Thursday, 31 October 2019

एच्छिक #पुरोगामीत्वाची लक्षणे ..

एच्छिक #पुरोगामीत्वाची लक्षणे ....

१)माझ्या घरी मी प्रतिगामीच असेल.... पुरोगामीत्व चौकटीच्या बाहेर .
२)रस्त्यात भेटलात बायको सोबत असेल तर मी प्रतिगामी असेल.
३)शनिवार रवीवार पुरोगामी असेल.
४)माझ्यावर बेतले,आणीबाणी असेल मी संकटात असेल तर मी प्रतिगामी असेल.
५)सत्तांतर झाले तर मी आतून पुरोगामी असेल.बाहेरून प्रतिगामीच !
६)हापिसात,उच्चजातीयांत,श्रीमंत नातेवाईकांत मी मौनधारी #पुरोगामी असेल.
७)निधी मागायला आलात तर मी प्रतिगामी असेल.
८)दुसऱ्याला मोजपट्ट्या लावायला मी पुरोगामी असेल,माझ्या घराला कुटुंबाला मला मोजपट्टी लावली तर मी प्रतिगामी रूप घेइल.
९)मला हवे असलेले नियमच पुरोगामी.म्हणजे मी म्हनेल ते पुरोगामीत्व.जसे विपश्यना पुरोगामी आहे.गांधीला स्विकारा वगैरे.
१०)आधी माझ्या सोइचे कृतीकार्यक्रम आणि मला प्राधन्य दिले तर मी पुरोगामी ...
११) मला स्वतंत्र व्यक्त होऊ द्या,मला स्वतंत्र विचार करु द्या,माझी अभिव्यक्ती हेच पुरोगामीत्व.. ब्राम्हणत्व वगैरे सब झुट .. आड ना विहीर .. घर ना घाट .. मला दोलायमान राहु द्या .. सावरकर बी आंबेडकर बी .... दोन्ही .. मी सगळ्यांचा ...यालाच महत्व द्या हेच #पुरोगामीत्व .... म्हनारे सर्व आले त्यात
१२) एकजन तावातावाने म्हनाला "त्याला एका बाईने कुरवाळले काय मेला पुरोगामी चळवळच सोडुन गेला ..."
१३)आपल्याला जेव्हा त्रास होइल तेव्हाच ती समस्या चर्चेला घ्यायची .. ऐच्छिक पुरोगामीत्वाचे लक्षण ..

आपल्या ओळखीतल्या अशा एखाद्या पुरोगाम्याला आवर्जून मेंशन करा ...

Tuesday, 15 October 2019

♦अण्णाभाऊंच्या संदर्भात केल्या गेलेल्या अफवा आणि वास्तव.

♦अण्णाभाऊंच्या संदर्भात केल्या गेलेल्या अफवा आणि वास्तव.

         नितीन सावंत परभणी
         9970744142
     (सौत्रांतिक मार्क्सवादी अभ्यासक)

