Thursday, 15 December 2016

अर्नेस्टो चे गव्हेरा एक क्रांतीवादळ

♦♦♦♦♦♦♦♦♦♦
ll व्यक्तीवेध आणि क्रांतीस्त्रोत ll
      
         १)अर्नेस्टो चे गव्हेरा

१९५९ मधे क्युबाच्या राष्ट्रीय ब्यांकेचे अध्यक्ष आणि त्यानंतर क्युबाचे उद्योगमंत्री तसेच क्युबाचे राष्ट्रीय नेते फिडेल केस्ट्रो यांच्या नंतर दोन नंबरवर आपले स्थान पटकवनारे ,आपली मायभुमी सोडुन  फिडेल केस्ट्रो बरोबर क्युबाच्या स्वातंत्र्यासाठी दम्याचा आजार शिगेला पोहंचला आसतानाही लढा देनारा एक तरुण म्हणजे चे गव्हेरा.अर्नेस्टो चे गव्हेरा.

बरे क्युबा स्वंतत्र झाला . त्या देशाने चे ला नागरिकत्वही बहाल केले . एवढी मोठ मोठी पदेही दिली. पन हा तरुण पुन्हा सर्व सोडुन निघाला गरिब देशांच्या मदतीला स्वातंत्र लढा उभा करण्यासाठी
कुणी आसेल का बरे की सुखासीन जिवन सोडुन पुन्हा दलदलीत भुके कंगाल जीवन जगण्यासाठी आपलाला आजार घेवुन दर्याखोर्यांत फिरणारा. बोलिव्हियाच्या स्वांतत्र्यासाठी जंगलात आणि नद्यांच्या महापुरात हा तरुण स्वातंत्र्यचा लढा उभारत होता . सडलेले कुत्र्यांचे ,प्राण्यांचे मांसही या तरुणाला खावे लागले.अन्नाची वनवन, कुणाचेही सहकार्य नाही . फिडेलशी आणि क्युबाशी संपर्क तुटलेला . आशा भायाण वातावरणात चे पकडला गेला. त्याला बोलिव्हीयन सैनिकांनी एका शाळेत नेले . बरेच प्रश्न विचारले आणि शेवटी धाडधाड गोळ्या घातल्या . प्रेतासग्गट ती शाळा उडवून दिली. आज अर्नेस्टो चे गव्हेराची कुठे साधी समाधी सुद्धा नाही . पण हा तरुण जगाच्या तरुणांची प्रेरणा बनला आहे . आनेक देशांतल्या तरुण तरुणींच्या टिशर्टवर चे दिसतो . आनेकांच्या फेसबुक प्रोफाइलवर किंवा whatsup dp वर चे आसतो. चे हे जग सोडुन क्रांतीस्त्रोत बनुन गेला तो ३९ व्या वर्षी.

फिडेल चे बद्दल म्हंतात
" चे सारखा माणुस एकच . चे गव्हेरा "
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
नितीन सावंत परभणी
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦     


शास्वत मुल्यांसाठी संघर्ष करा

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
    
           ll  विचारवेध ll

     नितीन सावंत परभणी
     9970744142
शाश्वत आणि मुलभूत मुल्ये कुणालाच नको आहेत काय ?
कुणी असा आहे का की ज्याला सत्य नकोय.कुणी आहे का ?ज्याला न्याय,समता नकोय,
असा कुणी आहे काय ?ज्याला अन्याय आवडतो.
हि शाश्वत नैतिक मुल्ये जर अंतिम असतील आणि  या मुल्यांच्या प्रस्थापनेशिवाय आपले काही भागतच नसेल.हिच मुल्ये एकमेव आणि आपल्यासाठी अतीमहत्वाची असतील तर त्या मुल्यांना रुजवण्यासाठी आपन का बरे संघर्ष करत नाहीत.
सत्याला सत्य मानुन सत्याची बाजू घेवून आपण सत्यासाठी संघर्ष केला पाहिजे.खऱ्याला खरे मानुन आणि खोट्याला खोटे मानुन खऱ्यासाठी आपन संघर्ष केला पाहिजे.
आपल्या श्वासाएवढे महत्व या मुल्यांना आहे.न्यायच नसेल,स्वातंत्र्य नसेल तर गुलामीतला श्वास काय कामाचा ? याच मुल्यांसाठी आपल्या पुर्वजांनी फार मोठा संघर्ष केला आहे.अनेक महापुरुषांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.ते या मुल्यांच्या प्रस्थापनेसाठी खस्ता खात मातीत गेले.केवढा संघर्ष केलाय आपल्या पुर्वजांनी.तरीही अजुनही ती मुल्ये प्रस्थापित करण्यात आपल्याला यश आलेले नाही.
काय आपल्या महापुरुषांचा संघर्ष पुर्ण झाला आहे ? काय त्यांना जे साध्य करायचे होते ते साध्या झाले आहे ? आपल्या पुर्वजांचा लढा यशश्वी झाला आहे काय ?
झाला नसेल तर तो संघर्ष पुर्ण कुणी करायचा ? त्याची जबाबदारी कुणावर आहे ? कोनी करायचे उरलेले काम ?
बायको पोरे,चिक्कार पैसा,गलेलठ्ठ पगारी,गाड्या, बंगले यामुळे हा संघर्ष आपोआप पुर्ण होनार आहे काय ?

