Monday, 31 August 2020

♦पुणे - मानव मुक्ती मिशन ♦

♦पुणे - मानव मुक्ती मिशन ♦

ज्ञानेश्वर राखोंडे 8379010175
पंकज बाविसकर 9209160437
गजानन देशमुख 9890409171
कुष्णा देशमुख  88059 67809 
स्वप्नील लांडगे 95119 36213
सन्नी राठोड  9511747781
सोनाई पाटील 8805631396
यशवंत शिंदे -9420045996
रिद्धी जाधव - 9167846157 
शिवाजी रनवरे ( शिरूर ता अध्यक्ष m3 ) 9766993214
प्रशांत गडपिले - 8806666050
रहिम शेख - 8999680779
सलमान मौला - 95278 60313
संजय शिवकर उरळी कांचन 96238 31891

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

Saturday, 22 August 2020

सरकारी नोकरदारांचा प्रामाणिकपणा ..

#सरकारी_नोकरदारांचा_प्रामाणिकपणा ..

तुम्ही तुमच्या क्षेत्रात प्रामाणिक असने कौतुकास्पद कसे होऊ शकेल? प्रामाणिकपणा हा तुम्हाला मिळालेला उपजत गुण आहे.तो तुम्ही पाळलाच पाहिजे.तुम्ही प्रामाणिक असायलाच हवे ना. तुम्ही इमानदार नाहीतर काय बेइमान होनार का ? स्पेशली सरकारी क्षेत्रात काम करनाऱ्या एखाद्याला मेडिया ते खुप ईमानदार आहेत,प्रामाणिक आहेत म्हणून जर पब्लिसिटी देत असेल तर समजावे काहीतरी लफडा आहे. 
त्याला पगार कशासाठी मिळतो ? इमानदार आणि प्रामाणिक असण्यासाठीच ना ? कि बेइमान वागावे म्हणून ? 

सरकारी क्षेत्रात काम करनार्यांचा इमानदारी हा गुण कौतुकाचा विषय होऊ शकत नाही जरी भांडवलशाही त्यांचे कौतुक करत असेल तरी... 

हल्ली वकिलीच्या क्षेत्रात आमका ईमानदार म्हणून विशिष्ट व्यक्तिला पब्लिसिटी आशा प्रकारे दिली जाते जणू काय सर्व वकिल बेइमानच आहेत. पोलीस खात्यातातही विशिष्ट मेकअप केलेला चेहरा भांडवलशाही ईमानदार म्हणून दाखवते जणू काय सर्वच सावळे काळे खरबड्या तोंडाचे बेइमानच असतात. यात आयुक्त असो नाहीतर कलेक्टर ते लै ईमानदार आहेत म्हणून भक्ताड आणि ते आपल्या जातीचे हाइतवाले रोज पारायणे करत असतात.मग तुमच्या साहेबाला पगार न घेता इमानदार प्रामाणिक रहा म्हनावे? जनु काय आख्खे जग बेइमान झाले आहे. आणि हे दोनचारजनच तेवढे प्रामाणिक, इमानदार उरले आहेत.

कर्तव्यात इमानदारी आणि या प्रामाणिकपणा या गुणांचे कौतुक होत असेल तर समजावे देश विनाशाच्या दिशेने जात आहे. कारण हे गुण दुर्मिळ होत असल्याचे लक्षण आहे. 

नितीन सावंत परभणी 
9970744142

Sunday, 16 August 2020

भटक्यांच्या स्वतंत्र्याचे काय ?

भटक्यांच्या स्वतंत्र्याचे काय ? 

पोट आणि भुक जन्माला घेवून येणारी माणसे म्हणजे भटके विमुक्त.गावच्या हगनदरीत बिराड उतरवून कोरकुटक्यासाठी आयुष्य पनाला लावणारी ही माणसांची टोळी.
आपल्याच सारखी दिसनारी हडामासाची माणसे किती भिषण आणि वेदनादाई जीवन जगतात ना ? 
फक्त आणि भक्त अन्नासाठी जीव धोक्यात घालून कुठल्याही जीवघेण्या प्रयोगाला ते सामोरे जातात. छातीवर दगड ठेवून मोठ्या हतोड्याने दगड फोडताना दगडी मनाचे कुनीच का त्यांना थांबत नसावे ? ती गोलाकार झुंड किती निर्दयीपणे पहात असते.डोळ्याच्या बुबुळात दोरीची गाठ खुपसून मोटारगाडी किंवा दगड ओढनारे ते प्रयोगकर्ते आणि त्यांच्या त्या शरिराला आणि टोळ्यांच्या खाचांना त्रास होताना बाजुचे नुसतेच  पहातात. त्या जीवघेण्या वेदनेला कुनीच का थांबत नसावे ? खड्डा खोदून त्यात स्वताला तासंतास पुरुन घेवून गुदमरून जायची रिस्क घेनारे त्या मातीच्या ढीगार्यावर चार चिल्लर पैसे कुनी टाकतील याची वाट पहात असतात.कित्तेक मधेच गुदमरून मेले सुद्धा पहाणाऱ्याला फारसी दया आल्याचे अजुन पहाण्यात नाही.
हे तर महाभयंकर आहे की आपल्या पोटाचा गोळा,! अगदीच केविलवाणी पहाणारी ती बाहुलीच जनु,काठीवर बांधून तिला लोकांच्या समोर प्राण्याप्रमाणे खेळवणे, मृत्यूच्या दारातून तिची ने आन करणे आणि सभ्यतेचा आव आणणाऱ्या संस्कृतीने ते करमणूक म्हणून पहाने किती अमानवीय आहे. 
करोडो भटक्यांना अजुन बुड टेकवायला हक्काची जागाही नसावी किती दयनीय जीवन आहे हे !
या देशात संधी गुण किंवा कार्यकतृत्व बघुन मिळत नाही तर जात,वस्त्या,रहणीमान आणि तोंड बघून दिली जाते.आम्ही गुणवान नाहीत हे साफ खोटे आहे.आम्हाला संधी दिली जात नाही हे वास्तव आहे.संधी दिली तर त्यांचे रेकॉर्ड मोडले जातील,त्यांना शरमेने माना खाली घालाव्या लागतील म्हणून प्रस्थापित व्यवस्था सदैव संधी नाकारत असते तरिही एखादी हिमा दास त्यांच्या थोबाडीत एडिडासचा बुट मारतेच.
सर्कसीत अशक्य कोटीतले प्रयोग करुन दाखवणारे सारे  पोटाच्या भुकेचे व्याकुळ कलाकार एकच संदेश देत असतात आम्हाला संधी द्या रे आम्हीही काही कमी नाहीत.
मानवी शरिराचा संपूर्ण तोल टांगलेल्या दोरीवर तासंतास संभाळून धरणे,छातीवर दगड फोडणे,बैलाला,माकडाला,अस्वलाला,कबुतराला,कुत्र्याला सर्व कौशल्य पनाला लावून ट्रेन करणे,उंच आकाशातील उडत्या पक्षाला एकाच नेमात जमीनीवर पाडणे आणि ते ही भटके विमुक्त तुमच्या भाषेत अज्ञानी जमातींनी, अचाट आहे हे. 
देशाच्या कलाकारी आणि करमणुकींच्या क्षेत्रात देखील तुम्हाला माजी अस्पृश्य,भटके विमुक्त,आदिवासी,दलीत,शेतकरी जातीतले चालु नयेत दुखद आहे.
         या देशात पारधी,बेलदार,कैकाडी,वडार,डक्कलवार , उचल्या वासुदेव आणि आदिवासी यांसारख्या असंख्य जाती,जमाती ह्या आजही भटकंती करत जीवन जगतात.त्यांच्या नावावर स्वताची हक्काची इंचभरही जमीन नाही.काही जातींना एखाद्या गावी आपला पाल ठोकावा लागला तर त्यांना गावच्या हगनंदरीत रहावे लागते. 
आशा जाती जमातींची मुले शाळेत गेल्यानंतर भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा रोज त्यांना म्हनायला लावतात.
भारताला माझा म्हणण्याइतपत त्यांच्याकडे हक्काचे काय आहे? 
प्रतिज्ञेतील माझा या शब्दावर माझा आक्षेप आहे. 
भारत एक देश आहे.त्या देशातील सर्वजन माझे बांधव आहेत.माझे त्या देशावर प्रेम आहे.अशी ती प्रतिज्ञा भटक्या विमुक्तांसाठी असावी.
       ज्यांच्या नावे पाय ठेवायला इंचभर जमीनही नाही,ज्यांना पाणी प्यायला हक्काचा पानवठा नाही,ज्यांना मुक्त वावरायला एक हक्काचा गाव नाही, त्यांना अख्खा भारत माझा म्हनायला लावने ही त्यांची क्रृर थट्टा आहे.
       तरीही नकट्या नाकाने आम्ही वर्षामागून वर्षे स्वातंत्र्याचे सोहळे साजरे करत आहोत. 

नितीन सावंत परभणी 
9970744142
दि.१५ ऑगस्ट २०२०

Saturday, 15 August 2020

♦बर नाही आज जरा खर बोलू ♦


♦बर नाही आज जरा खर बोलू ♦

पी.एच.डी. म्हणजे ब्राम्हणी डिग्री.समजापासून १००% तुटल्याचे आधिकृत व मान्यताप्राप्त प्रमाणपत्र. 
जगाचे सर्व ज्ञान मलाच मिळाले आहे आणि मीच एकमेव ज्ञानवंत आहे हा अविर्भाव निर्माण करुन देनारा पेशा म्हणजे प्राध्यापकी. ग्रामीण भागातील साध्या लोकांना, शेतकरी, शेतमजुरांना हिडीस फिडीस भावनेने पहानारा तसे वागवनारा व मळकट कळकट रंगधारी गरिब शेतकऱ्यांना जास्तकाळ जवळ सुद्धा फिरकू न देनारा,त्या रंगाप्रती घृणा बाळगनारा हा आइतखाऊ महाभाग म्हणजे प्राध्यापक .

आपल्या बुद्धीमत्तेचा वापर केवळ आणि केवळ ब्राम्हणी आणि भांडवली व्यवस्थेच्या हितासाठी तिच्या जतन संवर्धनासाठी करनारा तो मध्यमवर्गीय बुद्धीजीवी होय . त्यात हे प्राध्यापक अग्रभागी . 
तुम्ही कधी एकलेय का ? की चार प्राध्यापकांनी धरने आंदोलनात जावून मार्गदर्शन केले .
तुम्ही कधी एकलेय का ? 
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ५० प्राध्यपाकांकडून आर्थीक मदत. किंवा 
हे  प्राध्यापकांनी घेतले दोन अंध मुले दत्तक .

आपल्याच सारख्या प्रध्यापकी पेशातल्या किंवा नोकरदार वर्गातच जाणेयेणे ठेवने त्यांच्याशीच सन्मानाच्या संकल्पनांत आयुष्य घालवने, अतिउच्च वर्गातील सवई ,वस्तू फ्याशन आयात करन्याचा प्रयत्न करने ,बायको एके बायको करत मिरवने हे त्याचे आयुष्यातील इव्हेंट असतात . मी phd केलीय , मी डॉ आहे , हे त्याला मिरवण्यात मोठे स्वरस्य असते .

बर यांच्या पिएचड्या तरी इमानदारीच्या असतात का ?काहीजण
हो phd साठी मोजतात , phd प्रबंध चोरतात , phd लिहून घेतात , लागणारी माहिती गोळा करायला पैसे देवून माणसे लावतात .... असे अनेक phd चे प्रकार आहेत ...

phd धारक किंवा प्राध्यापक झाले की एका भयाणक आत्मकेंद्रि  , आत्ममग्न आत्मप्रोढी विश्वात त्यांचा प्रवेश होतो .

या वर्गाला सामाजिक भान राहिलेलं नाही. लठ्ठ पगारामुळे वाचन,लेखनही थांबलेलं. वर्गाबाहेर जाउन कुणाचं दुख समजून घ्याव,दूर करण्यासाठी मदत करावी,गावाची,भावाची,माय,बापाची हे तर त्यांच्या मनीही येत नाही.
किमान यांनी शेतकरी शेतमजूरांच्या बाजुचे साहित्य तरी लिहावे . आधी साहित्य क्रांती मग समाज क्रांती पन ते ही यांना जमले नाही . फिडेल गेला किती प्राध्यापकांचे लेख आले ??

