Wednesday, 12 September 2018

ll वारकरी चळवळीतील काही महत्वाच्या नोंदी ll

ll वारकरी चळवळीतील काही महत्वाच्या नोंदी ll

१)वारकरी परंपरेत सर्व प्रतिके आणि संकल्पना ठरलेल्या आहेत.काकड्यात गणपतीची आरती होत नाही.वारकरी परंपरेला सरस्वती मान्य नाही. तुकोबाराय म्हणतात.

"चोखा आमचा गणपती l राधाई आमची सरस्वती ll "

पंढरपूरात गेल्यावर आधी चोखोबांच्या समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय विठ्ठलाचे दर्शन पुर्ण होत नाही. म्हणून वारकऱ्यांचा गणपती हे संत चोखोबाराय होत.

२)वासकर सांप्रदायात
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव l म्हनती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ll
हा अभंग घेतला जात नाही.किर्तनकाराने हा अभंग किर्तनासाठी घेतल्यास टाळकरी मंडळी टाळ खाली ठेवतात.कारण या अभंगात तुकोबाराय स्वताला पायाची वहान म्हणतात हा त्यांचा अपमान आहे.हा अभंग प्रक्षिप्त आहे ..

३)वासकर सांप्रदायात रामेश्वर भटाने लिहीलेली तुकोबारायांची आरती घेतली जात नाही.त्या आरतीवर बंदी आहे.कारण तुकोबारायांना यानेच त्रास दिला होता.गाथा बुडवली होती.

४)अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा l माझिया सकळा हरिच्या दासा l हा संत नामदेवांचा अभंग पुर्वी वारकऱ्यांचे पसायदान होते.नंतर ज्ञानदेवांचे पसायदान कधी आले आणि रुजवले गेले पत्ताच लागला नाही. नंतर संत नामदेवरायंचे पसायदान बंद करण्यात आले.

५)एक महत्वाची गोस्ट अशी की संत तुकोबारायांवर संत नामदेवांचा प्रचंड मोठा प्रभाव होता.एवढेच काय तुकोबाराय संत नामदेवरायांना खुप मानायचे, याचा पुरावा म्हणजे नामदेवरायांच्या मुलांची जी नावे होती तिच नावे तुकोबारायांनी आपल्या मुलांची ठेवली होती.

६) तुकोबाराय म्हणतात
नामदेवे केले स्वप्नामाजी जागे l सवे पांडुरंगे येवुनिया ll

तुकोबाराय नामदेवांकडे बोट करतात पण ही जोडी अजरअमर न होऊ देण्यासाठी काकड्यात एक अभंग घुसवाला आणि त्यात तुकोबारायांना बाबाजी सदगुरुने स्वप्नात दिक्षा दिल्याचे ठोकुन दिले गेले.

७)हल्ली तुकोबारायांना स्वतंत्र उभे करण्याची बऱ्याच पुरोगाम्यांची धडपड चालु आहे.पण तुकोबाराय हे नामदेवांच्या साच्यात उभे आहेत.काहींना शिंप्याचा नामा चालत नाही.म्हणुन ते तुकोबा स्वयंभु म्हणून मांडत आहेत.परंतू कीर्तन परंपरा संत नामदेवांनी सुरु करुन दिली.तुकोबाराय त्या परंपरेतीलच .

8)प्राप्त परिस्थीला भिडायचे पळ काढायचा नाही ही संतांची शिकवन.रामदास मात्र लग्न मंडपातून पळाले आणि वर दासबोधात त्यांनी लिहीले आहे की, संसार करावा नेटका l प्रश्न आहे. मग तुम्ही का केला नाही नेटका संसार ? म्हणून संत रामदास वारकरी परंपरेत बसत नाहीत.वारकरी परंपरा "अवघाची संसार सुखाचा करिन" म्हननारी आहे. 

९)ब्राम्हणी पोथ्या पुरांनांनी देव महागडा केला होता आणि त्याद्वारे ते भोळ्या लोकांना लुटत असत.येथे मात्र संतांनी देव स्वस्तात उपलब्ध करुन दिला.कुनाचा तरी देव एवढा स्वस्तात उपलब्ध आसेल काय बरे ? संतांचा देव गोरा कुंभारासोबत चिखल तुडवतो,जनी सोबत दळु लागतो, सावता महाराजांसोबत मळा पिकवितो, चोखोबारायासोबत ढोरे ओढतो,सज्जन कसायासोबत मांस विकु लागतो,कबिराला शेले विनु लागतो.

१०)या देवाला मंत्र नाहीत की श्लोक नाहीत.उलट याला शिव्याही देता येतात ...

जनाई म्हनते
आरे आरे विठ्या l मुळ मायेच्या कारट्या ll
तुझी रांड रंडकी होओ l तुझे मडे बसो ll

११)हे आज जरी आऊटडेटेड झाले असते तरी. मध्ययुगीन भारतात देव आणि धर्माच्या नावे ब्राम्हणकुलोत्पन्न वर्ग जो लुट आणि शोषन करत होता त्यानुसार हे अपडेटेड तत्वज्ञान होते.

