ll सौत्रांतिक मार्क्सवादी ll
जातवर्गस्त्रीदास्यांतासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
Friday, 4 April 2025
स्त्रीवादी शिव्यांचा धुंडोळा...
Friday, 19 July 2024
जणी आणि विठ्ठल नाते - ओव्या
Sunday, 26 May 2024
मानव मुक्ती मिशन भूमिका व अटी
♦.....मानव मुक्ती मिशन.....♦
सदस्यत्वाच्या अटी :-
१)प्रतिज्ञा घेतलेली पाहिजे. २)डिकास्ट - डिक्लास - डिजेण्डर असला पाहिजे ३)संघटनेचे तत्वज्ञान आणि उद्देश यांप्रती सजग असला पाहिजे. ४)जनसंघटनेत कार्यरत असला पाहिजे . ५)घटना आणि कार्यक्रम मान्य असला पाहिजे.
🔸उद्दीष्टे :🔸
१) भारतात सर्वात प्रधान मानल्या गेलेल्या समस्या सोडवण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम राबवने.मुख्य म्हणजे जातवर्गस्त्रीदास्यांत करणे.त्यासाठी विवीध जनआघाड्या उघडणे.
२)सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी श्रमीक,शोषीत,पिडीत वर्गाला संघटीत करून त्या वर्गाची जाणीव नेणीव घडविणे.अर्थात सामाजिक सर्वहरा आणि आर्थिक सर्वहरा यांची क्रांतीदोस्ती घडवून आणणे.
3)प्रस्थापित व विषमतामुलक संस्कृतीक मुल्यव्यवस्थेशी संघर्ष करणे व नवी मुल्ये समाजस्थापनेसाठी प्रयत्न करणे.
४)पर्यायी संस्कृतीक समाजरचना उभी करणे.
५)सर्वक्षेत्रात असनारा जातवर्गीय संघर्ष गतीमान करणे.
६)मानव मुक्ती मिशन हे नावातच स्पष्ट केल्याप्रमाणे *माणसाकडून माणसांची होत असलेल्या पिळणुकी विरूध्दच्या मुक्ती लढ्यात आत्मीयता बाळगते*.
७)देशांतर्गत जनतेवर लादण्यात आलेली सर्वप्रकारची विषमता अन्याय संपुष्टात आनण्यासाठी सर्वप्रकारच्या आर्थिक विषमता मोडित काढेल. आवश्यक ती जनतेच्या हिताची आणि समाजवादी धाटणीची अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ते उपक्रम व धोरणे राबवेल.
८)वर्णवर्चस्ववादी आणि भांडवलदारी जातवर्गीय सामाजिक वर्चस्व मोडित काढून आणि लिंगभेदावर आधारलेले सांस्कृतिक व सामाजिक वर्चस्व मोडुन काढून मानवी समाजरचनेचा पुरस्कार करनारा सांस्कृतिक व सामाजिक बदल घडवेल व त्यासाठी आवश्यक तो उपक्रम व धोरणे राबवेल.
९)बहुसंख्येने असलेल्या भारतीय ग्रामीण व बहुजन समुदायाला ज्ञान प्रस्थापित करण्यासाठी शेतकी क्रांतिला आग्रक्रमाणे राबवेल. त्यासाठी लोकशाही मार्गाने जनअंदोलनांचा व जनचळवळींचा मार्ग स्विकारने.
१०)भारतामध्ये बहुसंख्य असनार्या शेतकरी,आदिवासी,मागासवर्गीय ,भटके,obc व अन्यशेतकरी जाती या श्रमीक घटकांच्या जीवनामध्ये गुणवत्तापूर्ण बदल घडविण्यासाठी चांगले आरोग्य,मानवी स्वरूपाचा रोजगार,आत्मसंम्मान पुर्वक सामाजिक जीवन यासाठी उपक्रम राबवेल,धोरणे घेइल आणि जनचळवळी करेल.स्वावलंबी व आत्मनिर्भर विकासाचा मार्ग खुला करणे.
११)गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण,आरोग्य अन्न वस्त्र निवारा व करमणूक या मानवी गरजा सकसपने पुर्ण करण्यासाठी सतत कार्यरत राहिल या गरजा पूर्ण करत असताना निसर्ग व पर्यावरनाचा समतोल राखण्यासाठी भूमिका असेल हितसंबंधांचा बिमोड करेल.