        सांप्रत वर्ष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून अनेक ठिकाणी साजरे होत आहे.या जन्मशताद्बी वर्षाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी अनेक चळवळी,पक्ष,संघटणा अण्णाभाऊंचे हे जन्मशताब्दी वर्ष साजरे करत आहेत.याच धर्तीवर अण्णाभाऊवरची डाव्यांची सुटलेली पकड पुन्हा मजबूत करण्यासाठी कॉ.सुबोध मोरे यांचा एक लेख लोकसत्ता या दैनिकात येवून गेला आहे.त्यांचा आनखी एक लेख त्या आधी बार्टीच्या पुस्तकातही आलेला आहे.दोनही लेखांची मांडणी आणि केंद्रबिंदू जवळपास सारखीच आहे.
या दोनही लेखात कॉ.सुबोधजी मोरे यांनी डाव्या चळवळीवर अण्णाभाऊंच्या संदर्भाने घेतले जाणारे आक्षेप खोडण्याचा प्रयत्न केलेला आहे.यात त्यांना लोकांचे आक्षेप अनेक मुद्दे पुरावे देवून खोडता आले असते त्या ऐवजी त्यांनी अण्णाभाऊंच्या जीवन चरित्रात जे घडलेच नाही ते अवास्तव मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसुन येइल.त्यांच्या दोनही लेखातील काही अक्षेपांवर येथे चर्चा करण्याचा माझा मानस आहे.
मोरे आपल्या दैनिक लोकसत्ताच्या लेखात म्हणतात,
" याच राजकारणाचा एक भाग म्हणून, डॉ. आंबेडकरांच्या प्रभावाखालील दलित चळवळीला कमजोर करण्यासाठी आणि मातंग समाजाला त्यातून वेगळे पाडण्यासाठी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी १९७५-७६ सालानंतर अण्णा भाऊंची ‘मातंग समाजाचे नेते’ अशी प्रतिमा पुढे आणण्याचा प्रयत्न केला;"
खरे तर १९७५ - ७६ नंतर  विविध आंबेडकरवादी सामाजिक चळवळींनीच अण्णाभाऊ हे प्रतिक फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीत अंतर्भूत करण्यास सुरुवात केली होती.विविध जात समुहाला आपल्या पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीत आणण्यासाठी नेहमी फुले शाहु आंबेडकर सांगण्या ऐवजी त्याच जातीतले पुरोगामी प्रतिक उभे करण्याचा प्रयत्न कांशीरामजींनी केलेला आहे.या धर्तीवर अण्णाभाऊंच्या गावी त्यांनी अण्णाभाऊंच्या कुटूंबातील सदस्यांना घरही बांधून दिलेले आहे.त्यानंतर स्वता आंबेडकरवादी चळवळींनीच अण्णाभाऊ हे प्रतिक चळवळीत सामावून घेतले,सर्वच महापुरुषांच्या फोटोंच्या रांगेत अण्णाभाऊ दिसायला लागले.यात सुबोध मोरेंना राजकारणाचा भाग कसाकाय दिसतो याचा उलगडा होत नाही.आणि जर अण्णाभाऊ हे प्रतिक मातंग समाजाला वेगळे पाडण्यासाठी आनण्यात आले होते तर सर्वाधिक मातंग समाज अण्णाभाऊंच्या प्रतिकाच्या द्वारेच फुले शाहु आंबेडकरवादी बनला.अनेक मातंगांनी तर बोद्ध धम्माची दिक्षाही घेतली.आंबेडकरांच्या प्रभावाखालील दलीत चळवळीत मातंग आले ते आण्णाभाऊंचे प्रतिक स्विकारुन यामुळे ती निष्प्रभ झाली नाहीच,मात्र डाव्यांच्या हातुन अण्णाभाऊ निसटले हे म्हनता येइल.कारण डाव्यांनी सामाजिक सर्वहरा जातीतील महापुरुषांना प्रतिक बनवायचे नाकारल्यामुळे हे घडले. 
लोकसत्ता दैनिकाच्या लेखात त्यांनी अण्णाभाऊंना घरी सोडले वगैरे जे लिहीलेले आहे अगदी तसेच बार्टीच्या पुस्तकातील लेखातही मोरे म्हणतात,
"कॉ.अण्णाभाऊ गेले त्या वेळेस मी अकरा वर्षाचा होतो.अण्णाभाऊ साठे ज्या गोरेगावातील सिद्धार्थनगर क्रमांक २ मधील गृहनिर्माण वसाहतीत रहात होते."
पुढे कॉ.मोरे यांनी शुद्ध नसलेल्या अण्णाभाऊंना त्या ट्याक्सीवाल्याला रस्ता दाखवत गोरेगातील घरी नेऊन सोडल्याचे विस्ताराने लिहीलेले आहे.यात ते म्हणतात
नंतर टॅक्सीत पुढे बसून मी अण्णाभाऊंच्या घरापर्यंत गेलो व घरातील पुरुष मंडळींना सांगून अण्णाऊंना टॅक्सीवाल्याच्या मदतीने घरात सोडले."
याबद्दल काही प्रश्न निर्माण होतात त्या बद्दल मोरे यांनी स्पष्ट मांडणी करायला हवी.मोरे जेव्हा अण्णाभाऊ यांना घरी सोडायला गेले तेव्हां अण्णाभाऊ यांच्या घरात अनखी कोन कोन पुरुषमंडळी होती ?
          कॉ.सुबोधजी मोरे यांना माझा प्रश्न असा आहे की अण्णाभाऊ यांच्या घरातील ही पुरूष मंडळी कोण ? कारण अण्णाभाऊ यांच्या सोबत त्यांचा मुलगा रहात असे आणि तो नेमका मे महिण्यात गावी गेलेला होता.आणि त्या नंतर त्यांचा मुलगा आणि अण्णाभाऊंचे भाऊ शंकर साठे हे अण्णाभाऊंच्या अंत्यविधीला मृत्यूच्या दुसऱ्यादिवसी पोहंचले.मग मोरे सोडायला गेल्यानंतर अण्णाभाऊंच्या घरी असलेली ही पुरुषमंडळी कोण ?
बार्टीच्या पुस्तकातील दिलेल्या याच लेखात पुढे कॉ.सुबोधजी मोरे म्हणतात
"त्याच काळात गोरेगावला अण्णाभाऊंचे भाऊ शंकर बापू साठे,आण्णाभाऊंची द्वितीय पत्नी जयंताबाई व मुलगी शकुंतला,शांताबाई राहत होत्या."
मोरे आपल्या लेखात शंकर साठे हे गोरेगावला रहात असल्याचे जे  सांगत आहेत हे धादांत खोटे आहे.शंकर साठे हे स्वता माझा भाऊ अण्णाभाऊ या स्वलिखीत ग्रंथात आपण गावी रहात असल्याचे वर्णन करतात.शेवटी अंत्यसंस्काराला सुद्धा ते आणि आण्णाभाऊंचा मुलगा दोघेही सोबत गावाकडून मुंबईला आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.आता खुद्द शंकर भाऊ साठे मी गावी रहात होतो हे आत्मचरित्रपर  निवेदन कथन करत असतील तर मोरेजी खुद्द प्रत्यक्षदर्शी शंकर भाऊ साठेंपेक्षा कोणत्या नव्या पुरावा पध्दतीचा वापर करत आहेत ?
