Tuesday, 26 November 2019

संत कुर्मादास

वारकरी चळवळीत संतांच्या यादीमध्ये संत कुर्मादास हे सुद्धा एक नाव लोकप्रिय आहे.ज्यांची समाधी सोलापूर जिल्ह्यातील लहुळ या गावी आहे.संत सावता महाराजांच्या आरण या गावाच्या अगदी बाजुला हे संत कुर्मादासांचे समाधी मंदिर आहे.

संत कुर्मादास हे पैठणहुन पंढरपूरला निघाले होते.त्यांना हात आणि पाय नसल्याने ते फरफटत चालत आल्याची एक मिथकीय आख्यायिका आहे.या कुर्मादासांची संत नामदेव संत ज्ञानेश्वरांची एकत्र भेट झाल्याचीही एक कथा प्रचलित आहे.

मुळ मुद्दा असा आहे की हे कुर्मादास जातीने ब्राम्हण असल्याचे सांगितले जाते.त्या पध्दतीने सर्वांनी साहित्य निर्मिती केलेली आहे.महिपतीबुवांच्या भक्ती विजय ग्रंथातही ते ब्राम्हण असल्याचे सांगितले आहे..
पन आम्ही जेव्हा समाधी पाहिली तर ती कबरीच्या स्वरूपात आहे.एवढेच काय तिच्यावर सुफी परंपरेप्रमाणे पांढरी हिरवी चादर चढवली जाते.एरवी सुद्धा त्याच रंगाचा कपडा कबरीवर असतो. मुख्य सणाला त्या कबरीवर मोठी हिरवी चादर चढवतात. पुजाऱ्यांना विचारले तर ते म्हनाले ही जुनीच परंपरा आहे.

जालिंदर कदम नावाचे पुजारी म्हनाले की १९९२ ला बाबरी मशीद पाडल्यानंतर याही परिसरात अनेक कबरी होत्या त्यांची मोडतोड करण्यात आली.

हा भाग आजही अत्यंत निर्जन वस्तीचा आहे.त्यामुळे नासधूस केल्यानंतर त्या दगडांची सुद्धा विलेवाट लावण्यात मोडतोड करनारे यशस्वी झाले.

मग संत कुर्मादास खरच जन्माने ब्राम्हण होते का ?
ब्राम्हण होते तर समाधीवर चादर का ?
विशेष म्हणजे समाधीच का मुर्ती का नाही ?

बाजुच्याच गावी सामधीवर संत सावंता महाराजांची मुर्ती आहे मग येथे का नाही ?

एका सुफी संतांचे सावकाशरित्या पिढीदरपिढीगत ब्राम्हणीकरण चालु आहे..
आणि त्या सुफी संताचे वैचारिक,धार्मिक वारसदार झोपलेले आहेत..

Friday, 1 November 2019

♦ स्त्रीवाद ...

♦ स्त्रीवाद ...

सर्वांच्या आधी तिने उठायचे आणि सर्वांच्या नंतर तिने झोपायचे.कोणी आजारी असेल तर उशाला बसुन राहुन सेवा तर करायचीच शिवाय सर्व घर अवरत रहायचे.आजारी असणाऱ्याचे हगणे मुतने तिने करायचे,सर्वांचे कपडे मनगटे झिजवुन स्वताला मरण येइपर्यंत धुत रहायचे.स्वयंपाक तर तिच्या पाचवीलाच पुजलेला.त्यातल्या त्यात सर्वांची मने सांभाळायची आणि सर्वांच्या अवडीच्या भाज्या रोज करायच्या.त्या बदल्यात आई तु भाज्या छान बनवतेस हे कौतुक सुद्धा नाही. वर्षानुवर्षे जनावरांच्या सारखे पुरूष चरत असतात.पण कौतुक नाही.  स्त्रीयांचे कौतुक म्हणजे महापाप .. आई म्हणून तिचे हे सर्वात मोठे पिडन आहे.कर्तव्याच्या नावाखाली तिची घोर कुचंबणा,दडपनुक आहे.संसार नावाच्या पाट्यावर कर्तव्याच्या वरवंट्याखाली ती सातत्याने चिरडली जातेय.

हल्ली सोप्पा स्त्रीवाद आलाय . गोऱ्यागोमट्या पोरी fb ला दिसल्या की आपला स्त्रीवाद प्रगट करायचा. fb ला बाई दिसली की कुत्र्यागत लाळ गाळायची.तिला मी किती समतावादी आहे हे उगच दाखवायच्या भानगडीत पडायचे..

