Tuesday, 26 May 2020

♦गांधी शिवाय मार्क्सवाद चालवता येतो.

♦गांधी शिवाय मार्क्सवाद चालवता येतो.

जाती व्यवस्था समर्थक, वेदांती विचाराचे प्रचारक गांधी पुरोगामी चळवळीचे प्रतिक म्हणून स्विकारा हा अट्टाहास का ? कशासाठी ?

या देशातील जातीवाद असा की
आजच्या या जात-वर्गीय ब्राम्हणी व्यवस्थेतील निम्नजातीय व्यक्तीने जागतिक दर्जाचे काम केले तरी ते सर्वांना अनुकरणीय, व्यापक प्रतिक बनु दिले जात नाही. बनवले जात नाही. उदा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जे जागतिक दर्जाचे विचारवंत,भारतीय अस्पृश्यता, जातीव्यवस्था ही समस्या प्रथम प्राधान्यक्रम देवून जागतिक पटलावर चर्चेला आननारे महान व्यक्तीमत्व. त्यांच्याबद्दल लैच मजबुरीने हात आखडता घेवून, नाविलाजाने जयंतीच्या शुभेच्छा वगैरे दिल्या जातात.

पण, ज्या गांधीचे संपूर्ण जीवन जात-वर्गीय व्यवस्थेच्या समर्थनार्थ गेले. अस्पृश्यता निवारण्यासाठी द्यायच्या उपायाच्या संभ्रमावस्थेत गेले. त्या गांधीजीला ओढून ताणून तत्वज्ञ बनवून त्यांच्या विचारसरणीला गांधीवाद वगैरे बनवून मिठ मसाला लावून बळजबरीनेच प्रतिक म्हणून थोपवणे पुरोगामी चळवळीत आजही चालु आहे.

#गांधीनी_तुकोबांचे_अभंग इंग्रजीत भाषांतरीत केल्याने ते लगेच पुरोगामी होतात. लिखानाचा विषय बनतात. पण तुकोबांच्या संकल्पनेतला मुक्यांचा नायक ठरलेला मूकनायककार मात्र उपेक्षित असतो. कारण काय ? जातीव्यवस्थाच ना ?

डॉ आंबेडकर हे निम्नजातीय प्रतिक नको ..

काहीजण म्हणतात संपूर्ण गांधी नाकारता येनार नाही. गांधी थोडेफार चांगले होतेच की.

आता बहुजनांच्यात तथा सर्वहारांत हजारो प्रतिके, महापुरुष एकापेक्षा एक गुणसंपन्न असताना थोड्यास्या गुणसंपन्न व्यक्तीला प्रतिक म्हणून स्विकारा हा अाग्रह का ? कॉग्रेस टिकली पाहिजे जगली पाहिजे असे ज्यांना वाटते त्यांनी आपली आयडॉलॉजी बदलून घ्यावी. प्रतिके बदलून घ्यावेत. इतकुसाकच चांगला असलेला गांधी बाजुला ठेवून फुले आंबेडकर प्रतिक म्हणून स्विकारावेत.

#जातीव्यवस्था_वर्णव्यवस्थेचे_समर्थक तथा डाव्या पक्षांचा कधीच साधा सदस्यही नसलेले गांधी आज डाव्यांच्या आयडॉलजीचा कणा बनलेले आहेत. पण डाव्या चळवळीचे सदस्य तथा स्टार प्रचालक असणारे आणि  जातवर्गांतक साहित्य लिहीनारे अण्णाभाऊ मात्र डाव्यांचे गांधीएवढे तात्विक प्रतिक बनलेले नाहीत.
कारण काय ?

अण्णाभाऊ माजी अस्पृश्य जातीतुन आलेले तर गांधी #उच्चजातीय_प्रतिक...
गांधीला विरोध म्हणजे संघाला मदत अशी एक भिती दाखवली जाते.
मग गांधी स्विकारणे म्हणजे आंबेडकरी विचारधारेशी द्रोह नव्हे का ?

पण डॉ आंबेडकर विचारात कोण घेतोय ....

त्यांचे म्हनने असते तुम्हाला गांधी समजलेच नाहीत. तुम्ही गांधीवरली ही ही पुस्तके वाचा. मग त्यांना विचारले तुम्ही आंबेडकर वाचले का तर ते नाही म्हणतात.

#गांधी समजून घेण्यासाठी आंबेडकर सुद्धा वाचावे लागतात हे त्यांना मान्य नसते. हा मोठाच आंतर्विरोध.

