Friday, 4 April 2025

स्त्रीवादी शिव्यांचा धुंडोळा...

 ♦️स्त्रीवादी शिव्यांचा धुंडोळा... 

                           जगभरातील समाज विकासाचा क्रम हा भटकंती करणाऱ्या टोळी समाजाकडून जमाती वा मातृसत्ताक समाज व्यवस्थेकडे, आणि समतावादी स्त्रीसत्ताक समाज व्यवस्थेकडून विषमतावादी पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेकडे वा संस्कृतीकडे झालेला आहे. प्रारंभीक समाज विकासक्रमात अग्रभागी असणारी स्त्री ही पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत दुय्यम ठरवली गेली. शेतीक्षेत्र, कलाक्षेत्र, राजशासन हातात असणारी स्त्री पुरुषांनी शेतीसाठी केलेल्या नांगराच्या शोधानंतर आलेल्या पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत परावलंबी, गुलाम बनत गेलेली आपल्याला दिसुन येईल. पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेच्या उदय काळानंतर पितृसत्ताक समाजव्यवस्थेत स्त्रीयांचे, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे, संस्कृतीचे दुष्ट नेनीवेकरण सुरु झाल्याने स्त्रीविरोधी प्रथांचा उदय, स्त्रीयांना हिनत्वदर्शक वागणुक देण्याची सुरुवात याच म्हणजे वैदिक काळापासून मोठ्या प्रमाणावर सुरु झाली होती. पुढील काळात स्त्री म्हणजे अधम योनी, स्त्री म्हणजे नर्काचे द्वार, स्त्रीयांना मोक्षाचा अधिकार नाही. ही भुमीका वैदिकांच्या सांगण्यावरून जनतेने सुध्दा स्विकारल्याचे आपल्याला दिसून येईल. यातुन स्त्रीयांची टिंगलटवाळी सतत होत राहीली. त्यांच्या गौरवशाली वारस्याबद्‌दल सतत हिनत्वदर्शक बोललं गेलं. याद्वारे स्त्रीयांवरून शिव्या देण्याचा प्रघात मोठ्या प्रमाणावर रुढ झाला. आज घडीला सर्वात जास्त शिव्या स्त्रीयांवरून आहेत. आज आपल्या अवती भोवती बोलताना सहजरीत्या आयला, मायला, मायघाल्या, छिनालिच्या या प्रकारच्या शिव्या वाक्याच्या सुरुवातीला किंवा शेवटीला वापरल्या जातात. यामागे संताप व्यक्त करण्याची भावना जरी नसेल तरिही शिवी मात्र वापरली जाते. आणि ही शिवी स्त्रीवरून असते. बाई वरची शिवी सहज वापरताना त्याबद्दल कुणाला काहीही वाटत नाही.एखादा व्यक्ती कुठल्याही कारणाने पराभुत होत नसेल तर त्याला आई, बहीणीवरून शिवी देऊन घायाळ केले जाते. स्त्रीयोनीवरून शिव्या आाणि पवित्र अपवित्रतेच्या संकल्पना ही पितृसत्तेची देन आहे. आपल्या आजूबाजूचा समाज ही देन, हा वारसा आवर्जून पाळतो.
                          आज घडीला स्त्रीयांवरून ज्या शिव्या आहेत, त्यातही इतिहासाचे काही तथ्यांश आणि पुरावे असल्याचे आपल्या लक्षात येते.  स्त्रीप्राधान्याच्या इतिहासात जे काही उदात्त, उन्नत आणि नवनिर्मीती प्रधान होते, त्याला पुरुषप्रधान संस्कृतीत नकारात्मक, हिनत्वदर्शक उल्लेखले गेले आहे. कमरेखालची भाषा, अभद्र बोलणे, संतापजनक बोलणे, लैंगिक शब्दांचा वापर करून नकार व्यक्त करणे, यांसारख्या बोलीला आपण 'शिवी' संबोधतो. याप्रकारच्या भाषेसाठी वापरलेली शिवी ही संज्ञा शिवाची पत्नी 'शिवी' अर्थात पार्वतीचे ते नाव आहे. पार्वती म्हणजे आदीशक्ती, आदीमाया होय. तिच्या नावावरून 'शिवी' हा शब्द रूढ करणे हे आपल्या मातृसत्ताक वारस्याचे व्यक्तीगत दुष्ट नेनीवेकरण आहे.कमरेखालच्या भाषेसाठी 'शिवराळ भाषा' हा शब्द‌प्रयोग सर्रास केला जातो. म्हणजे शिवाची भाषा ती शिवराळ भाषा होय.  असा त्यामागचा अर्थ असतो. जेते जेव्हा स्थानिकच्या संस्कृतीवर आक्रमण करून विजय प्राप्त करतात. त्यानंतर ते स्थानिकच्या मुलनिवासींच्या पूर्वजांचे, प्रथापरंपरांचे, सभ्यतेचे विकृतीकरण करतात. हरलेल्यांनी कुनाचीच प्रेरणा घेऊ नये म्हणून त्यांच्या पुर्वजांचा वारसा बदनाम करतात. हरलेल्या मुलनीवासींच्या संस्कृतीचे, त्यांच्या महापुरुषांचे विकृतीकरण करून त्यावर जेते सांस्कृतीकरित्या स्वार होतात. स्थानिकच्या मुलानिवासीयांच्या भाषेवर जेते त्यांच्या भाषेचे आधीपत्य निर्माण करतात. जेते हरलेल्यांच्यासाठी हिनत्वदर्शक शब्दप्रयोग करतात. आणि या प्रकारची बोली ते परंपरागत रूढ करून टाकतात. जसे की आर्यांच्या टोळ्यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांना या देशात नागरगठठे म्हटलेलं आहे. भारतीयांचा आद्य कुलपुरुष शिव आणि पार्वती यांनाही शिवी आणि शिवराळ शब्दांद्वारे नकारात्मरित्या प्रस्तुत केले गेले आहे.या प्रकारे भाषिक आक्रमणे, सांस्कृतिक अधिपत्यवाद जगभरात झालेला आहे. हे आपल्याकडे भारतातही झालेले आहे. अजूनही होत आहे.भारतात मुळच्या शाक्त, शैव संस्कृतीवर वैदिक इंद्रप्रधान संस्कृतीचे हल्ले झालेले आहेत. त्यातून आर्यांच्या टोळ्यांनी त्यांची प्रतिके, भाषा, संस्कृती  द्रविड, शैव, शाक्तांवर लादली होती. किंबहुना आजही लादलेली आहे. त्याचे पुरावे जागोजागी आपल्याला सापडतात. म्हणून भारतीयांच्या गौरवशाली इतिहासाचे पुरावे आज घडीला नकारात्मक रित्या जागोजागी, भाषेत, धर्मग्रंथांत सापडतात. त्याला आपल्याला विधायक उकल करून मांडावे लागेल.
                         म्हणुन शिव्यांमधुन आलेला नकारात्मक इतिहास आपण विधायक उकल करून सोडवणार आहोत. शिव्यांचा अभ्यास यापूर्वीही अनेकांनी केलेला आहे. हजार हातांचा आक्टोपस या ग्रंथात सुधीर बेडेकर यांनी समाजवादी शिव्यांचा शोध एक आर्टिकलच लिहिला आहे. परंतु शिव्यांमधला मातृसत्ताक स्त्रीसत्ता संस्कृतीचा नकारात्मक भाव आदीबंधात्मक मार्गाने सकारात्मक मांडण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. आणि हा आदीबंधात्मक मार्ग वास्तवाच्या अधिक जवळ जाणारा आहे. हा मार्ग इतिहासाची पुनरमांडणी करणारा आहे. त्यापैकी काही शिव्यांचा ऐतिहासीक मार्गाने धुंडोळा घेऊया.

        भटक भवानी :-

                                  मराठी भाषेत, ग्रामीण भागात कुठे कुठे वापरली जाणारी ही शिवी आहे. सतत फिरणाऱ्या स्त्रीला, मुलीला खेड्यात भटक भवानी म्हणतात. उग्र वागणाऱ्या,स्वभावाने तापट असणाऱ्या स्त्रीलाही 'भवाने' ही शिवी दिली जाते. दोन स्त्रियांची भांडणे शिव्यांच्या तीव्र टोकावर गेल्यावरही भवाने म्हणून शिवी दिली जाते. मराठी चित्रपट सृष्टीतही ही शिवी वापरून झालेली आहे. एकूण या शिवीचा केंद्रबिंदू तपासायचा झाल्यास. उनाड, कजाग, मुक्त भ्रमन करणारी, निर्भीड, निडर स्त्री म्हणजे भवानी होय. पितृसत्तेत हे गुण असणं काही चांगलं नाही. म्हणून हे चांगले असणारे गुण शिव्या बनल्या आहेत.
                      शिवी बनायला कुणाचा तरी संदर्भ असावा लागतो. शिवी सहजरीत्या बनत नाही. म्हणून ही शिवी स्वतंत्र राज्यकारभार करणाऱ्या 'भवाणी' गणराज्ञी वरून बनलेली आहे. महाराष्ट्रात 'भवानी' हे संबोधन तुळजेच्या नावा मागे लागते.तुळजा भवाणी याद्वारे महाराष्ट्रात तरी भवाणी शब्द 'तुळजाई' साठीचाच असल्याचे निश्चीती होते. त्यामुळे भटक भवानी ही ग्रामीण बोलीतील शिवी ही स्वतंत्र, स्वावलंबी, निर्भीड, सतत दौऱ्यावर फिरस्ती असणाऱ्या तुळजा भवानीच्या गुणवैविष्ट्यांना नकारात्मक अर्थाने सादर करणारी भाहे.
                           आजच्या पितृसत्ताक समाजव्यवस्थेत बाईने चाचपून चोचपुन धाकात रहावे, उनाड, निर्भीड असु नये, स्त्री स्वतंत्र असु नये. हा अघोषीत नियम आहे. त्यामुळे मुक्त, स्वतंत्र वागणाऱ्या 'भवणी' मातेवरून पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला हीनवने सुरु झाले होते. आजच्या 'भवणी'  या शिवीवरून भवाणीमातेच्या कालखंडातील तिचे गुणवैशिष्ट्ये आपल्या हाती लागतात. भगणी या शिवी बनलेल्या नकारात्मकतेला विधायक सकारात्मक अन्वेषणाने पाहिले की आपल्याला सत्य इतिहास, आपला वारसा हाती लागतो. निर्भिड, निडर, स्वतंत्र नेतृत्व करणारी गणराज्ञी म्हणजे भवानी माता होय. म्हणजे थोडक्यात काय तर शुरविर, धाडसी असणाऱ्या भवानी मातेला आज शिवीच्या रुपाने नकारात्मकतेत लोटले गेले आहे.

          रंडकी - चंडकी :-

                                 मराठी भाषेत ग्रामीण भागात रंडकी चंडकी ह्या शिव्या प्रचलीत आहेत. ह्या शिव्या रंडी आणि चंडी ह्या दोन मातृ‌देवतेवरून रूढ झालेल्या आहेत. संत तुकोबाराय यांच्या एका अभंगात या दोन मातृदेवतांचा उल्लेख आहे. संत तुकोबाराय म्हणतात

" रंडी चंडी शक्ती, मदय मांस भक्षीती "

                              हया लोकदेवता उग्र स्वरूपाच्या धाडसी निर्भीड होत्या. चंडी कींवा चंडीका तर उग्रदेवी मानली जाते. त्यांच्या स्वभाव गुणावरून रंडकी चंडकी ही शिवी रूढ झाली आहे. तुझा नाश होऊ दे! मागे काहीच न उरु दे! तुझे सर्वकाही संपून जाउ दे! या प्रकारची शापवाणीसाठी तुझी रंडकी होवो ! तुझी चंडकी होतो! अशी शिवी दिली जाते. म्हणजे हया लोकदेवता शत्रुपक्षावर तुटून पडल्यातर त्यांचा सुपडासाफ करत असाव्यात. त्या काहीच शुल्लक ठेवत नसाव्यात. म्हणून पितृसत्ताक समाजव्यवस्थेत त्यांचे कार्यकतृत्व शिवीच्या रूपाने रुढ झाले आहे. युद्धामध्ये आपल्या पराक्रमाच्या जोरावर प्रतिपक्षाची धुळधाम करणाऱ्या स्त्रिया म्हणजे रंडी चंडी होत.