१२)पांडुरंग,विठ्ठल,विठोबा,पंढरीनाथ,विठाई,जगजेठी ही पांडुरंगाची संत साहित्यातील नावे.तसेच त्याच्या रुपाचे म्हणजे मुर्तीचे वर्णनही संतांनी करुन ठेवलेली आहेत.सुंदर ते ध्यान उभे विठेवरी पासुन ते कटी कर चरण सम ब्रम्ह उभे पर्यंत अथवा विठेवरी उभा कटेवरी हाथ l सावळा माझा पांढरीनाथ अशी आनेक संतांची विठ्ठल मुर्तीची वर्णने करुन ठेवली आहेत .

१३)संतांनी ही वर्णने केली नसती तर ब्राम्हणांनी विठ्ठल बाजुला करुन तिथे परशुराम उभा केला असता.तरिही विठ्ठल हलवण्याचे अनेक प्रयत्न ब्राम्हणांनी केलेच.पुर्वी संतांनी केलेल्या वर्णनाप्रमाणे विठ्ठल मुर्ती बाहेरच्या अंगणातुन सहज दिसत असे. नंतर बाहेरून विठ्ठल दिसु नये म्हणून आडवी भिंत घालण्याचे कामही ब्राम्हणांनी केले.

एवढेच काय उत्तरेकडून कबिर रविदास व हिंदी भाषिक संतांच्या येणाऱ्या दिंड्या ब्राम्हणांनी बंद केल्या .

१४)वारकरी सांप्रदायात पुर्वीला एकही ब्राम्हण कीर्तनकार नव्हता . ल.रा. पांगारकर आणि वि.का. राजवाडे यांनी चर्चा केली आणि नंतर ब्राम्हण संत निर्माण करण्याचे ठरवले. हल्ली वेदांतचार्य लावनारे ब्राम्हण आणि भटाळलेले याच परंपरेतले आहेत.संत रामदास हा सुद्धा पुर्वी वारकरी सांप्रदायात नव्हता.त्याचा समर्थ सांप्रदाय होता. नंतर ब्राम्हणांनी त्याला घुसवला.

१५)म्हणजे ब्राह्मण कीर्तनकार निर्माण करुन त्यांच्याद्वारे सांप्रदायाचे ब्राम्हणीकरण करण्यात आले. वेद कर्मकांड नाकारणाऱ्या सांप्रदायाचे वैदिकीकरण करण्यात आले . आजही भिडे, चारुदत्त आफळे हे लोक सांप्रदायाचे ब्राम्हणीकरण करत आहेत.

तसे न होऊ देण्याची जबाबदारी आजच्या वारकऱ्यांवर आहे .

१६)सगळ्यात महत्वाचे म्हणजे वारकरी  परंपरेत संस्कृतला चारण्याचे सुद्धा स्थान नाही. सर्व कारभार चालतो तो प्राकृतात म्हणजे मराठीत. लोकभाषेचा वापर केल्याने हा संप्रदाय मातीत आपली मुळं रोऊ शकला . संत एकनाथ महाराज म्हनाले होते संस्कृत ही जर देवापासुन तयार झाली तर मग मराठीची माय काय भुताखाली गेली होती काय ? ( संस्कृत देवाने केली , मग काय प्राकृत भुतापासोनी झाली ? )

१७)येथे प्रत्येक विधी बिना ब्राम्हणाचा असतो . तुकोबाराय म्हनाले होते, "आपली आपन करा सोडवन " म्हणजे आपले भले  आपन करायचे भटजी कशाला पाहिजे ? ,

१८)वेदांना तर खुप सुनावले आहे,संत मंडळींनी . गाढवाच्या पाठीवर ओझे वाहुन नेनारे वेदपाठी आहेत.असे तुकोबाराय म्हणतात.या परंपरेत आत्मा मोक्ष अमान्य आहे . पुनर्जन्म तर नसतोच असे तुकोबाराय म्हणतात .
साखरेचा नव्हे ऊस l आम्हा कैसा गर्भवास ll
बिज भाजोणी केली लाही l
जन्म मरण आम्हासी नाही ll

१९)म्हणजे एकंदरीत हा प्रवाह अब्राम्हणी आहे . वैदिकांची टिंगलटवाळी आणि नवा पर्याय देनारा.

२०)येथे परोपकार हेच खरे पुण्य आहे आणि परपिडा पाप आहे. ब्राम्हण म्हनतो आम्हाला दान द्या पुण्य लागेल. ब्राम्हण निंदा करु नका पाप लागेल . तुकोबाराय म्हणतात असे काही नसते. गरिबांची सेवा करा हेच खरे पुण्य.तुम्हाला इतरांना दुध तुप लोणी नाही देता नाही आले तर किमान ताक तरी द्या l हे ही नाही जमले तर पाणी तरी पाजा. आपल्या सोबत परोपकारच जानार . आपन केलेला परोपकारच आपली किर्ती वाढवेल . उगच शरिराचे लाड कशाला करता .कशाला सुखाच्या मागे धावता .
तुकोबाराय म्हनाले
" कोन आहे सांगा सुखाचा सांगाती ? "

एवढेच की हा सांप्रदाय एकेश्वरवादी आहे त्यांना निरइश्वरवादी बनावने महाकठीण ...

२१)आरती प्रकाराचे जनक संत नामदेव होत . नामदेवांच्या आधी आरती गाईली गेल्याचे वाचनात नाही. वैदिक परंपरेत यज्ञ तर वारकरी परंपरेत नामस्मरण फारतर आरती .

