Sunday, 27 December 2020

ll निऋतीचा पट ll

ll निऋतीचा पट ll  

सप्तसिंधुत, निर्ऋती ऋती गणाच्या चार ज्ञातींची गणमुख्या होती. ती नियतकालिकांत, समया प्रमाणे (समय = ऋत = जगत्चालक नियमाप्रमाणे, order) शेतजमीनीचे, धनधान्याचे न्याय्य वाटप करत असे.

नदीच्या गाळपुराने, नदीकिनारीच्या शेतजमीनीच्या मिटवलेल्या बांधामुळे, ज्ञाती-ज्ञातीमध्ये शेतजमीनीच्या पुनर्वाटपावरुन होणारी संभाव्य भांडणे टाळण्यासाठी, ती शेतजमीनीचे ज्ञातींमध्ये पुनर्वाटप करत असे. हे शेतजमिनीचे पुनर्वाटप न्याय्य असावे यासाठी तीने पटाची, पटावरील घराची ज्ञातीच्या कुलाच्या संख्येएवढीच घरे बनवली.

शेतजमीन कमीजास्त चांगली-वाईट असू शकते. तिची प्रतवारी उत्तम, मध्यम, कनिष्ठ ठरवून प्रत्येक ज्ञातीच्या पटावर कुलांच्या तीन रांगा केल्या. प्रत्येक कुलाच्या वाटणीला उत्तम, मध्यम, कनिष्ठ अशी शेतजमिन वाटणीत येणार. एखाद्या कुलाला उत्तम तर दुसरया कुलाला कनिष्ठ शेतजमीन पुनर्वाटपात येऊन न्याय-अन्यायाचा प्रश्न उभा राहू नये यासाठी हा समतावादी पट निर्ऋतीने बनवला. चार ज्ञातींचे चार पट मिळून बनला चौपट.

याच पटाचा अर्थ उलट-सुलट लावत, व्यवहारात कधी न्यायासाठी कधी अन्यायासाठी त्याचा वापर मागील शतकांपर्यंत गावोगावी सर्रास होत आला तो हा पट, निर्ऋतीचा चौपट.

अत्रेंच्या 'गावगाड्या'तील काही संदर्भ स्पष्ट करतात की पटाचा वापर अाता-आत्तापर्यंत कसा होत आला आहे. निर्ऋतीचे वारसदार तो कसा वापरत आले आहेत.

१. कौल घेणे म्हणजे महत्वाचे निर्णय घेण्यासाठी 'इष्ट'देवतेची मदत घेणे त्याला पट्टा म्हणतात.

२. गावाच्या जमाबंदीच्या ताळेबंदाला पट्टा किंवा इजारपट म्हणतात.

तो पाटलाजवळ असतो आणि पाटिल त्याप्रमाणे वसूल करतो.

३. पाटिल, पटवारी हे जुळे - पट किंवा पट्टा या शब्दावरुन बरेच संभाव्य दिसते.

४. पट्ट म्हणजे मुख्य, या शब्दापासूनही पाटील शब्द निघाला असेल.

५. ज्यांच्याजवळ पट्टा किंवा पट असतो आणि त्याबरहुकूम जे पट्टी, सारा, अगर सार्वजनिक वर्गणी वसूल करतात ते पाटील-पटवारी.

६. तेव्हां सबंध जाती / जमातीत जो  स्मरणाचा धड (चांगल्या प्रकारचे स्मरण) असून लोकांवर ज्याचे वजन आहे अशा बुध्दिमान व मुख्य माणसाजवळच जातीचा पट राहावयाचा.

७. असे पट जातींच्या मुख्याकडे असत.

वि-राज घोगरे
मार्गदर्शक 
मानव मुक्ती मिशन

♦दत्तजयंती आणि दत्त सांप्रदाय

♦दत्तजयंती आणि दत्त सांप्रदाय

स्त्री सत्ता जात असताना ६४ योगीनींनी अनेक सांप्रदाय जन्माला घातले पुढे ते पुरुषांनी चालवले.
दत्त सांप्रदाय असाच एक मावळतीच्या स्त्रीसत्तेतुन जन्माला आलेला अब्राम्हणी सांप्रदाय.
अवधूत किंवा दत्त नावाचे कुणीतरी स्त्रीवादी व्यक्ती स्त्रीयांच्या राज्यात जावून दिक्षीत झाले त्यांनी तो सांप्रदाय  उभा केला.
पुढे ब्राम्हणांनी खोट्या कथा लिहुन त्यांचे ब्रम्हा विष्णु महेशासाशी जोडुन अलौकिक ब्राम्हणी तिन तोंडी दत्तात रूपांतर करुन तो सांप्रदाय हाइज्याक केला.

