सरंजामशाही आणि श्रौतस्मार्त धर्माविरूध्द अध्यात्मिक क्षेत्राचे बंड.
नितीन सावंत परभणी
मो: 9970744142
जोहार मायबाप जोहार l मी विठु पाटलाचा महार ll
हिशोब देतो ताबेदार l लंकेचा कारभार की जी मायबाप ll
संत एकनाथ महाराज
भारतीय सामंतशाहीने सुरवातीला ‘प्रवाही जातीव्यवस्था’ जन्माला घातली आणि मग सरंजामशाहीने ‘बंद जातीव्यवस्था'. सरंजामशाहीत शोषित-पीडितात समान हितसंबध असते तर या सरंजामशाहीत वर्ग बनले असते.पण,या देशात जातीतही पोटजाती निर्माण झाल्याने ‘क्रमीक असमानता’ (graded inequality) जन्माला अल्याने येथे वर्ग बनु शकले नाहीत.या सरंजामशाहीच्या शोषनाच्या काळातील सर्वात महत्वाची पदे होती ती कुलकर्णी,सरदेशपांडे, सरदेसाई,देशमुख आणि पाटील यांच्याकडे.पट,पटवारी पासुन पाटील पद बनत गेल्याचा इतिहास आलीकडे उजेडात येत आहे.सुरुवातीला ही पदे ग्राम संस्कृती वसवण्यासाठी,तिचे जतन संवर्धन करण्यासाठी,शांतता,न्याय आबाधीत ठेवण्यासाठी होती.नंतर पुढे हिच पदे शोषन-पिळवणूक करणारी बनली.हे जेव्हा मध्ययुगीन काळात, शिवाजी राजांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी हे सरंजामशाहीतील चालत आलेली पदे बरखास्त करुन रोख रकमेत कारभार सुरु केला होता.रांझ्याच्या पाटलाला महाराजांनी धडा शिकवला असल्याचे आपण जानतोच. पण,शिवपुर्व काळात,या सरंजामदारांच्या विरोधात कुनालाही आवाज उठवता येत नव्हता.तसे केल्यास भिंतीत जिवंत गाडले जाई. जाहीर हत्या केली जाई.
हे भौतिकवादी वास्तव लक्षात घेवून संतांनी आध्यात्मिक क्षेत्रात सरंजामशाही विरूध्द बंड उभे केले होते.मग हे आध्यात्मिक क्षेत्रातील बंड कुनाच्या विरूध्द होते ? तर पंढरपूरच्या विठु पाटला विरूध्द होते.यात सर्व संतांनी भूमिका अशी घेतली की आधी या विठु पाटलाला लाडिक जोहार घालून,ही सभोवतालची विषमता, भेदाभेद,अस्पृश्यता,जातीव्यवस्था, पिळवणूक लक्षात आणून द्यायचे.हे सर्व विठु पाटला समोर मांडायचे.नाही ऐकल्यास त्याच्या विरूध्द बंड करायचे.म्हणून सर्वच संतांनी आधी या विठु पाटलाला जोहार घातला.हा जोहार घालताना सर्व संत एकजात वेसकर बनले.हा लाडीक झगडा सुरु झाला तो विठु पाटलात आणि वेसकर संतांच्यात.
जोहार हे अभिवादन अस्पृश्य,निम्नजातीयांसाठी होते.अस्पृश्यांनी उच्चजातीयांना जोहार घालायचा असतो.आपण गुलाम, हरलेले आहोत ही त्या अभिवादनामागची भावना.आपली औकात सदैव लक्षात रहावी असे हे जोहार संबोधन.
पण सर्वच संतांनी भेदाभेदाच्या भिंतींच मोडल्या होत्या.निम्नजातीयांचा जोहार सर्व संतांनी आनंदने स्विकारला आणि हा जोहार विठू पाटलाला घातला.सर्व संत त्या विठुपाटलाच्या दारात गेले आणि जोहार म्हनत आपले गाऱ्हाणे मांडायला लागले.जातीव्यवस्थेत जोहार घालण्याचे खरे अधिकार फक्त चोखोबांनाच, पण संत मंडळात उच्चजातीय ज्ञानेश्वर,एकनाथ यांनी सुद्धा जोहार घातला आणि समतेची वाट अधिक भक्कम केली.कुठलाही भेद ठेवला नाही.
संत तुकोबाराय म्हणतात,
जोहार जी मायबाप जोहार I सारा साधावया आलो वेसकर ll
संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
जोहार मायबाप जोहार l मी कृष्णाजी घरचा पाडेवार ll
संत एकनाथ महाराजही ३० पेक्षा जास्त अभंगांतून स्वताला वेसकर संबोधतात.ते म्हणतात,
मी निर्गुणपुरीचा महार l करिती जोहार ll एका जनार्धनी महार l पायाशी केला जोहार ll
पण,हे संत काही जन्माने जोहार घालनारे वेसकर नव्हते की,अस्पृश्य नव्हते.पण त्यांना विठु पाटलाच्या वाड्यावर वैदिकांची फिर्याद न्यायची होती.धार्मीक दहशत मोडीत काढण्यासाठी त्यांना विठु पाटलाला समजून सांगायचे होते.सभोवतालची अस्पृश्यता,भेदाभेद लक्षात आणून द्यायची होते.धर्मपुरोहीतांचा छळ आणि देवा धर्माच्या नावे होनारी लुट संतांना विठू पाटलाच्या कानावर घालायची होती .
इतर संतांच्यापेक्षा संत चोखोबाराय मात्र त्या व्यथा वेदना जाणणारे खरेच अस्पृश्य होते.त्यांना जोहार काय असतो हे अनुभवातून माहिती होते.म्हणून संत चोखोबारायांचा जोहार मानवी हक्कांसाठी आहे.
चोखोबा हे खरच वेसकर होते. जन्माने अस्पृश्य महार होते.जोहार कसा घालतात हे चोखोबांना अभंग लिहीताना अवघड गेले नसनार. चोखोबा वास्तवात जगले.संत चोखोबाराय विठु पाटलाला जोहार घालताना म्हणतात,
जोहार मायबाप जोहार l तुमच्या महाराचा मी महार ll बहु भुकेला जहालो l तुमच्या उष्ट्यासाठी आलो ll
बहु केली आस l तुमच्या दासाचा मी दास ll
चोखा म्हने पाटी l आनिली तुमच्या उष्ट्यासाठी ll
किंवा,विठु पाटलाचा महार l चोखा मेळ्याचा जोहार ll सकळ संतांचा कारभार l मज नाफराचे शिरी की जी मायबाप ll
संत चोखोबारायांचा जोहार मानवी हक्कांसाठीचा आहे.अन्न, वस्त्र, निवारा या भौतिक गरजांच्या पुर्तीसाठी चोखोबा जोहार घालत आहेत. आमच्या पाटीत उष्ट्ये आन्न तरी टाका म्हनने ही मागणी अत्यंत हृदयद्रावक आहे.आता तरी विठु पाटलाला पाझर फुटायला हवा.एक विशेष असे की येथे संत चोखोबाराय अस्पृश्य असुन सर्व संतांचा कारभार बघत असल्याने निर्भयपणे सांगत आहेत.मानवी हक्कांसाठी चोखोबाराय जोहार घालत आहेत.
हा विठु पाटील कोण आहे?
खरे तर हा विठु पाटील म्हणजे सभोतालचे जग आहे.अन्याय अत्याचार करनारी सरंजामशाही आहे.शोषण पिळवणूक करनारे श्रौतस्मार्त (श्रुती व स्मृती या धर्मग्रंथावर आधारित धर्म ) धर्माचे दलाल आहेत.त्यांच्या समोर हे संत आधी जोहार घालताहेत.त्यांना आशा आहे ही व्यवस्था बदलेन. यांना थोडातरी पाझर फुटेल पण हे जेव्हा जोहारावर शक्य नव्हते, तेव्हा संतांनी विठु पाटला विरुद्ध बंडखोरी केली.जोहार घालुनही त्याला फरक पडत नसेल.मायबाप म्हणूनही तो बदलनार नसेल तर मग आपन पुढचे पाउल उचलले पाहिजे ही नवी भूमिका पुढे आली.
बंडाची मुख्य कळ काढुन दिली ती संत नामदेवांनी
आणि मग, संत नामदेव म्हनाले
पतीत पावन म्हणवूनी l आलो तुझिया दारा ll
पतीत पावन नव्हेसी म्हनोनी जातो माघारा ll
झेंगट घेवून हाती l दवंडी पेटवीन तिन्ही लोंकी ll
देवा पतीत पावन नव्हेसी l तु मोठा घातकी ll
.पुढे त्यांच्या या बंडात संत गोरोबा काका,संत सावता महाराज,संत जनाबाई,संत चोखोबाराय,संत सोयराबाई,संत निर्मळा,संत बंका,संत कर्ममेळा,संत जगमित्र,संत नरहरी सोनार,संत कबिर, संत ज्ञानेश्वर महाराज आदी वेसकरांनी (संतांनी ) हिरहीरीने भाग घेतला.
संत जनाबाई म्हनाल्या,
आरे आरे विठ्या l मुळ मायेच्या कारट्या ll
तुझी रांड रंडकी होवो l तुझे मढे बसो ll
संत चोखोबारायांची पत्नी संत सोयराबाई म्हनाल्या,
जन्म गेला तुमचे उष्टे खाता l लाज न ये तुझ्या चिता ll
हे विठु पाटला तुला लाज वाटत नाही का रे ? हा संत सोयराबाईचा सवाल आहे.
पुढच्या काळात संत एकनाथ महाराज संत तुकोबाराय यांनी सुद्धा या विठु पाटलाच्या विरोधात बंड चालु ठेवले.
संत तुकोबाराय म्हणतात,
हरी तु निष्ठुर निर्गुण l नाही माया बहु कठीन l
नव्हे ते करसी आण l कवने नाही केले ते ll
बळी सर्वस्वे उदार l जेने उभारीला कर l
करुनी कहर l तु पाताळी घातला ll
हे विठु पाटला तु निष्ठुर आहेस. तुझ्याकडे मायादया नाही.तु बळीराजाला पाताळात घातलेस.
या विठु पाटलाशी अजुनही बंड चालु आहे.हे बंड चालु ठेवले आहे वारकरी मंडळींनी.ते सुद्धा दरवर्षी पंढरीला जावुन त्या विठु पाटलाला जोहार घालतात.आता हे बंड लाखोंच्या संख्येने उभे राहिले आहे.प्रत्येक मंदिरात सकाळी जोहार ने बंडाचा घंटानाद होतो.हे बंड सुरु आहे जातवर्गस्त्रीदास्यांतासाठी.हे बंड सुरु आहे आधुनिक विठु पाटला विरूध्द.हा विठु पाटील म्हणजे निमभांडवली निमसरंजामी जातवर्गीय ब्राम्हणी व्यवस्था.या विठु पाटलाला आता हे महागात पडनार आहे.श्रौतस्मार्त (श्रुती व स्मृती या धर्मग्रंथावर आधारित धर्म ) धर्माव्यवस्था नामोहरम होण्याच्या मार्गावर आहे.जोहारचा लोकजागर आता प्रबोधनात्मक बनला आहे.
म्हणून या सर्व संतांच्या सोबत विठू पाटलाला आमचा जोहार.
No comments:
Post a Comment