१२)समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण समताधिष्टीत संस्कृती आणि धर्मनिरपेक्ष शासन प्रणाली कायम व्हावी यासाठी विविध उपक्रम अभियान राबविण्यात येइल आणि धोरणे आखली जातील.
१३)जातीभेदावरील आधारीत विषमता याला कायमची मूठमाती देण्यासाठी अथक प्ररिश्रम नावीन्यपूर्ण उपक्रम आणि जनचळवळ राबवीण्यात येइल अशा प्रकारचे प्रयत्न करनाऱ्या सर्व जनचळवळींशी समन्वय करण्याचा व सांधा जोडन्याचा प्रयत्न करण्यात येइल.
१४)सामान संधीसाठी विशेष संधी आणि खालच्या जातींच्या उत्थानासाठी सकारात्मक हस्तक्षेप याचा अग्रह व पुरस्कार करण्यात येइल.प्रचलित राखीव जागांचा लाभ त्या त्या घटकातील पिडीत शोषीतांपर्यंत पोहंचवा याचा अग्रह धरेल याच बरोबर वरिष्ठ वर्गातून,वर्णातून केल्याजानार्या शोषन पिडण आणि ताडण पिळवणूक याचा प्रतिकार करेल.
१५)भारतीय भौतिकवादी आणि प्रागतीक परंपरा उचलून धरण्यात येतील आणि जागतीकीकरनाच्या कालखंडातील साम्राज्यवादी शोषनाविरुद्ध कार्ल मार्क्स यांचे तत्वज्ञान आणि प्राच्यविद्यापंडीत कॉम्रेड शरद पाटील यांनी दिलेले भारतीय परिस्थीती संदर्भातील विवेचन पुढे चालवण्याची पराकाष्ठा करेल. आर्थात कॉम्रेड शरद पाटील यांनी दिलेला सौतांत्रिक मार्क्सवाद पुढे चालवला जाईल.
१६)तत्रंविज्ञान क्षेत्रामध्ये देखील वर्गसंघर्ष गतिमान आहे.समस्त मानवजातीच्या मुक्तीसाठी भागीदारी करू शकणाऱ्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या मानवी विकासाच्या वाटा साम्राज्यवाद व कार्पोरेट भांडवलशाही रोखून धरत आहे.आनेकदा कार्पोरेट हितसंबंधासाठी तंत्रज्ञान व संशोधन देखील दडपून टाकण्यात येते.मानवी मुल्यांवर आधारित तंत्रविज्ञानाच्या विकासाच्या बाजूने मानव मुक्ती मिशन कार्य करेल.आणि सर्व प्रकारच्या कार्पोरेट हितसंबंधांसाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा दुरुपयोग,विनाशकारी उपयोग,पर्यावरणाचा नाश,याला विरोध करेल.
१७)लिंगभेदावर आधारलेली सर्वप्रकारची विषमता मोडून काढण्यात मानव मुक्ती मिशन अग्रेसर राहील.स्त्रीयांना समान दर्जा आणि विकासाच्या समान संधी,निर्णय प्रक्रियेत समान वाटा आणि सामाजिक भागिदारी प्रस्थापित करण्यासाठी मिशन कार्यरत राहील.आर्थात स्त्रीवादी विचारसरणीला पुरेसा वाव राहील .
१८)आधुनिक जगातील नव्या मुल्यरचना व मुल्येव्यवस्थेसाठी कार्यरत राहील यामध्ये पारदर्शकता व सहभागी लोकशाही मूल्यांचा आग्रह राहील.
मानव मुक्ती मिशनच्या काही लोकशाखा पुढील प्रमाणे कार्यरत आहेत.