तरिही महानुभाव आजही एकमुखी दत्तालाच मानतात. 
भारतातले प्राचीन एकमुखी मूर्ती खानदेशात सिंधखेडा येथे आहे.अशी अनेक ठिकाणी एकमुखी दत्तांची मंदिरे आपल्याला पहायला मिळतील. 

एक मुखी दत्ताच्या डोक्यावरची केशाची चुंबळ हीच खरी स्त्री परंपरा राखणारी कींवा ज्या संप्रदायात थोडा स्त्री सारखं राहणं म्हणजेच स्त्रीची पाठराखण करण होय.दत्ताने स्रीयांची मुक्तता करुन त्यांना गुरु करुन घेतले अशा स्वरुपाच्या काही मिथक कथा आहेत.याचा अर्थ असा की दत्त हे स्त्रीस्वातंत्र्यांचे पुरस्कर्ते होते .
कारण दत्त या पुरषाने स्रीयांना गुरु केलं होत दत्ताचे चोवीस गुरु होते त्यात काही पहील्या स्रीया होत्या त्या स्रीया बंदीस्त होत्या त्यांची सुटका केली होती दत्ताने.

काही कथा व मिथकांच्या द्वारे भविष्यात दत्तांची अब्राम्हणी उकल करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करुत...

तोपर्यंत
अवधूत चिंतन..
गुरुदेव दत्त ...

शाक्त शैव परिषद...
♦♦♦♦♦♦♦♦♦♦

Saturday, 19 December 2020

संघटना का वाढत नाही....?

संघटना का वाढत  नाही....?

 प्रत्येकाने यात आपण कुठल्या प्रकारात बसतो याचा विचार करावा

1.तोकडा अभ्यास, सखोल अभ्यास न करता मतप्रदर्शन करणे. वस्तुस्थिती विचारात न घेणे.
2. वर्तमान घडामोडीचे अज्ञान.
3.चळवळीबाबत चिंता आणि तळमळ जास्त, परंतु प्रयत्नांत कमतरता.
4.सर्वसमावेशक भूमिकेचा अभाव
5. एकसंघ भावनेचा अभाव. 
6. वैयक्तिक कामे करण्याची धडपड.
7. संघटनेचे म्हणणे सोयीप्रमाणे मानणे.
8.स्वप्नाळू जास्त व वास्तववादी कमी.ग्रंथाळु जास्त,व्यावहारिक कमी.आदर्शवादी जास्त,भौतिकवादी कमी. 
9.जिंकू शकतो यांवर विश्वास नसणे.
10.मानापमानामध्ये झुरणे.न्यूनगंड बाळगणे.
11.जबाबदारी स्वीकारायला पुढे न  येणे.
12.सुसंवादाचा अभाव.
13. युध्दाच्या वेळी घरी बसणे व युध्द   झाल्यावर  लढण्याच्या गप्पा मारणे.
14.कामशूर कमी आणि बातशूर जास्त.
15. बोलण्यात आणि प्रत्यक्ष वागण्यात तफावत असणे.
16.काम करणा-यावर सतत टिका टिपणी करणे, मात्र स्वतः जबाबदारी न स्वीकारणे.
17.कम्फर्ट झोनमध्ये काम करणे.जीवाला तोसिस न देने.पोटातील पाणी सुद्धा न हलु देने. 
18.स्वतः चे दैनंदिन रुटिन न बिघडविता बदल करण्याची भाबडी इच्छा बाळगणे...
19.नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा ठेवणे परंतु त्याचे आदेश न पाळणे.
20.सहजशक्य नसलेले ध्येय निवडणे आणि सोपी कामे न करणे.
21.दुस-याकडून त्यागाची अपेक्षा ठेवणे, स्वतः मात्र सुरक्षित रहाणे.
22. एकमेकांच्या चांगल्या गुणांचा सन्मान न करणे. 
23.आपल्याच विचारांची टिमकी वाजविणे व इतरांनी केलेल्या चांगल्या कामांची दखल न घेणे.
24. आपल्या नेतृत्वा बद्दल आदर न बाळगणे आणि सतत दोष काढत रहाणे.
25. संघटनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास नसणे.
26.त्याग आणि समर्पण न करता क्रांतीची अपेक्षा ठेवणे.

