Thursday, 8 October 2020

जात काय असते ? ती कशी ओळखायची ?

जात काय असते ? ती कशी ओळखायची ?

१.आजही आनेक गांवामधे माजी अस्पृश्य जाती तथा काही भटक्या विमुक्त जाती मंदिरात जावू शकत नाहीत.(लातुर जिल्ह्यातील मातंग असनार्या सरपंच बाईला असेच मारण्यात आले,विदर्भातील अर्वी गावात मंदिरात का आला म्हणून ८ वर्षाच्या लहान मुलाला स्टाइलच्या गरम फर्शीवर ॲसिड टाकुन नग्न बसवले गेले )
२.ह्या जाती भटक्या विमुक्त जाती आणि माजी अस्पृश्य जाती सवर्ण मानल्या गेलेल्या मोठ्या जातींच्या लग्नात पंगतीत जेवू शकत नाहीत. 
३.आशा सामाजिकदृष्ट्या हिन मानले गेलेल्या जातीतील महिलांना मोठ्या जातींच्या वस्तीतून जाताना पायातील वहाणा हातात काढून जावे लागते.हि प्रथा राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश राज्यात काही ठिकाणी आजही चालु आहे. 
४.आजही जे आम्ही जातपात मानत नाही म्हणतात ते सुद्धा खुल्या दिलाने माजी अस्पृश्य जातींच्या पंगतीत सर्वांसमोर जेवायला बसत नाहीत.
५.आजही मोठ्या जातीतल्या कुनाचे घर विक्रीला असेल तर ते पैसे असुनही पुर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातीतील व्यक्तींना विकत घेता येत नाही.माजी अस्पृश्यांनी अस्पृश्य वस्तीतच घरे घ्यावीत,हा दंडक गावापातळीवर आजही आहे. 
६.जागा माजी अस्पृश्यांना म्हणजे शेडुल्ड कास्टला सुटली तर कारभार उपसरपंच म्हणून मोठ्या जातीकडे,वरच्या जातीकडे,सवर्ण जातीकडे असतो.
७.माजी अस्पृश्य जातीतीचा किंवा भटक्या विमुक्त जातीतील एखादा शिकून कितीही मोठा झाला,गावात फोरव्हिलरमधे आला तर त्याची प्रावेटात टिंगलटवाळी केली जाते.त्याला हिनत्वदर्शक वागणूक दिली जाते.
७.आजही बऱ्याच गावांमधे माजी भटक्या विमुक्त तथा माजी अस्पृश्य जातींच्या वृद्ध व्यक्तीना मोठ्या जातीचे लहान मुले,कमी वयाचे सुद्धा आरे कारे करुन बोलतात. 
८.भटके विमुक्त तथा माजी अस्पृश्यांच्या नावाला कधीही राव,जी,साहेब,सर आशी आदरार्थी विषशने लावली जात नाहीत.
९.मोठ्या जातीच्या सार्वजनिक स्वयंपाकासाठीची भांडी, मोठे पातेले, कढया,अस्पृश्य मानले गेलेल्यांना किरायाने पैसे देवून सुद्धा दिल्या जात नाहीत.कुनी आग्रह करुन दिल्यास मोठ्या जातीतले ते भांडे परत स्विकारत नाहीत. 
१०.अस्पृश्य मानले गेलेल्या जातीनी भडक रंगाचे भारीचे नवे कपडे घातले की आख्खा गाव चिडवतो हसतो .. अस्पृश्यांची मोठ्यातली मोठी व्यक्तीही वाड्याच्या ढाळजेच्या चबुतर्याच्या ओट्याच्या पुढे येवू शकत नाही ..
११.माजी अस्पृश्य जातीतील लोकांनी भारिचे कपडे घातले की गावात म्हणतात ते माजलेत.
१२.माजी अस्पृश्य जातींना आजही उच्चजातीयांचे अभिवादन,संबोधन वापरावे लागते.जसे राम नमस्कार वगैरे परंतू उच्चजातीय कधीही दलीतांचे माजी अस्पृश्य जातींचे संबोधन घालत नाहीत.जय भीम म्हणनार्याची उच्चजातीय आपापसात टिंगलटवाळी करतात.
१३.बऱ्याच गावांत आजही उच्चजातीय लोक माजी अस्पृश्यांच्या घरचे पाणी पित नाहीत.
