेले लाकडे टाकुन तसेच प्रेत जाळले जायचे.
                    नदिपात्रात प्रेत जाळत असताना पुर आला तर अर्धवट जळालेले प्रेत वाहुन जायचे.सलग पावसाळ्यात उघड्यावर जाळलेले प्रेत तिन तिन दिवस आर्धवट भिजत पडुन रहायचे.गरिब जातींच्या या प्रेतांना कुनीही वाली नसे . कुनी मदत करत नसे . यामुळे प्रेतांची विटंबना होइ.काही वेळेला टायर टाकुन प्रेत जाळले जाई. काही गरिब जातींना प्रेत जळण्यासाठी हक्काची जागाही नसे.गावातील श्रीमंत लोक पावसाळ्यात नदीपात्रात अंत्यविधी करता येत नाही म्हणून आपल्या स्वताच्या शेतात अंत्यविधी करत असत, परंतु ज्या जातींना शेतच नसे त्यांच्या प्रेताचा जाळण्याचा प्रश्न नेहमी उभा राही.
                    तारुण्यात या सरपंच झालेल्या युवकाच्या मनावर ही समस्या अत्यंत खोलवर घर करुन गेली आणि त्यांनी तेव्हाच एक संकल्प सोडला की, भविष्यात आपल्या गावात सर्वांत सुंदर, स्वच्छ, रमणीय आणि अंत्यविधीला आलेले लोक शांततेत बसुन शकतील अशी एक स्मशानभूमी बांधायची.
                    पुढील काळात त्यांनी गावात दवाखाना आनला,गावच्या विकासासाठी अनेक संस्था, सरकारी कार्यालये गावात आनली.त्यात काही वेळा जमीन दानही द्यावी लागली.पुढील काळात मात्र त्यांना स्वप्नातील आदर्श स्मशानभूमीच्या उभारणीसाठी गावात सरकारी किंवा गायरान असलेली जमीन काही उपलब्ध झाली नाही.साडे बारा हजार एक्कर शेती क्षेत्रफळ असणाऱ्या या झरी गावाला गायरान जमीन किंवा सरकारी जमीन नव्हती.गावात सर्वप्रकारच्या सेवा सुविधा आल्यानंतर काकांनी या स्मशानभूमीच्या उभारणीला हात घातला.काकांनी स्वखर्चाने एक एक्कर जमीन विकत घेवुन भव्यदिव्य अशी भली मोठी स्मशानभूमी बांधुन काढली.नेहमी सरपंच असणाऱ्या काकाकडे नेमके यावेळी सरपंच पद नव्हते.तसे ते २५ वर्षे सरपंच पदावर होते.यावेळी मात्र गावासाठी हे महत्वाचे काम करायचे आहे म्हणून त्यांनी सरपंच पद नसतानाही फार मोठा खर्च केला.ह्या स्वखर्चाने विकत घेतलेल्या जमीनीवर, बांधलेल्या स्मशानभूमीत त्यांनी देशी वृक्षांची लागवड केली.वड , पिंपळ , चिंच , कवठ , कडुलिंब, बेल , चंदन ही ऑक्सिजन देनारी झाडे त्यांनी बांधलेल्या स्मशानभूमीत लावली.ऑक्सिजन पार्क त्यांनी उभा केला.अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्यांना शांततेत बसता येइल यासाठी त्यांनी स्मशानभूमीत भरपूर बाकडे टाकले.शेवटचा निरोप देताना लोकांना आरामात बसता येइल , याप्रकारची व्यवस्था काकांनी केली.कंपाऊड वालवर म्हणी पेंट केल्या. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.स्मशानभूमीत देखरेखी साठी पगारीवर एक कुटुंब नियुक्त केले.ज्या जातीत दफनविधी केले जातात त्यांनाही काकांनी जमीन उपलब्ध करुन दिली. प्रेते जाळण्यासाठी जास्त लाकूडफाटा लागु नये , विनाकारण वृक्षतोड होऊ नये म्हणून त्यांनी अंत्यसंस्कार होताना शवदाहिनीची व्यवस्था केली. ही स्मशानभूमी बांधताना त्यांनी पुढील ५० वर्षाचा विचार करुन ही उभारणी केलेली आहे.त्यांच्या गावी आज घडीला एका वर्षात  ६२ ते ६३ लोक मृत्युमुखी पडतात.एका प्रेताचा अंत्यविधी होऊन राख उचलेपर्यंत किमान तिन दिवस लागतात.मग पुढील काळात ही संख्या वाढनार म्हणून त्यांनी एकाचवेळी पाच ते सहा प्रेते जाळता येतील अशीही व्यवस्था केलेली आहे. आणि याप्रकारे राज्यभर कौतुक होइल अशी सुंदर स्वच्छ स्मशानभूमी काकानी उभी केली.सर्व वृत्तपत्रे , चायनल एवढेच काय बीबीसी मराठीनेही त्यांच्या या माणुसकीच्या, निस्वार्थी कामाची दखल घेतली आहे.
                    एकदा सहज रस्त्याने जाताना स्वखुशाली विचारण्यासाठी काकांनी एकजनाला काय चाल्लेय ? कसे आहात ? हा प्रश्न केला.तेव्हा ती व्यक्ती म्हनाली वडिल वारले आहेत, परंतू अंत्यविधीचे सामान बांबू वगैरे आनण्यासाठी पैसे नाहीत.त्या अंत्यविधीला काकानी त्वरीत मदत केली. आणि लाकडी दांड्यांवर आणि बांबूवर होणारा खर्च टाळण्याच्या दृष्टीने काकानी गावला स्टीलची तिरडी तत्वरित दान दिली.  परंतू त्यांच्या लक्षात आले की स्मशानभूमी दुर अंतरावर आहे.तिरडीवर प्रेत नेण्यासाठी खांदेकरी तयार होत नाहीत.आणि अल्पसंख्याक जातींना तर खांदेकरी मिळने मुश्किल.मोठ्या जातीतले कुनी वारले तर ते लोक शहरातून स्वर्गरथ मागवायला लागले.त्यासाठी पाच हजार रुपये द्यावे लागत.गरिबांना स्वर्गरथ कुठून परवडनार.हा सर्व वृत्तांत जानुन काकांनी गावाला स्वर्गरथ दान देण्याचे ठरवले.परंतू पुढे त्यांच्या मुलिने म्हणजे जिजामाता कृषीभुषण मेघा विलासराव देशमुख यांनी आपल्या दिगवंत पतीच्या नावे गावाला स्टिलचा मजबूत असा ' विलासरथ' नावाने स्वर्गरथ दान दिला.