१)कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षक परिषद. २)भगतसिंग स्टुडंट फ्रंट. 3)राष्ट्रजागृती वारकरी परिषद, 4)परधर्म महासभा ५)राष्ट्रमुक्ती आंदोलन. ६)मजलिस ए इंसानियत. ७)जात्यांतक शेतकरी शेतमजूर महासभा. ८)ग्रामसुरक्षा दल. ९)बसवधर्म महासभा. १०)शाक्त शैव परिषद. ११)लोपामुद्रा बोली भाषा व लिपी संवर्धन समिती 12 ) सौत्रांतिक कलां व साहित्ये संघ
नितीन सावंत ,परभणीकर संस्थापक अध्यक्ष मानव मुक्ती मिशन. 9970744142
Tuesday, 11 July 2023
♦️पन्हाळ्याचे सादोबा (सुफी संत हजरत शाहदुद्दीन कत्ताल वली)
Friday, 9 December 2022
ब्राम्हणी (परंपरागत) बुद्धीजीवींचा तोरा - भाग एक
Sunday, 6 November 2022
ll सांडोनिया सुखाचा वाटा ... ll
Thursday, 20 October 2022
ll शहिद सरमद ll
आकडेवाल्यांचे शास्त्र - मटका जुगार
Tuesday, 18 October 2022
उत्सव बळीराजाच्या पुनरागमनाचा
Monday, 19 September 2022
♦️श्रमाची कदर नसलेला देश
नुकताच आम्ही पुर्णा तालुक्यातील सातेफळच्या कुंभार वस्तीला भेट दिली.सोबत होते महाराष्ट्र सरकारच्या मानव विकासचे आयुक्त मा.नितीन पाटील आणि त्यांचे इतर आधिकारी.विकासाच्या प्रक्रियेत न आलेल्या गरिब जाती जमातींसाठी काम करणारे हे आधिकारी कुंभार वस्तीत कुंभारकाम बघत होते.कुंभारकाम करणाऱ्या सर्व व्यावसाईकांना कशाप्रकारे मदत करता येइल जेणेकरून त्यांच्या व्यावसायात वृद्धी बरोबर नफाही जास्त कमावता येइल यासाठी सर्व आधिकारी आधिक माहिती देत होते.त्यांच्याकडील काही महत्वपूर्ण योजनाही सांगत होते.तशी चर्चाही करत होते.
मी अंगणात बसलेल्या एक दोन वृद्धांसोबत चर्चा करायला सुरुवात केली.बाजुला काही मडके वाळवत घातलेले होते.नवरात्रोत्सव जवळ आल्याने घटस्थापनेसाठी लागणारे ते छोटे आकाराचे गाडगे बनवले होते. मी म्हनालो " कितीला एक जाते हे मडके "
वृद्ध आज्जोबा म्हनाले ' पाच रुपायाला एक " मी आवाक झालो फक्त पाच रुपये किंमत.हल्ली काय येतेय हो पाच रुपायाला ? "
मी परत प्रश्न केला " यासाठी वेळ किती जातो , एक मडके बनवायला ? "
ते म्हनाले " माती भिजवने , मुरवने , चिखल घट्ट करणे ही चार पाच दिवसाची मोठी प्रक्रिया आहे. " एक गाडग्याच्या चिखलाला आकार द्यायला विचारत असाल तर आर्धा तास जातो."
आर्ध्या तासाच्या श्रमाचे फक्त पाच रुपये ??
ते म्हनाले " तिनशे मडके बमवायला सहा दिवस गेलेत.म्हणजे एका दिवसात ५० मडके बनवलीत.एक पाच रुपाला विकले जाते याप्रमाणे आम्हाला २५० रुपये रोज पडतो. "
मी म्हनालो " ही तर घोर निंदा आहे तुमच्या श्रमाची आणि कलेची." ते म्हनाले " साहेब या वंशाला घातलेय म्हणून करावे लागते बघा. नाहीतर कुनाला हौस आहे चिखल तुडवायची. आम्हाला पर्याय आहे का दुसरा काही , नाही ना . म्हणून हे सर्व . लोक भाव पाडून मागत्यात, उलटे रेटुन बोलतात . बरोबर वागणूक देत नाहीत. आमचे आम्हालाच माहिती आम्ही कसे जगतो ते. "
मी सिरिअस होतो आहे , हे लक्षात आल्यानंतर त्यांनी दुखातूनही हस्याची कमाई केलेली कला दाखवली.एक म्हातारा दुसऱ्या म्हाताऱ्याला म्हणाला " चोरी केली असती.पण आम्हाला करता येत नाही.आणि मार खाण्याजोगी तब्यतही नाही"
आम्ही सगळेचजन असलो.
तेवढ्या आपार मेहनतीतूनही ही मानसे आनंदी, सुखी रहातात.एकोप्याने रहातात.हसतात.दुख पोटात दाबुन ठेवतात.हजारो वर्षापासून अन्न खायला भांडी बनवून देनारा कुंभार आज व्यावसायाच्या रुपाने शेवटच्या घटका मोजत आहे.पाच रुपायासाठी तो चिखलाने हात भरवतो .तरी तो आनंदी रहातो. आणि इकडे नोकरदार वर्गाचा दोन महिने पगार नाही झाला तर बिपी वाढतो.