कबिरा खडा बाजार मे काठी लिये हाथ l
जो आवे घर फुकन के वही चलेगा साथ ll

या शाश्वत मुल्यांसाठी पुर्वजांच्या त्यागाला डोळ्यासमोर आपण संघर्ष करुया.माणुसकीसाठी न्यायासाठी झगडुया.

क्रांती हा सर्वहरा वर्गच करतो
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

Wednesday, 16 November 2016

शिवरायांचा शाक्त राज्याभिषेक सोहळा

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

🔶शक्तीचे उपासक ते शाक्त.आर्थात स्त्रीसत्ताक ,मात्रसत्ताक गणपद्धतींचा वारसा पुढे चालवनारे शाक्त म्हनून गणले जातात.
मध्ययुगीन भारतात हा शाक्त वारसा पुढे चालवण्याचे फार मोठे श्रेय छत्रपती संभाजी महाराजांस जाते.त्यांच्या वाचन लिखानामुळे छत्रपती शिवरायांनी शाक्त विचारधारेला राजाश्रय दिला.शिवरायांच्या पहिल्या वैदिक राज्याभिषेक सोहळ्यातल्या चुका निदर्शनास आनुन देण्याचे काम संस्क्रुत पंडीत छत्रपती संभाजी महाराजांनी केले होते.आणि पुढे ते शिवरायांच्या वैदिक राज्याभिषेक सोहळ्यापासून शाक्त राज्याभिषेक सोहळ्या पर्यंत रायगडावरच होते.
वैदिक राज्याभिषेक सोहळ्यात वैदिकांचे म्हणने होते की
"राजा केवळ नामधारी आसेल अंतीम निर्णय धर्मपुरोहीत घेतील.आणि राजा चुकला तर त्याच्या माथी राजदंड मारण्याचा आधीकार ब्राम्हणांस आसेल." हा वैदिकी निर्णयास विरोध दर्शवत छत्रपती संभाजी महाराजानी निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते शाक्त राज्याभिषेक सोह्ळा घडवून आनला.वैदिक राज्याभिषेक सोहळ्यातल्या चुका आणि आणि अंतीम निर्णय धर्मपुरोहीतांचा ह्या आसल्या गोस्टी मनाला लावून घेतल्यामुळे किंवा पैशांची ब्रम्हव्रांदांकडुन झालेली लुट म्हना किंवा अन्य कारनाने म्हना वैदिक राज्याभिषेक सोहळ्याच्या नंतर केवळ 11 दिवसांनी 17 जुन 1674 रोजी माँसाहेब जिजाऊंना या सर्व घटना सहन न झाल्याने त्यांचे निधन झाले.
छत्रपती संभाजी महाराज्यांच्या सासुरवाडीकडून त्यांस शाक्त धर्माचा वारसा मिळाला होता.29 एप्रिल 1661 ला शिवरायांनी श्रगांरपुर काबीज केले .आणि त्यानंतर त्यानी तेथील पिलाजी शिर्के यांच्या राजसबाई यांच्याबरोबर संभाजी महाराजांचे लग्न लावून दिले.राजसबाई म्हंजेच ज्यांच्या नावे भविष्यात "श्री सखी रान्यी जयती " ही राजमुद्रा निघाली त्या शाक्तराणी येसूबाई होत. श्रंगारपुर हे शाक्त धर्माचे फार मोठे केंद्र होते.आणि या शाक्त संस्क्रुतीचे वाहक शिर्के होते म्हनून वैदिकानी विनाकारण शिर्के बदनाम केले .आजही रायगडावर शिर्क्यांचे कुलदैवत शिर्काई देवीचे मंदिर आहे .शिर्केच नव्हे तर छत्रपती संभाजी महाराजही बदनाम केले गेले ते शाक्त आसल्यामुळेच.
हा राज्याभिषेक सोहळा 24 सप्टेंबर आर्थात नउरात्रोत्सवात पार पडला होता.शाक्त धर्माचा सर्वात मोठा सण हा नउरात्रोत्सव आसतो.वैदिक धर्माच्या द्रुष्टीने हा काळ अशुभ मानला जातो .कारण या काळात विष्णू झोपलेला आसतो.म्हंजे वैदिकांचा विष्णू झोपलेला आसताना शिवरायांनी  नउरात्रोत्सवात हा  राज्याभिषेक सोहळा करवून घेतला.
पुर्वीसारखाच आवाढव्य खर्च होउ नये म्हनून पुर्वीच्याच रत्नजडीत सोन्याच्या सिंहासनात आसलेली इंद्रप्रतीमा काढून त्या जागी दुसरी लाकडाची असंदी (प्रतीमा) ठेवली . आणि साध्या पद्धतीने हा शाक्त राज्याभिषेक सोहळा पार पडला.....