घरकुल आले इस्किम आली की " साले माजलेत ..."
शिकून नोकरिला लागला की "माजलेत .."
कामावर नाही आला रेटुन बोलला की "साले माजलेत .."
या सर्व गोस्टी जातीवादात मोडतात.यालाच जातीवाद म्हणतात. 
१४)उच्चजातीय पितृसत्ताक मानसिकता बाळगनारे माजी अस्पृश्य जातीतील किंवा भटक्या विमुक्तांच्या स्त्रीयांकडे कधीही आदराने सन्मानाने पहात नाहीत. म्हणून आशा प्रवर्गातील स्त्रीयांची ते नेहमीच सामूहिक बलात्कार करुन सहजरीत्या विल्हेवाट लावतात. 
१५)गावाला मोठे सभागृह असूनही , गावाला भव्य मंदिरे असूनही भटके विमुक्त गावात आल्यानंतर त्यांना गावच्या हगंनदरीत आपला पाल , बिराड उतरावे लागते. एवढेच सरकारी स्वच्छ जागेवर जरी पाल उतरवला तर गावचे टगे त्यांना हाकलून लावतात किंवा पैसे वसुल करतात.
१६) गावच्या बाहेर सरकारी जागेत एखादे भटक्याचे बिराड जास्त काळ विसाव्याला असेल तर त्याच्या घरी कोणी नसताना त्याला न विचारता ते घर जाळले जाते किंवा पाडले जाते.एकाच गावी भटक्यांनी दीर्घकाळ थांबु नये जातीव्यवस्था पाळणाऱ्या वर्गाचा दंडक. 
१७) चोरीचा आरोप सिद्ध होण्याच्या आधीच नेहमीच भटक्या विमुक्तांना आधी सार्वजनिक गावगुंडांचा मारखावा लागतो आणि नंतर पोलीसांचा. 
१८) शुल्लक आरोपांवरून गावचावडीवर संपूर्ण बाई निरवस्त्र करुन तिला मारल्याच्या , जाळल्याच्या किंवा बलात्कार केल्याच्या घटनाही अलीकडील आहेत.कारण त्या निम्नजातीय होत्या.
आजही यंत्रयुगात, it च्या जगात आपण माणुस म्हणून जगु शकत नाहीत का ??
जात काय असते ?? कशी ओळखायची ? खरच ती निसर्गदत्त आहे आहे का ? निसर्गनिर्मित आहे का ? निसर्गनिर्मित असल्याची खुन काय ? 
बरे जात रक्तावर आधारलेली म्हनावे तर दवाखान्यात रोज हजारो बाटल्या रक्ता कुनाचेही कुनालाही दिले जाते. तेव्हा जाती भ्रष्ट होत नाहीत का ?
जात वंशशुद्धत्वावर ओळखायची तर सर्वांचेच वंश शुद्ध आहेत काय ?
मात्रसत्ताक स्त्रीसत्ताक गणव्यवस्थेत स्त्रीस्वैर संभोग करत असे.नवरा नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता.त्याही आधी आदिमानव संस्कृतीत कुठल्याही स्त्रीसोबत कुठलाही पुरुष संबंध ठेवत असे. 
मग कुनाचा वंश शुद्ध आहे बरे ?
तुमच्या जातीचा इतिहास कधीपासून सांगू शकाल ? फार तर एक हजार वर्षापूर्वीपासून, मग मनुष्य निर्मीती किती हजार वर्षापूर्वीची आहे ?? तेव्हा तुमचे पुर्वज कोन होते  ??? तुमची जात कुठे होती ???
तेव्हा गर्वच नाहीतर माज होता का तुमच्या जातीला ??
शोधली पाहिजेत प्रश्नांची उत्तरे. 
लहान मुलांना जात काय असते हे कळतही नाही त्या वयात त्यांना मारणे हे किती अमानवीय कृत्य आहे .
मुस्लिम लहान मुलांना तुझ्या घरात बॉंब बनवतात का असे अनेक शाळेंत शिक्षकांनी प्रश्न विचाराल्याचे पुढे आले आहे. तुम्ही जेहादी आहात असले शिक्षकांकडून टार्गेटिंग झाल्याचे अनेक प्रकारही लहान मुलांकडून उघड झालेले आहेत. 

नितीन सावंत , परभणी
अध्यक्ष मानवमुक्ती मिशन 
9970744142

No comments:

Post a Comment