नितीन सावंत परभणी
9970744142
दिनांक २० सप्टेंबर २०२२
हस्तश्रमाने काम करणार्यांचे मोल करा
Saturday, 16 July 2022
कोण हे आहो सुखाचे सांगाती ? संत चोखोबाराय लेखमाला ३०
कोण हे आहो सुखाचे सांगाती ?
जन्मला देह पोशिला सुखाचा l काय भरवसा याचा आहे ll
ऐकलेची यावे ऐकलेची जावे l हेची अनुभवावे आपणची ll
कोण हे आहो सूखाचे सांगाती। अंतकाळी होती पाठमोरे ll
चोखा म्हणे याचा न धरी भरवसा । शरण जा सर्वेशा विठोबाशी ॥
शेवटच्या काळात संत चोखोबाराय अत्यंत एकटे पडले होते. त्यातूनच त्यांना अत्यंत करुणपणे मांडणी करणारा हा अभंग स्फुरला आहे. त्यांनी व्यक्त होने हा गुन्हा ठरला होता. त्यातून त्यांना आनखी एकटे पाडणारी परिस्थीती उद्दभवली होती. मंगळवेढ्याला वेशीच्या बांधकामासाठी त्यांना जावे लागले होते. त्यांच्या सर्व आशा, आकांक्षा स्वप्ने धुळीला मिळाली होती. त्यांचे निकटवर्ती संत मंडळ सोडून त्यांना ईच्छा नसतानाही वेठबिगारीच्या कामावर जाणे भाग पडले होते. या त्यांच्या जीवनात उद्धभवलेल्या या परिस्थीतून त्यांना हा अभंग स्फुरला आहे.
शेवटच्या काळात मन मारूण जगणे चोखोबारायांच्या वाट्याला आले होते. एकीकडे बडव्यांची पुरोहीतशाही तर दुसरीकडे वेठबिगारीच्या कामाला बळजबरीने नेनारी बिदरच्या राजाची सरंजामशाही, आशा दोनही व्यवस्थेचे. बळी चोखोबाराय ठरले होते.
आंबेडकरी चळवळीतील विद्वान आणि जेष्ठ लेखक ज. वि. पवार म्हणतात " निम्न जातीत जन्मलेल्या चोख्याने समताधिष्टीत समाजव्यवस्थेची अपेक्षा केल्यामुळे त्यांना भिंतीत चिरडून मारण्यात आले. ज. वि. पवारांसारखे अनेक दिग्गज लेखक चोखोबारायांची हत्याच झाली म्हणतात.फुले शाहु आंबेडकरी चळवळीचे लेखक, संघटक शुध्दोधन आहेर म्हणतात. " म्हणुनच चोखा डोंगा परि भाव नाही डोंगा अशी काळीज पिळवडून टाकणारी आर्त वेदना शब्दबध्द करणारा हा बंडखोर संत मंगळवेढ्याच्या बुरुजात जिवंत गाडला गेला. संत चक्रधरांचे शिष्यत्व पत्करणाऱ्या एका प्रवचनकार चांभाराला , देखील चुनखडीच्या खड्ड्यात बसवून आणि वरून असाहय्य वेदना, यातना देऊन ठार मारण्याची शिक्षा, देवगिरीच्या राजा रामदेवराय याच्या प्रधानाने, हेमाद्री पंडिताने दिली होती..... पुर्वास्पृश्य चोखामेळ्याला जिवंत गाडणे सहज शक्य आहे ! आशा तर्हेने या देशातील शुद्रातिशुद्रांनी आध्यात्मिक मुक्तीदेखील रक्त सांडवूनच मिळविली आहे. "
आशा पध्दतीने चोखोबारायांच्या अंतकाळी कुणीच जवळ नव्हते. यातून मन मारून चोखोबाराय जंगले आणि मेले. संत चोखोबारायांचे वारसदार म्हणुन पंढरपुरात सर्वगोड यांची घरे आहेत. सर्वगोड हे आडनाव पंढरपुर सोडून अख्या महाराष्ट्रात नाही. त्या काळी चोखोबारायांसारख्या अस्पृश्य जातींना आडनावे नव्हती. म्हणून त्याकाळी चोखोबारायांना चोखामेळा एवढेच म्हटले जाई. पुढे सर्व संतांनी त्यांचा 'चोखा चोखट निर्मळ' म्हणून, अभंग लिहुन गौरव केला आहे. चोखोबा भक्ती परंपरेत निर्मळ आहेत. संतांच्या या गोड संबोधनाने चोखोबांच्या नावातील मेळा ( मैला ) जावून चोखोबाराय शुद्ध झाले गोड झाले, असे संतांचे म्हनने होते.