ll निऋतीचा पट ll
सप्तसिंधुत, निर्ऋती ऋती गणाच्या चार ज्ञातींची गणमुख्या होती. ती नियतकालिकांत, समया प्रमाणे (समय = ऋत = जगत्चालक नियमाप्रमाणे, order) शेतजमीनीचे, धनधान्याचे न्याय्य वाटप करत असे.
नदीच्या गाळपुराने, नदीकिनारीच्या शेतजमीनीच्या मिटवलेल्या बांधामुळे, ज्ञाती-ज्ञातीमध्ये शेतजमीनीच्या पुनर्वाटपावरुन होणारी संभाव्य भांडणे टाळण्यासाठी, ती शेतजमीनीचे ज्ञातींमध्ये पुनर्वाटप करत असे. हे शेतजमिनीचे पुनर्वाटप न्याय्य असावे यासाठी तीने पटाची, पटावरील घराची ज्ञातीच्या कुलाच्या संख्येएवढीच घरे बनवली.
शेतजमीन कमीजास्त चांगली-वाईट असू शकते. तिची प्रतवारी उत्तम, मध्यम, कनिष्ठ ठरवून प्रत्येक ज्ञातीच्या पटावर कुलांच्या तीन रांगा केल्या. प्रत्येक कुलाच्या वाटणीला उत्तम, मध्यम, कनिष्ठ अशी शेतजमिन वाटणीत येणार. एखाद्या कुलाला उत्तम तर दुसरया कुलाला कनिष्ठ शेतजमीन पुनर्वाटपात येऊन न्याय-अन्यायाचा प्रश्न उभा राहू नये यासाठी हा समतावादी पट निर्ऋतीने बनवला. चार ज्ञातींचे चार पट मिळून बनला चौपट.
याच पटाचा अर्थ उलट-सुलट लावत, व्यवहारात कधी न्यायासाठी कधी अन्यायासाठी त्याचा वापर मागील शतकांपर्यंत गावोगावी सर्रास होत आला तो हा पट, निर्ऋतीचा चौपट.
अत्रेंच्या 'गावगाड्या'तील काही संदर्भ स्पष्ट करतात की पटाचा वापर अाता-आत्तापर्यंत कसा होत आला आहे. निर्ऋतीचे वारसदार तो कसा वापरत आले आहेत.
१. कौल घेणे म्हणजे महत्वाचे निर्णय घेण्यासाठी 'इष्ट'देवतेची मदत घेणे त्याला पट्टा म्हणतात.
२. गावाच्या जमाबंदीच्या ताळेबंदाला पट्टा किंवा इजारपट म्हणतात.
तो पाटलाजवळ असतो आणि पाटिल त्याप्रमाणे वसूल करतो.
३. पाटिल, पटवारी हे जुळे - पट किंवा पट्टा या शब्दावरुन बरेच संभाव्य दिसते.
४. पट्ट म्हणजे मुख्य, या शब्दापासूनही पाटील शब्द निघाला असेल.
५. ज्यांच्याजवळ पट्टा किंवा पट असतो आणि त्याबरहुकूम जे पट्टी, सारा, अगर सार्वजनिक वर्गणी वसूल करतात ते पाटील-पटवारी.
६. तेव्हां सबंध जाती / जमातीत जो स्मरणाचा धड (चांगल्या प्रकारचे स्मरण) असून लोकांवर ज्याचे वजन आहे अशा बुध्दिमान व मुख्य माणसाजवळच जातीचा पट राहावयाचा.
७. असे पट जातींच्या मुख्याकडे असत.
वि-राज घोगरे
मार्गदर्शक
मानव मुक्ती मिशन
No comments:
Post a Comment