              मऱ्या माईचा गाडा येवो :-

                         मरी आई निऋतीचे एक प्रतिरूप. मरी आई ही प्रत्येक खेड्यात असणारी ग्राम देवता आहे. मरीआई ही लोक परंपरेने जतन केलेली लोक देवता आहे. ती कोणत्याही धर्मग्रंथात नाही.मऱ्या आईचे ठाणे मातंग वस्तीत असते. जरी-मरी हया रोगराई निवारण करणाऱ्या वैदू देवता आहेत. मरी आई ही लिंबाचा पाला, लिंबू, हळद याद्वारे काही रोगांवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाली होती. काही साथीचे रोग, हगवन, खरूज यांसाख्खे काही आजारही थांबवण्यात तिला यश आले होते. तिने आपला गणसमाज रोग आणि  आजारांच्या खाईतून वाचवला होता. या रोग निवारण करणाऱ्या वस्तू घेऊन ती प्रत्येक गावात जात असे. आणि आपल्या गण समाजातील त्या गावांमध्ये या औषधी जडीबुटींचा वापर करून रोगराई थांबवत असे. पुढील काळात तिच्या प्रचारक स्त्रिया लिंबाचा पाला, लिंबोळ्या, लिंबू, हळद वगैरेंचा गाडा घेऊन याप्रकारे गावात जावून प्रचार करायला लागल्या होत्या. एखाद्या वैदू म्हणजे डॉक्टर प्रमाणे अनेकांच्या घरात जाऊन ही मरी आई उपचार करे. मरणाच्या दारातून आपल्या आपत्यांना वाचवणारी ती मरी आई होय. पुढे तिचे  प्रचारक पोतराज आणि देवकरीन स्त्रिया बनल्या. हे पोतराज डोक्यावर मऱ्यामाईचे छोटेसे मंदिर घेऊन गावोगाव फिरत असत. तर देवकरीन स्त्रिया हातात हळदीचा पिवळा डब्बा घेऊन प्रचाराला निघत असतात.कुनाला काही झाजार झालेला असेल तर ते स्वतःजवळील जडीबुटीने औषोधोपचार करत असत. पूर्वी मरीआई भाणि नंतर तिचे प्रचारक देवकरीन व पोतराज, गावावर साथीचा रोग येवू नये म्हणून लिंबाचा पाला आणि वनस्पती मिश्रीत पाणी गावभर शिंपडत असत. हे सर्व विधी वाजत-गाजत होत असत. इतकी स्पष्ट स्वरूप असणारी आरोग्याची देवता पुढे विनाशाचा, रोगराईचा गाडा होऊन येणारी म्हणून नकारात्मरित्या प्रस्तुत केली गेली आणि शिवी बनली मऱ्यामायचा गाडा येवो. म्हणजे तुझी बरबादी होतो. पूर्वी मऱ्यामाईचा गाडा आल्यावर चांगलेच होत असे. सर्वांचे भले होई. लहान मुलांसाठी तर ही जीवदान देणारी डॉक्टर होती. पुर्वी लेकरं वाचत नसतील तर ती मातंग स्त्रीच्या ओटित टाकली जात असत. मातंग आईला स्तनपान पिलेले बाळ निरोगी राही. मरी आईच्या प्रचारक स्त्रिया म्हणजे या मातंग समाजाच्या स्त्रिया होत. त्यांच्याकडे परंपरागत औषधी वनस्पती आणि रोग निवारणाबद्दलचे कला कौशल्य आलेलं होतं. गावातील आडल्या नडल्या स्त्रियांचे बाळंतपण करण्यासाठी या मारी आईच्या प्रचारक स्त्रिया धावून जातात. त्यामुळे मरीआई, तीची परंपरा पाळणारे मातंग हे पितृसत्ताक जातीयवादी समाज व्यवस्थेत अस्पृश्यतेत लोटले गेले. स्वातंत्र्यानंतर तरी ज्यांना प्राथमिक उपचार करण्यात तरबेज असल्याबद्दल डॉक्टरकीचे सर्टिफिकेट द्यायला पाहिजे होते. त्यांना अस्पृश्यतेत लोटलेजाणे हा उलटा सुड आहे. चांगल्या उपकाराची परतफेड उलटा सुड घेऊन करणे दुर्दैवी आहे. अगदीच मऱ्यामायचा गाडा येओ या शिवी प्रमाणे.

              संक्रांत कोसळणे :-

                           संक्रात कोसळणे म्हणजे नुकसान होने होय. 'अमुक व्यक्तीवर संक्रात कोसळली ' या प्रकारच्या वाक्यप्रयोगातून त्या व्यक्तीचे नुकसान झाले, हे आपण मांडत असतो.  
                   आज या शब्दाला प्राप्त झालेला अर्थ तसाच आहे का ? पुर्वर्वीही या शब्दाचा अर्थ तसाच होता का? याचे उत्तर नाही  दयावे लागेल. संक्रांत हा शब्द अत्यंत सुबत्तेचा द्योतक आहे. संक्रांत म्हणजे नुकसान होने, बरबाद होने नसुन 'आबाद' होने हे आहे. संकर म्हणजे मिळणे,मिसळणे होय. संकरित शब्दापासून संक्रांत शब्द बनलेला आहे. ती अनेक भाज्यांचा शोध लावत त्या भाज्यांना मिसळून मिक्स व्हेज बनवून वाटत येते. 
                    संक्रांत हा शाकंभरीचा उत्सव आहे. कर्नाटक, आंध्र,तेलेगंणा, महाष्ट्रात हा उत्सव मोठ्या प्रमाणावर होतो. संक्रांत हा विविध भाज्या आणि बि-बियान्यांच्या आदान-प्रदानाचा सण आहे. शाकंभरीच्या गणातील प्रचारक स्त्रीयांनी शोधलेल्या नवनवीन भाज्या एकत्र करून शिजवून खाल्या जात असत. या भाजीचा भोगी' नावाचा सण आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी करतो. शोधलेल्या भाज्यांचा भोग घेणारा सण तो भोगी होय. आदल्या दिवशी त्या शोधलेल्या भाज्या शिजवून खायच्या तर दुसऱ्या दिवशी काही फळे भाज्यां व बिया एकमेकींची ओटी भरून संक्रांत साजरी करायची हा रिवाज होता. म्हणून एकमेकींना बी बियाणे, भाज्या भेट देण्याचा संक्रमणाचा सण संक्रांत म्हणून विकास पावला आहे. संक्रांतीला हया भाज्यांच्या बिया आणि काही फळे ओटीला घातले जातात. गाडगे हे सुबत्तेचे, गर्भशयाचे प्रतिक आहे. असे छोटे गाडगे ज्याला 'सुगडे' म्हणतात. आलेली 'सुगी' त्या गाडग्यात भरून स्त्रीया सुगडे घेतात. उखाणे,नावे घेऊन उत्सव साजरा करतात. पर्यायाने त्या स्त्रिया ती सुगी वाटून घेतात. हा सण केवळ आणि केवळ स्त्रियांचाच आहे. पुरुषांचा नाही. ही सुबत्ता, सुगी वाटण्यासाठी, पुर्वी शाकंभरी यायची जीला संक्रांत असे म्हटले आहे. बनशंकरी,संक्रांत ही शाकंबरीचीच नावे आहेत. ही संक्रांत आनंद,उत्साह घेउन सुगी वाटत येत असे. फळे - भाज्या वाटत येत असे . ती मिळवलेल्या ज्ञानाचे वाटप करत येत असे. संक्रमण करत येत असे. म्हणजे नवे ज्ञान ती संक्रमीत करत येते. 
                      म्हणून या एकूण प्रक्रियेत  संक्रांत येणे हा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. हा शब्दप्रयोग सुरुवातीला विधायक सकारात्मक अर्थाचा होता. नंतर या शब्दाला नकारात्मक भाव प्रदान करण्यात आला.
म्हणून संक्रांत येणे सुबत्तेचे प्रतिक आहे. संक्रांत कोसळणे म्हणजे वाईट होणे, बरबाद होणे, हे चुकीचे आहे. हा अर्थ ब्राम्हणी पितृसत्तेचा खोडसाळपणा आहे. संक्रांत येणे चांगले आहे. वाईट नव्हे. सुबत्तेच्या उत्सवाला बरबादीचा अर्थ प्राप्त करून देने भाषीक षडयंत्र आहे. अभिजनांच्या तुच्छतादर्शक नेनीवेतून या प्रकारच्या शब्दांचे प्रत्यारोपण करण्यात येत असते. पुर्वीच्या शब्दांना तुच्छतादर्शकपणे वापरून नवे आणि चक्क उलटे, विरोधाभाषी अर्थ प्राप्त करून दिले जातात.

       बाजार बसवी :-

                            मातृसत्तेत, स्त्रीसत्तेत स्त्रीयांचे मेळावे भरत असत. सुरवातीला गणवृध्द स्त्रीया रात्रीच्या वेळी सामुहीक संघायण करत असत. अमावस्या, पौर्णिमेला पुष्करणीच्या काठावर बसून शेतीच्या ऋचा आणि काही भौतिक ज्ञानाचे त्या सामुहीक पाठांतर करत असत. मिळवलेले ज्ञान या पिढीकडून पुढच्या पिढीकडे सुपूर्त करण्यासाठी सामूहिक पाठांतराशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्या काळी उपलब्ध नव्हता. म्हणून स्त्रिया मिळावे भरवत असत.पुढील काळात हे स्त्रीयांचे मेळे औषोधोपचार, गायण, वादन, नृत्य, जोडीदार निवडण्याठी भरत असत. स्त्रीयांचा मेळा म्हणजे सल्ला, मशवरा आणि सर्वच गोष्टीवर विलाज असे. या मेळ्यात सर्वच गोष्टीवर तोडगा निघत असे. ६४ योगीनींचा काळही बहुतांश भटक्या, प्रचारक स्त्रीयांचा होता. विविध ठिकाणी प्रचार करत भटकणाऱ्या स्त्रीया नवनवीन ज्ञानाचं संकलन करत असत. आणि मग काही महत्त्वाच्या सण-उत्सवांना एकत्र येत मिळविलेले ज्ञान त्या इतरांना वाटून देत असत. यासाठी त्या मेळा भरवत असत. त्यातून त्या ज्ञानाचे आदन प्रदान करत असत.दक्षिण भारतात, महाराष्ट्रात हे स्त्रीयांचे मेळे भरत असत. सौदंती, महुर, वणी, तुळजापुर आदी ठिकाणी स्त्रियांचे मेळे आजही भरतात.
                       बाजार हा शब्द फारशी भाषेतून मराठीत आला आहे. मेळ्या ऐवजी बाजार शब्द वापरून 'बाजार बसवी' ही शिवी मराठीत रूढ झाली आहे. जी मेळा भरवते, मेळा बसवते ती मेळा बसवी होय. पण 'बाजार बसवी' हा शब्दाचा अर्थ कुत्सित आहे. 'बाजार बसवी' म्हणजे चारित्र्यहीन, स्वताला बाजारत उभी करणारी स्त्री होय. मान मर्तब न ठेवता प्रदर्शन मोडणारी या अर्थाने 'वेश्या' ठरवण्यासाठी बाजार बसवी ही शिवी मराठीत आहे. मेळा बसवणारी एवढी चांगली कृती 'बाजार बसवी' या च्यारित्र्यहीन ठरवण्यापर्यंत का अली, तर पितृसत्ताक समाजव्यवस्थेत स्त्रियांनी गुलाम रहावे, घराच्या बाहेरही जाऊ नये हा रिवाज बनला होता.तीने बाजार बसवणे तर दुरची गोष्ट.
                          आज घडीला जे बाजार भरतात त्याची अदय जननी स्त्रीच आहे. फळे भाज्यांचे बाजार स्त्रीयाच भरवतात. आजही ग्रामीण भागात भाजीपाला व अन्य हस्तश्रमाच्या वस्तु विक्रीला घेऊन बसलेल्या स्त्रीयाच असतात. म्हणून स्त्रीने बाजार बसवणे काही वाईट नाही. किंवा एखादी स्त्री बाजारबसवी असणे हा तिच्या कशी वागते याचा नव्हे तर पुर्वीच्या स्त्रीपरंपरेचा गौरव करणेच होय.
 बाजार बसवी ही शिवी केवळ स्त्रियांसाठी आहे पुरुषासाठी नाही. बाजार बसव्या हा शब्दप्रयोग मराठी भाषेमध्ये नाही. म्हणजे पुरुषांचा बाजार बसवण्याशी काही संबंध नाही. खरेदी विक्रीचा बाजार भरवण्याच्या आद्य स्त्रियाच आहेत. शिवाय चारित्र्यसंपन्नतेची कसोटीही स्त्रियांनाच. पुरुष चारित्र्यहीन असला तर त्याला बाजार बसव्या म्हटलं जात नाही. कमालच आहे ना ! 

              कुलटा :-

                             कुलटा, कुंटिण, कुंटण हया ' चारित्र्यहीन स्त्री' ठरवनाऱ्या शिव्या आहेत. कुंटण म्हणजे वैश्या आणि कुंटणखाना म्हणजे वैश्यागृह होय. कुंटण शब्दाचा अनखी एक अर्थ होतो - मध्यस्थी घडवून आननारी स्त्री. हाही अर्थ तसाच नकारात्मक अर्थाने आहे. व्याभिचारासाठी मध्यस्थी घडवून आणणारी स्त्री म्हणजे कुंटण. 
                            कुंटण, कुटिण, कुंटनखाना या शिव्या कुल्टा या शिवीच्याच अलिकडील काळातील प्रतिरूपे दर्शवणाऱ्या आहेत. 'कुलटा' या शिवीचा अर्थ होतो, दुराचारिणी स्त्री, व्याभिचारीणी स्त्री. किंवा अनेक पुरुषीसोबत संबंध ठेवणारी स्त्री. कुलटा ही शिवी कशी बनली ? आज जो या शब्दाला अर्थ प्राप्त झालेला आहे. पूर्वीलाही तोच अर्थ या शब्दात अंतर्भुत होता का ? 
                             याबद्द‌ल प्राच्यविद्यापंडीत कॉ. शरद पाटील यांनी  " दासशुद्रांची गुलामगिरी " या आपल्या खंड १, भाग 1  मध्ये कुलटा ने गणिका नावाचे एक प्रकरण लिहीले आहे. त्यात त्यांनी या शब्दीचे मुळ अर्थ स्पष्ट केलेले आहेत. त्यांनी दिलेले अर्थ असे की " कुलाचा अर्थ गाव असा होतो " तसेच " कुलाचा अर्थ नदीकिनारा असाही होतो." अजून पुढे कॉम्रेड शरद पाटील म्हणतात. 
             "कुल (कुटुंब) हा शब्द कुष या धातू पासुन निघाला आहे. त्याचा अर्थ मळणे ( तींबणे ) असा होतो. कुलाची तुलना मळलेल्या वा कसलेल्या जमिनीशी केली आहे. " 
                   हा कुल चा प्रारंभीक अर्थ शरद पाटील यांनी दिलेला आहे. स्त्रीसत्तेत ज्ञातींची पुढे कुले बनतात. ही कुले नदीकीनाऱ्या लगतची गाळपेऱ्याची शेती करत विस्तारत जातात. हे विस्तारलेले कुल सातव्या पिढीला फुटून विभक्त होई आणि नवे गाव वसवत असे. शेतीच्या प्रमुख हया स्त्रीया असल्यामुळे शेती करणाऱ्या कुलप्रमुख स्त्रीला कुलपा म्हटले जाई. कुलपा म्हणजे कुलाचे पालण वा आधिपत्य करणारी स्त्री असाच होतो. असे शरद पाटील म्हणतात. पुढे ते म्हणतात
"याचा अर्थ असा होतो की, स्त्री ही कुलाची मुख्य होती. ती कुलाची पुरोहिता या नात्याने कुल जमिनीची सुपीकता वा उत्पादकता संवर्धित करण्यासाठी कृषि-मायेचे विधी करी. " हे विधी करताना विस्तारत गेलेल्या आपल्या अनेक कुलीमधे ती भिक्षाटणाला जात असे. यातून आजच्या पितृसत्ताक दृष्टिकोनातून या कुलाकडून त्या कुलाकडे जाताना ती शीलभ्रष्ट होत असे. म्हणून कुलाच्या प्रमुख असणाऱ्या कुलपेचा विरोधाभासी प्रवास  पितृसत्तेत कुलटा म्हणून झाला. 
म्हणजे जी ज्ञातीमाता होती. कुलमाता होती. जी एका कुलाकडून दुसया कुलाकडे सुबत्ता होवून जाई. कृषीमायेचे तंत्र घेवून जाई.पुढील काळात ती दुराचारी स्त्री ठरवली गेली. तिला पितृसत्तेने 'शिवीत' परावर्तीत केले. कुलटा म्हणजे चारित्र्यहीन स्त्री म्हणुन. 

