Sunday, 25 August 2019

ll नैतिक अनैतिकतेच्या कसोट्या ll

१. जगण्याची नियमावली उच्चजातवर्गीय व्यवस्था बनवत असते.ती पाळता पाळता निम्नजातवर्गीयांची घुसमट होते.
नैतिक अनैतिकतेच्या कसोट्या उच्चजातवर्गी ठरवतात.काय नैतिक आणि काय अनैतिक हे वरचे ठरवनार.त्या नैतिक अनैतिकतेच्या शिक्षा आणि पुरस्कारही जात आणि तोंड बघूनठरते.सजातीय श्रीमंताने किंवा आपल्यापेक्षा वरच्या जातीच्याने केलेले महापाप माफ केले जाते.ते चव्हाट्यावर आनायचे धाडस समाजव्यवस्था करत नाही.पण
सजातीय गरीबांची किंवा आपल्यापेक्षा निम्नजातीयांची छोटीसी चुक सुद्धा टोकाच्या शिक्षेला तयार असते.कठोरातल्या कठोर शिक्षेचा अग्रह निम्नजातवर्गीयांसाठी असतो.
*********************************
२.बलात्कार हा शब्द संविधान आणि लोकशाही आल्यानंतर सर्वाधिक उच्चारला गेला आहे.लोकशाही येण्याआधी सगळं काही धर्मसंम्मत होतं.सन्माननीय अपवाद वगळता लोकशाही येण्याआधी बाई कितीही ओरडली,दाद मागायला कुनाच्या दारात गेली तरी बलात्कार नव्हेच.
*********************************

३.नैतिक अनैतिकतेच्या कसोट्या हल्ली श्रीमंतीवर पद प्रतिष्ठेवर बदललेल्या आहेत.जेल भोगुन आलेला,भ्रष्टाचार करतो हे जगजाहीर असनारा,लुटनारा,श्रीमंत तथा राजकारणी आल्यानंतर त्या अप्रामाणिकाच्या स्वागतासाठी लोक उभे रहातात तर प्रामाणिक असनारा सच्या मनाचा,तत्वांना माननारा,गरिब आल्यानंतर मात्र त्याच्या आदरार्थ उठण्याची प्रथा नाही असेल तर हल्ली मोडली म्हनावी लागेल.
*********************************
४.लहानपणी भांडणात कुणीच कुनाला ऐकनारे नसेल,एकमेकांना भारी पडनारे असतील आणि दोघेही समबळ असतील तर मारामारी ऐवजी आया बहिण काढुन हतापायी धकवली जाते.आय बहीण काढली की दोन्हीही पार्ट्या मारामारीपेक्षा जास्त घायाळ होतात.हतबल होतात.हा भांडणांतला मानसशास्त्रीय नियम आता राजकारणात आनला गेला आहे.
शेवटी काय बाई वरुन टिका पुरुषवर्चस्ववादी मानसिकता बळकट करत जानारे आहे.
********************************
नितीन सावंत परभणी
9970744142

Friday, 23 August 2019

ll औलिया ते आवली ll

#औलिया म्हणजे 'अल्लाह वाला' अर्थात अल्लाह का दोस्त.#अवलिया शब्दाचे साधु,संत,#फकिर,#पिर असे विविध अर्थ निघतात.

हा शब्द भरतात सुफींच्या आगमनामुळे आला.स्पेशली सुफींनाच औलिया म्हटले गेले आहे.या सुफींच्या चालिरीती,वर्तन बघून लोक अवाक होत असत.या सुफींची साधना आणि तत्वज्ञानातील उंचीमुळे सामन्य लोक त्यांच्या वागणूकीला हटके वर्तन करणारे लोक म्हनत असत.यांचे इश्वराशी लाडिक भांडण चाले.श्रीमंतांना,राजेमहाराजांना हे औलिया फारसा मानापमान देत नसत.किंवा आपल्या रहाण्याच्या अश्रमाबाहेर तासंतास उभे करत असत.हे लोक एकांतात रहात.संपत्ती वगैरेंचा बिलकुल लोभ नसे.

मराठीत हा शब्द दाखल होताना औलियाचे #अवली बनुन आला.नंतरच्या काळात हा अवली शब्द आगावु वर्तन करणाऱ्यासाठी वापरला जायला लागला.मराठवाड्यात आगाऊपणा करणाऱ्याला लै आवली पोरगं आहे म्हणतात.
पुढे ब्राम्हणी साहित्याकांनी तर कहरच केला.तुकोबारायांच्या बायकोला अगाऊ दाखवण्यासाठी त्यांनी जिजाबाई हे नाव वापरणे बंद करुन आवली हे नाव कायमचे चिकटवले.म्हणजे जिजाबाई नवऱ्याला मारते,भांडखोर आहे,फुटकळ तोंडाची आहे अशा खोट्या,खोडसाळ आणि विकृत अफवा ब्राम्हणी लेखक साहित्तीकांनी पसरवल्या.आणि जिजाबाईं हे नाव वापरणे बंद करुन,अवली हे नाव अधिक रुढ केले.आवली हे नाव ठेवले होते का ? त्याकाळी तुकोबारायांच्या घरात वापरले जाई का ?हे नाव जन्मनाव आहे का ? हे शोधले पाहिजे.

आशा पध्दतीने अवली शब्दाने इथपर्यंत प्रवास केला.औलिया या सुंदर #सुफी शब्दाचे अवली शब्दात विकृतीकरण करण्यात आले.औलिया शब्दापासून औलाद हा शब्द सुद्धा आलेला आहे.अलीकडे काय अवलाद हाय ही ! कडु #अवलाद हाय ते ! अशा शब्दातूनही औलाद शब्द बदनामीच्या वाटेवर आहे.

#भाषेचे_ब्राम्हणीकारण_आणि_विकृतीकरण_असे_होते.

नितीन सावंत परभणी
9970744142