Monday, 29 June 2020

♦राष्ट्रजागृती वारकरी परिषद संपर्क यादी ....

♦राष्ट्रजागृती वारकरी परिषद महाराष्ट्र प्रदेश

ह.भ.प धर्मकीर्ती परभणीकर (मार्गदर्शक)

1)ह.भ.प शिवाजी महाराज    शिरसगावकर (प्रदेशाध्यक्ष)+919370333975

2)ह.भ.प रविकांत महाराज वसेकर (प्रदेश उपाध्यक्ष)(संत सावता महाराज ह्यांचे वंशज)
+919922569769

4)ह.भ.प गणेश महाराज अंबाजोगाईकर(मराठवाडा विभागीय अध्यक्ष)+917522987949

5)ह.भ.प शंकर महाराज बाभुळगावकर (तालुका अध्यक्ष भोकरदन)+919890831744

6)रामेश्वर महाराज नालेगावकर (राष्ट्रजागृती वारकरी परिषद मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष)
मो 9970204714,7507416148

7)ह.भ.प.निवृत्ती महाराज कांगणे
( जिल्हाध्यक्ष जालना )
मो. 9923760877

8)गजानन ईलग (मंठा तालुका अध्यक्ष,राष्ट्र जागृती वारकरी परिषद ) मो.9763083454

9)ह.भ.प.शिवाजी महाराज चौधरी
(मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष)
9421867840

10)ह.भ.प अजय महाराज दाभाडे (जिल्हाध्यक्ष औरंगाबाद)+918805513757,+919021667591

11)ह.भ.प पवन महाराज खाडे (महानगर अध्यक्ष औरंगाबाद)+917499308083

12)ह.भ.प अजय महाराज वेलदोडे( जिल्हा कार्याध्यक्ष औरंगाबाद)+919307189759

14)ह.भ.प.ताई महाराज मंगळवेढाकर (प्रदेश कार्याध्यक्ष महिला आघाडी)

+919309187616

Sunday, 7 June 2020

काही पुस्तकांची शीर्षके

*शीर्षक* हा आरसा असतो. म्हणजे शीर्षकाने आधी अर्थबोध होतो की नेमका हा काय प्रकार आहे. पत्रकारितलेले शीर्षके गुढ असतात.लोकांनी  ती बातमी वाचावी म्हणून. हिंदी आणि मराठी चित्रपटवाल्यांची प्रतिभा आटल्याने हल्ली त्यांना काय शिर्षके द्यावीत हाच प्रश्न पडलेला आहे. काहीच्या काही नावाची चित्रपटे येत आहेत. काही चित्रपटांत तर शीर्षकाचा आणि आतल्या स्टोरीचा तिळमात्रही संबंध नसतो.

आसो मुद्दा आहे पुस्तकांच्या शिर्षकांचा.लेखक म्हटल्यावर प्रतिभा वगैरे असतेच.आणि ही माणसे जरा हटके आसतात म्हणून मला पुस्तकांच्या शीर्षकाबद्दल नेहमीच कुतुहल राहिले आहे.
एकदा असेच भारी भक्कम वाचनालयात इंट्री माराली. समोर लिहीलेले होते १ते १० क्रमांकाची कपाटे आमदारसाहेबांकडुन. मी मनल हे लोक मात्र आपली प्रसिद्धी करुन घ्यायला पुस्तकांच्या कपाटाच्या काचा पन सोडत नाही. मागे तर एका संडासच्या भिंतीवर आमदार साहेबांचे नाव होते आणि खाली लिहीलेले *साहेबांची कृपा*

आसो पुस्तकांच्या कपाटतल्या त्या ग्रंथांची नावे बघून यानां असाली नावे कशी काय सुचतात हा प्रश्न मला नेहमी पडतो.
एका ऱ्याक मधे
गंगेचे गगन वितळे नावाचा ग्रंथ मोठा दिमाखाने उभा होता. इतका कोरा होता की कुणीही हात लावल्याचे दिसत नव्हते. आता गंगेचे गगण वितळे म्हणजे काय मला तर मेळही लागला नाही. गगन कुठे वितळते का ? किंवा गंगेला पाणी असते गगन कुठे असते काय ?