२२)या वारकरी परंपरेत गणपतीला स्थान नाही . म्हणून मंदिरात होणाऱ्या भजनांत, काकडा आरतीच्या अभंगामधे गणपतीची आरती गाईली जात नाही .

२३)दास रामाचा या शब्दांनी गणपतीच्या आरतीचा समारोप होतो . म्हणजे रामदास स्वामीच्या कुठल्यातरी शिष्याने ही आरती अलीकडे लिहीली असावी . गणपतीचे महत्व पेशव्यांनी वाढवले .

२४)तसेच दिंड्यांमधेही सुरुवातीची मुळ तिंडी तुकोबारायांची. त्याच दिंडीत वारकरी मंडळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका नेत असत. नंतर ब्राम्हणांनी वाद घालुन संत ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी वेगळी केली .आज सर्वांत जास्त कव्हरेज ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीला दिले जाते.

२५) संत नामदेव महाराजांनी वैदिकांच्या ब्राम्हणी व्यवस्थेला जेव्हा पर्याय म्हणून विठ्ठल हे प्रतिक स्विकारले तेव्हा त्यांनी त्या विठ्ठलाचे महत्व वाढवनारे अनेक अभंग लिहीले .शाक्त ,शैव,  वैष्णव या सर्वांचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या दारात अनुन उभे केले . गमतीशीर बाब म्हणजे सकाळी काकडा आरतीच्या अभंगात हे सर्व उल्लेख येतात . पहाट झाली आहे आणि पांडुरंग काही उठेना . त्याच्या दर्शनासाठी दारात विष्णुचे वाहान गरुड आणि रामाचे वाहान ( सेवक ) हनुमंत उभा आहे . सभा मंडपापासुन बाहेरच्या महाद्वारापर्यंत दाटी जमली आहे . पुढे ही गर्दी पार वाळवंटापर्यंत म्हणजे चंद्रभागेपर्यंत वाढत जाते . विठ्ठलाला उठवण्यासाठी चौघडे वाजंत्री वाजत आहेत . तरी काही विठ्ठल उठेना . शेवटी त्रिशूळ डमरू वाजवत गिरजेचा कांत म्हणजे महादेव येतो . तोही आपला दाराशी उभा रहातो .पांडुरंग उठेनात म्हणून मग रुखमाईला विनवण्या सुरु होतात .
राही रुखमाबाई तुम्हा येवु द्या दया l शेजे हलवूनी जागे करा देवराया ll
काय मोठेपण आहे या पंढरीच्या राणाचे .. इतके दाराशी जमलेत आणि हा भाव खातोय .

शेवटी

झाले मुक्त द्वार लाभ झालासे रोकडा l विष्णुदास नामा उभा घेवूनी काकडा ll

नामदेवराय आरती करतात . मागे डोळे झाकुन जणी उभी आसते .
हे एवढे महत्व वाढवल्यामुळे इतर पंथ सांप्रदायाकडे जानारा भोळाभक्त वर्ग विठ्ठलाशी एकरुप झाला ..

२६)मग या सांप्रादायात आनेकजन गडेलगुप झाले . म्हणजे सामवले . आलीकडे जन्माला आलेले आनेक साधु संत सुद्धा या सांप्रादायात दिंडीच्या रुपाने पंढरीला जायला लागले . गजानन महाराज सुद्धा शेवटी या सांप्रादायात विलीन झाले . त्यांची शेगावहुन पंढरपूरला दिंडी असते . फक्त स्वामी समर्थ आणि साईबाबा मात्र इतके अखडु आहेत की ते या सांप्रदायाला शरण यायला तयार नाहीत. ते आपली स्वतंत्र ओळख टिकवून आहेत.

२७) ह्या दिंड्यान्मधे आलीकडे आनेक नव्या महाराजांच्या दिंड्यांची भर पडत आहे . भविष्यात आजुन एक दिंडी वाढनार आहे , ती म्हणजे एकदाही किर्तन न केलेल्या  ह.भ.प मनोहरपंत भिडे महाराज सांगलीकर यांचाही दिंडी सोहळा पांढरीकडे निघेल .

ह.भ.प.धर्मकिर्ती महाराज परभणीकर
9970744142

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
कॉपीराईट आपल्याकडेच. मुद्दे चोरु नयेत .
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

