वेदांचे मूळच आमचा पांडुरंग आहे ..
अनादि निर्मळ वेदांचे जे मुळ l परब्रम्ह् सोज्वळ विटेवरी ll कर दोन्ही कटी राहिलासे उभा l नीलवर्ण प्रभा फांकतसे ll आनंदाचा कंद पाऊले साजिरी l चोखा म्हने हरी पंढरीये ll - संत चोखोबाराय
प्रस्तुत अभंग संत चोखोबारायांच्या स्वमुखातील अत्यंत गौरवशाली उदगार आहेत.गौरवशाली यासाठी की ब्राम्हणी व्यवस्थेने ज्यांना हिन अस्पृश्य अपवित्र मानले त्या चोखोबारायांनी विठ्ठलाचे वर्णन करणे क्रांतिकारी आणि गौरवशाली आहे.मध्ययुगीन भारतात जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता अत्यंत काटेकोर आणि टोकाची बनली होती.मंदिरांवर देव आणि धर्मावर पूर्णपणे ब्राम्हणांचे नियंत्रण प्रस्थापित झालेले होते. अस्पृश्य जातीत जन्माला आलेल्यांना मंदिराचे दरवाजे बंद होते.त्यांना ज्ञानबंदी होती, शिकायचे नाही , लिहायचे नाही , वाचायचे नाही . एवढेच काय आपल्यापेक्षा उच्चजातीय व्यक्तिला ज्ञानाच्या वक्तव्यात बोलायचे नाही. अस्पृश्यांसाठी जी जी आणि व्हय जी एवढेच.आशा काळात पंढरपूरात संत चोखोबाराय चक्क वेदांच्या पलीकडील भाष्य करतात मोठे क्रांतिकारी आहे हे. पंढरपुरातील बडवे ब्राम्हण चोखोबारायांना हिन अस्पृश्य मानतात.हे बडवे वैदिक व्यवस्थेचे प्रतिनिधी आहेत.जे वेदांना प्रधान प्रमुख मानतात.आशांना अस्पृश्य जातीतून आलेला संत ज्ञानाची अनुभूती देतो आणि म्हनतो
"तुम्ही ज्या वेदांना प्रमाण मानता त्या वेदाचे मुळच आमचा विठ्ठल आहे.तो अनादि अनंतकाळापासुन आहे.अगदी निर्मळ स्वच्छ भेदरहित."
एका अस्पृश्य संतांचे तत्वज्ञानाच्या पातळीवर प्रतिछावनीला उत्तरे देने फारच धाडसाचे आहे.विठ्ठलाचे मुळ शोधणे आणि वैदिकांच्या आधीचे म्हणून वैदिकांच्या मांडणीला सुरुंग लावने रणनीतीचा भाग आहे.तुम्ही वेद काय सांगता आमचा विठ्ठल त्याच्याही आधिचा आहे.युक्तिवाद करावा तो असा.
पुढे चोखोबाराय म्हणतात
"तो अनादि निर्मळ दोन्ही हात कमरेवर ठेवून विटेवर उभा आहे.आणि त्याच्या तेजाची नीलवर्ण प्रभा सर्वत्र पसरली आहे"
येथे संत चोखोबाराय पांडुरंगाची प्रभा नीलवर्ण म्हणून मांडतात.ती गौरवर्णीय नाही.गौरवर्ण वैदिकांचा तर नीलवर्ण द्रविडांचा.कृष्ण महादेव खंडोबा निलवर्णीयच.अगदी विठ्ठलही नीलवर्ण प्रभा घेवून सर्वत्र प्रसिध्दीस पावला आहे.
या पध्दतीने वैदिकांच्या असमानतेच्या विषमतेच्या विकृतीला संत चोखोबाराय पर्यायी संस्कृती निर्माण करत होते.
म्हणून ते म्हणतात "आमच्या आनंदाचे उत्सवाचे प्रतिक हा पांडुरंग आहे. हा हरी पांढरीचा आहे.तो इतर ठिकाणचा नव्हे."
ही मांडणी चोखोबाराय करतात.हे सर्व दुर्लक्षुन कसे चालेल.
अस्पृश्य मानलेल्या व्यक्तीने विठ्ठलाचे मुळ शोधने खऱ्या अर्थाने विठ्ठलाला पवित्र करण्यासारखे आहे ..
चोखोबारायांची वैचारिकता किती ग्रेट होती. म्हणून आम्ही राष्ट्रजागृती वारकरी परिषदेसाठी लोगोखाली संत चोखोबारायांच्या ह्या अभंगाची ओळ निवडली आहे..
धर्मकीर्ती महाराज परभणीकर 9970744142
No comments:
Post a Comment