Monday, 16 March 2020

♦अस्पृश्यता थांबवा ♦

♦अस्पृश्यता थांबवा ♦

मुस्लिमांना अस्पृश्यतेत लोटणे चालु आहे.एखादी जात अस्पृश्य काशी बनते हे बघायचे असेल तर आज मुस्लिमांच्या संदर्भात जे द्वेषजनक वातावरण आहे त्यावरुन तुम्ही अंदाज बांधु शकता.तिरस्कार अत्यंतिक द्वेष,निंदा आणि खोट्या अफवेतुन अस्पृश्यतेला सुरुवात होते.
दिल्ली मुंबई पुणे यांसारख्या अनेक मेट्रो सिटीज मधे हल्ली मुस्लिमांना उच्चजातवर्गीय कॉलण्यांत किरायाणे घरे देने बंद करण्यात आले आहे.उच्चजातवर्गीयांच्या मोठ्या कंपण्यांत मुस्लिमांना येथून पुढे नोकऱ्या न देण्याचा फतवा जाहिर करण्यात आलेला आहे.दिल्लीतील मुस्लिमांवर झालेल्या हल्यानंतर अशे फतवे जगजाहीर झाल्याचे आपण पाहिले आहे.बहुतांश ब्राम्हणी सनातन्यांनी यावर अमलबजावणी देखील सुरु केलेली आहे.हे वातावरण भविष्यात सतत चालु राहिले तर भविष्यात १००% मुस्लिम अस्पृश्य ठरतील.सध्या २५ % काम ब्राम्हणी छावणीकडुन पुर्ण झालेले आहे.कारण जो तो मुस्लिम म्हटले की आधी संशायाने बघत आहे.या बद्दल भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ राजन क्षीरसागर म्हणतात की आगोदर मुस्लिमांवर विश्वास दाखवा संशयाने बघने बंद करा.

ज्यांना मुस्लिम समुदायाला तिरस्कृत ठरवून अस्पृश्यतेत लोटायचे आहे.ज्यांना तसे करणाऱ्याला मदत करायची आहे आशांसाठी ...
किंवा थोडीतरी माणुसकी शिल्लक आहे आशांसाठी काही उदाहरणे देत आहे जी वास्तवादी आहेत ...

१)मागे काही दिवसांपूर्वी  मांगाचा नागु मेला तेव्हा व्हंडी खालाने शंबर शंबर रुपये गोळा करुन त्याचा अंत्यविधी केला..( किस्सा सांगणाऱ्याच्याच शब्दात मांडला आहे )

२)हरिभक्त पारायण कुरुंदकर महाराजांच्या वडिलांना हार्टअट्याक आला.त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी उसने पैसे हवे होते.सगळ्या हिंदूंच्या घरी महालक्ष्मी पुजण चालु होते.लक्ष्म्या घरात बसल्या असताना पैशांची लक्ष्मी घराबाहेर जावु देने बरोबर नाही,म्हणून त्यांना हिंदू म्हणवून घेणाऱ्या कुनीही मदत केली नाही.बाहेर प्रचंड पाऊस चालु असताना आशावेळी त्यांनी मंगलकार्यालय चालवणाऱ्या मालकाला मदतीसाठी फोन केला.मालक पैशाची मदत करतो म्हनाले.गाडी करुन तालुक्याला येइपर्यंत मदतीची रक्कम घेवून माणूस एका कोपऱ्यावर भर पावसात उभा होता.दहा हजाराची कापडात गुंडाळलेली ऱक्कम मदत करणारा व्यक्ती मुस्लिम होता.

३)इर्शाद हा गावचा मुक्तीदाता मानला जातो.कुठलीही समस्या आसली लोक त्यांच्या दारात निवाड्यासाठी येवून बसतात.ओटी(मासिक पाळी) येत नाय म्हणून लग्नाला आलेली एक ताई आणि तिची आई इर्शादकडे येवून म्हनाली यावर काही उपचार आहेत का ? असतील तर काय खर्च होइल ते देवु तुम्ही दवाखाना आणि डॉक्टर सुचवा.इर्शादनी त्यांना डॉक्टर मिळवून दिला.