लेखकाच्या या नाव सुचण्याच्या प्रतिभेला स्याल्युट करुन पुढल्या कपाटात डोकावलो तर शापीत सौंदर्य नावाचा पुस्तोकोबा दिसत होता. सौंदर्यही आणि शापीतही हे ही जरा ऑडच.

मला सर्वात मजेशीर नाव वाटले ते म्हणजे
कुरतडलेला सुर्य.
सुर्याला कुनाची बरे कुरतडायची हिम्मत.पण लेखकोबा मात्र काहीही करु शकतात.महातेजस्वी सुर्यालाही कुरतडायला हे लोक कमी करत नाहीत.असेच मला एका हिंदी चित्रपटाचे नाव आठवले सुरज का सातवा घोडा.

म्हणजे पहिला घोडा नाय, दुसरा नाय,लक्ष कोण्या घोड्यावर तर सातव्या.

याच्या अमर कहाणी ,त्याची अमर कहाणी असल्या अमर कहाण्या तर लै झाल्यात.एका ग्रंथावर नाव होते बापुजांची अमर कहाणी.हे बापुजा कोन होते आपल्याला (आज्ञानाला ) माहिती नाय.

पुढे तर कहरच विनोदी कथा कांदबरीच्या ऱ्याक मधे भारतीय संस्कृती कोष खंड क्रमवार लावलेले होते.

म्हटले अगदी योग्य जागी लावलेत हे खंड आमची संस्कृती हल्ली हसण्याचाच भाग झालीय.म्हणून त्या खंडांची गणना विदोनी साहित्यात केलीय.ही संस्कृती विष्णुच्या बेंबटातून निर्माण झालीय म्हटल्यावर ती विनोदी साहित्यातच येनार ना.

नवनीत इयत्ता ४ थी चे मार्गदर्शक पुस्तक रहस्यमय कांदबरीत लावलेले सापडले.मुळ पुस्तकांचा अभ्यास करावा वाटेना गेला की पळवाट म्हणून नवनितचा अभ्यास करुन पास होण्याचे धवपळीचे मार्ग म्हणजे हे रहस्यमयच म्हटले पाहिजे.

मराठवाडा मुक्ती संग्रामचा लढा च्या साहित्याचा रकाना होता.त्यात एक पुस्तक होते पोटदुखी विसरा.
हा लढा एक पोटदुखी आहे आणि तो विसरा.हा हा हा 

पुन्हा मर्ढेकर नावाचे एक बुक दिसले. तोच तो लेखक कवी लोक कशाला वाचतील बरे.पुन्हा म्हटल्यावर नको रे बाबा असेच म्हनतील लोक.आवारा मसिहा आणि टिळकांचे चरित्र अगदी जवळ जवळ लावलेले होते.या दोनही पुस्तकांचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता.पण मला मात्र टिळक म्हणजेच आवारा मसिहा वाटला.

असो सर्वात हास्यास्पद नाव काय असेल तर खालील पुस्तकाचे शिर्षक होते.मी तर खळखळून हसलो.

क्रांतीसुर्य म्हटले की जोतीराव फुले आठवतात,किंवा बाबासाहेब यांनाही ती उपाधी देता येइल.पण शिर्षक होते
"क्रांतीसुर्य सावरकर"