                          गणिका :-

                            प्राचीन मातृसत्ताक स्त्रीसत्ताक कालखंडातील समाज व्यवस्थेमध्ये. गण समाज विकसित झाले होते. गण म्हणजे ज्ञातींचा समुह होय.अनेक कुले आणि ज्ञाती मिळुन गण बने. गणाची मुख्या स्त्री असे म्हणून गणमुख्या ती गणीका होय.
                           ही गणीका धांन्याचे मोजमापण करून समसमान वाटुन देत असे. जी गणना करते ती गणीका असेही म्हणता येईल. कॉ शरद पाटील म्हणतात ज्ञातीच्या संस्थापिकेवरून गणाचे नाव पडत असे.
                               गणिका ही गणाची शासनकर्ती होती. प्रमुख होती. अनेक ज्ञातीगण तिच्या आधिकारक्षेत्रात असत. वज्जी हा गण नऊ ज्ञातीचा बनलेला होता. या नऊ ज्ञातीने बनलेल्या गणाची प्रमुख गणिका होती अंबपाली. ती गणवृध्दीसाठी पन्नास कार्षापण होऊन ज्ञातीप्रमुखीकडे रात्रीला जाई, ज्यामुळे वैशालीची अधिक भरभराट होई. ही गणिका अंबपाली देखील सुबत्ता बहाल करणारी, गणवृध्दी करणारी, अंबका म्हणजे आई होती. गणातील प्रजेची आई. 
                          पुढे गणिका (गणवृद्धी करणारी) हा शब्द बदनाम होत गेला आणि गणिका या शब्दाचा अर्थ बनला वैश्या. सुफी सुफलीकरणाचे विधी करणारी, गणाची वृद्धी करणारी, अनेक ज्ञाती, कुळांना एकत्र करून समन्याई राज्य करणारी गणिका पुढील काळात अंधारकोठडीतली वैश्या ठरवली गेली. पितृसत्तेत ती परावलंबी, हीन, कलंकीत बनवली गेली.स्वातंत्र्यातून ती पारतंत्र्यात गेली. जिला आईचा, आंबेचा दर्जा होता, पुढे निला वैश्येचा दर्जा पितृसत्तेत बहाल झाला. म्हणून गणिका शब्दाचा अर्थ मातृसत्ताक स्त्रीसत्ताक कालखंडात चांगला होता. पितृसत्ताक कालखंडात हा शब्द बदनाम करण्यात आला. 
                           गाढव हे निऋतीचे वाहन आहे. माणसाळवलेला सर्वात पहिला प्राणी कोणता असेल तर ते गाढव. मातृसत्तेत स्त्रीसत्तेत स्त्रियांनी गाढवाला माणसाळवण्यात यश मिळवलं होतं. म्हणून निऋतीचे वाहन गाढव आहे. पण गाढवावरून मराठी भाषेत शिवी आहे. दिलेलं काम प्रामाणिकपणे नियमितपणे करणारा प्राणी. अंगावरचे जुने केस गळून पडावेत आणि नवे उगवावेत म्हणून उकिरड्यावर लोळणारा प्राणी. त्याच्या दृष्टीने व्यवस्थित नैसर्गिक जीवन जगणारा तो. पण नेमकं त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध शिवी आहे.काहीच न करणारा, ढ मुलाला आपण गाढवा म्हणतो. गाढव ढ नव्हे. तो प्रामाणिक आणि हुशार आहे. तरीही त्याच्यावरून गाढवा शिवी आहे. 
                              आशाप्रकारे असंख्य शिव्यांमधून आपल्याला गतकाळाचे  संदर्भ हाती लागतात. आजच्या शिव्यांमधील आदिबंध आपल्याला विधायक इतिहास बहाल करतात. या शिव्यांच्या उकलीतून आपण इतिहाच्या एका मोठ्या वारस्यापर्यंत जातो.
                               मराठीत ' सुकाळीची लेक ' ही देखील एक विधायक शिवी आहे. विधायक यासाठी की ही शिवी नकारात्मक भावनेने जरी वापरली जात असेल तरी त्या शिवीचा अर्थ अत्यंत चांगला आहे. सुकाळ म्हणजे सुबत्ता, संपन्नतेचा , भरभराटीचा काळ होय. आशा संपन्न भागातून नांदायला आलेल्या सुनेला 'सुकाळीची लेक' ही शिवी दिली जाते. सुनेचे घरातलं वागणं आघळपघळ असेल, काटकसर न करता ती घरातल्या वस्तू सहज वापरणारी असेल किंवा उधळपट्टी करणारी असेल तर तिला सुकाळीची लेक शिवी दिली जाते. म्हणजे जिला मोजून मापून राहणे, गरिबी, काटकसर माहिती नाही अशी ती सुकळीची लेक.
                      
महाराष्ट्रभरात सर्व दुकानदार, विक्रेते सकाळी सकाळी पाहिले गिर्हाईक करताना, पहीली वस्तु किंवा माल विकताना गिऱ्हाईक जो भाव मागेल त्या भावात वस्तू देऊन टाकतात. गिऱ्हाईक भाव ठरवत असेल, घासाघीस करत असेल तर दुकानदार त्या पहिल्या गिऱ्हाइकाला त्याच्या मर्जीतल्या भावामध्ये वस्तू देऊन टाकतात.हे असे का केलं जातं ? तर ही पहिली वस्तू आईला दान असते आणि आईला दिलेल्या वस्तूचा भाव करायच्या नसतो. तिच्यामुळेच तर हे सगळं वैभव,सुबत्ता आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे पहिली वस्तू आईच्या नावे दान दिली जाते. ही आई म्हणजे आपली कुलदैवत. यासाठी शब्दप्रयोग आहे भवाणी. काही ठिकाणी भवणी, बव्हणी असेही म्हणतात. गिर्हाईकाने भाव तोडून मागितला की विक्रेता म्हणतो "साहेब दया काय दयायचे ते, भवाणीचा टाईम आहे." म्हणजे काय तर हे पहिलं गिऱ्हाईक आईच्या नावाने आहे. भवानीच्या नावे आहे.
या प्रकारच्या छोट्या कृतीतूनही फार मोठा ऐतिहासीक वारसा आपल्या पुर्वजांनी जपुन ठेवला आहे. हे सर्व हाती लागण्यासाठी संशोधनाची एक विधायक दृष्टी आपल्याकडे हवी. आपल्या सांस्कृतीक वारस्यांचा धांडोळा घेण्यासाठी आपण सदैव सजग, जागरूक असले पाहीजे. 

नितीन सावंत परभणीकर 
9970744142 
दिनांक : 5 एप्रिल 2025.
-----------------------------------------------------

Friday, 19 July 2024

जणी आणि विठ्ठल नाते - ओव्या

जनी आणि विठ्ठलाचे नेमके नाते काय होते ? वारकरी परंपरेला मधुरा भक्ती मान्य होती का ? तर बिलकुल नाही.वारकरी परंपरेत मधुरा भक्ती नाही.. मग जनी आणि विठ्ठल यांचे नातेसंबंध काय होते.. ? 

याचे उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील महिलांनी जात्यावरच्या ओव्यांमधुन दिलेले आहे.. 

Kailash B. Krishna  यांनी जमा केलेले मौखिक संचीत .. लाखमोलाचा ठेवा .. याद्वारे हे नातेसंबंध काय होते हे आपल्याला हे समजते .. 

जनी आणि विठ्ठलाचे नेमके नाते काय होते .. ग्रामीण जात्यावरच्या ओव्यांमधुन .. 

                            ( 1 ) 

कैलास यांच्या वालवरुन ..नवा ठेवा .. 

जेव्हा रुख्माणीला हेवा वाटतो जनाबाईंचा..... 
(आई गात असतांना लिहून काढलं)

कमानी दरवाजात, रुख्मणीचे दोन्ही हात!
खरं सांगा विठ्ठला, जनी शी काय नातं?
विठ्ठल म्हणे रुख्मानिला,अंघोळीला टाक पाणी!
मी नाही टाकणार पाणी, जनी तुमची आहे कोणी?

कमानी दरवाजात रुख्मणीचे दोन्ही हात!
खरं सांगा विठ्ठला, जनी शी काय नातं?
विठ्ठल म्हणे रुख्मानिला, जेवायला आन ताट!
मी नाही वाढत ताट, जनी तुमची लागस कोण?

कमानी दरवाजात रुख्मणीचे दोन्ही हात!
खरं सांगा विठ्ठला, जनी शी काय नातं?
विठ्ठल म्हणे रुख्मानिला, पानाचा आन विडा!
 मी नाही आणत विडा, जनीचा नाद सोडा!

कमानी दरवाजात रुख्मणीचे दोन्ही हात!
खरं सांगा विठ्ठला, जनी शी काय नातं?
विठ्ठल म्हणे रुख्मानिला, नको लावू असं पाप!
जनी आहे आपली लेक, आपण तिचे माय-बाप! 
**************************************************** 
( जुने कलेक्षण )
                               ( 2) 

जनी बैसली न्हायाला l
पाणी नाही विसणाला ll
घागर घेवून पाण्या गेली l
विठू मागे धाव घाली ll

गोपाळपुर्यावरी l जनाबाईची झोपडी ll
नामयाच्या घरी l जनी झाडलोट करी ll
देव केराच्या पाट्या भरी l
दळीता कांडीता l देवाहाती आले फोड ll
जनाबाई बोले l केली वैकुंठाची जोड ll

जनाबाई धुन धुई l विठ्ल दरडी उभा ll
त्याहीच्या पिरतीला ll दंग झाली चंद्रभागा ll 
इठ्ठल म्हनती l नाही जना करमत ll
मी जातो अंघुळीला l कर धुण्याचं निमित्त ll
रावळापासुन l गोपाळपुराला सुरंग ll
येरझारा घाली l जनीसाठी पांडुरंग ll

इट्टल मनईती l चल जना माडिवरती ll
रुख्मिण नाही घरी l दोघं बोलु घडीभरी ll

रुख्मिण जेवु वाढी l निराशा दुधामधी केळं ll
देवाला आवडतं l जनाच ताक शिळं ll
देवाच्या फराळाला l रुख्मिण देती दुध फेन्या ll
देवाला आवडती l जनाच्या ताककन्या l
रुख्मिण जेवु वाढी l पोळी ठेवती काढून ll
दे ग जनाला वाढून l सावळे रुखमाई ll
देव बसले जेवाया l पोळी ठेवीती ताटाआड ll
रुख्मिण म्हनती देवा l जनाचं किती येड ll

रुख्मिण म्हनती l कांबळ कावं खांद्यावरी ll
अग इसरुन आलो l शाल जनीच्या मी घरी ll
रुख्मिण म्हनी l देवा तुम्हाला लाज थोडी ll
जनीच्या मंदिरात l वाकळाची काय गोडी ll
रुख्मिण मनिती l देवा तुमचा येतो राग ll
जनीच्या काळजाचा ll दुशालीला काळा डाग ll
काठी या घोंगडीच्या l म्होरं वाटेनं कोन जातो ll
पिरतीचा पांडुरंग l जनीचं धुनं धुतो ll
विठ्ठल म्हने l चल जने गवताला ll
चंद्रभागेच्या वताला l फार पोवना दाटला ll

इट्टलाच्या पाया l रुख्मिण लावती दही ll
खरं सांगा इठ्ठला l जना तुमची कोन व्हावी ?
इट्टलाचं पाय l रुख्मिण घेई तळहातं ll
खरं बोला स्वामी l जनीचं काय नातं ll
रुख्मिण म्हनती देवा l गळीयाची आन ll
जना तुमची व्हावी कोन l माझी धर्माची बहीण ll

इट्टल म्हनती l नको रुख्मिण राग धरु ll
जना धर्माचं लेकरु l आलं थार्याला पाखरु ll
इट्टल म्हनती l कागं रुख्मिण कपटी ll
जना बहीण धाकटी l आपल्या दोघामधी ll

इट्टल मनितो l का गं रुख्मिण बोलना ll
गोपाळपूरा जाया l रथ जागचा हलेना ll
देव इट्टल मनी l नाही रुख्मिणीला ग्यान ll
आपल्या दारावुन l जनी गेली अबोल्यानं ll
भरली चंद्रभागा l पाणी चाललं वाहुनं ll
जनाच्या भेटीसाठी देव l जाती रुख्मिणी घेवून ll

Sunday, 26 May 2024

मानव मुक्ती मिशन भूमिका व अटी

 मानव मुक्ती मिशन भूमिका व अटी  

♦.....मानव मुक्ती मिशन.....♦

सदस्यत्वाच्या अटी :-

१)प्रतिज्ञा घेतलेली पाहिजे.                          २)डिकास्ट - डिक्लास - डिजेण्डर असला पाहिजे          ३)संघटनेचे तत्वज्ञान आणि उद्देश यांप्रती सजग असला पाहिजे.                                              ४)जनसंघटनेत कार्यरत असला पाहिजे .                      ५)घटना आणि कार्यक्रम मान्य असला पाहिजे.

           🔸उद्दीष्टे :🔸

१) भारतात सर्वात प्रधान मानल्या गेलेल्या समस्या सोडवण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम राबवने.मुख्य म्हणजे  जातवर्गस्त्रीदास्यांत करणे.त्यासाठी विवीध जनआघाड्या उघडणे.

