Tuesday, 18 January 2022

संत चोखोबाराय चरित्र ll प्रकरण १२ वे llसंत चोखोबारायांच्या भूमिका

 संत चोखोबाराय चरित्र 
ll प्रकरण १२  वे ll

संत चोखोबारायांच्या भूमिका 

ज्या कारणे वेदश्रृती अनुवादती l तो हा रमापती पंढरीये ll
सुखाचे ठेवणे क्षीरसागर निवासी l तो हा पंढरिसी उभा विटे ll 
भाविका कारणे उभवोनी हात l उदारपणे देत भक्ती मुक्ती ll
न पाहे उंच निच याती कुळ l स्त्री शुद्र चांडळा सरते पायी ll
चोखा म्हने ऐसा भावाचा भुकेला l म्हणोनी स्थिरावला भीमातटी ll 
                  -  संत चोखोबाराय 

              गुलामांना स्वताचे विचार आणि भूमिका नसतात.जे तर्क करतात , चिकीत्सा करतात त्यांची स्वयंसंवादाची प्रगल्भ विचारक्षमता विकसित होत जाते.विचारकरणारी व्यक्ती सभोवतालच्या परिस्थितीबद्दल स्वताची मते नोंदवायला लागते.मते नोंदवणारी व्यक्ती आपल्या भूमिका घेवून पुढे येते आणि यातूनच प्रस्थापित , जुनाट , जुलमी आणि शोषकांच्या परंपरागत मुल्यव्यवस्थेला हदरे बसतात.कारण त्यांचे विषमतावादी तत्वे आणि शोषणाची व्यवस्था नाकारणारा तयार झालेला असतो.
                 संत चोखोबारायांचेही असेच आहे.संत नामदेवांच्या संत मंडळातून त्यांचे वैचारिक प्रबोधन झाले होते.या संत मंडळात चोखोबाराय तर्क करायला लागतात आणि यातून ते आपल्या भूमिकाही विषद करताना दिसतात.अस्पृश्य जातीतल्या व्यक्तीने स्वतंत्र मत मांडणे त्याकाळी गुन्हाच.त्यामुळे धर्मग्रंथावर स्वताचा अभिप्राय देने महापातक होते.तरी संत चोखोबाराय स्वताची मतेही विषद करतात आणि धर्मग्रंथावर आपला अभिप्रायही नोंदवतात.ते वेद पुराण्यांच्या समिक्षेपर्यंत जातात.१६ व्या शकतकात मराठा कुनब्याच्या घरात जन्माला आलेल्या तुकोबारांवर तुम्हाला अभंग लिहिण्याचे आधिकार नाहीत आणि धर्मचिकीत्साही करता येनार नाही असे आरोप होते.त्या गुन्हयाची शिक्षा म्हणून संत तुकोबारायांचा गाथाही इंद्रायणीच्या पाण्यात बुडवला गेला होता.येथे तर चोखोबाराय अस्पृश्य आणि तरीही ते निर्भीडपणे आपल्या भूमिका मांडतात.हे मोठे धाडसाचे आणि क्रांतिकारी आहे. 
                 संत चोखोबारायांच्या भूमिका पिडन चित्रीत करणाऱ्या आहेत.शोषण स्पष्टपणे दिसते.शोषणाचे मोजमाप करता येते.पिडन म्हणजे अंतरिक वेदना , जीवाची एक सल , मनाला लागलेली बोचनी होय.अस्पृश्यता , विटाळ आणि त्यावरून आलेली हिनत्वदर्शक वागणूक हे पिडन आहे.आशाप्रकारचे जे पिडन चोखोबांच्या वाट्याला आलेले आहेत ते पिडन चोखोबा चित्रीत करतात.या प्रकारे चित्रण करणाऱ्या संत चोखोबारायांच्या भूमिका पुढीलप्रमाणे आहेत. " इतर माणसांच्या प्रमाणे जगण्याचे आधिकार आम्हाला का नाहीत ? विटाळापासून कोण चुकला आहे.विटाळ सर्वांनाच असतो मग आम्हीच तेवढे अपवित्र का ? माणसाचे शरिर आणि त्याची कातडी बघु नये त्याचे गुण स्वभाव बघावा.जात, कुळ,धर्म बघुन केलेले वर्तन भेदभावाचे ठरते. म्हणून कुनालाही जात, कुळ, वर्णावरुन हिनवु नये.आम्ही काय सदैव तुझ्या पायरीलाच लोळायचे का ? आमचा जन्म उष्टे खाण्यासाठीच आहे का ? वेदांपेक्षाही विठ्ठल जुना आहे.आधिचा आहे.आम्हाला वेदांपेक्षा विठ्ठलच प्रिय आहे.वेद श्रृती पुराणांनी ज्या इश्वराचे गुणगान केलेले आहे तो ईश्वर म्हणजेच पंढरपूरचा विठ्ठल होय.सुखाचा सागर आणि सागरातील शेषशायी नागवार बसलेला विष्णु म्हणजेच विठ्ठल होय.तो सर्वांच्या कल्याणासाठी विटेवर उभा आहे.तो सर्वकाही देण्यासाठी उदारपणे हात वर करुन भक्ती मुक्ती वाटायला उभा आहे.हा आमचा पांडुरंग जात, कुळ, धर्म ,पंथ बघत नाही.स्त्री असो किंवा शुद्र किंवा चांडाळ असो तो सर्वांशी प्रेमाणे वर्तन करतो.तो भेदभाव करत नाही.कुनालाही हिन लेखत नाही.तो फक्त प्रेमाचा भावाचा भुकेला आहे.वैदिक परंपरेपेक्षा आमची विठ्ठलाची परंपरा समतावादी आहे. " याप्रकारे संत चोखोबाराय आपल्या अनेक अभंगांतून आपल्या भूमिका विषद करतात. 
                 अनेकदा ते त्यांची विवंचना जगासमोर मांडतात.मनाला लागलेला घोर , एक हुरहूर ते व्यक्त करतात.ते म्हणतात " आता कुठपर्यंत आम्ही भीड धरायची.अजूनही तुमचे दार राखीत बसलो आहे. देवा ही तुझी रित बरी नाही.तुम्हाला हे साजत नाही.किती तिष्ठत ठेवनार आम्हाला.आमच्या वाट्याला पर्वताएवढे दुख आहे.सुखाचा कवडसाही प्राप्त नाही.असेच तुला वर्तन करायचे होते.आमच्याशी भेदभाव करायचा होता तु आम्हाला जन्म का दिलास.नेमका आमच्या वेळीच कुठे गेला होतास.इतका निष्ठुर कसाकाय वागलास.तु तरी उद्धार करशील म्हणून तुझ्या द्वारी आलो आहे.तुझा महिमा खुप मोठा आहे.तुझे नाव ऐकताच पुराणे रानोमाळ पळतात.तु तर वेदांच्याही आधीचा आहेस.आमचाही उद्धार कर की. तु दुजाभाव करु नकोस.एकाला भिखारी आणि एकाला राजा करु नकोस.काहींना मिष्ठान्न तर काहींना कोरकुटकाही मिळेना.काहीना दारोदार भिख मागावी लागते.ही असमानता का जन्माला घातलीस. " 
                 संत चोखोबारायांचा अभिव्यक्तीचा मार्ग विठ्ठल आहे.विठ्ठलाशी बोलत , त्याला सुखदुःखे सांगत , कधीकधी विनयशील तक्रार करत संत चोखोबाराय आपल्या भूमिका मांडतात.या भुमीकांचे स्वागत करत इतर संत चोखोबारायांना प्रकाशात आनतात. कुटूंबातील सदस्य मेव्हणा , बहिन , बायको आणि मुलगा संत चोखोबारायांच्या भुमीकांच्या समर्थनात उभे रहातात.संत चोखोबारायांचे चिरंजीव कर्ममेळा महाराज तर आनखी कडक भूमिका घेवुन मैदानात येतात.संत चोखोबारायांच्या भुमीकांना जसा ब्राम्हणांचा विरोध झाला तसाच त्यांच्या भुमीकांचे समर्थन करणारा एक मोठा वर्गही त्यांना लाभला.त्यांच्या पश्च्यात पिढीदरपिढीगत लोकांनी संत चोखोबारायांची मांडणी जपून ठेवली.त्यांच्या अभंगांचे संकलन झाले.गाथा निर्माण झाला.त्यांच्या मांडणीला स्विकारत लोकांनी त्यांना संतत्व बहाल केले.संत चोखोबाराय काही चमत्कार दाखवून शिष्यांचा मेळा जमवनारे भोंदूबाबा नव्हते.किंवा ते उच्चजातीय ब्राम्हण वगैरेही नव्हते की लोकांनी त्यांच्याभोवती गराडा घालावा आणि त्यांना सहजरीत्या गुरु करावे. संत चोखोबारायांना संतत्व सहजरीत्या मिळालेले नाही.त्यांना अत्यंत खडतर भूमिका घेवुन , सत्याचा अग्रह धरत ही लोकप्रियता शेवटी प्राप्त झालेली आहे. आशा संताला पुन्हा प्रकाशात आनने आपले प्रथम कर्तव्य आहे. 

नितीन सावंत परभणी
9970744142

Friday, 14 January 2022

ll संत चोखोबाराय चरित्र ll प्रकरण ४ थे चोखोबारायांचा परिवार

ll संत चोखोबाराय चरित्र ll 
प्रकरण ४ थे 

चोखोबारायांचा परिवार

चोखा चोखट निर्मळ। तया अंगी नाही मळ।।
चोखा सुखाचा सागर। चोखा भक्तीचा आगर।।
चोखा प्रेमाची माऊली।चोखा कृपेची साऊली।।
चोखा मनाचे मोहन। बंका घाली लोटांगण।।
                      - संत बंका महाराज.