Monday, 10 September 2018

ll संत लतिफशाह मंगळवेढेकर ll

कबीर लतिफ मोमीन मुसलमान l
सेना नाव्ही जान विष्णुदास ll
        -संत तुकोबाराय

मंगळवेढा हे शहर सोलापूर जिल्ह्यात येते.मंगळवेढा पंढरपूर पासून अवघ्या 27 km अंतरावर आहे.या मंगळवेढ्यात अनेक संत होऊन गेले त्यामध्ये संत दामाजी पंत,संत चोखामेळा,संत कान्होपात्रा,संत बसवेश्वर,संत मौनी बुवा,संत गैबीबाबा आणि संत लतिफ बुवा होत.या मंगळवेढ्याच्या भूमीत सर्वांत जास्त संत विसावले,वाढले,बहरले आणि तिथेच त्यांनी आपला देह ठेवला. काहीजन जन्माने तिथलेच तर काहीजन बाहेरचे.मंगळवेढा पुर्वीचे मोठे शहर.त्यामुळे तिथे सर्वच धर्म,पंथ,सांप्रदायाची रेलचेल असे.अनेक साधु,संत,मुनी या शहरात येत असत.अगदी असेच लतिफशाह नामक एक संत विजापूरच्या शहरातून मंगळवेढ्याला आले होते.मंगळवेढ्यात आल्यावर ते लिंगायत धर्मीयांच्या मठात थांबले होते.पुढे लिंगायत आचार्यांनी त्यांनी तिथेच रहण्यास अग्रह धरला आणि ते शेवटपर्यंत मंगळवेढ्यातच आपले सामाजिक आध्यात्मिक कार्य करत राहिले.आज मंगळवेढ्यात संत लतिफशाहा यांची समाधी असनारा एक दर्गा आहे.बाजुला लतिफशाहा यांच्या सोबत आलेल्या इतर सहकारी संतांच्याही समाध्या आहेत.लतिफशाहा यांच्याबद्दल सकल संत गाथेत एक अभंग समाविष्ट आहे. म्हणजे हे संत वारकरी सांप्रदायत सर्वानुमते मान्यताप्राप्त आहेत.या मान्यतेचा आनखी एक पुरावा असा की संत तुकोबाराय सुद्धा या संताचा उल्लेख करतात तो असा की,

कबिर लतिफ मोमीन मुसलमान l
सेना नाव्ही जान विष्णुदास ll

म्हणजे संत लतिफशाह हे सुफी संत होते. त्यामुळे त्यांची समाधी दर्ग्याच्या स्वरूपात आहे.ते लिंगायत धर्मातही प्रिय आहेत आणि वारकरी संतांचे तर ते प्राणप्रिय आहेत.इतका एकात्म संत सापडणे मुश्किल.ज्याअर्थी संत तुकोबाराय या संत लतिफशाह यांचा उल्लेख आपल्या अभंगात करतात त्याअर्थी ते संत संत तुकोबारायांच्या आधीचे असण्याचा निकष आपन बांधु शकतो.लतिफशाह यांचे एकूण दोन अभंग पुर्णस्वरुपात तर एक अभंग आर्धा,असे  एकूण ३ अभंग आज आपल्याला उपलब्ध आहेत.रा.चिं.ढेरे यांनी आपल्या मराठी मुसलमान संतकवी या ग्रंथात लतिफशाहा यांच्याबद्दल लिहीताना त्यांचा एक अभंग समाविष्ट केला आहे.तो असा ..

आता पुजा कुठे वाहू l
पहाता देहीच झाला देवु ll
भावे पुजन करिता l
देही देव झाला तत्वतः ll
तोडु गेलो तुळशीपान l
तेथे अवघा मधुसूदन ll
अत्र गंध पुष्प धुप l
अवघे विठ्ठल स्वरूप ll
फल तांदूळ नैवेद्य l
पहाता अवघाची गोविंद ll
म्हने लतीफ ब्रम्हज्ञानी l
अवघा पहाता चक्रपाणी ll

आणि वारकरी धर्माच्या मान्यताप्राप्त सकलसंत गाथेत त्यांचा दुसरा अभंग खालीलप्रामाने सामाविष्ट आहे.

बाजरगीर देख नहीं उपजता नहीं गावदी l
आंखया होके दुनिया आंधी ll
आजब आजब हूं इस तनका l
घडी पहेर खेल है नही गारुडका ll
राजा और रंग एक राह सबकी l
मट्टी हो जाय घडी पलख तनकी ll
कहे लतिबशा गुरु मिल जद हमकू l
संसार झुटा गारुड हो गया तबकू ll

इतका ग्रेट संत आणि ब्राम्हणी व्यवस्थेने त्यांच्याबद्दल कुठलेही साहित्य जतन केले नाही.उलट नष्ट  केले असण्याचीच शक्यता जास्त आहे. तरिही हा संत जीवंत राहिला तो इतर संतांच्या उल्लेखांवरुन. संत लतिफशाह बद्दल मोरोपंत म्हणतात

" ख्यात तुकारामसुत साधुसभा प्राणवल्लभ लतिफा l
हृदयात स्मरा त्यासी असो भागवत भक्त जाती असतीलभा ll "

संत तुकोबाराय यांनी लतीफशाह यांच्या पुष्कळ लिखान केले असावे. म्हणूनच तर मोरोपंत लतिफ यांना तुकारामसुत म्हनत आहेत.दुर्देवाने आज तुकोबाराय यांनी केलेले ते उल्लेख नाहीत.

संत लतिफ यांनी एक हिंदी पदावली लिहीलेली आहे त्यात संत नामदेव यांचा उल्लेख लतिफशाह यांनी पहिला संत म्हणून अग्रभागी केला आहे. याद्वारे वारकरी सांप्रदायाचे पाया रचैता पद हे नामदेवांच्याकडेच जाते.संत लतिफशाह म्हणतात

