संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २४ वे
जातीअंताचे वारकरी शिलेदार
संत नामदेव, संत चोखोबाराय आणि त्या काळातील समकालीन सर्वच संतांनी भेदभावावर आक्षेप नोंदवलेला आहे. अस्पृश्यता आणि जातीभेद संत नामदेव यांच्या संतमंडळाला मान्य नाही. जातीअंताची प्रखर भुमिका घेऊन हे सर्व संत उभे राहिले होते. म्हणुनच पुढच्या काळात हा जातीअंताचा केंद्रबिंदू पकडुन त्यावर अनेकांनी काम केले.संतांना केवल भक्तीच अपेक्षीत होती का ? तर नाही. वारकरी संतांना भक्तीचे माध्यम वापरून समतेचे ध्येय साध्य करायचे होते. भक्ती हे साधन होते, आदर्श समाज निर्मातीसाठी.आज घडीला मुख्य उद्देशापासुन वारकरी चळवळ जरी भरकटली असेल. तरही अनेकांनी मात्र जातीअंताचे काम केल्याचे दाखले इतिहासात जागोजागी उपलब्ध आहेत.संतांची प्रेरणा घेवुन अनेकांनी समतेचे , माणुसकीचे काम केल्याचे आपल्याला दिसेल.
संत चळवळीचा दुसरा कालखंड किंवा दुसरा टप्पा संत एकनाथ महाराज व संत तुकोबारायांचा काळ मानता येईल.संत नामदेव, संत चोखोबाराय आणि त्यांचे संत मंडळ गेल्यानंतर इ.स. १५४८ ते १५८e हा संत एकनाथ महाराजांचा कालखंड तर १६०८ ते १६५० हा संत तुकोबारायांचा कालखंड मानला जानो. नामदेवांच्या संत मंडळात 'हिन केली आमुची याती " हा प्रश्न संत चोखोबाराय आणि त्यांच्या कुटुंबियांनी विचारला होता. 'मज दूर हो' म्हनती ही चोखोबारायांची मनातील सल होती. चोखोबारायांच्या या वेदनेचा, दुखाचा संत एकनाथ महाराजांवर खूप प्रभाव पडलेला दिसुन येते. संत एकनाथ महाराजांना संत चोखोबारायांची वेदना अत्यंत दुखद वाटली होती आणि म्हणून एकनाथ महाराजांनी चोखोबारायांना प्रेरणा मानुन जातीअंताचे गुरू काम केले होते. पैठण ही सनातनी कर्मठ ब्राम्हणांची नगरी होती.या कर्मठ नगरीत संत चक्रधर स्वामींना खुप त्रास देण्यात आला होता.त्या नागरीत संत एकनाथ महाराजांनी कुनालाही न जुमानता जातीअंताचे अस्पृश्यता निर्मुलनाचे काम केले होते. जोहार हे संबोधन केवळ गावच्या माजीअस्पृश्य जातीसाठीच होते. अस्पृश्यांनी जोहार घालावा असा त्याकाळी प्रघात होता. संत एकनाथ महाराज जन्माने ब्राम्हण असुन त्यांनी ब्राम्हणत्व टाकुन देऊन ते डिकास्ट बनले होते.ते स्वतः अभंग लिहुन जोहार घालत होते. त्यांनी ३० पेक्षा जास्त अभंगातून जोहार घातलेला आहे. संत चोखोबारायांच्या जीवनातील सोसाव्या लागलेल्या वेदना त्यांचे जगणे संत एकनाथ महाराज स्वतःच्या रूपाने मोडत होते.संत एकनाथ महाराज आनेक अभंगात स्वतःला महार संबोधुन घेतात. ते आपल्या अभंगात महारांचे संबोधन जोहार घालतात.अस्पृश्यत्वाची अनुभूती ते आध्यात्मिक भक्तीपंथात घेतात. ते म्हणतात
" जोहार जी मायबाप जोहार l मी एकनाथ महार l सीगतो सारासार विचार l तो ऐका जी मायबाप ॥"
किंवा
जोहार मायबाप जोहार । मी जनार्दनाचा एका महार | सांगतो तुमचे नगरीचा समाचार । की जी मायबाप l तो ऐका की जी मायबाप ll
आशा अनेक अभंगातून संत एकनाथ महाराजांनी अस्पृश्यांची बाजू घेऊन त्यांची वेदना मांडली होती.