                    पुढे ठरले असे की काकांच्याच पेट्रोल पंपावरुन स्वर्गरथाच्या ट्र्याक्टर मधे फ्रीमधे पेट्रोल भरुन , काकांनीच उभारलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायचे आणि मृत व्यक्तिला शेवटचा हार कांकाच्या काकाकडून राहिल.
                    ज्यांना स्मशानभूमी नव्हती त्यांना हक्काची स्मशानभूमी तर काकांनी दिलीच.परंतू ज्यांना आयुष्यभर कुनी हारही घातला नसेल आशा गरिब ,वंचीत,शोषीत,शेतकरी , शेतमजूर पिडीताला शेवटचा हार मात्र काकांचाच असतो.हे फार मोठे आणि प्रेरणादायी काम आहे.मंगळवेढ्याच्या वेशीतील ढिगार्यातून संत चोखोबारायांचे हाडे शोधुन आनुन पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात संत नामदेवांनी चोखोबांची समाधी बांधली.आणि त्या समाधीवर पहिला हार संत नामदेवांनी घातला.कृषीभुषण कांताराव काका देशमुख म्हणजे आधुनिक नामदेवच. निराधार , गरिब, शोषीत , वंचीत समुहातील हजारो चोखोबांचे अत्यंत सन्मानाने अंत्यसंस्कार करणारे काका हे खरे वारकरी होत.संत चोखोबाराय ज्या आत्मसन्मानाची लढाई लढत होते. त्या लढाईला कांताराव काका देशमुख यांनी आपल्या हाती घेतले आहे. चोखोबारायांराख्या कलंकित जीवन वाट्याला आलेल्यांना मरताना तरी कलंकित्वात मरु देवु नये म्हणून काकांनी केलेले काम अत्यंत उंचीवरले आहे.
                    सुरुवातीला लोकांचा गैरसमज असा झाला की , ही उभारलेली स्मशानभूमी केवळ स्वजातीसाठीच आहे.गावात तशाप्रकारची सुप्त चर्चा होत राहिली.पुढे गावात बोद्ध समाजातील ग्रहस्थ होनाजीराव सावंत वारले. काका तेव्हा मुंबईतला होते.हातातील कामे टाकुन ते मुंबईतहुन गावी आले आणि होनाजीराव यांच्या कुटूंबातील सदस्यांशी बोलुन नव्या स्मशानभूमीत पहिला अंत्यविधी केला.पुढे लोक पुन्हा म्हनायला लागले की ही स्मशानभूमी मागासवर्गीयांसाठी बांधली आहे . नंतरच्या काळात काकांच्या कुटूंबातील व्यक्ती म्हणजे सख्खे भाऊ प्रसादराव देशमुख वारले.हा दुसरा अंत्यविधी करुन काकांनी ही स्मशानभूमी सर्वांसाठी आहे हे सिद्ध केले.त्यानंतर सर्वांचे अंत्यसंस्कार या स्मशानभूमीत व्हायला लागले.काकांच्या या स्मशानभूमीत पहिला अंत्यसंस्कार माजी अस्पृश्य जातीतला झाला, हे फार मोठे समतेचे माणुसकीचे पाऊल आहे.कारण याच परभणी जिल्ह्यात आजही मातंग , बोद्ध , चर्मकार, आणि भटक्या विमुक्त जातींना हक्काच्या स्मशानभूमी नाहीत.प्रेते जाळण्यासाठी सतत संघर्ष होतो.तासनतास प्रेत तसेच ठेवुन प्रचंड वाद होणाऱ्या घटना आजही घडतात.भांडणे विकोपाला जातात.त्या दृष्टीने हे काम मोठे महत्वाचे माणुसकीचे आहे.
                    दोन हजार साली सुरु केलेले हे काकांचे काम आज परभणी आणि मराठवाडाभर लोकचळवळ  बनले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गावांत आता 'एक गाव एक स्मशानभूमी' ही संकल्पना राबवली जात आहे.यासाठी अनेक गावांनी पुढाकार घेतला आहे.८० ते ९० गावांत या दृष्टीने काम सुरु आहे.झाडे लावुन , शवदाहिनी बसवुन , सर्व जातींना प्राधान्य देनार्या आणि काही अटिंची पुर्तता करणाऱ्या गावातील स्मशानभूमीला काकांनी १ लाख रुपयाचे बक्षिसही जाहिर केले आहे.खरे तर ही लोकचळवळ राज्यदरबारी जावी.बाबा आढाव यांच्या एक गाव एक पानवठा या लोकचळीसारखी याही संकल्पनेची दखल घेतली गेली पाहिजे.कृषीभुषण कांतराव काका देशमुख यांचे नाव देवुन एक गाव एक स्मशानभूमी ही योजना सरकारने कायदेशीररित्या राबवावी.प्रत्येक जातीच्या स्मशानभूमीला स्वतंत्र निधी देवुन जातीजातीत फुट पाडनारे जातीवादी काम सरकारने थांबवावे.आणि गाव तिथे एक स्मशानभूमी उभारणीला, समतेच्या मार्गाला सरकारने स्विकारावे.कांताराव काका देशमुख यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रभुषण देवुन त्यांचा सन्मान करावा.
                    काका म्हणतात " आपण जन्माला येताना काही कुठे अर्ज केला नव्हता की मी अमुक जातीतच जन्माला यावे.कोण्या जातीत जन्माला यावे हे आपल्या हतात नसते.जात ही अपघाताने मिळालेली असते.ती काही कर्तबगारी नव्हे.म्हणून ती मिरवण्याची गोस्ट नाही. जातीभेद करु नये.आणि मरताना कुणाच्याही प्रेताची विटंबना होऊ नये.मृत पावलेल्या देहाचे अत्यंत सन्मानाने अंत्यसंस्कार व्हावेत या मताचा मी आहे. अंत्यविधी म्हणजे शेवटचा निरोप ! "
                    काकांच्या या विचारांना साष्टांग दंडवत..
                    काकांचा संपर्क : मो : 9423776600