                      प्रस्तुत अभंग संत चोखोबारायांचे मेव्हणे संत बंका महाराजांचा आहे.चोखोबारायांच्या मेव्हन्याने त्यांचा गुणगौरव करावा ही आगळीवेगळी आणि महत्वाची बाब आहे.मेहुनपुरी गावी सुदामा आणि सावित्री यांच्या पोटी चोखोबाराय आणि निर्मळा यांचा जन्म झाला.त्याच गावी कृष्णा आणि भीमाबाई यांना बंका आणि सोयरा ही दोन अपत्ये झाली.या दोन कुटुंबाने एकमेकांशी सोयर संबंध निर्माण केले.बंका यांची बहीण सोयरा चोखोबारायांना देण्यात आली.तर चोखोबारायांच्या निर्मळा या बहिणीचा विवाह बंका यांच्याशी लावून देण्यात आला.पूर्वीच्या काळी साटे लोटे पद्धतीनं आशाप्रकारे विवाह होत असत.

                           संत चोखोबाराय आणि सोयराबाई यांच्या पोटी कर्ममेळा जन्मले तर बंका आणि निर्मळा यांचा मुलगा हरी होय.हरी बद्दल इतिहासात,संत साहित्यात काहीच उल्लेख सापडत नाहीत.मात्र परिवारातील बाकी सर्वांचे थोडे थोडे का होइना अभंग उपलब्ध आहेत.संत चोखोबाराय पंढरपूरात आल्यानंतर त्यांचा संत नामदेवांशी संपर्क झाला. त्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवांचे किर्तन ऐकले.नामदेवांना जावुन ते भेटले आणि किर्तन आवडल्याची प्रतिक्रिया चोखोबारायांनी नामदेवांना दिली. नामदेवांनी चोखोबारायांना कडकडु आलिंगन दिले.गळाभेट घेतली आणि आमच्या संतमंडळात या म्हणून निमंत्रण दिले. संत चोखोबारायांना खुप आनंद झाला. तेंव्हा ही नामदेव-चोखामेळा गळाभेटीची हकीकत संत चोखोबारायांनी घरी आपल्या बायकोला सांगितली.पुढे ही हकीकत संत सोयराबाईंनी माहेरी आपला भाऊ बंका यांना सांगितली.या कृतीमुळे संत चोखामेळा आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि बंका निर्मळेसह सर्व जण संत नामदेवांच्या संतमंडळात सामील झाले.नामदेव आणि सर्व संतमेळा भेदाभेद करत नाहीत.ते सर्वजन एका ताटात जेवतात.गोपाळकाला करतात.एकमेकांना जीव लावतात.या भावनेतून संत चोखोबारायांचा परिवारात वारकरी भागवत धर्मात दाखल झाला. संत चोखोबाराय जेंव्हा अभंग राचायला लागले तेंव्हा हे सर्वच कुटुंब साथ द्यायला लागले.आज घडीला संत चोखोबारायांचे ३५८,कर्ममेळा यांचे २७,बंका महाराजांचे ४१,सोयरा यांचे ६२,तर निर्मळा यांचे २४ अभंग उपलब्ध आहेत. या संपूर्ण कुटुंबाला जे आत्मभान निर्माण झाले चोखामेळा यांच्यामुळे होय. स्त्रियांनाही बरोबरीचा दर्जा देऊन आपली बायको आणि बहीण दोघींनाही अभंग निर्मितीच्या कार्यात चोखोबांनी सहभागी करून घेतले होते.आपल्या बायकोचा भाऊ आणि आपला मुलगाही आपल्याला साथ सहयोग देतो आहे हे बघून संत किती सुखावले असतील.संपूर्ण कुटुंब एकसंघ पाहून त्यांना वारंवार अत्यानंद झाला असेल.संत बंका आणि निर्मळा मेहुनपुरी राहत असत तर चोखोबाराय,सोयरा आणि कर्ममेळा पंढरपुरात रहात असत.तरीही हे एवढ्या दूर रहाणारे कुटुंब अभंगाच्या रूपाने एकमेकांच्या हृदयात रहात होते.संत चोखोबारायांच्या कुटुंबाने लिहीलेले अभंग गेले शेकडो वर्षे महाराष्ट्रातील कष्टकरी जनतेने पिढीदरपिढीगत गात , गुणगुणत जपुन ठेवले आहेत.संपूर्ण कुटुंबातील सर्व सदस्यांची अभीव्यक्ती जपणे , त्यांचे काव्य , लिखान जपणे बे फार मोठे डॉक्युमेंटेंशन आहे.जे इतिहासाने आणि काही इतिहासकारांनी केले आहे.
                        
        संत बंका महाराज यांनी चोखोबारायांचा स्वभाव कसा आहे हे वर्णन करणारा प्रस्तुत अभंग दिला आहे.
           
      " चोखोबाराय स्वभावाने अत्यंत निर्मळ स्वभावाचे आहेत.त्यांच्या अंगी (मनात) थोडेही किल्मिस,द्वेष,तिरस्कार नाही.ते मनाने निर्मळ आहेत.त्यांच्या अंगी मळ नाही." पुढे बंका महाराज म्हणतात " की चोखोबाराय सुखाचा सागर आहेत.ईश्वर भक्तीत ही ते सरस आहेत.चोखोबाराय स्वभावाने खूप प्रेमळ आहेत.ते प्रेमाची माऊली आहेत.आम्हा सर्व कुटुंबावरली ते कृपेची सावलीच आहेत." अशा सर्वांच्या मनाला मोहून टाकणाऱ्या चोखोबारायांना बंका महाराज दंडवत घालतात.
                      महाराष्ट्रातील सर्व संतांनी शिकवणुकीत 'माणुसकी' या मूल्यांना प्रथम प्राधान्य दिलेले आहे.'माणुसकी' प्रस्थापित करण्यासाठी मानुसकीच्या आड येणाऱ्या सर्व वाईट प्रथा,परंपरा,दुर्गुणांचा धिक्कार सर्व संतांनी केलेला आहे.'माणुसकी आणि माणूसपण' सदैव शाबूत रहावे म्हणून सर्वच संत सर्वच प्रकारच्या विषमता,भेदाभेद नाकारतात. म्हणून बंका महाराज जे चोखोबारायांचे प्रेमळ म्हणून वर्णन करतात ते सार्थ,योग्य आहे. सर्वच संत अगदी निर्मळ, प्रेमळ स्वभावाचे होते.सर्वाना सामावून घेणारे होते.त्यावेळी प्रस्थपित धर्म पुरोहितांनी आमच्या धार्मिक,आध्यत्मिक क्षेत्रात तुम्ही शूद्र संत का ढवळाढवळ करताय म्हणून खूप ओरड केली होती.अनेक संतांना त्यांनी छळले,त्रास दिला तरीही निर्मळ, प्रेमळ मनाचे संत डगमगले नाही.त्यांनी धार्मिक क्षेत्रात मानवी मूल्यांचा,माणुसकीचा आग्रह धरणे चालूच ठेवले.त्यासाठी धर्माची चिकित्सा देखील केली.फोलपणा दाखवताना हे जर अमानवी असेल तर असला ग्रंथ, वेद,पुराण धर्म सुद्धा आम्हाला अमान्य आहे.अशी भूमिका संतांनी घेतली.बरोबरीचे समान हक्क अधिकार आणि माणसाला  माणसासारखी माणुस म्हणून वागणूक दया, हा अग्रह संतांनी शेवपर्यंत लावून धरला होता.त्यात संत चोखामेळा,संत रविदासांसारखे संत शेवटी शहीदही झाले.
         
      माणुसकीच्या लढाईत,मानव मुक्तीच्या लढाईत चांगलुपणाचा अग्रह धरत संत शहीद झाले.

नितीन सावंत परभणी 
9970744142

Monday, 10 January 2022

श्रद्ध अंधश्रद्धच्या पलीकडील ग्रामीण निरीक्षणे..

श्रद्ध अंधश्रद्धच्या पलीकडील ग्रामीण निरीक्षणे..

                      माणूस हा निसर्गाचाच एक भाग आहे.हल्ली आपण हे वास्तव विसरत चाललो आहोत.परंतू फार मोठा काळ माणूस हा निसर्गाला कॉपी करत आलेला आहे. माणूस निसर्गातील निरिक्षणांच्याद्वारे आपल्या दैनंदिन जीवनात मार्गक्रमण करत असे,आपलं जीवन सुखकर बनवण्यासाठी माणसाने निसर्गातील अनेक बदलांचा अभ्यास बारकाव्याने केलेला आहे.विज्ञानाचा विकास फारच अलीकडचा आहे.परंतु सगळं काही सायंटिफिक होण्याच्या अगोदर आपण निसर्गातील निरीक्षणांच्या,नोंदींच्या,अनुभवांच्या द्वारेच आपले जीवन व्यतीत करत असू.आजही ग्रामीण भागात संपूर्ण ग्रामीण जीवन निसर्गातील अनेक नोंदींवरून चालतं.