ऱामनाम नौबत बजाई l
पेहली नौबत  नारद सुंबर ll
दुसरी नामा कबीर सुनाई ll

यात संत ज्ञानेश्वर नाव नाही.संत लतिफशाह यांच्यावर महितीबुवांनी सुद्धा लिखाण केले आहे.सर्व संतांची चरित्रे असनार्या भक्तिविजय ग्रंथात महिपतीबुवांनी लतिफशाह यांना स्थान दिले आहे म्हणजे ते किती उल्लेखनीय व ग्रेट होते हे लक्षात येते.
असो या संताच्या समाधीवर नतमस्तक होण्यास संधी साधून येणे फारच प्रेरणादायी आहे.मंगळवेढा फिरून दाखवताना ह.भ.प योगेश महाराज सिद व ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी या संतांची भेट घालून दिली.दर्ग्याजवळ गेलो असताना बाजुला बसलेल्या मुस्लिम मंडळीना या संताबद्दल विचारले असता त्यांनी आपल्याला काहिच माहिती नसल्याचे कबुल केले.आम्ही म्हनालो हे लतिफशाह संत तुकोबारायांचे प्राणप्रिय संत होते.तेव्हा एक मुस्लिम म्हनाले मी संत तुकाराम यांच्यावर लागलेली टिव्हीवरली संपूर्णपणे सिरिअल पाहिली त्यात हे उल्लेख आले नाहीत.मी म्हनालो ब्राम्हणी मेडिया दाखवत नसतो.एकजन संत लतिफशाह यांचे वारसदार यांना बोलवायला गेले होते.पण ते घरी नसल्याचे कळले.नाहीतर आनखी काही वेगळी माहिती मिळाली असती.संत कबीर ते संत शेख मुहम्मद या क्रांतीकारी संत परंपरेतील हे लतिफबुवा आजच्या ब्राम्होभांडवली जातवर्गीय व्यवस्थेत एक क्रांतिदोस्ती करुन देनारा दुवा ठरो .. 
असो मंगळवेढ्यातील इतर संतांच्या प्रमाणे संत लतिफशहा यांना सुद्धा  आमचा ...
सांप्रदायिक जोहार ..
जय भारत ..

संदर्भ :
१)रा.चिं.ढेरे - मराठी मुसलमान संतकवी.
२) सकळसंत गाथा.
३) तुकाराम गाथा - देहुप्रत
४)प्राचार्य आप्पासाहेब पुजारी - मुलाखत

नितीन सावंत परभणी
मानव मुक्ती मिशन
9970744142

Monday, 3 September 2018

रा.चिं.ढेरे यांचे मराठी मुसलमान संतकवी- एक समिक्षा

चिं.ढेरे यांचे मराठी मुसलमान संतकवी- एक समिक्षा           

   

             नितीन सावंत परभणी

           9970744142


                     भारतीय जात्यांतक क्रांतीसाठी आधुनिक भारतातील ज्या ज्या साहित्तीकांच्या साहित्यसंपदेला अभ्यासल्याशिवाय पुढे जाता येत नाही त्यामधे फुले ,आंबेडकर, अण्णाभाऊ साठे , वि.रा.शिंदे आणि कॉ शरद पाटील होत.कॉ शरद पाटील यांच्या अन्वेषणाच्या द्वारे जी मेथड बनते त्या अब्राम्हणी विधायक बहुप्रवाही एतिहासिक भौतिकवादी मेथडद्वारे आनखी काही साहित्यिक आपल्याला गवसतात,ज्यांच्याशिवाय जात्यांतक क्रांतीसाठी पुढे सरकता येत नाही.त्यामध्ये परात्मतेच्या परमोत्कर्षाचे साहित्य मांडनारे भालचंद्र नेमाडे,लोकदैवतांचे विश्व दाखवनारे रा.चिं.ढेरे आणि मिथकांच्या शास्त्राचा विधायक विकास करुन भारतीय मिथकांचा उलगडा करणारे डॉ अशोक राणा आदी होत.

                             रा.चिं.ढेरे यांचे लिखान हे प्रत्यक्षात स्थळांना भेटी देवून तथा जुने हस्तलिखिते धुंडाळून त्यांचा तौलनिक अभ्यास करणारे राहिलेले आहे.सर्व पंथप्रवाह हताळनारी त्यांची ग्रंथसंपदा आहे.ज्यामध्ये श्रीपर्वताच्या छायेत,लज्जागौरी,श्रीतुळजाभवानी,करवीरवासिनी श्रीमहालक्ष्मी,लोकदैवतांचे विश्व,दत्त सांप्रदायाचा इतिहास, नाथ सांप्रदायाचा इतिहास,भारतीय रंगभूमीच्या शोधात,त्रिविधा,संत लोक आणि अभिजन,लोकसंस्कृतीचे उपासक, इत्यादींचा समावेश त्यांच्या ग्रंथसंपदेत करता येइल.यामध्ये त्यांनी वारकरी,नाथ,महानुभाव,लिंगायत,शाक्त,शैव, या सर्व पंथांवर लिखान केलेले आहे.शिवाय त्यांनी ' मराठी मुसलमान संतकवी' या नावाने सुद्धा उपेक्षित मुस्लिम संतांवर लिखान केल्याचे दिसून येते. 

                            ' मराठी मुसलमान संतकवी '  हा त्यांचा एकूण १६७ पानांचा ग्रंथ.पद्मगंधा प्रकाशनाकडून प्रकाशित झालेले १७० रुपये किमतीचे हे पुस्तक सहजरीत्या कुठेही उपलब्ध होऊ शकेल. हा ग्रंथ ब्राम्हणी व्यवस्थेने उपेक्षित ठेवलेल्या अदखलपात्र व दुर्मीळ मुस्लिम संतांवर प्रकाशझोत टकणारा अमुल्य ठेवा आहे.

