Friday, 13 December 2019

सौत्रान्तिक मार्क्सवाद (सौमा) हे तत्त्वज्ञान समजून घेताना..

सौत्रान्तिक मार्क्सवाद (सौमा) हे तत्त्वज्ञान समजून घेताना..

तथागत बुद्धानंतरचा सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ दिग्नाग आहेत.त्यांच्या  सौत्रांतिक तत्त्वज्ञानाची जोड मार्क्सवादाला दिल्याशिवाय भारतीय मार्क्सवाद्यांची अधोगती थांबणार नाही आणि त्यांना वर्ण आणि जात या संस्थांचेही आकलण होणार नाही,असे प्राच्यविद्यापंडित कॉ.शरद पाटील नेहमी म्हणत  असत.म्हणून आपल्या "मार्क्सवाद फुले आंबेडकरवाद" या तत्वज्ञानाला मागे घेत शपांनी सौत्रांतिक मार्क्सवाद हे नवे तत्वज्ञान बहाल केले.बुद्धाची सुत्रे आणि मार्क्सचा पाया इमला तथा भौतिकवाद स्विकारत शरद पाटलांनी सौत्रांतिक मार्क्सवाद उभा केला.माणसाला डिकास्ट आणि डिक्लास बनवनारे त्यांचे तत्वज्ञान जाणीव आणि नेनीवेचा विचार मांडते .

सौत्रांतिक मार्क्सवाद

या तत्वज्ञानाला फिल्डवरती किंवा डिबेटसाठी हाताळताना काही  बेसिक्स टर्मस लक्षात घेतल्या पाहिजेत.

१.हे जात-वर्ग-स्त्रीदास्यांताचे तत्त्वज्ञान असल्यामुळे वापरताने काटेकोर पणे वापरले पाहिजे. कुठे वर्ण, सरंजामीव्यवस्थेचे किंवा भांडवलशाहीचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन तर करणार नाहीं ना, या कडे लक्ष दिले पाहिजे.  कॉ. शरद पाटील यांनी माफुआचा विकास करून सौत्रान्तिक मार्क्सवाद (सौमा) हे तत्त्वज्ञान निर्माण करतांना काय आणि किती कष्ट घेतले आहेत, ते विसरता कामा नये.

तरीही, सौमा व्यक्तिविशेष/ हिरोईझमला  महत्व देत नाही.

२.सौमा वापरत असताना तुम्हाला समग्र क्रांतिदृष्टि प्राप्त होते. म्हणजे जात, वर्ग, स्त्रीदास्य या शोषणशासन व्यवस्थेचे अविभाज्य भाग कसे आहेत, हे स्पष्ट होईल. या तीन्ही शोषणशासनसंस्थांच्या व्यवस्थांचे गतिनियम ज्ञात होतील. एकदा का हे समजले तर त्याच्या अंतासाठी घेतलेला मार्ग हा क्रांतीमार्ग बनेल. मात्र हा क्रांतीमार्ग वनवे आहे. परतीचा मार्ग नाही. हे लक्षात घेतले पाहिजे.

३. हे तत्वज्ञान, पहिली जात्यंताची  मागणी करतो. त्यामुळे तो डॉग्मा नाही तर स्वयंप्रज्ञतेचा पुरस्कर्ता बनतो.

४.तो वापरणाराला प्रदर्शनी बनू देत नसल्यामुळे रुक्ष आहे. तो त्यागाची आपेक्षा करतो, आपण त्यागाची भूमिका घेत असाल तर वापरणे कठिण नाही.

हा प्रदर्शनीय नसला तरी, वादविवादाचे सर्वात प्रबळ शास्त्र आहे. त्यामूळे जात-वर्ग-स्त्री शोषणाच्या नियंत्यांना उघडे पाडतो.

५ सौमा 'स्त्री - प्राधान्य' महत्वाचे मानतो, पुरुषी अस्तित्व दुय्यम. आजच्या व्यवस्थेच्या शोषणपिडनाची सर्वांत जास्त प्रभाविता ही स्त्री आहे त्यामुळे तिची नेणिव ही तेवढीच पेनिट्रेटींग. समाजव्यवस्थेमधील अाभासाला भेदून वास्तवापर्यंत जाण्याची तिची क्षमता हि तेवढीच प्रखर.
म्हणून विचारातही आणि कृतीतही तिलाच प्राधान्य.

६. सौमा हा निम-सरंजामी, निम-भांडवली जात-वर्ग समाजातील उत्पादन संबंधाना बदलून अौद्योगिक भांडवली लोकशाही क्रांतीसाठी नवे उत्पादन संबंध आणू पाहतो.

७. सौमा हा जात्यंतक उद्देश घेउन भारतातील अ.जाती, अ.जमाती, इ.मागास जाती, अल्पसंख्यांकातील मागास जाती-जमाती व स्त्रीयांच्या महाप्रबोधनाचा प्रमाणिक प्रयत्न नवधम्म क्रांतीसूत्रांच्या माध्यमातून करत असतो.

