Tuesday, 18 January 2022
संत चोखोबाराय चरित्र ll प्रकरण १२ वे llसंत चोखोबारायांच्या भूमिका
Friday, 14 January 2022
ll संत चोखोबाराय चरित्र ll प्रकरण ४ थे चोखोबारायांचा परिवार
Monday, 10 January 2022
श्रद्ध अंधश्रद्धच्या पलीकडील ग्रामीण निरीक्षणे..
श्रद्ध अंधश्रद्धच्या पलीकडील ग्रामीण निरीक्षणे..
माणूस हा निसर्गाचाच एक भाग आहे.हल्ली आपण हे वास्तव विसरत चाललो आहोत.परंतू फार मोठा काळ माणूस हा निसर्गाला कॉपी करत आलेला आहे. माणूस निसर्गातील निरिक्षणांच्याद्वारे आपल्या दैनंदिन जीवनात मार्गक्रमण करत असे,आपलं जीवन सुखकर बनवण्यासाठी माणसाने निसर्गातील अनेक बदलांचा अभ्यास बारकाव्याने केलेला आहे.विज्ञानाचा विकास फारच अलीकडचा आहे.परंतु सगळं काही सायंटिफिक होण्याच्या अगोदर आपण निसर्गातील निरीक्षणांच्या,नोंदींच्या,अनुभवांच्या द्वारेच आपले जीवन व्यतीत करत असू.आजही ग्रामीण भागात संपूर्ण ग्रामीण जीवन निसर्गातील अनेक नोंदींवरून चालतं.
ग्रामीण भागातील शेतकरी,कष्टकरीवर्ग पावसाच्या आगमनाचे अंदाज आजूबाजूच्या निरीक्षणावरून लावत असतात.पावसाळा सुरू होणार आहे,तर उर्वरित शेतीची कामे उरकून घेतली पाहिजेत.हे ठरवण्यासाठी जे काही अंदाज होते त्यामध्ये मुंग्या तोंडामध्ये पांढरी अंडी घेऊन जात असतील तर असं समजलं जातं की आता पाऊस होणार आहे,किंवा पावसाळा जवळ आलेला आहे.
त्याचबरोबर सरड्याचे तोंड लाल होणे हेसुद्धा पावसाळा जवळ आल्याचे लक्षण मानले जाते. त्याचबरोबर पंख असलेल्या एक प्रकारच्या उडणार्या मुंग्या दिसायला लागल्या की समजावं पावसाळा सुरू होतो आहे.आनखी एक पक्के निरीक्षण म्हणजे शेतामध्ये पावश्या नावाचा एक पक्षी, विशिष्ट प्रकारचा आवाज काढतो, सूर लावतो त्यावरूनही शेतकरी अंदाज बांधतात की पावसाळा जवळ आलेला आहे. किंवा उंच फांदीवर घरटे बांधले की पाऊस विरळ होनार आहे आणि दाट फांदीवर खाली घरटे बांधले की पाऊस भरपूर होणार असल्याचे समजले जाते.अशा निरीक्षणांच्या द्वारे शेतकरी वर्गाने आपले बहुतेक जीवन सुखकर केलेले आहे.
मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाला एक काळ्या रंगाचा किडा निघतो.सर्वत्र दिसु लागतो.त्याच्या आगमनानेच पाऊसाला सुरुवात होते.म्हणून या किड्याला मिरगा किडा सुद्धा म्हणतात.या किड्याच्या पुजनाने पावसाळा सुरु होतो.विदर्भ मराठवाड्यात आजही या मिरग्या किड्याचे हळदी कुंकू टाकून पुजन केले जाते.
