वारकरी चळवळीत संतांच्या यादीमध्ये संत कुर्मादास हे सुद्धा एक नाव लोकप्रिय आहे.ज्यांची समाधी सोलापूर जिल्ह्यातील लहुळ या गावी आहे.संत सावता महाराजांच्या आरण या गावाच्या अगदी बाजुला हे संत कुर्मादासांचे समाधी मंदिर आहे.
संत कुर्मादास हे पैठणहुन पंढरपूरला निघाले होते.त्यांना हात आणि पाय नसल्याने ते फरफटत चालत आल्याची एक मिथकीय आख्यायिका आहे.या कुर्मादासांची संत नामदेव संत ज्ञानेश्वरांची एकत्र भेट झाल्याचीही एक कथा प्रचलित आहे.
मुळ मुद्दा असा आहे की हे कुर्मादास जातीने ब्राम्हण असल्याचे सांगितले जाते.त्या पध्दतीने सर्वांनी साहित्य निर्मिती केलेली आहे.महिपतीबुवांच्या भक्ती विजय ग्रंथातही ते ब्राम्हण असल्याचे सांगितले आहे..
पन आम्ही जेव्हा समाधी पाहिली तर ती कबरीच्या स्वरूपात आहे.एवढेच काय तिच्यावर सुफी परंपरेप्रमाणे पांढरी हिरवी चादर चढवली जाते.एरवी सुद्धा त्याच रंगाचा कपडा कबरीवर असतो. मुख्य सणाला त्या कबरीवर मोठी हिरवी चादर चढवतात. पुजाऱ्यांना विचारले तर ते म्हनाले ही जुनीच परंपरा आहे.
जालिंदर कदम नावाचे पुजारी म्हनाले की १९९२ ला बाबरी मशीद पाडल्यानंतर याही परिसरात अनेक कबरी होत्या त्यांची मोडतोड करण्यात आली.
हा भाग आजही अत्यंत निर्जन वस्तीचा आहे.त्यामुळे नासधूस केल्यानंतर त्या दगडांची सुद्धा विलेवाट लावण्यात मोडतोड करनारे यशस्वी झाले.
मग संत कुर्मादास खरच जन्माने ब्राम्हण होते का ?
ब्राम्हण होते तर समाधीवर चादर का ?
विशेष म्हणजे समाधीच का मुर्ती का नाही ?
बाजुच्याच गावी सामधीवर संत सावंता महाराजांची मुर्ती आहे मग येथे का नाही ?
एका सुफी संतांचे सावकाशरित्या पिढीदरपिढीगत ब्राम्हणीकरण चालु आहे..
आणि त्या सुफी संताचे वैचारिक,धार्मिक वारसदार झोपलेले आहेत..
No comments:
Post a Comment