8.तथाकथित बुद्धीजीवी अलीकडे जातवार मेळाव्यांत , जातवार कृतीकार्यक्रमांत अग्रभागी सहभाग नोंदवून जात्यंतक क्रांतीला फाटा देवून जातोन्न्तीला प्राधान्य देत असतील तर त्यांना सौमा जवळ घेत नाहीं.

९. हे तत्वज्ञान, सर्वकष समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी सामाजिक व आर्थिक सर्वहारा वर्गाच्या निर्मितीसाठी या जातींचे काटेकोरपणे आकलन करायला लावतो. त्या सर्वहारा वर्गाच्या निर्मितीच्या प्रक्रियेतच त्यांना क्रांतीप्रवण बनवण्याची मोहीम घ्यायला लावतो. त्यांची जानीव - नेनीव कला-साहित्याच्या माध्यमातून जातीअंतक बनवतो. दोन सर्वहारांची एकजूट घडवून आणण्याची हमी देतों.

१०. ब्राम्हणी परिपोष घेवून वावरनारे आणि सर्वहारांपासुन परात्म होणारे. मध्यमवर्गिय बुध्दिजीवी, आपले एक स्वताचे विश्व मेंटेन करणारे. जाॅन शुम्पेटर ने मांडल्याप्रमाणे, ते त्यात त्यांचे कौशल्य creative destruction ने शोषकशासकांना फायदा मिळवून देतात. त्याच्या आधारे आपले विश्व सुरक्षित करतात.

सौमा अश्या बुद्धिजीवींना दुर करतो...

मानव मुक्ती मिशन

Thursday, 12 December 2019

अब्राम्हणी विधायक बहुप्रवाही अन्वेषण पद्धती

       ll विचारवेध ll

" कॉम्रेड शरद पाटांची -
अब्राम्हणी विधायक बहुप्रवाही अन्वेषण पद्धती"

सध्याला सर्व परिवर्तनवादी चळवळींच्या एकुण प्रचार प्रसाराकडे पहाता अत्यंतिक नकाराचा सुर त्यांच्याकडुन येताना दिसत आहे . आपन जेव्हा प्रबोधनाला सुरुवात करतो तेव्हा ती सुरुवात नकाराने होते . प्रस्थापीत ब्राह्मणी व्यवस्थेची कुठलीही गोष्ट खोडण्यासाठी आपण  जेवढे पुढे सरसावतो तेवढेच नव्या मांडणीसाठी आपन अग्रही नसतो . या नकारात्मकातेतून लोक तुटतात . सतत खोडत बसण्याने लोक जोडले जाण्याऐवजी तोडले जातात . हा वाइट तो वाइट मग चांगला कोन ? असा प्रश्न आपल्या अत्यंतिक नकारातुन लोक विचारतात . सध्याला बर्याच संघटना या नकारात्मक मांडणीच्या अत्यंत आहारी गेल्या आहेत . ह्या संघटणा समविचारी संघटांचे विश्लेषण सुद्धा नकारात्मकतेने करतात. एक परिवर्तनवादी गट दुसर्या आपल्याच परिवर्तनवादी गटावर या नकारात्मकातेतुनच तुटून पडतो . यातून काहीच साध्य होत नाही .

म्हणून ज्यांचे रस्ते चुकलेले आहेत . ज्यांना रिझल्ट मिळत नाहीत. त्यांनी आता तरी बदलावे .
यासाठी कॉ . शरद पाटांनी चळवळीसाठी एक अत्यंत महत्वाची अन्वेषण पद्धती दिली आहे .
तिला
'अब्राम्हणी विधायक बहुप्रवाही अन्वेषण पद्धती '
म्हणतात .

अब्राम्हणी म्हणजे पुरुषसत्ताक वर्चस्व नाकारुन समता स्वातंत्र्य आणि लोकशाही देनारी मात्रसत्ताक व्यवस्था मानने किंवा त्या दृष्टीने पहाणे होय.

विधायक हा शब्द विघातक शब्दाच्या विरुद्ध आहे . आपन विघातक टाकुन दिले पाहिजे . विघातक मांडणी करता कामा नये . आपले विश्लेषण विधायक असावे .

बहुप्रवाही म्हणजे सर्वंगाचा विचार करणारी . वर्गाचा अभ्यास ,जातीचाही अभ्यास ,जातवर्गाचाही अभ्यास आपन जिथे करतो ती बहुप्रवाही पद्धती .

अब्राम्हणी साहित्य आणि संस्कृतीच्या आधारे आपल्याला पुरुषी व्यवस्थेला नकार द्यायचा आहे . आणि तो नकार विधायक असनार आहे .