यांना
आपल्या दारावर कुनी आलेला गेलेला त्याला खपत नाही . डुप्लीकेट स्माइल हा त्याचा ,महतप्रयासाने शिकुन कमवलेला अनमोल दागीणा . सर्वांची घरे हुडकून काढता येतात पन यांची घरे शोधने जरा अवघडच . समाजव्यवस्थेपासून कोसो दुर रहतात ही लोक .
दुष्काळ येवो , सुनामी येवो , कुनी मरो कुनी खपो आम्हाला त्याचे सोयर न सुतक ...

गावात जावून पारावर , चौकात चार शेतकरी , शेतमजूर ,हमाल गोळा करुन कधी मार्गदर्शन सुद्धा या लोकांनी केल्याचे मी पाहिलेले नाही . बरे किमान आपल्या धंद्याच्या बाहेर कधी चार विद्यार्थ्याना सुद्धा हे लोक मार्गदर्शन केल्याचे दिसत नाहीत .

आनेक शिक्षकांचे त्यांच्या हताखालून शिकुन गेलेले विद्यार्थी मोठे झालेले बघायला मिळतात तशा ब्यातम्या झळकतात . पन प्राध्यापकांना विद्यार्थीच असतात का नाही कुनास ठावूक . कारण कुणीही विद्यार्थी हे माझे मार्गदर्शक आहेत असे मनापासून मानयला तयार नसतो शिक्षकांप्रती असलेली आत्मीयता यांच्याप्रती का नसते कुनास ठावूक .

चार पाहुने आल्यावर आर्ध्या अर्ध्या कपात चाहा आणि चौघांमधे ट्रेमधे दोन बिस्किटे ठेवून पाहुनचार करनारे पुण्यातील सदाशिवपेठी ब्राह्मण परवडले पन हे लोक नको .प्राच्यापकांनी केला मोठा पाहुनचार , आज अमुक प्राध्यापकाने आम्हाला तुडुंब जेवायला घातले , आज आमच्या गावी प्राध्यपकाची जेवायची पंगत होती , प्राध्यापकांनी केले अन्नदान अशी विधाने तर मोठी हास्यास्पद वाटतात .तुम्ही सामाजिक देने लागता या भावनेने एकदाच निधी माघायला जावून बघा एकग्लास पाण्यावर त्यांचेच मोठेपन , कुजकेपन आइकुन रिकामे या किंवा शेपाचशे घेवून या .प्रचंड कंजूष ही जमात . प्राध्यापकांना एवढाल्या पगारी असुन सुद्धा मोठमोठ्या बिल्डींगच्या गेटवर , भिंतीवर पाटी लावलेली असते येथे पिकोफॉल करुन मिळेल म्हणून ... बायकोला सुद्धा पिकॉफॉल करुन पैसे कमवायला लावते ही जमात .. 
समोर अन्याय अत्याचार होत असताना गप्प बसने , लोक अज्ञानात रुढी परंपरांत तडफडात असताना त्यांना योग्य रस्ता न दाखवने , ही कपाळ करंटेपनाची लक्षने आहेत . यापेक्षा अधिक न बोललेले बरे ...
यासंदर्भात आपल्याला ८ तासाचा पगार २ तास शिकविण्यासाठी ६ तासाच्या तयारी साठी दिला जातो . पन हे तास कुठलाही तयारी न करता बेइमानी करण्याचे काम आजचे प्राध्यापक करत आहेत . 
प्राध्यापक हेरंब कुलकर्णी हे एक अशे प्राध्यापक आहेत की ज्यांनी सहाव्या वेतन आयोगाची पगार घेन्यास सक्त नकार दिला. सरकारने नकार दिल्यास ते त्यांची पगार डोनेट करतात .

त्यांनी प्राध्यपकांचे अशैक्षणिक जोडधंदे या विषयावर संशोधन केलेले  आहे आणि त्यावर पुस्तकही आहे . त्यात त्यांनी प्राध्यपकांचे जोडधंदे दिलेत 
" चड्डी बनियान विकने , प्लॉटिंगचा धंदा करने , विम्याची दलाली खाने , चैन मार्केटिंगचे धंदे करने , मनिसर्क्युलेशन चे स्किमा चावने ,मटका लावने , इत्यादी वैध अवैध अशैक्षनिक जोडधंदे तथाकथित प्राध्यापकांतील महाभाग अग्रेसर आहेत. आणि संस्थाचालकाच्या वाढदिवसाच्या  होर्डिंगावर यांचेच धोबाडं असतात . लाचारी आणि हुजरेगिरीचे पुनरुत्पाद्न महाविद्यालांमधुन करने बंडखोरीच्या प्रेरणा मारुन टाकने  यासाठीच प्रस्थापित व्यवस्स्था यांना ७ व्या वेतनाची लाच देत आहे . हा आजच्या प्राध्यपकांचा धंदा आहे ..
बरे हे नेहमी यांच्या बुद्धीमत्तेचे स्तोम नेहमीच मजावतात.