                               ग्रामीण भागातील शेतकरी,कष्टकरीवर्ग पावसाच्या आगमनाचे अंदाज आजूबाजूच्या निरीक्षणावरून लावत असतात.पावसाळा सुरू होणार आहे,तर उर्वरित शेतीची कामे उरकून घेतली पाहिजेत.हे ठरवण्यासाठी जे काही अंदाज होते त्यामध्ये मुंग्या तोंडामध्ये पांढरी अंडी घेऊन जात असतील तर असं समजलं जातं की आता पाऊस होणार आहे,किंवा पावसाळा जवळ आलेला आहे.
त्याचबरोबर सरड्याचे तोंड लाल होणे हेसुद्धा पावसाळा जवळ आल्याचे लक्षण मानले जाते. त्याचबरोबर पंख असलेल्या एक प्रकारच्या उडणार्‍या मुंग्या दिसायला लागल्या की समजावं पावसाळा सुरू होतो आहे.आनखी एक पक्के निरीक्षण म्हणजे शेतामध्ये पावश्या नावाचा एक पक्षी, विशिष्ट प्रकारचा आवाज काढतो, सूर लावतो त्यावरूनही शेतकरी अंदाज बांधतात की पावसाळा जवळ आलेला आहे. किंवा उंच फांदीवर घरटे बांधले की पाऊस विरळ होनार आहे आणि दाट फांदीवर खाली घरटे बांधले की पाऊस भरपूर होणार असल्याचे समजले जाते.अशा निरीक्षणांच्या द्वारे शेतकरी वर्गाने आपले बहुतेक जीवन सुखकर केलेले आहे.

                               मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाला एक काळ्या रंगाचा किडा निघतो.सर्वत्र दिसु लागतो.त्याच्या आगमनानेच पाऊसाला सुरुवात होते.म्हणून या किड्याला मिरगा किडा सुद्धा म्हणतात.या किड्याच्या पुजनाने पावसाळा सुरु होतो.विदर्भ मराठवाड्यात आजही या मिरग्या किड्याचे हळदी कुंकू टाकून पुजन केले जाते.

                              शेतकऱ्यांची आत्तापर्यंत शेती करण्याची जी पद्धती आहे,ती नक्षत्रांच्याद्वारे चालत आलेली आहे.नक्षत्र परंपरा ही काही वैदिकांची नव्हे,ती शेतकऱ्यांची आहे.कोणत्या ऋतूत पाऊस पडेल,कोणत्या काळात तो सर्वाधिक असेल, कोणत्या काळात रिमझिम पाऊस होईल,या पावसांच्या सुद्धा कमी अधिक पडण्याच्या नोंदी शेतकऱ्यांनी नक्षत्राद्वारे शोधून ठेवलेल्या आहेत.ग्रामीण भागात या नक्षत्रांना म्हणींमध्ये बंदिस्त केलेले आहे ज्यामुळे तो अनुभव एकापिढीकडुन दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द करता येइल.आजही ग्रामीण भागात विविध नक्षत्रांच्या विविध म्हणी तुम्हाला बघायला मिळतील.जसे की "पडला हस्त तर धनी मगर मस्त नाहीतर गल्या गस्त " म्हणजे हस्त नक्षत्रात चांगला पाऊस पडला तर धणी म्हणजे मालक मस्तीत राहतो, चांगलं जीवन जगतो. पण पाऊस नाही पडला तर त्याच्यावर वाईट वेळ येते.

                             मघा नक्षत्रात झडीचा म्हणजे मुसळधार पाऊस होतो.हे निरीक्षण 'मघा चुलीपशी हगा नाहीतर वर बघा' या म्हणीत पुर्वजांनी बंदिस्त केले आहे.उत्तरा हे नक्षत्र भाताच्या पिकासाठी चांगले मानले जाते.त्या नक्षत्रात पाऊस पडला तर साळ चांगली येते.म्हणून त्याची नोंद " उत्तरा भात खाईना कुत्तरा नाहीतर मिळेना पित्तरा " या म्हनीत करुन ठेवलेली आहे.

                                   पोळ्यानंतर पावसाळा थांबतो.म्हणून लोक म्हणतात " "पोळा आन पाऊस झाला भोळा".म्हणूनच पोळ्याला बैलांना स्वच्छ धुवुन घेतले जाते कारण शेतीची चिखलातली कामे संपलेली असतात.

                         महापूर सुनामी यांसाठी नैसर्गिक संकटांची चाहूल आगोदर पक्षांना प्राण्यांना लागते.त्यामुळे जपानमधे एक विशिष्ट प्रकारची चिमणी आपल्या गावातून दिसेनाशी झाली की भूकंप येनार असे मानले जाते.नव्हे ते सत्य आहे.या चिमनीला २४ तासांच्या आत भूकंप येणार असल्याचे माहिती पडते हे सिद्ध झाले आहे.

                              याचपद्धतीने व्यापारी लोकं,जगभर प्रवास करणारे प्रवासी,वाळवंटांतून रस्ते शोधत जानारे प्रवासी,समुद्र सफारी करणारे खलाशी हे लोकं रात्रीच्या चंद्र ग्रह  ताऱ्याचे निरीक्षणे करुन रस्ते निश्चित करत असत.
कोल्हापूर,कर्नाटक तथा उस्मानाबाद जिल्हातील तेर यांचा थेट व्यापार युरोपात होत असे.ते एवढ्या दुरचा मार्ग आशाच नैसर्गिक निरिक्षणांच्या,ग्रह तारे पाऊसाचे अंदाज यांद्वारे निश्चित करत असत.

                              भारतीय कालगणना, ऋतू,दिशा, उपदिशा,पंचांग,ग्रहांच्या नोंदी आणि नक्षत्रे हे अब्राम्हणी परंपरेतील आहे.त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मोठ्या वारस्यापासून मुकणे ठरेल.ब्राम्हणी छावणीने त्याला पवित्र अपवितेत बसवल्याने आपण त्याला टाकून देवु नये.शुभ अशुभाच्या कल्पना ब्राम्हणी देन आहे ती बाजुला सारली पाहिजे.

                              नाथ या ब्राम्हणी परंपरेने ग्रहणाचा काळ रसविद्या शिकण्यासाठी उपयोगात आनलेला आहे.विविध औषधी जडीबुटींचा रस करुन गरम पाण्याच्या कुडांच्या जवळ या रसविद्येचे भौतिक प्रयोग हे नाथ,योगी,सिद्ध करत असत.याद्वारे त्यांनी अनेक रोगांवर उपचार पध्दती शोधल्याचे लक्षात येते.

                                म्हणून भारतीय सर्व परंपरा,संस्कृती, सभ्यता तुच्छ टाकावु अगदीच अंधश्रद्ध वगैरे मानुन आंघोळीच्या पाण्याबरोबर बाळही टाकून देण्याचा हा प्रकार आहे.तो चुकीचा आहे.पाश्चात्त्य ते सर्व सायंटिफिक आणि भारतीय ते सर्व अंधश्रद्ध हे शिक्के मारणारे धोरण आम्हाला अमान्य आहे.

नितीन सावंत परभणी
९९७०७४४१४२ 
दि,२१ जून २०२०

♦️संत चोखोबाराय चरित्र ll प्रकरण ५ वे ll गुणदोष मांडणारा डिकास्ट संत

♦️संत चोखोबाराय चरित्र 

ll प्रकरण ५ वे   ll 

गुणदोष मांडणारा डिकास्ट संत 

बहुत प्रकार बहुत या जगाचे। काय वानूं त्याचे गुणदोष ।। 
नीच हे याती अनामिक नांव । तेथे भावाभाव कोण कैचा। 
चाहाड, चोर, जार, भ्रष्ट ते साचे। हीनत्व जन्मांचे पदरी ओह।। 
चोखा म्हणे त्यांचे संगती पहिलो। बहु हे पीडीलो वियोगाने।। 
                       - संत चोखोबाराय 
                       - ( श्रीसंत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र - प्राचार्य डॉ.आप्पासाहेब पुजारी प्रथम आवृत्ती सोमवार ११ जुलै २०११ , अभंग क्रमांक २९५ ) 

                             भारतात तथागत बुध्दाच्या वर्णांताच्या क्रांती नंतर जातीव्यवस्था जन्माला आली. या जातीव्यवस्थेच्या काळातच काही जातींना जाचक नियम लावून अस्पृश्यतेत लोटण्यात आले होते. वर्णव्यवस्थेच्या काळात, बुध्द काळात चांडाळ, शोपज, भंगी जातींचा ऊल्लेख सापडतो, परंतु पुढील काळात जातीव्यवस्था जशजशी जटील होत गेली तस तशा जातींच्या विविध लक्षणांसह भेदरेषा आनखी गडत होत गेल्या. पुढील काळात अस्पृश्य ठरवल्या  गेलेल्या जातींना गावगाड्यातून अलग, वेगळे करण्यात आले.गावाबाहेर स्वतंत्र अश्या अस्पृश्यांच्या वस्त्या बनवल्या गेल्या. या अस्पृश्य वस्त्यांवर कठोर धार्मिक नियमावली लादून देव आणि धर्मशास्त्राचा हवाला देण्यास सुरुवात करण्यात आली. या अस्पृश्य जातींवर धर्मपुरोहीत अत्यंत कठोर जाचक नियम लादून लक्ष ठेवत असत. या अस्पृश्य जातींचे जगण्याचे, वागण्याचे बोलण्याचे खाण्यापिण्याचे कपडे घालण्याचे, अभिव्यक्त होण्याचे, सर्वच  अधिकार श्रौतस्मार्त धर्माकडे होते.आणि ह्या धर्माचे सर्वेसर्वा होते ब्राह्मण.इ.स.च्या १२ व्या शतकापर्यंत अस्पृश्य जातींवर सर्वच प्रकारचे बंधने आनली गेली होती. अस्पृश्य जातीनी अभिव्यक्ति होने , प्रश्न उपस्थित करणे घोर अपराध होता.  मनुस्मृती नावाचा कायदेग्रंथ घेऊनच धर्मपुरोहीत शिक्षा देण्यासाठी फिरत असत.हे सर्व झाले ते कष्टकरी गणांच्या हातून उत्पादनाची साधने आणि त्यावरील मालकी हक्क काढुन घेण्यातून पुढे ते अस्पृश्य बनले.
                                   अशा कर्मठ बनलेल्या जाती,धर्मव्यवस्थेच्या काळात आपली शोषण पिडणाची अभिव्यक्त होण्याची भुमीका घेऊन संत चोखोबाराया नावाचा एक अस्पृश्य जातीतला संत ऊभा राहिला होता.
                                    संत चोखोबारायांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील मेहुनराजा गावी झाला.ते संत नामदेव यांच्या समकालीन होते. संत चोखोबाराय आणि त्यांचे कुटुंब मेहुणराजा गावचे असल्याचे अनेक उल्लेख, संदर्भ त्यांच्या आणि त्यांच्या कुटूंबातील सर्वच सदस्यांच्या अभंगात सापडतात. संत चोखोबारायांच्या जन्माच्या तारिख किंवा तिथीचे थेट पुरावे मात्र ऊपलब्ध नाहीत. मात्र अलीकडील काळात मेहुनराजा येथे संत चोखोबारायांचा जन्मोत्सव सुरु केला आहे. दरवर्षी १४ जानेवारी रोजी मेहुणा गावी संत चोखोबारायांचा जन्मोत्सव साजरा होतो. ही तारीख स्विकारली तर चोखोबारायांचे जन्मवर्ष १४ जानेवारी ११९० हे होय. प्रा.देविदास इथापे यांनी ही तारीख शोधली आहे, असे संदर्भ दिले जात आहेत.संत चोखोबारायांचे निर्वाण शके १२६० गुरुवारी वैशाख वद्य पंचमीला झाले. संत सोयराबाई ज्या चोखोबांची पत्नी होत.त्यांनी आपल्या अभंगात मेहुणराजा गावचा उल्लेख केल्याचा पुरावा उपलब्ध आहे. चोखोबारायांनीही मेहुणपुरीचा केलेला ऊल्लेख हे चोखोबारायांच्या जन्मगावची निश्चिती करनारे ठोस पुरावे म्हनता येतील.
                                    संत सोयराबाईंचा अभंग खालीलप्रमाणे आहे. 
                                    