विपर्यास होणारा सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की मोरे हे अण्णाभाऊ गोरेगावातील सिद्धार्थ नगर मधे रहात असल्याची आणि तिथेच ते गेल्याची जी माहिती देत आहेत ती चुकीची आहे.
मोरे जेव्हा ११ वर्षाचे होते तेव्हा चंद्रकुमार नलगे नावाचे लेखक अण्णाभाऊंशी तासंतास चर्चा करत असत,एवढ्या ते म्याच्युअरिटीचे होते.म्हणून त्यांच्या सर्जा नावाच्या पहिल्या कथासंग्रहाला अण्णाभाऊंनी प्रास्तावना दिली आहे.अण्णाभाऊंनी दिलेली ही एकमेव प्रास्तावना आहे.आता एवढे म्याच्युअर्ड चंद्रकुमार नलगे आपल्या लेखात म्हणतात
"मी अण्णाभाऊंना म्हटलं, " तुम्हाला तर मंत्री राजारामबापू पाटलांनी फ्लॅट दिला आहे,असं मी ऐकलं आहे. तुम्ही इथं कसं काय रहाता ?" अण्णाभाऊ म्हनाले , " मी तो नाकारला. कारण माझी माणसं इथं आहेत.ही मोठ्या दिलाची माणसं आहेत. त्यांचे जगणं खर आहे.या जगण्यावर माझा जीव आहे.या जिवंत माणसांना सोडून गेलो तर माझी प्रतिभा अटेल.सुखदुखाशी झोंबाडून जीवनाशी लढा देनारी इथली माणसं मी सोडुन गेलो,तर मी जीवंत रहाणार नाही.माझी लेखणी थंडावून जाईल."
नलगे जे सांगताहेत ते सत्य मानायचे की मोरे यांचा घरी नेऊन सोडलेला प्रसंग सत्य मानायचा ?
प्रा.चंद्रकुमार नलगे सध्याला जीवंत आहेत.ते दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे संस्थापक आहेत.एवढा मोठा माणूस खोटे बोलत आहे का ? किंवा का खोटे बोलत असावा ? निवृत्त प्राध्यापक नलगे यांना कॉल करुन चौकशी केली तर ते म्हणाले अण्णाभाऊ चिराग नगरातील घरीच वारले ते गोरेगावला कधीच रहायला गेलेले नाहीत.अण्णाभाऊंच्या भावकीतले जवळचे विलास साठे हे सध्या पुण्यात रहातात ते सुद्धा म्हणतात की अण्णाभाऊ चिरागनगरलाच वारले.
कॉ.सुबोध मोरे यांना खोटी माहिती देण्याची वेळ का यावी ?
सुबोध मोरे हे अण्णाभाऊ सुव्यवस्थीत जीवन जगत होते, वगैरे ही जी मांडणी करत आहेत ती चुकीची आहे.कारण अण्णाभाऊंनी नलगे यांना पत्र लिहून मुलगा मधुला मदत करण्याचे कळविले आहे.सुव्यवस्थित जीवन जगणारा माणूस मदत मागेल का ?
मग अशी मदत त्यांनी मोरे यांच्याकडे हक्काने मागयला हवी होती.किंवा कम्युनिस्ट पार्टीकडे तरी ही मदत त्यांनी मागायला हवी होती.अण्णाभाऊ तसे का करत नाहीत ? अण्णाभाऊंना पार्टीतील लोकांनी अप्रत्यक्षरित्या वेगळे किंवा एकटे पाडले होते.
शाहीर द.ना.गव्हाणकर यांनी कलापथक मोडल्यानंतर पुन्हा तिच माणसे घेवु कार्यक्रम करणे सुरु केले.म्हणजे तुम्हाला नेमके अण्णाभाऊच नको होते का ? याबद्दल माझे भाऊ अण्णाभाऊ मधे शंकर साठे म्हणतात
"फक्त अण्णाभाऊच त्या पथकात नव्हते.अण्णाभाऊंची गाणी,पोवाडे,छक्कड,लावणी हे सर्व पाहिजे होते.पण त्यांना अण्णाभाऊ नको होते."
मग डाव्यांनी अण्णाभाऊंची उपेक्षा केली हा जो लोक आक्षेप आहे तो खरा नव्हे का ? गव्हाणकर यांनी अण्णाभाऊंना डावलून पुन्हा कला पथक चालवणे म्हणजे अण्णाभाऊंना एकटे पाडणे होय.यातून अण्णाभाऊ मानसिक तनावाखाली गेले.एक माजी अस्पृश्य जातीतून आलेला व्यक्ती आता बुद्धीजीवी म्हणून नावारूपाला येत आहे हे गव्हाणकरांसाख्यांना सहन तर झाले नसावे ना ?
कम्युनिस्ट चळवळीला आर्थिक सर्वहरातून आलेले शेतकरी जातीतलेले कॉ.शरद पाटील बुद्धीजीवी म्हणून चालले नाहीत,आजही चालत नाहीत मग त्यांना सामाजिक सर्वहरातील माजी अस्पृश्य जातीतले अण्णाभाऊ बुद्धीजीवी म्हणुन चालतील का ?
अण्णाभाऊ कम्युनिस्ट होते.त्यांनी वर्गीय साहित्यनिर्मिती केली.त्याचबरोबर ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढे आणि चळवळींच्या अकलनातून जातीअंताच्या भुमीकेपर्यंत आले.त्याद्वारेच त्यांनी बुद्धाची शपत,उपकाराची फेड ह्या कथा लिहील्या.अण्णाभाऊ जसे वर्गीय साहित्य निर्मिती करत होते तसेच त्यांनी जात हे वास्तव दाखवत जातीअंताची भूमिका घेणारी साहित्यनिर्मिती केली,माजी अस्पृश्य व शेतकरी जातींना जोडणारे दुवे बनवणारी भूमिका सुद्धा घेतली.त्यामुळे ते मार्क्सवादी आंबेडकरवादी होते असे म्हणण्यात काहीही चुक नाही वाईट नाही.अण्णाभाऊंवर डाव्या विचारांचा प्रभाव होता हे म्हणण्याला आमचा विरोध नाही.पण ते आंबेडकरवादी सुद्धा होते हे डाव्यांनी मान्य करायला हवे.म्हणून अण्णाभाऊ फक्त मार्क्सवादीच होते.त्यांना कॉम्रेड लावलेच पाहिजेत हा अग्रह कशासाठी ? त्या अग्रहातून मोरेंनी सुद्धा बाहेर येण्याची गरज आहे.
इंग्रजांकडून मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल अण्णाभाऊंची भूमिका कॉ.मोरे यांना समजून घेता आलेली नाही.ही भूमिका कोंबडीचोर कथेतून अगदी स्पष्ट झालेली आहे.त्यामुळे अण्णाभाऊ मिळालेल्या स्वातंत्र्याचे अगदीच समर्थक होते वगैरे हा दावा कोंबडीचोर कथा निकाली काढते. " यह आझादी झुटी है देश जनता भुकी है " हे शब्द नसतील पण भाव आणि केंद्रबिंदू तोच असणारी कथा म्हणजे कोंबडीचोर होय.अण्णाभाऊं बद्दल जनमानसात झालेले प्रबोधन आणि त्यातले आपल्याला न पटलेले मुद्दे खोडण्याच्या नादात अण्णाभाऊंनी  साहित्यातून दिलेले संदेश आणि त्या साहित्याचे अंतरंगच हरवले जानार नाही याची दक्षाता मोरेंसारख्या जुण्या कम्युनिष्टांनी तरी घ्यायला हवी.