नितीन सावंत परभणी 

दि.७ जुन २०२० 


Wednesday, 3 June 2020

ll राष्ट्रजागृती वारकरी परिषदेची वैशिष्ट्ये आणि भूमिका ll

ll राष्ट्रजागृती वारकरी परिषदेची वैशिष्ट्ये आणि भूमिका ll

♦ *राष्ट्रजागृती वारकरी परिषद* ♦

🚩प्रेरणास्थान 🚩

संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखोबाराय, संत सोयराबाई, संत निर्मळा, संत बंका महाराज, संत कुर्मादास, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत कबीर, संत रविदास, संत मीराबाई, संत दामाजीपंत, संत नरहरी महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबाकाका, संत सज्जन कसाई, संत शेख मुहम्मद, संत सखुबाई, संत चांगदेव, संत विसोबा खेचर, संत महायोगिनी मुक्ताबाई, संत भानुदास महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकोबाराय, संत शहामुनी, संत लतिफशाह मंगळवेढेकर, संत कान्होपात्रा, संत सेनामहाराज, संत परिसा भागवत, संत बहिणाबाई,संत धन्ना जाट, संत गुरु नानक, संत दादू पिंजारी, संत गोरक्षनाथ, संत मच्छिंद्रनाथ, संत बसवाण्णा, संत चक्रधरस्वामी, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेमहाराज.            

♦उद्देश :
१) कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, ही वारकरी सांप्रदायाची सामाजिक विषमता मोडणारी शिकवण आचरणात आणायला शिकविणे.
२) संत नामदेव, संत तुकोबाराय ते संत तुकडोजी, गाडगेबाबा या सर्व संतांचे तत्वज्ञान जनतेत रुजविणे.
३) हिंसा, अनाचार, व्यसनाधीनता, या विरुद्ध आवाज उठवून सामाजिक प्रेरणा सक्षम करणे आणि सामुदायिक कृतीला प्रोत्साहन देणे.
४) संकटाच्या कालखंडात, नैसर्गिक आपत्ती, सामाजिक ताणतणाव, अशा काळात जनतेचे मनोधैर्य टिकवून ठेवणे, आपत्कालीन परिस्थीतीत स्वप्रेरणेने शांतता प्रस्थापित करणे.
५) कृषी संस्कृतीची प्रागतिक मूल्ये जनतेपर्यंत पोहचविणे.
6) वारकरी सांप्रदायात कार्यरत असणाऱ्या प्रागतिक समाजाला पुढे नेणारे वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी व टाळकरी संघटीत करणे.
७) किर्तने, प्रवचने, परिषदा, प्रकाशने, संम्मेलने भरवणे.
८) महिला वारकरी वर्गाला प्रोत्साहीत करणे व सक्षम बनवणे. त्यांना वारकरी विचारपीठ उपलब्ध करुन देणे. महिला कीर्तनकार, प्रवचनकार बनवणे.
९) सर्वधर्म, तीर्थक्षेत्रेस्थळी अमानवीय, प्रथा, अस्पृश्यता, जातीय विषमता संपुष्टात आणून राज्यघटनेने दिलेल्या मानवी नागरी हक्कांचे रक्षण करणे.
१०) अनिष्ट, चुकीच्या आणि विषमतामूलक बाबींपासून समाजाचा बचाव करणे. भेदाभेद भ्रम अमंगळ हे तत्व समाजात रुजवणे.
११) भजनी, प्रवचनकार, वारकरी, कीर्तनकार यांच्यासाठी आरोग्य, अपघात, वार्धक्य यासाठी उपक्रम राबवणे व सामाजिक सुरक्षा देणे.
१२) संतपीठाला सामुदायिक चेतनेचे विचारपीठ बनवणे. त्यासाठी शिक्षण, संशोधन, पथदर्शक प्रकल्प राबवणे व संतपीठाच्या सहकार्याने ते चालवणे.
१३) अशाच प्रकारचे कार्य करणाऱ्या देशाच्या आणि देशाबाहेरील प्रवाहांशी सुसंवाद ठेवणे, विचारांचे आदान-प्रदान करणे.
१४) ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये, संदर्भग्रंथालये, स्थापित करणे, शासनाच्या मदतीने व स्वंयप्रेरणेने हे चालवणे.
१५) ही राष्ट्रजागृती वारकरी परिषद पूर्णपणे मानवमुक्ती मिशनशी सुसंगत उद्दीष्टाने कार्यरत राहील.        

