Sunday, 7 June 2020

काही पुस्तकांची शीर्षके

*शीर्षक* हा आरसा असतो. म्हणजे शीर्षकाने आधी अर्थबोध होतो की नेमका हा काय प्रकार आहे. पत्रकारितलेले शीर्षके गुढ असतात.लोकांनी  ती बातमी वाचावी म्हणून. हिंदी आणि मराठी चित्रपटवाल्यांची प्रतिभा आटल्याने हल्ली त्यांना काय शिर्षके द्यावीत हाच प्रश्न पडलेला आहे. काहीच्या काही नावाची चित्रपटे येत आहेत. काही चित्रपटांत तर शीर्षकाचा आणि आतल्या स्टोरीचा तिळमात्रही संबंध नसतो.

आसो मुद्दा आहे पुस्तकांच्या शिर्षकांचा.लेखक म्हटल्यावर प्रतिभा वगैरे असतेच.आणि ही माणसे जरा हटके आसतात म्हणून मला पुस्तकांच्या शीर्षकाबद्दल नेहमीच कुतुहल राहिले आहे.
एकदा असेच भारी भक्कम वाचनालयात इंट्री माराली. समोर लिहीलेले होते १ते १० क्रमांकाची कपाटे आमदारसाहेबांकडुन. मी मनल हे लोक मात्र आपली प्रसिद्धी करुन घ्यायला पुस्तकांच्या कपाटाच्या काचा पन सोडत नाही. मागे तर एका संडासच्या भिंतीवर आमदार साहेबांचे नाव होते आणि खाली लिहीलेले *साहेबांची कृपा*

आसो पुस्तकांच्या कपाटतल्या त्या ग्रंथांची नावे बघून यानां असाली नावे कशी काय सुचतात हा प्रश्न मला नेहमी पडतो.
एका ऱ्याक मधे
गंगेचे गगन वितळे नावाचा ग्रंथ मोठा दिमाखाने उभा होता. इतका कोरा होता की कुणीही हात लावल्याचे दिसत नव्हते. आता गंगेचे गगण वितळे म्हणजे काय मला तर मेळही लागला नाही. गगन कुठे वितळते का ? किंवा गंगेला पाणी असते गगन कुठे असते काय ?

लेखकाच्या या नाव सुचण्याच्या प्रतिभेला स्याल्युट करुन पुढल्या कपाटात डोकावलो तर शापीत सौंदर्य नावाचा पुस्तोकोबा दिसत होता. सौंदर्यही आणि शापीतही हे ही जरा ऑडच.

मला सर्वात मजेशीर नाव वाटले ते म्हणजे
कुरतडलेला सुर्य.
सुर्याला कुनाची बरे कुरतडायची हिम्मत.पण लेखकोबा मात्र काहीही करु शकतात.महातेजस्वी सुर्यालाही कुरतडायला हे लोक कमी करत नाहीत.असेच मला एका हिंदी चित्रपटाचे नाव आठवले सुरज का सातवा घोडा.

म्हणजे पहिला घोडा नाय, दुसरा नाय,लक्ष कोण्या घोड्यावर तर सातव्या.

याच्या अमर कहाणी ,त्याची अमर कहाणी असल्या अमर कहाण्या तर लै झाल्यात.एका ग्रंथावर नाव होते बापुजांची अमर कहाणी.हे बापुजा कोन होते आपल्याला (आज्ञानाला ) माहिती नाय.

पुढे तर कहरच विनोदी कथा कांदबरीच्या ऱ्याक मधे भारतीय संस्कृती कोष खंड क्रमवार लावलेले होते.

म्हटले अगदी योग्य जागी लावलेत हे खंड आमची संस्कृती हल्ली हसण्याचाच भाग झालीय.म्हणून त्या खंडांची गणना विदोनी साहित्यात केलीय.ही संस्कृती विष्णुच्या बेंबटातून निर्माण झालीय म्हटल्यावर ती विनोदी साहित्यातच येनार ना.

नवनीत इयत्ता ४ थी चे मार्गदर्शक पुस्तक रहस्यमय कांदबरीत लावलेले सापडले.मुळ पुस्तकांचा अभ्यास करावा वाटेना गेला की पळवाट म्हणून नवनितचा अभ्यास करुन पास होण्याचे धवपळीचे मार्ग म्हणजे हे रहस्यमयच म्हटले पाहिजे.

मराठवाडा मुक्ती संग्रामचा लढा च्या साहित्याचा रकाना होता.त्यात एक पुस्तक होते पोटदुखी विसरा.
हा लढा एक पोटदुखी आहे आणि तो विसरा.हा हा हा 

पुन्हा मर्ढेकर नावाचे एक बुक दिसले. तोच तो लेखक कवी लोक कशाला वाचतील बरे.पुन्हा म्हटल्यावर नको रे बाबा असेच म्हनतील लोक.आवारा मसिहा आणि टिळकांचे चरित्र अगदी जवळ जवळ लावलेले होते.या दोनही पुस्तकांचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता.पण मला मात्र टिळक म्हणजेच आवारा मसिहा वाटला.

असो सर्वात हास्यास्पद नाव काय असेल तर खालील पुस्तकाचे शिर्षक होते.मी तर खळखळून हसलो.

क्रांतीसुर्य म्हटले की जोतीराव फुले आठवतात,किंवा बाबासाहेब यांनाही ती उपाधी देता येइल.पण शिर्षक होते
"क्रांतीसुर्य सावरकर"

नितीन सावंत परभणी 

दि.७ जुन २०२० 


No comments:

Post a Comment