४)सोमनाथची आई ज्यांच्याकडून बांगड्या भरुन घेते तो रमु मुसलमान आहे ज्याचे खरे नाव माहिती पण नाही.तो वर्षानुवर्षे गावात महिलांना बागंड्या भरायला येतो.

यापेक्षा कितीतरी ग्रेट उदाहरणे आपल्या आजूबाजूला आहेत.ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्वरित दवाखान्यात घेवून जानारे,धान्य बाजारहाट घेवून देनारे,घरच्या लग्नात हक्काने वाढायला कामाला हजर असनारे मुस्लिम असतात.
त्यामुळे अस्पृश्यता टाळा.अत्यंतिक द्वेष पसरवणे बंद करा.साले माजलेत हे छुप्या पध्दतीने दलितांच्या बद्दल  शेडुल्ड कास्ट बद्दल म्हटले जाते.त्याच जोडीला आज साले माजलेत,हकलले पाहिजेत देशातून,.. हे छुप्या पध्दतीने मुस्लिमांच्या बद्दल पसरवले जात आहे.हे थांबवा. द्वेष आणि अत्यंतिक तिरस्कार अस्पृश्यतेला जन्म देतो.

नितीन सावंत परभणी
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

Saturday, 7 March 2020

ll महिला दिनाच्या निमीत्ताने ll

ll महिला दिनाच्या निमीत्ताने ll

आजही तिला मोठ्याने हसता येत नाही,चौकटीच्या बाहेर पाऊल टाकता येत नाही.काही घरातील कर्तीधर्ती माणसे ही गोस्ट अभिमानाने मिरवतात "आमची बाई चौकटीच्या बाहेर पाऊल टाकत नाही !"

आशा गावांना मानामोळ्याचे गाव म्हंतात.म्हणजे ज्या गावातील बाई दुकानात जात नाही,गिरणीत जात नाही,पाणी भरायला जात नाही,ढाळजेत सुद्धा येत नाही ते गाव प्रतिष्टेचे.तिथेच मुली द्याव्यात,कराव्यात असा तो नियम.म्हणजे गावची प्रतिष्ठा बाईच्या दमकोंडीवर.पदर घेने,मोठ्याने न बोलने,निर्णय प्रक्रियेत सहभागी नसणे ही चांगली बाई आसल्याची लक्षणे. माझे तर एक सुत्रच बनलेले आहे जिच्या गळ्यात भरपूर दागिने ती जास्तित जास्त डांबलेली.कधीतरी बारा महिण्याला घराच्या बाहेर येणारी ती अंगभर दागिने लपेटून येते.

हळ्दीच्या डागाचा नवरा मेला तरी तिला जन्मभर सांभाळनारे ग्रेट.तसे वर्तन करनारी पोटजात श्रेष्ठ.आणि पुनर्विवाह लावुन देनारे तिचे आयुष्य पुन्हा सुंदर बनवनारे हलके, ही स्त्रीची सिडी करुन बनवलेली उलटी रित.स्त्री ही जातीव्यवस्थेचे खरच महाद्वार आहे.

कलपरवा भाषण संपल्यानंतर एका msw च्या विद्यार्थीनीने उभे राहुन प्रश्न केला.हा भेद घरातच होत असेल तर.ह्रदयाला टोचले.आपनही हक्क आधिकारांना पात्र आहोत ही जाणीव नव्हती तेव्हाचे ठिक होते.स्त्री निमूटपणे स्विकारे ते.मी सुद्धा दादाच्याबरोबरीने घरात का जगु शकत नाही ? त्याचे आंथुरणे मी का काढावीत ? त्याच्या अंथुरानाच्या घड्या त्याने का घालू नयेत ? हे प्रश्न आज मुलींना सतावत आहेत.ॲड वैशालीताई डोळस म्हंतात "स्वयंपाक कुणी करावा तर ज्याला भुक लागली त्याने".स्विकारेल का निदान मध्यमवर्गीय संस्कृती तरी ? आहे ना अवघड.भरधाव वेगाने पोरगी मोटारसायकल चालवत गेली की त्या कोपऱ्यापर्यंत जाइस्तोवर मान मोडेपर्यंत बघनार्या मंडळीचे म्हनने असे असते की बाई स्कुटीवरच छान दिसते. याच्या पुरुषी अहंकाराला धक्क पोहंचतो तिने गाडी चालवल्यावर.जेवनाचे ताटे कुनी लावावीत.निदान पाण्याचा तांब्या तरी आपल्याला भरुन घेता येतो का ?? आयुष्यभर सर्व ऋतूत तिने लागनार्या १२ तोंडांच्या भाकर्या दिवसरात्र बडवत बसाव्यात,आपन एकदातरी स्वखुशीने तिचे हे काम हलके केलेय का.जमेल का ?