अण्णाभाऊ 1958 ला झालेल्या दलित साहित्य संम्मेलनाच्या उद्दघाटनपर भाषणात म्हणतात
" हे जग,ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे."
या विधानातील दलीत शब्द काढून कष्टकरी श्रमकरी हा वर्गीय शब्द प्रचारित करण्यामगे डाव्यांचे काय प्रयोजन होते ? फक्त लढाई वर्गीयच जात्यांतक नको या प्रयोजनातून त्या विधानाला सोइसकररित्या बदलण्यात आलेले आहे.याबद्दल आज डावे स्पष्टीकरण देतील का ?
खरे तर अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या साहित्यातील विविध प्रतिके,दुवे यावर चर्चा व्हायला हवी.तसी न करता कुठलातरी असंयुक्तीक वाद निर्माण करुन चळवळी विस्तारणार आहेत काय ?
सामाजिक सर्वहरा आणि आर्थिक सर्वहरांना जोडणारा सर्वात मोठा दुवा हे अण्णाभाऊ आहेत.त्यांना सर्वच सामाजिक चवळींनी प्रतिक मानने चांगलेच आहे.भाषेची निर्मिती राबनारे करतात.शब्दांची निर्मीती कष्टकरी,श्रमकरी,शेतकरी करतात.ऐतखाऊ किंवा अभिजन नव्हे.आणि अण्णाभाऊ याच भाषेची, शब्दांची नवनिर्मीती करणाऱ्या जात,जमात समुहाला ते आपल्या साहित्याचे नायक बनवतात.स्त्रीयांना त्यांनी नाइका बनवले.भटके विमुक्त,आदिवासी,दलित-अस्पृश्य आणि शेतकरी जातीतले लोक अण्णाभाऊंनी  नायक म्हणून उभे केले.त्यांच्या स्वस्त्तित्वाचा प्रश्न उभा करत त्या नायकांना विद्रोह शिकवीला.म्हणून भाषेची निर्मिती करणाऱ्या सर्वहरांचे (सामाजिक,आर्थिक) साहित्यिक क्षेत्रातील नेतृत्व म्हणून अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस एक ऑगस्ट हाच खरा मराठी भाषा दिन म्हणून साजरा झाला पहिजे.या मागणीला डाव्यांनी स्विकारले पाहिजे.पाठिंबा दिला पाहिजे.अण्णाभाऊंच्याच नावे मराठी भाषा दिन घेतला पाहिजे.
कॉ.शरद पाटील अण्णाभाऊंच्या फकिरा कादंबरी बद्दल म्हणतात.
"अण्णाभाऊंची फकिरा ही महान दृष्टी कादंबरी आहे.ही कांदबरी क्रांतीकारी नेनीवेचा विजय आहे."

( @ लेख आहे तसा वापरा,पोस्ट,शेअर करा )
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

Monday, 14 October 2019

डॉ.अशोक राणा लिखीत शोध आदिमायेचा ग्रंथाचे परीक्षण.

डॉ.अशोक राणा लिखीत शोध आदिमायेचा ग्रंथाचे परीक्षण ....

         नितीन सावंत,परभणी
         9970744142

मानवाने आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टी गूढ आणि कल्पना रम्य पध्दतीने कथांच्याद्वारे एका पुढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रसारित केल्या.अशा सर्व  चमत्कारिक अतिमानवी कथांना 'मिथके' असे म्हणले जाते. या मिथकाना विविध नावे आहेत. कल्पितकथा, मिथ, दिव्यकथा, पवित्रकथा, पुराकथा, दैवतकथा ही मिथकांचीच समानार्थी नावे आहेत. 'मानवी जीवन, त्याचा इतिहास, त्याचा धर्म, त्याचे सांस्कृतिक जीवन इत्यादींचे चित्रण या मिथकामध्ये येत असल्याने ही मिथके किंवा पुराकथा त्या त्या मानवी समूहाचे सांस्कृतिक प्रतिनिधित्व करतात.'
म्हणून या मिथकांकडे डोळेझाक करता येणार नाही किंवा अमानवी, चमत्कारिक आजच्या भाषेत अवैज्ञानिक म्हणून त्या कथांना अदखलपात्र ठरवता येणार नाही. या पुराकथा अलीकडील काळात इतिहासाच्या संशोधनाशास्त्रात महत्त्वाच्या मानल्या जाऊ लागल्याने जगभरात 'मायथॉलॉजी' नावाचे शास्त्र विकसित झाले आहे.या धर्तीवर भारतात देखील अलीकडील काळात मोठे काम झाले आहे. मिथकशास्त्राच्या आधारे सत्य इतिहासाचे धागेदोरे उलगडणाऱ्यांमध्ये धर्मनांद कोसंबी, कॉ.शरद पाटील, इरावती कर्वे, रा.ची.ढेरे, रोमिला थापर, सुकन्या आगाशे आदींची नावे अगक्रमाणे घ्यावी लागतात.
या मिथकशास्त्राला इतिहास संशोधनाच्या, विविध, विधायक अन्वेषण पद्धतीद्वारे विकसित करण्याचे काम कॉ शरद पाटील यांनी केले आहे. याचं धर्तीवर वेद, पुराणे, उपनिषदातील विविध मिथकांचा उलगडा करून, भारताच्या अत्यंत प्राचीन, आर्वाचीन मातृसत्ताक, स्त्रीसत्ताक वारशाची ओळख करून देण्याचे काम गेली 25 ते 30 वर्षापासून डॉ.अशोक राणा करत आहेत.त्यांच्या विविध ग्रंथापैकी मातृसत्ता तथा स्त्रीसत्तेचा वारसा सांगणारा महत्वाचा ग्रंथ म्हणुन  'आदिमाया' चा आवर्जून उल्लेख करावा लागतो. प्राजाक्त प्रकाशनाने प्रकाशित केलेला 26  मातृदेवांचा हा ग्रंथ अतिशय महत्वपूर्ण, प्रेरणादायी इतिहास पुढे ठेवतो.
आपल्या सभेवतालचे संपूर्ण मानवी जीवन विविध संस्कारांनी वेढलेले आहे. हे संस्कार बहुतांश धर्मग्रंथील मिथक कथाचेच आहेत. रामायण, महाभारत या महाकाव्याचा तर समाज मनावर प्रचंड मोठा पगडा आहे. आपण काही शिकलेले  लोक, विज्ञानवादी जरी बनलो असलो तरी आजूबाजूचे लोक जुनेच सणवार, उत्सव करताना दिसतात.या सर्वच सणवार उत्सव तथा मानवी मनावर राज्य करणाऱ्या काल्पनिक कथांचा उलगडा करून वास्तवापर्यंत नेण्याचे काम डॉ अशोक राणा हे आपल्या ग्रंथातून करताना दिसतात.
कॉ शरद पाटील म्हणतात, 'श्रुतिशच्  द्विविधा , वैदिकीच तंत्रिकीच !' म्हणजे श्रुती (एक नाही तर) दोन आहेत, (एक) वैदीकी व (दुसरी) तांत्रिकी, तांत्रिकी म्हणजे स्त्रीसत्तावादी. चातुवर्ण पितृसत्ताक वैदिकीने हिंसक विजय मिळवल्यानंतर तंत्रिकीला नामशेष करण्यात यशस्वी झाल्यानंतर तिने तंत्रिकीला बदनाम केले.
तांत्रिकी श्रुतीचा प्रवाह हा भारतीय भूमिपुत्रांचा आहे. फुलेंच्या भाषेत हा अब्राम्हणी प्रवाह आहे. याला वैदीकी श्रुतीच्या ब्राम्हणी म्हणजे पुरुषवर्चस्ववादी वारसदारांनी अत्यंत निच पातळीवर बदनाम केल्याने भारतीय लोक गुलाम बनले. यात बदनाम केलेल्या तांत्रिकी श्रुतीच्या मातृदेवांना डॉ.अशोक राणा यांनी विस्ताराने उजेडात आणले आहे. आणि त्या मातृदेवतांचा मूळ व खरा इतिहास जगापुढे ठेवला आहे. आजही या तांत्रिकी श्रुतीच्या प्रचारक मातृदेवतामध्ये निऋती, दिती, होलिका अलक्ष्मी, सटवी, माया, पुतना, हिंडीबा आदी मातृदेवता जनमानसात बदनामच आहेत.डॉ अशोक राणा म्हणतात, 'दोन प्रकारच्या संस्कृती मधील संघर्ष भारतात गेल्या पाच हजार वर्षापासून चालूच आहे. त्यापैकी एक आर्य संस्कृती तर दुसरी द्रविड संस्कृती.'
कपटाने जिंकत गेलेल्या आर्य संस्कृतीच्या वरसदारांनी हरवलेल्या द्रविड सांस्कृतिला तिरस्कारनिय ठरवून नेणिवेत दफन केले. तरीही इतक्या नेणिवेच्या दफन भूमीतला इतिहास शब्दांच्या , अदीबंधांच्या उकलीतुन डॉ अशोक राणा आपल्या पुढे ठेवतात. या आदिमाया ग्रंथात त्यांनी जागतिक मातृदेवांचाही आढावा घेऊन, मातृपूजन, भुमिपूजन जगभर होत असल्याचे मांडले आहे.
'बॅबिलोनिया, असिरिया, इजिप्त याही देशात एकेकाळी मातृसत्ताक समाजरचना अस्तित्वात होती.आणि साहजिकच तेथे स्त्री- पुरोहितांना  महत्वाचं स्थान होत.'
एकंदरीत डॉ अशोक राणा यांनी घेतलेला हा जागतिक मातृदेवतांचा आढावा डाव्या, पुरोगामी इत्यादी चळवळीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मानवी विकासाच्या टप्यात मातृसत्ताक तथा स्त्रीसत्ताक समाजव्यवस्था ही जगभरात असल्याने आदिम साम्यवादाची मांडणी करणारे डावे आणि आंबेडकरवादी मात्र याकडे अजूनही दुर्लक्ष करताना दिसतात. एवढेच काय डॉ.अशोक राणा यांनी भारताचा गौरवशाली जो इतिहास आपल्यामुळे ठेवला आहे. या इतिहासाची साधने म्हणून वापरली जाणारी वेद, पुराणे, स्मृती याकडे नकारात्मक भावनेने पाहणाऱ्या चळवळी अजूनही विधायक बदल स्वीकारायला तयार नाहीत.रा.ची.ढेरे सुद्धा म्हणतात.'पुराणे ही धर्मेतिहासाच्या आणि मुख्यतः दैवतशास्त्राच्या अभ्यासात आद्य महत्वाची साधने आहेत याचे भान आमच्या अभ्यासकाना अजूनही घडत नाही, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.'