निर्मळेसी करतां स्नान। कोटी प्रयाग समान।।१।। 
तेथे करितां अन्नदान। स्वयं तुष्टे नारायण।।२।। 
तेथे करिता प्रदक्षिणा। कोटी तीर्थे घडली जाना।।३।। 
ऐसी विख्यात मेहुनपुरी। म्हणे चोखीयाची महारी।।४।।

                           यामुळे संत चोखोबारायांचे जन्मस्थान निर्विवादपणे बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणराजा हे गाव होय. 
                      प्रस्तुत अभंगात जो सुरुवातीला दिला आहे. या चोखोबारायांनी स्वता:च्या समाजाचे वर्णन केले. "या जगात वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत. जगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. या जगात नाना तर्हेचे, प्रकारांचे लोक आहेत. त्यांचे आपण काय गुण दोष वर्णन करावेत? मी ज्या जातीत जन्माला आलो तिला हे जग हीन जात म्हणते. अशा हीन,अनामिक जातीत जन्मलेलो आम्ही आहोत.येथे भाव अभाव आणि  कोण कसा आहे हे सांगता येणार नाही. सर्वच प्रकारचे लोक माझ्या समाजात आहेत. चहाडी लावणारे, चोरी करणारे, भ्रष्ट सगळेच आहेत येथे. माझ्या समाजाच्या पदरी सदैव हिनत्वच आहे. या हिवत्व मानल्या गेलेल्यांच्या संगतीत मीही आहे. त्यामुळे माझेही पीडन शोषण होतेच. चालूच आहे."
                       स्वत:च्या समाजाचे गुणदोषांसहीत वर्णन करणे डिकास्ट माणसाचे लक्षण आहे. संत चोखोबाराय हे वर्णन करुन ते स्वता डिकास्ट असल्याचा पुरावा आपल्याला देतात. त्यांना आजुबाजुला जे दिसते ते लपवावेशे वाटत नाही. ते निर्भिडपणे मांडतात.स्वजातीच्याही उणीवा मांडणारा हा निर्भीड संत होता.  
                      संत चोखोबाराय जातीने 'महार' होते. महार ही जात गांवकुसाबाहेरची अस्पृश्य ठरवलेली जात असल्याने प्रचंड यातनामय जगणे या जातीतील लोकांच्या वाट्याला आलेले होते. सरंजामशाहीत महारांच्या वाट्याला जी कामे दिली गेली होती ती अत्यंत निकृष्ट दर्जाची, अमानवीय स्वरुपाची होती.
                     संत चोखोबारायांचे नाव चोखामेळा हे होय. चोखा आणि मैळा या दोन शब्दांपासुन चोखामेळा हे नाव रुढ़ झाले. मैळा म्हणजे घान, केळकचरा, सडके, कुजके, वास सुटलेले टाकावू घटक होत. म्हणून चोखोबांच्या नावामागे लागलेले मेळा (मैला) हे गावकीची साफसफाई करणारा, घान साफ करणारा, परंपरागत व्यक्ति ह्या अर्थाचे आहे. संत चोखोबाराय संत पदाला पोहचले होते. तर त्यांचा नावामागे आजही मेळा का लावले जाते? गावगाढ्यात ही मैला उचलण्याची कामे अस्पृश्य मानल्या गेलेल्या महार ह्या जातीच्या वाट्याला दिलेली असत. गाव साफ करणे, नाल्या, गटारे साफ करणे, मेलेली जनावरे ओढून नेने, बांधकाम करणे, विहिरी खोदने, रात्रभर गावाबाहेर पाळत ठेवणे, वेसकरकी करणे, मृतांचा सांगावा पाई पळत जाऊन नातेवाईकांच्या गावी सांगणे, लाकडे फोडुन देने, ओझी उचलणे, ह्यांसारखी अनेक हिनत्वदर्शक कामे अस्पृश्यांमध्ये महार ह्या जातीच्या वाट्याला होती. या श्रमाचा मोबदला काय? तर उरलेले शिळेपाके, सडलेले, नासलेले, विटलेले बुरा आलेले अन्न किंवा खराब झालेली किडा लागलेली ज्वारी , बाजरी. 
                      चोखोबारायांच्या नावातील मेळा (मैला) याबद्दल आपण विचार केला. आता चोखोबांच्या नावातील चोखा हा शब्द पाहुया. चोखा म्हणजे स्वच्छ, निर्मळ अर्थात चोख होय. चोखोबा म्हणजे चोख कृती करणारा , अंतकरणातून निर्मळ वागणारा मनुष्य होय. चोखोबारायांचे चोखोबा हे नाव घरच्यांनीच ठेवले होते. या नावाबद्दल एक खोटी कथा सांगितली जाते तिला कुठलाही आधार नाही.बनवाट ब्राम्हणी कथा आहे ती. मैला उचलणारा अस्पृश्य व्यक्ति संत नामदेवांच्यामुळे चोखा (निर्मळ) झाला.
अर्थात जातीव्यवस्थेने संत म्हणून नावलौकीकला पोहलेल्या चोखोबाला पावलोपावली त्रासच दिला. 
                      संत चोखोबारायांच्या जन्माबद्दल काही चमत्कारीक मिथक कथा आहेत.त्या जशाला तशा स्विकारता येत नाहीत. चोखोबारायांच्या जन्माबद्दल एक मिथक कथा अशी आहे की चोखोबारायांचे आई-वडील गावच्या पाटलाने दिलेले आंबे घेऊन पंढरपुरला निघाले होते. हे आंबे विठ्ठलाला अर्पण करण्यासाठी दिले होते. रस्त्यात एक भूकेला ब्राह्मण भेटला तर चोखोबारायांची आई सावित्रीबाईंनी डोक्यावरील टोपल्यातील एक आंबा ब्राम्हणाला दिला. ब्राम्हणाने तो आंबा चोखला आणि आंबट आहे म्हणून त्याने तो परत दिला. सावित्रीबाईंनी तो आंबा पदरात टाकला.सुदामा आणि सावित्री हे जोडपे पंढरपुरात बडव्यांकडे आले, त्यांनी आंबे आणि चिठ्ठी बडव्यांना  दिली. बडव्यांनी आंबे मोजुन पाहिले,एक आंबा कमी भरला. त्याने सुदामा आणि सावित्रीबाईला विचारले सावित्रीबाईंनी हकीकत सांगीतली आणि पदरातील आर्धा चोखलेला आंबा दाखवण्यासाठी पदरात हात घातला तर पदरात आंबा न निघता मुल निघाले. ब्राम्हणाने चोखून दिलेल्या आंब्यापासून झाला म्हणून त्या मुलाचे नाव "चोखा" असे ठेवण्यात आले. 
                ही कथा ब्राह्मण महात्म्य वाढवणारी आहे. शिवाय पदरातुन आंब्यापासून मुल होत नसते. त्यामुळे चोखोबारायांचा जन्म चमत्कारीकरीत्या झालेला नसुन सुदामा आणि सावित्रीबाईंच्या पोटी झालेला आहे. हेच त्यांचे आईवडील आहेत.पदरातील एका छोट्या आंब्यापासून एक मुल तयार होईपर्यंत त्याचे वाढले वजन सावित्रीबाईंच्या लक्षात आले नसेल का ? बडव्यांना समोर चोखुन दिलेला पदरातील आंबा काढुन देताना आचनक आंब्याच्या ऐवजी बाळ हताला लागावे हे न पटनारे अवास्तव वर्णन आहे. शिवाय आपला जन्म 'ब्राह्मणाने चोखून दिलेल्या आंब्यापासून' झाल्याचे चोखोबारायांनी कधीही म्हटलेले नाही. समकालीन इतर संतानीही असे म्हटलेले नाही. एखादी व्यक्ती मोठी झाली, महान झाली की त्या व्यक्तीच्या जीवनचरीत्रात कोण्यान कोण्या रुपाने ब्राह्मण घुसवलाच जातो. ही पुर्वापार चालत आलेली ब्राह्मणी पध्दती आहे. यातून ब्राम्हणांच्या उष्ट्या पासुनही ईश्वर भक्ती करणारे जन्माला येतात असा ब्राम्हण माहात्म्य वाढवणारा ब्राम्हणी डाव आसतो. 
                         संत चोखोबारायांच्या कुटुंबात त्यांची बायको संत सोयराबाई, त्यांचा मुलगा कर्ममेळा, त्यांचा मेव्हणा संत बंका त्यांची बहिण संत निर्मळा शिवाय बंका आणि निर्मळा यांच्या हरि या मुलाचाही ऊल्लेख सापडतो. हे सर्वच्या सर्व कवित्व करीत असत.यांनीही कधीही संत चोखोबाराय आंब्यापासून झाल्याचे म्हटलेले नाही.
                             संत चोखोबारायांच्या अभंगांच्या एकुण रचणांमध्ये सांसरीक शब्द, घरातील वस्तु वगैरे येत नाहीत. त्यामुळे त्यांचे घर कसे होते,याचा फक्त अंदाज बांधावा लागतो. 
                             म्हणून संत चोखोबारायांचा जन्मगाव मेहुणराजा जिल्हा बुलढाणा, त्यांचे आईवडील सुदामा आणि सावित्री. बायको सोयराबाई , मुलगा कर्ममेळा तर बहिण निर्मळा आणि मेव्हणा बंका होत.एवढे ठोस पुराव्यांच्या आधारे आपल्या हाती लागते.एका गुणवान अस्पृश्य कुटुंबाची एवढी नोंदही इतिहासाने ठेवणे मोठेपणाचे आहे. 


