Wednesday, 15 November 2017

ll सर्वहरांचे नायक ll

येथल्या ब्राम्हणी व्यवस्थेने माणुस म्हणून त्यांच्या जगण्याची सर्व साधने हिसकावून घेतली होती . आपल्याला हिशोबशीर धर्म निर्माण करुन त्याचे धर्मपुस्तकही त्यांनी काढले होते . त्याद्वारे ते कारभार करत . आपल्या जगण्याची सर्व साधने हिसकावून घेतलेली हडामासांची माणसासारखी माणसे पाच नव्हे दहा नव्हे हजारो वर्षे मेलेल्या जनावरांचे मांस खात होते .

कार्यकतृत्व सुद्धा आम्हीच गाजवनार , कलाकारी आदाकारी आमचीच मक्तेदारी ज्ञानभांडाराच्या चाव्या आमच्याच जानव्याला म्हननार्या जात्यांध वर्गाने या देशाचे सांस्कृतिक कुपोषण केले .

तरी आमच्या माणसांनी आपली कलाकारी आदाकारी दाखवलीच . त्यांनी आपला जीव धोक्यात घालून अस्वलाशी मैत्री केली त्याला आपल्या रोजीरोटीचे साधन बनवले . माकडालाही माणुसकी आली आणि तो गरिबांना कमाई करुन देवू लागला. मंद नवऱ्याला बायकोचा नंदीबैल  म्हटले जाते . पन स्वताला संस्कृती चालक म्हनवनार्या ब्राम्हणांच्यापेक्षा  नंदीबैल बरे . ते सुद्धा परोपकार करतात एकदोन कुटुंबे निस्वार्थीपने जगवतो तो नंदीबैल .
लखाई , जाखाई , जोखाई , मरीआई जा जागर करनारा आंगावर फटके मारुन घेनारा आमचा पोतराजही या ब्राम्हणी कालखंडात टिकून राहिला कसातरी जगला .
किती पिढ्या बरबाद झाल्या .

शिक्षणापासून वंचित ठेवले गेले . जानीवपुर्वक लोक भिके कंगाल केले गेले . देशाचा विकासाच होऊ दिला गेला नाही . या देशात हजारो चार्ली चापलीन राईंदर , बहुरूपी म्हणून रस्त्याने आपले दुखाश्रृ पुसत लोकांना हसवत फिरत आहेत . कुठलीही सेवा सुविधा साधने न देता उलट त्यांची रोजीरोटी हुसकावून घेवून सुद्धा आमचे लोक कलाकारितेत ब्राम्हणांच्या पेक्षा सरसच राहिलेले आहेत . स्पर्धा बरोबरीत लावावी आम्हाला हाजारो वर्षे मागे फेकले आहे . तरी आम्हीच भारी . मेलेल्या प्राण्यांच्या कातड्यावर आम्ही हजारो धुन बनवल्या, गायल्या . लग्नातल्या घोगर गळ्याच्या मंगळाष्टीकेशिवाय ब्राम्हणांना येतेच काय ?

उडत्या पक्षाला एका निशान्यात पाडनारे , चपळ सस्याला सुद्धा हाताने पकडनारे पोरे आमच्या पारध्या कैकाड्यात आहेत .पन हे आमचे एकलव्य स्पर्धेबाहेरच . तेव्हा  तुमचे द्रोणाचार्य पुरस्कार तुम्हालाच लखलाभ ...

लोहहृदयाच्या काळ्याभोर दगडावर मनगटे झिजवत पिढ्यानपिढ्या कोरल्यात बुद्ध लेण्या आमच्या बापांनी. नवनिर्मिती आइतखाऊंची नाय. आमची , सर्वहरांची कष्टकर्यांची .