क्रृरे घोरे म्हणून जिची यज्ञातून हकालपट्टी केली, जिला नरकदेवता म्हणून बदनाम केले गेले त्या निऋतिला 'वैराज' स्त्री राज्याची गणराणी म्हणून कॉ शरद पाटील यांनी उजेडात आणले आहे.त्यानंतर विविध मिथकांत बंद केलेल्या निरुतीला डॉ. अशोक राणा यांनी सुद्धा सखोल संशोधनाद्वारे विधायकरित्या पुढे आणले आहे. विविध नावाद्वारे धर्मग्रंथात, लोकसाहित्यात वावरणारी  निऋती एवढ्या विस्ताराने मांडली ती डॉ अशोक राणा यांनीच. अलक्ष्मी, श्री, षष्टी, सखी, सिरिमा,गजलक्ष्मी, शालभंजिका, असुरलक्ष्मी, जेष्ठा या विविध नावाने विस्तारात गेलेली निऋती डॉ.अशोक राणा यांनी या ग्रंथात मांडली आहे.
ही सर्व नावे, या सर्व मातृका निरूतीचेच विविध रूपे असल्याचे डॉ.अशोक राणा मांडतात. उत्खननात सापडलेल्या शिल्पांच्या, पुराव्यांच्या द्वारे रा.ची. ढेरे यांनी जी लज्जगौरी मांडली आहे ती उर्वशी असल्याची मांडणी स्वीकारण्यात अथार्थता आहे. कारण सुंदर मांड्या असलेली उर्वशी असा अर्थ नावातच ध्वनित होतो. लज्जगौरीची सर्व शिल्पे तशीच आहेत.
अमावष्येच्या संदर्भात जनमानसात पसरवण्यात आलेल्या अफवा आणि अंधश्रध्दा यांचा विचार करता डॉ.अशोक राणा यांनी 'अमावास्या' नावाचे प्रकरण लिहले आहे ते अत्यंत महत्वाचे वाटते. ही अमावास्या का बदनाम झाली तर 'जैनांच्या
कल्पसूत्रानुसार अमावस्या ही स्वतः निऋतीच होती.'
ग्रामीण भागात, लोकबोलीत गाढवावरून शिव्या देण्याचा प्रघात मोठ्या प्रमाणावर दिसून येतो, गाढवावरून धिंड काढणे असो किंवा शिल्पशास्त्रातील गधेगाळ असो, गाढव एवढा बदनाम का तर 'शितला, जेष्ठा आणि निऋती  या तिन्ही अशुभ व विघ्नकार  देवतांशी गाढवाचा संबंध आहे.' वरील रा.ची.ढेरे यांची विधाने निऋती आणि गाढवांचा संबंध स्पष्ट करतात. विधायक उकलाची उन्वेषण पद्धती अवगत नसल्याने रा.ची.ढेरे मात्र निऋतीला अशुभ आणि विघ्नकारच म्हणतात.
म्हणजे ग्रामीण भागात आजही निऋती शिव्यांच्या द्वारे बदनामच आहे.ही निऋती विधायक ऊकली तुन अशोक राणा यांना कशी प्राप्त झाली? डॉ.अशोक राणा यांच्या संशोधनाच्या अन्वेषण पद्धतीत याचे ऊत्तर आहे. रा.ची.ढेरे यांनी मांडलेली निरूती नकारात्मकच राहिली. जोतीराव फुले गणपतीला ढंबुढेऱ्या म्हणतात. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राम-कृष्णाचे कोडे हे पुस्तक हिंदुत्ववाद्यांत नकारात्मक प्रभाव गाजवत आहे. यातून विधायक प्रबोधनाची वाट काढली ती कॉम्रेड शरद पाटील यांनी. याद्वारे डॉ.अशोक राणा यांच्या लिखाणाची मेथोड म्हणजे अब्राम्हणी बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण पद्धती होय. नकारात्मक मांडणी करत जाण्याऐवजी आपली विधायक मूल्ये वाढवत जाणे हा त्यातला महत्वाचा गाभा. या मेथोडद्वारे डॉ.अशोक राणा यांनी संपूर्ण 'आदिमाया' विधायक रीतीने मांडली आहे.
'स्वर्ग हा आकाशातला नसून, तो तिबेटचा भाग आहे.देव म्हणजे गॉड किंवा ईश्वर नसून आर्य टोळ्यातील एका गटाचे नाव होते.दानव,राक्षस,असुर, दैत्य, पिशाच्य, भूत हे वाईट, अक्राळविक्राळ नसून भारतीय भूमिपुत्र अर्थात चांगली माणसे होत.' अशी अत्यंत महत्वाची मांडणी डॉ.अशोक राणा 'आदिमायेत' करतात.
भारतीय स्त्रीयांच्या मनावर सर्वात खोलवर रुजवलेले पौराणिक पात्र म्हणजे सीता होय. पण या पौराणिक साहित्यातील सीता ब्राम्हणी साहित्याने दुय्यम दर्जा देऊन शोषित मांडली. या सीतेबद्दल डॉ.अशोक राणा सीता नावाच्या 18 व्या प्रकरणात जी माहिती देतात ती भारतीय स्त्रीयांना प्रेरणादायी आहे. सीता म्हणजे रामायणाची मुख्य नाईका. मातृसत्ताक-स्त्रीसत्ताक गणव्यवस्थेतून प्रवास करत आलेला अहल्येचा गण मखादेव नावाचा जनक सीतेला पुरुष गणात नांदायला पाठवून आपल्या ताब्यात घेतो. सीतेच्या रूपाने द्विवर्ण व्यवस्था संपवून, रामाच्या रूपाने चातुर्वण्याची स्थापना होते. राम चतुर्वण्याच्या स्थापणेसाठी दक्षिण भारतातली स्त्रीराज्ये  नष्ट करून पुरुषसत्ता स्थापित जातो. या जाचक पुरुषसत्तेला कंटाळून शेवटी सीता यज्ञात उडी घेते या बद्दल कॉ.शरद पाटील म्हणतात, 'महाकवी असत्य बोलला ! भूमीकण्या सीतेने पुरुषोत्तम रामाच्या अंतिम विटंबनेला वैतागून आत्महत्या केली.'
डॉ.अशोक राणा यांनी अगदी संक्षिप्त मांडलेली सीता विस्ताराने  विधायक रित्या मांडली पाहिजे. सीतेचे दुय्यमत्व नाकारून तिचे नायकत्व तिला परत मिळवून दिले पाहिजे. रा. ची. ढेरे यांनी श्री. आनंदनायकी या ग्रंथात शेवटचे प्रकरण सीतेची मांडणी करणारेच लिहले आहे. ते म्हणतात, 'सीतेच्या मिथकांत कारणीभुत झालेली भारतीय स्त्री ची वेदना, सीतेच्या विद्रोही हौतात्म्यातून रामाचा मूल्यविवेक सावरला तर संपू शकेल. हौताम्य स्वीकारणारी 'सत्यक्रिया' आचरून त्या रामायनीय सीतेने युगसापेक्ष शक्तीच्या कक्षेत बसणारा विद्रोह केला आहे.
          डाव्या चळवळीतुन आलेला पाश्चिमात्य स्त्रीवाद असून सामाजिक सर्वहारातील स्त्रीयांचे शोषण, पिंडन समजून घेऊ शकलेला नाही. आपले वर्तन पाश्चिमात्य पद्धतीने मुक्त जगणारे बनवले की आपण स्त्रीवादी बनलो किंवा स्त्रीयांनी बॉबकट करून पुरुषी वर्तन केल्यानेही आपण स्त्रीवादी बनलो असे होत नाही. तर भारतीय स्त्रीवाद हा अत्यंत भिन्न आहे. भारतीय स्त्रीयांची दास्यत्वाची, गुलामीची मुक्ती भारतीय स्त्रीवादानेच होणार आहे. या भारतीय स्त्रीवादाची प्रतीके आणि प्रेरणा उभे करण्याचे काम डॉ. अशोक राणा यांच्या साहित्याच्या रूपाने होणार आहे. भारतीय स्त्रीवादाचा पाया घालण्याचे काम कॉ.शरद पाटील यांच्या नंतर डॉ.अशोक राणा करत आहेत.
आदिमायेतल्या  प्रत्येक मातृदेवता ह्या स्वतंत्र, मित्रता आणि समतेच्या प्रतीक आहेत. या मातृसत्ताक स्त्रीसत्ताक गणराण्यांच्या उकलीतूनच भारतीय स्त्रीवाद सुरू होतो. त्यावर आपले आयुष्य वेचून डॉ.अशोक राणा यांसारखे विद्वान काम करत आहेत हे अत्यंत प्रशंसनीय आहे.
खरे तर अशोक राणा यांचे समग्र साहित्य पुरोगामी तथा डाव्यांनी आपल्या चळवळींचा बेसिक अभ्यासक्रम म्हणून स्वीकारला पाहिजे.आदिमाया तर सांस्कृतिक चळवळ उभी करण्यासाठी दिशादर्शक ग्रंथ ठरणार आहे.यात कुठलीही शंका नाही.
         लोकभावना श्रद्धा, आस्था ह्या प्रबोधनाच्या चळवळी चलवणार्यानी समजावून घेतल्या पाहिजेत .डॉक्टर अशोक राणा यांची मांडणी लोकमानाचा, श्रद्धा, अस्थांचा विचार करते. कठोर मांडणी करून लोक मने दुखावणारे काम त्यांनी कधीही केलेले नाही आणि चिकित्सा तर्क करताना मात्र आस्थेपेक्षही संसोधनाला पुरव्याना महत्व दिलेले आहे. हा आदिमाया ग्रंथ भविष्यात नक्कीच लोकमानाची व साहित्तीकांच्या मांडणीची पकड होईल यात किंतू परंतु बाळगण्याचे कारण नाही
पुराणकथा आणि वास्तवता या ग्रंथात धर्मानंद कोसंबी म्हणतात "भारतीय धार्मिक तत्वज्ञानाची मुळे आदिम समाजव्यवस्थेत आहेत हे मान्य करण्याची आणि आदिम काळातून  टिकून राहिलेल्या श्रद्धांचे अस्तित्वास सामोरे जाण्यास असणारी देशातील भारतीय विचारवंतांची स्वाभाविक नाखुशी ही बहुदा साम्राज्यशाही काळात सहन करावे लागलेल्या आणि अद्यापही तिची स्मृती जिवंत आहे अशा दडपशाहीची सहज प्रतिक्रिया असणे शक्य आहे."