                               चोखोबारायांची कर्मकहानी सुरु होते ती मेहुणराजातुन पुढे त्यांचे वास्तव्य असते पंढरपुरात आणि शेवट होतो मंगळवेढ्यात. मध्ययुगीन भारतात एव्हढ्या कठोर अस्पृश्यता आणि जातीव्यवस्थेच्या काळात संत चोखोबारायांसारखे संत आपल्या स्व अस्तित्वाचा, उच्चतम अभिव्यक्तिचा ठसा समाजमनावर उमटवून गेले हे अत्यंत प्रेरणादायी आहे. गुलामीत जगणार्या आणि गुलामगिरीत खितपत पडलेल्या अस्पृश्यांचे नेतृत्व चोखोबाराय आहेत. गुलामांच्या व्यथा जागतिक पटलावर मांडणारे नेते चोखोबाराय होत. जगभरात एव्हढा जुना गुलामगिरीची मांडणी करणारा डोळस नेता क्वचित ठिकाणी सापडेल. भारतात मात्र साडेसातशे वर्षांपुर्वी धार्मिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात गुलाम समाजाचे नेतृत्व करायला चोखोबाराय पुढे आले होते. 'बाप से बेटा सवाई' या उक्तीप्रमाणे 'विद्रोही' नेतृत्व म्हणून कर्ममेळाही आपल्या वडीलांचा वारसा चालवत होते. संत नामदेवांच्या परीस स्पर्शाने संत चोखोबारायांच्या कुटुंबाचे सोने झाले होते. आज संपुर्ण कुटुंब जागतीक पटलावर अजरामर झाले आहे. जगभरातील संशोधक संत चोखोबारायांच्या रचना संदर्भ म्हणून वापरतात. मध्ययुगीन भारतातील अस्पृश्यांची स्थिती, जगणे, वागणे, व्यवहार, लोकजीवन समजून घेण्यासाठी संत चोखोबाराय प्रमुख आहेत. भारतीय जातीव्यवस्था, अस्पृश्यता, गैरबराबरी, विषमता अभ्यासताना संत चोखोबारायांना वगळून ते शक्य होणार नाही. सर्वात मोठे पुरावे, मोठे संचीत संत चोखोबारायांनी देऊन ठेवले आहे.


नितीन सावंत परभणी 
9970744142

Thursday, 6 January 2022

♦️संत चोखोबारायांचे चरित्र प्रकरण ६ वे ll धर्माच्या दलालांचा त्रास .. ll

 ♦️संत चोखोबारायांचे चरित्र 
            प्रकरण ६ वे

 ll धर्माच्या दलालांचा त्रास .. ll 

धाव घाली विठु आता चालु नको मंद ।
बडवे मज मारिती काय अपराध ।
विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला ।
शिव्या देऊनी म्हारा म्हणती देव कां बाटवला ।
आहोजी महाराज तुमचे द्वारीचा कुतरा  
नकाजी मोकलूं चक्रपाणी जीमेदारा ||
जोडोनीया कर चोखा विनवितो देवा ।
बोलिलो उत्तरे परि राग नसावा ।
              - संत चोखोबाराय 
              
                         संत चोखोबाराय नामदेवांच्या वारकरी, भागवत धर्माच्या कार्याने प्रेरीत होऊन पंढरपुरात स्थाईक झाले होते.आपली बहिण निर्मळा आणि मेव्हणा बंका मेहुणपुरीतच ठेवून चोखोबा आपल्या बायकोला म्हणजे सोयराबाई यांना घेऊन पंढरपुरी कायमचे स्थाईक झाले होते. पुढील काळात ते नामदेवांच्या सहवासातून अभंग निर्मिती करू लागले. यातून संत चोखोबारायांना सर्वच वारकरी संतांनी स्विकारले, सामावून घेतले होते. परंतू वारकरी संत मंडळ वगळता इतरांनी मात्र चोखोबारायांची शेवटपर्यंत दैनाच केली. अस्पृश्य आणि महार म्हणून त्यांची मानहानी, टिंगलटवाळी सदैव होत राहिली. चोखोबा अभंग गाताहेत, भजने म्हणत आहेत. ते पांडुरंग भक्ती करत आहेत म्हणुन काही कुणाचेही हृदय समतावादी बनले नाही. नामदेवांचे सहकरी संत मंडळ सोडता बाकीचे लोक चोखोबांना उष्टे खायला भाग पाडत हाते, हे चोखोबारायांच्या एकुण अभंगांवरून समजून येते.त्यांच्याशी भेदभाव आणि जातीवाद शेवटपर्यंत होत राहिल्याचे आपल्याला दिसुन येते.अस्पृश्यतेची दैना , कलंक , महारोग काही मरेपर्यंत चोखोबांचा सुटला नाही.संत मंडळाच्या सहवासात एक आत्मीक सुख मिळाले , गुलामीची जानीव झाले एवढेच ते काय. 
                    नामदेवांच्या शिकवणीतून चोखोबा अस्पृश्यतेविरूध्द मत व्यक्त करायला लागले होते. त्यांनी समतेचा अग्रह धरला होता. ते दररोज विठ्ठल मंदिरासमोर जावून अंगणातून विठ्ठलाला डोळे भरून पाहत असत. त्या विठ्ठल मंदिरातील अंगणातील दिपमाळेसमोरून नामदेवांचा  किंवा स्वरचीत एखादा आभंग म्हणत असत. पुर्वी संत चोखामेळा जिथुन उभे राहुन विठ्ठलाला हात जोडत तिथून विठ्ल अगदी स्पष्ट दिसत असे. नंतरच्या काळात पुढचे बांधकाम करुन घेऊन विठ्ठल आनखी बंदिस्त केला गेला.या संदर्भात तशी मांडणी सुध्दा झालेली आहे. शिवाय, चोखामेळा यांनी अंगणात उभे राहुनच विठ्ठलाचे वर्णन केल्याचे अनेक अभंग आहेत. म्हणेजच अंगणातून विठ्ठल सहजरित्या दिसत असे. संत चोखोबाराय विठ्ठल मंदिरात गेले का नही? तर ते स्वतः कुठल्याही अभंगात मी मंदिरात गेलो असे म्हणत नाहीत. ते अनेक अभंगात
                