अशा पद्धतीने आपन सविस्तरपणे या पद्धतीचा अभ्यास केला पाहिजे .
या मेथडोलॉजीवर मानवमुक्ती मिशन मार्गक्रम करते 

वैदिक - अवैदिक ऐवजी ब्राम्हणी - अब्राम्हणी

वैदिक - अवैदिक ऐवजी ब्राम्हणी - अब्राम्हणी

अवैदिक म्हणजे कोण? काय? हे समजून घेण्यासाठी वैदिकचा अर्थ समजून घ्यावा लागेल. वैदिकचा अर्थ वेदाचा, वेदासंबंधी असा होतो.  वेद म्हणजे श्रुती, पठणाने जीवंत ठेवलेला इतिहास. ऋग्वेदामध्ये कोणत्याही पुरुषसूक्त (जे प्रक्षिप्त आहे) सोडता आजच्या सांस्कृतिक संघर्षासाठी, अस्मितेची लढाई लढण्याचे कोणतेही सूत्र दिसत नाही. हि पहिली गोष्ट.

दुसरी बाब हि कि अाज किंवा वेदपूर्वकाळापासून सांस्कृतिक लढाई लढणारे हे वेगळे होते आणि तो लढा संहिताबंद करणारे वेगळे होते.

वैदिकपूर्वकाळापासून एक संघर्ष दोन गणार्धामध्ये होत आल्याचे काॅ. शपांनी स्पष्ट केले आहे. तो म्हणजे क्षत्र विरूद्ध ब्रम्हन. ज्यांची स्वतःची श्रुती होती, तांत्रिकी. जीला छन्दाम्सी म्हटले गेले आहे.

क्षत्र नियंत्रित व्दैवर्णी, त्रैवर्णी गणसमाजाच्या नंतर चातुर्वर्ण्यापासून म्हणजेच उर्वशी पुरुरव्यापासून ब्राम्हण नियंत्रित  परंपरा चालू होते अाणि उर्वशी वरुणापासून अब्राम्हणी प्रवाह जो क्षत्र नियंत्रित राहतो. अगदी शिवकाळापर्यंत.

हे अब्राम्हणी प्रवाहाचे लढा लढणारे क्षत्र म्हणजे स्त्रिसत्ताक समाजाचे वारसदार, कृषक समाजाचे वारसदार, समतावादी गणसमाज होते.

अशा ब्राम्हणी विरूद्ध अब्राम्हणी सांस्कृतिक लढ्याचा स्पष्ट तपशील कवष ऐलूषच्या सांस्कृतिक लढ्याच्या घटनेने ऋग्वेदाने मांडून ठेवला आहे. काॅ. शपानी तो अापल्या ग्रंथात साधार मांडला आहे.

त्यामुळे लढणाऱ्यांचा म्हणजे ब्राम्हणी विरूद्ध अब्राम्हणी हे अस्सल संघर्षसुत्र जे काॅ. शपानी मांडले, ते घ्यावे. जे वैदिकपूर्वकाळापासूनचे आहे.

संहिता लिहणा-यांचा म्हणजे अभिजनांचा - वैदिक विरूद्ध अवैदिक हे प्रतिष्ठित संघर्षसूत्र  सांस्कृतिक लढ्यासाठी, अस्मितेच्या लढ्यासाठी वापरु नये.

Tuesday, 3 December 2019

अक्करमाशी: पोटजातीची व्यथा.

अक्करमाशी: पोटजातीची व्यथा.

नितीन सावंत,परभणी
9970744142

              भारतात सर्वात भीषण कोणती गोष्ट असेल तर, अस्पृश्य म्हणून जन्माला येणे. एखाद्या वेळी दिली गेलेली कठोर आणि भयानक शिक्षाही या विशिष्ट वेळेपुरती असू शकते पण "दलितत्व" अर्थात अस्पृश्य जातीत जन्माला येणे हे आयुष्यभर आणि क्षणाक्षणाला छळणारे असते, पीडणारे असते. आपली एक पायरी बघून सतत वावरावे लागते; पायरी सोडून वागायला जमत नाही. जन्मानेच एखाद्याला, एखाद्या समुहाला दलित, हलका, नीच, अस्पृश्य मानणे आणि तशा प्रथा परंपरा चालू ठेवणे हे भारतीय संस्कृतीमधली हीनकस परंपरा आहे; ती एक विकृती आहे. ही विकृती हजारो वर्ष भारतीय लोक पिढी-दर-पिढीगत पोसत, जपत आलेले आहेत.

                कुणाला वाटेल आता कुठे राहिला आहे जातिवाद?  पण असे म्हणनारे, वरवरचा विचार करणारे लोक आहेत. आजही ग्रामीण भागात जातिवाद तसाच आहे. अस्पृश्यता जरा कमी झाली असेल, पण जातीवाद मात्र तसाच आहे. ग्रामीण भागात माजी अस्पृश्य जातींच्या लोकांना मंदिरात जाता येत नाही. वर्धा जिल्ह्यातील आर्वी गावातील लक्ष्मीबाई वार्डातील आर्यन नावाच्या आठ वर्षाच्या मातंग समाजातील मुलाला मंदिरात का गेला म्हणून त्या मुलाची पॅन्ट काढून भर उन्हात गरम टाईल्सवर(फरशीवर)  बसवले. त्यामुळे मुलगा बसण्याच्या जागेवर गंभीर जखमी झाला. या घटनेचे फोटो संबंध महाराष्ट्राने सोशल मीडियात पाहिले आहेत. हि घटना जून 2019 ची आहे. हे उदाहरण अपवाद नाही तर, अशा घटना सातत्याने घडतात. फक्त माहित होत नाहीत.

आजही ग्रामीण भागात माजी-अस्पृश्य जातींच्या लोकांना सार्वजनिक जेवणाच्या पंगतीत उच्च जातीच्या बरोबरीने सहजरीत्या बसता येत नाही. काही गावे अपवाद आहेत. आजही ग्रामीण भागात उच्चजातीय वस्तीतले विक्रिला असणारे घर दलितांना विकत घेता येत नाही. ग्रामीण भागात निवडणूकीत जागा माजी-अस्पृश्यांसाठी सुटली असेल तर नामधारी पद भरून कारभार मात्र उच्चजातीय पहातात. गावसंस्कृतीत अस्पृश्यांची 'प्राइव्हेटात' नेहमी टिंगलटवाळी केली जाते. पुर्वी मात्र जाहिररित्या केली जाई. "साले माजलेत", हे वाक्य तर माजी-अस्पृश्य जातींच्यासाठी सर्रासपणे वापरले जाते.

शहरांची परिस्थिती जरा वेगळी आहे. शहरी मध्यमवर्गीय लोक छुपा जातीवाद पाळतात. शहरांत घरे विकत घेताना शेजारी मुस्लिम, दलीत नसावेत याची दक्षता घेतली जाते. शहरांत दलीतांना उच्चजातीयांच्या कॉलनीत किरायाने घरे दिली जात नाहीत. म्हणजे शहरी जातीवाद अगदी छुप्या पध्दतीने कार्यरत असतो.

कॉ.शरद पाटील यांनी 'मार्क्सवाद फुले- आंबेडकरवाद' या ग्रंथात जातीव्यवस्थेची सहा लक्षणे दिली आहेत.
१)जातींची अनुवंशिकता २)जन्मसिद्ध व्यावसाय ३)रोटीव्यवहार निर्बंधीत ४)बेटीव्यवहार निर्बंधीत ५)जातींची उचनिचता,जातवार वस्त्या ६)जातपंचायत
यातील जातव्यवस्थेच्या लक्षणांत कमी-अधीक थोडेफार बदल झालेले असतील परंतू, नव्या लक्षणांसह जातीव्यवस्था कायम आहे. उलट जातीय अस्मितांच्यामुळे आज जातीव्यवस्था अधिक तिव्र होताना दिसत आहे.

ही आजची परिस्थिती असेल तर स्वातंत्र्यपुर्व काळात दलीत आणि भटक्याविमुक्तांचे काय हाल असतील ?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वारे  उदयाला आलेल्या विद्रोही साहित्यिकांनी लिहिलेल्या साहित्याद्वारे जातीव्यवस्था तथा अस्पृश्यत्येचे आकलन आपल्याला करून घेता येते. या जातीव्यवस्था तिचे क्रमीक स्तर, पोट जाती हे समजून घ्यायला दलित साहित्य मदत करते. दलित आत्मकथने, जातीव्यस्था, अस्पृश्यता समजून घेण्याची महत्वपूर्ण साधने आहेत. ही दलित आत्मकथने केवळ स्वानुभव न राहता उद्यासाठीचा तो इतिहास बनलेली आहेत. जातीव्यस्थेच्या आकलनात मी दलित आत्मकथनांना मैलाचा दगड मानतो. स्वातंत्र्यानंतर शिक्षणामुळे आणि आंबेडकरी चळवळींमुळे दलितांमधे आत्मभान निर्माण झाले. यातून आपले जगणे, आपल्या वेदना आत्मकथानाद्वारे जगजाहीर करण्याचा एक मोठा प्रवाहच सुरू झाला.

अशा अनेक दलित आत्मकथनांपैकी 'अक्करमाशी' हे एक गाजलेलं आत्मकथन. डॉ.शरणकुमार लिंबाळे यांनी निर्भीडपणे लिहिलेले हे आत्मकथन आहे. हे आत्मकथन त्यांनी वयाच्या २५ व्या वर्षी म्हणजे १९८४ साली लिहिलेले आहे. त्यानंतर तेच आत्मकथन त्यांनी प्रमाणभाषेत १९९९ ला 'पुन्हा अक्करमाशी' म्हणून जगासमोर आणले.
      
हे आत्मकथन निम्नजातीतही एक पोटजातीय व्यवस्था कशी कार्यरत असते याचे चित्रण करते. भारतीय समाजव्यवस्थेत हलक्या, अस्पृश्य मानलेल्या जातीतही जातीबाह्य संबंधातून झालेल्या संततीला किती हीन आणि दुय्यम वागवले जाते, हे या आत्मकथानातून निदर्शनास येते.
अक्करमाशी म्हणजे विवाहबाह्य संबंधातून झालेली संतती होय. आत्मकथनाचे नायक शरणकुमार लिंबाळे, आई महार(पूर्वाश्रमीच्या) व वडील लिंगायत पाटील यांच्या विवाहबाह्य संबंधातून जन्माला आल्याने आपली भळभळणारी जखम अक्करमाशी नावाने जगा समोर उघडी करतात.

डाव्यांच्या वर्गीय भाषेत बोलायचे झाले तर आई भूमिहीन तर वडील जमीनदार, सरंजमादार. पण हा संघर्ष एवढाच, वर्गीयदृष्टीने पाहिला तर विषमतेच्या जातीसारख्या विविध शोषण-शासनसंस्था लपून राहतात ज्या जात्यांध्य आहेत. म्हणून अक्करमाशी मधल्या नायकाचा असणारा संघर्ष जातीय आहे, वर्गीय नव्हे.

लेखकाला भोगाव्या लागणाऱ्या यातना ते भूमिहीन आहेत म्हणून नव्हे तर ते माजी-अस्पृश्य जातीतले अक्करमाशी आहेत म्हणून आहे. म्हणून निंबाळेंच्या महार वस्तीतही स्वजातीय लोक देखील त्यांना निट वागवत नाहीत, त्यांना विवाहासाठी स्वजातीय मुली देत नाहीत, त्याचे कारण ते अक्करमाशी आहेत. आणि सवर्ण, उच्चजातीय त्यांचा तिरस्कार करतात कारण ते अस्पृश्य जातीचे आहेत म्हणून. येथे लेखकाचे पिडन दुहेरी आहे. उच्चजातीयांच्या दृष्टीने अस्पृश्य तर स्वजातीयांच्या दृष्टीने अक्करमाशी. असे दुहेरी दु:ख लेखक जगतो.

लेखक बालपणी शाळेतून येतांना पोर त्याना 'महार महार' म्हणून चिडवायचे हा उच्चजातीकडून  झालेला जातीवाद आहे,आणि हा जातीवाद अक्करमाशी म्हणून नव्हे. कारण उच्च जातियांच्या दृष्टीने हीन लेखण्यासाठी अस्पृश्य जातीत जन्माला येणे पुरेशे आहे, त्यात अक्करमाशी, बारामाशी असे काही नाही. अक्करमाशी आणि बारामाशी महार हा वरच्या जातींच्या दृष्टीने अस्पृश्य आणि तिरस्कारनीयच त्यात भेद नाही, म्हणजेच शरणकुमार लिंबाळे यांनी आत्मचरित्र ला दिलेले नाव स्वजातीय वेदनेतून दिलेले आहे. उच्चजातीच्या दुःख, पिडणापेक्षा आकारमाशी म्हणून जन्माला येणे लेखकाला जास्त त्रासदायक वाटते. पुरोगामी चळवळींनी अजूनही जातीअंतर्गत द्वंद्वावर तोंड उघडलेले नाही.

अक्करमाशीत शरणकुमार लिंबाळे यांना होणारा त्रास दुहेरी आहे. एक उच्चजातीयांचा जातीवाद तर दुसरा स्वजातीयांचा पोटजातीवाद. या भयाण दमनातून लेखकाचे आत्मकथन साहित्याची महत्तम उंची गाठते.
हे आत्मकथन केवळ अस्पृशांच्या वेदनादायी जिवनाचेच चित्रण करते असे नव्हे. या आत्मकथानाला अनेक कंगोरे आहेत. लेखकाच्या आजोबांच्या भूमिकेत असणारा पण रक्ताच्या नात्याने कुणीच नसणारा 'दादा' मुस्लिम आहे. त्यांचं नाव महामुद दास्तगीर जमादार. त्याची बायको पळून गेल्याने तो एकटा असे आणि लेखकाची आज्जी संतामाय नवऱ्याने सोडून दिलेली असल्याने ती आणि मुस्लिम दादा दोघेही एकमेकांना जीव लावायचे. ह्या दादाने आपला नात्याने कोणीच नसणाऱ्या शरणकुमार नावाच्या नातवाला शेवटपर्यंत माया लावली. हमालीचे पैसे दिले. बापापेक्षाही माया लावणारा दादा लेखकाने चित्रित केला आहे. आपल्या पोटूशी घेऊन झोपणारा मुस्लिम दादा आणि शाळेत पोराला माझे नाव लावू नका म्हणून सांगणारा लिंगायत पाटील. यांचे वास्तववादी, निर्भीड चित्रण लेखक करतात. धर्माच्या अंगाने पहायचे झाल्यास बसवण्णांच्या जात्यंतक समतावादी धर्मात जन्मलेल्या हणमंत लिंबाळे पाटलाला
आपले नाव पोटच्या पोराला द्यावेसे वाटत त्यासाठी तो विरोध करतो.कारण आपण ठेवलेल्या महार स्त्रीला आपल्याकडून झालेले आपत्य पुढे आपले नाव लाविल, त्याने बापाचे नाव लावू नये म्हणून हनुमंत निंबाळे शाळेत नाव लावताना विरोध करतो.एवढेच काय, काका म्हणजे जुन्नरचा यशवंतराव सिद्रमाप्पा पोलीस पाटील यांनी मसामायला म्हणजे लेखकाच्या आईला ठेवलेली होती. त्याने आणखी एक कुंभार स्त्री ठेवली होती. त्या कुंभार जातीच्या स्त्रीला पाटलाने गळ्यात लिंग घालायला लावून लिंगायत बनवले पण, मसामाय महार असल्याने तिला मात्र पाटील लिंगायत बनवू शकला नाही. महात्मा बसवण्णांची जातीअंताची चळवळ ग्रामीण भागात रुजली नाही तर उलट ती विरोधी टोकाच्या उंचीवर गेली. याचा हा पुरावाच म्हनावा लागेल.
म्हणून लेखक आपल्याला जवळ करणार्‍या मुसलमान दादा बद्दल म्हणतो, 'जात धर्म सोडून त्यांनी मला प्रेम दिलं. मला लेकरा सारखं वाढवलं. दादाचा धर्म आडवा आला नैय की जात.'

दलित आत्मकथने आणि आंबेडकरी चळवळी हिंदू धर्माला नावे का  ठेवतात तर या धर्मात एवढी नीच जाती व्यवस्था आहे की या धर्मातली काही माणसे माणुसकी पाळत नाहीत. पाळली तर ती माणुसकी जातवार असते. उच्चजातीयांपुरतीच असते. म्हणून लेखकाला हिंदू लिंगायत पाटला पेक्षा मुसलमानच जवळचा वाटतो. अक्करमाशीतले स्त्री चित्रण म्हणजे जगण्यासाठी कष्ट उपसणाऱ्या महिलांचे शोषण पिडनकारी विश्व आहे. 'प्रत्येक गावात एक-दोन चवचाल स्त्रिया असतात' हे पितृसत्ताक सामाजव्यवस्थेचे म्हणने लेखकानी प्रस्ताविकातच खोडले आहे. स्त्रीयाच चवचाल का असतात ? हा प्रश्न करून खोडले आहे.
ही पुरुष वर्चस्ववादी समाजव्यवस्था नैतिक-अनैतिकतेच्या कसोट्या स्त्रियांच्या शुद्धतेवरून लावते. पुरुष कसाही वागला तरी चालतो. परंतु स्त्रीयांना मात्र बारीक नियमांच्या कसोट्या लावलेल्या असतात. दलित साहित्यातील स्त्री गुलामीच्या अनेक शृंखलांनी जखडलेली आहे. जातीव्यवस्था आणि पितृसत्ता ही तिची सर्वात जाचक गुलामीची शृंखला आहे. उच्च जातीयांच्या नजरा सांभाळून दलित स्त्रियांना वावरावे लागते. नाहीतर आयुष्याचे मातेरे होते ठेवलेली, रखेली  म्हणून. आणि जन्माला आलेली संतती जाचक जातीव्यवस्थेत बनते अक्करमाशी.
अक्करमाशीत ज्या स्त्रिया येतात, त्यात आयुष्याचे मातेरे झालेली लेखकाची आई मसामाय. ह्या मसामायचे विठ्ठल कांबळे सोबत लग्न झाले होते. विठ्ठल कांबळे पासून तिला तीन मुलं झाली होती. पुढे गावच्या पाटलाने विठ्ठलाचा संसार मोडला. इठ्ठलाला कायबाय लावून देवून विठ्ठलाला मसामायला सोडून द्यायला लावली. पुढे मसामायला हनुमंत पाटलानीच ठेवली. त्याच्यापासून मसामायला शरणकुमार झाले. याच मसामायला परत गावच्या यशवंतराव सिद्धाप्पा पाटलाने ठेवली. त्याच्यापासून नागुबाई, निर्मला, वनमाला, सुनंदा, प्रमिला, श्रीकांत, इंदिरा व सिद्राम एवढी मुलं झाली. ठेवलेल्या स्त्रीला सुद्धा गावात मर्यादेच्या चौकटीत राहावे लागते. तिला इतर स्त्रियां सारखे जेवणाच्या पंक्तीत येता येत नाही. कारण ती पाटलाने ठेवलेली. माजी अस्पृश्य जातीतील स्त्रीला पाटलांनी ठेवलेली म्हणून सतत रस्त्यावर बाहेर वावरता येत नाही. म्हणून मसामाय कधीही जेवनाच्या पंगतीत जात नसे. ही पुरुष वर्चस्ववादी तथा उच्चजातीय शोषण शासनव्यवस्था.