शेतकऱ्यांची आत्तापर्यंत शेती करण्याची जी पद्धती आहे,ती नक्षत्रांच्याद्वारे चालत आलेली आहे.नक्षत्र परंपरा ही काही वैदिकांची नव्हे,ती शेतकऱ्यांची आहे.कोणत्या ऋतूत पाऊस पडेल,कोणत्या काळात तो सर्वाधिक असेल, कोणत्या काळात रिमझिम पाऊस होईल,या पावसांच्या सुद्धा कमी अधिक पडण्याच्या नोंदी शेतकऱ्यांनी नक्षत्राद्वारे शोधून ठेवलेल्या आहेत.ग्रामीण भागात या नक्षत्रांना म्हणींमध्ये बंदिस्त केलेले आहे ज्यामुळे तो अनुभव एकापिढीकडुन दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द करता येइल.आजही ग्रामीण भागात विविध नक्षत्रांच्या विविध म्हणी तुम्हाला बघायला मिळतील.जसे की "पडला हस्त तर धनी मगर मस्त नाहीतर गल्या गस्त " म्हणजे हस्त नक्षत्रात चांगला पाऊस पडला तर धणी म्हणजे मालक मस्तीत राहतो, चांगलं जीवन जगतो. पण पाऊस नाही पडला तर त्याच्यावर वाईट वेळ येते.
मघा नक्षत्रात झडीचा म्हणजे मुसळधार पाऊस होतो.हे निरीक्षण 'मघा चुलीपशी हगा नाहीतर वर बघा' या म्हणीत पुर्वजांनी बंदिस्त केले आहे.उत्तरा हे नक्षत्र भाताच्या पिकासाठी चांगले मानले जाते.त्या नक्षत्रात पाऊस पडला तर साळ चांगली येते.म्हणून त्याची नोंद " उत्तरा भात खाईना कुत्तरा नाहीतर मिळेना पित्तरा " या म्हनीत करुन ठेवलेली आहे.
पोळ्यानंतर पावसाळा थांबतो.म्हणून लोक म्हणतात " "पोळा आन पाऊस झाला भोळा".म्हणूनच पोळ्याला बैलांना स्वच्छ धुवुन घेतले जाते कारण शेतीची चिखलातली कामे संपलेली असतात.
महापूर सुनामी यांसाठी नैसर्गिक संकटांची चाहूल आगोदर पक्षांना प्राण्यांना लागते.त्यामुळे जपानमधे एक विशिष्ट प्रकारची चिमणी आपल्या गावातून दिसेनाशी झाली की भूकंप येनार असे मानले जाते.नव्हे ते सत्य आहे.या चिमनीला २४ तासांच्या आत भूकंप येणार असल्याचे माहिती पडते हे सिद्ध झाले आहे.
याचपद्धतीने व्यापारी लोकं,जगभर प्रवास करणारे प्रवासी,वाळवंटांतून रस्ते शोधत जानारे प्रवासी,समुद्र सफारी करणारे खलाशी हे लोकं रात्रीच्या चंद्र ग्रह ताऱ्याचे निरीक्षणे करुन रस्ते निश्चित करत असत.
कोल्हापूर,कर्नाटक तथा उस्मानाबाद जिल्हातील तेर यांचा थेट व्यापार युरोपात होत असे.ते एवढ्या दुरचा मार्ग आशाच नैसर्गिक निरिक्षणांच्या,ग्रह तारे पाऊसाचे अंदाज यांद्वारे निश्चित करत असत.
भारतीय कालगणना, ऋतू,दिशा, उपदिशा,पंचांग,ग्रहांच्या नोंदी आणि नक्षत्रे हे अब्राम्हणी परंपरेतील आहे.त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मोठ्या वारस्यापासून मुकणे ठरेल.ब्राम्हणी छावणीने त्याला पवित्र अपवितेत बसवल्याने आपण त्याला टाकून देवु नये.शुभ अशुभाच्या कल्पना ब्राम्हणी देन आहे ती बाजुला सारली पाहिजे.
नाथ या ब्राम्हणी परंपरेने ग्रहणाचा काळ रसविद्या शिकण्यासाठी उपयोगात आनलेला आहे.विविध औषधी जडीबुटींचा रस करुन गरम पाण्याच्या कुडांच्या जवळ या रसविद्येचे भौतिक प्रयोग हे नाथ,योगी,सिद्ध करत असत.याद्वारे त्यांनी अनेक रोगांवर उपचार पध्दती शोधल्याचे लक्षात येते.
म्हणून भारतीय सर्व परंपरा,संस्कृती, सभ्यता तुच्छ टाकावु अगदीच अंधश्रद्ध वगैरे मानुन आंघोळीच्या पाण्याबरोबर बाळही टाकून देण्याचा हा प्रकार आहे.तो चुकीचा आहे.पाश्चात्त्य ते सर्व सायंटिफिक आणि भारतीय ते सर्व अंधश्रद्ध हे शिक्के मारणारे धोरण आम्हाला अमान्य आहे.
नितीन सावंत परभणी
९९७०७४४१४२
दि,२१ जून २०२०
♦️संत चोखोबाराय चरित्र ll प्रकरण ५ वे ll गुणदोष मांडणारा डिकास्ट संत
Thursday, 6 January 2022
♦️संत चोखोबारायांचे चरित्र प्रकरण ६ वे ll धर्माच्या दलालांचा त्रास .. ll
Monday, 3 January 2022
भिमा कोरेगाव रणसंग्राम एक जोडनारा दुवा ....
♦️संत चोखोबारायांचे चरित्र l प्रकरण ८ वे ll धन्य धन्य नामदेव... ll
♦️संत चोखोबारायांचे चरित्र
प्रकरण ८ वे
ll धन्य धन्य नामदेव... ll
धन्य धन्य नामदेव । माझा निरसला भेव ।।१।।
विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी । खुण सांगितली निर्धारी ।।२।।
ठेवोनी माथां हात । दिले माझें मज हित ।।३।।
दावियेले तारू। चोख्या म्हणे माझा गुरु।।४।।
- संत चोखोबाराय
संत चोखोबारायांच्या नवीन उपलब्धीसह एकुन ३५८ अभंगापैकी एकुन ३२ अभंगात संत चोखोबारायांनी संत नामदेव यांचे गुणगान केले आहे. नामदेवांचा सर्वांत मोठा प्रभाव संत चोखोबारांवर होता.नामदेवांचा सहवास चोखोबारायांचा उद्धार करणारा ठरल्याने चोखोबाराय वारंवार नामदेवांचे ऋण व्यक्त करतात. त्यांनी हे केलेले नामदेवाचे गुणगान धन्यवाद व्यक्त करणारे आहे.नामदेवांच्यामुळेच संत चोखोबारायांना माणुसपणाचा दर्जा मिळाला होता. नव्याने जगण्याची प्रेरणा संत नामदेवानी चोखोबारायांना दिली होती.
संत चोखोबारायांच्या जिवनाचे शिल्पकारच संत नामदेव होते. संत नामदेवाचे मोठेपण सांगताना अनेक उदाहरणे देत चोखोबा व्यक्त होतात. नामदेवाचे वर्णन करताना चोखोबाराय उत्साही आनंदी असल्याचे दिसते. ते म्हणतात ''संध्याकाळी बाजार बंद व्हायच्या वेळेला गिर्हाईक निघुन जाते हा नवलाचा प्रसंग मला नामदेवांच्या शिकवणीतून बघायला मिळाला आहे. " म्हणजे काय तर आयुष्याच्या मावळतीला तुमच्या ऊभ्या केलेल्या वैभवाच्या बाजाराला तुम्हाला कोणीही विचारत नाही. सर्वजन सोडुन जातात.
आपले सुख आपणच भोगावे, वेडगळांना ह्या सुखाच्या गोष्टी सांगून काय फायदा. ज्यांच्या मनात भाव नाही त्यांना अख्खे जग ओस पडलेले असते. हे सर्व ज्ञान मला सुजान नामदेवांच्यामुळे झाले आहे."
"सर्वत्र संचार करणारे मन, एकत्र आणि एकचित्त कसे ठेवायचे हे संत नामदेवानी शिकवीले आहे.आणि आज ते फळा आले आहे." असे संत चोखोबाराय विविध अभंगात आपले मत व्यक्त करताना दिसतात.पुढे ते म्हणतात " मला सुख जर कोणी दाखविले असेल तर तर ते संत नामदेवांनी,त्यांच्याकृपेमुळे मी पावन झालो आहे. मला तर नवल वाटत आहे की ह्रदयातच त्यांनी देव दाखवीला. नामदेवांच्यामुळेच मला जगण्याचे बळ मिळाले आहे. हे नामदेवा तुम्ही मला हा सुखाचा आनंद सोहळा दाखवीलात. तुमच्या प्रेमाच्या या वर्षावाने मी पुरता गुदमरलो आहे. मला तोंडातून शब्द फुटत नाहीत. हे गुरुवर्या नामदेवा आपण धन्य आहात माझ्या जिवनातला अंधकारच तुमच्यामुळे दुर झाला आहे."