मध्ययुगीन काळात भारतीय जातीव्यवस्था संपूर्णपणे विकास पाऊन, तीने ताठर स्वरुप धारण केले होते.संत नामदेवांसारख्या शिंपी जातीत जन्मलेल्या व्यक्तीलाही मंदिरात न येवु देण्याचे आदेश काढले जात होते.यापुढे संत चोखोबा तर जाणूनबुजून अस्पृश्य.आशा काही लिखीत पुराव्यांनुसार याप्रकारच्या हिन, दिन वागणुकीला कंटाळून भारतीय जातीजमाती इस्लामच्या सुफी संतांच्या प्रभावक्षेत्रात येवुन इस्लाम स्विकारत होत्या.यात मुस्लिम झालेले अनेक कुटुंबे मात्र भारतीय सांस्कृतिक नाळ मात्र तोडु शकलेले नव्हते.सुफींच्या प्रभावक्षेत्रातुन एकेश्वरवादी पंथ सांप्रदायाची पायाभरणी या मातीत केव्हाच सुरु झाली होती.संत नामदेवांच्या भक्ती संप्रदायाचे लोण उत्तरेतही पसरले होते.हे भक्ती सांप्रदाय एकेश्वरवादी असल्याने मुस्लीमांच्या उपसना पध्दतींचा अवलंब जसे गैरमुस्लिमही करत असत तसेच अनेक मुस्लिमही गैर मुस्लिमांच्या एकेश्वरवादी भक्ती सांप्रदायाला आपले मानयला लागले होते.याचे पुरावे आजही पहायला मिळतात.आजही अनेक मुस्लिम हे वारकरी, महानुभाव या एकेश्वरवादी सांप्रदायाला जीवेभावे अनुसरतात.

                          याच धर्तीवर मराठी भक्ती सांप्रदातील संतांचा प्रभाव इतका विस्तारत गेला की त्यात अनेक मुस्लिमही संत म्हणून नावलौकीकास पावले.यामधे रा.चिं.ढेरे मुख्य असणाऱ्या शहा मुंतोजी ब्रम्हणी,हुसेन अंबरखान,शेख सुलतान,शेख मुहम्मद,शहा मुनी,लतिफ शाहा,शेख अली मुहम्मद,अविंध आणि गोविंद आदी मुस्लिम संतांची चरित्रे या पुस्तकात देतात.

हे सर्व लिखान करताना रा.चिं.ढेरे यांनी भरपूर कष्ट घेतल्याचे दिसते. त्यांनी जुने बाढे ,कागदपत्रे आणि बऱ्याच धर्मग्रंथ व पोथ्यांचा धुंडाळा घेतल्याचा दिसतो. काही चरित्रांत त्यांनी एकाच पोथीच्या आधारे मुस्लिम संतकवी साकारलेला दिसतो.यामधे रा.चिं.ढेरे मात्र एकदाही मिथकांचा उलगडा वगैरे करत नाहीत. काल्पनिकता व अवास्तविक भागही ते चर्चेला घेतात आणि संतकवींचे चरित्र साकारत जातात.रा.चिं ढेरे यांना मिथकशास्त्र माहिती नव्हते असे म्हनता येनार नाही.परंतू त्यांनी मिथकांचा उलगडा का केलेला नसावा हे सांगणे कठीण.त्यांची मांडणी कधी कधी विज्ञाननिष्ठा सोडुन भौतिकवादापासून दुर जाते.म्हणजे आचानक हृदयपरिवर्तन झाल्याच्या किंवा साक्षात्कार झाल्याच्या घटना त्यांच्या साहित्यात अनेकदा जशास तशा येतात.याद्वारे ते पुर्वीचे भौतिक प्रभावक्षेत्र विचारात घेत नाहीत.या ग्रंथात रा.चिं.ढेरे यांची ब्राम्हणी नेनीव सुद्धा कुठे कुठे उफाळून आलेली आपल्याला दिसेल.त्यांनी मुसलमान मराठी संतकवी हा ग्रंथ जरी महाराष्ट्राला दिला असला तरी महाराष्ट्रात सुफींनी येने आणि धर्मप्रसार करणे त्यांच्या ब्राम्हणी बुद्धीला मान्य नाही. मग अस्पृश्यांनी उद्धारासाठी ब्राम्हणांच्या दारात किती पिढ्या घालवायच्या होत्याका ? हा प्रश्न राचिंढेरेना ते जिवंत असताना कुणीतरी विचारायला हवा होता. या ग्रंथात ते एकांगी मांडणी करतात ती अशी की,

१)सर्व मुस्लिम संत हे मुस्लिम नसलेल्या अवैदिक संतांच्या प्रभावक्षेत्रातुन तयार झालेले होते.

२)सर्वच मुस्लिम कवी,संतांना ते स्वता मुस्लिम असल्याचा पश्चात्ताप होता आणि मग त्यांनी या अब्राम्हणी,अवैदिक प्रवाहाला आपलेसे केले.यासाठी रा.चिं.ढेरे मुस्लिम संतांनी ते मुस्लिम असल्याचा खेद व्यक्त केलेले पुरावेही देतात.