"गहिवरुनी, चोखा उभा महाद्वारि ।
विनवी जोडूनि करी विठ्ठोबासी"॥

महाद्वारातच उभे असल्याचे वर्णन करतात. जसे की 

म्हणे मज काहीच न कळे |
उगाची मी लोळे महाद्वारि ||

                        संत चोखाबारायांना मंदिरात प्रवेश नव्हता. "शिंपी या सवर्ण जातीत जन्मलेल्या संत नामदेव महाराजांनाच जर औंढ्याचे (जिल्हा हिंगोली) ब्राम्हण हलक्या जातीच्या म्हणून मंदीरातून बोहर काढत असतील तर चोखोबा जाणून बुजून त्यांच्या धर्मशास्त्राप्रमाणे अस्पश्य". त्यामुळे संत चोखोबाराय स्वता कधीही मंदिरात गेले नाहीत.तसे धाडस करण्याजोगा तो काळही नव्हता. 
                        त्यावेळी विठ्ठल मंदिराचे पुजरी बडवे ब्राम्हण होते. ते ब्राम्हण असल्याने जातीव्यवस्था , अस्पृश्यतेचे कट्टर समर्थक तथा कडवे धर्माभिमानी होते.त्यांनीच वेळोवेळी संत चोखोबारायांना मंदिरात येऊ दिले नाही.आणि काहीही खुसपटे काढुन सतत त्रास दिला.उलट ह्या चोखामेळ्याने परत मंदिरासमोर सुध्दा दिसू नये म्हणून त्यांनी चोखोबारायांवर देव बाटवला म्हणून आळ घातला. आणि त्यांना प्रचंड मारहाण केली.
                       आधी बदनामी केली.परत येथे दिसु नकोस म्हणून तंबी सुद्धा दिली.एवढ्यावर संत चोखोबाराय ऐकायला तयार नाहीत म्हणून मग विठ्ठलाचा हार संत चोखोबारायांनी चोरला हा आरोप लावून विठ्ठल मंदिरातील ब्राम्हणांनी त्यांना मारहाण केली. एकदा बैलांना जुंपुन फरपटत नेल्याची शिक्षाही ब्राम्हणांनी दिली होती.या शिक्षेचा उल्लेख संत सोयराबाई यांच्या अभंगात सापडतो.
                        परत संत चोखोबारायांनी मंदिराच्या परिसरातही दिसू नये. त्यांनी विठ्ठल मंदिरासमोर येऊन भजन म्हणू नये असा यामागचा धर्मपुरोहितांचा उद्देश होता. लोकप्रिय होत चाललेल्या संत जनाबाईंवर सुध्दा विठ्ठलाचे पदक चोरल्याच्या आरोपावरून ४० ब्राह्मणांनी जनाबाईंना घरात जाऊन बाहेर काढले होते. आशाच प्रकारचा चोखोबारायांना बदनाम करणारा चोरिचा आळ घालण्यात आला. या मंदिरासमोर लोक जमवून चोरीच्या आरोपाखाली संत चोखोबारायांना मारहाण करण्यात आली.त्यानंतर तु परत या परिसरात दिसलात तर याद राख अशी तंबीही देण्यात आली. नंतर चोखोबारायांना मुळ पंढरपूरातून हाकलून लावण्यात आले. चोखोबाराय
सोयराबाईंसह चंद्रभागेच्या पलिकडच्या तिरावर जावून
झोपडी बांधून रहायला लागले. तिथुन सतत विठ्ठल मंदिर दिसावे. वाळवंटात होणारे संत मेळावे दिसावेत, त्यात सहभागी होता यावे यामागचा त्यांचा उद्देश होता. संत चोखोबारायांनी चंद्रभागेच्या पलिकडे एक दिपमाळ बांधली होती. हि दिपमाळ १९६९ पर्यंत होती. स. भा. कदम यांनी जी अभंगगाथा प्रकाशीत केली होती त्यात त्या दिपमाळेचा फोटो होता. नंतर जमिनीचा ताबा बदलल्याने चोखोबारायांची शेवटची निशानिही जमीनदोस्त केली गेली .
                        आशा प्रकारे संत नामदेवांच्या संत मंडळात एकोप्याने , गुण्यागोविंदाने रहाणाऱ्या चोखोबारायांना बडव्यांनी मारले. गावातून हकलून दिले. एका अस्पृश्याने अभंग रचावेत हे त्या काळात न पचनारी गोष्ट होती. म्हणून खोटे आरोप लावून चोखोबारायांची प्रतिमा जनमानसात मलिन करण्याचा प्रयत्न पंढरपुरातील पुरोहित वर्ग करत होता. आणि  चोखोबाराय मात्र सहन करत होते. त्यांनी भक्तीचा मार्ग सोडला नाही. राहण्याची जागा मात्र बदलावी लागली.
                          चोखोबाराय नदीपल्ल्याड रहायला गेल्याने सर्व संत मंडळी त्यांना भेटायला नदीपल्याड जायला - यायला लागले. सर्वांचा चोखोबांशी प्रेमाचा धागा आनखी मजबुत होत गेला. पर्यायाने चोखोबा पंढरपुर परिसरात अणखी लोकप्रिय होत गेले.संत मंडळाच्या सहभोजनाच्या पंगतीच संत चोखोबारायांच्या अंगणात बसायला लागल्या आणि नामदेवादी संत मंडळाने प्रचार सुरु केला ही चोखोबांच्या घरी साक्षात विठ्ठल जेवायला येतो.यातून ब्राम्हणांचा तिळपापड होने साहजिकच होते.आशाप्रकारे अभिव्यक्ती दाबु पहाणाऱ्या चोखोबांना आनखी प्रसिध्दी मिळत गेली.ते पंढरपूरात चर्चेचा विषय बनले. 
                   संत चोखोबाराय स्वभावाने अत्यंत विनयशील होते.ते बोलताना शब्द सांभाळून वापरत असत.वरिल अभंगात ते विठ्ठालाला आपली तक्रार सांगत आहेत.ती तक्रार सांगतानाही त्यांनी विनयशीलता सोडलेली नाही." हे विठ्ठला हे बडवे मला मारत आहेत.तु धाव मला वाचव.यांनी माझ्यावर तुझा हार चोरल्याचा आरोप केलेला आहे.आरे पांडुरंगा माझी किंमत ती किती रे शेवटी आम्ही अस्पृश्य म्हणजे तुमच्या दारातील कुत्रेच.माझ्या तक्रारीचा राग येवु देवु नकोस.माझी विनवनी आहे की या बडव्यांकडे बघ जरा.माझ्यावर खोटा आळ घेत आहेत." 
                         अस्पृश्य आणि कलंकित जीवन वाट्याला आलेल्या समुदायाला त्याकाळी जी जी , व्हाय जी  म्हणूनच बोलावे लागत असे.त्यांना विनयशीलता सोडता येत नसे.एखादा शब्दही वाकडा गेला तर भयानक शिक्षेला सामोरे जावे लागे.गावकीत मिळणारी मदत मिळणे बंद होई .वाळीत टाकले जाई , वस्ती जाळली जाई. आजही गावखेड्यात जातींचे नावे घेवू हे माजलेत ते माजलेत जाहिर म्हटले जाते.वाळीत टाकल्याच्या घटना तर नेहमीच घडतात.म्हणून अस्पृश्य आणि भटक्या जातींना आदब विनयशीलता सोडता येत नसे.ही विनयशीलताही गुलामगिरीतून आलेली होती.तीच मुजबुरी आणि काळाच्या मर्यादा वारंवार चोखोबारायांच्या अभंगात दिसत आहेत.

नितीन सावंत परभणी 
9970744142

Monday, 3 January 2022

भिमा कोरेगाव रणसंग्राम एक जोडनारा दुवा ....

भिमा कोरेगाव रणसंग्राम एक जोडनारा दुवा .... 

जय भारत ,

उद्याच्या १ जानेवारीला भिमा कोरेगावच्या रनसंग्रामाला २०१ वर्षे पुर्ण होत आहेत.१ जानेवारी १८१८ रोजी रंगेल पेशवाई बुडवून पाचशे महार बटालियन नी ब्राम्हणी दहशद संपविली होती.हि ब्राम्हणी दहशत पेशवाईच्या रुपाने महाराष्ट्राच्या छाताडावर कित्तेक वर्षे नाचत होती.हि पेशवाई शिवशाहीतील शिवशक बंद करुन फसली शक सुरु करून कार्यरत होती.शिवशाहीतले छत्रपती पद नामधारी बनवून तथा काही छत्रपतींचा खुन करवून तर काही छत्रपतींना वेडे ठरवून पेशवाई पुण्यात घटकंचुकीचे खेळ खेळत होती.आपल्या मस्तिनीच्या पोराला हिंदू करायचा की मुस्लिम करायचा याच्या चिंतेत होमहवन करनारी पेशवाई ब्राम्हणांच्या कल्याणाच्या बाहेर विचार कधी करु शकलेली नव्हती.प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहीलेल्या ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास वाचावा ते म्हणतात 
*पुण्यात नग्न बायकांच्या धावण्याच्या शर्यती लावल्या जायच्या आणि त्यात प्रथम आलेल्यांना योग्य बक्षीस द्यायला स्वता पेशवे हजर असत*

ज्या शिवरायांनी परस्त्रीला मातेसमान मानले त्या पेशव्यांनी स्त्रीयांची अब्रू वेशीला टांगली.म्हणून शिवप्रेमींनी शिवशाही आणि पेशवाईतला फरक समजून घ्यावा.पेशव्यांच्या रंगेल चाळ्यांबद्दल आजही बाजारपेठेत कित्तेक पुस्तके उपलब्ध आहेत. पायपोस किमतीचे पेशवे पुस्तक तर आवर्जून वाचणीय आहे.पुष्पा भावे यांनी सुद्धा या विषयावर लिहीलेले आहे.  

पेशव्यांच्या जुलमाबद्दल तर सर्वांना ज्ञातच आहे की पुण्यात अस्पृश्यांसाठी शिरण्याची वेळ फक्त दुपार होती.त्यात कमरेला झाडू आणि गळ्यात मडके असे ठरलेले होते. अस्पृश्यांचे काय घेवून बसलात,पेशवाई संपल्यानंतर सुद्धा अस्पृश्य नसलेल्या जोतीराव फुलेंना लग्नाच्या वरातीतून हाकलून दिले गेले.म्हणजे यावरून पेशवाई काय होती याचा आंदाज बांधता येइल.देशाचे दुश्मन नावाच्या पुस्तकात दिनकरराव जवळकर यांनी पेशवे माणसांच्या मुडक्याचा चेंडू करून गुलटेकडीच्या मागे खेळत असल्याचाही उल्लेख आहे. 
शिवरायांनी मात्र शत्रूच्या उडवलेल्या मुंडक्याची सुद्धा समाधी बांधली.

पेशवाईत तुकोबारायांचे नाव ठेवायला आणि नाव घ्यायला बंदी होती.पुण्या जवळील एका गावातील कीर्तनकाराने किर्तनात तुकोबारायंचा अभंग घेतला म्हणून पेशव्यांनी तिथे जावून चालू किर्तनात किर्तनकारांच्या कानसुल्यात दिली होती.म्हणजे ही पेशवाई काही फक्त अस्पृश्य वर्गालाच जाचक होती असे नव्हे.