एका अस्पृश्य व्यक्तीला त्यांच्या कुटुंबियांच्यासह आपल्या संत मंडळात दाखल करुन घेने , सर्वांच्या बरोबरीला बसवने , तसी बरोबरीची वागणूक देने हे खरच मोठपणाचे आणि क्रांतिकारी काम संत नामदेवांनी केले होते. वैदिक ब्राम्हणवाद्यांच्या दबावाला , विरोधाला आणि छळाला न जुमानता संत नामदेवांचे समतावादी संत मंडळ संत चोखोबारायांच्या घरी सहभोजन करत होते.ह्या सर्व गोस्टी बघुन संत चोखोबाराय भारावून गेले होते. म्हणून संत नामदेवांचे एवढे गुणगान करताना चोखोबाराय सर्वोच्च उपाधी वापरतात ती आईची.
"चोखा म्हणे तुम्ही माय हो माऊली।
कृपेची सावली नामदेव।।
आई पेक्षा मोठी उपाधी काय असु शकेल.संत चोखोबारायांना संत नामदेव आई प्रमाणे वाटतात.इतका जीव संत चोखोबारायांचा संत नामदेवांवर होता.
संत नामदेवांनी उपकार केल्याची भावना चोखोबांची आहे ते म्हणतात
" नामदेवें आजी उपकार केला ।
हाटाचा हाट चौबारा ठेला ।।
संत नामदेवांच्यामुळे संत चोखोबारायांना संत मंडळात जागा मिळाली. सर्व संत चोखोबारायांना आदराने वागवायला लागले. संत मंडळात जातिभेद अस्पृश्यतेला थाराच नसल्यामुळे सर्व संत चोखोबारायांच्या झोपडीसमोर एकत्र जेवायला बसत असत.अख्खे जग ज्याला दुर हो म्हणत आहे, ज्याचा विटाळ मानला जातो, ज्याचा तिरस्कार केला जातो आशा व्यक्तीला संत नामदेवांच्या अनुग्रहामुळे एक नवे जीवन मिळले. नामदेवांच्यामुळे सर्व संत चोखोबारायांना सामावून होत असतील तर संत मंडळातील नामदेवांचे मुख्य नेतृत्व आधोरेखीत होते.
या गोष्टीचा आनंद हर्ष चोखोबारायांना होने नैसर्गिकच आहे.हे नवल, हा आनंद कुणाला सांगावे असे चोखोबारायांना झाले आहे. नामदेवांचे पाय जन्मोजन्मी धरून ठेवावे असे त्यांना वाटते. नामदेवांची भेट होने चोखोबारायांना सोन्याचा दिवस वाटतो. या भल्या नामदेवाने मला व्यापक अनुभव दिला असे चोखोबांचे म्हणने आहे ऐके ठिकाणी त्यांनी 'सुजान' ही उपाधी वापरली आहे.खरच मध्ययुगीन भारतात नामदेवच सुजान होते.ऐवढे आर्त, गोड, भरभरून, व्यापक नामदेवांचे वर्णन केल्यानंतर संत चोखोबाराय म्हणतात
'म्हणोनी नामयाचे धरियेले पाय ।
आठविता होय समाधान ।।
'चोखा म्हणे माझा नामदेव प्राण ।
घालीन लोटांगण जीवें भावे ।।
संत नामदेवांना आपल्या प्राणापेक्षाही चोखोबाराय मोठे मानतात. त्यांना जीवेभावे लोटांगण घालीन असे चोखोबा म्हणतात.
संत नामदेवांच्याबद्दल प्रगट केलेल्या या आदरभावात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो चोखोबारायांच्या गुरुचा. संत चोखोबारायांनी तिन अभंगात माझे गुरू नामदेवच असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे संत चोखोबारायांचे गुरू 'संत नामदेव होते.