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

संदर्भ :१) वा .सी . बेंद्रे -छत्रपती शिवाजी महाराज उत्तरार्ध.
२) कृष्णाजी केळुस्कर यांचे शिवचरित्र.
३) शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोन ? मुहम्मदी कि ब्राम्हणी . - कॉ. शरद पाटिल
४)छत्रपती संभाजी महाराज - वा . सी . बेंद्रे .
५)शिवाजी शुद्र कसा ? - डॉ आशोक राणा .
६) छत्रपती शिवाजी महाराज - श्रीमंत कोकाटे .
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

नितीन सावंत ,परभणी
9970744142

Saturday, 12 November 2016

कॉ. शरद पाटील यांचे नवे तत्वज्ञान


*************************

कुठल्याही आजाराचे अचुक निदान झाले तरच  पुढील उपचार निट करता येतात.आमचा पेशंट कोमात गेला आहे . त्याला आज दाखवू उद्या दाखवू म्हटल्याने जमेल काय ?

या देशाचेही तसेच झाले आहे . हा देश सडत चालला आहे . बेकारी बेरोजगारी आणि शिकून कामे मागनारे हात प्रचंड वाढलेत . या देशात नोकरीच्या १६ जागांसाठी विस हजार फॉम भरले जातात . ऱोज सकाळी चौका चौकात हमाल , रोजंदार खोेरे ,विळा , टोपले घेवून कामे मागत उभे आसतात . कुठलाही पेपर उघडा 'कुपोषनाने दहा बालके दगावली , आदिवास्यामधे कुपोषनाचे प्रमाण जास्त' आशा बातम्या रोज आसतात . कुपोषन हे श्रीमंतांनी दिलेले गोंडस नाव आहे .कुपोषन म्हनजे भुकबळी . या देशात माणसे भुकेने मरावीत लाजीरवानी बाब आहे . माता म्हनू म्हनू अमेरीकेच्या मार्केटमधे तिला येथेच्छ भोगण्याचे काम हे ब्राम्हण- बनिया, भांडवलदार- सरंजामदार करत आहेत .
एकीकडे  शेतात कमी पिकेना म्हनून शेतकरी अत्महत्या करत आहेत तर दुसरीकडे शेतकी विद्यापीठे एकदा वापरलेले बी परत उपयोगात येवू नये , आमच्याच कंपनीकडे बी घ्यायला शेतकऱ्यांने यावे यासाठी नवे शोध लावत आहेत . म्हने देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे .

या ब्राम्हण, बनिया, भांडवलदार सरंजामदार जात-वर्ग युतीला भेदून जर येथे समाजवादी लोकशाही क्रांती करायची असेल तर तसे नवे तत्वज्ञान उभारावे लागेल .

त्याच दिशेने आपले आयुष्य पनाला लावून ज्यांनी नवे तत्वज्ञान नवी शस्त्रे बहाल केली ते प्राच्यविद्यापंडीत कॉम्रेड शरद पाटील होत .

या देशातील व्यवस्थेचे योग्य आकलन पहिल्यांदा त्यांनीच केले . हा देश निमभांडवली निमसरंजामी जातवर्गीय ब्राम्हणी व्यवस्थेत आडकला आहे . त्यातून त्याला बाहेर काढायचे असेल तर कॉ शरद पाटील यांचे :

१) मार्क्सवाद:फुले आंबेडकरवाद

२) अब्राम्हणी विधायक बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण  पध्दती

३) अतित-सद्य-भविष्य वेधी प्रमाणशास्त्र

४) जानीवनेनीन्वेषी तर्कशास्त्र

५) सौत्रांतिक मार्क्सवाद (तत्वज्ञान)

६) अब्राम्हणी सौंदर्यशास्त्र

७) अब्राम्हणी, विधायक इतिहासलेखन शास्त्र

हे त्यांनी दिलेले समग्र तत्वज्ञान, क्रांतिशास्त्र अभ्यासावे लागेल . आणि ते तत्वज्ञान समाजाला लावत उभा करावा लागेल एक नवा क्रांतीलढा ,
वर्गजातस्त्रीदास्यांताचा !!

नितीन सावंत , परभणी
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

कॉम्रेड शरद पाटलांची - अब्राम्हणी विधायक बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण पद्धती

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
         ll विचारवेध 5 ll

" कॉम्रेड शरद पाटलांची -
अब्राम्हणी विधायक बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण पद्धती"

सध्याला सर्व परिवर्तनवादी चळवळींच्या एकुण प्रचार प्रसाराकडे पहाता अत्यंतिक नकाराचा सुर त्यांच्याकडुन येताना दिसत आहे . आपन जेव्हा प्रबोधनाला सुरुवात करतो तेव्हा ती सुरुवात नकाराने होते . प्रस्थापीत ब्राह्मणी व्यवस्थेची कुठलीही गोष्ट खोडण्यासाठी आपण  जेवढे पुढे सरसावतो तेवढेच नव्या मांडणीसाठी आपन अग्रही नसतो . या नकारात्मकातेतून लोक तुटतात . सतत खोडत बसण्याने लोक जोडले जाण्याऐवजी तोडले जातात . हा वाइट तो वाइट मग चांगला कोन ? असा प्रश्न आपल्या अत्यंतिक नकारातुन लोक विचारतात . सध्याला बर्याच संघटना या नकारात्मक मांडणीच्या अत्यंत आहारी गेल्या आहेत . ह्या संघटणा समविचारी संघटांचे विश्लेषण सुद्धा नकारात्मकतेने करतात. एक परिवर्तनवादी गट दुसर्या आपल्याच परिवर्तनवादी गटावर या नकारात्मकातेतुनच तुटून पडतो . यातून काहीच साध्य होत नाही .

म्हणून ज्यांचे रस्ते चुकलेले आहेत . ज्यांना रिझल्ट मिळत नाहीत. त्यांनी आता तरी बदलावे .
यासाठी कॉ . शरद पाटांनी चळवळीसाठी एक अत्यंत महत्वाची अन्वेषण पद्धती दिली आहे .
तिला
'अब्राम्हणी विधायक बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण पद्धती '
म्हणतात .

अब्राम्हणी म्हणजे पुरुषसत्ताक वर्चस्व नाकारुन समता स्वातंत्र्य आणि लोकशाही देनारी मात्रसत्ताक व्यवस्था मानने किंवा त्या दृष्टीने पहाणे होय.

विधायक हा शब्द विघातक शब्दाच्या विरुद्ध आहे . आपन विघातक टाकुन दिले पाहिजे . विघातक मांडणी करता कामा नये . आपले विश्लेषण विधायक असावे .

बहुप्रवाही म्हणजे सर्वंगाचा विचार करणारी . वर्गाचा अभ्यास ,जातीचाही अभ्यास ,जातवर्गाचाही अभ्यास आपन जिथे करतो ती बहुप्रवाही पद्धती .

ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे भौतिकवादी पद्धतीने इतिहासाचे विश्लेषण करणे .

अब्राम्हणी साहित्य आणि संस्कृतीच्या आधारे आपल्याला पुरुषी व्यवस्थेला नकार द्यायचा आहे . आणि तो नकार विधायक असनार आहे .

अशा पद्धतीने आपन सविस्तरपणे या पद्धतीचा अभ्यास केला पाहिजे .
या मेथडोलॉजीवर मानवमुक्ती मिशन मार्गक्रमण करते .

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
नितीन सावंत , परभणी 9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