एका उच्चजातीय व्यक्तीने स्वतःला महार म्हणवून घेने क्रांतिकारी,धाडसाचे आहे. त्याकाळी प्रत्येक सरंजामदाराच्या हताखाली चाकरी करण्यासाठी , त्याच्या हाताखालील कामे करण्यासाठी तत्कालीन महार , मातंग आदी जातींचे लोक असत. हे रुपक वापरताना संत एकनाथ महाराज मी संत जनार्दन स्वामी यांच्या घरचा महार आहे असे म्हणवून घेतात.सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की संत एकनाथ महाराज अगदी अस्पृश्यांच्या ग्रामीण बोलीचा,गावकुसाबाहेरच्या बोलीचा जशाला तसा वापर करतात. माजी अस्पृश्य जाती पुर्वीला जी लावून बोलत असत.संत एकनाथ महाराजही अगदी जी लाऊन अभंग लिहीतात. महाराला गावकीत काय काय कामे करावी लागतात, ते सर्व वर्णन एकनाथ महाराजांनी करुण ठेवलेले आहे. या पद्धतीने त्यांनी केवळ जोहार घालून अभंगच लिहीले नाहीत तर भौतिकवादात अस्पृश्यता निर्मुलनाचे कामही केले होते. ते जसे बोलले तसे त्यांनी करुन दाखवले होते. या बद्दल बा. रं. सुष्णकर लिहीतात. " एकनाथांनी जातिभेदाविरुध्द फार मोठे बंड उभे केले होते. पितरांच्या श्राध्दाच्या दिवसी आपल्या घरी अंत्यजांना जेवू घालून, उन्हात तळमळणारे महाराचे मुल कडेवर घेऊन, आपल्या अंथरूणावर वडाऱ्याला निजायला ठेवून, राणू महाराकडे सर्वासमक्ष स्वतः जेवायला जाऊन एकनाथांनी रूढ जातिनिर्बंध झुगारून दिले. " मध्ययुगीन भारतात संत एकनाथ महाराजांनी या भेदाभेदाच्या विरोधात लिखानही केले आणि तसे जातीअंताचे प्रयोगही केले. त्याकाळी सहभोजनांचा प्रयोग करणे क्रांतीकारी म्हटले पाहिजे अस्पृश्यांच्या सहवासात राहून दाखवणे, त्यांची बोली बोलणे आणि त्यांच्या सोबत अन्न ग्रहण करणे हे धाडसी आणि माणुसकीचे काम संत एकनाथ महाराजानी करून दाखवले होते. संत एकनाथ महाराज यांच्या गुरुचे म्हणजे जनार्दन स्वामी यांचे गुरू संत चांद बोधले हे मुस्लीम होते.त्यामुळे सुफी परपरेचाही वारसा संत एकनाथ महाराजांकडे आला होता.त्यातून ते अस्पृश्य निर्मूलनाचे प्रयोग करु शकले.थोडक्यात काय वारकरी सुफी मिलाफातून संच एकनाथ महाराज जातीअंताचे -प्रयोग करू शकले होते.
संत एकनाथ महाराजांच्या नंतर या भेदाभेदाच्या विरुद्ध, ब्राम्हणी ब्यूरोक्रॉसी विरुद्ध संत तुकोबारायांनी आघाडी उघडली होती जन्माने हिन मानने तुकोबारायांना मान्य नव्हते.
" अभक्त ब्राम्हण जळो त्याचे तोंड l काय त्यासी रांड प्रवसवली । वैष्णव चांभार अन्य त्याची माता l शुद्ध उभयंता कुळयाती ll
अशी गुणकर्मावर श्रेष्ठत्वाची भुमीका संत तुकोबारायांनी घेतली होती. त्यांना अस्पृश्यतेचा, जातपात मानणार्यांचा तिटकारा होता. ते म्हणायचे "" विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ ll तुकोबारायांच्या अभंग गाथेत शेकडो अभंग जातीभेद,अस्पृश्यता पाळणाऱ्याना, जन्माने श्रेष्ठत्व मिरवणाऱ्याना खडे बोल सुनवनारे आहेत.त्यांचे म्हणने होते वाण्याच्या दुकानातून गुळ आनयचा असेल तर त्याची जात आणि कुल कशाला विचारावे ? अस्प्रश्य संतांच्या वाट्याला आलेल्या दुःखद वेदना भविष्यात कुनाच्याही वाट्याला येवू नयेत म्हणून तुकोबाराय काम करत होते. आपल्या साहित्य निर्मीतून त्यांनी जगाला माणुसकी शिकवणारा संदेश दिला होता. तुकोबारायांचे अस्पृश्यतेला, जातीव्यवस्थेला विरोध करणारे अभंग पाहिले की वाटु लागते की ते संत चोखोबारायांचे अंतरीचे दुःख जाणून होते संत तुकोबारायांनी इंद्रायणीहुन आंघोळ करुन येताना दर्शन घेण्यासाठी संत चोखोबारायांचे छोटे मंदिरही बांधले होते.