नितीन सावंत , परभणी
राष्ट्रीय संसद प्रमुख
मानव मुक्ती मिशन .
9970744142
--्---्---्---्---्---्---्---्---्------------------

Sunday, 5 November 2017

ll वांझ गावची पाटीलकी काय कामाची ll

शेतकरी आत्महत्येच्या सत्राबरोबर आता त्यांच्या मुलीही आत्महत्या करत आहेत . लातुर जिल्ह्यातील वडिलांची अगतीक अवस्था बघवेना म्हणून एका मुलीने आत्महत्या केली . अगदी त्याच पध्दतीने  पाथरी तालुक्यात नापिकी  आणि कर्जाला कंटाळून एका शेतकर्याने आत्महत्या केली . आपल्या चुलत्याप्रमाने बापही  आत्महत्या करिल या भीतीपोटी लग्नला आलेल्या  मुलिने सुद्धा काल  आत्महत्या केली. भांडवलशाहीत शेतकरी  जातिमध्ये परात्मता आली आहे . एक तुटलेपना  आला आहे. ईमोशन्यालिटिचे बुडबुडे कितीही उभे केले तरीही ते शेवटी  फुटनारच . त्यातुन शेतकऱ्यांच्या भुकेचा प्रश्न काही सुटू शकत नाही.

जातिचे मेळावे घेवून जातीचा  गर्व करायला लावने , जातीची अस्मिता उभी करने , दुरच्या आरबी समुद्रातील शिवस्मारकाने सर्वांचे भले होइल हा भास निर्माण करणे , स्वजातीच्या विकास महामंडळांच्या निधीवर संतोष मानायला शिकवने ही बुडबुडे आहेत .यातून शेतकरी म्हणून काय फायदा होनार आहे ?? भले होनारच आहे काय ?? ही बुडबुडे आहेत . शेवटी फुटनारच .

भालचंद्र नेमाडेंच्या देशीवादाचा हाच अर्थ आहे . ज्या गावात काहीहीच नविन निर्माण होत नाही . नविन काहीच जन्माला येत नाही .काहीच फायदा होत नाही . ना विकास , ना प्रगती त्या वांझ गावची पाटीलकी मिरवण्यात काय अर्थ आहे ?? त्या गावचा पाटील होन्यात काय अर्थ आहे . हा आशाय नेमाडेच्या मांडणीचा असतो .

आपन जर  जात म्हणून एकत्र येतो , सकळ जात समाज म्हणून मिरवतो , तर दोन दोन हजार रु गोळा करुन अशा गरिबांना का मदत करु शकत नाहीत .जातभाई म्हणून स्वजातीत तरी समता बंधूत्व का प्रस्थापित करत नाहीत . स्वजातीय लोकांना संस्था कॉलेजस मधे फुकटात शिक्षण का देत नाहीत  ? डॉ लोक्स स्वजातीय बांधवांस फुकट विलाज करतील का ??
हे सोडा किमान पोट जात तरी मिटेल काय ?? लग्न कार्यात सोयरिकीच्या वेळेला पोस्टजात का पाळतो . हलके भारित्व का मधे आनतो . आपल्याच जातीच्या वधुबापाकडुन भरमसाठ हुंडा का घेतो ? त्याला आडून मारल्यसारखे सतत त्रास का देतो ??

नेमाडेंच्या समृद्ध हिंदुतली हिच अडगळ आहे . दिसायला , सांगायला भले मोठे गणगोत, भलेमोठे घराणे , बापजाद्यांचे भलेमोठे नाव आणि भलीमोठी जात , पन वक्ताला कोनीबी कामाचा नाय . म्हणतात ना सारा गाव मामाचा एक नाही कामाचा .

स्वजातीतला अंतर्गत विरोध , त्यातले द्वंद्व कधी मिटवनार .
हिच तर वांझगावची पाटीलकी आहे . काल मुंबईत झालेल्या मोर्च्यानेही हेच वांझपन हाती दिले . स्वामिनाथन आयोगाचे नावही नाही . मराठा समाजातील गरिब मराठ्यांच्या , शेतकरी मराठांच्या हाती काय लागले ?? वांझ गावची पाटीलकीच ना .

नितीन सावंत परभणी
9970744142