गांधी प्रतिक म्हणून स्विकारा हा अट्टाहास का ?
आमची पण प्रतिके स्विकाराकी ...
--------------------------------------------------------------------------

भारतामधे आलेली मार्क्सवादी चळवळ ही उच्चजातीयांनी आणल्यामुळे ती जात्यांतक न रहाता केवळ वर्गांतक हा एकेरी लढा लढत राहिल्याने आज मार्क्सवादी पक्षांची फार मोठी सरशी झालेली आहे.
तरिही फुले आंबेडकरवादाचा व्यावहारिक जोड डाव्यांना अजूनही घ्यायचा नाही.फुले आंबेडकर व्यावहारिक जात्यांतक पण ते शुद्र आतिशुद्र जातीतले तर गांधी बनिया उच्चजातीय तो चालवायला सोपा जातो म्हणून अजूनही ज्याचा कुठलाही तत्वज्ञानात्मक वाद नाही तो गांधीवाद ब्राम्हणी डावे सोडायला तयार नाहीत.

जातवर्गस्त्रीदास्यांतक तत्वज्ञान उभारणारे कॉ.शरद पाटील
गांधीबद्दल म्हणतात...

1)काँग्रेसचे सर्वोच्च नेते टिळक व गांधीजी हे चातुर्वर्ण्य समर्थक वेदांती होते.
(जात्यांतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पुर्ती पेज नंबर १७९ )

2) आणि खुद्द बनिया भांडवलदार जातवर्ग बुद्धकालीन मेंडकासारख्या गहपती भांडवलदारांचा क्रांतिकारी वारसा चालवणारा कधीच नव्हता. त्यांचे महत्तम राजकीय प्रतिनिधी गांधीजी.निळउत्पादक भारतीय शेतकऱ्यांची ब्रिटिश प्लॅटर्सविरुद्ध  बाजू घेऊन लढणारे गांधीजी एक होते. तर सत्याग्रहींनी जमीनदारांचा खंड द्यायचे बंद करण्यापर्यंत जाऊ नये म्हणून चौरीचौरा ची पोलीस चौकी जाळली गेल्याचे निमित्त करून सत्याग्रहसंग्राच बिनशर्त मागे घेणारे गांधीजी दुसरे होते.ब्रिटिश सरकारने दिलेला कम्युनल ॲवॉर्ड मान्य करणारे गांधीजी एक होते. तर तो अस्पृश्यांना लावावा या आंबेडकर यांच्या मागणीला जिवावर उदार होऊन विरोध करणारे गांधीजी दुसरे होते.पण हे दोन्ही विरोध मिळून गांधीजी बनले होते.कारण भांडवलदार जातवर्गाला जातीव्यवस्था अबाधित ठेवून स्वातंत्र्य पाहिजे होते.आज या जातवर्गाला वरचढ शेतकरी जातींच्या उच्चभ्रूकडील वरकड जमिनींचे अतिशुद्रांत फेरवाटप करून संपन्न ग्रह बाजारपेठ निर्मायाला विरोध आहे. आणि म्हणूनच औद्योगिक विकास ठप्प होऊन  बेकारी व दारिद्र्य वाढले आहे.

(जात्यांतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पुर्ती पेज नंबर 188 )

3)गांधीजींनी जरी स्वातंत्र्यचळवळीत शेतकऱ्यांप्रमाणे स्त्रियांना आणले तरी त्यांनी आंबेडकरांची जातीअंताची मागणी न स्वीकारल्यामुळे उच्च जात वर्गीय स्त्रियांच्या पलीकडे स्वातंत्र्यचळवळीत स्त्री आल्या नाहीत.
( जात्यांतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पुर्ती पेज नंबर १९४)

------------------------------------------------------------------------

१)गांधी हे वर्णव्यवस्थेचे समर्थक होते.जातीव्यवस्था त्यांना इश्वरदत्त वाटे.त्यामुळे ते मार्क्सवाद:फुले आंबेडकरवादी गटाचे तथा सौत्रांतिक मार्क्सवादी गटाचे प्रतिक नाही बनु शकत..

२) डॉ बाबासाहेब आंबेडकर गांधीला नेहमी मिस्टर गांधी म्हणायचे.त्यांनी संबंध आयुष्यात गांधीला कधीही महात्मा म्हटले नाही

३) व्हाट गांधी ॲंड कॉग्रेस ह्याव डन टु अनटचेबल्स

हा ग्रंथ लिहून बाबासाहेबांनी तेव्हाच गांधी पुर्ण उघडे पाडले आहेत.
ते सर्वहरांच्या जात्यांतक लढ्याचे प्रतिक बनु शकत नाहीत .