नितीन सावंत परभणी
9970744242

संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २५ वे चोखोबांचे वारसदार

 संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २५ वे 
चोखोबांचे वारसदार


                       महाराष्ट्रातील लोकमनावर सर्वाधीक प्रभाव आहे तो साधू संतांचा. संत, महाराज, गोसावी, बुवा, बाबा, मुनी म्हटले की सर्वसामान्य लोक आदराने मान झुकवतात.साडे सातशे वर्षापूर्वी सुरू केलेला माणुसकी शिकवणारा वारकरी धर्म कुठलीही साधने नसताना संत नामदेव महाराजांनी पंजाब पर्यंत नेवून पोहचवला होता. महाराष्ट्रातील कुठल्याही कानाकोपऱ्यात जा तुम्हाला संतांचे अभंग गुणगुणनारे आणि त्यांचे किस्से सांगणारे लोक भेटतीलच. 
                         राजाश्रय नसताना आणि उच्च जातीयांना, भारतीय सरंजामशाहीला हे साहित्य मान्य नसतानाही ग्रामीण जनतेने सतांचे  विचार जगवले, जीवंत ठेवले. काही लोकांनी हा संतांचा समानतेचा, माणुसकीचा विचार जीवंत ठेवण्यासाठी आयुष्य पणाला लावले होते. अत्यंत हालाखीचे जीवन जगत संतांचे साहित्य, त्यांची शिकवण पुढच्या पिढीला कळावी,हा विचारांचा ठेवा जीवंत रहावा म्हणून, अनेक लोक राबलेले आहेत. संत एकनाथ महाराज आणि संत तुकोबारायांच्या समतेसाठी केलेल्या त्याग आणि समर्पनानंतर महाराष्ट्रात त्यांची प्रेरणा घेवुन असंख्य दिग्गज समतेसाठी पुढील काळात पुढे आले होते. 
                         त्यातीललच एक नाव म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे होत.ते वारकरी परंपरेतूनच जाती अंताचे, अस्पृश्यता निर्मूलनाचे काम करण्यास पुढे होते. संत चळवळ त्यांची प्रेरणा होती. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे, संत गाडगे महाराज यांसारखे अनेक महापुरूष संत चळवळीची प्रेरणा घेऊन जाती अंताचे काम करत होते.सत्यशोधक चळवळीचे नेते मुकुंदराव पाटील यांनी " विठोबाची  शिकवण" हा ग्रंथ लिहुन आपली वारकरी नाळ आणि सांस्कृतिक परंपरा जगासमोर आनली होती. मुकुंदराव पाटील यांनी सत्यशोधक चळवळीत विधायक प्रबोधनांचा पायांडा पाडला होता.फुले शाहु आंबेडकरी चळवळ आणि सत्यशोधक चळवळ या दोनही चळवळीचा पाया संतांचे विचारच होते. 
                                    याच काळाच्या टप्यावर विदर्भातले एक नाव म्हणजे गणपती महाराज होय. "आमरावती जिल्हयातील मंगळुर दस्तगीरचे हे, गणपती महाराज उर्फ हरि महाराज विठोबा अभूतकर होते. दशक १९३० चे तर त्यांचा कार्यकाळ १८८५ ते १९४९ चा होता.गणपती महाराजांनी वारकरी चळवळीतून प्रेरणा घेऊन विदर्भात जातीअंताची चळवळ उभी केली होती. नव्हे ती त्याच्या समक्ष अंतरजातीय विवाह सोहळे लावून पूर्णत्वास नेली होती. विदर्भ हा तसा,अत्यंत प्रेमळ आणि माणुसकी जपणारा प्रांत. आपल्या सभोतालची विषमता, जातीभेद बघून गणपती महाराजीनी विरोधकांना न जुमानता अस्पृश्यता निर्मुलनाचे , जातीअंताचे काम त्याकाळी केले होते. पंढरपुरला जाणाऱ्या लोकांसाठी,पंढरपूरहुन त्यांनी डोक्यावर विठ्ठलमूर्ती आजून तिची स्थापना मंगळूर दस्तगीरमध्ये केली होती.त्यांनी विठ्ठल मंदिर बांधुन सार्वांसाठी खुले केले होते. या मंदिरात त्यांनी अस्पृश्यांना सुध्दा प्रवेश दिला होता. बाहेर ताटकळत आर्जव करत उभा असलेला चोखोबा डोळ्यासमोर अनला की गणपती महाराजांनी केलेले काम महत्त्वाचे वाटू लागते. सर्वांना भक्तीचे आधिकार बहाल करणारे गणपती महाराज अस्पृश्यांना मंदिरात आनतात,जातपात मानत नाहीत. म्हणून ते त्याकाळी ब्राम्हणांच्या टिकेचे लक्ष बनले.तेव्हा महाराज म्हणायचे मी आनलेली ती विठ्ठल मुर्ती आहे. तिचे दर्शन कोणाला घेवु द्यायचे हे मीच ठरवणार. नाहीतर त्या मुतींवर मी धुनं धुइल ” पुढे गणपती महाराजांनी प्रबोधन करत जात सांगूं नका, जात पाळु नका हा अग्रह धरला भाणि आपल्या डोळ्यासमोर अनेकांची अंतर जातीय लग्ने लावली.
                                    अस्पृश्य जाती व सवर्ण जातींचा रोटीबेटी व्यवहार त्यांनी सुरु करून दिला. एका पंगतीत सर्वांनी जेवायला बसण्याचे संत सोयराबाईचे स्वप्न गणपती महाराजांनी पुर्ण करून दाखवले. याप्रकारे समतावादी काम करणाऱ्या गणपती महाराजांच्या केलेल्या कार्याचा गौरव व्हायला हवा होता. परंतू प्रस्थापीत उच्चभ्रू जातीव्यवस्थेने यांच्यावर अजात चा  शिक्का मारला.अलीकडे अरविंद जोषी यांची शणपती महाराजांच्या कार्यावर अजात नावे डॉक्युमेंटरी झाली आहे. त्यात सुरवातीलाच सदानंद मोरेंचे 'जातीव्यवस्थेच्या विरोधात टोकाची भुमिका घेतली की जातीव्यवस्था तर मोडली जात नाही उलट तुमचीच एक जान बनते "  असे बोल्ड आणि व्यवस्थेला पूरक स्टेटमेंट घेवून अत्यंत एकांगी व एकप्रवाही स्वरुपाची ही डॉक्युमेंटरी जोषींनी बनवली आहे. 
                                    जोषींनी आणि मोरेला विचारले पाहिजे की जातिव्यवस्थेला टोकाचा विरोध केल्यामुळे जातीव्यवस्था मोडतच नाही म्हणून काय जातीवस्थेला विरोधच करायचा नाही? आपण समाजव्यवस्थेपासून बाहेर फेकले जावू नये म्हणून आपल्या आजुबाजूला काहीही चालुदाद्यायचे का ? अमानवीय -प्रथा परंपरांचा विरोध करायचा नाही का? किती सांगू तरी न ऐकती बटकींचे । पुढे शिंदवीचे रडतील || ही तुकोबारायांची भुमीका कशी होती? मऊ की टोकाची ? गणपती महाराज विदर्भ सोडून इतरत्र जन्माला आले असते तर त्यांची निश्चीत घेतली गेली असती, शिवाय ते पडले दुय्यम शेतकरी जातीतले.ते उच्चजातवर्गीय असले असते तर सावरकरांना भारतरत्न द्या म्हनणार्यांनी गणपती महाराजांनाही भारतरत्न दया म्हणून मागणी केली असती. स्वतंत्र्या नंतर शाळेच्या दाखल्यावर कुठली जात लावायची या समस्येतून प्रस्थापित व्यवस्थेतल्या उच्चभ्रु शिक्षकवर्गाने जातीच्या रकान्यात अजात शब्द लावला म्हणून हे गणपती महाराजांचे भक्त अजात'' बनले. यात दोष गणपती महाराजांचा आहे का? तुमच्या ब्राम्हणी व्यवस्थेचा तो दोष आहे. केरळातील दिड लाख विदयार्थ्यांनी एकाचवेळी जात टाकुन दिल्याचे उदाहरण डोळ्यासमोर आहे. हे मोरे-जोषी त्यांना अजात म्हणतील का ?  अजात' ही गणपती महाराजांच्या कार्याची ब्राम्हणी व्यवस्थेने केलेली टिंगलटवाळी आहे . तरीही अरविंद जोषांनी एकसुरी का होईना परंतू गणपती महाराजांचे कार्य जगासमोर आनल्या बद्दल त्यांचे अभिनंदन.दलितांचे बुद्धीजीवी म्हणुन या डाक्युमेंटरीत ज.वी पवार, रावसाहेब कसबे, लक्ष्मण गायकवाड़ हवे होते किंवा विदर्भातील जातीअंताचे प्रबोधन करणारे मा. म. देशमुख, डॉ. अशोक राणा, तरी जोषीनी बुध्दीजीवी म्हणून स्विकारायला हवे होते.पर्यंत या बुद्धीजीवींचे मते विचार घेतलेली नाहीत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ॲनहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक येण्याच्या अगोदर गणपती महाराज सहभोजन आणि अंतरजातीय विवाह या उपाययोजनांच्याद्वारे जाती अंताचे काम करत होते. त्याबद्दल इतिहास त्यांचे सदैव स्मरण करेल. 
