Wednesday, 9 February 2022

कीर्तनकार_आणि_अस्पृश्यता

#कीर्तनकार_आणि_अस्पृश्यता ...

                         भारतात संविधान लागु झाल्यानंतर कागदोपत्री अस्पृश्यता संपली .वास्तवातील आणि मनामनातील जातीव्यवस्था,  अस्पृश्यता विधायक प्रबोधनाने अजून संपायची आहे. म्हणजे ती अजुन संपलेली नाही.अस्पृश्यता तर संपली आता कुठे राहायली आहे ?  म्हणू म्हणू ती कुठे,कुठे चव्हाट्यावर येतेच.अस्पृश्यता संपली आशा बोंबा मारुनही दर एक दोन वर्षाला तशा घटना आज २०२२ सालापर्यंत घडणे चालु आहेत.जात वास्तव स्विकारल्याशिवाय तिच्या उपाययोजणांवर काम कसे करता येइल बरे.अजुन शहरी वर्ग आता कुठे राहिला आहे जातीवाद असे म्हणून जात वास्तवाला बगल देत आहे.

                         महाराष्ट्रातील किर्तन परंपरेचा पाया मात्र समता , मित्रता हा आहे.वारकरी परंपरेचा केंद्रबिंदू " कोण्याही जीवाचा न घडो मत्सर " हा आहे.किंवा " सकळांशी येथे आहे आधिकार " हा आहे.

                           सर्वच संतांनी जातीव्यवस्था आणि अस्पृश्यतेला कडाडून आणि प्राणप्रणाने विरोध केला आहे.काही संतांच्या हत्या होण्या मागचे कारण नेमके हेच होते ते जातीव्यवस्था अस्पृश्यता मोडीत काढायला निघाले होते. 

                                 #आजचे_किर्तनकार मात्र नेमके या मुळ उद्देशापासून , वारकरी परंपरेच्या केंद्रबिंदूपासून भरकटलेले आहेत.जिथे कुठे मंदिरातून अस्पृश्य मानलेल्या व्यक्तिला हाकलून लावण्याची घटना घडते तिथे एकही किर्तनकार जावुन अस्पृश्यतेला विरोध करत नाही, की प्रबोधन करत नाही.एकीकडे वारकरी परंपरेत पंढरपूरचा पांडुरंग अस्पृश्य असणाऱ्या संत सोयराबाईचे बाळंतपण करतो.बाळतंपण करणे हे विटाळाचे काम आहे.विठ्ठल दोन प्रकारचे विटाळ धडकावून लावतो.एक म्हणजे अस्पृश्य स्त्रीचे बाळातंपण करुन आणि दुसरे म्हणजे बाळंतपण काय स्त्रीयांनीच करावे का ? तो स्वता ही कृती करुन पितृसत्ताक समाजव्यस्थेला हदरा देतो.विटाळाचे बाळंतपण तो स्वता करतो.विटाळ आणि अस्पृश्यता तो धुडकावून लावतो. या विठ्ठलाच्या कथेबद्दल प्रमाणही आहे की " चोखोबाची बहिण झाला शारंगधर l वहिणी उघडा दार हाका मारी ll " 
                                 एवढेच काय इंद्रदरबारातील नासलेले अमृत शुद्ध करण्याची ताकद संत चोखोबारायांच्या एका दृष्टीत म्हणजे एका नजरेच्या कटाक्षात होती. विठ्ठल संज्जन कसायासोबत मांस विकायला बसतो.अशीही मिथकीय कथा आहे.येथे विठ्ठल आणि एकही संत अस्पृश्यता पाळत नाहीत. अस्पृश्यतेला ते विरोध करतात. 
आजचे कीर्तनकार नेमका हा मुद्दाच का गहाळ करत असावेत बरे ? 
                         #लातूर_जिल्ह्यातील मंदिरात नारळ फोडायला का गेला म्हणून गावाने #बहिष्कार टाकलेल्या माजी अस्पृश्य जातीतल्या कुटुंबाची बाजु घ्यायला बंडातात्या कराडकर आणि त्यांची सनातनी कीर्तनकार मंडळी त्या गावी का जात नसावी बरे ? यांना खरेच वारकरी किंवा कीर्तनकार म्हनावे का ? 

ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर 
9970744142

Thursday, 3 February 2022

♦*राष्ट्रजागृती वारकरी परिषद*♦

♦*राष्ट्रजागृती वारकरी परिषद*♦


            🔸प्रेरणास्थान 🔸

संत नामदेव , संत जनाबाई , संत चोखोबाराय , संत कबीर , संत रविदास,संत मीराबाई, संत नरहरी महाराज , संत सावता महाराज , संत गोरोबाकाका , संत सज्जन कसाई , संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथमहाराज , संत सोपानकाका ,संत एकनाथ महाराज , संत चांदबोधले , संत तुकोबाराय ,संत शेख मुहम्मद महाराज , संत शहामुनी , संत निळोबाराय , संत बहिणाबाई , संत तुकडोजी महाराज , संत गाडगेमहाराज, संत कैकाडी महाराज. आदी . 


             🔸उद्देश :


१)वारकरी सांप्रदायाची सामाजिक विषमता मोडणारी शिकवण आचरणात आणायला शिकविणे .

२)संत नामदेव ते संत तुकोबाराय , संत कबीर ते संत गाडगेमहाराज,  प्रणित सर्व संतांचे तत्वज्ञान जनतेत रुजविने .

३)हिंसा ,अनाचार,व्यसानिधीनता ,यांविरुद्ध सामाजिक प्रेरणा सक्षम करने आणि सामुदायिक कृतीला प्रोत्साहन देने .

४)संकटाच्या कालखंडात ,नैसर्गिक आपत्ती,सामाजिक ताणतणाव,अशा काळात जनतेचे मनोधैर्य टिकवून ठेवणे ,आपत्कालीन परिस्थीतीत स्वप्रेरनेने शांतता  प्रस्थापित करणे .

५)कृषी संस्कृतीची प्रागतिक मुल्ये जनतेपर्यंत पोहंचविने

6)वारकरी सांप्रदायात कार्यरत असनार्या प्रागतिक समाजाला पुढे नेनारे वारकरी, कीर्तनकार,प्रवचनकार , भजनी व टाळकरी संघटीत करणे .

७) किर्तर्ने ,प्रवचने , परिषदा ,प्रकाशने ,संम्मेलने भरवने

८)महिला वारकरी वर्गाला प्रोत्साहीतकरणे व सक्षम बनवने . व त्यांना वारकरी विचारपीठ उपलब्ध करुन देने .

९)सर्वधर्म , तीर्थक्षेत्रेस्थळी अमानवीय ,प्रथा ,अस्पृश्यता ,जातीय विषमता संपुष्टात आणून राज्यघटनेने दिलेल्या मानवी नगरी हक्कांचे रक्षण करणे .

१०)अनिष्ठ,चुकीच्या आणि विषमतामुलक बाबींपासून समाजाचा बचाव करने

११)भजनी , प्रवचनकार, वारकरी, कीर्तनकार यांच्यासाठी आरोग्य , अपघात, वार्धक्य यासाठी उपक्रम राबवने व सामाजिक सुरक्षा देने .

१२)संतपीठाला सामुदाईक चेतनेचे विचारपीठ बनवने . त्यासाठी शिक्षण, संशोधन,पथदर्शक प्रकल्प राबवने व संतपीठाच्या सहकार्याने ते चालवने .

१३)आशाच प्रकारचे कार्यकरनार्या देशाच्या आणि देशाबाहेरील प्रवाहांशी सुसंवाद ठेवने , विचारांचे आदान प्रदान करने .

१४)ग्रंथालये,वस्तुसंग्रहालये , संदर्भग्रंथालये , स्थापित करने , शासनाच्या मदतीने स्वंयप्रेरनेने हे चालवे .

१५)ही वारकरी परिषद मानवमुक्ती मिशनशी सुसंगत उद्दीष्टाने कार्यरत राहिल .


         ♦  ऱचना ♦

   🔸सभासदत्वाच्या अटी 🔸

१)घटना व नियम मान्य पाहिजेत

२)प्रतिज्ञा घेतलेली पाहिजे

३)मुखपत्राचे वर्गणीदार असाले पाहिजे

४)एका जन आघाडीत सक्रिय असले पाहिजे

५)जनतेत सामाजिक,सांस्कृतिक आणि राजकीय भुमीकेत ठाम कार्यरत असले पाहिजेत .

     🔸कृती आराखाडा🔸

१)नामदेव - तुकोबाराय जागृती अभियान दरवर्षी राबवने.

२)वारकरी,कीर्तनकार, टाकळरी ,भजने ,प्रवचनकार भारुडकार , वारकरी गायक यांना पेन्शन लागू करणे .

३)वारकरी तीर्थक्षेत्रे, धर्मस्थळे अशाठिकाणी मदत केंद्रे चालवने .

४)संतपिठा मार्फत वारकरी, भजणी ,प्रवचनकार,कीर्तनकार,भारूडकार ,टाळकरी यांची नोदणी करा ,प्रमाणित करा .

५)नोंदणीकृत वारकऱ्यांना समाजजाजृती अभियानात सहभागी करा .

६)सर्व धार्मिक स्थळांचा निधी सामाजिक उत्थान व विकासासाठी वापरा ,देवस्थान व तिर्थक्षेत्रांच्या निधीमधील अनागोंदी ,भ्रष्टाचार दुर करा आणि कायमस्वरूपी नियंत्रण स्थापीत करा .

७) तीर्थक्षेत्र स्थळावरील छोटे व्यावसाय करनारे आणि उपजीविका करनारे सर्वच यांना किमान सुविधा उपलब्ध करा . नियोजित विकास करा .

८)जिल्हास्तरावर व तीर्थक्षेत्रस्थळी सुसज्ज वारकरी भवन उपलब्ध करा.


 ताई महाराज मंगळवेढेकर                                        प्रदेश कार्याध्यक्षा , महाराष्ट्र राज्य 

+91 93091 87616

ह.भ.प धर्मकीर्ती महाराज परभणीकर. 

संस्थापक अध्यक्ष 

9970744142 


♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️