'न करी न करी आनिक साधन।
नामयाने खुण सांगितली ।।
संसार सागर भरला दुस्तर ।
तारक निर्धार विठ्ठल हा मंत्राचा ll
मंत्र त्रिअक्षरी सोपा ।
तुटताती खेपा जन्म मरण ll
चोखा म्हणे माझा धन्य गुरुराव ।
दाखवीला देव ह्रदयी माझ्या ।।
संत चोखोबारायांच्या हिनदिन जीवनात ज्ञानाचा, समतेचा प्रकाश घेऊन जाणारे नामदेव होत.
नामदेवांच्यामुळे संत चोखोबाराय आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला अभिव्यक्त होता आले. एवढे महान काम करणारे नामदेव मात्र उच्चजातवर्गीयांनी उपेक्षितच ठेवलेले आहेत.नामदेवांचे महत्व कमी करण्यासाठी त्यांना उपेक्षेच्या खाईत लोटले. तरीही त्या काळात आपल्या जीवनात ज्ञान प्रकाश उधळणारा नामदेव संत चोखोबारायांनी चित्रीत करून ठेवला आहे. संत चोखोबारायांच्या साहित्तिक विश्वास संत नामदेव जीवंत आहेत. संत नामदेवही संत चोखोबांना जिवाभावाचा मानत असत.संत चोखोबारायांच्या मृत्युनंतर त्यांच्या आस्थी मंगळवेढ्यातील वेशीच्या ढिगार्यातून काढून पंढरपुरात विठ्ठलाच्या पायरीसमोर अजरामर होणारी चोखोबांची समाधी बांधणारे संत नामदेवच होते. संत चोखोबारायांना सर्व वारकर्यांच्या नजरेसमोर सदैव ठेवण्याचे महत्वाचे काम नामदेवांचेच. संत नामदेवांच्यामुळे वारकऱ्यांचा गणपती चोखोबाराय बनले.संत चोखोबारायांच्या समाधीच्या दर्शनाशिवाय मुख्य विठोबाचे दर्शन होत नाही.याचे श्रेय संत नामदेवांना जाते.संत चोखोबारायांचा सर्वात मोठा सन्मान संत नामदेवांनीच केला.
संत नामदेव चोखोबारायांबद्दल म्हणतात.
"चोखा माझा जी चोखा माझा भाव ।
कुळधर्म देव चोखा माझा ।।
काय त्याची भक्ती काय त्याची शक्ती ।
मी हि आलों व्यक्ती तयासाठी ।
माझिया चोखियाचे करिती जे ध्यान ।
तया कधी विघ्न घडो नेदी ।।
नामदेवें आस्थि आणिल्या पारखोनी ।
घेत चक्रपाणी पितांबरी ।।
आशाप्रकारे संत चोखोबारायांचे उद्धारकर्ते , मार्गदर्शक आणि गुरु संत नामदेव होत.
नितीन सावंत परभणी
9970744142
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
Sunday, 2 January 2022
♦चला आपण आपली पत घालवू ♦
नितीन सावंत, परभणी
9970744142
सध्याला ब्राम्हणी बुद्धीजीवी,बनिया भांडवलदार जातवर्ग आणि उच्चभ्रू मिरासदार जातवर्गाचे दिवस आलेले आहेत.त्यांच्याकडूनच शेतकरी,कष्टकरी भिकेला लावने चालू आहे.यात ग्रामीण भागातील शेतकरी अत्यंत बिकट अवस्थेत सापडलेला आहे.पुर्वीचे वाडवडीलांचे वैभव गेलेले आहे.मोठ्या जमीनीचे तुकडे होत होत ही शेतजमीन वाटुन वाटुन गुंठ्यांवर आली आहे.ज्या वाड्यात एक किंवा दोन घरे रहायची ते वाडे मधेच वाटण्या करुन करुन, प्रत्येकाच्या वाट्याला पाच पाच खनाची जोडणी आली आहे.
आशा वेळेला जुना सरंजामी बाज सोडुन,तोरेताठे आणि मिरवणे सोडुन शेतकरी वर्गाने आपल्या प्रगतीचे पहायला हवे. पण नेमके तसे करण्याचा विचार केला की *पत* आडवी येते.