आणि आपल्या घरतली आई.ती राबनार तशीच.स्त्री ही गणीतातला हातचा आहे.कधीही वापरा.स्त्री हे गृहीतक आहे. हे गृहीतक आपन ग्राह्य धरायचे पण तिने  स्वताला ग्राह्य धरता कामा नये.

एखाद्या अंगणात जावून आवाज द्या. आहे का घरी कुणी. घरात कोणीही पुरुषमंडळी नसेल तर आवाज येतो. " *घरी कोनीही नाही* ".ती स्वताला कोणीच मानत नाही. तिच्या दृष्टीने ती ग्रहीतकात नाही ....

तिने मोठ्याने हासायाचे नाही, तिने चारचौघात बसायचे नाही, तिने निर्णयप्रक्रियेत सहभागी व्हायचे नाही. तिच्या नातेवाईकांकडे जाताना तिने विचारुनच गेले पाहिजे.तिने सर्वात शेवटी जेवायचे,उरलेले शिळे तिच्याच वाट्याला.शिवाय तिने कधीही आजारी पडायचे नाही.सगळ्यांची कामे अडतात ना म्हणून.

आनेक शुर धाडसी सुंदर स्त्रीया बघून नेहमी वाटते की असल्या बावळटाच्या गळ्यात ह्या कशा काय पडल्या असतील. नंतर कळते की कसाई बापाने ही गाय या खाटकाच्या  खुंट्याला बळजबरीने बांधलेली आहे. नवरा निवडीचे स्वातंत्र्य फारच कमी हो.

सर्व चित्रपटे मग हिंदी असोत नाहीतर मराठी असोत.
त्याच्यात स्त्री गुलामीचे चित्रण जाहीररीत्या केलेले दाखवले जाते. नवरा घराबाहेर पडताना तिने घडी घातलेला रुमाल हातात देताना,घरी आल्यावर त्याचा कोट काढुन घेताना, हातात पाणी चहा देताना,जेवन लावताना/ वाढताना, जेवायला त्याची वाट बघताना,असले चित्रने सहजरीत्या केली जातात.यात कुनाचेही ओब्जक्षण नसते.बाई ग्रहीतक आहे ना म्हणून ..

तरिही त्या स्त्रीयांनी स्वताला खुप मल्टिपल बनवून घेतलेले तुम्हाला दिसेल.सिलाई मशिनवर ती शिवतेय, चुलीवर दाळ शिजत घातलीय,लेकरु अंगणात खेळतेय,आणि उन्हाला काहीतरी वाळवत घातलेय .. आशा आनेक घटकांत तिचे लक्ष चौफेर असते.ती  दाळ उतू जावु देत नाही की मुलाला माती खानार नाही यावरही तिचे लक्ष असते .. वाळवत घातलेल्या धान्यावर कुत्रे किंवा जानावर येनार नाही याचीही ती काळजी घेते आणि शिवनकामही चोखपणे चालु असते.हे पुरुषांना एकत्रितपणे जमनार नाही.

मला स्त्रीवादात एक स्त्री खुप भावली ती म्हणजे संत जनाबाई ..
ती म्हनते *स्त्रीजन्म म्हणोनी न व्हावे उदास*

स्त्रीयांचा जन्म मिळाला म्हणून उदास होण्याचे कारण नाही.तर

*डोक्यावरचा पदर कमरेला खोसुन भर बाजारात यायचे,कुनाच्याही बापाला घाबरायचे नाही,कुनाला काय मनगटावर तेल घालून बोंबलायचे असेल बोंबलु द्या .. लोक म्हनतील ही वाया गेलेली बाई आहे.मी तर घोषनाच केलीय मी वेश्या होऊन  विठ्ठलाचे घर निघनार आहे*

स्त्री जीवनात अब्रू महत्वाची असते. आमची जनाबाई ती सुद्धा दावनीला बांधतात.तुम्ही वाया गेलीय काय म्हणतात.मी वैश्याच होतेय,कोण काय म्हननार बोला हाय हिम्मत.

हाच सर्वोच्च स्त्रीवाद आहे.लोकलाज सोडने.पुरुषी नियमावली मोडने ... हाच आमचा स्त्रीवाद....

नितीन सावंत
राष्ट्रीय संसद प्रमुख
मानव मुक्ती मिशन
ntnsawant31gmail.com
9970744142

♦♦♦♦♦♦♦♦♦♦