या देशात खडतर शारीरिक श्रमसाठी रोहयोवर १९२ रु रोज दिला जातो अशेच  कुशल श्रमासाठी रुपये ४ शे रोज आणि तथाकथित बौद्धिक श्रमासाठी या प्राध्यापक वर्गाला रुपये ३ हजार रोज. असा भेद करुन आणि विनाकारण बोद्धीक श्रमाचे स्तोम माजवून श्रमीक वर्गाच्या हिताचे बोद्धीक कार्य होऊ नये याची दक्षता प्रस्थापित व्यवस्था घेते.
भालचंद्र नेमाडे कोसलामधे म्हणतात "ही शिक्षणपद्धती म्हणजे तरुण मुलांना झूल पांघरलेली हिजडे बैल बनवणारी षंढ व्यवस्था होय."

आणि हे प्राध्यापक राबतात तरी किती 
वर्षाच्या तिनशे पासष्ट दिवसांत एकूण रविवार ५२ सरकारी सणांच्या सुट्या २० दिवस,दिवाळीच्या सुट्या २० दिवस,महापुरुषांच्या जयंत्या २० दिवस,परिक्षांच्या सुट्या २० दिवस आणि स्वताच्या हक्काच्या रजा २० दिवस शिवाय उन्हाळी सुट्या दोन महिणे म्हणजे ३६५ दिवसांत तुम्ही फक्त १५३ दिवस कॉलेजात असता तर  ३०६ तास शिकवता.आणि तोरा केवढा तर जागतिक दर्जाचा.

म्हणून इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेचे काम केल्याबद्दल कुठलेही आंदोलन ,मोर्चा न करता त्यांची सरकारने पगारवाढ केली आहे.ही शेतकऱयांची,बेकार बेरोजगारांची थट्टाच आहे.अंगणवाडी सेविका,विनाअनुदानावर काम करणारे शिक्षक,कंत्राटी ग्रामसेवक,पोलीस पाटील, सफाई कामगार,न्यायालयात काम करणारे कंत्राटी सेवक दिसत नाहीत काय?हे लोक जीव ओतून काम करतात.नेमाडें म्हणतात त्याप्रमाणे प्राध्यापकांना अज्ञानच शोभून दिसते.यांनी यांच्या हाताखालून एकही क्रांतिकारक घडवला नाही.संशोधक,शास्त्रज्ञ,तत्वज्ञ तर सोडूनच द्या.

मला सांगा ...

प्रत्येक श्रमाला बुद्धी लागतेच .. ना 
शेवटचा वाफा कधी भिजेल आणि यासाठी कधी मोटार बंद करायची हे आमच्या गुराख्याला कळते . त्यालाही बुद्धी लागतेच ना . तो ती योग्य वापरतो .

शेतकरी शेतमजूर हमाल यांच्या अमुर्त श्रमाची किती रक्कम देता ? ऊसतोणी करताना , शेती करताना , हमाली करताना , कारखान्यात काम करताना बुद्धीचा वापर होत नाही का ?? आणि पाठांतर वाचन आणि लिखान म्हणजे बुद्धीवान का?

कुंभार मडके घडवताना हाताने श्रम करतो.हे झाले शारीरिक श्रम. त्याच जोडिला मेंदुचा वापर होतो.लक्ष द्यावे लागते. नक्षीकाम करताना, आकार देताना , बोद्धीक तान द्यावा लागतो .. म्हणजे हे बोद्धीक श्रम ..

मग प्राध्यापक कोनते वेगळे शारिरीक श्रम करतो ..

मग बुद्धीजीवी प्राध्यापकच कसे ?

(आर्थात काही अपवाद असतात ,आणि अपवाद हा नियम नसातो )

नितीन सावंत, परभणी 
9970744142