         कोसंबी मंहतात ती विधाने आज तंतोतंत लागू झालेली आहेत. देशभर चाललेला धार्मिक उन्माद,धर्माच्या नावाखाली चाललेल्या दंगली हे पुरोगामी वर्गाने धार्मिक तत्वज्ञानाकडे डोळे झाक केल्याने उदभवले आहे.महत्वाचे म्हणजे  याच धार्मिक तत्वज्ञानाकडे डॉ अशोक राणा वळले आणि त्यांनी कोसंबी ची खंत भरून काढली. त्याबद्दल डॉ.अशोक राणा यांचे अभिनंदन ! त्यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा आणि 'आदिमाया' सर्वांनी अवश्य वाचावी असे वाचकांना नम्र निवेदन...
*********************************

Friday, 11 October 2019

ll सौत्रांतिक मार्क्सवादी राजकीय विश्लेषण ll

ll सौत्रांतिक मार्क्सवादी राजकीय विश्लेषण  ll

          नितीन सावंत परभणी
          9970744142

1) भारतीय सरंजामशाहीने सामाजिक सर्वहरा आर्थात माजीअस्पृश्य जाती व अनुसूचित जमातींच्या जगण्यावर एवढे नियंत्रण मिळविले होते की ते फक्त मरणार नाहीत याची ते निकृष्ट दक्षता घ्यायचे.मग हा वर्ग  निर्णयप्रक्रियेत येने हे महापापी स्वप्न.आज लोकशाही आली पण या लोकशाहीत नवी जातीव्यवस्था,अस्पृश्यता अदृश्य स्वरुपात वावरतेच.या सामाजिक सर्वहरा वर्गातुन पुढे आलेल्या नेतृत्वांना उच्चजातवर्गीय पक्ष पार्ट्या हसण्याचा विषय बनवतात.त्या नेतृत्वाने निर्णयप्रक्रियेत येने त्यांना हास्यास्पद वाटते.या मिश्किल हसण्यात "यांची काय औकात"  हे निर्देश असतात.ही औकात ते जन्मावर आधारलेल्या निकषांवर काढतात.कारण गुणवत्तेत सामाजिक सर्वहरा वर्गच वरचढ ठरताना दिसतो. म्हणून भारतीय राजकारण हे जातीग्रस्त असल्यामुळे उच्चजातवर्गीय नेत्यांवर टिका होताना आरेकारे वगैरे फारसे होत नाही तर माजीअस्पृश्य जाती व अनुसूचित जामातींच्या नेत्यांवर टिका होताना आरेकारे तर होतेच प्रसंगी हल्ले सुद्धा केले जातात.भारतीय राजकारणात तर सामाजिक सर्वहरांच्या नेतृत्वाला जोडे उचलायला लावण्याचे प्रयोग सुद्धा झालेले आहेत.साम्राज्यशाही कंट्रोल करत जाणाऱ्या ब्राम्हो भांडवली राजकारणावर सध्या बनिया भांडवलदार,ब्राम्हणी बुद्धीजीवी तथा उच्चवर्गीय मिरासदार शेतकरी जातींचा कब्जा आहे.ही त्यांची अभेद युती आहे. ती तुमच्या एकाच निवडणूकीत आणि एकाच प्रयोगाने तुटणे असंभव आहे.
*******************************
2)शेतकरी जातीतुन राजकीय क्षेत्रात गेलेले धनदांडगे हे ज्या त्या जातीतले सर्वहरा नसून उच्चभ्रू मिरासदार असल्यामुळे ते शेतकरी जातींचे सच्चे लिडर ठरु शकत नाहीत.म्हणून आपन पहात आहोत की आलीकडील काही वर्षांत शेतकरी जातवर्गीयांची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चाललेली आहे.आणि या उलट शेतकरी जातींचे नेते दिवसेंदिवस प्रचंड श्रीमंत होताना दिसत आहेत.शेतमालाचा भाव ठरवताना,बजेट ठरवताना शेतकऱ्यांचेच नेते मुख्य सूत्रधार असूनही ते शेतकऱ्यांची मातीच करतात.म्हणून शेतकरी जातीत दोन वर्ग बनत असल्याचे चित्र लवकरच क्लिअर होनार आहे.पहिला वर्ग म्हणजे उच्चभ्रू मिरासदार राजकारणी आणि दुसरा म्हणजे आर्थिक सर्वहरा वर्ग.शेतकरी जातींना राजकीय क्षेत्रात आर्थिक सर्वहरांचे नेतृत्व म्हणून पुर्वीचे श्रीमंत असलेले सजातीय पर्याय सोडुन देवून नवे तथा सर्वहराप्रधान पर्याय निवडावे लागतील.आपल्याच सारख्या समान दुख,पिडन असणाऱ्या इतर जातवर्गीयांशी मैत्री करावी लागेल.आणि सामाजिक सर्वहरा वर्गातले बुद्धीजीवी स्विकारावे लागतील.

#आर्थीक_सर्वहरा वर्गीय नेतृत्व स्टार्च केलेल्या कपड्यांतील ग्ल्यामरमधे जगनारे असेल की मातींचे लेने अंगभर लेवून नेतृत्व करनारे असेल ?

ही वेळ शेतकऱ्यांनी आपले नेतृत्व ठरवायची आहे.

शेतकरी जातीतील नेतृत्वात जातवर्गीय स्तरिकरण करुन घेण्यासाठी वाट्टेल ती  तयारी आणि धडपड उपजत आसल्याने त्यांचे लढे तडीस जात नाहीत.. या नेतृत्वाला भांडवली झगमगाटाचे प्रचंड आकर्षण आहे.