४)इंडिया टुडे नावाच्या सर्वाधीक खपाच्या मासिकाने सुद्धा गांधीजींच्या ब्रम्हचर्यत्वाच्या प्रयोगांवर निर्भयपणे लिहीलेलेले आहे ..

५)गांधीवाद तत्वज्ञान वगैरे होऊ शकत नाही.तरी त्याला ओढून ताणून तत्वज्ञान बनवने म्हणजे बळजबरीनेच उच्चजातीय प्रतिक स्विकारणे होय.

6)हजारो वर्षापासून उपेक्षीत असणारे माजीअस्पृश्य लोक जेव्हा हक्क अधिकार मागत होते तेव्हा त्यांना स्पेशल मताधिकार मिळु नये म्हणून उपोषण करुन खोडा घालनारे गांधी मानने म्हणजे माजी अस्पृश्य जातींची क्रूर थट्टा आहे.हे म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जखमेवर मिठ चोळणे होय.
--------------------------------------------------------------------------

गांधीवादाचा रस्ता जातीव्यवस्था,वर्णव्यवस्थेच्या समर्थाने उच्चजातवर्गीयांची निमसरंजामी निमभांडवली व्यवस्था मजबुत करणाऱ्या राजकीय ध्येयस्थळी पोहंचतो.हा सबरमतीचा संत ज्यांच्या कृतीत आहे ते जय भीमचे नारे फक्त स्टेजशोसाठी देतात.त्यांच्या उक्तीत आणि कृतीत अंतर आहे.आम्हाला कृतीत ॲनहिलेशन ओफ कास्टवाले,ह्युमिनीटीला प्रधान माननारे आंबेडकर हवेत. इश्वर अल्लाह तेरो नाम ही समरसता झाली.ती आम्हाला नकोय.गांधी आंबेडकरवादाचा तात्विक मेळ बसु शकत नाही.त्याचे निर्माते परस्परविरोधी विचारधारेचे एकाच काळातील प्रतिनिधी आहेत.जात्यांध की जात्यांतक हा आमचा प्रधान निकष आहे.आता पुन्हा इमोशन्यालिटीची लाट गांधीच्या रुपाने आनने म्हणजे  पुन्हा पुर्वीचीच उच्चजातवर्गीयांचीच ब्राम्हणी व्यवस्था स्वताहून मागणेच ठरेल.हा काळ प्रखर भूमिका घेण्याचा आहे.अन्यथा पुर्वीचे पाढे पन्नास..

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
#फुले_आंबेडकर_अपरिहार्य
#अब्राम्हणी_कम्युनिझम 

नितीन सावंत परभणी 

9970744142 


Thursday, 21 May 2020

भांडवली ईमानदारी आणि प्रामाणिकपणा

भांडवली ईमानदारी आणि प्रामाणिकपणा

जागतिक समाजव्यवस्थेचे मार्क्सवादाने एकूण सहा कालखंड केलेले आहेत.
आदिम साम्यवाद, सरंजामशाही,भांडवलशाही,साम्राज्यशाही,कम्युनिझम,आणि असे राज्य तिथे शासनसंस्था नसतील तो साम्यवाद.

प्राच्यविद्यापंडीत कॉ.शरद पाटील यांनी आदिम साम्यवादामधे मातृसत्ता आणि स्त्रीसत्ता तर सरंजामशाही मधे तुर्कपुर्व आणि तुर्क आल्यानंतर खालून वरुन अशा सामंतप्रथा उभ्या केल्या आहेत.

भारतीय सरंजामशाहीमधे वर्णजातीय अभ्यास करताना अंतर्गत द्वंद्व, शोषणाची यंत्रणा याच बरोबर काही गुणविशेषही आपल्याला अभ्यासण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय भांडवलशाहीचे डावपेच आपल्याला कळनार नाहीत.