आमच्या परभणीत मालतीताई गिरी आहेत.त्या सायकल पासुन ट्रकपर्यंत सर्व वहाने धुतात.म्हणजे वाशिंग सेंटर चालवतात. एवढेच नव्हे तर सायकल पासुन मोठ्या ट्रक पर्यंत सर्व वहाने चालवतात.त्या बोलताना म्हनाल्या की तुमच्या सैराटच्या आर्चीने आत्ता ट्र्याक्टर चालवले आहो मी तर २००१ सालीच ट्र्याक्टर चालवला.पण मला परिस्थेने चालवावा लागला एवढेच.कुठलेही काम करन्याला न लाजता त्यांनी त्यांची दोन मुले व एक मुलगी उच्च शिक्षणासाठी पुणे औरंगाबाद ला पाठवलीत. त्यांच्या वाशिंग सेंटरवर गेलो तर अगदी पुरुषांना लाजवेल या पद्धतीने त्या गाड्या वाश करत असतात.पुरुषांच्या कपड्यात बॉब कट केल्याल्या आमच्या मालतीताई ताई गिरी.आज त्यांची दैनिक एकमत ने परभणी पेजवर दखल घेतली आहे.बरे एखादी मालतीताई धाडसाने पुढे येते बाकीच्या हळव्या मायमाऊल्यांचे काय ??

स्वताच्या महिलांना स्वातंत्र्य न देता दुसऱ्या महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्याऐवजी त्या स्त्रीयांच्या पुरुषांना शुभेच्छा द्या ही डेअरिंग आपल्याला तर करने झाली नाही त्याने तरी केली म्हणून .

नितीन सावंत , परभणी
प्रवक्ता मानव मुक्ती मिशन .
9970744142

ll उंदिरायण ll

ll उंदिरायण ll

कोणे एकेकाळी बिळराष्ट्र नावाच्या देशात आटपाट नगरी एक गरिब उंदिर रहात असे. तो महाण अशा कुरतडे वंशात जन्माला आला होता. त्याबद्दल त्याला विशेष असा स्वाभिमान वाटत असे. याच नगरात अनेक वंशाचे उंदिर रहात असत. दुतोंडे, फेके , टणाटणे, भोकपाडे, पळपुटे अशा अनेक वंशाची ही उंदरे बिळराष्ट्रात आनंदाने गुण्यागोविंदाने नांदत होती.कुरतडे वंशात जन्माला आलेल्या उंदराला विशेष अभिमान वाटण्याचे कारणच तसे होते. याच्या पुर्वजांनी मोठमोठ्या संस्कृती कुरतडून त्या संस्कृतीचा बट्याबोळ केला होता. याच्या पुर्वजान्मधे तिन बिळांपुरती जागा मागनारा आर्यमान बटुउंदिर यापासुन ते इंग्रजांच्या विरोधात झालेल्या स्वतंत्र संग्रामात जहाजातून उडी मारनारा फिदा फरारकर अशी मोठी परंपरा होती. या बद्दल आजही कुरतडे जमातीचे लोक चवीने सांगत असतात.