२)सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी श्रमीक,शोषीत,पिडीत वर्गाला संघटीत करून त्या वर्गाची जाणीव नेणीव घडविणे.अर्थात सामाजिक सर्वहरा आणि आर्थिक सर्वहरा यांची क्रांतीदोस्ती घडवून आणणे.

 3)प्रस्थापित व विषमतामुलक संस्कृतीक मुल्यव्यवस्थेशी संघर्ष करणे व नवी मुल्ये समाजस्थापनेसाठी प्रयत्न करणे.

४)पर्यायी संस्कृतीक समाजरचना उभी करणे.

 ५)सर्वक्षेत्रात असनारा जातवर्गीय संघर्ष गतीमान करणे.

६)मानव मुक्ती मिशन हे नावातच स्पष्ट केल्याप्रमाणे *माणसाकडून माणसांची होत असलेल्या पिळणुकी विरूध्दच्या मुक्ती लढ्यात आत्मीयता बाळगते*.

७)देशांतर्गत जनतेवर लादण्यात आलेली सर्वप्रकारची विषमता अन्याय संपुष्टात आनण्यासाठी सर्वप्रकारच्या आर्थिक विषमता मोडित काढेल. आवश्यक ती जनतेच्या हिताची आणि समाजवादी धाटणीची अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ते उपक्रम व धोरणे राबवेल.

 ८)वर्णवर्चस्ववादी आणि भांडवलदारी जातवर्गीय सामाजिक वर्चस्व मोडित काढून आणि लिंगभेदावर आधारलेले सांस्कृतिक व सामाजिक वर्चस्व मोडुन काढून मानवी समाजरचनेचा पुरस्कार करनारा सांस्कृतिक व सामाजिक बदल घडवेल व त्यासाठी आवश्यक तो उपक्रम व धोरणे राबवेल.

९)बहुसंख्येने असलेल्या भारतीय ग्रामीण व बहुजन समुदायाला ज्ञान प्रस्थापित करण्यासाठी शेतकी क्रांतिला आग्रक्रमाणे राबवेल. त्यासाठी लोकशाही मार्गाने जनअंदोलनांचा व जनचळवळींचा मार्ग स्विकारने.

१०)भारतामध्ये बहुसंख्य असनार्या शेतकरी,आदिवासी,मागासवर्गीय ,भटके,obc व अन्यशेतकरी जाती या श्रमीक घटकांच्या जीवनामध्ये गुणवत्तापूर्ण बदल घडविण्यासाठी चांगले आरोग्य,मानवी स्वरूपाचा रोजगार,आत्मसंम्मान पुर्वक सामाजिक जीवन यासाठी उपक्रम राबवेल,धोरणे घेइल आणि जनचळवळी करेल.स्वावलंबी व आत्मनिर्भर विकासाचा मार्ग खुला करणे. 

११)गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण,आरोग्य अन्न वस्त्र निवारा व करमणूक या मानवी गरजा सकसपने पुर्ण करण्यासाठी सतत कार्यरत राहिल या गरजा पूर्ण करत असताना निसर्ग व पर्यावरनाचा समतोल राखण्यासाठी भूमिका असेल हितसंबंधांचा बिमोड करेल.

 १२)समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण समताधिष्टीत संस्कृती आणि धर्मनिरपेक्ष शासन प्रणाली कायम व्हावी यासाठी विविध उपक्रम अभियान राबविण्यात येइल आणि धोरणे आखली जातील.

 १३)जातीभेदावरील आधारीत विषमता याला कायमची मूठमाती देण्यासाठी अथक प्ररिश्रम नावीन्यपूर्ण उपक्रम आणि जनचळवळ राबवीण्यात येइल अशा प्रकारचे प्रयत्न करनाऱ्या सर्व जनचळवळींशी समन्वय करण्याचा व सांधा जोडन्याचा प्रयत्न करण्यात येइल. 

१४)सामान संधीसाठी विशेष संधी आणि खालच्या जातींच्या उत्थानासाठी सकारात्मक हस्तक्षेप याचा अग्रह व पुरस्कार करण्यात येइल.प्रचलित राखीव जागांचा लाभ त्या त्या घटकातील पिडीत शोषीतांपर्यंत पोहंचवा याचा अग्रह धरेल याच बरोबर वरिष्ठ वर्गातून,वर्णातून केल्याजानार्या शोषन पिडण आणि ताडण पिळवणूक याचा प्रतिकार करेल.

१५)भारतीय भौतिकवादी आणि प्रागतीक परंपरा उचलून धरण्यात येतील आणि जागतीकीकरनाच्या कालखंडातील साम्राज्यवादी शोषनाविरुद्ध कार्ल मार्क्स यांचे तत्वज्ञान आणि प्राच्यविद्यापंडीत कॉम्रेड शरद पाटील यांनी दिलेले भारतीय परिस्थीती संदर्भातील विवेचन पुढे चालवण्याची पराकाष्ठा करेल. आर्थात कॉम्रेड शरद पाटील यांनी दिलेला सौतांत्रिक मार्क्सवाद पुढे चालवला जाईल. 

१६)तत्रंविज्ञान क्षेत्रामध्ये देखील वर्गसंघर्ष गतिमान आहे.समस्त मानवजातीच्या मुक्तीसाठी भागीदारी करू शकणाऱ्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या मानवी विकासाच्या वाटा साम्राज्यवाद व कार्पोरेट भांडवलशाही रोखून धरत आहे.आनेकदा कार्पोरेट हितसंबंधासाठी तंत्रज्ञान व संशोधन देखील दडपून टाकण्यात येते.मानवी मुल्यांवर आधारित तंत्रविज्ञानाच्या विकासाच्या बाजूने मानव मुक्ती मिशन कार्य करेल.आणि सर्व प्रकारच्या कार्पोरेट हितसंबंधांसाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा दुरुपयोग,विनाशकारी उपयोग,पर्यावरणाचा नाश,याला विरोध करेल.

१७)लिंगभेदावर आधारलेली सर्वप्रकारची विषमता मोडून काढण्यात मानव मुक्ती मिशन अग्रेसर राहील.स्त्रीयांना समान दर्जा आणि विकासाच्या समान संधी,निर्णय प्रक्रियेत समान वाटा आणि सामाजिक भागिदारी प्रस्थापित करण्यासाठी मिशन कार्यरत राहील.आर्थात स्त्रीवादी विचारसरणीला पुरेसा वाव राहील .

१८)आधुनिक जगातील नव्या मुल्यरचना व मुल्येव्यवस्थेसाठी कार्यरत राहील यामध्ये पारदर्शकता व सहभागी लोकशाही मूल्यांचा आग्रह राहील.

मानव मुक्ती मिशनच्या काही लोकशाखा पुढील प्रमाणे कार्यरत आहेत.

१)कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षक परिषद.    २)भगतसिंग स्टुडंट फ्रंट.                              3)राष्ट्रजागृती वारकरी परिषद,                        4)परधर्म महासभा                                    ५)राष्ट्रमुक्ती आंदोलन.                                ६)मजलिस ए इंसानियत.                          ७)जात्यांतक शेतकरी शेतमजूर महासभा.        ८)ग्रामसुरक्षा दल.                                    ९)बसवधर्म महासभा.                                  १०)शाक्त शैव परिषद.                            ११)लोपामुद्रा बोली भाषा व लिपी संवर्धन समिती     12 ) सौत्रांतिक कलां व साहित्ये संघ 


नितीन सावंत ,परभणीकर                            संस्थापक अध्यक्ष                                              मानव मुक्ती मिशन.                                9970744142

Tuesday, 11 July 2023

♦️पन्हाळ्याचे सादोबा (सुफी संत हजरत शाहदुद्दीन कत्ताल वली)

♦️पन्हाळ्याचे सादोबा (सुफी संत हजरत शाहदुद्दीन कत्ताल वली)

"या जगातील सर्व गोष्टी नष्टत्व पावतात
 देव मात्र एकटा अक्षय रहातो"
         - सादोबा दर्ग्यातील कबरीवरील लेख,

                       निसर्गाच्या समृद्ध वारश्याने संपन्न असलेली ही भारतीय भुमी, बौद्ध चिनी प्रवासी हयून त्सांग आणि फाहियान पासुन तर अरबस्तानातून आलेल्या अनेक सुफीपर्यंत सर्वांना अत्यंत मोहित करणारी ठरलेली आहे. भारतीय भुमीला सर्वोच्च असे स्वर्गाचे विशेषण वापरणे, या भुमीला स्वर्ग म्हणून संबोधने, या देशासाठी अत्यंत गौरवाचे आहे. भारतीय भुमीबद्दल अमिर खूसरो म्हणतात 
         " हस्त मेरा मौलीद व मावा वत्तन
           किश्वरे हिंद बहिश्ते बर जमीन "
           