सरंजामशाहीमधे प्रामाणिकपणा, इमानदारी, नैतिकता, सदाचार, हे सर्व गुण प्रत्येकाला कंपलसरी पाळणे बंधनकारक आहे. कारण हि सरंजामशाही आपसी सालोहीत संबधाने, वस्तुविनिमय पद्धतीने बांधलेली आहे. एखादा गुण एखाद्या व्यक्तीने सोडला किंवा तो वाईट वागला,चुकला तर सामूहिक बहिष्काराद्वारे किंवा इतर शिक्षेद्वारे तो गुण पाळण्याची नियमावली पुन्हा प्रस्थापित केली जाते. सरंजामशाहीत 'जान जाय पर वजन न जाए' अशी यंत्रणा आहे. तिथे शब्दांचा आदर आहे. दिलेला शब्द आणि वचन पाळले जाते.

म्हणून सरंजामशाहीत 'पुरस्कारवितरण सोहळे' तुम्हाला दिसनार नाहीत.अत्यंत प्रामाणिक असल्याबद्दल,पैसे कमावताना टार्गेट पूर्ण केल्याबद्दल, उत्तम संवादकौशल्याबद्दल, नोकरी, काम प्रामाणिकपणे करत असल्याबद्दल पुरस्कार वगैरे. असले पुरस्कार सरंजामशाहीत तुम्हाला दिसनार नाहीत. हि देन भांडवलशाहीची. सरंजामदाराप्रती निष्ठा असणे अत्यंत महत्वाचे.

भांडवलशाहीत एकमेकांचे संबंध व्यावहारिक आहेत.त्यात पैशांच्या स्वरूप देवान घेवान होते,आणि पर्याय उपलब्ध असतात.शिवाय नफा हा उद्देश प्रधान बनल्यामुळे प्रामाणिक असणे,ईमानदार असने दुर्मिळ होत चालल्यामुळे त्यांना असले पुरस्कार देवून भांडवलशाहीला प्रामाणिक असल्याचे चित्र उभे करावे लागते. मोठा झालझोल करनाऱ्याला पुरस्कार देवून त्याला प्रामाणिक असल्याचे भांडवली यंत्रणा दाखवत असते.हे पुरस्कारही त्यांनीच निर्माण केलेले असतात.पुरस्कार वितरनाचे निकषही त्यांचेच असतात. किंवा मेडियाद्वारे पब्लिसिटी देवून भांडवली व्यवस्था एखाद्याला हिरो बनवते जो भांडवलदारांच्या ओंजळीने पाणी पित असतो.

तुम्ही तुमच्या क्षेत्रात प्रामाणिक असने कौतुकास्पद कसे होऊ शकेल? प्रामाणिकपणा हा तुम्हाला मिळालेला उपजत गुण आहे.तो तुम्ही पाळलाच पाहिजे.तुम्ही प्रामाणिक असायलाच हवे ना. तुम्ही इमानदार नाहीतर काय बेइमान होनार का ? स्पेशली सरकारी क्षेत्रात काम करनाऱ्या एखाद्याला मेडिया ते खुप ईमानदार आहेत,प्रामाणिक आहेत म्हणून जर पब्लिसिटी देत असेल तर समजावे काहीतरी लफडा आहे.
त्याला पगार कशासाठी मिळतो ? इमानदार आणि प्रामाणिक असण्यासाठीच ना ? कि बेइमान वागावे म्हणून ?

सरकारी क्षेत्रात काम करनार्यांचा इमानदारी हा गुण कौतुकाचा विषय होऊ शकत नाही जरी भांडवलशाही त्यांचे कौतुक करत असेल तरी...

हल्ली वकिलीच्या क्षेत्रात आमका ईमानदार म्हणून विशिष्ट व्यक्तिला पब्लिसिटी आशा प्रकारे दिली जाते जणू काय सर्व वकिल बेइमानच आहेत. पोलीस खात्यातातही विशिष्ट मेकअप केलेला चेहरा भांडवलशाही ईमानदार म्हणून दाखवते जणू काय सर्वच सावळे काळे खरबड्या तोंडाचे बेइमानच असतात. यात आयुक्त असो नाहीतर कलेक्टर ते लै ईमानदार आहेत म्हणून भक्ताड आणि ते आपल्या जातीचे हाइतवाले रोज पारायणे करत असतात.मग तुमच्या साहेबाला पगार न घेता इमानदार प्रामाणिक रहा म्हनावे? जनु काय आख्खे जग बेइमान झाले आहे. आणि हे दोनचारजनच तेवढे प्रामाणिक, इमानदार उरले आहेत.

कर्तव्यात इमानदारी आणि या प्रामाणिकपणा या गुणांचे कौतुक होत असेल तर समजावे देश विनाशाच्या दिशेने जात आहे. कारण हे गुण दुर्मिळ होत असल्याचे लक्षण आहे.