त्यानंतर स्त्री म्हणून काबाडकष्ट करणारी लेखकाची आज्जी दिसते. पुढे लेखकाच्या बहिणी सुद्धा जगण्याची धडपड करताना दिसतात.
प्रत्येक गावात बाळंतपण करणारी जी दाई असते. ती मुख्यतः अस्पृश्य जातीतली असते. लेखकाची अाज्जी संतामाय असेच उच्चजातीय स्ञीयांचे बाळंतपण करायला जायची. हि जातीव्यवस्था अडलेल्या कामात निम्नजातीय, अस्पृश्य स्ञीयांची मदत घेते पण, गावच्या महत्त्वाच्या जागेवर मात्र हे लोक, स्ञीया नको असतात. कित्येक उच्चजातीय घरात अनेक मुलां-मुलींना याच अस्पृश्य दायांच्यामुळे जिवदान मिळालेले आहे, संगळ्यांच्याच घरात मुले-मुली रक्तातूनच जन्माला येतात ना  ? मग उच्चजातीय निम्नजातीय ही भावना का पेरली जात असेल ? शरणकुमार लिंबाळे म्हणतात,"आमीबी धर्मानं हिंदू ,आमीबी माणसं हावं, गावातली सर्व पोरं देवाजवळ जातात पण आमाला देवळात जाता येतं न्हाय. मुले म्हणजे देवाघराची फुले, आमी देवाघरची फुले न्हौतो. आमी गावाबाहेरचां केरकचरा" काळजाला भिडणारी वास्तविकता आहे ही. हि वाक्ये आहेत ही निंबाळेंच्या आत्मकथनातील.

अन्याय अत्त्याचारच्या काहीतरी सीमा असाव्यात, जातशोषणाला मर्यादातरी असावी पण, भारतीय जातीव्यवस्थेत अन्याय अत्याचाराला कुठलीही मर्यादा,अट नाही. धर्मसंम्मत अन्याय, शोषण करा. लूटा, बायां ओरबडा. खुली सुट. उच्चजातीयांच्या पाणवठ्यावरून लेकुरूवाळीनीनं धूतलेल्या बाळवतांच्या गुवाचे फथुले पिढ्यानपिढ्या पाण्यासोबत पोटात रचणारे अनेक शरणकुमार अाजवर गप्पच होते, बरे झाले एक निंबाळे बोलता झाला. नाहीतर उच्चजातीय उद्या म्हणाले असते,'असल्या प्रकारचा कुठलाही अन्याय-अत्याचार आम्ही केलाच नाही.'

निंबाळे यांचे आत्मकथन मला पुरावे वाटतात जाचक जातीव्यवस्थेचे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम या समतेचा पुरस्कार करणाऱ्या नामघोषाने, गजराने सुरू होणाऱ्या जेवणाच्या पंक्तीत निंबाळे सारख्या अस्पृश्यांना कधी बसताच आले नाही. या पंगती उच्चजातीयांच्या. वारकऱ्यांची समता फक्त अध्यात्मातच. गावपातळीवर वास्तवात तुळशी माळा गळा घालनारे वारकरी सुद्धा जातीव्यवस्था, अस्पृश्यता पाळतात. जेवणाच्या पंगतीत अस्पृश्यांना बसु देत नाहीत. अस्पृश्यांची पोरं दूर थुंका गिळत पंगतीकडे बघत उभी असल्याचे अक्करमाशी वर्णन आले आहे. जे आजचे सुद्धा वास्तव आहे. ही कुठली जातीव्यवस्था व अस्पृश्यता आपण जन्माला घातलेली आहे? याचे फायदे काय ? कुणाला हे  फायदे झाले ? सोइची जातीव्यवस्था अस्पृश्यता आपण का पाळतो ? म्हणजे बाळंतपणात लेकराला जन्माला घालताना अस्पृश्य दाई चालते. पुढे त्याच लेकराला अस्पृश्य स्त्रीने स्पर्श केला तर बाट का व्हावा ? अस्पृश्यांची बाई ठेवता येते तेव्हा बाट होत नाही का ? 'बहात्तर मैल एक प्रवास' या चित्रपटात नायिका म्हणते कातड्याला  कातडे घासताना तुम्हाला विटाळ होत नाही का ? अस्पृश्य स्त्रीयांच्या सोबत शारीरिक संबंध ठेवताना विटाळाचे भय वाटत नसते का ? या प्रश्नाचे उत्तर उच्चजातीय देतील का ?  दारुड्यांना अस्पृश्यांची दारू चालावी पण पाणी का चालू नये ? मोठा प्रश्नच आहे. ग्रामीण जीवनात अस्पृश्यता जातीव्यवस्थेचे चटके खाणारे शरणकुमार निंबाळे शिक्षण घेण्यासाठी जेव्हा सोलापुरात येतात तेव्हा त्यांना गुलामीची जाणीव व्हायला लागते. अशातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळु लागतात. वाचनाने त्यांना प्रगल्भता येते.आपले गावकडचे जीवन त्यांना किळसवाने नकोसे वाटु लागते. शहरात भेटायला आलेली आपली आज्जी त्यांना रुमला न्यावीशी वाटत नाही. कसले गुलाम जीवन आपण जगतो त्यांना हे उमगते. आशातच त्यांना बार्शीचे कांबळे मुलगी द्यायला तयार होतात.