 ♦ ऱचना :

१) सभासदत्व फिस :५ शे रु वार्षिक.
२) राज्यस्तरीय कार्यकारीणी एक निमंत्रक, पाच सहनिमंत्रक आणि एक खाजिनदार राहील.
३) ही परिषद दर ३ वर्षाला भरेल. जुन्या कार्यकारीण्या बरखास्त होऊन, नवनियुक्त्या होतील.  

🚩सभासदत्वाच्या अटी 🚩

१) घटना व नियम मान्य पाहिजेत.
२) प्रतिज्ञा घेतलेली पाहिजे.
३) मुखपत्राचे वर्गणीदार असले पाहिजे.
४) एका जनआघाडीत सक्रिय असले पाहिजे.
५) जनतेत सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय भूमीकेत ठाम कार्यरत असले पाहिजे.

🚩कृती आराखाडा 🚩

१) संत नामदेव-संत तुकोबाराय जागृती अभियान दरवर्षी राबवा.
२) वारकरी,कीर्तनकार, टाकळरी, भजनी, प्रवचनकार, भारुडकार, वारकरी गायक यांना पेन्शन लागू करा.
३) वारकरी तीर्थक्षेत्रे, धर्मस्थळे अशाठिकाणी मदत केंद्रे चालवा.
४) संतपीठामार्फत वारकरी, भजनी, प्रवचनकार, कीर्तनकार, भारूडकार, टाळकरी यांची नोंदणी करा, प्रमाणित करा.
५) नोंदणीकृत वारकऱ्यांना समाजजागृती अभियानात सहभागी करा.
६) सर्व धार्मिक स्थळांचा निधी सामाजिक उत्थान व विकासासाठी वापरा, देवस्थान व तिर्थक्षेत्रांच्या निधी मधील अनागोंदी, भ्रष्टाचार दूर करा आणि कायमस्वरूपी नियंत्रण स्थापित करा.
७) तीर्थक्षेत्र स्थळावरील छोटे व्यवसाय करणारे आणि उपजीविका करणारे सर्वच यांना किमान सुविधा उपलब्ध करा. नियोजित विकास करा.
८) जिल्हास्तरावर व तीर्थक्षेत्रस्थळी सुसज्ज वारकरी भवन उपलब्ध करा.
९) वारकऱ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ द्या.
१०) प्रत्येक संताच्या जन्मगावाचा विकास करा. रस्ते बांधा आणि भव्य भक्तनिवास उभे करा.
११) शिक्षक मतदारसंघासारखा वारकरी मतदारसंघाची तरतूद करण्यात यावी.
१२) ब्राम्हण पुरोहीतांप्रमाणे वारकऱ्यांना दरमहा मासिक वेतन सुरु करण्यात यावे.
*******************************
on January 04, 2017

ह.भ.प.शिवाजी महाराज  इंगळे सिरसगावकर,
(प्रदेशाध्यक्ष राष्ट्रजागृती वारकरी परिषद)
मो:9370333975 

Monday, 1 June 2020

♦अनादि निर्मळ वेदांचे जे मुळ l

वेदांचे मूळच आमचा पांडुरंग आहे .. 


अनादि निर्मळ वेदांचे जे मुळ l                            परब्रम्ह् सोज्वळ विटेवरी ll                                      कर दोन्ही कटी राहिलासे उभा l                         नीलवर्ण प्रभा फांकतसे ll                               आनंदाचा कंद पाऊले साजिरी l                            चोखा म्हने हरी पंढरीये ll                                                     - संत चोखोबाराय