नितीन सावंत परभणी
9970744142
३१/१२/२०१८

Wednesday, 20 May 2020

ll संत चोखोबारायांचा समाधी सोहळा दिवस ll

ll संत चोखोबारायांचा समाधी सोहळा दिवस ll

सर्वच संतांवर सर्वात मोठा अन्याय कोणता झाला असेल तर त्यांची मते विकृत करुन खपवली गेल्याचा.किंवा संत जे म्हनालेच नाहीत ते त्यांच्या नावे खपवले जाने.काही संतांवर तर त्यांचे श्रेय दुसऱ्यालाच देवुनही अन्याय झालेला आहे.
वारकरी सांप्रदायाचे पहिले आणि मुख्य नेतृत्व संत नामदेव होत.त्यांनीच उत्तरेकडे दौरे काढले,सांप्रदायाचे अभंगरुपी तत्वज्ञान निर्माण केले आणि विठ्ठलाची आरती लिहीली.तरी त्यांना अडगळीत टाकण्याचा मोठा कट महाराष्ट्रात आजतागायत झाला आहे.
संत चोखोबारायांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात संत नामदेव यांनी वेळोवेळी भूमिका घेतली होती.पंढरपूरातील ब्राम्हण बडव्यांनी चोखोबारायांना पंढरपूराच्या बाहेर हकलल्यानंतर चोखोबाराय चंद्रभागेच्या पलीकडे जावुन राहिले असताना,संत नामदेव संपूर्ण संतमंडळाला तिथे घेवून गेले.सर्वांनी संत चोखोबारायांच्या घरी सहभोजन केले.मोठा उत्सव साजरा केला गेला.संत चोखोबाराय वेस पडुन गतप्राण झाल्यानंतर मंगळवेढ्याच्या वेसीच्या ढिगार्यातून  त्यांची हडे गोळा करुन पंढरपूरातील विठ्ठल मंदिराच्या पायरीला समाधी बांधण्याचे मोठे धाडस संत नामदेव यांनी केले होते.या संपूर्ण सोहळ्याचे नेतृत्वच संत नामदेव यांच्याकडे होते.तरी त्यांना मुख्य नेतृत्व म्हणून मानण्यास ब्राम्हणी छावणीचा विरोध आहे.
संत चोखोबारायांचा समाधी उत्सव वैशाख महिन्यात साजरा केला जातो. या उत्सवाचे नियोजन संत नामदेव महाराजांचे  वंशज असलेल्या नामदास मंडळींकडे असते. वैशाख वद्य पंचमी हा चोखोबारायांचा निर्वाण दिवस तर वैशाख वद्य त्रयोदशी हा चोखोबारायांचा समाधी बांधली तो दिवस. समाधी सोहळ्यानिमित्त छोटा मांडव घातला जातो. वैशाख वद्य पंचमीपासून अखंड वीणा उभा रहातो. वैशाख वद्य त्रयोदशीला कीर्तन व महाप्रसाद होतो.

नितीन सावंत परभणी
दि.20/5/2020

Friday, 8 May 2020

भारताचा सांमाजिक इतिहास ढोबळ मनाने सांगता येईल:

भारताचा सांमाजिक इतिहास ढोबळ मनाने सांगता येईल:-

*1)इ.स पुर्व 3000-1500 सिंधु संस्क्रुती,हडपा, मोहनजोदारो*

*2)इ.स पुर्व- 1500 आर्याचे आगमन व ऋग्वेद निर्मिती*

*3)इ.स.पुर्व - १००० ते ९०० रामायण महाभारत काळ*

*4) इ.स पुर्व 1500-500 वर्ण व्यवस्था प्रस्थापित झाली.*

*5) 600 कोसला, मगध आदि साम्राजे,जैन धर्माचा विकास, जातीव्यवस्थे निर्मितीला सुरवात.*

*6) 563-483 बुद्धाचा जन्म, बुध्दाच्या शेवटच्या काळात जाती व्यवस्था जमजात रुजली*

*7)274-273 राजा अशोक*

*8) 187-172 राजा पुश्यमित्र, बुध्द धर्माचा विनाशक व ब्राह्मनी धर्माचा पुनरुज्जिवक*

*इ.स. नंतर*

*1) 320-475 गुप्त साम्राज्य*

*2) 400-900 पल्लवा साम्राज्य.*

*3) 600-900 शंकराचार्य निश्चित असा क्षन नाही*