( हिंद माझी जन्मभुमी आणि हिंद माझा देश आहे. आणि तो पृथ्वीवरील स्वर्ग आहे." )
              एवढेच काय सुफी संतांनी वसवलेल्या शहराला जन्नतचे शहर (खुल्ताबाद) हे नाव देने हे या भुमीचे मोठेपण सांगणारे तर आहेच शिवाय ही उदार, व्यापक, सर्वव्यापी दृष्टी लाभलेले ते महान सुफी देखील किती मोठ्या मनाचे होते, हे आपल्याला लक्षात घ्यावे लागते. नाहीतरी शेतक-यांना 'नागरगट्ठे' म्हणून हिनवनारे समुह देखील या देशात आहेतच.
                हजारो किलोमिटरचा प्रवास करून भारतीय भुमीची, येथील गोरगरीब जनतेची सेवा करून, या मातीत देह ठेवणाऱ्या अनेक सुफींच्या मजारी, दर्गे, पीर आपल्याला इतिहाच्या पाऊलखुणा दाखवत आहेत.
                 कोल्हापुरच्या मजारी, पिर, दर्ग्याच्या विश्वात पन्हाळा किल्ल्यावरील "सादोबा' दर्गाह असेच आपले लक्ष वेधुन घेतल्याशिवाय राहत नाही. कोल्हापुर शहरापासून  साधारणतः २० कि.मी अंतरावर पन्हाळगडाच्या प्रवेशद्वार चार दरवाजाच्या जवळ हा सुंदर, मनमोहक दर्गाह आहे. हा दर्गा अंदाजे १५ गुंठे परिसरात असुन बाजुला असणा-या दोन्ही ऐतिहासीक तलावांच्या मध्ये हा दर्गा तत्कालीन राज्यकर्ता इब्राहिम आदिलशाहच्या कारकिर्दीत त्याचा मुख्य वजीर खिजर खान याने बांधलेला आहे.  दर्गाच्या प्रवेशद्वारा समोरील पराशर तलाव अत्यंत जुना मानला जातो. त्याचे बांधकाम बहामनी, शिलाहार राजांच्या राजवटितही झाल्याचे समजते.
                 दर्गाहच्या कमाणीवर लिहलेले " हजरत पीर शहादुदीन कत्तालवली रहे. दर्गाह पन्हाळा." हे पाहताच क्षणी आपले लक्ष वेधून घेते. हे नाव लिहीलेल्या छोट्या दरवाजावजा कमानीतून आत प्रवेश केला की अत्यंत सुंदर दगडी नक्षीकाम केलेल्या अनेक मजारी आपल्याला दिसु लागतात. महाराष्ट्रतील इतर मजारींपेक्षा या मजारीवरील दगडावर केलेले नक्षीकाम आणि रचना अत्यंत वेगळी असल्याचे आपल्या लक्षात येईल. अधिक माहिती घेतली असता त्या तुर्की पद्धतीच्या असल्याची माहिती स्थानिक मुस्लिमांकडून मिळाली. उंच दगडी चबूतऱ्यावर बऱ्याच मजारी अर्थात समाध्या आपल्याला दिसतील. या मजारी मुख्य दर्गाच्या समोरील भागात आहेत. दर्ग्यात प्रवेश केल्याबरोबर आतमध्ये एकुण तिन मजारी आहेत. डाव्या हाताकडील मुख्य मोठी मजार हज़रत शाहदुदीन कत्ताल वली रहे.अ. यांची आहे. मधली छोटी मजार त्यांचे सुपुत्र मासुम साहब यांची आहे.  फार वर्षांनी हजरत शाहदुद्दीन कत्ताल वली यांना ही पुत्रप्राप्ती झाली होती परंतु लहान वयातच मासुम सहाब यांचा मृत्यु झाला होता. फारशी भाषेमध्ये मासुम साहब यांच्या माजारीवर सुफी संत शाहदुद्दीन कत्ताल वली यांना त्यांच्या अकाली मृत्यूनंतर अतिव दुःख झाल्याने त्यांची पुत्रप्रेमापोटी लिहलेली कवणे आहेत ती अशी की "परमेश्वराने जोपर्यंत त्याला वाटले तोपर्यंत त्याला या जगात ठेवले नंतर त्याला आपल्याकडे बोलावून घेतले आणि आम्हाला अतिव दुःखी केले". तिसरी शेवटची मजार त्यांच्या पत्नी माँसाहेबी यांची आहे.
             या दर्गाहची लांबी 25 फुट लांब आणि 29 फुट रुंद तर 50 फुट उंच अशी रचना आहे. स्थानीक लोकभाषेत  याला सादोबा (साधुबाबा ) म्हणुन प्रसिद्ध असणारे हे सुफीसंत इराण या देशातील जनानण प्रांतातून १२ व्या शतकात साधारणतः ९ शे वर्षापूर्वी संपुर्ण कुटुंबासह पन्हाळगडावर आले होते. त्यांचे नाव सुल्तानुल मा. शेख सय्येदुल सादात, हजरत शाहद्दुदीन कत्ताल वली जनजानी आहे. स्थानिक लोकांनी त्यांना साधुबाबा हे संबोधन वापरल्याने नंतर अपभ्रश होऊन ते सादोबा नावाने ओळखले जावू लागले. ते चिश्तीया-निजामीया-अलफिया परंपरेतील सुफी होत. त्यांच्या वडीलांचे नाव सुल्तानुल आरिफिन सिराजुस सालीकीन हजरत हिसामुद्दीन कत्ताल जनजानी होय. त्यांची मजार पुण्यात शनिवारवाड्याच्या समोर आहे. तर आईचे नाव आबीदा झाहिदा बी सय्यदा माँ साहेबा (र.अ.) आहे. यांची मजार पुण्यात आहे. सादोबा साहेबांच्या भावाचे नाव सय्यद शहाबुद्दीन कत्ताल वली होय. यांची मजार कर्नाटक राज्यातील  बेळगाव शहरात (सिमाभागात) आहे. बहीणीचे नाव ताहिरा झाकिराह खातून सय्यदा आहे, यांची मजार देखील पुण्यात आहे.
    सादोबा यांचे वडील इराण देशातील जनजाण प्रांताचे बादशाह सुलतान होते. एकेश्वरवादाच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांनी आपल्या  बादशाहीचा , शाही जगण्याचा त्याग केला आणि ते महाराष्ट्रात आले. सादोबा यांचे घराणे मुहम्मद पैंगंबर (स.) यांचे जावाई चौथे खलिफा हजरत अली यांच्या घराण्याचे वंशज असल्याचे सांगिले जाते. मिरज शहरातील मिरासाहेब हजरत ख्वाजा मोहम्मद मिरा हुसैनी चिश्ती (रहे) हे साधोबा यांचे आजोबा आणि हजरत शमशुद्दीन वली यांना मामा लागतात, त्यांच्या आईकडून नातलग असणारे मिरजेचे मिरासाहेब होत अशी माहिती स्थानिक मुजावर यांच्याकडून मिळाली.
              पन्हाळगडावरील सादोबा यांच्या कबरीवर, सदरच्या भिंतीवर आणि आजुबाजुलाही फारशी भाषेतील अनेक शिलालेख आहेत. या शिलालेखांचे मराठी भाषेत भाषांतर तथा वाचनही झाले आहे.
सादोबा यांच्या  दर्गाहचे बांधकाम विजापुरचे बादशाह इब्राहिम आदिलशाह दुसरा यांचे वजीर खिजर खान यांच्या देखरेखीत झाले आहे. पुढील काळात पन्हाळा मोगलांकडे गेल्यानंतर मुघल बादशाह औरंगजेब
 याने दर्ग्याला भेट दिल्याचे इतिहासात  दाखले मिळतात. मराठा राजवटीत हा दर्गाह पन्हाळा परिसराचे ग्रामदैवत बनला आणि या दर्गाहच्या उरुस उत्सवाला लोकाश्रय मिळाला. सर्वसामान्य जनतेपासून राजघराण्यातील मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वजन या उरुस उत्सवात सहभागी होत असत.
                  छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू आणि छत्रपती राजाराम महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज (दुसरे) यांच्या मंदिरातून दरवर्षी  उरुसाच्या काळात सादोबा दर्ग्यास गलेफ चढवण्याची प्रथा आहे.  छत्रपती घरण्याकडुन सुफी संत सादोबा यांना तो मान असून ती प्रथा आजतागायत सुरू आहे. आज घडीला दोन मानाचे गलेफ (चादर) मजारींवर चढवले जातात. त्यातला पहिला गलेफ मुजावरांच्या वतीने चढवला जातो तर दुसरा गलेफ पन्हाळगडावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या मंदिरातून निघतो. तो पन्हाळा तहसीलदार यांच्याकडून सरकारी गलेफ म्हणून चढवला जातो. या दर्गाच्या देखभालीसाठी लोकराजा
             राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी  पन्हाळा पायथ्याशी असणारे गुढे येथील जमीन इनाम म्हणून  दिले होते. शिवाय त्यांनी या दर्ग्याला सोन्याचा नारळही दान दिला आहे. मुस्लिम हिजरी दिनदर्शिकेप्रमाणे  रज्जब महिन्याच्या २४ तारखेला सादोबा दर्गाहचा भर उरूस भरतो. भर उरुसच्या आदल्या दिवशी सर्व धर्मीय महिलांच्या हस्ते माँसाहेबांची ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न होतो.  रज्जब महिन्याच्या २४ तारखेच्या पहाटे ०२.०० ते ०४.०० या वेळेत दर्ग्यातील मजारींना  दर्ग्याचे मानकरी मुजावर लोकांकडून चंदनचा लेप म्हणजे संदल लावून गलेफ चढवला जाऊन प्रार्थना केली जाते. उरुसाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रज्जब महिन्याच्या २५ तारखेला पन्हाळ गडावरील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मंदिरातून सरकारी गलेफ मिरवणुकीने आणून  तहशिलदारांच्या हस्ते दर्ग्यास अर्पन केला जातो. या उरुसाला हिंदू-मुस्लीम तसेच स्थानिक सर्व जाती जमातींचे लोक उपस्थित असतात. सामाजीक ऐक्याचे, बंधुभावाचे प्रतिक म्हणून हा दर्गा आदिलशाही आणि शिवकाळापासून आजही सर्वसामान्य जनतेच्या मनात पुजनीय, वंदनीय आहे. कोल्हापुर शहर तसे सलोखा आणि समतेचे शहर म्हणून ओळले जाते. कोल्हापुरच्या अंबार्बाइपासून ते महाराणी ताराराणी पर्यंत आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पासून ते लोकराजा राजर्षी शाहु महाराजांपर्यंत येथे समतेचे, ऐक्याचे, माणुसकीचे दर्शन घडवणारी हजारो महापुरुष, संत पुरुष होऊन गेले आहेत, आणि सुफी परंपरेनेही या शहरात शहावल्ली साहेब, सय्यद सादाद औलीया.ह.पीर. बुराणद्दीन कादरीया , हजरत सय्यद मुबारक घुडाणपीर, हजरत पीर लाल शहाबाज कलंदर, हजरत पीर बाबुजमाल साहेब, हजरत पीर नंगी शाह वली, हजरत पीर शाह कुली (साकोली), हजरत पीर हूसेन जहांगीर लगोड बंद बाबा अशा अनेक सुफी संतांनी माणुसकीचा आणि समतेचा विचार पेरला, सुफींनी कधीही भेदभाव पाळला नाही. त्यानीं अस्पृश्यता नाकारली. सर्वांना एका ताटात, एका पंगतीत घेऊन ते जेवत असत. दुर्धर रोगांवर त्यांनी औषोधोपचार केले. जखमांवर मलपट्टी केली. अनेकांच्या घरातील गृहकलह त्यांनी सोडवला. माणुसकीचे बंधुभावाचे सल्ले त्यानीं दिले. निर्गुण निराकर ईश्वर सांगितला. गोरगरीब जनतेला त्यांनी पोटाशी धरले. म्हणूनच आजही जनता म्हणते की बाबांच्या दरबारात गेलो की सर्व समस्यांवर उपाय निघतोच. शेवटी हजरत पीर शाहदुद्दीन कत्ताल वली यांच्या कवनाप्रमाणे या जगातील सर्व गोष्टी नष्ट पावतात, परमेश्वर तेवढा अक्षय्य राहतो 
हा सुफी संतांचा आधार आहे असेच म्हणावे लागेल.

नितीन सावंत परभणीकर
9970744142
11 जुलै 2023

Friday, 9 December 2022

ब्राम्हणी (परंपरागत) बुद्धीजीवींचा तोरा - भाग एक

 ब्राम्हणी (परंपरागत) बुद्धीजीवींचा तोरा - भाग एक 

                      काळाच्या पटलावर समस्या जोखून त्यासाठी उपाययोजना देनारा खाऱ्या अर्थाने बुद्धीजीवी असतो.त्यालाच विचारवंत , तत्वज्ञही म्हणता येइल. तो जनसमुदायात वावरतो , समाजात जातो. तिथे समस्यांचा क्रम लक्षात घेतो.प्रथम प्राधान्याच्या समस्येला तो केंद्र बनवतो आणि त्यावर क्रांतीशस्त्रे तयार करतो.
                      
                           बुद्ध भारतभर फिरले आणि त्यांनी वर्णांतांच्या क्रांतीचे तत्वज्ञान दिले.शाळेसाठी लेकरे आणण्यासाठी फुले अस्पृश्य वास्त्यांत फिरले त्यातून त्यांनी जात्यान्तक क्रांतीचा शस्त्रागार तयार करायला सुरुवात केली.डॉ बाबासाहेब आंबेडकर लढे,मोर्चे उभे करत करत अस्पृश्यता ही प्रथम प्राधान्याची समस्या जागतिक पटलावर नेताना दिसतात. म्हणजे हे महापुरुष जनतेत जावुन समस्या जोखतात आणि त्या समस्येला धरुन क्रांतीशस्त्रे तयार करतात.म्हणून ते मुक्तीदाते ठरतात.                    
                             आजचे सांप्रत पुस्तकी विचारवंत स्वताला सर्वहरांचे बुद्धीजीवी म्हणून घेवुन घोर फसवणूक करताना दिसत आहेत.यांचे पुस्तकी ज्ञान हे जातवर्गीय समाजव्यवस्थेत केवळ आणि केवळ भागीदारी मिळवण्यासाठी, काहीतरी पदरात पाडुन घेण्यासाठी असते.पुस्तकी विचारवंत हे एकांगी बनले आहेत.त्यांनी आधिक प्रगल्भ आणि व्यापक बनण्याऐवजी ते तुसडे ,साचेबद्ध बनले आहेत. ते कधीही समाजव्यवस्थेत गेलेले नाहीत , किंवा जायला तयार नसल्यामुळे त्यांना आजच्या समस्या चर्चेच्या पटलावर आनता आलेल्या नाहीत.समाजव्यवस्थेला त्यांना निट समजून न घेता आल्याने त्यांच्या कलासाहित्यात सर्वहरांच्या समाजव्यवस्थेचे प्रतिबिंबही आपल्याला दिसत नाही .                   
                            यांची साहित्यकृती आणि बुद्धीमत्ता जर सर्वहारांच्या मुक्तीचा मार्ग देऊ शकत नसेल. त्यांचे संघर्षमय जीवन सुखकर करु शकत नसेल तर हे बुद्धीजीवी ब्राम्हणी (परंपरागत) बुद्धीजीवी आहेत.

                          आज घडीला सर्वहारांच्या शोषण पिडणाच्या , गुलामीच्या बेड्या आधिकाधिक घट्ट होत आहेत.देश रसातळाला जात आहे. आशावेळेला विचारवंत , बुद्धीजीवी म्हणवून घेनारे केवळ साहित्तिक कंड शमवत असतील तर ते ब्राम्हणी बुद्धीजीवी ठरतात, परंपरागत बुद्धिजीवी ठरतात.

गरज आहे जैविक बुद्धिजीवीची, चळवळीच्या लढ्यातून निर्माण बुद्धिजीवीची. 

नितीन सावंत परभणी 
9970744142

Sunday, 6 November 2022

ll सांडोनिया सुखाचा वाटा ... ll

 ll  सांडोनिया सुखाचा वाटा ... ll 
      
               संत भौतिक जगताप्रती अगदी एकजीव होते.त्यांना इहलोकीचेच जीवन हवे होते.इहलोकीचे जीवनच सुखकर , सुंदर बनवण्यासाठी त्यांनी हयात घालवली.तसा इतरांना संदेशही त्यांनी दिला. हे जे जीवन आपल्या वाट्याला आले आहे ते पुरेपूर जगा हे संतांचे सांगणे होते.निसर्ग , सौंदर्य संतांच्या मनाला भावाचे , आवडायचे.म्हणूनच सुफी संत बघा अगदीच ते उंचावर किंवा निसर्गरम्य ठिकाणी राहत असत.
              वारकरी परंपरेतील संत तुकोबाराय सुद्धा जगण्याचे आणि जीवनाचे महत्त्व सांगताना म्हणतात " सुखाचा वाटा सोडुन मुक्ती मागणारा किती करंटा आसेल ? " ह्या जीवणात आपल्या वाट्याला आलेले सुख उपभोगले पाहिजेत ते सोडून मुक्तीच्या मागे लागु नये.हातचे सोडुन पळत्याच्या मागे लागणाऱ्याला करंटाच म्हनावे लागेल. 
         वैदिक ग्रंथ आणि ब्राम्हण मंडळी , धर्मपुरोहीत काहीही म्हनो, आम्ही मात्र इहलोकीचेच जीवन सुंदरतेने जगण्याचा प्रयत्न करनार आहोत.आम्ही का बर जन्म घ्यायचा नाही ? आम्ही जन्म घेनारच. जन्माला येने , जीवन जगणे वाईट नव्हे.वैकुंठास जावुन काय मिळते ? तिथे समता आहे का ? दही भात आहे का ? समतेचा गोपालकाला आहे का वैकुंठात ? आमच्याकडे आम्ही एका ताटात समतेचा काला जेवतो.ते तुमच्या वैकुंठात नाही. त्यामुळे आम्हाला मुक्ती , मोक्ष , सायुज्यता नको.इहलोकीचे जीवन आणि त्यात वाट्याला आलेले सुख आम्ही उपभोगनार आहोत. वाट्याला आलेले क्षण आम्ही जगणार आहोत.