या उंदरांची एक भाषा सर्व जगात विख्यात आहे . ती म्हणजे फेकृत भाषा. समस्त उंदिरवृंदांचा असा दावा आहे की ही आमची फेकृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. पण यांच्या उंदिरराष्ट्राला विरोध करनाऱ्या नतदृष्ट्या काही सामाजिक संघटनांचे असे म्हनने आहे की ही फेकृत भाषा फेकाफेकीची जाडाजोडीची आहे.

असो आद्यआर्यवृत्त उंदिरराष्ट्र बनवण्यासाठी समस्त उंदिरवृंद एक दिलाने झटत असतात.या उंदिरवृदांच्या आनेक संघटना आहे. ज्यामधे टणाटण संस्था,अखिल भारतीय दंगार्थी परिषद, उंदिरमहासभा, उंदिरदल , राष्ट्रीय उंदिरस्वयंसेवक संघ, महिला उंदरिणीसांठी उंदिरीण वाहिनी आदी संघटना कार्यरत आहेत .

या उंदिर संस्कृतीवर माहिती देनारी भरघोस पुस्तके बाजारात आहेत.
ज्यामध्ये
फिदा फरारकर यांचे चिंधुत्व , उंदिरदास यांचे उंदरांचे श्लोक, तसेच या उंदिरांच्या स्वप्नातील राष्ट्र उभे करण्यासाठीचा प्रेरक ग्रंथ म्हणजे हनुस्मृती तर उंदिरांच्या पुर्वजांचा इतिहास सांगणारा ग्रंथ जो फिदांनी लिहीलेला आहे. तो ग्रंथ म्हणजे सहा उंदरांची पाने.

इत्यादी ग्रंथांमधुन आपन उंदिरवृंदांची माहिती घेवु शकतो.

उंदिर संस्कृती मधे अनेक शास्त्रज्ञ आहेत.या उंदिरांचे एक तांबेउंदिरबुवा आहेत त्यांनी  वैद्यकशास्त्र इतके विकसित केले आहे की पुरुषांनाही गर्भधारणा राहु शकते. तर एक क्लासेस चालवनारे उंदरेधिकारी ॐ बरोबर एम सी स्क्वेअर असे शास्त्रीय सुत्र मांडत आहेत.इतिहासात केलेली प्रत्येक ग्रेट कृती उंदिरांचीच असते असा उंदिरवृदांचा दावा आहे.

उंदिरांच्या महान पराक्रमांबद्दल इतिहासात पानापानावर पुरावे सापडतात. पुण्यात एका पाजीराव उंदरे यांनी उंदराई राजवटीत नग्न उंदरींच्या शर्यती लावल्याचे, घटकंचुकीचे खेळ खेळल्याचे पुरावे सापडतात. एका उंदिर ऋषी यांनी समुद्र प्राशन केल्याची सुद्धा कथा लोकप्रिय आहे. मग जीवसृष्टी धोक्यात आल्याने ते मुतले. म्हणून समुद्राचे पाणी खारे झाले ..

हल्ली या उंदरांचे मंत्रालय भरते. मंत्रालयात उंदरांची संख्या खुप वाढली आहे. समस्त देशावर उंदिरांचा कब्जा निर्माण झाला आहे ...

उंदिरवृदांच्या या यशाचे कौतुक करावे तेवढेच कमी आहे ...

संदर्भसुची :
१) पुण्यात उंदिर उपरेच - स.दा. कुरतडे
२) अद्यआर्यवृत्तासाठी उंदरांचे योगदान - ना.सी लाळघोटे
३) उंदरांना आनखी झोडपनार - गमो उंदरे
४) यात उंदरांचा काय दोष - उंदिरध्वाज बिळेकर
५) उंदिरान्नो जागे व्हा - मिलींद उंदिरबोटे
६) अवघ्या सुर्यजाळ - उंदिरगुरुजी धोत्रे
७) मुशकपुराण अध्याय सातवा पळपुटे कांड - कामदास पळपुटे
८) उंदिरमाहात्म्य - च.ला जावे
आणि
९)अखिल भारतीय उंदिर साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष
बालसाहित्तीक कुर्तडकर यांचा लेख

-----------------------------------------------------------------------------

नितीन सावंत परभणी
9970744142

♦♦♦♦♦♦♦♦♦♦