खेड्यात सर्वात जास्त भिती असते ती चार चौघात *पत* जाण्याची.बापजाद्यांचा एक दरारा होता आपण तो कसा मोडावा.त्यांची कमवलेली *पत*आपन कशी घालवावी.पत गेली म्हणजे राहिलेच काय ? वगैरे. हिंदीत हरिशंकर परसाई यांची दोन नाक वाले लोग ही हस्यव्यंग रचना आहे.ती अशीच पत जाने सारखी रचना आहे.म्हणजे हिंदीत नाक कटते तर मराठीत पत जाते असे म्हनता येइल.
बरे ही पत जाते तरी कशाने ? तर
शेतातून डोक्यावर जाळन आनल्याने,स्वत: पाणी भरल्याने, महिला दुकानात गेल्याने,गिरणीत गेल्याने,कोर्टाची पायरी चढल्याने,पोलीसस्टेशनला गेल्याने,घरी चौकशीसाठी पोलीस आल्याने,पोटजात मोडुन विवाह केल्याने,विधवेवा पुनर्विवाह लावुन दिल्याने,गरिबांनी मोठ्यांना उलटून बोलल्याने,हुंडा कमी घेतल्याने किंवा घेतलाच नाही तर, लग्नात खर्च कमी केल्यास म्हणजे लग्न हालके केल्यास,घरच्या महिलांच्या अंगावर दागीने नसल्याने,महिला बाजारात गेल्याने किंवा परगावी एकटी गेल्यास,स्त्री पुरुषांना जास्त सलगीने बोलल्यास,नवऱ्याला चार चौघात बोलल्यास,स्त्रीने कोर्टात साक्ष दिल्यास,निवडणूक हरल्यास,मुलींनी तमाशा पाहिल्यास ,दान धर्म न केल्यास, अखंड हरिनाम सप्ताहची पट्टी न फाडल्यास,वर्गनी न दिल्यास,सण मोठा न केल्यास किंवा साजरा न केल्यास, देव देव न करने,उपास न धरने,नास्तिकता बाळगणे,मटण खाने,ब्राम्हणी व्यवस्थेने हलक्या मानलेल्या जातींच्यांना घरी बोलवल्याने, त्यांच्याशी नेहमी संपर्क ठेवल्याने,त्यांची मदत घेतल्याने,शेजारी पाजारी वाटी घेवून भाजी मागल्याने, पाहुणे आल्यास घरी ट्रे नसने,एकाच रंगाचे किंवा डिझाइनचे कप नसने,घर बांधलेले नसने,अशी पत जाणारी खुप मोठी कारणे आहेत.ज्यामुळे आपली पत जावू शकते .
आता या पत जाणाऱ्या गोस्टी पाहिल्या तर त्या अगदी किरकोळ आहेत.अगदी शुल्लक,पण तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा छोट्याशा पत जाण्यामुळेच कित्तेकांनी आत्महत्या केलेल्या आहेत.काही जन तर सहकुटुंब आत्महत्येचा मार्ग आवलंबतात.पत जाण्यापेक्षाही नाक जाने हा प्रकार तर खुप भयानक आहे.
लक्षदेवून बघा प्रत्येक गावात बाहेरून आलेली चार दोन पाहुण्यांची घरे प्रगती करतात श्रीमंत असतात किंवा खाऊन पिऊन टामटुम असतात.असे का ? तर ते पत नावाच्या प्रकारात जास्त आडकत नाहीत.ते कुनालाही न जुमानता पत बित न पाळता प्रगती करतात.पण ज्यांना मोठी भाऊकी आसते,गोतावळा असतो ते मात्र या पतीत अडकतात.म्हणून पत ही प्रगतीला रोखुन धरते.
म्हणजे पत जाने चांगले असते.एकदा का पत गेली की प्रगतीचा मार्ग खुला होतो. आपल्यावरचे लोकांचे लक्ष ठेवण्याचे ओझे कमी होते.पत गेलीच पाहिजे.ग्रामीण भागाच्या अधोगतीला भावुकी आणि ही पतच जबाबदार आहे.
चला एकदा आपन ही पत घालवूच.
लोक म्हतात शेतात खत नाही, गावात पत नाही आणि बाजारात ऐपत नाही.
माझे म्हनणे आहे खताचे आणि ऐपतीचे ठिक आहे पन पत काय चाटायचीय का ?
नितीन सावंत
परभणी
७/१/ २०१७