सांडुनि सुखाचा वांटा । मुक्ति मागे तो करंटा ॥१॥
कां रे न घ्यावे हे जन्म । काय वैकुठा जाऊन ॥ध्रु.॥
येथें मिळतो दहीं भात । नाहीं वैकुंठीं ते मात ॥२॥
तुका म्हणे मुक्ती नलगे । राहेन संतांची संगे॥३॥

नितीन सावंत परभणी 
9970744142

Thursday, 20 October 2022

ll शहिद सरमद ll

 ll  शहिद सरमद ll           

मर्ग अस्त दर ईं बादिया दुंबाल तुरा।
ई अस्त मआले-कार अज माल तुरा।
अब्बल मिहनत ओ आखिरश हसरत अस्त ,
ई माल कुनद हमेशा पामाल तुरा l 

( ज़रा सोचकर देख कि जिन्दगी का अंजाम मौत है। धन कमाने में दुःख सहना पड़ता है और इसके चले जाने पर भी दुःख होता है। धन-दौलत इनसान की बर्बादी का कारण बन जाती है। )
         
                  महाबलाढ्य जुलमी जेत्यांच्या उन्मत्त आणि विलासी जीवनावर थुंकणारे, त्यांच्या तोंडावर कडवे नग्न सत्य जगजाहीर करणारे अवलिये इतिहासाच्या पानापानावर जागोजागी ताठमानेने स्वाभिमान शिकवत उभे आहेत. यांच्याशिवाय इतिहास म्हणजे निरस कथांचा समुच्चय.असा एकांगी, स्वाभिमानहीन इतिहास कुनाला आवडेल ? 
                  सॉक्रेटिस, चार्वाक , मंसुर , सरमद किंवा चक्रधर घ्या, राजेमहाराज्यांच्या तोंडावर नग्न सत्य सांगताना यांनी थोडीही मान तुकविली नाही.मरने बेहत्तर पण माघार नाही असा यांचा रिवाज. 
                   असाच एक अवलिया म्हणजे सरमद.विलासी जीवन जगणार्यांच्या काळजावर घाव घालनारा.महाद्वारावर निस नागवा होऊन प्रस्थापितांच्या व्यवस्थेचे नग्न धिंडवडे काढनारा सरमद. 
                   कौरवांचा नरसंहार करुन पांडव नगरात प्रवेश करत असताना महाद्वारावर चार्वाक उभा होता.त्याने प्रश्न केला "धर्मराजा ( युधिष्ठिरा ) एवढा आनंदाने वाजतगाजत विजय संपादन करुन नगरात प्रवेश करत आहेस.या विजयाचे कौतुक करायला कुनी नातेवाईक तरी जीवंत ठेवलास की नाही ? " 
                   काळजाला बान मारावा तसा चार्वाकाचा प्रश्न होता.चार्वाकाला भरलेल्या धर्मसभेत सत्य बोलल्याबद्दल जीवंत जाळले गेले. दारा शिकोह सारख्या घरच्यांच्या हत्या करुन ,वडिलांना जेलात घालणाऱ्या आयत्या कमाईवर बादशाह बनलेल्या औरंगजेबाला " अंग का झाकत नाहीस ? "  या प्रश्नाला सर्मदने महाद्वारावर उत्तर दिले होते की " माझे अंग झाकले जाइल असे कुठलेही इमानदारीचे आणि स्वकामाईचे तुझे उत्पन्न नाही. " सर्मदला अनेक कारणे आणि आरोप लावुन त्याचे सर कलाम केले गेले. 
                   सर्मद शहिद झाला. पण संपला नाही .अजरामर झाला. विरुन गेला नाही. 
                   हेच नग्न प्रश्न दिल्लीच्या महाद्वारावर आजच्या  उन्मादी शासकांना विचारणारे सरमद उभे करायचे आहेत. 

नितीन सावंत , परभणी
9970744142

आकडेवाल्यांचे शास्त्र - मटका जुगार

आकडेवाल्यांचे शास्त्र 

 मोठ्या लोकसंख्येच्या गावांमधे आकड्यांची  दुकाने असतात . गावात सर्वच जन एकमेकांच्या ओळखीचे असतात . प्रत्येकाला एकमेकांच्या कुंडल्या माहिती असतात . आणि प्रत्येकचजन एकमेकांच्या समोर सोज्वळतेचा आव अनत आसतो . मी मोठा इमानदार आणि सरळमार्गी हे दाखवण्याचा प्रयत्न चालू असतो . 
म्हणून आकड्यांच्या दुकानात आकडे लावायला येनारा प्रत्येकजण चोरून आकडे लावत असतो . काहीजन तो आकडा चिठ्ठीवरच विचारपूर्वक तयार करून घेवून आलेले असतात . ती चिठ्ठी हळूच दुकानदाराकडे सरकवतात . कुठलेही संभाषण न होता दुकानदार ती चिठ्ठी घेतो . या दुकानदाराचे दुकान हा दुय्यम आणि देखाव्याचा व्यावसाय असतो मागे मात्र त्याची ही आकड्यांची दुकानदारी चालू असते . आकडे लावनार्यान्मधे एक पीएचडी करनारा वर्ग असतो . कागदावर चौकोन करून  , डब्बे मारून त्यांनी मोठा हिशोबच मांडलेला असतो आणि तासंतास त्याकडे बघत बसलेले असतात . हे आकडेशास्त्रातले मोठे तत्ववेत्तेच असतात . यांचा हा हिशोब वर्षातून एखादा आकाडा आणून देतो . हे आकडे लावून लावून काहीजन जागीच वाकडे होतात .तर काहिजनांच्या अंगावर आकडा येतो . काहीजण या क्षेत्रात आपले पाय कायमस्वरूपी रोवून धीरोदात्तपणे उभे असतात . चोरून आकडे लावण्याच्या प्रकारात तर आधी दुकानावर बाप येवून जातो आणि नंतर मुलगा . कधीतरी मुलाचा आकडा आला तर त्याच दिवसी त्याच्याबापाचेच आकडे चुकलेले असतात  . दोघांचेही आकडे एकाच दिवसी तेव्हाच येतील जेव्हा दोघेही एकत्र बसून सामोपचाराने दोघांचाही एकच आकडा लावतील . 

या क्षेत्रात थोड्याबहुत प्रमाणात महिलाही आहेत . महिला जशा तंबाखू खातात तशाच त्या आकडेही लावतात . पन त्यात व्रद्ध महिला जास्त असतात . 

या क्षेत्रात आकडे घेनारे श्रीमंत होतात . पन आकडे लावनारे श्रीमंत झाल्याचे पहाण्यात नाही . पन हे त्या आकडेशास्त्रज्ञांच्या व phd धारकांच्या लक्षात का येत नसावे . हा प्रश्न मला नेहमी पडतो . 
या अकडेशास्त्राची एक वेगळीच भाषा असते म्हणे . ती काही मला अवगत नाही आणि एकिण्यातही नाही . 
ज्या गावात या आकड्यांचे दुकान असते तिथे तिथे रस्त्याने लोळनारे चार दोन तरी सापडतात . खरे तर शुन्य आणि एक ते नऊ असे एकूण दहाच आकडे आहेत . पन हेच दहाजन आलटून पालटून आख्ख्या जगाला सतवत आसतात . आणि आपली किन्मत बदलवून घेत असतात . यामुळे आकडे लावनार्यांची मोठी पंचाईत होते . या क्षेत्रात आरक्षण आसावे काय ? या बद्दल आकडे लावनार्यांना विचारले पाहिजे . 
आकडे लावनार्यांसाठी काहीठीकाणी काही खास सुविधाही केलेल्या असतात . टेबल ,खुर्च्या , पानी ,कोरे कागद आणि पेनचीही व्यवस्था केलेली असते . जे कोनाच्याही बापाला घाबरत नाहीत आणि उजागरपने आकडे लावतात ते  बहाद्दर या सेवा सुविधांचा उपभोग आणि उपयोग घेत असतात .
आकड्यांची देवता म्हणून आपल्या ३३ कोटींमधे कुनी नाही . एखादा नविन भरम्हनुन आकडेबाबा लॉंच केला तर लॉंच करनार्यांची फुलटु कमाई होइल .हे आकडे लावनारे कुन्याही देवावर विसंबून न रहाता स्वता मेंदूचा वापर करुन आकडे लावत आसतात . हे क्रांतीकारीच म्हटले पाहिजे .

Tuesday, 18 October 2022

उत्सव बळीराजाच्या पुनरागमनाचा

 उत्सव बळीराजाच्या पुनरागमनाचा 

पुण्यवंत पाताळ लोकीं नेला ।
दरिद्री तो भाग्यवंत केला ।
चोरटयाचा बहुमान वाढविला ।
कीर्तिवानाचा अपमान केला ॥१॥
धुंद झाला तुझा दरबार ॥धृ०॥
                 - संत जनाबाई 
                 
                   आम्ही वाट पाहत आहोत ,बळीराजाच्या पुनरागमनाची. हजारो वर्षापासून आम्ही त्याला स्मरणात ठेवले आहे. तो हिरण्यकशिपुचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या, बाणासुराचा पिता आणि उषेचा आज्जोबा.भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व.सुमारे साडेतीन ते पाच हजार वर्षा पूर्वी होऊन गेलेला एक महानायक, महासम्राट,एक महान तत्ववेत्ता.
                         हजारो वर्षापासून आमच्या माय-माऊल्या दसरा दिवाळीला तुझ्या आगमनाचा उत्सव साजरा करतात बळीराजा. त्या मोठ्या आनंदाने तुझा राज्य येऊ दे म्हणतात. आज भलेही वामनाचे राज्य असो,आम्ही मात्र तुझ्याच पुनरागमनाची वर्षानुवर्षे आस लावून बसलेलो आहोत. आता आम्हाला हवा आहे, वामनाला पाताळात घालणारा बळीराजा. पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे , सर्वहारांचे अभेद राज्य उभं करणारा महासम्राट बळीराजा.शेतातील नांगराचा  सोन्याचा फाळ आणि अंगणातील सोन्याचे रांजण एवढा वैभवसंपन्न शेतकऱ्यांचा राजा आम्हाला पुन्हा हवा आहे.
दैन्य दुख दारिद्र्य दुर करणारा समतेचे राज्य उभे करनारा  बळीराजा आम्हाला हवा आहे. म्हणूनच आम्ही त्याची पुन्हा पुन्हा वाट पाहतो आहोत, नक्कीच तो एक दिवस येईल एक नवा क्रांतिकारक बनवून.... नवा नायक बनून... 
                  सुखासमाधाणाने नांदनाऱ्या बळीराज्यात एकदा वामन नावाची पिडा आली आणि कपटाने यज्ञाच्या खांबाला बांधुन आमचा बळीराजा संपवला गेला.
राजामारल्यावर त्याचे मुंडके लाथेने उडवले गेले.यज्ञदेवतेला रक्ताचा नैव्यद्य दाखवण्यात आला.नरमेध यज्ञ म्हणुन ते रक्त वैदिक पित होते.काय ही दशा केली गेली आमच्या पुर्वजांची. 
                 आम्ही आसुर कुळाचे वारसदार बळीचे वंशज वामनाची वैदिक संस्कृती कधीच माननार नाहीत. आमच्या धमण्यान्मधे बळीराच्या आसुर कुळाचे रक्त वाहात आसेल तर ते आम्ही कसे नाकारायचे.
                         होय आम्ही आसुर आहोत.आसुर सम्राट हिरण्यकश्यपचा पनतु ,प्रल्हादाचा नातु ,विरोचणचा पुत्र ,कपिल यांचा पुतण्या,बाणासुराचे पिता महासम्राट बळीराजा आमचा सख्खा पुर्वज होता.
आम्ही आमच्याच पुर्वजांचा गौरव करणार .
आम्ही बळीराजाचाच गौरव करणार...

वदनी कवळ घेता | नाम घ्या बळीराजाचे || 
सहज स्मरण करा |आपल्या कुळस्वामीचे ||
कृषीक्षेत्रात राबती | मायबाप दिनरात ||
करतात श्रमकरी शेतकरी |अन्नधान्याची भरभराट ||
करून स्मरण तयांचे | करावे अन्न सेवन ||
उदरभरण आहे | संपन्न होवो जीवन ||

रास्ट्रपिता जोतिराव फुले साहेब बळीराजाची बाजु घेताना म्हनतात .

आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर ||
होते रणधीर ||मरुत्यास ||
बळीस्थानी आले शूर भैरोबा ||
खंडोबा,जोतिबा || महासुभा ||१||

सद् गुणी पुतळा राजा मुळ बळी ||
दशहरा,दिवाळी ||आठविती ||२||

क्षत्रिय भार्या "इडा पीडा जाओ ||
बळी राज्य येवो "||अशा का बा ?||३||

आर्य भट आले,सुवर्ण लुटिले ||
क्षत्री दास केले ||बापमत्ता ||४||

वामन का घाली बळी रसातळी ||
प्रश्न जोतीमाळी ||करी भटा ||५||

-रास्ट्रपिता जोतीराव फुले.

जगतगुरु तुकोबाराय सुद्धा बळीराजाची बाजु घेताना म्हणतात.. 

हरि तु निष्ठुर ,निर्गुण  !
नाही माया बहु कठिण  !! 
नव्हे ते करिशी आण !
कवणे नाही केले ते !! 

बळी सर्वस्वे उदार !
जेणे उभारिला कर !!
करोनी कहर !!
तु पाताळी घातिला !!

जय बळिराजा ...

आपल्याही गावी , शहरात , वाड्यावर, वस्तीवर, तांड्यावर  ग्रामपंचायत कार्यालयात , ओट्यावर , चौकात ऑफिसात किंवा घरात चौरंगावर बळीराजाची प्रतिमा ठेवून पुजन करावे.विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे . वारकऱ्यांना घेवुन टाळ मृदंगाच्या गजरात पालखी सोहळा काढावा किंवा बैलगाडीने मिरवून काढावी. 

ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर 
9970744142

Monday, 19 September 2022

♦️श्रमाची कदर नसलेला देश

 ♦️श्रमाची कदर नसलेला देश

           नुकताच आम्ही पुर्णा तालुक्यातील सातेफळच्या कुंभार वस्तीला भेट दिली.सोबत होते महाराष्ट्र सरकारच्या मानव विकासचे आयुक्त मा.नितीन पाटील आणि त्यांचे इतर आधिकारी.विकासाच्या प्रक्रियेत न आलेल्या गरिब जाती जमातींसाठी काम करणारे हे आधिकारी कुंभार वस्तीत कुंभारकाम बघत होते.कुंभारकाम करणाऱ्या सर्व व्यावसाईकांना कशाप्रकारे मदत करता येइल जेणेकरून त्यांच्या व्यावसायात वृद्धी बरोबर नफाही जास्त कमावता येइल यासाठी सर्व आधिकारी आधिक माहिती देत होते.त्यांच्याकडील काही महत्वपूर्ण योजनाही सांगत होते.तशी चर्चाही करत होते.
                    मी अंगणात बसलेल्या एक दोन वृद्धांसोबत चर्चा करायला सुरुवात केली.बाजुला काही मडके वाळवत घातलेले होते.नवरात्रोत्सव जवळ आल्याने घटस्थापनेसाठी लागणारे ते छोटे आकाराचे गाडगे बनवले होते. मी म्हनालो " कितीला एक जाते हे मडके "
        वृद्ध आज्जोबा म्हनाले ' पाच रुपायाला एक " मी आवाक झालो फक्त पाच रुपये किंमत.हल्ली काय येतेय हो पाच रुपायाला ? "
         मी परत प्रश्न केला " यासाठी वेळ किती जातो , एक मडके बनवायला ? "
         ते म्हनाले " माती भिजवने , मुरवने , चिखल घट्ट करणे ही चार पाच दिवसाची मोठी प्रक्रिया आहे. " एक गाडग्याच्या चिखलाला आकार द्यायला विचारत असाल तर आर्धा तास जातो."
   आर्ध्या तासाच्या श्रमाचे फक्त पाच रुपये ??
ते म्हनाले " तिनशे मडके बमवायला सहा दिवस गेलेत.म्हणजे एका दिवसात ५० मडके बनवलीत.एक पाच रुपाला विकले जाते याप्रमाणे आम्हाला २५० रुपये रोज पडतो. "

मी म्हनालो " ही तर घोर निंदा आहे तुमच्या श्रमाची आणि कलेची." ते म्हनाले " साहेब या वंशाला घातलेय म्हणून करावे लागते बघा. नाहीतर कुनाला हौस आहे चिखल तुडवायची. आम्हाला पर्याय आहे का दुसरा काही , नाही ना . म्हणून हे सर्व . लोक भाव पाडून मागत्यात, उलटे रेटुन बोलतात . बरोबर वागणूक देत नाहीत. आमचे आम्हालाच माहिती आम्ही कसे जगतो ते. "

                     मी सिरिअस होतो आहे , हे लक्षात आल्यानंतर त्यांनी दुखातूनही हस्याची कमाई केलेली कला दाखवली.एक म्हातारा दुसऱ्या म्हाताऱ्याला म्हणाला " चोरी केली असती.पण आम्हाला करता येत नाही.आणि मार खाण्याजोगी तब्यतही नाही"
आम्ही सगळेचजन असलो.
तेवढ्या आपार मेहनतीतूनही ही मानसे आनंदी, सुखी रहातात.एकोप्याने रहातात.हसतात.दुख पोटात दाबुन ठेवतात.हजारो वर्षापासून अन्न खायला भांडी बनवून देनारा कुंभार आज व्यावसायाच्या रुपाने शेवटच्या घटका मोजत आहे.पाच रुपायासाठी तो चिखलाने हात भरवतो .तरी तो आनंदी रहातो. आणि इकडे नोकरदार वर्गाचा दोन महिने पगार नाही झाला तर बिपी वाढतो.

नितीन सावंत परभणी
9970744142
दिनांक २० सप्टेंबर २०२२ 

हस्तश्रमाने काम करणार्यांचे मोल करा

 "ताई कितीला दिला हा फडा?"
" भाऊ हा ५० आणि हा ६० रुपायाला"
त्यांनी उत्तर दिल्यानंतर मी परत प्रश्न केला 
"दोन्ही तर सारखेच दिसताहेत फरक काय ?" 
" भाऊ पानोळ्या,वजन सारखेच आहे फरक फक्त बांधण्यात असतो.दोरी गच्च कमी अधीक होते भाऊ म्हणून" 

मी दोनही फडे हातात घेवून बघत होतो.अगदी दोनही बाजूने.
त्या मायमाऊलीचे हृदय खालीवर होत होते.एखाद्याने मोठ्या श्रमाने हताला घाव सहन करुन एखादी सुंदर कलाकृती बनवावी आणि माझ्या सारख्याने क्षणात तिच्या उनीवा काढुन नावे ठेवून निघून जावे काय वाटत असेल त्या पोटासाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या जीवाला. 
 
रस्त्यावर संपूर्ण अंधार झालेला आहे. आणि तिला एवढा माल खपवून घरी जायचेय.फक्त दोनच फडे उरलेले आहेत.आणि ते ही मी बघत आहे. 

" भाऊ दहाविस कमी द्या,एवढे काय पहायले" 
"अहो ताई मी किंमत कमी करनार नाही " 

त्या रखुमाईला वाटले, मी किंमत करनार नाही म्हणजे आता मी निघून जातो का काय की.शेवटचा उरला सुरला माल असल्याने कदाचित मी घेनार नाही असा तिचा समज. 

परत ती म्हणाली "भाऊ मया स्वता हताने बनवलेले फडे हाइत.एक भी खराब नाही." 

"अहो मी त्या फड्याच्या पानोळ्या नाही बघत.त्या झिजूनच जानार आहेत ना.मी बघत आहे मुठ मजबूत असावी."
 "भाऊ मी स्वता बळ लाऊन आवळल्यात मुठी.. " 

" भाऊ कोनता घेता मग ? " 
"ताई दोनीबी" 
तिच्या चेहऱ्यावर हस्य उमलले. 
"हे घ्या एकशे दहा रुपये"  
भाव न करता फडे घेवून मी माझ्या घरी निघालो आणि ती तिचा पसारा आवरायला लागली .. घरी जाण्यासाठी ..

मी विचार करत होतो. कुठल्यातरी डोंगराळ भागातुन डोक्यावर भारे आना.मग त्या पानांचे बारिक बारिक पाते कट करा. त्याला एका गोलाकार पध्दतीने विना.ते कितीतरी वेळा हताला टोचते.नखात टोचल्यावर जिभाळी लागते.कुठेच जीव लागत नाही इतकी आग होते.तळहावर ते सर्व विनायचे.मग मुठीला घट्टपणे दोरी बांधायची.यावेळी स्त्रीयांना सर्व जीव एकवटून ती मुठ बांधावी लागते. त्या मुठेला नायलॉनची दोरी.मुठ ढिली असेल तर गिर्हाइक निघून जाते. 
एवढ्या बेजारीतुन त्या फड्याची किंमत किती तर 
पंन्नाससाठ रुपये.. 
आन यांच्या मॉल मधला झाडु कितीला तर एकशे दहा पासुन बोली ... 

एका दिवाळीत भाव न कमी करता तुम्ही सुद्धा एखाद्याच्या श्रमाचे मुल्य करु शकतात ... 

फार सोपी कृती आहे. करुन बघा. 
थेट शेतात पिकवलेले माळवं भाजीपाला घेवून आलेले शेतकरी पहाटेच रोडच्या कडेला बसतात.भाव न करता घ्या बर .. काय बिघडत नाय.. 

उन्हाळ्यात गरिबांचा फ्रिज घेवून बसलेले कुंभार... हंडा घेताना भाव कमी करु नका,  काय बिघडत नाय .. 

लोहाराकडुन विळा, कुऱ्हाड शेवटुन घेताना .. कुलपाची नवी चावी बनवुन घेताना भाव कमी करु नका काय बिघडत नाही ..

भाव कमी करायचा प्रयत्न मॉल मधे करुन बघा बरे .. 

दोन रु सुट्टे नाहीत म्हणून चॉकलेट का घेतो आपन .. त्याला ते दोन रुपयेच दे म्हनावे .. वाटलेच तर घेतलेले सामान वापस करा ..
दुसरीकडे घ्या ..
पन हस्तश्रमाने राबनार्यांच्या श्रमाचे मोल करा ..

नितीन सावंत परभणी 
9970744142

Saturday, 16 July 2022

कोण हे आहो सुखाचे सांगाती ? संत चोखोबाराय लेखमाला ३०

कोण हे आहो सुखाचे सांगाती ?

जन्मला देह पोशिला सुखाचा l काय भरवसा याचा आहे ll
ऐकलेची यावे ऐकलेची जावे l  हेची अनुभवावे आपणची ll
कोण हे आहो सूखाचे सांगाती। अंतकाळी होती पाठमोरे ll
चोखा म्हणे याचा न धरी भरवसा । शरण जा सर्वेशा विठोबाशी ॥

                             
                           शेवटच्या काळात संत चोखोबाराय अत्यंत एकटे पडले होते. त्यातूनच त्यांना अत्यंत करुणपणे मांडणी करणारा हा अभंग स्फुरला आहे. त्यांनी व्यक्त होने हा गुन्हा ठरला होता. त्यातून त्यांना आनखी एकटे पाडणारी परिस्थीती उद्दभवली होती. मंगळवेढ्याला वेशीच्या बांधकामासाठी त्यांना जावे लागले होते. त्यांच्या सर्व आशा, आकांक्षा स्वप्ने धुळीला मिळाली होती. त्यांचे निकटवर्ती संत मंडळ सोडून त्यांना ईच्छा नसतानाही वेठबिगारीच्या कामावर जाणे भाग पडले होते. या त्यांच्या जीवनात उद्धभवलेल्या या परिस्थीतून त्यांना हा अभंग स्फुरला आहे.
                            शेवटच्या काळात मन मारूण जगणे चोखोबारायांच्या वाट्याला आले होते. एकीकडे बडव्यांची पुरोहीतशाही तर दुसरीकडे वेठबिगारीच्या कामाला बळजबरीने नेनारी बिदरच्या राजाची सरंजामशाही, आशा दोनही व्यवस्थेचे. बळी चोखोबाराय ठरले होते.

                                आंबेडकरी चळवळीतील विद्वान आणि जेष्ठ लेखक ज. वि. पवार म्हणतात " निम्न जातीत जन्मलेल्या चोख्याने समताधिष्टीत समाजव्यवस्थेची अपेक्षा केल्यामुळे त्यांना भिंतीत चिरडून मारण्यात आले. ज. वि. पवारांसारखे अनेक दिग्गज लेखक चोखोबारायांची हत्याच झाली म्हणतात.फुले शाहु आंबेडकरी चळवळीचे लेखक, संघटक शुध्दोधन आहेर म्हणतात. " म्हणुनच चोखा डोंगा परि भाव नाही डोंगा अशी काळीज पिळवडून टाकणारी आर्त वेदना शब्दबध्द करणारा हा बंडखोर  संत मंगळवेढ्याच्या बुरुजात जिवंत गाडला गेला. संत चक्रधरांचे   शिष्यत्व पत्करणाऱ्या एका प्रवचनकार चांभाराला , देखील चुनखडीच्या खड्ड्यात बसवून आणि वरून असाहय्य वेदना, यातना देऊन ठार मारण्याची शिक्षा, देवगिरीच्या राजा रामदेवराय याच्या प्रधानाने, हेमाद्री पंडिताने दिली होती..... पुर्वास्पृश्य  चोखामेळ्याला जिवंत गाडणे सहज शक्य आहे ! आशा तर्हेने या देशातील शुद्रातिशुद्रांनी आध्यात्मिक मुक्तीदेखील रक्त सांडवूनच मिळविली आहे. "
                                आशा पध्दतीने चोखोबारायांच्या अंतकाळी कुणीच जवळ नव्हते. यातून मन मारून चोखोबाराय जंगले आणि मेले. संत चोखोबारायांचे वारसदार म्हणुन पंढरपुरात सर्वगोड यांची घरे आहेत. सर्वगोड हे आडनाव पंढरपुर सोडून अख्या महाराष्ट्रात नाही. त्या काळी चोखोबारायांसारख्या अस्पृश्य  जातींना आडनावे नव्हती. म्हणून त्याकाळी चोखोबारायांना चोखामेळा एवढेच म्हटले जाई. पुढे सर्व संतांनी त्यांचा 'चोखा चोखट निर्मळ'  म्हणून, अभंग लिहुन गौरव केला आहे. चोखोबा भक्ती परंपरेत निर्मळ आहेत. संतांच्या या गोड संबोधनाने चोखोबांच्या नावातील मेळा ( मैला ) जावून चोखोबाराय शुद्ध झाले गोड झाले, असे संतांचे म्हनने होते.संत नामदेवांनी संत चोखोबारायांचे स्मारक बांधुन चोखोबाचा शेवट गोड केला.यातूनही कदाचीत सर्वगोड हे आडनाव पुढे आले असावे. आशाच कुठल्यातरी कारणाने भविष्यात संत चोखोबारायांच्या वारसदारांना' 'सर्वगोड' हे आडनाव मिळाले असावे. सर्वगोड हे अडनाव अत्यंत गौरवशाली आहे. संत चोखोबारायांची परंपरा सांगणारे आहे. "या बाबतीत पंढरपुरतील माजी नगराध्यक्ष सुनिल सर्वगोड म्हणतात
                             "आजवर सनातनी लोकांनी देव आपल्या हातात ठेवला, संतांना छळले. माझे तर असंही म्हणणं आहे की, सनातन्यांनी चोखोबांना मारले आणि त्यांचा मृत्यू, गावकुस पडुन झाला असं सांगितले. हा अन्याय किती दिवस सहनकरायचा. त्यापेक्षा बाबासाहेबांच्या वाटेने आम्ही चाललो आहोत"  या पद्धतीने आंबेडकरी चळवळीतील दिग्गजांच्या भुमीका संत चोखोबारायांची वेस ढकलून किवा 'वेसीत गाडून हत्या केली गेली आशा स्वरूपाच्या आहेत.
                             येथील उच्चभ्रृ जातवर्गीय व्यवस्था आजुनही संत चोखोबारायांना न्याय दयायला तयार नाही. संत चोखोबारायांची झोपडी आणि त्यांनी स्वता बांधलेली दिपमाळेची जागा बळकावण्यात आली आहे. त्यांची शेवटची निषाणी सुद्धा सांभाळली गेली नाही. आजच्या पुराव्यानुसार मौजे शेगाव, सर्वे नंबर १० येथील ३० बिघ्याचे शेत चोखोबांचं होत." ती जमीन आज घडीला संत चोखोबारायांच्या वारसदारांकडे हवी होती.ती जमीन बळकावली गेली. ती चोखोबारायांच्या वारसदारांकडे नाही. इतर तिर्थक्षत्रांच्या ठिकाणी संत चोखोबारायाचे मंदिरे नाहीत.असेलच एखादे तर तेही उपेक्षीत दुर्लक्षीत आहे. " काही वारकरी म्हणवणाऱ्या काही फडांमध्ये आजही बहुजन जातीतील संतांचे अभंग घेवुन कीर्तन होत नाहीत. महिलांची प्रवचनं होत नाहीत. विठोबा बाटला म्हणून काही मोठमोठे महाराज आजही पंढरपुरच्या विठ्ठलमंदिरात जात नाहीत." ज्या अस्पृश्यतेच्या विरोधात, भेदाभेदाच्या विरोधात चोखोबारायांनी आणि सर्व संतांनी बंड केले ती अस्प्रश्यता,भेदाभेद तशीच चालू आहे.चोखोबारायांना काही न्याय मिळाला नाही.गावखेड्यातील  बरेच जन म्हणतात आता कुठे राहिला आहे जातीवाद. आशांनी गावपातळीवर लक्ष ठेवून पहावे गावात ' एक गाव एक पाणवठा झाला पण आजूनही एक गाव एक मसणवाटा'  होऊ शकलेला नाही, भेदभाव आजुनही तसाच आहे. त्या काळात संत चोखोबारायांना आपल्या सख्या पांडुरंगाची भेट घेता आली नाही. आणि आजही  गाव पातळीवर मातंग, चर्मकारांना पारावर, मंदिरात का आले म्हणून मारले जाते.मंदिराच्या आडोशाला पावसाच्या बचावासाठी उभे असलेल्या परभणी जिल्यातील आंबादास सावणेला मंदिर बाटवले म्हणून जीवे मारले जाते. आजही किर्तनातून वक्ते महाराजांच्या सारखे कीर्तनकार जाहिररित्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची टिंगलटवाळी करतात. म्हणजे संत चोखोबाराय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे  मानापसून स्विकारायचेच नाहीत असे ठरवूनच टाकले गेले आहे.
                              जग एवढे पुढे गेले आहे, तरिही भारतीयांनी जुनाट, बुरसटलेल्या संकल्पना काही सोडलेल्या नाहीत. आजुनही आम्ही आजुबाजुच्यांकडे माणुस म्हणुन  पहायला तयार नाहीत. आम्ही माणसाला जात, धर्म, वर्गाच्या  चष्म्यातून पहातो. कधी बदलणार आपण? किती चोखोबारायांनी हळहळ व्यक्त करत, निकृष्ठ जीवन जगत मरायचे ? आजही भंगी, वडार, घिसडी, पारधी, ढोर, बेलदार, पथरवट यांसारख्या कितीतरी भटक्या विमुक्त जाती अत्यंत हालाखीचे जीवन जगत आहेत.आशा जातीना गावात प्रवेश सुद्धा दिला जात नाही. "कोण्याही जीवाचा न  घडो मत्सर" ही संतांनी सांगितलेली शिकवण आपण विसरत चाललेलो आहोत का ?
                              आपल्या जगण्याचे मुख्य मूल्य माणुसकी असायला हवे.संतांनी माणुसकीच केंद्रबिंदू मानुन शिकवन दिली आहे. मग नेमकी ती माणुसकी तेवढी आपण सोडली आहे का ?
                               सर्व  संत आणि त्या संतांची शिकवण आपल्याला बरोबरीची असावी. आपला परका भेद किमान संतांमध्ये तरी करू नये. ठरवीक सतांनाच प्रसिद्धी आणि संत चोखोबारायांसारखे मात्र उपेक्षीत, हे अन्यायकारक आहे. त्यांची जातीअंताची शिकवण आपण अंगी बाळगावी. जातीभेद अस्पृश्यता, बंद हावी. त्यासाठी आपण काम केले पाहीजेत. कुणाची घृष्णा करणे, द्वेष करणे, हिंगलटवाळी करणे, हिने लेखने हे थांबले पाहिजे. गोरगरीबांत आजुबाला चोखोबारायच वावरत आहेत , असे आपल्याला वाटले पाहीजे. सर्वांना समान बंधूभावाची वागणुक आपण दिली पाहिजे. हीच खरी संत चोखोबारायांना श्रध्दांजली असेल.