म्हणजे विठ्ठल , नामदेव यांच्या बरोबर संत तुकोबारायांची प्रेरणा संत चोखोबाराय सुद्धा होते.चोखोबारायांसाठी तुकोबांनी जोहार तर घातलाच शिवाय आपल्या अभंगातून चोखोबारायांचा आदरपूर्वक उल्लेखही केलेला आहे. ते उंच नीच काही नेणो भगवंत या अभंगात तुकोबाराय म्हणतात
" सज्जन कसाया विकु लागे मांस | माळ्या सावत्यास खुरपु लागे ॥ नरहरी सोनारा घडवू फुंकू लागे । चोखामेळ्यासंगे ढोरे ओढी ॥
आमचा देव ब्राम्हणांच्या सारखा उचनिच
भेदभाव करत नाही तो सज्जन कसायासोबत मांस विकु लागतो , चोखोबारायांसोबत मेलेली ढोरे ओढु लागतो. शिवाय " पवित्र ते कुळ पावन तो देश " या अभंगात चोखोबारायांचा उल्लेख करताना संत तुकोबाराय म्हणतात
चोखामेळा बंका जातीचे महार । त्यासी सवैश्वर ऐक्य करी ll
आमच्या सर्वेश्वर भेदभाव करत नाही. तो सर्वांना समान मानतो. हा संदेश तुकोबाराय देतात. संत चोखोबारायांची बाजू घेताना संत तुकोबाराय म्हणतात
" चोख्याचे अभंग करविले देवानी | स्वप्नीही येऊनी सांगितले ll चोखिया म्हणोनी निंदतील कोणी l लागोणी बरे मजला भोगीन पहाती ।।
माझ्या चोखियाचे नित्य घेती नाव l त्याच्या घरी धाव जाय माझी ॥
तुका म्हणे चोखा युगायुगीचा भक्त । म्हणोनी पंढरीनाथ ऋणी त्याचा ll
या अगातून संत चोखोबारायांनी निंदा करणार्यांना संत तुकोबारायांनी चांगलेच फटकारले आहे. जे लोक संत चोखोबारायांचे नित्य, नियमीतपणे चांगले नाव घेतील त्यांच्याकडे तुकोबाराय जाने येणे ठेवतील असे तुकोबारायांचे म्हणने आहे. त्यांचे चोखोबांच्या प्रती आदरयुक्त बोल आहेत. याचा एक अर्थ असाही निघतो की संत तुकोबारायांच्या आजूबाजूला संत चोखोबांची निंदानालस्ती चालु होती. म्हणून त्यांना ठणकावून सांगावे लागले की खबरदार चोखोबांची कुनी निंदा कराल तर. ऐके ठिकाणी तर तुकोबारायांनी 'चोखा माझा गणपती, म्हणून त्यांना प्रमुख भुमीकेत आनुन बसवले आहे. संत चोखोबारायांना एवढ्या उंचीवर नेवारे तुकोबाराय होते. महाराष्ट्रीतील मराठ्याच्या, कुणब्याच्या घरातील सर्वाधीक लोकप्रिय संताने संत चोखोबारायांचा एवढा सन्मान करणे क्रांतीकारी आहे. दोन जातींना सांस्कृतिक ऐक्याने जोडनारे प्रतिक तुकोबाराय आहेत. तुकोबाराय म्हणजे सामाजिक आर्थिक सर्वहरा जातींच्या क्रांतीदोस्तीचे तत्वज्ञान निर्माण करणारे महान व्यक्तिमत्त्व होते. ते सामाजातील शेतकरी जाती व अस्पृश्य जातींना जोडणारा दुवा आहेत. संत चोखोबारायांचे एवढे मोठेपण मांडणारे तुकोबारायच !
बघा अनखी ऐके ठिकाणी तुकोबाराय काय म्हणतात.
"रायाचे सिपाई हजाराचे बारा l लाखाचा मोहरा प्राणी एक ll सवारूपयाची येती पाच मोती | हजाराची येती जोड़ी एक ll रुपायाच्या कवड्या मधे भरे गोणी l मोहर बांधुनी पदरी न्यावी ll शंभर लोकांत सद्गुणी ऐका | तुका म्हणे चोखा पंढरीचा ॥
ग्रामीण भागात बोलताना आपण नेहमी म्हनतो आमचा गडी लाखात एक आहे. अगदी तसेच संत तुकोबाराय चोखोबारायांच्या बद्दल बोलनताना म्हणतात "आमचा चोखोबा लाखात एक आहे"
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment