Sunday, 27 December 2020
ll निऋतीचा पट ll
♦दत्तजयंती आणि दत्त सांप्रदाय
Saturday, 19 December 2020
संघटना का वाढत नाही....?
Tuesday, 15 December 2020
मलाही जीवनरस पुरवीतात ही सांस्कृतिक प्रतिके ...
Friday, 4 December 2020
मानव मुक्ती मिशन संपर्क यादी राज्य व विभाग
Sunday, 29 November 2020
सौमावाद्यान्नो भूमिका घ्या ! सामाजिक कार्यात उतरताना
Saturday, 7 November 2020
भगतसिंग स्टुडंट फ्रंटची भूमिका
Monday, 12 October 2020
बुद्धीजीवी : ब्राम्हणी, अब्राम्हणी
Thursday, 8 October 2020
जात काय असते ? ती कशी ओळखायची ?
Sunday, 4 October 2020
सरंजामशाहीची अदृष्य नियमावली
Sunday, 27 September 2020
कार्यकर्ता कसा आसावा :
Thursday, 17 September 2020
मानव मुक्ती मिशन औरंगाबाद
Monday, 31 August 2020
♦पुणे - मानव मुक्ती मिशन ♦
Saturday, 22 August 2020
सरकारी नोकरदारांचा प्रामाणिकपणा ..
Sunday, 16 August 2020
भटक्यांच्या स्वतंत्र्याचे काय ?
Saturday, 15 August 2020
♦बर नाही आज जरा खर बोलू ♦
♦बर नाही आज जरा खर बोलू ♦
पी.एच.डी. म्हणजे ब्राम्हणी डिग्री.समजापासून १००% तुटल्याचे आधिकृत व मान्यताप्राप्त प्रमाणपत्र.
जगाचे सर्व ज्ञान मलाच मिळाले आहे आणि मीच एकमेव ज्ञानवंत आहे हा अविर्भाव निर्माण करुन देनारा पेशा म्हणजे प्राध्यापकी. ग्रामीण भागातील साध्या लोकांना, शेतकरी, शेतमजुरांना हिडीस फिडीस भावनेने पहानारा तसे वागवनारा व मळकट कळकट रंगधारी गरिब शेतकऱ्यांना जास्तकाळ जवळ सुद्धा फिरकू न देनारा,त्या रंगाप्रती घृणा बाळगनारा हा आइतखाऊ महाभाग म्हणजे प्राध्यापक .
आपल्या बुद्धीमत्तेचा वापर केवळ आणि केवळ ब्राम्हणी आणि भांडवली व्यवस्थेच्या हितासाठी तिच्या जतन संवर्धनासाठी करनारा तो मध्यमवर्गीय बुद्धीजीवी होय . त्यात हे प्राध्यापक अग्रभागी .
तुम्ही कधी एकलेय का ? की चार प्राध्यापकांनी धरने आंदोलनात जावून मार्गदर्शन केले .
तुम्ही कधी एकलेय का ?
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ५० प्राध्यपाकांकडून आर्थीक मदत. किंवा
हे प्राध्यापकांनी घेतले दोन अंध मुले दत्तक .
आपल्याच सारख्या प्रध्यापकी पेशातल्या किंवा नोकरदार वर्गातच जाणेयेणे ठेवने त्यांच्याशीच सन्मानाच्या संकल्पनांत आयुष्य घालवने, अतिउच्च वर्गातील सवई ,वस्तू फ्याशन आयात करन्याचा प्रयत्न करने ,बायको एके बायको करत मिरवने हे त्याचे आयुष्यातील इव्हेंट असतात . मी phd केलीय , मी डॉ आहे , हे त्याला मिरवण्यात मोठे स्वरस्य असते .
बर यांच्या पिएचड्या तरी इमानदारीच्या असतात का ?काहीजण
हो phd साठी मोजतात , phd प्रबंध चोरतात , phd लिहून घेतात , लागणारी माहिती गोळा करायला पैसे देवून माणसे लावतात .... असे अनेक phd चे प्रकार आहेत ...
phd धारक किंवा प्राध्यापक झाले की एका भयाणक आत्मकेंद्रि , आत्ममग्न आत्मप्रोढी विश्वात त्यांचा प्रवेश होतो .
या वर्गाला सामाजिक भान राहिलेलं नाही. लठ्ठ पगारामुळे वाचन,लेखनही थांबलेलं. वर्गाबाहेर जाउन कुणाचं दुख समजून घ्याव,दूर करण्यासाठी मदत करावी,गावाची,भावाची,माय,बापाची हे तर त्यांच्या मनीही येत नाही.
किमान यांनी शेतकरी शेतमजूरांच्या बाजुचे साहित्य तरी लिहावे . आधी साहित्य क्रांती मग समाज क्रांती पन ते ही यांना जमले नाही . फिडेल गेला किती प्राध्यापकांचे लेख आले ??
यांना
आपल्या दारावर कुनी आलेला गेलेला त्याला खपत नाही . डुप्लीकेट स्माइल हा त्याचा ,महतप्रयासाने शिकुन कमवलेला अनमोल दागीणा . सर्वांची घरे हुडकून काढता येतात पन यांची घरे शोधने जरा अवघडच . समाजव्यवस्थेपासून कोसो दुर रहतात ही लोक .
दुष्काळ येवो , सुनामी येवो , कुनी मरो कुनी खपो आम्हाला त्याचे सोयर न सुतक ...
गावात जावून पारावर , चौकात चार शेतकरी , शेतमजूर ,हमाल गोळा करुन कधी मार्गदर्शन सुद्धा या लोकांनी केल्याचे मी पाहिलेले नाही . बरे किमान आपल्या धंद्याच्या बाहेर कधी चार विद्यार्थ्याना सुद्धा हे लोक मार्गदर्शन केल्याचे दिसत नाहीत .
आनेक शिक्षकांचे त्यांच्या हताखालून शिकुन गेलेले विद्यार्थी मोठे झालेले बघायला मिळतात तशा ब्यातम्या झळकतात . पन प्राध्यापकांना विद्यार्थीच असतात का नाही कुनास ठावूक . कारण कुणीही विद्यार्थी हे माझे मार्गदर्शक आहेत असे मनापासून मानयला तयार नसतो शिक्षकांप्रती असलेली आत्मीयता यांच्याप्रती का नसते कुनास ठावूक .