                                    या पध्दतीने संत चोखोबारायांना प्रेरणा मानून विदार्भात आनखी एक महान माणुन महानतेचे काम करत होता. या मानसाचे नाव म्हणजे किसन फागुजी बनसोड होय. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी रोजी नागपुर पासून २४ किलोमीटर अंतरावर असणानार्या मोहपा या गावी झाला. त्यांनी जातीव्यवस्था, अस्पृश्यतेचा कसून अभ्यास करून अस्पृश्यांमधे  जागृतीचे काम केले होते. त्यासाठी त्यांनी अस्पृश्य जातींमधे प्रेरणा उभी करण्यासाठी संत चोखोबारायांना चर्चेच्या कार्यक्षेत्रात  आनले होते.संत चोखोबारायांना त्यांनी प्रेरणा मानले होते.यातून त्यांनी नागपुरच्याच पाचपावली भागात १९०७ साली 'चोखामेळा मुलींची शाळा काढली.त्यांच्या कार्याचा कल लोकजागृती करणे व  अस्पृश्यांना हक्क अधिकार मिळवून देणारा त्यांना सन्मानाचे जीवन जगायला शिकवणारा होता. त्यांनी संत चोखोबारायांचे अभंग गोळा केले होते.त्यांनी महार लोकांना धैर्य मिळावे म्हणून चोखोबांवर कविताही लिहीली होती.  १९४२ साली प्रकाशित झालेले संत चोखामेळा चरित्र, सत्यशोधकी जलसा आणि चोखामेळा दर्शन ही त्यांची साहित्य संपदा होय. किसन फागुजी बनसोड यांनी प्रस्थापीत ब्राम्हणी धर्मव्यवस्थेला धारदार शब्दात प्रश्न विचारले आहेत. १८०९ साली त्यांनी 'मुंबई वैभव' मधे लेख लिहीला होता. त्या लेखात त्यांनी अस्पृश्यता का पाळता या मुद्द्यावर भर देत विविध उदाहरणांच्याद्वारे सर्वण जातींना प्रश्न विचारले आहेत. गणपती महाराजांप्रमाणेच, बनसोड यांना फारसी प्रसिद्धी मिळालेली दिसत नाही.गणपती महाराज, किसन फाराजी बनसोड हे संत चळवळीतून प्रेरणा घेऊन थेट जातीअंताचे, अस्पृश्यता निर्मूलनाचे काम करत होते. सोईची भुमीका घेणाऱ्या भटाळलेल्या वारकऱ्यांनी या चोखोबांच्या वैचारिक वारसदारांकनाही अंधारात ठेवले आहे.चोखोबारायांप्रमाणेच अस्पृश्यतेचे सवाल उपस्थित करणारेच अस्प्रश्य ठरवले गेले आहेत. गणपती महाराज, किसन, फागुजी बनसोड यांच्याप्रमाणेच विदर्भातून जातीअंताचे प्रबोधनात्मक काम करणार्यांमध्ये संत गाडगे महाराजांचे नाव टाळताच येणारे नाही. एकवेळचे जेवणाचे ताट मोडा परंतू शिका असे म्हणानारे गाडगे महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही किर्तनातून उल्लेख करत असत.१९१७ साली संत गाडगे महाराजांनी पंढरपूरला एक धर्मशाळा बांधली होती. ती धर्मशाळा संत चोखोबारांच्या स्मरणार्थ अस्पृश्यांसाठी बांधली होती. गाडगे महाराजांनी आपला धागा चोखोबारायांशी तर जोडून दिलाच परंतू त्यांनी आपल्या शेवटच्या काळात अनेक धर्मशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे करून दिल्या.माणुसकी, समानता यासाठी संत गाडगे महाराजांनी आयुष्य पणाला लावले होते.यामुळे ते लोकमनावर ते कायमस्वरूपी अजरामर झाले.
                             आलिकडच्या काळात संत चोखोबारायांचा 'विस्तारीत चरीत्रासह अभंगगाथा छापण्याचे श्रेय स.भा. कदम यांना जाते. त्याच्या पश्चात हा गाथा संपादीत करून उजेडात आणण्याचे काम भालचंद्र नेमाडे यांनी केले आहे. अंधारात लुप्त होत जानारा चोखोबा न मिटु देणारे, न संपु देणारे हे दोन दिग्गज स.भा.कदम , भालचंद्र नेमाडे होत. चोखोबाराय विद्रोही नाहीत. परंपरेला शरण जाणारे आहेत, असा एक आरोप त्यांच्यावर झाला होता. अति कर्मठ पुरोगाम्यांनी आजच्या मोजपट्या त्या काळातील चोखोबारायांना लावल्या होत्या. तरी या प्रश्नाला समर्पक उत्तर देणारे पुस्तक शंकरराव खरात यांनी लिहीले आहे. पुस्तकाचे नाव 'चोखोबाचा विद्रोह' आहे.अत्यंत महत्वपूर्ण मांडणी या पुस्तकात शंकरराव खरात यांनी केली आहे.
                             त्याच बरोबर अत्यंत सखोलपणे अभ्यासु मांडणी करणारे आनखी एक पुस्तक म्हणजे ' संत चोखामेळा आणि मी ' लेखकाचे नाव भि. शि. शिंदे होय.यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या पटलावर संत चोखोबाराय पुन्हा चर्चेत राहिले.
संत चोखोबारायांच्या साठी प्राचार्य पदाचा राजीनामा देवून महाष्ट्रभर फिरून त्यांचे साहित्य गोळा करुन सर्वव्यापक संत चोखोबाराय सर्वांच्या समोर ठेवणारे एक महान व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राचार्य डॉ आप्पासाहेब पुजारी होत.संत चोखोबारायांच्या इतिहासात यांचे नाव टाळता येनारे नाही. मंगळवेढ्याचे निवासी अप्पासाहेव पुजारी हे मुळचे कर्नाटकातील होत. परंतू वारकरी परंपरेतील उपेक्षित संत चोखोबाराय आणि कान्होपात्रा या दोन संतांना प्रकाशझोतात आणण्यासाठी त्यांनी अफाट कष्ट घेतलेले आहेत.त्यांनी चोखोबारायांच्या चरित्रासह,विविध दिग्गज लेखकांच्या लेखासह चोखोबांचा अभंग गाथा त्यांनी प्रकाशीत केला आहे.हे काम करताना त्यांना खुप अडथळे आले तरी त्यांनी हे काम शेवटाला नेलेच. त्यांनी चोखोबांचा २८६ पानांचा ग्रंथ संपादीत केला आहे. या ग्रंथाचे नाव आहे " श्रीसंत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र". नुकतीच २०२० ला या ग्रंथाची दुसरी सुधारित आवृत्ती प्रकाशीत केली आहे. 
                                   आशा पध्दतीने साहित्तीक, लेखक, संपादक खऱ्या आर्थाने चोखोबारायांचे वैचारिक वारसदार आहेत.याप्रकारे चांगले काम करणाऱ्या लोकांमुळेच चोखोबांच्या इतिहासाचे डॉक्युमेंटेशन होऊ शकले. अनंतभट ते महिपतीबुवा आणि नामदेव ते गणपती महाराज. आणि किसन फागुजी बनसोड से सभा क़दम , भालचंद्र नेमाडे  हा चोखोबारायांच्या इतिहासाचे डॉक्युमेंटेशन करणारा वर्ग कायमस्वरूपी अजरामर राहील. पुढील पिढ्या त्यांच्याप्रती ऋणी रहातील.
                                     ज्यात आनखी महत्त्वाचे एक नाव घ्यावे लागते ते, एलिनॉर झेलियट या फॉरेनच्या लेखीकेचे. त्यांनी संत चोखोबारायांवर अत्यंत सखोल, संशोधन करून ग्रंथ लिहीला आहे.काही लेख संपादीत केले आहेत. संत चोखोबारायांवरील त्यांचा ग्रंथ "  संत चोखामेळा विविध दर्शन " या नावे प्रसिद्ध आहे. सुगावा प्रकाशनाने प्रकाशीत केलेल्या या ग्रंथात अनेक दिग्गज लेखक संशोधकांचे लेखही आहेत.एक विदेशी लेखीका चोखोबांच्यासाठी आयुष्यातील महत्वाचा वेळ देते,खरच गौरवाचे आहे. 
                                खच्चा अर्थाने ही सर्व मंडळी संत 'चोखोबारायांची वारसदार आहेत.कोण्यान कोण्या मार्गाने संत चोखोबाराय जीवंत ठेवल्याबद्द याही महान हस्तींचे सदैव स्मरण होत राहिल. 

संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २४ वे जातीअंताचे वारकरी शिलेदार

संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २४ वे 

जातीअंताचे वारकरी शिलेदार

                                   संत नामदेव, संत चोखोबाराय आणि त्या काळातील समकालीन सर्वच संतांनी भेदभावावर आक्षेप नोंदवलेला आहे. अस्पृश्यता आणि जातीभेद संत नामदेव यांच्या संतमंडळाला मान्य नाही. जातीअंताची प्रखर भुमिका घेऊन हे सर्व संत उभे राहिले होते. म्हणुनच पुढच्या काळात हा जातीअंताचा केंद्रबिंदू पकडुन त्यावर अनेकांनी काम केले.संतांना केवल भक्तीच अपेक्षीत होती का ? तर नाही. वारकरी संतांना भक्तीचे माध्यम वापरून समतेचे ध्येय साध्य करायचे होते. भक्ती हे साधन होते, आदर्श समाज निर्मातीसाठी.आज घडीला मुख्य उद्देशापासुन वारकरी चळवळ जरी भरकटली असेल. तरही अनेकांनी मात्र जातीअंताचे काम केल्याचे दाखले इतिहासात जागोजागी उपलब्ध आहेत.संतांची प्रेरणा घेवुन अनेकांनी समतेचे , माणुसकीचे काम केल्याचे आपल्याला दिसेल.
                                     संत चळवळीचा दुसरा कालखंड किंवा दुसरा टप्पा संत एकनाथ महाराज व संत तुकोबारायांचा  काळ मानता येईल.संत नामदेव, संत चोखोबाराय आणि त्यांचे संत मंडळ गेल्यानंतर इ.स. १५४८ ते १५८e हा संत एकनाथ महाराजांचा कालखंड तर १६०८ ते १६५० हा संत तुकोबारायांचा कालखंड मानला जानो. नामदेवांच्या संत मंडळात 'हिन केली आमुची याती "  हा प्रश्न संत चोखोबाराय आणि त्यांच्या  कुटुंबियांनी विचारला होता. 'मज दूर हो'  म्हनती ही चोखोबारायांची मनातील सल होती. चोखोबारायांच्या या वेदनेचा, दुखाचा संत एकनाथ महाराजांवर खूप प्रभाव पडलेला दिसुन येते. संत एकनाथ महाराजांना  संत चोखोबारायांची वेदना अत्यंत दुखद  वाटली होती आणि म्हणून एकनाथ महाराजांनी  चोखोबारायांना प्रेरणा मानुन जातीअंताचे गुरू काम केले होते. पैठण ही सनातनी कर्मठ ब्राम्हणांची नगरी होती.या कर्मठ नगरीत संत चक्रधर स्वामींना खुप त्रास देण्यात आला होता.त्या नागरीत संत एकनाथ महाराजांनी कुनालाही न जुमानता जातीअंताचे अस्पृश्यता निर्मुलनाचे काम केले होते. जोहार हे संबोधन केवळ गावच्या माजीअस्पृश्य जातीसाठीच होते. अस्पृश्यांनी जोहार घालावा असा त्याकाळी प्रघात होता. संत एकनाथ महाराज जन्माने ब्राम्हण असुन त्यांनी ब्राम्हणत्व टाकुन देऊन ते डिकास्ट बनले होते.ते स्वतः अभंग लिहुन जोहार घालत होते. त्यांनी ३० पेक्षा जास्त अभंगातून जोहार घातलेला आहे. संत चोखोबारायांच्या जीवनातील सोसाव्या लागलेल्या वेदना त्यांचे जगणे संत एकनाथ महाराज स्वतःच्या रूपाने मोडत होते.संत एकनाथ महाराज आनेक अभंगात स्वतःला महार संबोधुन घेतात. ते आपल्या अभंगात महारांचे संबोधन जोहार घालतात.अस्पृश्यत्वाची अनुभूती ते आध्यात्मिक भक्तीपंथात घेतात. ते म्हणतात
                   " जोहार जी मायबाप जोहार l मी एकनाथ महार l सीगतो सारासार विचार l तो ऐका जी मायबाप ॥"
                   किंवा
                   जोहार मायबाप जोहार । मी जनार्दनाचा एका महार | सांगतो तुमचे नगरीचा समाचार । की जी मायबाप l तो ऐका की जी मायबाप ll
                            आशा अनेक अभंगातून संत एकनाथ महाराजांनी अस्पृश्यांची बाजू घेऊन त्यांची वेदना मांडली होती.
                            एका उच्चजातीय व्यक्तीने स्वतःला महार म्हणवून घेने क्रांतिकारी,धाडसाचे आहे. त्याकाळी प्रत्येक सरंजामदाराच्या हताखाली चाकरी करण्यासाठी , त्याच्या हाताखालील कामे करण्यासाठी तत्कालीन महार , मातंग आदी जातींचे लोक असत. हे रुपक वापरताना संत एकनाथ महाराज मी संत जनार्दन स्वामी यांच्या घरचा महार आहे असे म्हणवून घेतात.सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की संत एकनाथ महाराज अगदी अस्पृश्यांच्या ग्रामीण बोलीचा,गावकुसाबाहेरच्या बोलीचा  जशाला तसा वापर करतात. माजी अस्पृश्य जाती पुर्वीला जी लावून बोलत असत.संत एकनाथ महाराजही अगदी जी लाऊन अभंग लिहीतात. महाराला गावकीत काय काय कामे करावी लागतात, ते सर्व वर्णन एकनाथ महाराजांनी करुण ठेवलेले आहे. या पद्धतीने त्यांनी केवळ जोहार घालून अभंगच लिहीले नाहीत तर भौतिकवादात अस्पृश्यता निर्मुलनाचे कामही केले होते. ते जसे बोलले तसे त्यांनी करुन दाखवले होते. या बद्दल बा. रं. सुष्णकर लिहीतात. " एकनाथांनी जातिभेदाविरुध्द फार मोठे बंड उभे केले होते. पितरांच्या श्राध्दाच्या दिवसी आपल्या घरी अंत्यजांना जेवू घालून, उन्हात तळमळणारे महाराचे मुल कडेवर घेऊन, आपल्या अंथरूणावर वडाऱ्याला निजायला ठेवून, राणू महाराकडे सर्वासमक्ष स्वतः जेवायला जाऊन एकनाथांनी रूढ जातिनिर्बंध  झुगारून दिले. " मध्ययुगीन भारतात संत एकनाथ महाराजांनी या भेदाभेदाच्या विरोधात लिखानही केले आणि तसे जातीअंताचे प्रयोगही केले. त्याकाळी सहभोजनांचा प्रयोग करणे क्रांतीकारी म्हटले पाहिजे अस्पृश्यांच्या सहवासात राहून दाखवणे, त्यांची बोली बोलणे आणि त्यांच्या सोबत अन्न ग्रहण करणे हे धाडसी आणि  माणुसकीचे काम संत एकनाथ महाराजानी करून दाखवले होते. संत एकनाथ महाराज यांच्या गुरुचे म्हणजे जनार्दन स्वामी यांचे गुरू संत चांद बोधले हे मुस्लीम होते.त्यामुळे  सुफी परपरेचाही वारसा संत एकनाथ महाराजांकडे आला होता.त्यातून ते अस्पृश्य निर्मूलनाचे प्रयोग करु शकले.थोडक्यात काय वारकरी सुफी  मिलाफातून संच एकनाथ महाराज जातीअंताचे -प्रयोग करू शकले होते.
                         संत एकनाथ महाराजांच्या नंतर या भेदाभेदाच्या विरुद्ध, ब्राम्हणी ब्यूरोक्रॉसी विरुद्ध संत तुकोबारायांनी आघाडी उघडली होती जन्माने हिन मानने तुकोबारायांना मान्य नव्हते.
                          " अभक्त ब्राम्हण जळो त्याचे तोंड l काय त्यासी रांड प्रवसवली । वैष्णव चांभार अन्य त्याची माता l  शुद्ध उभयंता कुळयाती ll
                         अशी गुणकर्मावर श्रेष्ठत्वाची भुमीका संत तुकोबारायांनी घेतली होती. त्यांना अस्पृश्यतेचा, जातपात मानणार्यांचा तिटकारा होता. ते म्हणायचे "" विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ ll तुकोबारायांच्या अभंग गाथेत शेकडो अभंग जातीभेद,अस्पृश्यता पाळणाऱ्याना, जन्माने श्रेष्ठत्व मिरवणाऱ्याना खडे बोल सुनवनारे आहेत.त्यांचे म्हणने होते वाण्याच्या दुकानातून गुळ आनयचा असेल तर त्याची जात आणि कुल कशाला विचारावे ? अस्प्रश्य संतांच्या वाट्याला आलेल्या दुःखद वेदना भविष्यात कुनाच्याही वाट्याला येवू नयेत म्हणून तुकोबाराय काम करत होते. आपल्या साहित्य निर्मीतून त्यांनी जगाला माणुसकी शिकवणारा संदेश दिला होता. तुकोबारायांचे अस्पृश्यतेला, जातीव्यवस्थेला विरोध करणारे अभंग पाहिले की वाटु लागते की ते संत चोखोबारायांचे अंतरीचे दुःख जाणून होते संत तुकोबारायांनी इंद्रायणीहुन आंघोळ करुन येताना दर्शन घेण्यासाठी संत चोखोबारायांचे छोटे मंदिरही बांधले होते.म्हणजे विठ्ठल , नामदेव यांच्या बरोबर संत तुकोबारायांची प्रेरणा संत चोखोबाराय सुद्धा होते.चोखोबारायांसाठी तुकोबांनी जोहार तर घातलाच शिवाय आपल्या अभंगातून चोखोबारायांचा आदरपूर्वक उल्लेखही केलेला आहे. ते उंच नीच काही नेणो भगवंत या अभंगात तुकोबाराय म्हणतात
" सज्जन कसाया विकु लागे मांस | माळ्या सावत्यास खुरपु लागे ॥ नरहरी सोनारा घडवू फुंकू लागे । चोखामेळ्यासंगे ढोरे ओढी ॥

                                आमचा देव ब्राम्हणांच्या सारखा उचनिच
भेदभाव करत नाही तो सज्जन कसायासोबत मांस विकु लागतो , चोखोबारायांसोबत मेलेली ढोरे ओढु लागतो. शिवाय " पवित्र ते कुळ पावन तो देश " या अभंगात  चोखोबारायांचा उल्लेख करताना संत तुकोबाराय म्हणतात
चोखामेळा बंका जातीचे महार । त्यासी सवैश्वर ऐक्य करी ll
                                आमच्या सर्वेश्वर भेदभाव करत नाही. तो सर्वांना समान मानतो. हा संदेश तुकोबाराय देतात. संत चोखोबारायांची बाजू घेताना संत तुकोबाराय म्हणतात

" चोख्याचे अभंग करविले देवानी | स्वप्नीही येऊनी सांगितले ll  चोखिया म्हणोनी निंदतील कोणी l लागोणी बरे मजला भोगीन पहाती ।।
माझ्या चोखियाचे नित्य घेती नाव l त्याच्या घरी धाव जाय माझी ॥
तुका म्हणे चोखा युगायुगीचा भक्त । म्हणोनी पंढरीनाथ ऋणी त्याचा ll

                             या अगातून संत चोखोबारायांनी निंदा करणार्यांना संत तुकोबारायांनी चांगलेच फटकारले आहे. जे लोक संत चोखोबारायांचे नित्य, नियमीतपणे चांगले नाव घेतील त्यांच्याकडे तुकोबाराय जाने येणे ठेवतील असे तुकोबारायांचे म्हणने आहे. त्यांचे चोखोबांच्या प्रती आदरयुक्त बोल आहेत. याचा एक अर्थ असाही निघतो की संत तुकोबारायांच्या आजूबाजूला संत चोखोबांची निंदानालस्ती चालु होती. म्हणून त्यांना ठणकावून सांगावे लागले की खबरदार चोखोबांची कुनी निंदा कराल तर. ऐके ठिकाणी तर तुकोबारायांनी 'चोखा माझा गणपती, म्हणून त्यांना प्रमुख भुमीकेत आनुन बसवले आहे. संत चोखोबारायांना एवढ्या उंचीवर नेवारे तुकोबाराय होते. महाराष्ट्रीतील मराठ्याच्या, कुणब्याच्या घरातील सर्वाधीक लोकप्रिय संताने संत चोखोबारायांचा एवढा सन्मान करणे क्रांतीकारी आहे. दोन जातींना सांस्कृतिक ऐक्याने जोडनारे प्रतिक तुकोबाराय आहेत. तुकोबाराय म्हणजे सामाजिक आर्थिक सर्वहरा जातींच्या क्रांतीदोस्तीचे तत्वज्ञान निर्माण करणारे महान व्यक्तिमत्त्व होते. ते सामाजातील शेतकरी जाती व अस्पृश्य  जातींना जोडणारा दुवा आहेत. संत चोखोबारायांचे एवढे मोठेपण मांडणारे तुकोबारायच !
                             बघा अनखी ऐके ठिकाणी तुकोबाराय काय म्हणतात.

"रायाचे सिपाई हजाराचे बारा l लाखाचा मोहरा प्राणी एक ll  सवारूपयाची येती पाच मोती | हजाराची येती जोड़ी एक ll रुपायाच्या कवड्या मधे भरे गोणी l मोहर बांधुनी पदरी न्यावी ll शंभर लोकांत सद्‌गुणी ऐका | तुका म्हणे चोखा पंढरीचा ॥

ग्रामीण भागात बोलताना आपण नेहमी म्हनतो  आमचा गडी लाखात एक आहे. अगदी तसेच संत तुकोबाराय चोखोबारायांच्या  बद्दल बोलनताना म्हणतात "आमचा चोखोबा लाखात एक आहे"

नितीन सावंत परभणी
9970744142

संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २३ वे मुसलमान संताची जातीअंतक भुमीका

 संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २३ वे 
मुसलमान संताची जातीअंतक भुमीका

देवाची भक्ती चोखामेळा करी | त्यास लोक धरिती दुरी ।
"वैकुंठी  महारवाडा वेगळा करी । नांदावया तयासी ? ॥
ऊँच-नीच नदीत शिरोन । बाहेर निघती कुंभ भरोन् ।
मग म्हणती, स्पर्शो नका , चला दुरोन' |
उदकांत उभयता उभी होती ॥
                    - संत शहामुनी, (संदर्भ:- मुसलमान मराठी संतकवी. रा. चिं. ढेरे आवृत्ती २१जुलै २०१४ पान १२२ )

                              भारतातील पहिली मस्जिद इ.स. ६२९ च्या कालखंडातील.ही मस्जीद केरळ राज्यात कोर्डगलूर तालुक्यातील मेयला या गावी आहे. ही मस्जीद हिंदू (द्रवीड) चेरामन पेरुमल यांच्या नावे आहे. हे चेरामन खुद्द  रसुल्लला सल्लल्लाहु वल्लेही अस्सलम अर्थात मुहम्मद पैगंबर यांना भारतातून भेटायला गेले होते.भेट घेवुन भारतात येताना ते वारले.सहाबा लोक आणि चेरामन यांच्याद्वारे इस्लाम भारताच्या किनाऱ्यावर आला. त्यामुळे भारतात पहिले इस्लामचे आगमन दक्षिण भारतात झाले.ते काही नंग्या तलवारी हतात घेवुन नव्हे.त्याप्रमाणे खैबर खिंडीतूनही अनेक सुफी संत भारतात आले. राजस्थानमधील आजमेरचे  सूफ़ी मोइनुद्दीन चिश्ती ख्वाजा गरीब नवाज(११४१ - १२३६ ई॰) हे थेट मक्केहून भारतात आले होते. उत्तर भारतातूनही दोन वेळा सातशे , सातशे अशा चौदाशे सुफी संतांच्या पालख्या महाराष्ट्रात आल्या होत्या.
                             दक्षिणेस केरळमधे आलेले सहाबा आणि उत्तर भारतात उतरलेले सुफी या ईस्लामच्या संतांनी भारतात आल्यानंतर सर्वप्रथम अस्पृश्यता ही मनुष्यनिर्मित आहे, हे जगजाहीर सांगितले. त्यांनी जातीव्यवस्था अस्पृश्यतेला कडाडून विरोध केला.ते अस्पृश्यांच्या सोबत एका ताटात जेवायला लागले.अस्प्रश्यांना कडकडून अलिंगण द्यायला लागले.अस्पृश्यांच्या जखमा धुवून त्यांना मलमपट्टी करुन त्यांची सेवासुश्रृषा करण्याचे काम सुफी संतांनी केले होते.  भारतात सुफी संत येण्या अगोदर अस्पृश्यता ही  ईश्वर निर्मात मानली जायची. हे सर्व पुर्वजन्मीचे भोग आहेत असे अस्पृश्यांच्या मनावर बिंबवले जायचे.त्यांना गुलाम बनवलेले होते.
                                 सुफी संतांनी या खोट्या आफवा धुडकावून लावल्या. आणि माणुसपणाची शिकवण द्यायला सुरुवात केली.म्हणूनच जातीव्यवस्था अस्पृश्यतेला कंटाळलेल्या मोठ्या जनसमुदायांनी या देशात धर्मांतर केले.महाराष्ट्रात सुफींचे प्रचारक आणि वारकरी संत यांचा एकमेकांवर मोठा प्रभाव आहे. वारकरी सांप्रदायावर सुफींचा एकेश्वरवाद मोठा प्रभाव टाकुन गेलेला आहे. शिवाय संत तुकोबारायांनीही कबीर ,लतिफ, मोमीन या तिन मुस्लीम संतांचे आदाराने उल्लेख केलेले आहेत. व्यावसायावरुन हिन लेखु नका असे सांगताना "  आमचा विठ्ठल सज्जन कसाया सोबत मांस विकू लागतो " असेही तुकोबाराय म्हणाले आहेत. संत एकनाथ महाराजांचे गुरू संत जनार्धन स्वामी. आणि  संत जनार्धन स्वामी , यांचे गुरु संत चांदबोधले होते.हे संत चांदबोधले  सुफी परंपरेतील होते. संत चांद बोधले यांना दोन लोकप्रिय शिष्य लाभले.एक म्हणजे संत जनार्धन स्वामी आणि दुसरे म्हणजे श्रीगोंद्याचे  शेख मुहम्मद महाराज श्रीगोंदेकर होत. या शेख मुहम्मद महाराज श्रीगोंदेकर यांचे आणि  तुकोबारायांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते.
                             याच सुफींच्या प्रभावक्षेत्रातील आनखी एक नाव म्हणजे संत शहामुनी होत. संत शहामुनींचा जन्म श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावला इ.स. १६४८ला झाला आणि त्यांचा शेवट शहागड (जि. जालना ता. अंबड) ला १८०८ला झाला. शहागडला त्यांची समाधी आहे. है संत शहामुनी मुस्लीम संत होते त्यांनी महानुभावांच्या शिकवणुकीला साजेल असा सिद्धांतबोध हा ग्रंथ लिहीला आहे. हा ग्रंथ महानुभव पंथात सर्वाधीक लोकप्रिय आहे. आजही महानुभव या ग्रंथाचे पारायणे करतात.
                              याच महानुभव मुस्लीम संताने वारकरी परंपरेवरही लिहीले आहे.सुफी, महानुभव आणि वारकरी यांच्यातला समन्वय साधनारे संत शहामुनी होत. संत शहामुनी यांनी आपले कार्य आणि साहित्यनिर्मीती करताना भारतीय उच्चजातीयांचे  जातीवादी मुल्ये थेट नाकारली आहेत.अस्पृश्यता  ही,  ईश्वर निर्मीत नाही.हे त्यांनी ठणकावुन सांगितले. जातीभेदाला, अस्पृश्यतेला त्यांनी विरोध केला होता.अस्पृश्य  जातीतून आलेल्या संत चोखोबारायांची त्यांनी सन्मानपूर्वक बाजु घेतली.जातीवाद करणाऱ्या समुहाला संत शहामुनी यांनी काही प्रश्न विचारले आहेत.ते म्हणतात की " ईश्वर भक्ती करणाऱ्या संत चोखामेळ्याला वैकुंठात वेगळा महारवाडा असेल काय ?" उच्च -निच भेदभाव पाळता, स्पर्श करू नको दुर हो म्हणता मग ईश्वर भेदभाव पाळतो का? त्याच्याकडे स्वर्गात अस्पृश्यांसाठी वेगळी वस्ती आहे का?.नदीच्या पाण्यात भेदभाव असतो का ? तिथे तर सर्वजातीपातीचे बुडतात , ओले होतात.नदी आणि पाणी भेदभाव करत नाही.एकाच पाण्यात स्पृश्य आणि अस्पृश्य आंघोळ करतात.आणि वर आल्यानंतर म्हणतात तु अस्पृश्य आहेस मला शिवु नकोस.हे कसे चालेल ? हे संत शहामुनी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एक मुस्लीम संताने अस्पृश्यांची बाजू घेऊन व्यक्त केलेला निर्भीडपणा वाखाणण्याजोगा आहे. त्यावेळी उच्चजातीयांना नक्कीच हे झोंबले असेल. स्पेशली धर्मपुरोहीत वर्गाच्या काय प्रतिक्रिया असतील याचा अंदाज आपन बांधु शकतोत.
                         संत शहामुनींच्या आधी साधारण पाचशे ते साडे पाचशे वर्षापूर्वी होऊन गेलेल्या संत चोखोबारायांवर अभंग लिहुन त्यांची वेदना समाज पटलावर ठेवणे हे मोठे गौरवाचे काम आहे. संत चोखोबारायांचा, संत नामदेवांचा जातीअंताचा "लढा संत शहामुनी पुढे चालवत होते. एक मुस्लिम संत अस्पृश्यांसाठी लढत होते.प्रस्थापीत मिरासदार, सरंजामदारांच्या व ब्राम्हणशाहीतील कर्मठ ब्राम्हणवाद्यांच्या विरोधात जावे लागले तरी हरकत नाही या भुमीकेतून त्यांनी संत चोखोबारायांचे दुःख, पिडन पुन्हा चर्चेत आनले होते.