Tuesday, 15 December 2020

मलाही जीवनरस पुरवीतात ही सांस्कृतिक प्रतिके ...

मलाही जीवनरस पुरवीतात ही सांस्कृतिक प्रतिके ...

आमचे दृविड पुर्वज अत्यंत संवेदनशील होते.माणूस असो अथवा पशु,पक्षी किंवा निसर्ग त्यांनी सर्वांना अत्यंत जीव्हाळा प्रेम लावला.वृक्ष पुजा,निसर्ग पुजा,प्राण्यांची पुजा करणारी संस्कृती आमची म्हणजे दृविडांची.याचे पुरावे भारतीय सर्व सण उत्सवांत मिळतात.बैल पोळा,नागपंचमी,दिवाळी हे सण आमच्या संवैदनशील पुर्वजांची साक्ष देतात.आमचे पुर्वज निसर्ग,प्राणी पुजक होते.चांगले काम करून मेलेल्या माणसांचे स्मारके बांधून आमच्या पूर्वजांनी त्यांच्या कार्यकतृत्वाच्या कहाण्या पिढीदरपिढीगत सांगितल्या आहेत.जाकाई , जोकाई , मेसाई,मरिआई,तुळजाई , रेणुका , सप्तशृंगी, ,खंडोबा,बहिरोबा,जोतिबा,थळोबा , बिरोबा, नरसोबा,म्हसोबा,विठोबा,या अकारहिन दगडांकडून आमचे पुर्वज प्रेरणा किंवा जीवनरस घेत आलेले आहेत.भरपूर सुगी आल्यानंतर आलेले सुख असो नाहीतर दुष्काळ पडल्यानंतर आलेले दु:ख असो, त्यांनी आपल्या पुर्वजांना आळवणे, आठवणे कधीही सोडलेले नाही.आमच्या पूर्वजांनी याच अकारहिन पुर्वजांच्या स्मारकांतून संय्यमाचा, चिकाटीचा जीवनरस पिढ्यानपिढ्या घेतला आहे.
          म्हणून ही हजारो वर्षे जीवनरस पुरवणारी स्मारके,प्रतिके आणि त्यांची अस्मिता सहजासहजी टाकून  देता येइल का ? टाकता येइल का ? आपली सांस्कृतिक  नेनीव हे सर्व सोडायला सहजासहजी तयार होइल का ? 
      ते सर्व टाकुन देवुन त्यांनी गावंढळपणा सोडावा असे म्हनत, आपण मात्र नवे पुतळे स्मारके प्रतिके उभी करत आहोत. आणि याला आपण आधुनिकता म्हनतो.हा आपल्या वर्तनातील दुट्टप्पीपणा आहे.ज्याप्रमाणे आपले पुर्वज आकरहिन दगडातून जीवनरस घेत होते,त्याचप्रमाणे आपणही चौक,पुतळे,प्रतिके यांतून जीवनरस घेत असतो.ते काही वाईट नाही.

आस्मिता आणि प्रतिकांचे राजकारण

भारतात ब्राम्हणी छावणीचे मुख्य राजकारण आस्मिता आणि प्रतिकांचेच राहिलेले आहे.त्यांना भौतिकवादाशी कधीही काहीही घेणेदेणे नसते.नव्हते.आज bjp संघ रामायणातील रामाच्या प्रतिकावर सत्ताभोगत आहे.त्याला पर्यायी सांस्कृतिक भूमिका घेण्यासाठी शंबुक , सिता , रावण , मंदोदरी , शूर्पणखा , शबरी ही प्रतिके उभी केली गेलीत.हे पर्यायी उत्तर अगदी समर्पक आहे.
नाही आम्हाला हे आस्मितांचे आणि प्रतिकांचे राजकारण मान्य नाही.आम्ही कोरड्या भौतिकवादाची लढाई लढु म्हणून चालेल का ?
डाव्यांचा ह्या अस्मिता आणि प्रतिकांच्या लढाईला कसुन विरोध राहिलेला आहे.आता आपल्याकडे एवढा पावरफुल मार्क्स असताना भारतीय प्रतिकांना इतके का घाबरून जावे की तुम्हाला त्या प्रतिकांना विरोध करायची वेळ यावी.फुले आंबेडकर आस्मिता आणि प्रतिकांच्या लढाईत अव्वल असणे का रुचावे ? सर्वांना प्रेरणा उर्जा देणारी ही प्रतिके का नको आहेत तुम्हाला ? डाव्यांच्या कुठल्याही ऑफिसमधे प्रतिके नसतात का ? असतात पण ती मार्क्सवादी अभारतीय प्रतिके मोठ्याप्रमाणावर मिरवली जातात.फक्त भारतीय प्रतिकांच्या बद्दल किंतूपरंतु केला गेला तो डाव्यांच्या पक्षातील ब्राम्हणी विचार बाळगणाऱ्या लोकांनी. 

