मार्क्सवादी इतिहासाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत ..
कार्ल मार्क्स भौतिक अंगाने इतिहासाचे,मानवी उत्कर्षाचे काही टप्पे करतो.ते खालीलप्रमाणे आहेत.
१) आदिम साम्यवाद : येथे मानवी जीवणाचा भटकंतीचा टप्पा ते स्थीर होत जानारे मानवी जीवनाचा विचार केला जातो.या काळात साठवून ठेवण्यासाठी मानवी साधने तयार नसल्यामुळे आदि मानव आपली शिकार , कंदमुळे समान वाटुन खात असे.म्हणजे फळे कंदमुळे शिकार स्टोअर करण्याची साधने उपलब्ध नसल्यामुळे येथे नैसर्गिक समता साम्यवाद होता.येथे कुनीही गुलाम नाही मालक नाही.हाच आदिम साम्यवाद होय.या काळात नितीमुल्ये , जगण्याची सभ्य नियमावली अस्तित्वात नव्हती.
२) सरंजामशाही : हा इतिहासाचा मोठा कालखंड मानला जातो.यात दोन वर्ग अस्तित्वात आले.गुलाम आणि मालक.गुलामांना पकडुन अत्यंत कमी निकृष्ट दर्जाचे अन्न देवून त्याच्याकडून प्रचंड श्रम करुन घेतले जायचे.येथे साठवूनक वाढली.शोषण वाढले.
पुढे याच सरंजामशाहीच्या कालखंडात बडे जमिनदार हे गरीब शेतकऱ्यांना लुटायला लागले . मग राजेशाही आली त्यात शेतकऱ्यांच्याकडुन शेतसारा घेण्याची पध्दती आली.मग सैन्य आले.लूटमार आली.यातुन एका वर्गाचे प्रचंड शोषण चालु राहिले.गरिब श्रीमंत भेद वाढत गेला.येथे सरंजामीमुल्ये तयार केली गेली.जसे चोरी करणे पाप आहे वगैरे.
३) भांडवलशाही : यात उत्पादन केवळ नफा मिळविण्यासाठी सुरु झाले.माणूस वस्तु बनला.नव्या बाजारपेठा शोधण्यासाठी स्पर्धा लागली.त्यातून कामगार मालक संघर्ष सुरु झाला.भारतात इंग्रजांच्या आगमनाने भांडवलशाही आली.येथे व्यक्तिस्वातंत्र्य वाढले.माणूस स्वतंत्र झाला.परंतू त्यात तुटलेपण आले.व्यवहारवादी नफ्या तोड्याच्या जगण्यात तो केवळ वस्तू बनला.
4)साम्रज्यशाही : यात एकच देश जगावर राज्य करायला बघतो.अनेक देश उध्वस्त केले जातात.उदा अमेरिका.
५) कम्युनिझम : एक शासन यंत्रणा येवुन सर्वांना बरोबरीने वागवण्याचा प्रयत्न करते.येथे साम्यवादाला सुरुवात होते .कुनी कुनाचे शोषण करु नये अशी राज्ययंत्रणा आनली जाते.उदा समाजवादी लोकशाही वगैरे.
६) साम्यवाद : असे राष्ट्र जिथे कोनीही गुलाम नाही मालक नाही. सगळे समान.शासन नाही प्रशासन नाही बंधने नाहित अशी व्यवस्था..
नितीन सावंत परभणी ..
No comments:
Post a Comment