                     परंतू ही मांडणी नकारात्मक एकप्रवाही आहे. खरेतर भारतीय संतचळवळ सुफींच्या प्रभावक्षेत्रातुनही बहरली आहे.जे सुफी संत होते त्यांना कधीही ते मुस्लिम असल्याचा प्रश्चाताप झाला नाही की खेद वाटला नाही.किंवा हिंदू संतांना देखिल मुस्लिम संत , सुफी कधीही बला किंवा महाराष्ट्राला लागलेली पिडा वाटले नाहीत. अनेक  मुस्लिम संतांनी आणि सुफींनी इस्लामात घुसलेल्या अनाचारावर टिका केली असेल पण इस्लाम आमच्यासाठी नर्क आहे अशी खेदजनक विधाने त्यांनी केलेली नाहीत.रा.चिं. अशी मांडणी करतात की जनु काय ते नरकात अडकले होते, आणि मग महाराष्ट्रातील हिंदूंच्या संपर्कामुळे त्यांचा आत्मोद्धार झाला.उलट सुफी आणि इस्लाम आल्यामुळे भटके विमुक्त , काही प्रमाणात आदिवासी व संपूर्ण अस्पृश्यांसाठी मुक्तीमार्ग निर्माण झाला होता. 

                     जनार्धन स्वामींचे गुरु चांदबोधले हे कादरी परंपरेतील सुफी प्रचारक आहेत.त्यांचे नाव सय्यद चांदसाहेब कादरी उर्फ चांद बोधला आहे.बोधले आडनावाच्या हिंदू संताने सुफी परंपरेची दिक्षा घेतली , इस्लाम स्विकारला आणि पुढे ते कादरी परंपरेचे प्रचारक बनले इतके हे सुर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे.तरी राचिंढेरे या आपल्या ग्रंथात चांद बोधले यांना हिंदू ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.ते शेख मुहम्मद या प्रकरणात पान क्र ८२ वर म्हणतात " गुरु परंपरेने सुफी साधू असल्यामुळे सुफी वेशात म्हणजे मंगलवेशात रहात असत . " पान क्र ८३ वरही ते असेच एक विधान करतात. " जनार्धन स्वामींनी बांधलेली चांद बोधल्यांची समाधी देवगिरीच्या पायथ्याशी आजही आहे. चांद बोधले यांनी सुफी साधना आणि सुफी वेश स्विकारलेला असल्यामुळे ते हिंदू असूनही त्यांचे समाधी मंदिर दर्ग्याच्या स्वरूपात आहे. " 

                     ढेरे यांची ब्राम्हणी नेनीव अशी की ते चांद बोधले हे मुस्लिम झाले होते, हे ढेरे मान्य करत नाहीत तर त्यांचे हिंदूकरण करतात.चांद हे नंतर दिलेले नाव आहे.हिंदू घरात ठेवलेले नाव नाही. दिक्षा झाल्याशिवाय हिंदू नाव जावुन मुस्लिम नाव लागने शक्य नाही.त्यातल्या त्यात सय्यद चांदसाहेब कादरी हे नाव इस्लाम स्विकारल्याशिवाय कसेकाय लावले जाईल.ते सर्व इस्लामिक रिवाज आदा करायचे.नमाज पढायचे म्हणून त्यांचा अंत्यसंस्कारविधीही इस्लामीक पध्दतीने झाला म्हणूनच तर संत जनार्धन स्वामी यांनी चांद बोधले यांची समाधी स्वताच्या पगारीतून खर्च करुन दर्ग्याच्या स्वरूपात बांधलेली आहे.शेख मुहम्मद महाराज श्रीगोंदेकर हे या चांदसाहेब यांचे शिष्य होते.चांद बोधले हिंदू होते तर शेख मुहम्मद यांनी चांद बोधले यांच्याकडून कशाची दिक्षा घेतली होती ? 

                      दावल मलिक या  मुस्लिम संतांचे महाराष्ट्रात फार मोठे प्रभावक्षेत्र त्याकाळी निर्माण झाले होते. त्यांच्याबद्दल रा.चिं. गौरवास्पद विधान करण्याऐवजी " अनेक हिंदू त्यांच्या नादी लागले होते " ( पान क्र १४६ , आवृत्ती २१ जुलै २०१४ ) असे हेटाळणी करणारे विधान ते करतात. ते याचा ग्रंथात पान क्र १४२ व १४३ वर म्हणतात " या राजकीय आक्रमणाच्या हतात हात घालूनच सुफींचे धार्मिक आक्रमण मोठ्या प्रमाणात घडुन आले. " ... "चौदाव्या शतकाच्या पुर्वार्धात या चौदाशे सुफी प्रचारकांनी देवगिरीच्या परिसरात आपले प्रधान केंद्र ठेवून सारा महाराष्ट्र व्यापला आणि इस्लामच्या बलात्कारी विस्ताराची मोहीम उघडली. "                   

                         यातून राचिंढेरे यांची ब्राम्हण्यग्रस्त नेनीव स्पष्टपणे उघड होते. त्यांना इस्लाम आणि सुफी संतांचे आगमन बलात्कारी मोहिम वाटते.येथे रा.चिं ढेरेना सुफींनी केलेल्या जातीव्यवस्था,अस्पृश्यता,गैरबराबरीच्या विरोधातील इस्लामचा प्रचार बलात्कारी मोहीम वाटणे अत्यंत दुर्दैवी आहे.  याऊलट कॉ शरद पाटील तर सुफींचे आगमन बोधीसत्वासारखे मुक्तीदाई ठरले असे म्हणतात.