शिवरायांनी मात्र किर्तनातून प्रबोधन करनाऱ्या तुकोबारायांना सिक्युरिटी म्हणून दोन चोपदार दिले होते.गुरु मानले होते .
व्यापाऱ्यांसाठी शिवरायांनी गडावर बाजारपेठ वसवली होती याउलट पुण्यात पेशव्यांनी व्यापार करनाऱ्या सोनारांनी आमच्यासारखे धोतरे का नेसली म्हणून त्यांना शिक्षा केल्याचे उदाहरण उपलब्ध आहे.

म्हणून पेशवाई ही फक्त अतिशुद्रांनाच त्रासदायक होती असे कुणी समजू नये. आजचे सवर्ण म्हणजे obc,मराठा, तसेच कीर्तनकार सोनार ,माळी सर्वजण पेशव्यांच्या उत्पाताला कंटाळलेले होते.म्हणून शिवशाही नव्हे पेशवाई बुडाली आणि ही पेशवाई बुडाल्याचा आनंद सर्वांनी व्यक्त केलेला आहे.फुले पेशवाई बुडवून आलेल्या इंग्रजांच्या राज्याचे स्वागत करतात ते म्हणतात. 
जोपर्यंत इंग्रज मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत शुद्रातीशुद्रांनी जल्दी करावी आणि शिकून घ्यावे. 

जेधे जवळकर सुद्धा पेशवाई बुडाल्याचे स्वागत करत असत.म्हणून विनाकारण आज पेशवाईत कुनाचा जीव असण्याचे कारण नाही.ज्यांना पेशवाई हवी आहे त्यांना ती लखलाभ ...

ब्राम्हणेतर वर्गाने भिमाकोरेगावचा रणसंग्राम इंग्रज विरूध्द मराठे असा समजू नये.तो संघर्ष पेशवे विरूध्द पाचशे महार बटालियन असाच आहे.आणि ते वास्तव आहे. 

म्हणून भिमा कोरेगावाच्या रनसंग्रामाच्या दोनशे एक वर्षाच्या निमीत्ताने होत असलेल्या सोहळ्याच्या सर्वांना शुभेच्छा.या  भिमा कोरेगावला  बाबासाहेबांनी  सुद्धा आपली हजेरी लावलेली आहे.म्हणून 
आर्थिक सर्वहरा आणि सामाजिक सर्वहरा यांना जोडनारा हा सोहळा बनायला हवा. 
वढू बुद्रूक येथील ज्या समाधीचे विद्रूपीकरण केले गेले आहे,ते गोविंद गायकवाड होत.प्राच्यविद्यापंडित कॉ शरद पाटील त्यांची नोंद गोविंद गोपाळ नावे करतात. ते ढगोजी मंगोजी या सांप्रदायाचे असल्याचे सांगतात.त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार केल्याचे ते नमूद करतात. म्हणजे हा भिमा कोरेगावचा रणसंग्राम छत्रपती संभाजी महाराजांच्या आपमानाचा आणि हत्येचा बदला घेनारा प्रेरणादायी इतिहास म्हणून आम्ही बघतो ......

सर्वांना भिमाकोरेगाव शौर्यदिनाच्या शुभेच्छा ... 

नितीन सावंत,परभणी
राष्ट्रीय संसदप्रमुख 
मानव मुक्ती मिशन 
9970744142

♦♦♦♦♦♦♦♦♦♦

♦️संत चोखोबारायांचे चरित्र l प्रकरण ८ वे ll धन्य धन्य नामदेव... ll

♦️संत चोखोबारायांचे चरित्र
            प्रकरण ८ वे 

         ll धन्य धन्य नामदेव... ll

धन्य धन्य नामदेव । माझा निरसला भेव ।।१।।
विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी । खुण सांगितली निर्धारी ।।२।।
ठेवोनी माथां हात । दिले माझें मज हित ।।३।।
दावियेले तारू। चोख्या म्हणे माझा गुरु।।४।।
                     - संत चोखोबाराय
                      
                    संत चोखोबारायांच्या नवीन उपलब्धीसह एकुन ३५८ अभंगापैकी एकुन ३२ अभंगात संत चोखोबारायांनी संत नामदेव यांचे गुणगान केले आहे. नामदेवांचा सर्वांत मोठा प्रभाव संत चोखोबारांवर होता.नामदेवांचा सहवास चोखोबारायांचा उद्धार करणारा ठरल्याने चोखोबाराय वारंवार नामदेवांचे ऋण व्यक्त करतात. त्यांनी हे केलेले नामदेवाचे गुणगान धन्यवाद व्यक्त करणारे आहे.नामदेवांच्यामुळेच संत चोखोबारायांना माणुसपणाचा दर्जा मिळाला होता. नव्याने जगण्याची प्रेरणा संत नामदेवानी चोखोबारायांना दिली होती.
संत चोखोबारायांच्या जिवनाचे शिल्पकारच संत नामदेव होते. संत नामदेवाचे मोठेपण सांगताना अनेक उदाहरणे देत चोखोबा व्यक्त होतात. नामदेवाचे वर्णन करताना चोखोबाराय उत्साही आनंदी असल्याचे दिसते. ते म्हणतात ''संध्याकाळी बाजार बंद व्हायच्या वेळेला गिर्हाईक निघुन जाते हा नवलाचा प्रसंग मला नामदेवांच्या शिकवणीतून बघायला मिळाला आहे. " म्हणजे काय तर आयुष्याच्या मावळतीला तुमच्या ऊभ्या केलेल्या वैभवाच्या बाजाराला तुम्हाला कोणीही विचारत नाही. सर्वजन सोडुन जातात.
आपले सुख आपणच भोगावे, वेडगळांना ह्या सुखाच्या गोष्टी सांगून काय फायदा. ज्यांच्या मनात भाव नाही त्यांना अख्खे जग ओस पडलेले असते. हे सर्व ज्ञान मला सुजान नामदेवांच्यामुळे झाले आहे."
"सर्वत्र संचार करणारे मन, एकत्र आणि एकचित्त कसे ठेवायचे हे संत नामदेवानी शिकवीले आहे.आणि आज ते फळा आले आहे." असे संत चोखोबाराय विविध अभंगात आपले मत व्यक्त करताना दिसतात.पुढे ते म्हणतात " मला सुख जर कोणी दाखविले असेल तर तर ते संत नामदेवांनी,त्यांच्याकृपेमुळे मी पावन झालो आहे. मला तर नवल वाटत आहे की ह्रदयातच त्यांनी देव दाखवीला. नामदेवांच्यामुळेच मला जगण्याचे बळ मिळाले आहे. हे नामदेवा तुम्ही मला हा सुखाचा आनंद सोहळा दाखवीलात. तुमच्या प्रेमाच्या या वर्षावाने मी पुरता गुदमरलो आहे. मला तोंडातून शब्द फुटत नाहीत. हे गुरुवर्या नामदेवा आपण धन्य आहात माझ्या जिवनातला अंधकारच तुमच्यामुळे दुर झाला आहे."
                   एका अस्पृश्य व्यक्तीला त्यांच्या कुटुंबियांच्यासह आपल्या संत मंडळात दाखल करुन घेने , सर्वांच्या बरोबरीला बसवने , तसी बरोबरीची वागणूक देने हे खरच मोठपणाचे आणि क्रांतिकारी काम संत नामदेवांनी केले होते. वैदिक ब्राम्हणवाद्यांच्या दबावाला , विरोधाला आणि छळाला न जुमानता संत नामदेवांचे समतावादी संत मंडळ संत चोखोबारायांच्या घरी सहभोजन करत होते.ह्या सर्व गोस्टी बघुन संत चोखोबाराय भारावून गेले होते. म्हणून  संत नामदेवांचे एवढे गुणगान करताना चोखोबाराय सर्वोच्च उपाधी वापरतात ती आईची.

"चोखा म्हणे तुम्ही माय हो माऊली।
कृपेची सावली नामदेव।।

आई पेक्षा मोठी उपाधी काय असु शकेल.संत चोखोबारायांना संत नामदेव आई प्रमाणे वाटतात.इतका जीव संत चोखोबारायांचा संत नामदेवांवर होता.
संत नामदेवांनी उपकार केल्याची भावना चोखोबांची आहे ते म्हणतात
" नामदेवें आजी उपकार केला ।
हाटाचा हाट चौबारा ठेला ।।

             संत नामदेवांच्यामुळे संत चोखोबारायांना संत मंडळात जागा मिळाली. सर्व संत चोखोबारायांना आदराने वागवायला लागले. संत मंडळात जातिभेद अस्पृश्यतेला थाराच नसल्यामुळे सर्व संत चोखोबारायांच्या झोपडीसमोर एकत्र जेवायला बसत असत.अख्खे जग ज्याला दुर हो म्हणत आहे, ज्याचा विटाळ मानला जातो, ज्याचा तिरस्कार केला जातो आशा व्यक्तीला संत नामदेवांच्या अनुग्रहामुळे एक नवे जीवन मिळले. नामदेवांच्यामुळे सर्व संत चोखोबारायांना सामावून होत असतील तर संत मंडळातील नामदेवांचे मुख्य नेतृत्व आधोरेखीत होते.
या गोष्टीचा आनंद हर्ष चोखोबारायांना होने नैसर्गिकच आहे.हे नवल, हा आनंद कुणाला सांगावे असे चोखोबारायांना झाले आहे. नामदेवांचे पाय जन्मोजन्मी धरून ठेवावे असे त्यांना वाटते. नामदेवांची भेट होने चोखोबारायांना सोन्याचा दिवस वाटतो. या भल्या नामदेवाने मला व्यापक अनुभव दिला असे चोखोबांचे म्हणने आहे ऐके ठिकाणी त्यांनी 'सुजान' ही उपाधी वापरली आहे.खरच मध्ययुगीन भारतात नामदेवच सुजान होते.ऐवढे आर्त, गोड, भरभरून, व्यापक नामदेवांचे वर्णन केल्यानंतर संत चोखोबाराय म्हणतात

'म्हणोनी नामयाचे धरियेले पाय ।
आठविता होय समाधान ।।
'चोखा म्हणे माझा नामदेव प्राण ।
घालीन लोटांगण जीवें भावे ।।

                        संत नामदेवांना आपल्या प्राणापेक्षाही चोखोबाराय मोठे मानतात. त्यांना जीवेभावे लोटांगण घालीन असे चोखोबा म्हणतात.
संत नामदेवांच्याबद्दल प्रगट केलेल्या या आदरभावात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो चोखोबारायांच्या गुरुचा. संत चोखोबारायांनी तिन अभंगात माझे गुरू नामदेवच असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे संत चोखोबारायांचे गुरू 'संत नामदेव होते.