चार पाहुने आल्यावर आर्ध्या अर्ध्या कपात चाहा आणि चौघांमधे ट्रेमधे दोन बिस्किटे ठेवून पाहुनचार करनारे पुण्यातील सदाशिवपेठी ब्राह्मण परवडले पन हे लोक नको .प्राच्यापकांनी केला मोठा पाहुनचार , आज अमुक प्राध्यापकाने आम्हाला तुडुंब जेवायला घातले , आज आमच्या गावी प्राध्यपकाची जेवायची पंगत होती , प्राध्यापकांनी केले अन्नदान अशी विधाने तर मोठी हास्यास्पद वाटतात .तुम्ही सामाजिक देने लागता या भावनेने एकदाच निधी माघायला जावून बघा एकग्लास पाण्यावर त्यांचेच मोठेपन , कुजकेपन आइकुन रिकामे या किंवा शेपाचशे घेवून या .प्रचंड कंजूष ही जमात . प्राध्यापकांना एवढाल्या पगारी असुन सुद्धा मोठमोठ्या बिल्डींगच्या गेटवर , भिंतीवर पाटी लावलेली असते येथे पिकोफॉल करुन मिळेल म्हणून ... बायकोला सुद्धा पिकॉफॉल करुन पैसे कमवायला लावते ही जमात ..
समोर अन्याय अत्याचार होत असताना गप्प बसने , लोक अज्ञानात रुढी परंपरांत तडफडात असताना त्यांना योग्य रस्ता न दाखवने , ही कपाळ करंटेपनाची लक्षने आहेत . यापेक्षा अधिक न बोललेले बरे ...
यासंदर्भात आपल्याला ८ तासाचा पगार २ तास शिकविण्यासाठी ६ तासाच्या तयारी साठी दिला जातो . पन हे तास कुठलाही तयारी न करता बेइमानी करण्याचे काम आजचे प्राध्यापक करत आहेत .
प्राध्यापक हेरंब कुलकर्णी हे एक अशे प्राध्यापक आहेत की ज्यांनी सहाव्या वेतन आयोगाची पगार घेन्यास सक्त नकार दिला. सरकारने नकार दिल्यास ते त्यांची पगार डोनेट करतात .
त्यांनी प्राध्यपकांचे अशैक्षणिक जोडधंदे या विषयावर संशोधन केलेले आहे आणि त्यावर पुस्तकही आहे . त्यात त्यांनी प्राध्यपकांचे जोडधंदे दिलेत
" चड्डी बनियान विकने , प्लॉटिंगचा धंदा करने , विम्याची दलाली खाने , चैन मार्केटिंगचे धंदे करने , मनिसर्क्युलेशन चे स्किमा चावने ,मटका लावने , इत्यादी वैध अवैध अशैक्षनिक जोडधंदे तथाकथित प्राध्यापकांतील महाभाग अग्रेसर आहेत. आणि संस्थाचालकाच्या वाढदिवसाच्या होर्डिंगावर यांचेच धोबाडं असतात . लाचारी आणि हुजरेगिरीचे पुनरुत्पाद्न महाविद्यालांमधुन करने बंडखोरीच्या प्रेरणा मारुन टाकने यासाठीच प्रस्थापित व्यवस्स्था यांना ७ व्या वेतनाची लाच देत आहे . हा आजच्या प्राध्यपकांचा धंदा आहे ..
बरे हे नेहमी यांच्या बुद्धीमत्तेचे स्तोम नेहमीच मजावतात.
या देशात खडतर शारीरिक श्रमसाठी रोहयोवर १९२ रु रोज दिला जातो अशेच कुशल श्रमासाठी रुपये ४ शे रोज आणि तथाकथित बौद्धिक श्रमासाठी या प्राध्यापक वर्गाला रुपये ३ हजार रोज. असा भेद करुन आणि विनाकारण बोद्धीक श्रमाचे स्तोम माजवून श्रमीक वर्गाच्या हिताचे बोद्धीक कार्य होऊ नये याची दक्षता प्रस्थापित व्यवस्था घेते.
भालचंद्र नेमाडे कोसलामधे म्हणतात "ही शिक्षणपद्धती म्हणजे तरुण मुलांना झूल पांघरलेली हिजडे बैल बनवणारी षंढ व्यवस्था होय."
आणि हे प्राध्यापक राबतात तरी किती
वर्षाच्या तिनशे पासष्ट दिवसांत एकूण रविवार ५२ सरकारी सणांच्या सुट्या २० दिवस,दिवाळीच्या सुट्या २० दिवस,महापुरुषांच्या जयंत्या २० दिवस,परिक्षांच्या सुट्या २० दिवस आणि स्वताच्या हक्काच्या रजा २० दिवस शिवाय उन्हाळी सुट्या दोन महिणे म्हणजे ३६५ दिवसांत तुम्ही फक्त १५३ दिवस कॉलेजात असता तर ३०६ तास शिकवता.आणि तोरा केवढा तर जागतिक दर्जाचा.
म्हणून इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेचे काम केल्याबद्दल कुठलेही आंदोलन ,मोर्चा न करता त्यांची सरकारने पगारवाढ केली आहे.ही शेतकऱयांची,बेकार बेरोजगारांची थट्टाच आहे.अंगणवाडी सेविका,विनाअनुदानावर काम करणारे शिक्षक,कंत्राटी ग्रामसेवक,पोलीस पाटील, सफाई कामगार,न्यायालयात काम करणारे कंत्राटी सेवक दिसत नाहीत काय?हे लोक जीव ओतून काम करतात.नेमाडें म्हणतात त्याप्रमाणे प्राध्यापकांना अज्ञानच शोभून दिसते.यांनी यांच्या हाताखालून एकही क्रांतिकारक घडवला नाही.संशोधक,शास्त्रज्ञ,तत्वज्ञ तर सोडूनच द्या.
मला सांगा ...
प्रत्येक श्रमाला बुद्धी लागतेच .. ना
शेवटचा वाफा कधी भिजेल आणि यासाठी कधी मोटार बंद करायची हे आमच्या गुराख्याला कळते . त्यालाही बुद्धी लागतेच ना . तो ती योग्य वापरतो .
शेतकरी शेतमजूर हमाल यांच्या अमुर्त श्रमाची किती रक्कम देता ? ऊसतोणी करताना , शेती करताना , हमाली करताना , कारखान्यात काम करताना बुद्धीचा वापर होत नाही का ?? आणि पाठांतर वाचन आणि लिखान म्हणजे बुद्धीवान का?
कुंभार मडके घडवताना हाताने श्रम करतो.हे झाले शारीरिक श्रम. त्याच जोडिला मेंदुचा वापर होतो.लक्ष द्यावे लागते. नक्षीकाम करताना, आकार देताना , बोद्धीक तान द्यावा लागतो .. म्हणजे हे बोद्धीक श्रम ..
मग प्राध्यापक कोनते वेगळे शारिरीक श्रम करतो ..
मग बुद्धीजीवी प्राध्यापकच कसे ?
(आर्थात काही अपवाद असतात ,आणि अपवाद हा नियम नसातो )
नितीन सावंत, परभणी
9970744142
Friday, 31 July 2020
♦छंदांम्सी कला आणि साहित्य महासभा ♦
Thursday, 23 July 2020
राष्ट्रजागृती वारकरी परिषद - पदाधीकारी कसा असावा
Monday, 29 June 2020
♦राष्ट्रजागृती वारकरी परिषद संपर्क यादी ....
♦राष्ट्रजागृती वारकरी परिषद महाराष्ट्र प्रदेश
ह.भ.प धर्मकीर्ती परभणीकर (मार्गदर्शक)
1)ह.भ.प शिवाजी महाराज शिरसगावकर (प्रदेशाध्यक्ष)+919370333975
2)ह.भ.प रविकांत महाराज वसेकर (प्रदेश उपाध्यक्ष)(संत सावता महाराज ह्यांचे वंशज)
+919922569769
4)ह.भ.प गणेश महाराज अंबाजोगाईकर(मराठवाडा विभागीय अध्यक्ष)+917522987949
5)ह.भ.प शंकर महाराज बाभुळगावकर (तालुका अध्यक्ष भोकरदन)+919890831744
6)रामेश्वर महाराज नालेगावकर (राष्ट्रजागृती वारकरी परिषद मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष)
मो 9970204714,7507416148
7)ह.भ.प.निवृत्ती महाराज कांगणे
( जिल्हाध्यक्ष जालना )
मो. 9923760877
8)गजानन ईलग (मंठा तालुका अध्यक्ष,राष्ट्र जागृती वारकरी परिषद ) मो.9763083454
9)ह.भ.प.शिवाजी महाराज चौधरी
(मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष)
9421867840
10)ह.भ.प अजय महाराज दाभाडे (जिल्हाध्यक्ष औरंगाबाद)+918805513757,+919021667591
11)ह.भ.प पवन महाराज खाडे (महानगर अध्यक्ष औरंगाबाद)+917499308083
12)ह.भ.प अजय महाराज वेलदोडे( जिल्हा कार्याध्यक्ष औरंगाबाद)+919307189759
14)ह.भ.प.ताई महाराज मंगळवेढाकर (प्रदेश कार्याध्यक्ष महिला आघाडी)
+919309187616
Sunday, 7 June 2020
काही पुस्तकांची शीर्षके
*शीर्षक* हा आरसा असतो. म्हणजे शीर्षकाने आधी अर्थबोध होतो की नेमका हा काय प्रकार आहे. पत्रकारितलेले शीर्षके गुढ असतात.लोकांनी ती बातमी वाचावी म्हणून. हिंदी आणि मराठी चित्रपटवाल्यांची प्रतिभा आटल्याने हल्ली त्यांना काय शिर्षके द्यावीत हाच प्रश्न पडलेला आहे. काहीच्या काही नावाची चित्रपटे येत आहेत. काही चित्रपटांत तर शीर्षकाचा आणि आतल्या स्टोरीचा तिळमात्रही संबंध नसतो.
आसो मुद्दा आहे पुस्तकांच्या शिर्षकांचा.लेखक म्हटल्यावर प्रतिभा वगैरे असतेच.आणि ही माणसे जरा हटके आसतात म्हणून मला पुस्तकांच्या शीर्षकाबद्दल नेहमीच कुतुहल राहिले आहे.
एकदा असेच भारी भक्कम वाचनालयात इंट्री माराली. समोर लिहीलेले होते १ते १० क्रमांकाची कपाटे आमदारसाहेबांकडुन. मी मनल हे लोक मात्र आपली प्रसिद्धी करुन घ्यायला पुस्तकांच्या कपाटाच्या काचा पन सोडत नाही. मागे तर एका संडासच्या भिंतीवर आमदार साहेबांचे नाव होते आणि खाली लिहीलेले *साहेबांची कृपा*
आसो पुस्तकांच्या कपाटतल्या त्या ग्रंथांची नावे बघून यानां असाली नावे कशी काय सुचतात हा प्रश्न मला नेहमी पडतो.
एका ऱ्याक मधे
गंगेचे गगन वितळे नावाचा ग्रंथ मोठा दिमाखाने उभा होता. इतका कोरा होता की कुणीही हात लावल्याचे दिसत नव्हते. आता गंगेचे गगण वितळे म्हणजे काय मला तर मेळही लागला नाही. गगन कुठे वितळते का ? किंवा गंगेला पाणी असते गगन कुठे असते काय ?
लेखकाच्या या नाव सुचण्याच्या प्रतिभेला स्याल्युट करुन पुढल्या कपाटात डोकावलो तर शापीत सौंदर्य नावाचा पुस्तोकोबा दिसत होता. सौंदर्यही आणि शापीतही हे ही जरा ऑडच.
मला सर्वात मजेशीर नाव वाटले ते म्हणजे
कुरतडलेला सुर्य.
सुर्याला कुनाची बरे कुरतडायची हिम्मत.पण लेखकोबा मात्र काहीही करु शकतात.महातेजस्वी सुर्यालाही कुरतडायला हे लोक कमी करत नाहीत.असेच मला एका हिंदी चित्रपटाचे नाव आठवले सुरज का सातवा घोडा.
म्हणजे पहिला घोडा नाय, दुसरा नाय,लक्ष कोण्या घोड्यावर तर सातव्या.
याच्या अमर कहाणी ,त्याची अमर कहाणी असल्या अमर कहाण्या तर लै झाल्यात.एका ग्रंथावर नाव होते बापुजांची अमर कहाणी.हे बापुजा कोन होते आपल्याला (आज्ञानाला ) माहिती नाय.
पुढे तर कहरच विनोदी कथा कांदबरीच्या ऱ्याक मधे भारतीय संस्कृती कोष खंड क्रमवार लावलेले होते.
म्हटले अगदी योग्य जागी लावलेत हे खंड आमची संस्कृती हल्ली हसण्याचाच भाग झालीय.म्हणून त्या खंडांची गणना विदोनी साहित्यात केलीय.ही संस्कृती विष्णुच्या बेंबटातून निर्माण झालीय म्हटल्यावर ती विनोदी साहित्यातच येनार ना.
नवनीत इयत्ता ४ थी चे मार्गदर्शक पुस्तक रहस्यमय कांदबरीत लावलेले सापडले.मुळ पुस्तकांचा अभ्यास करावा वाटेना गेला की पळवाट म्हणून नवनितचा अभ्यास करुन पास होण्याचे धवपळीचे मार्ग म्हणजे हे रहस्यमयच म्हटले पाहिजे.
मराठवाडा मुक्ती संग्रामचा लढा च्या साहित्याचा रकाना होता.त्यात एक पुस्तक होते पोटदुखी विसरा.
हा लढा एक पोटदुखी आहे आणि तो विसरा.हा हा हा
पुन्हा मर्ढेकर नावाचे एक बुक दिसले. तोच तो लेखक कवी लोक कशाला वाचतील बरे.पुन्हा म्हटल्यावर नको रे बाबा असेच म्हनतील लोक.आवारा मसिहा आणि टिळकांचे चरित्र अगदी जवळ जवळ लावलेले होते.या दोनही पुस्तकांचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता.पण मला मात्र टिळक म्हणजेच आवारा मसिहा वाटला.
असो सर्वात हास्यास्पद नाव काय असेल तर खालील पुस्तकाचे शिर्षक होते.मी तर खळखळून हसलो.
क्रांतीसुर्य म्हटले की जोतीराव फुले आठवतात,किंवा बाबासाहेब यांनाही ती उपाधी देता येइल.पण शिर्षक होते
"क्रांतीसुर्य सावरकर"
नितीन सावंत परभणी
दि.७ जुन २०२०
Wednesday, 3 June 2020
ll राष्ट्रजागृती वारकरी परिषदेची वैशिष्ट्ये आणि भूमिका ll
ll राष्ट्रजागृती वारकरी परिषदेची वैशिष्ट्ये आणि भूमिका ll
♦ *राष्ट्रजागृती वारकरी परिषद* ♦
🚩प्रेरणास्थान 🚩
संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखोबाराय, संत सोयराबाई, संत निर्मळा, संत बंका महाराज, संत कुर्मादास, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत कबीर, संत रविदास, संत मीराबाई, संत दामाजीपंत, संत नरहरी महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबाकाका, संत सज्जन कसाई, संत शेख मुहम्मद, संत सखुबाई, संत चांगदेव, संत विसोबा खेचर, संत महायोगिनी मुक्ताबाई, संत भानुदास महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकोबाराय, संत शहामुनी, संत लतिफशाह मंगळवेढेकर, संत कान्होपात्रा, संत सेनामहाराज, संत परिसा भागवत, संत बहिणाबाई,संत धन्ना जाट, संत गुरु नानक, संत दादू पिंजारी, संत गोरक्षनाथ, संत मच्छिंद्रनाथ, संत बसवाण्णा, संत चक्रधरस्वामी, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेमहाराज.
♦उद्देश :
१) कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, ही वारकरी सांप्रदायाची सामाजिक विषमता मोडणारी शिकवण आचरणात आणायला शिकविणे.
२) संत नामदेव, संत तुकोबाराय ते संत तुकडोजी, गाडगेबाबा या सर्व संतांचे तत्वज्ञान जनतेत रुजविणे.
३) हिंसा, अनाचार, व्यसनाधीनता, या विरुद्ध आवाज उठवून सामाजिक प्रेरणा सक्षम करणे आणि सामुदायिक कृतीला प्रोत्साहन देणे.
४) संकटाच्या कालखंडात, नैसर्गिक आपत्ती, सामाजिक ताणतणाव, अशा काळात जनतेचे मनोधैर्य टिकवून ठेवणे, आपत्कालीन परिस्थीतीत स्वप्रेरणेने शांतता प्रस्थापित करणे.
५) कृषी संस्कृतीची प्रागतिक मूल्ये जनतेपर्यंत पोहचविणे.
6) वारकरी सांप्रदायात कार्यरत असणाऱ्या प्रागतिक समाजाला पुढे नेणारे वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी व टाळकरी संघटीत करणे.
७) किर्तने, प्रवचने, परिषदा, प्रकाशने, संम्मेलने भरवणे.
८) महिला वारकरी वर्गाला प्रोत्साहीत करणे व सक्षम बनवणे. त्यांना वारकरी विचारपीठ उपलब्ध करुन देणे. महिला कीर्तनकार, प्रवचनकार बनवणे.
९) सर्वधर्म, तीर्थक्षेत्रेस्थळी अमानवीय, प्रथा, अस्पृश्यता, जातीय विषमता संपुष्टात आणून राज्यघटनेने दिलेल्या मानवी नागरी हक्कांचे रक्षण करणे.
१०) अनिष्ट, चुकीच्या आणि विषमतामूलक बाबींपासून समाजाचा बचाव करणे. भेदाभेद भ्रम अमंगळ हे तत्व समाजात रुजवणे.
११) भजनी, प्रवचनकार, वारकरी, कीर्तनकार यांच्यासाठी आरोग्य, अपघात, वार्धक्य यासाठी उपक्रम राबवणे व सामाजिक सुरक्षा देणे.
१२) संतपीठाला सामुदायिक चेतनेचे विचारपीठ बनवणे. त्यासाठी शिक्षण, संशोधन, पथदर्शक प्रकल्प राबवणे व संतपीठाच्या सहकार्याने ते चालवणे.
१३) अशाच प्रकारचे कार्य करणाऱ्या देशाच्या आणि देशाबाहेरील प्रवाहांशी सुसंवाद ठेवणे, विचारांचे आदान-प्रदान करणे.
१४) ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये, संदर्भग्रंथालये, स्थापित करणे, शासनाच्या मदतीने व स्वंयप्रेरणेने हे चालवणे.
१५) ही राष्ट्रजागृती वारकरी परिषद पूर्णपणे मानवमुक्ती मिशनशी सुसंगत उद्दीष्टाने कार्यरत राहील.
♦ ऱचना :
१) सभासदत्व फिस :५ शे रु वार्षिक.
२) राज्यस्तरीय कार्यकारीणी एक निमंत्रक, पाच सहनिमंत्रक आणि एक खाजिनदार राहील.
३) ही परिषद दर ३ वर्षाला भरेल. जुन्या कार्यकारीण्या बरखास्त होऊन, नवनियुक्त्या होतील.
🚩सभासदत्वाच्या अटी 🚩
१) घटना व नियम मान्य पाहिजेत.
२) प्रतिज्ञा घेतलेली पाहिजे.
३) मुखपत्राचे वर्गणीदार असले पाहिजे.
४) एका जनआघाडीत सक्रिय असले पाहिजे.
५) जनतेत सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय भूमीकेत ठाम कार्यरत असले पाहिजे.
🚩कृती आराखाडा 🚩
१) संत नामदेव-संत तुकोबाराय जागृती अभियान दरवर्षी राबवा.
२) वारकरी,कीर्तनकार, टाकळरी, भजनी, प्रवचनकार, भारुडकार, वारकरी गायक यांना पेन्शन लागू करा.
३) वारकरी तीर्थक्षेत्रे, धर्मस्थळे अशाठिकाणी मदत केंद्रे चालवा.
४) संतपीठामार्फत वारकरी, भजनी, प्रवचनकार, कीर्तनकार, भारूडकार, टाळकरी यांची नोंदणी करा, प्रमाणित करा.
५) नोंदणीकृत वारकऱ्यांना समाजजागृती अभियानात सहभागी करा.
६) सर्व धार्मिक स्थळांचा निधी सामाजिक उत्थान व विकासासाठी वापरा, देवस्थान व तिर्थक्षेत्रांच्या निधी मधील अनागोंदी, भ्रष्टाचार दूर करा आणि कायमस्वरूपी नियंत्रण स्थापित करा.
७) तीर्थक्षेत्र स्थळावरील छोटे व्यवसाय करणारे आणि उपजीविका करणारे सर्वच यांना किमान सुविधा उपलब्ध करा. नियोजित विकास करा.
८) जिल्हास्तरावर व तीर्थक्षेत्रस्थळी सुसज्ज वारकरी भवन उपलब्ध करा.
९) वारकऱ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ द्या.
१०) प्रत्येक संताच्या जन्मगावाचा विकास करा. रस्ते बांधा आणि भव्य भक्तनिवास उभे करा.
११) शिक्षक मतदारसंघासारखा वारकरी मतदारसंघाची तरतूद करण्यात यावी.
१२) ब्राम्हण पुरोहीतांप्रमाणे वारकऱ्यांना दरमहा मासिक वेतन सुरु करण्यात यावे.
*******************************
on January 04, 2017
ह.भ.प.शिवाजी महाराज इंगळे सिरसगावकर,
(प्रदेशाध्यक्ष राष्ट्रजागृती वारकरी परिषद)
मो:9370333975
Monday, 1 June 2020
♦अनादि निर्मळ वेदांचे जे मुळ l
वेदांचे मूळच आमचा पांडुरंग आहे ..
अनादि निर्मळ वेदांचे जे मुळ l परब्रम्ह् सोज्वळ विटेवरी ll कर दोन्ही कटी राहिलासे उभा l नीलवर्ण प्रभा फांकतसे ll आनंदाचा कंद पाऊले साजिरी l चोखा म्हने हरी पंढरीये ll - संत चोखोबाराय
प्रस्तुत अभंग संत चोखोबारायांच्या स्वमुखातील अत्यंत गौरवशाली उदगार आहेत.गौरवशाली यासाठी की ब्राम्हणी व्यवस्थेने ज्यांना हिन अस्पृश्य अपवित्र मानले त्या चोखोबारायांनी विठ्ठलाचे वर्णन करणे क्रांतिकारी आणि गौरवशाली आहे.मध्ययुगीन भारतात जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता अत्यंत काटेकोर आणि टोकाची बनली होती.मंदिरांवर देव आणि धर्मावर पूर्णपणे ब्राम्हणांचे नियंत्रण प्रस्थापित झालेले होते. अस्पृश्य जातीत जन्माला आलेल्यांना मंदिराचे दरवाजे बंद होते.त्यांना ज्ञानबंदी होती, शिकायचे नाही , लिहायचे नाही , वाचायचे नाही . एवढेच काय आपल्यापेक्षा उच्चजातीय व्यक्तिला ज्ञानाच्या वक्तव्यात बोलायचे नाही. अस्पृश्यांसाठी जी जी आणि व्हय जी एवढेच.आशा काळात पंढरपूरात संत चोखोबाराय चक्क वेदांच्या पलीकडील भाष्य करतात मोठे क्रांतिकारी आहे हे. पंढरपुरातील बडवे ब्राम्हण चोखोबारायांना हिन अस्पृश्य मानतात.हे बडवे वैदिक व्यवस्थेचे प्रतिनिधी आहेत.जे वेदांना प्रधान प्रमुख मानतात.आशांना अस्पृश्य जातीतून आलेला संत ज्ञानाची अनुभूती देतो आणि म्हनतो
"तुम्ही ज्या वेदांना प्रमाण मानता त्या वेदाचे मुळच आमचा विठ्ठल आहे.तो अनादि अनंतकाळापासुन आहे.अगदी निर्मळ स्वच्छ भेदरहित."
एका अस्पृश्य संतांचे तत्वज्ञानाच्या पातळीवर प्रतिछावनीला उत्तरे देने फारच धाडसाचे आहे.विठ्ठलाचे मुळ शोधणे आणि वैदिकांच्या आधीचे म्हणून वैदिकांच्या मांडणीला सुरुंग लावने रणनीतीचा भाग आहे.तुम्ही वेद काय सांगता आमचा विठ्ठल त्याच्याही आधिचा आहे.युक्तिवाद करावा तो असा.
पुढे चोखोबाराय म्हणतात
"तो अनादि निर्मळ दोन्ही हात कमरेवर ठेवून विटेवर उभा आहे.आणि त्याच्या तेजाची नीलवर्ण प्रभा सर्वत्र पसरली आहे"
येथे संत चोखोबाराय पांडुरंगाची प्रभा नीलवर्ण म्हणून मांडतात.ती गौरवर्णीय नाही.गौरवर्ण वैदिकांचा तर नीलवर्ण द्रविडांचा.कृष्ण महादेव खंडोबा निलवर्णीयच.अगदी विठ्ठलही नीलवर्ण प्रभा घेवून सर्वत्र प्रसिध्दीस पावला आहे.
या पध्दतीने वैदिकांच्या असमानतेच्या विषमतेच्या विकृतीला संत चोखोबाराय पर्यायी संस्कृती निर्माण करत होते.
म्हणून ते म्हणतात "आमच्या आनंदाचे उत्सवाचे प्रतिक हा पांडुरंग आहे. हा हरी पांढरीचा आहे.तो इतर ठिकाणचा नव्हे."
ही मांडणी चोखोबाराय करतात.हे सर्व दुर्लक्षुन कसे चालेल.
अस्पृश्य मानलेल्या व्यक्तीने विठ्ठलाचे मुळ शोधने खऱ्या अर्थाने विठ्ठलाला पवित्र करण्यासारखे आहे ..
चोखोबारायांची वैचारिकता किती ग्रेट होती. म्हणून आम्ही राष्ट्रजागृती वारकरी परिषदेसाठी लोगोखाली संत चोखोबारायांच्या ह्या अभंगाची ओळ निवडली आहे..
धर्मकीर्ती महाराज परभणीकर 9970744142
Tuesday, 26 May 2020
♦गांधी शिवाय मार्क्सवाद चालवता येतो.
♦गांधी शिवाय मार्क्सवाद चालवता येतो.
जाती व्यवस्था समर्थक, वेदांती विचाराचे प्रचारक गांधी पुरोगामी चळवळीचे प्रतिक म्हणून स्विकारा हा अट्टाहास का ? कशासाठी ?
या देशातील जातीवाद असा की
आजच्या या जात-वर्गीय ब्राम्हणी व्यवस्थेतील निम्नजातीय व्यक्तीने जागतिक दर्जाचे काम केले तरी ते सर्वांना अनुकरणीय, व्यापक प्रतिक बनु दिले जात नाही. बनवले जात नाही. उदा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जे जागतिक दर्जाचे विचारवंत,भारतीय अस्पृश्यता, जातीव्यवस्था ही समस्या प्रथम प्राधान्यक्रम देवून जागतिक पटलावर चर्चेला आननारे महान व्यक्तीमत्व. त्यांच्याबद्दल लैच मजबुरीने हात आखडता घेवून, नाविलाजाने जयंतीच्या शुभेच्छा वगैरे दिल्या जातात.
पण, ज्या गांधीचे संपूर्ण जीवन जात-वर्गीय व्यवस्थेच्या समर्थनार्थ गेले. अस्पृश्यता निवारण्यासाठी द्यायच्या उपायाच्या संभ्रमावस्थेत गेले. त्या गांधीजीला ओढून ताणून तत्वज्ञ बनवून त्यांच्या विचारसरणीला गांधीवाद वगैरे बनवून मिठ मसाला लावून बळजबरीनेच प्रतिक म्हणून थोपवणे पुरोगामी चळवळीत आजही चालु आहे.
#गांधीनी_तुकोबांचे_अभंग इंग्रजीत भाषांतरीत केल्याने ते लगेच पुरोगामी होतात. लिखानाचा विषय बनतात. पण तुकोबांच्या संकल्पनेतला मुक्यांचा नायक ठरलेला मूकनायककार मात्र उपेक्षित असतो. कारण काय ? जातीव्यवस्थाच ना ?
डॉ आंबेडकर हे निम्नजातीय प्रतिक नको ..
काहीजण म्हणतात संपूर्ण गांधी नाकारता येनार नाही. गांधी थोडेफार चांगले होतेच की.
आता बहुजनांच्यात तथा सर्वहारांत हजारो प्रतिके, महापुरुष एकापेक्षा एक गुणसंपन्न असताना थोड्यास्या गुणसंपन्न व्यक्तीला प्रतिक म्हणून स्विकारा हा अाग्रह का ? कॉग्रेस टिकली पाहिजे जगली पाहिजे असे ज्यांना वाटते त्यांनी आपली आयडॉलॉजी बदलून घ्यावी. प्रतिके बदलून घ्यावेत. इतकुसाकच चांगला असलेला गांधी बाजुला ठेवून फुले आंबेडकर प्रतिक म्हणून स्विकारावेत.
#जातीव्यवस्था_वर्णव्यवस्थेचे_समर्थक तथा डाव्या पक्षांचा कधीच साधा सदस्यही नसलेले गांधी आज डाव्यांच्या आयडॉलजीचा कणा बनलेले आहेत. पण डाव्या चळवळीचे सदस्य तथा स्टार प्रचालक असणारे आणि जातवर्गांतक साहित्य लिहीनारे अण्णाभाऊ मात्र डाव्यांचे गांधीएवढे तात्विक प्रतिक बनलेले नाहीत.
कारण काय ?
अण्णाभाऊ माजी अस्पृश्य जातीतुन आलेले तर गांधी #उच्चजातीय_प्रतिक...
गांधीला विरोध म्हणजे संघाला मदत अशी एक भिती दाखवली जाते.
मग गांधी स्विकारणे म्हणजे आंबेडकरी विचारधारेशी द्रोह नव्हे का ?
पण डॉ आंबेडकर विचारात कोण घेतोय ....
त्यांचे म्हनने असते तुम्हाला गांधी समजलेच नाहीत. तुम्ही गांधीवरली ही ही पुस्तके वाचा. मग त्यांना विचारले तुम्ही आंबेडकर वाचले का तर ते नाही म्हणतात.
#गांधी समजून घेण्यासाठी आंबेडकर सुद्धा वाचावे लागतात हे त्यांना मान्य नसते. हा मोठाच आंतर्विरोध.
गांधी प्रतिक म्हणून स्विकारा हा अट्टाहास का ?
आमची पण प्रतिके स्विकाराकी ...
--------------------------------------------------------------------------
भारतामधे आलेली मार्क्सवादी चळवळ ही उच्चजातीयांनी आणल्यामुळे ती जात्यांतक न रहाता केवळ वर्गांतक हा एकेरी लढा लढत राहिल्याने आज मार्क्सवादी पक्षांची फार मोठी सरशी झालेली आहे.
तरिही फुले आंबेडकरवादाचा व्यावहारिक जोड डाव्यांना अजूनही घ्यायचा नाही.फुले आंबेडकर व्यावहारिक जात्यांतक पण ते शुद्र आतिशुद्र जातीतले तर गांधी बनिया उच्चजातीय तो चालवायला सोपा जातो म्हणून अजूनही ज्याचा कुठलाही तत्वज्ञानात्मक वाद नाही तो गांधीवाद ब्राम्हणी डावे सोडायला तयार नाहीत.
जातवर्गस्त्रीदास्यांतक तत्वज्ञान उभारणारे कॉ.शरद पाटील
गांधीबद्दल म्हणतात...
1)काँग्रेसचे सर्वोच्च नेते टिळक व गांधीजी हे चातुर्वर्ण्य समर्थक वेदांती होते.
(जात्यांतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पुर्ती पेज नंबर १७९ )
2) आणि खुद्द बनिया भांडवलदार जातवर्ग बुद्धकालीन मेंडकासारख्या गहपती भांडवलदारांचा क्रांतिकारी वारसा चालवणारा कधीच नव्हता. त्यांचे महत्तम राजकीय प्रतिनिधी गांधीजी.निळउत्पादक भारतीय शेतकऱ्यांची ब्रिटिश प्लॅटर्सविरुद्ध बाजू घेऊन लढणारे गांधीजी एक होते. तर सत्याग्रहींनी जमीनदारांचा खंड द्यायचे बंद करण्यापर्यंत जाऊ नये म्हणून चौरीचौरा ची पोलीस चौकी जाळली गेल्याचे निमित्त करून सत्याग्रहसंग्राच बिनशर्त मागे घेणारे गांधीजी दुसरे होते.ब्रिटिश सरकारने दिलेला कम्युनल ॲवॉर्ड मान्य करणारे गांधीजी एक होते. तर तो अस्पृश्यांना लावावा या आंबेडकर यांच्या मागणीला जिवावर उदार होऊन विरोध करणारे गांधीजी दुसरे होते.पण हे दोन्ही विरोध मिळून गांधीजी बनले होते.कारण भांडवलदार जातवर्गाला जातीव्यवस्था अबाधित ठेवून स्वातंत्र्य पाहिजे होते.आज या जातवर्गाला वरचढ शेतकरी जातींच्या उच्चभ्रूकडील वरकड जमिनींचे अतिशुद्रांत फेरवाटप करून संपन्न ग्रह बाजारपेठ निर्मायाला विरोध आहे. आणि म्हणूनच औद्योगिक विकास ठप्प होऊन बेकारी व दारिद्र्य वाढले आहे.
(जात्यांतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पुर्ती पेज नंबर 188 )
3)गांधीजींनी जरी स्वातंत्र्यचळवळीत शेतकऱ्यांप्रमाणे स्त्रियांना आणले तरी त्यांनी आंबेडकरांची जातीअंताची मागणी न स्वीकारल्यामुळे उच्च जात वर्गीय स्त्रियांच्या पलीकडे स्वातंत्र्यचळवळीत स्त्री आल्या नाहीत.
( जात्यांतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पुर्ती पेज नंबर १९४)
------------------------------------------------------------------------
१)गांधी हे वर्णव्यवस्थेचे समर्थक होते.जातीव्यवस्था त्यांना इश्वरदत्त वाटे.त्यामुळे ते मार्क्सवाद:फुले आंबेडकरवादी गटाचे तथा सौत्रांतिक मार्क्सवादी गटाचे प्रतिक नाही बनु शकत..
२) डॉ बाबासाहेब आंबेडकर गांधीला नेहमी मिस्टर गांधी म्हणायचे.त्यांनी संबंध आयुष्यात गांधीला कधीही महात्मा म्हटले नाही
३) व्हाट गांधी ॲंड कॉग्रेस ह्याव डन टु अनटचेबल्स
हा ग्रंथ लिहून बाबासाहेबांनी तेव्हाच गांधी पुर्ण उघडे पाडले आहेत.
ते सर्वहरांच्या जात्यांतक लढ्याचे प्रतिक बनु शकत नाहीत .
४)इंडिया टुडे नावाच्या सर्वाधीक खपाच्या मासिकाने सुद्धा गांधीजींच्या ब्रम्हचर्यत्वाच्या प्रयोगांवर निर्भयपणे लिहीलेलेले आहे ..
५)गांधीवाद तत्वज्ञान वगैरे होऊ शकत नाही.तरी त्याला ओढून ताणून तत्वज्ञान बनवने म्हणजे बळजबरीनेच उच्चजातीय प्रतिक स्विकारणे होय.
6)हजारो वर्षापासून उपेक्षीत असणारे माजीअस्पृश्य लोक जेव्हा हक्क अधिकार मागत होते तेव्हा त्यांना स्पेशल मताधिकार मिळु नये म्हणून उपोषण करुन खोडा घालनारे गांधी मानने म्हणजे माजी अस्पृश्य जातींची क्रूर थट्टा आहे.हे म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जखमेवर मिठ चोळणे होय.
--------------------------------------------------------------------------
गांधीवादाचा रस्ता जातीव्यवस्था,वर्णव्यवस्थेच्या समर्थाने उच्चजातवर्गीयांची निमसरंजामी निमभांडवली व्यवस्था मजबुत करणाऱ्या राजकीय ध्येयस्थळी पोहंचतो.हा सबरमतीचा संत ज्यांच्या कृतीत आहे ते जय भीमचे नारे फक्त स्टेजशोसाठी देतात.त्यांच्या उक्तीत आणि कृतीत अंतर आहे.आम्हाला कृतीत ॲनहिलेशन ओफ कास्टवाले,ह्युमिनीटीला प्रधान माननारे आंबेडकर हवेत. इश्वर अल्लाह तेरो नाम ही समरसता झाली.ती आम्हाला नकोय.गांधी आंबेडकरवादाचा तात्विक मेळ बसु शकत नाही.त्याचे निर्माते परस्परविरोधी विचारधारेचे एकाच काळातील प्रतिनिधी आहेत.जात्यांध की जात्यांतक हा आमचा प्रधान निकष आहे.आता पुन्हा इमोशन्यालिटीची लाट गांधीच्या रुपाने आनने म्हणजे पुन्हा पुर्वीचीच उच्चजातवर्गीयांचीच ब्राम्हणी व्यवस्था स्वताहून मागणेच ठरेल.हा काळ प्रखर भूमिका घेण्याचा आहे.अन्यथा पुर्वीचे पाढे पन्नास..
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
#फुले_आंबेडकर_अपरिहार्य
#अब्राम्हणी_कम्युनिझम
नितीन सावंत परभणी
9970744142
Thursday, 21 May 2020
भांडवली ईमानदारी आणि प्रामाणिकपणा
भांडवली ईमानदारी आणि प्रामाणिकपणा
जागतिक समाजव्यवस्थेचे मार्क्सवादाने एकूण सहा कालखंड केलेले आहेत.
आदिम साम्यवाद, सरंजामशाही,भांडवलशाही,साम्राज्यशाही,कम्युनिझम,आणि असे राज्य तिथे शासनसंस्था नसतील तो साम्यवाद.
प्राच्यविद्यापंडीत कॉ.शरद पाटील यांनी आदिम साम्यवादामधे मातृसत्ता आणि स्त्रीसत्ता तर सरंजामशाही मधे तुर्कपुर्व आणि तुर्क आल्यानंतर खालून वरुन अशा सामंतप्रथा उभ्या केल्या आहेत.
भारतीय सरंजामशाहीमधे वर्णजातीय अभ्यास करताना अंतर्गत द्वंद्व, शोषणाची यंत्रणा याच बरोबर काही गुणविशेषही आपल्याला अभ्यासण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय भांडवलशाहीचे डावपेच आपल्याला कळनार नाहीत.
सरंजामशाहीमधे प्रामाणिकपणा, इमानदारी, नैतिकता, सदाचार, हे सर्व गुण प्रत्येकाला कंपलसरी पाळणे बंधनकारक आहे. कारण हि सरंजामशाही आपसी सालोहीत संबधाने, वस्तुविनिमय पद्धतीने बांधलेली आहे. एखादा गुण एखाद्या व्यक्तीने सोडला किंवा तो वाईट वागला,चुकला तर सामूहिक बहिष्काराद्वारे किंवा इतर शिक्षेद्वारे तो गुण पाळण्याची नियमावली पुन्हा प्रस्थापित केली जाते. सरंजामशाहीत 'जान जाय पर वजन न जाए' अशी यंत्रणा आहे. तिथे शब्दांचा आदर आहे. दिलेला शब्द आणि वचन पाळले जाते.
म्हणून सरंजामशाहीत 'पुरस्कारवितरण सोहळे' तुम्हाला दिसनार नाहीत.अत्यंत प्रामाणिक असल्याबद्दल,पैसे कमावताना टार्गेट पूर्ण केल्याबद्दल, उत्तम संवादकौशल्याबद्दल, नोकरी, काम प्रामाणिकपणे करत असल्याबद्दल पुरस्कार वगैरे. असले पुरस्कार सरंजामशाहीत तुम्हाला दिसनार नाहीत. हि देन भांडवलशाहीची. सरंजामदाराप्रती निष्ठा असणे अत्यंत महत्वाचे.
भांडवलशाहीत एकमेकांचे संबंध व्यावहारिक आहेत.त्यात पैशांच्या स्वरूप देवान घेवान होते,आणि पर्याय उपलब्ध असतात.शिवाय नफा हा उद्देश प्रधान बनल्यामुळे प्रामाणिक असणे,ईमानदार असने दुर्मिळ होत चालल्यामुळे त्यांना असले पुरस्कार देवून भांडवलशाहीला प्रामाणिक असल्याचे चित्र उभे करावे लागते. मोठा झालझोल करनाऱ्याला पुरस्कार देवून त्याला प्रामाणिक असल्याचे भांडवली यंत्रणा दाखवत असते.हे पुरस्कारही त्यांनीच निर्माण केलेले असतात.पुरस्कार वितरनाचे निकषही त्यांचेच असतात. किंवा मेडियाद्वारे पब्लिसिटी देवून भांडवली व्यवस्था एखाद्याला हिरो बनवते जो भांडवलदारांच्या ओंजळीने पाणी पित असतो.
तुम्ही तुमच्या क्षेत्रात प्रामाणिक असने कौतुकास्पद कसे होऊ शकेल? प्रामाणिकपणा हा तुम्हाला मिळालेला उपजत गुण आहे.तो तुम्ही पाळलाच पाहिजे.तुम्ही प्रामाणिक असायलाच हवे ना. तुम्ही इमानदार नाहीतर काय बेइमान होनार का ? स्पेशली सरकारी क्षेत्रात काम करनाऱ्या एखाद्याला मेडिया ते खुप ईमानदार आहेत,प्रामाणिक आहेत म्हणून जर पब्लिसिटी देत असेल तर समजावे काहीतरी लफडा आहे.
त्याला पगार कशासाठी मिळतो ? इमानदार आणि प्रामाणिक असण्यासाठीच ना ? कि बेइमान वागावे म्हणून ?
सरकारी क्षेत्रात काम करनार्यांचा इमानदारी हा गुण कौतुकाचा विषय होऊ शकत नाही जरी भांडवलशाही त्यांचे कौतुक करत असेल तरी...
हल्ली वकिलीच्या क्षेत्रात आमका ईमानदार म्हणून विशिष्ट व्यक्तिला पब्लिसिटी आशा प्रकारे दिली जाते जणू काय सर्व वकिल बेइमानच आहेत. पोलीस खात्यातातही विशिष्ट मेकअप केलेला चेहरा भांडवलशाही ईमानदार म्हणून दाखवते जणू काय सर्वच सावळे काळे खरबड्या तोंडाचे बेइमानच असतात. यात आयुक्त असो नाहीतर कलेक्टर ते लै ईमानदार आहेत म्हणून भक्ताड आणि ते आपल्या जातीचे हाइतवाले रोज पारायणे करत असतात.मग तुमच्या साहेबाला पगार न घेता इमानदार प्रामाणिक रहा म्हनावे? जनु काय आख्खे जग बेइमान झाले आहे. आणि हे दोनचारजनच तेवढे प्रामाणिक, इमानदार उरले आहेत.
कर्तव्यात इमानदारी आणि या प्रामाणिकपणा या गुणांचे कौतुक होत असेल तर समजावे देश विनाशाच्या दिशेने जात आहे. कारण हे गुण दुर्मिळ होत असल्याचे लक्षण आहे.
नितीन सावंत परभणी
9970744142
३१/१२/२०१८
Wednesday, 20 May 2020
ll संत चोखोबारायांचा समाधी सोहळा दिवस ll
ll संत चोखोबारायांचा समाधी सोहळा दिवस ll
सर्वच संतांवर सर्वात मोठा अन्याय कोणता झाला असेल तर त्यांची मते विकृत करुन खपवली गेल्याचा.किंवा संत जे म्हनालेच नाहीत ते त्यांच्या नावे खपवले जाने.काही संतांवर तर त्यांचे श्रेय दुसऱ्यालाच देवुनही अन्याय झालेला आहे.
वारकरी सांप्रदायाचे पहिले आणि मुख्य नेतृत्व संत नामदेव होत.त्यांनीच उत्तरेकडे दौरे काढले,सांप्रदायाचे अभंगरुपी तत्वज्ञान निर्माण केले आणि विठ्ठलाची आरती लिहीली.तरी त्यांना अडगळीत टाकण्याचा मोठा कट महाराष्ट्रात आजतागायत झाला आहे.
संत चोखोबारायांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात संत नामदेव यांनी वेळोवेळी भूमिका घेतली होती.पंढरपूरातील ब्राम्हण बडव्यांनी चोखोबारायांना पंढरपूराच्या बाहेर हकलल्यानंतर चोखोबाराय चंद्रभागेच्या पलीकडे जावुन राहिले असताना,संत नामदेव संपूर्ण संतमंडळाला तिथे घेवून गेले.सर्वांनी संत चोखोबारायांच्या घरी सहभोजन केले.मोठा उत्सव साजरा केला गेला.संत चोखोबाराय वेस पडुन गतप्राण झाल्यानंतर मंगळवेढ्याच्या वेसीच्या ढिगार्यातून त्यांची हडे गोळा करुन पंढरपूरातील विठ्ठल मंदिराच्या पायरीला समाधी बांधण्याचे मोठे धाडस संत नामदेव यांनी केले होते.या संपूर्ण सोहळ्याचे नेतृत्वच संत नामदेव यांच्याकडे होते.तरी त्यांना मुख्य नेतृत्व म्हणून मानण्यास ब्राम्हणी छावणीचा विरोध आहे.
संत चोखोबारायांचा समाधी उत्सव वैशाख महिन्यात साजरा केला जातो. या उत्सवाचे नियोजन संत नामदेव महाराजांचे वंशज असलेल्या नामदास मंडळींकडे असते. वैशाख वद्य पंचमी हा चोखोबारायांचा निर्वाण दिवस तर वैशाख वद्य त्रयोदशी हा चोखोबारायांचा समाधी बांधली तो दिवस. समाधी सोहळ्यानिमित्त छोटा मांडव घातला जातो. वैशाख वद्य पंचमीपासून अखंड वीणा उभा रहातो. वैशाख वद्य त्रयोदशीला कीर्तन व महाप्रसाद होतो.
नितीन सावंत परभणी
दि.20/5/2020