संत नामदेवांनी संत चोखोबारायांचे स्मारक बांधुन चोखोबाचा शेवट गोड केला.यातूनही कदाचीत सर्वगोड हे आडनाव पुढे आले असावे. आशाच कुठल्यातरी कारणाने भविष्यात संत चोखोबारायांच्या वारसदारांना' 'सर्वगोड' हे आडनाव मिळाले असावे. सर्वगोड हे अडनाव अत्यंत गौरवशाली आहे. संत चोखोबारायांची परंपरा सांगणारे आहे. "या बाबतीत पंढरपुरतील माजी नगराध्यक्ष सुनिल सर्वगोड म्हणतात
"आजवर सनातनी लोकांनी देव आपल्या हातात ठेवला, संतांना छळले. माझे तर असंही म्हणणं आहे की, सनातन्यांनी चोखोबांना मारले आणि त्यांचा मृत्यू, गावकुस पडुन झाला असं सांगितले. हा अन्याय किती दिवस सहनकरायचा. त्यापेक्षा बाबासाहेबांच्या वाटेने आम्ही चाललो आहोत" या पद्धतीने आंबेडकरी चळवळीतील दिग्गजांच्या भुमीका संत चोखोबारायांची वेस ढकलून किवा 'वेसीत गाडून हत्या केली गेली आशा स्वरूपाच्या आहेत.
येथील उच्चभ्रृ जातवर्गीय व्यवस्था आजुनही संत चोखोबारायांना न्याय दयायला तयार नाही. संत चोखोबारायांची झोपडी आणि त्यांनी स्वता बांधलेली दिपमाळेची जागा बळकावण्यात आली आहे. त्यांची शेवटची निषाणी सुद्धा सांभाळली गेली नाही. आजच्या पुराव्यानुसार मौजे शेगाव, सर्वे नंबर १० येथील ३० बिघ्याचे शेत चोखोबांचं होत." ती जमीन आज घडीला संत चोखोबारायांच्या वारसदारांकडे हवी होती.ती जमीन बळकावली गेली. ती चोखोबारायांच्या वारसदारांकडे नाही. इतर तिर्थक्षत्रांच्या ठिकाणी संत चोखोबारायाचे मंदिरे नाहीत.असेलच एखादे तर तेही उपेक्षीत दुर्लक्षीत आहे. " काही वारकरी म्हणवणाऱ्या काही फडांमध्ये आजही बहुजन जातीतील संतांचे अभंग घेवुन कीर्तन होत नाहीत. महिलांची प्रवचनं होत नाहीत. विठोबा बाटला म्हणून काही मोठमोठे महाराज आजही पंढरपुरच्या विठ्ठलमंदिरात जात नाहीत." ज्या अस्पृश्यतेच्या विरोधात, भेदाभेदाच्या विरोधात चोखोबारायांनी आणि सर्व संतांनी बंड केले ती अस्प्रश्यता,भेदाभेद तशीच चालू आहे.चोखोबारायांना काही न्याय मिळाला नाही.गावखेड्यातील बरेच जन म्हणतात आता कुठे राहिला आहे जातीवाद. आशांनी गावपातळीवर लक्ष ठेवून पहावे गावात ' एक गाव एक पाणवठा झाला पण आजूनही एक गाव एक मसणवाटा' होऊ शकलेला नाही, भेदभाव आजुनही तसाच आहे. त्या काळात संत चोखोबारायांना आपल्या सख्या पांडुरंगाची भेट घेता आली नाही. आणि आजही गाव पातळीवर मातंग, चर्मकारांना पारावर, मंदिरात का आले म्हणून मारले जाते.मंदिराच्या आडोशाला पावसाच्या बचावासाठी उभे असलेल्या परभणी जिल्यातील आंबादास सावणेला मंदिर बाटवले म्हणून जीवे मारले जाते. आजही किर्तनातून वक्ते महाराजांच्या सारखे कीर्तनकार जाहिररित्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची टिंगलटवाळी करतात. म्हणजे संत चोखोबाराय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मानापसून स्विकारायचेच नाहीत असे ठरवूनच टाकले गेले आहे.