                                 अहमदनगर, बिड, जालना या भागात संत शहामुनी यांनी अस्पृश्यतेला विरोध करणारे प्रबोधन केल्याचे वरील अभंगावरून लक्षात येते. माणुसकीचा उपदेश त्यांनी सर्वांना केला होता. संत जगाबरोबर वहात जात नाहीत , तर त्यांना दिसलेल्या खोट्या गोष्टींना ते विरोध करतात. ते जग बदलवतात.जगाला दिशा देतात. संत चोखोबारायांचे थेट नाव घेवुन संत शहामुनी यांनी आपली नाळ वारकरी परंपरेशी जोडली आहे. जातीअंताचा मार्ग त्यांनी चोखोबारायांना चर्चेत आनुन निवडला आहे. संत नामदेव , संत चोखोबारायांसारखाच  माणुसकीचा धर्म शहामुनी सांगत होते. आपणही संत चोखोबारायांचा, संत शहामुनी यांचा भेदभाव विरहीत  माणुसकीचा धर्म जोपासुया, वाढवूया.

नितीन सावंत परभणी
9970744142



Sunday, 10 July 2022

संत चोखोबाराय जीवनचरित्र - प्रकरण २२ वे l चोखोबाराय आणि आंबेडकरवादी चळवळ

   संत चोखोबाराय जीवनचरित्र - प्रकरण २२ वे l 
चोखोबाराय आणि आंबेडकरवादी चळवळ

                                २६ जानेवारी १९५० रोजी भारतात संविधान लागू झाले. खऱ्या अर्थाने सर्व शोषीत, पिडीत,अस्पृश्यांना  स्वतंत्र्य  मिळाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुक्त संचार स्वातंत्र्य, दर्जा आणि समान संधी अशा कित्तेक मानवी हक्काच्या गोष्टी,  हजारो वर्षे मुक्तीदात्याची वाट पाहुन अस्पृश्य जातींच्या पदरात पडल्या होत्या. 'अभिव्यक्तीचे' स्वतंत्र्य काय असते हे नव्या पिढीला कळणार नाही.केवळ देवाच्या दारात उभे राहुन अभंग का म्हनतो म्हणून अनेक यातना दिले गेलेले संत चोखोबाराय डोळ्यासमोर ठेवले की किंवा "घोकाव्या अक्षर मज नाही अधिकार " म्हणनारे तुकोबाराय डोळ्यासमोर ठेवले की अभिव्यक्त होण्यावर सुद्धा या देशात बंदी आसल्याचे, अभीव्यक्तीवर कडेकोट पहारे बसवले गेल्याचे आपल्या लक्षात येते. मराठ्याच्या , कुणब्याच्या घरात जन्माला आलेल्या तुकोबारायांना जर अक्षरे  घोकु दिली जात नसतील तर संत चोखोबारायांसारख्या अस्पृश्यांचे काय हाल असतील ? याचा अंदाज आपण बांधु शकतो. म्हणून मध्ययुगीन भारताच्या जातीव्यवस्था कठोर असल्याच्या काळात संत चोखोबांच्या परिवाराने अभिव्यक्त होने धाडसाचेच म्हणावे लागेल. भागवत धर्माच्या वाटेने एकच चोखोबा अभिव्यक्त होऊ शकला, त्याचा उद्धार संत नामवादी संतांनी केला. पण हजारों अस्पृश्य, हजारो चोखोबा अभिव्यक्तीसाठी, बरोबरीचा दर्जा मिळण्याची वाट पहात होते.
                         पुढील काळात संविधान देवून , करोड़ो चोखोबारायांना समतेच्या प्रवाहात आनुन, सर्वांच्या बरोबरीला बसवण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. करोडो चोखोबारायांना अस्पृश्यतेच्या जाचक गुलमगिरीतून बाबासाहेबीना मुक्त केले. "आम्ही अस्पृश्य का ? " आमचा विटाल का पाळता? असे म्हणनाऱ्या चोखोबारायांना बाबासाहेबांनी न्याय मिळवून दिला. २६ जानेवारी १९५० रोजी संत चोखोबारायांना न्याय मिळाला.
                             डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत चळवळीचे नाते जवळचेच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे  वडील रामजी आंबेडकर हे कबीरपंथी होते बाबासाहेबांच्या लहानपणी त्यांच्या घरामधे अभंग, दोहे यांचे वाचन होत असे. त्यामुळे संत चळवळीची पहिली ओळख बालवयातच बाबासाहेबांना झाली होती. "त्यामुळे त्यांनी बुद्ध आणि फुले आपले गुरु मानले, त्यात संत कबीर यांना सुद्धा गुरू म्हणुन " स्थान देऊन संत चळवळीशी आपला धागा कायम ठेवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनेक भाषणांत 'संतांचे अभंग दाखले देण्यासाठी वापरत असत. २० जुलै ११९४२ ला नागपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहिंसेची समर्पक  व्याख्या सांगताना 
                             " दया तिचे नाव भुतीचे पालन ।
                             आणिक निदालन कंटकाचे "
                            
                 या अभंगाच्या ओळी वापरल्या होत्या. संत तुकोबारायांच्या याच्या ओळी वापरून डॉ. बाबासाहब आंबेडकर त्यांनी सविस्तर भुमिका सुध्दा मांडली होती. या देशात शुद्र अतिशुद्र मुके आहेत. त्यांना अभिव्यक्ती  स्वतंत्र्य सुद्धा नाही, हे लक्षात घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक' हे वृत्तपत्र सुरू केले. मुकनायक हे पाक्षीक होते. या मुकनायकाचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० ला काढण्यात आला होता.  मुकनायक या शिर्षकाचा शब्द डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी  संत तुकोबारायांच्या अभंगातून घेतला होता. त्या अभंगाची ओळ  या मराठीतील पहिल्या पाक्षीवर छापली गेली ती अशी

काय करू आता धरूनिया भीड । निशंक हे तोंड वाजविले ॥
नव्हे जगी कोण मुकियाचा जाण । सार्थक लाजोनी नव्हे हित ।।

                   आशा पध्दतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्यांचा नायक बनले. त्यानंतर त्यांनी ३ एप्रिल १९२६ रोजी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र काढले. या वृत्तपत्राच्या हेडींगला संत ज्ञानेश्वर  महाराजांच्या स्वलिखीत ओळी दिलेल्या असायच्या.