या आरिष्ठ्यात आडकलेली शेतकरी चळवळ आणि  राजकारण अंतर्गत जातवर्गीय लढ्याची भेदक रेषा स्पष्ट उभी केल्याशिवाय बाहेर निघु शकत नाही.
*******************************
3) भारतीय सरंजामशाही वर्गीय नसून जातीय असल्याने तरिही वर्गीय भुमीकेतून उभे रहाणाऱ्या डाव्या चळवळींचा जातीग्रस्त राजकारणाने दारुण पराभव केला आहे.यातून जातीअंत झाल्याशिवाय वर्ग बननार नाहीत किंवा जातवर्गीय लढा एकत्रच लढावा लागेल,अशा स्वरुपाच्या बऱ्याच मुद्द्यांवर आलीकडे डाव्या तथा पुरोगामी पक्षांचे एकमत झाल्याचे दिसून येत आहे.तरिही आज जातवर्गस्त्रीदास्यांत ही प्रमुख समस्या असतानाही डाव्या आणि पुरोगामी पक्ष पार्ट्यांना याचा कसा काय विसर पडतो हा महत्वाचा प्रश्न आहे.कारण आज घडीला कुठल्याही पक्षाच्या आजेंड्यावर हा जातवर्गस्त्रीदास्यांताचा गंभीर मुद्दा प्रमुख म्हणून घेतलेला दिसत नाही.फुले-शाहु-आंबेडकरवादी विचारांचे पुरोगामी पक्ष असोत किंवा मार्क्स-लेनीनवादी डावे पक्ष असोत हे सर्वच पक्ष उच्चजातवर्गीय तथा ब्राम्हो भांडवली पक्षीय ढाच्याला कॉपी करताना दिसत आहेत.भव्य मोठे स्टेज लावून माणसांची राजकीय जत्रा भरवण्याची पध्दती सर्वहरांच्यासाठी राजकारण करणाऱ्याना करता येणार नाही.सर्वहरांचे समाजमन राजकीय बनवताना ते लढे,मोर्चे, आंदोलने याद्वारेचे बनवावे लागते.राजकीय मेळावे हे जनतेला काहीच न देण्यासाठी उच्चजातवर्गीय पॅटर्नवर भरवले जातात.यात फक्त आश्वासनांची भाषणे होतात.
ब्राम्हो भांडवली पक्षामध्ये कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्यांना गुणवत्तेच्या आधारे पक्षात नेतृत्व किंवा स्थान मिळत नाही.तर जातीच्या तथा संख्येच्या आधारे जागा,स्थान,चेहरा निर्धारित केला जातो.त्यासाठी त्यांच्या जातीय सेल असतात.जसे दलित सेल,मागासवर्गीय सेल,अल्पसंख्यांक सेल,आदी.अगदी याच पॅटर्नवर पुरोगामी,डाव्या पक्षांमधे जातींच्या सेल नसतील परंतु जातींचे नेते,जातवार प्रतिनिधी म्हणून बसवले जातात.शिवाय ब्यानरवर सुद्धा जातवार महापुरुषांचे फोटो लावले जातात.म्हणजे जात कायम ठेवून हा प्रकार चालु असतो.ज्या पक्षांना प्रतिगामी म्हणून सतत विरोध चालु असतो त्याच पक्षांचे सर्वकाही कॉपी करता करता पुरोगामी पक्ष अगदी घराणेशाही सुद्धा स्विकारताना दिसत आहेत.
पुरोगामी चळवळीतील सर्वहरा तरुण आणि स्त्रीया कितीकाळ पक्षप्रमुखांचा जयजयकार करणार ? कितीकाळ साहेब साहेब करत सिल्फी काढत फिरणार किंवा सतरंज्या उचलनार ?
पुरोगामी किंवा डाव्या पक्षप्रमुखांनी आपल्या पक्षातून किती नवे नेतृत्व तयार केले आहेत ? सर्वहरांच्या चळवळीत बुद्धीजीवी बनण्याची प्रक्रिया चांगली आहे.परंतु राजकीय नेतृत्व न बनु देण्यात पुरोगामी आणि डावे पक्षप्रमुखच जबाबदार राहिलेले आहेत.राजकीय नेतृत्व म्हणून तरुणांना पुढे येण्यापासून प्रतिगामी पक्षाप्रमाणेच पुरोगामी तथा डाव्या पक्षानीही रोखलेले आहे.म्हणजे कार्यकर्त्यांनी कार्यकर्ताच रहावे नेतृत्व करत राजकारणी बनु नये.हा तरुणांचा कोंडमारा देशासाठीही नुकसानदायकच बनला आहे.
********************************
४)भारतीय राजकारणात प्रतिगामी पक्ष पार्ट्यांमध्ये स्त्री अवहेलना,शोषण, पिडण हे तर धर्मसंम्मत आहे.पण पुरोगामी म्हणून नवी व्यवस्था अनुपहाणाऱ्या पक्ष पार्ट्यांमध्ये स्त्रीवादी भूमिका तरी कोनत्या धड आणि चांगल्या आहेत.पुरोगामी पक्षांमधे स्त्रीला स्वताची राजकीय भूमिका आहे का ? तिला स्वताचे मत आहे का ? पुरोगामी तथा डाव्या पक्षांच्या अजेंड्यावर स्त्रीवादी तथा शोषण पिडन थांबवणारे किती मुद्दे आपल्याला ठळक दिसतात ?आपल्या स्टेजवर बाई दिसावी म्हणून बियाण्या पुरत्या एक दोन स्त्रीया स्टेजवर ठेवण्या पलीकडे पुरोगामी पक्ष पुढे जावु शकलेले नाहीत.त्याचे कारण म्हणजे भारतीय पुरोगामी चळवळी पुरुषवर्चस्ववादी एकप्रवाही आहेत.राजकारणात ज्या चार दोन पुरोगामी स्त्रीया पुढे आलेल्या दिसतात त्यांचाही पुरुष करून त्यांना पुढे आनलेले असते.ती बाई नसते एक प्रकारचा गडीच असतो.पुरुषी हावभाव आणि पुरुषी बोली बोलणारी राजकारणी बाई स्त्रीयांना न्याय देवु शकत नाही.
थोडक्यात काय जातीजातींचे कडबोळे उभे करुन त्या त्या जातीचे प्रतिनिधी घेवून एखादवेळा सत्ता येइल पन ती दीर्घकाळ टिकनार नाही.जातीजोडो नव्हे जातीअंत आणि पुरुषवर्चस्ववादी स्त्रीवाद नव्हे तर स्त्रीवादी स्त्रीवाद हवा आहे.तरच भारतीय पुरोगामी राजकारण यशस्वी राहिल.प्रतिगामी आणि पुरोगामी वर्गातील सिमारेषा स्पष्ट उभी राहिली पाहिजे.
पुरोगामी पक्षातील वक्ते,समीक्षक,प्रसिद्धीप्रमुख तथा ट्रोलर यांना प्रतिगामी पक्षांवर टिका करायला काहिच मिळत नसेल तेव्हा ते प्रतिगामी पक्षातील स्त्रीयांना टार्गेट करतात किंवा राजकारणात नसलेल्या राजकारण्यांच्या बायकांनाही लक्ष बनवले जाते.हिन दर्जाची भाषा वापरली जाते.आशा वेळेला पुरोगामी पक्षप्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आपल्याच ट्रोलरला आवरताना दिसत नाहीत.परिणामी आपलेही राजकारण सेम ब्राम्हणी प्रतिगाम्यांप्रमाणेच अन्यायकारक विषमतावादी बनते.
मागच्या निवडणुकांमध्ये विदर्भातील एका चांगल्या राजकारण्याच्या बायकोला त्या गरोदर असतानाचा फोटो सोशलमेडियात फिरवून ट्रोल करण्यात आले होते.असेच विद्यमान मुख्यमंत्र्याची बायको राजकारणात नसूनही त्या टार्गेट झाल्या त्या पुरोगाम्यांकडुनच.नुकतीच एक पुरोगामी समाजसेविका प्रतिगामी पक्षात गेली तेव्हा पुरोगामी पक्षातील ग्राउंडवरील कार्यकर्त्यांनी अत्यंत हिन शब्दात शिव्या वगैरे देवून त्या महिलेला टार्गेट केले.अशी अनेक उदाहरणे देता येतील ज्याद्वारे पुरुषवर्चस्ववादी पुरोगामी राजकारण आपल्याला दिसून येइल.म्हणजे स्त्रीयांना रिअल प्रतिनिधित्व नाही,सक्रिय सहभाग नाही आणि आदबिची वागणुकही नाही.मग कसा काय करणार स्त्रीदास्यांत ?
ग्रामीण महिलेचे भयानक पिडन चालू आहे त्यावर कुठले पक्ष काम करत आहेत ? तिच्या श्रमाला दुय्यम दर्जा व  हिन भाव आहेत. त्यावर कोनत्या पक्षाने गांभीर्याने घ्यायचे ठरवले आहे ?
*******************************
५)भारतीय पुरोगामी तथा डाव्या पक्ष संघटना अजूनही लोकमन क्याच करु शकलेल्या नाहीत.त्यांच्या जीवनात मोठा बदल होइल असा आशावाद सुद्धा ते निर्माण करु शकलेले नाहीत.लोकांना स्वयंस्फुर्त वाटायला हवे की हाच पक्ष का सत्तेत यावा.लोकांनी तनमनधनाने मदत करावी आसा पक्ष अजुनही भारतीय क्रांतीच्या क्षितीजावरही दिसत नाही.त्यासाठी लोकमन जिंकणाऱ्या सामाजिक आणि सांस्कृतिक आघाड्या आधी मजबूत कराव्या लागतात.भारतात धर्मसत्ता राजसत्तेला लगाम घालून हवे तसी चालवते.याला ग्रामसीच्या भाषेत सांस्कृतिक अधिपत्यवाद म्हणतात.पुरोगामी पक्ष संघटनांचा सांस्कृतिक आधिपत्यवाद मजबूत झाल्याशिवाय कुठलीही राजकीय सत्ता येनार नाही.यासाठी पर्यायी सांस्कृतिक राजकारण करण्यासाठी,तेवढा वेळ देण्यासाठी पुरोगामी पक्ष तयार नाहीत.त्यामुळे ब्राम्हणी पक्ष पार्ट्या अजुन मजबूत होताना तुम्हाला दिसत आहेत.हिंदुत्वाची सांस्कृतिक महाआघाडी ज्या प्रतिगाम्यांच्या ताब्यात आहे,त्यांचे सध्यातरी कुनीही काहीही वाकडे करु शकत नाही.हे थांबवण्यासाठी सांस्कृतिक लढाई आधी लढावी लागेल.मग दीर्घकालीन राजसत्तेचा मार्ग मोकळा होइल.विविध जातवर्गीयांना जोडनारे सामाईक दुवे घेवून सांस्कृतिक राजकारणाची सुरुवात होऊ शकते.पन वेळ कुणी द्यायचा ? हल्ली तर पुरोगामी पक्षप्रमुखांनी ठेवलेले बुद्धीजीवी साहेबच कसे सर्वहरांचे अंतिम उद्धारकर्ते असल्याचा भास निर्माण करताना दिसत आहेत.प्रत्येक पुरोगामी पक्षांचा बहुजनवाद स्वजातीकेंद्रित आहे.प्रत्येकाचा साहेब अनअपडेटेड कार्यप्रणाली घेवून राजकीय गणिते मांडत आहे.बुद्धीजीवी म्हणून घेनारे वैचारिक बनलेले कोनत्या साहेबाकडे चाकरी करायला जायचे याच्या तयारीत आहेत.आणि प्रत्येकाचे म्हनने आहे ते प्रतिगामी आहेत आम्हीच तेवढे पुरोगामी.
म्हणजे ब्राम्हणी भांडवली तथा सरंजामी उच्चभ्रू वर्गाची सत्ता घालवून नव्या जातजमातवादी ब्राम्हणी बुद्धीजीवी तथा पुरुषवर्चस्ववाद्यांची सत्ता आनायची आहे.हा नवा rशाहाणपना काही काळ आपल्या सर्वांना करायचा आहे.
*******************************
६)ब्राम्हणी भांडवली राजवटीत तोंडदाबुन लाथाबुक्यांचा मारा चालू असताना गांगरुन गेलाला सर्वहरा नेतृत्व नायकाची वाट पहात आहे . आणि ज्यांनी नेतृत्व करायचे आहे ते ब्राम्हणी भांडवली व्यवस्थेचे दलाल बनून सर्वहरा वर्गाला फसवत आहेत . सामाजिक सर्वहरांतले ब्राम्हणी बुद्धीजीवी आपल्या बुद्धीचा वापर व्याभिचारी वृत्तीने करत आहेत . सोईचे तत्वज्ञान निर्माण करुन त्यांनी क्रांतीस उद्विक्त परिस्थिती रोखून धरलेली आहे . हा ब्राम्हणी बुद्धीजीवी वर्ग साहित्य निर्मीती तर करतच नाही उलट थोडेफार कालाकारी आदाकारी निर्माण केली तर ती व्यवस्थेचे पाय चाटनारी असते .म्हणून व्यवस्था अशांना दरमहा लाखो रुपायांच्या पगारी देते . लोकमनाचा ठाव घेनारा  विद्रोह व्यक्त करनारे नवे बुद्धीजीवी आजुन बनायचे आहेत ..