जग एवढे पुढे गेले आहे, तरिही भारतीयांनी जुनाट, बुरसटलेल्या संकल्पना काही सोडलेल्या नाहीत. आजुनही आम्ही आजुबाजुच्यांकडे माणुस म्हणुन पहायला तयार नाहीत. आम्ही माणसाला जात, धर्म, वर्गाच्या चष्म्यातून पहातो. कधी बदलणार आपण? किती चोखोबारायांनी हळहळ व्यक्त करत, निकृष्ठ जीवन जगत मरायचे ? आजही भंगी, वडार, घिसडी, पारधी, ढोर, बेलदार, पथरवट यांसारख्या कितीतरी भटक्या विमुक्त जाती अत्यंत हालाखीचे जीवन जगत आहेत.आशा जातीना गावात प्रवेश सुद्धा दिला जात नाही. "कोण्याही जीवाचा न घडो मत्सर" ही संतांनी सांगितलेली शिकवण आपण विसरत चाललेलो आहोत का ?
आपल्या जगण्याचे मुख्य मूल्य माणुसकी असायला हवे.संतांनी माणुसकीच केंद्रबिंदू मानुन शिकवन दिली आहे. मग नेमकी ती माणुसकी तेवढी आपण सोडली आहे का ?
सर्व संत आणि त्या संतांची शिकवण आपल्याला बरोबरीची असावी. आपला परका भेद किमान संतांमध्ये तरी करू नये. ठरवीक सतांनाच प्रसिद्धी आणि संत चोखोबारायांसारखे मात्र उपेक्षीत, हे अन्यायकारक आहे. त्यांची जातीअंताची शिकवण आपण अंगी बाळगावी. जातीभेद अस्पृश्यता, बंद हावी. त्यासाठी आपण काम केले पाहीजेत. कुणाची घृष्णा करणे, द्वेष करणे, हिंगलटवाळी करणे, हिने लेखने हे थांबले पाहिजे. गोरगरीबांत आजुबाला चोखोबारायच वावरत आहेत , असे आपल्याला वाटले पाहीजे. सर्वांना समान बंधूभावाची वागणुक आपण दिली पाहिजे. हीच खरी संत चोखोबारायांना श्रध्दांजली असेल.
प्रस्तूत अभंगात संत चोखोबाराय म्हणतात " माणसाचे जीवन क्षणभंगुर आहे. माणुस कुठल्याही कारणाने ताबडतोब मरू शकतो. जगणे क्षणीक आहे. मृत्यू नग्न सत्य आहे.वास्तव आहे. माणुस जन्माला आल्यापासुन देहाचे भरणपोषण करत असतो. शरीराला सुख मिळावे म्हणून नाना प्रकार माणूस करत असतो. पण जीवनाची निश्चीती कुणाकडेच नाही." संत चोखोबाराय हे सत्य सांगताना म्हणतात
" की माणुस एकटाच येतो आणि एकटाच जातो. हे सदैव आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या वाईट प्रसंगी कुणीही साथ देत नाही अंतकाळी सर्वजन पाठमोरे उभे रहातात. लोक सुखाचे सांगाती असतात. दुख वाटुन घ्यायला कुणी नसते. म्हणुन कशाचाच आणि कुणाचाच भरोसा धुरु नये. देहाचा किंवा नातेवाईकांचा खात्रीशिर विश्वास धरू नये. सर्वांनी विठ्ठलाला शरण जावे."
संत चोखोबाराय वारकरी परंपरेबद्दल म्हणतात की आमचा समतेचा , माणुसकीचा हा प्रवाह आहे.कुनीही या आणि शुद्ध होऊन जा.