                  आशा रितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संत  चळवळीशी चांगला संबंध होता. त्यांनी या संत चळवळीतील अस्पृश्य ठरवलेल्या संतांचाही अभ्यास केला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांचे पहिले प्रतिनीधी म्हणून संत चोखोबाराय, संत रवीदास तथा संत नंदनार या तिन संतांचा  उल्लेख करुन त्यांची ओळख जगाला करून दिली. त्यांनी आपला अनटचेबल्स हा ग्रंथ या तिन संतांना अर्पण केला आहे. त्या आपण पत्रिकेत बाबासाहेब म्हणतात 
                  " आपल्या निष्ठायुक्त कृत्य, संयमी व न्यायी वृत्ती यामुळे ते सर्वांपेक्षा उच्चतम आदरास पात्र ठरले. त्या तीन संताच्या स्मृतीस अर्पण "

                           यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत चळवळीचा एवढा व्यापक संबंध होता लक्षात येते.परंतू ही संतांची चळवळ जनमानसात रुजल्यानंतर ती समतावादी न राहू शकल्यामुळे बाबासाहेबांनी चोखोबारायांच्या भक्तीपंथाच्या आध्यात्मिक मार्गाने जाने नाकारले. वारकरी पंथात पाळली जाणारी अस्पृश्यता, भेदाभेद ,जातीभेद पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वारकरी, भागवत धर्म सोडून बोद्ध धम्म स्विकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई यांनी  पंढरपुरला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिथे मंदिरात येऊ दिले जात नाही, भेदाभेद पाळला जातो, हे बाबासाहेब जानुन होते. म्हणुन बाबासाहेबांनी रमाईला पंढरपुरला नेण्यास नकार दिला आणि आपण आपले स्वतंत्र पंढरपुर उभे करू असा असा शब्दही दिला होता. त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपुरला बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन स्वतंत्र पंढरपुर वसवून दाखवले.हे बघायला रमाई मात्र नव्हत्या.पुण्यातील देहू रोडला चोखोबारायांचे मंदिर बांधण्याची तयारी करत असलेले काही अस्पृश्य कामगार " बाबासाहेबांकडे  गेले होते. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धाचे मंदिर बांधायला लावले आणि उद्घघाटनाला गेले सुध्दा. बाबासाहेबांनी भक्तीच्या मार्गाने जाने नाकारून बुध्दाच्या मार्गाने अस्पृश्य जातींना मुक्ती मिळवून दिली.अस्पृश्यता जातीव्यवस्था नाकारणाऱ्या  धम्मात त्यांनी अस्पृश्य मानले गेलेल्या जातींना नेवुन मुक्ती दिली. परंतू एक गोस्ट चर्चेत कार्यक्षेत्रात येने महत्वाचे आहे की , बाबासाहेब संत चळवळीला आणि संत चोखोबारायांना नाकारणारे होते का ? त्यांचे योगदान त्यांना मान्य होते की नाही ? तर बाबासाहेब चोखोबारायांना नाकारणारे नव्हते. केवळ पून्हा त्या मार्गाने जाने त्यांनी नाकारले.अस्पृश्यांचा उध्दार करणारी भक्ती परंपरा नको तर संपूर्ण अस्पृश्यांचा उद्धार करणारा धम्म बाबासाहेबांनी पुढे केला.अलिकडच्या काळात अनेक पुरोगाम्यांनी, चोखोबारायांना जाहिर नाकरले आहे. आशांना एक प्रश्न आहे. त्याकाळातीले जातीव्यवस्था अस्पृश्यता वाईट होती की चोखोबाराय ? ब्राम्हणी व्यवस्था नाकारणार की चोखोबाराय ? बाबासाहेबांनी चोखोबारायांना ग्रंथ आर्पण केला पण चोखोबारायीचा मार्ग नाकारला होता.तुम्ही पुरोगामी चोखोबाराय नाकारणार की तो मार्ग ? त्या काळातील जातीव्यवस्था,अस्पृश्यता, ब्राम्हणी विटाळ या संकल्पना जाहीरपणे मांडणे हे पाप होते का ? हे मांडल्या बद्दल चोखोबारायांचा सन्मान व्हायला हवा की त्यांना दुर्लक्षित करुन मारणार. त्यांना दुर्लक्षीत करून ब्राम्हणी छावणीला मदतच करण्याचे काम पुरोगामी काही करत आहेत. संत चोखोबाराय चर्चेत आनले आसते तर जातीवादी समाजव्यवस्था उघडी पडली असती.हे पुरोगामी लेखक मंडळीला करावेसे वाटले नाही.उलट संत चोखोबारायांना चर्चेत आनुन जातीव्यवस्थेच्या विरोधात लढाई उभी करता आली असती.आज घडीला दलित आत्मकथने चर्चेला घेतली जातात.त्यावर समीक्षा येतात.मोठे धुमसान होते. पण देशातील पहिले दलीत आत्मकथन लिहीनारा चोखोबा मात्र  दुर्लक्षीत असतो.भारतातील पहिले दलीत आत्मकथन संत चोखोबारायांचे आहे. याकडे दलीत आत्मकथाकारांनी कानाडोळा केला आहे. दलीत कवितेचा इतिहास चोखोबारायांपासूनच खुरु होतो. तर दलीत स्त्रीवाद संत सोयराबाई, संत निर्मळा यांच्यापासून सुरु होतो. परंतु यावर पुरोगामी म्हणूवुन घेनारे फुले शाहु आंबेडकरवादी प्रवाह चर्चेला तयार नाहीत. संत चोखोबाराय त्यावेळी बाहेर ठेवले ते ब्राम्हणवाद्यांनी आणि आता वाळीत टाकले ते चोखोबारायांच्या आप्तस्वकीयांनी.
                           म्हणून स्वच्छ मनाने एकदा विचार करुया. त्याकाळी मिळतील त्या साधनांचा वापर करून, अतिशय बिकट परिस्थितीत आपला विद्रोह मांडल्या बद्दल आपण चोखोबारायांचा सन्मान करूया. त्यांना जातीअंताच्या मर्गावरील एक प्रतिक म्हणून स्विकारूया.अस्पृश्यतेचा गंभीर प्रश्न सर्वात आधी उभा केल्या बद्दल त्यांचे साहित्य स्विकारूया.चोखोबारायांना घेवून  समतेच्या हक्क अधिकारांसाठी प्रस्थापीत ब्राम्हणी व्यवस्थेशी भांडुया. वारकरी पंथात सर्व संतांप्रमाणे अधिकृत, नोंदनीकृत गुणवान,वैचारिक, प्रगल्भ महान संत म्हणुन चोखोबाराय सर्व संतांनी मान्य केलेले आहेत. त्या चोखोबारायांनी अस्पृश्यांच्या शोषण, पिडण, दमन आणि वेदनेचे डॉक्युमेंटेशन केल्या बद्दल त्यांच्याप्रती नतमस्तक होऊया. तसे न करणे आपल्या इतिहासपुरुशासी बेईमानी केल्यासारखे होईल. चांगले काम केलेल्या आपल्या पुर्वजाची आठवण सुद्धा न काढणे नतदृष्टेपण  ठरेल. तसे आपण करू नये एवढेच !

नितीन सावंत परभणी
9970744142