आर्थिक सर्वहरा वर्गातून उच्चभ्रू मिरासदार शेतकरी तथा बनिया भांडवलदार मस्तपैकी गरिब शेतकऱ्यांचे ढेकनासारखे शोषण करत आहेत . तुम्ही मरनार पन हे तुम्हालाही कळनार नाही .यात आर्थिक सर्वहरा वर्ग बनु घातलेले गरिब शेतकरी मात्र आशेने या पांढऱ्या कपड्यांतील माजलेल्या स्वजातीय राजकारणी वर्गाकडे मुक्तीदाता म्हणून पहात आहेत .पन हा भ्रम आहे . आजुन नवे लिडर , आर्थिक सर्वहरा वर्गांचे मुक्तीदाते बनायचे आहेत ....

सामाजिक सर्वहरा आणि आर्थिक सर्वहरा वर्गबनल्या नंतर दोनही वर्गाचे मुक्तीदाते खरी मैदानी लढाई लढतील ..

सौमावादी मुक्तीदात्यांन्नो वाट पहात आहे सर्वहरा वर्ग त्यांच्या मुक्तीची ... सर्वंकष मुक्तीची .. जातवर्गीयस्त्रीदास्यांताची.
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

Friday, 4 October 2019

♦सामाजिक_चळवळींचे_आकलन♦

♦#सामाजिक_चळवळींचे_आकलन♦

भारतीय इतिहासाला एकामागोमाग एक अशा  गौरवशाली महापुरुष , तत्ववेत्ते , विचारवंतांची परंपरा असतानाही याच भारतात आतिरेकी भक्तवर्ग वेगाने तयार होत असतो. तर्क करा म्हणणाऱ्या , स्वताच्या डोक्याचा वापर करा म्हणणाऱ्या महापुरुषांच्या बाबतीतही पुढे भक्त वर्गाला चिकीत्सा तर्कच चालत नाही . तो स्वताही करत नाही आणि दुसऱ्यालाही करु देत नाही . हे जरा विचित्रच आहे . पन हे सत्य आहे .

आलीकडल्या काळात परिवर्तनवादी चळवळींचेही तसेच होत चालेले आहे. महापुरुष जावून शतके उलटत आलीत, पन त्यांचे विधाने घेवूनच भक्त वर्ग लढत आहे . नवे #संशोधन काडीचेही नाही.आजच्या नव्या समस्यांवर उपाय शोधायला हे जुण्या ग्रंथात डोकावतात . एकमेकांच्या लिहीलेले पुस्तकांवरुन हे समाजव्यवस्थेचे आकलन ठरवतात . आणि मिरवतात . हे सर्व कसे प्रचारकीय थाटत चालू आसते. आजचे प्रबोधन परिवर्तन हे प्रचारकीय थाटाचेच आहे .जे वाळुत मुतले फेस ना पाणी या स्वरुपाचे आहे .

गावगाड्याचे आकलन करनारी फारच कमी पुस्तके चळवळीत सापडतील . जी सापडतील ती ही खेड्यातल्यांना वेडे ठरवनारी . भटाळलेले म्हननारी .

विचार करा तुमची या महिण्याची पगार जरा उशीरा झाली तर तुम्हाला वेडे व्हायची वेळ येते . दोन दोन तिन तीन महिणे पगार नसेल तर संपूर्ण घरात चिडचिडेपणा येतो , भांडणे होतात . मग त्या #शेतकऱ्यांना एवढा सामंजस्यपणा कुठून येतो की सहा सहा महिणे घरात पिक येई पर्यंत तो न कुथता न भांडता निट घर संसार चालवतो . आणि सहा महिण्याला तुमच्या पगारी सारखी पिक येण्याची ग्यारेंटी नसतानाही मटका लावल्याप्रणे मातीत पैसे घालण्याचे धाडस कशाच्या , कुठल्या शक्तीच्या जोरावर शेतकरी करत असतो . त्याला शहरी लोक वेडे म्हणतात . वेडे शेतकरी नाही . पगार न झाल्यावर अस्वस्थ होनारे वेडे .

आता हे गावकी वर्णन , त्या गावगाड्यातील आर्थकारण , एकमेकांचे सामाजिक संबंध हे सर्व अभ्यासून नवी सुत्रे निर्माण करुन चळवळी पुढे नेण्याएवजी परिवर्तनवादी चळवळीत मसिहागिरीसाठी भांडणे लागली आहेत .चार पुस्तके वाचुन पुस्तकी शानपन आलेल्यांना सर्व खेडुतांनी आमचे मार्गदर्शन घ्यावे असे वाटते . पन तुमच्या अभ्यासक्षेत्रात त्या खेडुताचे जीवन सुखकर करणारे काहीच नसते तर तुम्ही काय ढेकळाचे त्यांचे मार्गदाते मुक्तीदाते होनार आहात .
त्यासाठी जमीनीवर राबावे लागते . लोकांत मिसळावे लागते. आसे न करता तुमच्या चळवळींचे आकलन पुतळे चौक आणि आस्मितांपुरतेच रहाते . भिडे गुरुजींनी परकायाप्रवेशाची कला आत्मसात करुन हजारो तरुणांत प्रवेश केला आहे . एकप्रकारचा संघाचा कार्यकर्ता बदलवता येइल पन भिडे गुरुजींचा कार्यकर्ता बदलवणे मुश्किल . परिवर्तनवादी चळवळीत आसे एखादे उदाहरण देता येइल काय ? जमीनीवर राहून लोक जोडून परकायाप्रवेश करुन हजारो तरुण आपल्याकडे खिचनारा आपल्यात कोणी आहे का ? नसेल तर नुसते भिडे गुरुजींना fb / whatsup ला झोडपून हाती काय लागणार ?

गजहब तर तिथे होती की मूठभर मते असणारा शेडुल्ड कास्टचा वर्ग , त्यातले तरुण निवडनुका जवळ यायच्या आधिच आपल्यातल्या ढीगभर नेत्यांची नावे पुढे करून रिअल हिरो कोन हे विचारत आहेत . तुम्ही सगळेजन एकत्र आलात तरी संपूर्ण सत्ता अशक्य .

#परिवर्तनवादी_चळवळींत नास्तिकवाद्यांचा तर फार उत आला आहे . आस्तिक नास्तिकवादाच्या डिव्हायडेशनमधे लाखो आस्तिक स्वताच्याच विरोधी उभे करण्याचे काम शाहाण्या पुरोगाम्यांनी केले आहे . तुम्हाला सत्तेत येण्यासाठी मते हवीत की आख्खा देश #नास्तिक बनवायचा आहे .?? सत्ता हवी आसेल तर आस्तिक स्विकारावे लागतील . सर्वच देशवासीयांना नास्तिक बनवून सत्ता आनायला तुम्हाला पंन्नास वर्षे तरी लावतील .  तुम्ही लोक फुलेंना मानतात ना ? मग ते एकेश्वरवादी होते . ते निर्मीक मानत . सर्व संत एकेश्वरवादी होते . आपल्याला यात काही प्रोब्लेम असण्याचे कारण नाही . पन हे परिवर्तनवाद्यांना सहजासहजी रुचनार नाही . यामुळे स्वताचेच आईबाप आणि कुटुंबीय विरोधात गेलेले सुद्धा चालतील .

आपल्याच जातीतले दलाल आपल्या फसवत आहेत याचे आकलन आजूनही कुठल्याही जातीला आलेले नाही. म्हणून प्रत्येक जातीत उच्चभ्रू वर्गाच्या मांडिला मांडी लावून बसण्यासाठी नवनवे दलाल लॉंच होत आहेत . आणि सर्वहरा ( आर्थिक, सामाजिक ) वर्ग मात्र हा भले करेल का तो भले करेल म्हणून बिचारा डोळे लावून बसला आहे .

आशावेळेला तुम्हाला गरज भासते नव्या आकलनाच्या पद्धतींची . या पद्धती कॉ शरद पाटील यांनी दिलेल्या आहेत. त्याद्वारे आपन टाकलेल्या सापळ्यांत आडकण्यापासुन नक्की वाचू शकतो .

नितीन सावंत परभणी ..
9970744142