खटनट यावे शुद्ध होऊनी जावे l
दवंडी पिटी भावे चोखामेळा ll
नितीन सावंत परभणी
9970744142
मेहुणाराजा दर्शन संत चोखोबाराय लेखमाला २९
मध्ययुगीन भारताच्या पटलावर जातीव्यस्थेने बरबटलेल्या लोकमनावर संत नामदेवांनी समतेचा, एकोप्याचा मळा फुलवायला घेतला होता. लोकांना माणुसकीचा धर्म शिकविने, भेदाभेदाच्या पलीकडे जावून एकात्म बनविणे हे नामदेवांच्या संत चळवळीचा मुख्य गाभा होता.नामदेवांच्या या कार्याचा सहवास संत चोखोबारायांच्या संपूर्ण कुटूंबाला लाभला होता.या संत नामदेवांच्या कार्याची एक शाखा संत निर्मळा आणि संत बंका महाराज हे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील मेहुणाराजा गावी चालवत होते. संत नामदेवांनी महाराष्ट्राच्या बोहर अनेक राज्यात आपल्या कार्याची छाप सोडलेले पुरावे आजही आपल्याला सापडतात. संत नामदेवांच्या शिकवणुकीचा सर्वात मोठा प्रभाव पंजाबवर आणि शिख धर्मावर आहे. संत नामदेवांप्रमाणे चोखोबारायांचा प्रभाव समाज मनावर पडला की नाही? संत चोखोबाराय ज्या भागातून जन्माला आले त्या परिसरातील समाजव्यवस्थने चोखोबारायांना स्विकारले की नाही? त्यांच्या जन्मभुमीत त्यांच्याप्रती लोकांच्या काय धारणा, भुमीका आहेत ? हे समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. सवर्ण नामदेवांना कुठेही वावरणे आपली छाप टाकणे तितकेसे आवघड नाही परंतू अस्पृश्य मानलेल्या चोखोबांच्याप्रती भारतीय समाजमन कसे वागले, हे जगासमोर आले पाहीजे.
म्हणुन एकदा संत चोखोबारायांच्या जन्मभुमीला भेट देण्यासाठी अभ्यास दौराच ठेवला.स्थानिकच्या ग्रामीन लोकांच्या गाठीभेटी घेता येतील, सहज कुठेही थांबून चर्चा करता येईल या हेतूने भोकरदनहुन दोन मोटार सायकलवरून चोखोबारांचे जन्मगाव बघायला आम्ही तिन लोकं निघालो. भोकरदन तालुक्यातील बरंजाळा लोखंडे गावचे अनिल भुतेकर, बाभुळगावचे ह. भ. प. शंकर महाराज राऊत आणि मी, असे आम्ही तिघांनी खेड्यापाड्यांचा रस्ता तुडवीत देऊळगाव राजाहून मेहुणाराज गाठले. देउळगाव राजा ते देऊळगाव मही या दोन छोट्याशा शहरांच्या मधे मेहुणाराजा गावाची कमान रोडवरच लागते. कमानीवर " श्री संत चोखामेळा मेहुणाराजा जन्मस्थान " असे पांढऱ्या अक्षरात रंगवलेले आहे. आम्हाला त्या भागाची माहिती देण्यासाठी देऊळगाव महीचे शिक्षक संतोष नागरे आमच्या आधीच मेहुणराजाला येऊन दाखल झाले होते. आम्ही कमानीतून गावात शिरलो गाव सुरू व्हायच्या आलिकडेच संत चोखोबारायांचे छोटेसे मंदिर आहे. समोर छोटासा सभामंडप आणि रिकामे मैदान आहे. संत चोखोबारायांच्या मंदिराच्या मागेच अगदी लागून निर्मळा नदीचे पात्र आहे.या पात्रात संत बंका महाराज आणि संत निर्मळा महाराज या दोघांच्या समाध्या आहेत.हे दोघे संत चोखोबारायांची बहिण आणि मेहुणे होत.