ll परकायाप्रवेश ll
कॉ शरद पाटलांच्या साहित्यात परकायाप्रवेश हा शब्द नेमाडेंच्या कोसलाचे समीक्षण करताना शेवटी येतो.
तसा हा शब्द कॉ राजकुमार घोगरे यांच्या तोंडून आनेकवेळा कानी गेला आहे.
पण हा शब्द जगायला मिळाला तो दिंडीत.पंढरीच्या वारीत.
एवढ्या सत्यवादी परिवर्तनाच्या चळवळी आपन चालवतो मग त्या अल्पजीवी का ठरतात ? त्याचे मुख्य कारण हेच आहे,की
आजूनही आपन परकायाप्रवेश करु शकलेलो नाहीत.
वारीला जाताना मी ठरवलेले होते.सामान्य वारकरी जसे जगतात अगदी तसेच जगायचे.अगदी खडतर वृत्त घेवून.
कधी कधी आंगाखाली काहीही न घेता तसेच झोपावे लागले.एकदा खुप गारठा पडला,थंडी वाजली.त्या दिवसी किर्तनात आलेल्या सत्काराच्या शालीवर रात्र काढली .
आसाच असतो परकायाप्रवेश.ते जगतात अगदी तसेच जगणे,ते खातात तेच खाने.हे मी गेले चार वर्षे झाले करत आहे.
कुठलेही पाणी प्या,जे मिळेल ते खा.दिवसभर आंगावर उन घेवून तासंतास चालत राहायचे.एकूण सर्व दिवसांचा प्रवास ५०० शे १००० किमीचा.
रात्रीला पाऊस आला तर राहुट्या किंवा उघड्यावर भिजायचे.
हे त्याग आणि समर्पित जीवन लोकांना तत्वज्ञानापेक्षा जास्त जवळ करते.लोकांना ज्ञानापेक्षा त्याग हवा हे जेव्हा मला कळले तेव्हा धक्काच बसला.आणि उदाहरण म्हणून दिसले ते संभाजी भिडे.
तुम्ही कितीही शिव्या द्या.पण तुम्ही भिडे गुरुजींचे चेले बदलवू शकत नाहीत.कारण भिडे गुरूजींच्याकडे ही परकायाप्रवेशाची कला आत्मसात आहे.त्यांनी पायात कधीही चप्पल बुट काहीही न घालता,साधा पोशाख करुन, मळकट कळकट कपडे घालून या परकायाप्रवेशाद्वारे हजारो संभाजी भिडे तयार केले आहेत.अगदी असेच खडतर वृत स्विकारून.
हि कला कॉ शरद पाटलांना सुद्धा अवगत होती.म्हणून तर आदिवासींना ते प्रिय होते.शपांनीही खडतर व्रत्ताद्वारे आदिवासींच्यात परकायाप्रवेश केला होता.त्यासाठी त्यांना उपाशीतापाशी रहावे लागले,एकदा तर ते रात्रभर पिकाच्या भुस्यात थंडीपासून बचावासाठी झोपले.पायात खुरुप आणि काटे घेवून ते जगले.
आणि तुम्ही मात्र घरातल्या ए सी खुर्चीवर बसुन वारकऱ्यांची टिंगल टवाळी करता.या तुमच्या नास्तिकवादाने लोक जोडले जातील काय ? कोनता आजेंडा आहे तुमच्याकडे हे गरिब कष्टकरी लोक जोडनारा.तुमच्या कोरड्या तत्वज्ञानाने हे जोडले जातील काय ??
भिडे गुरुजींच्या चेल्यांना तुमचे तत्वज्ञान सांगून एक तरी बदलून दाखवा बरे.
जोपर्यंत परिवर्तनवादी चळवळीत ही परकायाप्रवेशाची कला घेवून कुणी त्याग आणि समर्पण करायला तयार होत नाही तोपर्यंत सामाजिक चळवळी जैसे थेच रहातील.एकेरी नास्तिकवादातून फक्त टिका करत बसायचे बाकी काम शून्य...
नितीन सावंत , परभणी
9970744142
No comments:
Post a Comment