                                 प्रस्तूत अभंगात संत चोखोबाराय म्हणतात " माणसाचे जीवन क्षणभंगुर आहे. माणुस कुठल्याही कारणाने ताबडतोब मरू शकतो. जगणे क्षणीक आहे. मृत्यू नग्न सत्य आहे.वास्तव आहे. माणुस जन्माला आल्यापासुन देहाचे भरणपोषण करत असतो. शरीराला सुख मिळावे म्हणून नाना प्रकार माणूस करत असतो. पण जीवनाची निश्चीती कुणाकडेच नाही."  संत चोखोबाराय हे सत्य सांगताना म्हणतात

                       "  की माणुस एकटाच येतो आणि एकटाच जातो. हे सदैव आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या वाईट प्रसंगी कुणीही साथ देत नाही अंतकाळी सर्वजन पाठमोरे उभे रहातात. लोक सुखाचे सांगाती असतात. दुख वाटुन घ्यायला कुणी नसते. म्हणुन कशाचाच आणि कुणाचाच भरोसा धुरु नये. देहाचा किंवा नातेवाईकांचा खात्रीशिर विश्वास धरू नये. सर्वांनी विठ्ठलाला शरण जावे."

                               संत चोखोबाराय वारकरी परंपरेबद्दल म्हणतात की आमचा समतेचा , माणुसकीचा हा प्रवाह आहे.कुनीही या आणि शुद्ध होऊन जा.

खटनट यावे शुद्ध होऊनी जावे l
दवंडी पिटी भावे चोखामेळा ll

नितीन सावंत परभणी
9970744142

मेहुणाराजा दर्शन संत चोखोबाराय लेखमाला २९

 मेहुणाराजा दर्शन

                                       मध्ययुगीन भारताच्या पटलावर जातीव्यस्थेने बरबटलेल्या लोकमनावर संत नामदेवांनी समतेचा, एकोप्याचा मळा फुलवायला घेतला होता. लोकांना माणुसकीचा धर्म शिकविने, भेदाभेदाच्या पलीकडे जावून एकात्म बनविणे हे नामदेवांच्या संत चळवळीचा मुख्य गाभा होता.नामदेवांच्या या कार्याचा सहवास संत चोखोबारायांच्या संपूर्ण कुटूंबाला लाभला होता.या संत नामदेवांच्या कार्याची एक शाखा संत निर्मळा आणि संत बंका महाराज हे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील मेहुणाराजा गावी चालवत होते. संत नामदेवांनी महाराष्ट्राच्या बोहर अनेक राज्यात आपल्या कार्याची छाप सोडलेले पुरावे आजही आपल्याला सापडतात. संत नामदेवांच्या शिकवणुकीचा सर्वात मोठा प्रभाव पंजाबवर आणि शिख धर्मावर आहे. संत नामदेवांप्रमाणे चोखोबारायांचा प्रभाव समाज मनावर पडला की नाही? संत चोखोबाराय ज्या भागातून जन्माला आले त्या परिसरातील समाजव्यवस्थने चोखोबारायांना स्विकारले की नाही? त्यांच्या जन्मभुमीत त्यांच्याप्रती लोकांच्या काय धारणा, भुमीका आहेत ?  हे समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. सवर्ण नामदेवांना कुठेही वावरणे आपली छाप टाकणे तितकेसे आवघड नाही परंतू अस्पृश्य मानलेल्या चोखोबांच्याप्रती भारतीय समाजमन कसे वागले, हे जगासमोर आले पाहीजे.

                    म्हणुन एकदा संत चोखोबारायांच्या जन्मभुमीला भेट देण्यासाठी अभ्यास दौराच ठेवला.स्थानिकच्या ग्रामीन लोकांच्या  गाठीभेटी घेता येतील, सहज कुठेही थांबून चर्चा करता येईल या हेतूने भोकरदनहुन दोन मोटार सायकलवरून चोखोबारांचे जन्मगाव बघायला आम्ही तिन लोकं निघालो. भोकरदन तालुक्यातील बरंजाळा लोखंडे गावचे अनिल भुतेकर, बाभुळगावचे ह. भ. प. शंकर महाराज राऊत आणि मी, असे आम्ही तिघांनी खेड्यापाड्यांचा रस्ता तुडवीत देऊळगाव राजाहून  मेहुणाराज गाठले. देउळगाव राजा ते देऊळगाव मही या दोन छोट्याशा शहरांच्या मधे मेहुणाराजा गावाची कमान रोडवरच लागते. कमानीवर " श्री संत चोखामेळा मेहुणाराजा जन्मस्थान "  असे पांढऱ्या अक्षरात रंगवलेले आहे. आम्हाला त्या भागाची माहिती देण्यासाठी देऊळगाव महीचे शिक्षक संतोष नागरे आमच्या आधीच मेहुणराजाला येऊन दाखल झाले होते. आम्ही कमानीतून गावात शिरलो गाव सुरू व्हायच्या आलिकडेच संत चोखोबारायांचे छोटेसे मंदिर आहे. समोर छोटासा सभामंडप आणि रिकामे मैदान आहे. संत चोखोबारायांच्या मंदिराच्या मागेच अगदी लागून निर्मळा नदीचे पात्र आहे.या पात्रात संत बंका महाराज आणि संत निर्मळा महाराज या दोघांच्या समाध्या आहेत.हे दोघे संत चोखोबारायांची बहिण आणि मेहुणे होत.या नदीवर आम्ही जेव्हा पोहंचलो तेव्हा तिथे दशक्रिया विधी चालू होता. स्थानिकच्या बऱ्याच लोकांकडून नवीन माहिती मिळाली. सर्वांशी चर्चा करून आम्ही मुख्य गावाची वेस, महाद्वार पहाण्यासाठी निघालो. हे गाव अत्यंत जुणे असल्याकारणाने या गावाला सर्व बाजूनी अत्यंत सुंदर अशी दगडी तड़बंदी होती. गावकरी अभय जाधव बोलताना म्हनाले की या गावाला पुर्वी १२ दरवाजे होते. आता चार दरवाजे आस्तित्वात आहेत. २०२० - २०२१ साली या गावची लोकसंख्या तिन हजार असावी असा त्यांनी अंदाज व्यक्ता केला. मेहुणाराजा गावची पाहाणी, फोटोग्राफी करून आम्ही सर्वजन संतोष नागरे यांच्या सोबत देऊळगाव महीला प्रा. कमलेश खिल्लारे यांच्याकडे निघालो. प्रा. कमलेश खिल्लारे हे संत चोखोबारायांच्या साहित्याचे अभ्यासक आहेत. संत चोबोबारायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात सरांचा मोठा सहभाग , वाटा आहे. १४ जानेवारीला दरवर्षी मेहुणाराजा गावी चोखोबारायांच्या जन्मोत्सवाला विविध कार्यक्रम असतात.त्यात सरांचे व्याख्याब व मार्गदर्शन असते. सबंध जिल्हाभर संत चोखोबारायांचे आभ्यासक म्हणून खिल्लारे सरांचा नावलौकीक आहे. खिल्लारे सरांच्या घरी गेल्यानंतर सरांनी पुस्तक देऊन छोटासा सत्कार केला. सरांच्या घरीच त्यांनी वाचनालय उभे केले. खिल्लारे सर याच भागात अनाथ , वृद्ध आणि निराधारांसाठी कबिरालय उभे करत आहेत. खिल्लारे सरांनी संत चोखोबारायांच्या संदर्भात बराचवेळ चर्चा केली. दरवर्षी होत असलेल्या चोखामेळा जन्मोत्सवाची माहिती दिली. काही क़िस्से सांगितले.राजकारणी वर्गही आता संत चोखोबारायांच्या जन्मभुमीत रमु लागला आहे. शिवाय वैचारिक , बुद्धीजीवी वर्गातील संत चोखोबारायांच्या बद्दल एक सकारात्मक चर्चा चालु आहे.असे सरांनी सांगितले.

                      बरिच चर्चा करुन प्रा. कमलेश खिल्लारे यांच्या घरून आम्ही संतोष नागरे यांच्या घरी जेवण करण्यासाठी निघालो. मी अनिल भुलेकर, ह.भ.प. शंकर महाराज राउत आदिंनी संतोष नागरे  यांकडे जेवणे केली. भुसुर चर्चा झाली. आणि "आम्ही तिघेजन पुढील प्रवासाला निघालो बुलढाण्याकडे.

                                भारतात जातीव्यवस्था अस्पृश्यता इतकी टोकाची आहे की ती माणुसकीचे काम करणाऱ्या संतांच्या बाबतीतही पाळली जाते. इतर संतांचा जेवढा जयजयकार झाला किंवा होतो आहे.त्यातुलनेत चोखोबांच्या वाट्याला अवहेलनाच आलेली दिसते आहे.इतर संतांची नावे ठेवुन वारसा जोपासाण्याची परंपरा कायम असताना चोखोबा नाव ठेवने या आजच्या जातीग्रस्त समाजव्यवस्थेला सुट होत नाही. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकोबाराय यांच्या आळंदी , देहू पेक्षा संत चोखोबारायांचे जन्मस्थाळ उपेक्षीत का ठेवले गेले असावे? सर्व संत सारखेच ना? मग मेहुणाराजा गावच्या विकासासाठी २०२० - २०२१ का  उजाडावे ? काही अपवाद सोडल्यास महाराष्ट्रभर तुम्हाला कुठेही चोखामेळा चौक , चोखामेळा संकुल,चोखामेळा कॉलेज असे काही दिसनार नाही. जातीग्रस्त समाजमान, जातीग्रस्त राज्यव्यवस्था याला जबाबदार आहे.
                                एकदा मी संत गोरोबाकाकांच्या जन्मगावी तेरला गेलो होतो.तिथेही संत गोरोबाकाकांच्या मंदिर वजा वाड्याच्या बाहेर , पायरीच्या बाजूलाच छोट्याशा मंदिरात उभी केलेल्या दगडी शेळेच्या स्वरूपात चोखोबा तिष्ठत उभा होता.आपल्या मित्राची भेट घेण्यासाठी.याही चोखोबाच्या मंदिराला रंगरंगोटी नाही.अगदी चोखामेळा मंदिर हे नाव मिटत आलेले आहे.महाराष्ट्रभर हा चोखोबा पायरीलाच उभा केला गेला. खिन्न मनाने मी चोखोबारायांचा निरोप घेतला. माझ्या समोर करुण स्वरूपात आर्त भावनेने गाणारा चोखोबा उभा राहिला.
                               
                    उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीनl
                    रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दिन ll