या नदीवर आम्ही जेव्हा पोहंचलो तेव्हा तिथे दशक्रिया विधी चालू होता. स्थानिकच्या बऱ्याच लोकांकडून नवीन माहिती मिळाली. सर्वांशी चर्चा करून आम्ही मुख्य गावाची वेस, महाद्वार पहाण्यासाठी निघालो. हे गाव अत्यंत जुणे असल्याकारणाने या गावाला सर्व बाजूनी अत्यंत सुंदर अशी दगडी तड़बंदी होती. गावकरी अभय जाधव बोलताना म्हनाले की या गावाला पुर्वी १२ दरवाजे होते. आता चार दरवाजे आस्तित्वात आहेत. २०२० - २०२१ साली या गावची लोकसंख्या तिन हजार असावी असा त्यांनी अंदाज व्यक्ता केला. मेहुणाराजा गावची पाहाणी, फोटोग्राफी करून आम्ही सर्वजन संतोष नागरे यांच्या सोबत देऊळगाव महीला प्रा. कमलेश खिल्लारे यांच्याकडे निघालो. प्रा. कमलेश खिल्लारे हे संत चोखोबारायांच्या साहित्याचे अभ्यासक आहेत. संत चोबोबारायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात सरांचा मोठा सहभाग , वाटा आहे. १४ जानेवारीला दरवर्षी मेहुणाराजा गावी चोखोबारायांच्या जन्मोत्सवाला विविध कार्यक्रम असतात.त्यात सरांचे व्याख्याब व मार्गदर्शन असते. सबंध जिल्हाभर संत चोखोबारायांचे आभ्यासक म्हणून खिल्लारे सरांचा नावलौकीक आहे. खिल्लारे सरांच्या घरी गेल्यानंतर सरांनी पुस्तक देऊन छोटासा सत्कार केला. सरांच्या घरीच त्यांनी वाचनालय उभे केले. खिल्लारे सर याच भागात अनाथ , वृद्ध आणि निराधारांसाठी कबिरालय उभे करत आहेत. खिल्लारे सरांनी संत चोखोबारायांच्या संदर्भात बराचवेळ चर्चा केली. दरवर्षी होत असलेल्या चोखामेळा जन्मोत्सवाची माहिती दिली. काही क़िस्से सांगितले.राजकारणी वर्गही आता संत चोखोबारायांच्या जन्मभुमीत रमु लागला आहे. शिवाय वैचारिक , बुद्धीजीवी वर्गातील संत चोखोबारायांच्या बद्दल एक सकारात्मक चर्चा चालु आहे.असे सरांनी सांगितले.
बरिच चर्चा करुन प्रा. कमलेश खिल्लारे यांच्या घरून आम्ही संतोष नागरे यांच्या घरी जेवण करण्यासाठी निघालो. मी अनिल भुलेकर, ह.भ.प. शंकर महाराज राउत आदिंनी संतोष नागरे यांकडे जेवणे केली. भुसुर चर्चा झाली. आणि "आम्ही तिघेजन पुढील प्रवासाला निघालो बुलढाण्याकडे.
भारतात जातीव्यवस्था अस्पृश्यता इतकी टोकाची आहे की ती माणुसकीचे काम करणाऱ्या संतांच्या बाबतीतही पाळली जाते. इतर संतांचा जेवढा जयजयकार झाला किंवा होतो आहे.त्यातुलनेत चोखोबांच्या वाट्याला अवहेलनाच आलेली दिसते आहे.इतर संतांची नावे ठेवुन वारसा जोपासाण्याची परंपरा कायम असताना चोखोबा नाव ठेवने या आजच्या जातीग्रस्त समाजव्यवस्थेला सुट होत नाही. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकोबाराय यांच्या आळंदी , देहू पेक्षा संत चोखोबारायांचे जन्मस्थाळ उपेक्षीत का ठेवले गेले असावे? सर्व संत सारखेच ना? मग मेहुणाराजा गावच्या विकासासाठी २०२० - २०२१ का उजाडावे ? काही अपवाद सोडल्यास महाराष्ट्रभर तुम्हाला कुठेही चोखामेळा चौक , चोखामेळा संकुल,चोखामेळा कॉलेज असे काही दिसनार नाही. जातीग्रस्त समाजमान, जातीग्रस्त राज्यव्यवस्था याला जबाबदार आहे.
एकदा मी संत गोरोबाकाकांच्या जन्मगावी तेरला गेलो होतो.तिथेही संत गोरोबाकाकांच्या मंदिर वजा वाड्याच्या बाहेर , पायरीच्या बाजूलाच छोट्याशा मंदिरात उभी केलेल्या दगडी शेळेच्या स्वरूपात चोखोबा तिष्ठत उभा होता.आपल्या मित्राची भेट घेण्यासाठी.याही चोखोबाच्या मंदिराला रंगरंगोटी नाही.अगदी चोखामेळा मंदिर हे नाव मिटत आलेले आहे.महाराष्ट्रभर हा चोखोबा पायरीलाच उभा केला गेला. खिन्न मनाने मी चोखोबारायांचा निरोप घेतला. माझ्या समोर करुण स्वरूपात आर्त भावनेने गाणारा चोखोबा उभा राहिला.
उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीनl
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दिन ll