बुद्ध धम्मात अक्करमाशी, बारामाशी असे काही नसते हे सांगून ते कोणाच्याही विरोधाला न जुमानता शरणकुमार यांना जावई करून घेतात. पुढे लेखकाला टेलिफोन ऑपरेटर म्हणून नोकरी लागली, त्या निमित्ताने त्यांना मराठवाडा पाहायला मिळाला, अहमदपूर, लातूर, भागात रूम शोधताना होणारा जातीवाद लेखकाने पाहिला - भोगला, कधी कधी जात लपवून राहावे लागले.
            
उच्चजातीयांचा जातीवाद तर त्यांनी भोगलाच परंतु बाबासाहेबानी दिलेल्या पवित्र धम्मातही, त्यांना पोट जातीवाद छळत राहिला, एकदा असेच बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिटींगीला अक्करमाशी अध्यक्ष नको बारामाशीच हवा असे म्हणाऱ्या मंडळींच्या बोलवण्याला निंबाळे जाऊ शकले नाहीत कारण ते अक्करमाशी होते.
                  
बाबासाहेबांच्या मिरवणुकीतही लेखकाला परक्यासारखे वाटते कारण ते म्हणतात मिरवणूक बारामाशी महारांची, ते म्हणतात 'भीम जन्मला बाई सोमवंशी कुळात' हे ऐकताना मी कासावीस व्हायचो,
              
सर्वच बाजूने होरपळलेला अक्करमाशीकर खचून न जाता संकटांना सामोरे जातो, व्यवस्थेशी लढतो इथल्या जातिव्यवस्थेच्या छाताडावर नाचून मोठा लेखक म्हणून निंबाळे उभे राहातात, हे अत्यंत प्रेरणादायी आहे. व्यवस्थेला वाकवणारं हे स्फूर्तिदायक उदाहरण आहे.

डॉ.शरणकुमार लिंबाळे यांची अक्करमाशी सर्वांना अस्वस्थ करून सोडणारी आहे. शिवाय विधायक मार्गाने उभे राहायला शिकवणारी आहे. या आत्मकथनाबद्दल किंवा एकूण दलीत आत्मकथनावर ज्या वेगवेगळ्या टीका होतात त्या मला अमान्य आहेत. अशा टिका जात-वर्ग पितृसत्ताक व्यवस्थेच्या जाणीवेतून आलेल्या टीका असतात, कारण आपल्या वाट्याला आलेले दुःख,आपल्याशी झालेला, केला गेलेला जतिवादाचा बलात्कार मांडायचाच नाही, व्यक्त व्हायचेच नाही, हे सनातनी वर्तन ठरेल. भटके, आदिवासी व माजी अस्पृश्य जातींनी लिहावे, आत्मकथने ‌मांडावीत. जातीवादाचे खवंद फोडावे, पिळून काढावे, वरच्या व्यवस्थेला लाज वाटली पाहिजे किंवा जगाला तरी कळले पाहिजे या देशात लोक जनावरांच्या पलीकडे जगत होती म्हणून.

जातीव्यवस्थेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना हे आत्मकथन नक्कीच चिमटे काढेल  किंवा जातीव्यवस्थेविषयी कोरडी आस्था दाखवणारयांना अस्वस्थ करेल.  जात्यंतक विचारसरणीवर चालणाऱ्यांना अंतर्मुख करेल, जात-पोटजातीतील विरोधाचा गुंता सोडवायला प्रज्ञावान बनवेल. या आत्मकथनामुळे नक्कीच 'गुलामाला गुलामीची व गुलाम करणाऱ्याला माणुसकीची जाणीव होईल.'

नितीन सावंत,परभणी
9970744142