                         सुफी आले नसते तर अस्पृश्यता इश्वर निर्मीत नाही हे अस्पृश्यांना समजायला इंग्रजांचा काळ उजाडावा लागला असता. या ग्रंथ तरी राचिंढेरे यांचे लिखान निरपेक्ष ठरवत नाही. ते तटस्थ लिहीण्याएवजी ब्राम्हणवाद्यांच्या बाजुने लिहीतात असे दिसते आहे.  रा.चिं.ढेरे यांनी हे मुसलमान मराठी संतकवी पुस्तक लिहीताना पुर्वपार्श्वभुमी दिलेली नाही. आणि त्यांना सुफी व इस्लामचा मूलभूत फरक माहिती असेल की नाही याची शंका येते.

                         भारतात सुफी इस्लामचा संदेश घेवुन आले , त्यांनी प्रचार केलाही पण याचा फायदा अस्पृश्य जाती , भटक्या विमुक्तांना झालाच ना . ते सनातनी कर्मठांच्या कैदेतून मुक्त झाले.उच्चभ्रूच्या संस्कारातून घडलेली ढेरेंची नेनीव तळागाळातील सर्वहरा जातींचा विचार करणार नाही हे स्पष्टच आहे. त्यांनी शोधलेले हे मुस्लिम संतकवी फारच थोडे आणि वैदिकांच्या गौरवीकरनातले आहेत. इतरही संतकवी प्रकाशात येने गरजेचे आहे.परंतु तरिही त्यांनी ही केलेली मांडणी मात्र नव्या इतिहासकारांच्यासाठी अप्रतिम असा पुराव्यांचा संग्रह म्हनायला काही हरकत नाही.

                         आपल्याकडे ब्राम्हणेतरांत झालेल्या संतांकडे कुनी बघायला तयार नाही तर मुस्लिम संतांकडे कोन वळनार ? काही फड आजूनही भजनातुन संत नामदेव, संत जनाबाई , संत चोखोबाराय सांगत नाहीत. त्यांचा अभ्यासक्रमच ब्राम्हणी आहे. असे भटाळलेले लोक मुस्लिम संतांकडे कधी वळणार.या धर्तीवर रा.चिं.ढेरे यांनी मुस्लिम संतदर्शन घडवून आनल्या बद्दल खरच ते कौतुकास्पद आहेत.या पुस्तकात त्यांनी दिलेल्या मोजक्याच संतांची चरित्रे आहेत.याशिवाय अनखी बऱ्याच मुस्लिम संतांची चरित्रे उजेडात यायची आहेत.त्यावर काम करणे गरजेचे आहे.

                         संत कुठलाही असो मुस्लिम किंवा गैरमुस्लिम तो सर्वहरा जातवर्गीयांचा श्वास असतो या धर्तीवर रा.चिं.ढेरे यांची ही देन जात्यांतक क्रांतीस एक दुवा ठरणारी आहे.तत्कालीन परिस्थींचे सांस्कृतिक भान आपल्याला रा.चिं.ढेरे यांच्या साहित्याच्या आधारे लक्षात घेता येते.महाराष्ट्रातील गंगाजमुनी परंपराही या ग्रंथात जागोजागी दिसते.जसे संत शहामुनी मुस्लिम आहेत.ते वारकरी संतांना आदबीने उल्लेख करतात.अस्पृश्यतेला विरोध करुन ते संत चोखोबारायांची बाजु घेतात.त्यांनी लिहीलेला सिद्धांतबोध हा ग्रंथ महानुभाव पंथाचे लोक नित्यनियमाने वाचतात.यावरून मुस्लिम , वारकरी , महानुवांचा गंगाजमुना परंपरेचा सांस्कृतिक दुवा शहामुनी ठरतात.

                          महाराष्ट्रात सुफींचे येने अत्यंत नवचैतन्य प्रदान करणारे ठरले आहे.त्यांनी कुनालाही त्रास तर दिला नाहीच उलट या सुफींच्या प्रभावातून संत जनार्दन स्वामी , संत एकनाथ महाराजांसारखे महान संत महाराष्ट्राला मिळाले.कला साहित्याचा विकास सुफींच्या अगमनाने झाला.कारागिरी आणि इतर व्यावसायांची भरभराट सुफींच्या प्रोत्साहानातून झालेली आहे.अस्पृश्य आणि भटक्या विमुक्तांना माय बनुन पोटाशी धरणारे हे सुफी मुक्तीदाते होते.त्यांचा द्वेष करुन आपल्याही पदरात द्वेषच पडेल. 

                         असो कुनालाही कुठल्याही पंथात किती सहजरीत्या जाता येत असे. मुस्लिम असलेले संतही किती सहजतेने किर्तन करत असत.वारकरी , महानुभाव , नाथ आणि सुफी परंपरा ही किती एकमेकांना मिसळलेली आहे. यांची प्रचिती रा.चिं. वाचताना आपल्याला येते.रा.चिं.ढेरे यांच्या काही मर्यादा लक्षात घेता हा ग्रंथ एक वेगळा आणि उपेक्षित विषय असनाऱ्या मुस्लिम संतकवींवर उत्तमरित्या प्रकाश टाकतो.त्यांच्या मर्यादा लक्षात घेता वाचकांना हा ग्रंथ मार्गदर्शकच आहे.