'न करी न करी आनिक साधन।
नामयाने खुण सांगितली ।।
संसार सागर भरला दुस्तर ।
तारक निर्धार विठ्ठल हा मंत्राचा ll
मंत्र त्रिअक्षरी सोपा ।
तुटताती खेपा जन्म मरण ll
चोखा म्हणे माझा धन्य गुरुराव ।
दाखवीला देव ह्रदयी माझ्या ।।

                   संत चोखोबारायांच्या हिनदिन जीवनात ज्ञानाचा, समतेचा प्रकाश घेऊन जाणारे नामदेव होत.
नामदेवांच्यामुळे संत चोखोबाराय आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला अभिव्यक्त होता आले. एवढे महान काम करणारे नामदेव मात्र उच्चजातवर्गीयांनी उपेक्षितच ठेवलेले आहेत.नामदेवांचे महत्व कमी करण्यासाठी त्यांना उपेक्षेच्या खाईत लोटले. तरीही त्या काळात आपल्या जीवनात ज्ञान प्रकाश उधळणारा नामदेव संत चोखोबारायांनी चित्रीत करून ठेवला आहे. संत चोखोबारायांच्या साहित्तिक विश्वास संत नामदेव जीवंत आहेत. संत नामदेवही संत चोखोबांना जिवाभावाचा मानत असत.संत चोखोबारायांच्या मृत्युनंतर त्यांच्या आस्थी मंगळवेढ्यातील वेशीच्या ढिगार्यातून काढून पंढरपुरात विठ्ठलाच्या पायरीसमोर अजरामर होणारी चोखोबांची समाधी बांधणारे संत नामदेवच होते. संत चोखोबारायांना सर्व वारकर्यांच्या नजरेसमोर सदैव ठेवण्याचे महत्वाचे काम नामदेवांचेच. संत नामदेवांच्यामुळे वारकऱ्यांचा गणपती चोखोबाराय बनले.संत चोखोबारायांच्या समाधीच्या दर्शनाशिवाय मुख्य विठोबाचे दर्शन होत नाही.याचे श्रेय संत नामदेवांना जाते.संत चोखोबारायांचा सर्वात मोठा सन्मान संत नामदेवांनीच केला.
संत नामदेव चोखोबारायांबद्दल म्हणतात.

"चोखा माझा जी चोखा माझा भाव ।
कुळधर्म देव चोखा माझा ।।
काय त्याची भक्ती काय त्याची शक्ती ।
मी हि आलों व्यक्ती तयासाठी ।
माझिया चोखियाचे करिती जे ध्यान ।
तया कधी विघ्न घडो नेदी ।।
नामदेवें आस्थि आणिल्या पारखोनी ।
घेत चक्रपाणी पितांबरी ।।

आशाप्रकारे संत चोखोबारायांचे उद्धारकर्ते , मार्गदर्शक आणि गुरु संत नामदेव होत.

नितीन सावंत परभणी
9970744142
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️

Sunday, 2 January 2022

♦चला आपण आपली पत घालवू ♦

 ♦चला आपण आपली पत घालवू ♦

नितीन सावंत, परभणी 
9970744142

सध्याला ब्राम्हणी बुद्धीजीवी,बनिया भांडवलदार जातवर्ग आणि उच्चभ्रू मिरासदार जातवर्गाचे दिवस आलेले आहेत.त्यांच्याकडूनच शेतकरी,कष्टकरी भिकेला लावने चालू आहे.यात ग्रामीण भागातील शेतकरी अत्यंत बिकट अवस्थेत सापडलेला आहे.पुर्वीचे वाडवडीलांचे वैभव गेलेले आहे.मोठ्या जमीनीचे तुकडे होत होत ही शेतजमीन वाटुन वाटुन गुंठ्यांवर आली आहे.ज्या वाड्यात एक किंवा दोन घरे रहायची ते वाडे मधेच वाटण्या करुन करुन, प्रत्येकाच्या वाट्याला पाच पाच खनाची जोडणी आली आहे.
आशा वेळेला जुना सरंजामी बाज सोडुन,तोरेताठे आणि मिरवणे सोडुन शेतकरी वर्गाने आपल्या प्रगतीचे पहायला हवे. पण नेमके तसे करण्याचा विचार केला की *पत* आडवी येते. 
खेड्यात सर्वात जास्त भिती असते ती चार चौघात *पत* जाण्याची.बापजाद्यांचा एक दरारा होता आपण तो कसा मोडावा.त्यांची कमवलेली *पत*आपन कशी घालवावी.पत गेली म्हणजे राहिलेच काय ? वगैरे. हिंदीत हरिशंकर परसाई यांची दोन नाक वाले लोग ही हस्यव्यंग रचना आहे.ती अशीच पत जाने सारखी रचना आहे.म्हणजे हिंदीत नाक कटते तर मराठीत पत जाते असे म्हनता येइल. 
बरे ही पत जाते तरी कशाने ? तर 
शेतातून डोक्यावर जाळन आनल्याने,स्वत: पाणी भरल्याने, महिला दुकानात गेल्याने,गिरणीत गेल्याने,कोर्टाची पायरी चढल्याने,पोलीसस्टेशनला गेल्याने,घरी चौकशीसाठी पोलीस आल्याने,पोटजात मोडुन विवाह केल्याने,विधवेवा पुनर्विवाह लावुन दिल्याने,गरिबांनी मोठ्यांना उलटून बोलल्याने,हुंडा कमी घेतल्याने किंवा घेतलाच नाही तर, लग्नात खर्च कमी केल्यास म्हणजे लग्न हालके केल्यास,घरच्या महिलांच्या अंगावर दागीने नसल्याने,महिला बाजारात गेल्याने किंवा परगावी एकटी गेल्यास,स्त्री पुरुषांना जास्त सलगीने बोलल्यास,नवऱ्याला चार चौघात बोलल्यास,स्त्रीने कोर्टात साक्ष दिल्यास,निवडणूक हरल्यास,मुलींनी तमाशा पाहिल्यास ,दान धर्म न केल्यास, अखंड हरिनाम सप्ताहची पट्टी न फाडल्यास,वर्गनी न दिल्यास,सण मोठा न केल्यास किंवा साजरा न केल्यास, देव देव न करने,उपास न धरने,नास्तिकता बाळगणे,मटण खाने,ब्राम्हणी व्यवस्थेने हलक्या मानलेल्या जातींच्यांना घरी बोलवल्याने, त्यांच्याशी नेहमी संपर्क ठेवल्याने,त्यांची मदत घेतल्याने,शेजारी पाजारी वाटी घेवून भाजी मागल्याने, पाहुणे आल्यास घरी ट्रे नसने,एकाच रंगाचे किंवा डिझाइनचे कप नसने,घर बांधलेले नसने,अशी पत जाणारी खुप मोठी कारणे आहेत.ज्यामुळे आपली पत जावू शकते . 
आता या पत जाणाऱ्या गोस्टी पाहिल्या तर त्या अगदी किरकोळ आहेत.अगदी शुल्लक,पण तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा छोट्याशा पत जाण्यामुळेच कित्तेकांनी आत्महत्या केलेल्या आहेत.काही जन तर सहकुटुंब आत्महत्येचा मार्ग आवलंबतात.पत जाण्यापेक्षाही नाक जाने हा प्रकार तर खुप भयानक आहे.
लक्षदेवून बघा प्रत्येक गावात बाहेरून आलेली चार दोन पाहुण्यांची घरे प्रगती करतात श्रीमंत असतात किंवा खाऊन पिऊन टामटुम असतात.असे का ? तर ते पत नावाच्या प्रकारात जास्त आडकत नाहीत.ते कुनालाही न जुमानता पत बित न पाळता प्रगती करतात.पण ज्यांना मोठी भाऊकी आसते,गोतावळा असतो ते मात्र या पतीत अडकतात.म्हणून पत ही प्रगतीला रोखुन धरते.
म्हणजे पत जाने चांगले असते.एकदा का पत गेली की प्रगतीचा मार्ग खुला होतो. आपल्यावरचे लोकांचे लक्ष ठेवण्याचे ओझे कमी होते.पत गेलीच पाहिजे.ग्रामीण भागाच्या अधोगतीला भावुकी आणि ही पतच जबाबदार आहे. 
चला एकदा आपन ही पत घालवूच.
लोक म्हतात शेतात खत नाही, गावात पत नाही आणि बाजारात ऐपत नाही.
माझे म्हनणे आहे खताचे आणि ऐपतीचे ठिक आहे पन पत काय चाटायचीय का ?

नितीन सावंत 
परभणी 
७/१/ २०१७