ही प्रतिके ब्राम्हणी छावणीला सहज चित करतील ती तुम्ही कुठल्या भितीने दुर लोटत आहात ? 
म्हणून प्रचंड कोरडे जीवन जगण्यापेक्षा आपणही ही जीवनरस पुरवणारी ठिकाणे पाहिली पाहिजेत.प्रतिके स्विकारली पाहिजेत.याद्वारेच तर देश संस्कृती बचावाचा मोठा उठाव होनार आहे.
आमची लढाई पक्ष संघटना म्हणून नाही तर ही लढाई अस्तित्वाची, अस्मितेची,संस्कृतीची आहे.आम्हाला जीवनरस पुरवणारी गावे,संस्कृती ते नष्ट  करायला निघालेत , ते आम्ही कसेकाय नष्ट करु देनार ? 
आम्ही जीवनरस पुरवणारी प्रतिके संस्कृती देश वाचवण्यासाठी लढा उभारनार आहोत.आमची भाषा , वेशभूषा, आमची संस्कृती , आमच्या अस्मिता आणि प्रतिके घेवूनच आम्ही सक्षमपणे लढाई लढु शकु.त्याशिवाय आम्ही उपरे बनु.
म्हणून मलाही खुनवतात ही सर्वच सांस्कृतिक प्रतिके.मला जीवनरस बहाल करतात ही ठिकाणे. 

नितीन सावंत परभणी 
9970744142 
१२ डिसें. २०२०

Friday, 4 December 2020

मानव मुक्ती मिशन संपर्क यादी राज्य व विभाग

मानव मुक्ती मिशन संपर्क यादी राज्य व विभाग 
♦मानव मुक्ती मिशन ♦

मार्गदर्शक : राजकुमार घोगरे ( पुणे )

1) अध्यक्ष तथा राष्ट्रीय संसद प्रमुख :नितीन सावंत ( परभणी ) 
मो. 9970744142

प्रदेशाध्यक्ष - ॲड अण्णा पातळे 

मानव मुक्ती मिशन प्रेरीत काही कक्षांचे प्रमुख :

1) नूरजहाँ शेख ( परांडा. जिल्हा उस्मानाबाद ) :प्रदेशाध्यक्षा हरिती स्त्रीदास्यांतक संघर्षसभा. 
मो.7744074290

3)जयराम सांगळे (प्रदेशकार्याध्यक्ष जात्यांतक शेतकरी शेतमजूर सभा )
मो: 9604458756

4)इस्माईल तांबोळी ( बार्शी ) : प्रदेशाध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षक परिषद. 
मो.9689903001

5) राम सरनाईक (परभणी) :
प्रदेशाध्यक्ष भगतसिंग स्टुडंट फ्रंट. 
मो.9404504159

6)जयेश आहेर.
महाराष्ट्र राज्य संघटक,
भगतसिंह स्टुडंट फ्रंट
७०२८७१९७१३

7)आसिफ नदाफ (कराड जिल्हा सातारा): प्रदेशाध्यक्ष मजलिस ए इंसानियत.
मो.9527975286 

8) रफिक सय्यद ( प्रदेश कार्याध्यक्ष मजलिस ए इंसानियत महाराष्ट्र ) 
मो : 88069 36151

11)अजय महाराज वेलदोडे ( प्रदेश संघटक शाक्त शैव परिषद , महाराष्ट्र ) 
9307189759 

15) विकासराव चव्हाण 
पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष 
शाक्त शैव परिषद 
9653454607

16) अविनाश खाडे ( मराठवाडा विभागीय अध्यक्ष मानव मुक्ती मिशन) 
9822214310

17)अभय पाटील बुलढाणा ( अमरावती विभागीय अध्यक्ष मानव मुक्ती मिशन ) 
+91 84828 88292

18)नितीन दांदळे ( अमरावती विभागीय अध्यक्ष भगतसिंग स्टुडंट फ्रंट ) 
Mo : 9112681017

19)प्रभाकर शिंदे ( नागपूर विभागीय अध्यक्ष मानव मुक्ती मिशन ) 
Mo : 9834438685 
----------------------------------------