            प्रस्तुत अभंग संत चोखोबारायांच्या स्वमुखातील अत्यंत गौरवशाली उदगार आहेत.गौरवशाली यासाठी की ब्राम्हणी व्यवस्थेने ज्यांना हिन अस्पृश्य अपवित्र मानले त्या चोखोबारायांनी विठ्ठलाचे वर्णन करणे क्रांतिकारी आणि गौरवशाली आहे.मध्ययुगीन भारतात जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता अत्यंत काटेकोर आणि टोकाची बनली होती.मंदिरांवर देव आणि धर्मावर पूर्णपणे ब्राम्हणांचे नियंत्रण प्रस्थापित झालेले होते. अस्पृश्य जातीत जन्माला आलेल्यांना मंदिराचे दरवाजे बंद होते.त्यांना ज्ञानबंदी होती, शिकायचे नाही , लिहायचे नाही , वाचायचे नाही . एवढेच काय आपल्यापेक्षा उच्चजातीय व्यक्तिला ज्ञानाच्या वक्तव्यात बोलायचे नाही. अस्पृश्यांसाठी जी जी आणि व्हय जी एवढेच.आशा काळात पंढरपूरात संत चोखोबाराय चक्क वेदांच्या पलीकडील भाष्य करतात मोठे क्रांतिकारी आहे हे. पंढरपुरातील बडवे ब्राम्हण चोखोबारायांना हिन अस्पृश्य मानतात.हे बडवे वैदिक व्यवस्थेचे प्रतिनिधी आहेत.जे वेदांना प्रधान प्रमुख मानतात.आशांना अस्पृश्य जातीतून आलेला संत ज्ञानाची अनुभूती देतो आणि म्हनतो

"तुम्ही ज्या वेदांना प्रमाण मानता त्या वेदाचे मुळच आमचा विठ्ठल आहे.तो अनादि अनंतकाळापासुन आहे.अगदी निर्मळ स्वच्छ भेदरहित."

         एका अस्पृश्य संतांचे तत्वज्ञानाच्या पातळीवर प्रतिछावनीला उत्तरे देने फारच धाडसाचे आहे.विठ्ठलाचे मुळ शोधणे आणि वैदिकांच्या आधीचे म्हणून वैदिकांच्या मांडणीला सुरुंग लावने रणनीतीचा भाग आहे.तुम्ही वेद काय सांगता आमचा विठ्ठल त्याच्याही आधिचा आहे.युक्तिवाद करावा तो असा.

पुढे चोखोबाराय म्हणतात

"तो अनादि निर्मळ दोन्ही हात कमरेवर ठेवून विटेवर उभा आहे.आणि त्याच्या तेजाची नीलवर्ण प्रभा सर्वत्र पसरली आहे"

           येथे संत चोखोबाराय पांडुरंगाची प्रभा नीलवर्ण म्हणून मांडतात.ती गौरवर्णीय नाही.गौरवर्ण वैदिकांचा तर नीलवर्ण द्रविडांचा.कृष्ण महादेव खंडोबा निलवर्णीयच.अगदी विठ्ठलही नीलवर्ण प्रभा घेवून सर्वत्र प्रसिध्दीस पावला आहे.

या पध्दतीने वैदिकांच्या असमानतेच्या विषमतेच्या विकृतीला संत चोखोबाराय पर्यायी संस्कृती निर्माण करत होते.

म्हणून ते म्हणतात "आमच्या आनंदाचे उत्सवाचे प्रतिक हा पांडुरंग आहे. हा हरी पांढरीचा आहे.तो इतर ठिकाणचा नव्हे."

              ही मांडणी चोखोबाराय करतात.हे सर्व दुर्लक्षुन कसे चालेल.

अस्पृश्य मानलेल्या व्यक्तीने विठ्ठलाचे मुळ शोधने खऱ्या अर्थाने विठ्ठलाला पवित्र करण्यासारखे आहे ..

चोखोबारायांची वैचारिकता किती ग्रेट होती.            म्हणून आम्ही राष्ट्रजागृती वारकरी परिषदेसाठी लोगोखाली संत चोखोबारायांच्या ह्या अभंगाची ओळ निवडली आहे..

धर्मकीर्ती महाराज परभणीकर               9970744142