#सरकारी_नोकरदारांचा_प्रामाणिकपणा ..
तुम्ही तुमच्या क्षेत्रात प्रामाणिक असने कौतुकास्पद कसे होऊ शकेल? प्रामाणिकपणा हा तुम्हाला मिळालेला उपजत गुण आहे.तो तुम्ही पाळलाच पाहिजे.तुम्ही प्रामाणिक असायलाच हवे ना. तुम्ही इमानदार नाहीतर काय बेइमान होनार का ? स्पेशली सरकारी क्षेत्रात काम करनाऱ्या एखाद्याला मेडिया ते खुप ईमानदार आहेत,प्रामाणिक आहेत म्हणून जर पब्लिसिटी देत असेल तर समजावे काहीतरी लफडा आहे.
त्याला पगार कशासाठी मिळतो ? इमानदार आणि प्रामाणिक असण्यासाठीच ना ? कि बेइमान वागावे म्हणून ?
सरकारी क्षेत्रात काम करनार्यांचा इमानदारी हा गुण कौतुकाचा विषय होऊ शकत नाही जरी भांडवलशाही त्यांचे कौतुक करत असेल तरी...
हल्ली वकिलीच्या क्षेत्रात आमका ईमानदार म्हणून विशिष्ट व्यक्तिला पब्लिसिटी आशा प्रकारे दिली जाते जणू काय सर्व वकिल बेइमानच आहेत. पोलीस खात्यातातही विशिष्ट मेकअप केलेला चेहरा भांडवलशाही ईमानदार म्हणून दाखवते जणू काय सर्वच सावळे काळे खरबड्या तोंडाचे बेइमानच असतात. यात आयुक्त असो नाहीतर कलेक्टर ते लै ईमानदार आहेत म्हणून भक्ताड आणि ते आपल्या जातीचे हाइतवाले रोज पारायणे करत असतात.मग तुमच्या साहेबाला पगार न घेता इमानदार प्रामाणिक रहा म्हनावे? जनु काय आख्खे जग बेइमान झाले आहे. आणि हे दोनचारजनच तेवढे प्रामाणिक, इमानदार उरले आहेत.
कर्तव्यात इमानदारी आणि या प्रामाणिकपणा या गुणांचे कौतुक होत असेल तर समजावे देश विनाशाच्या दिशेने जात आहे. कारण हे गुण दुर्मिळ होत असल्याचे लक्षण आहे.
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment