Saturday, 29 December 2018

♦बुद्ध एक चिंतन ♦

बुद्ध एक राजघराण्यातील लाडका तरुण.ग्रहत्याग करताना आपन सर्वसंगपरित्याग करत आहोत हे बुद्धाने जाहीर केले होते आणि त्यांनी तसे केलेही.आपला घोडा व आंगावरील राजवस्त्र त्यागुन त्यांनी सोबत आलेल्या सेवकाला माघारी पाठवले होते.पुढे त्यांनी चिंध्यांपासून,गोणपाटापासून बनवलेले चिवर धारण केले.पुर्वीप्रचलीत असलेल्या अनेक पंथ प्रवाहांशी चर्चा करुन,मुनी साधु यांच्याशी तात्विक घुसळण करुन पुढे तथागतांनी स्वतंत्र धम्ममार्ग निर्माण केला.आणि भिख्खुसंघासाठी एक आदर्श नियमावली बनवली.

प्रश्न असा आहे की.भिख्खुसंघासाठी बनवलेली नियमावली तथागत बुद्धांनाही लागू होती की नाही ? असायलाच पाहिजे.कारण बुद्ध कधीही भेद करत नसत.
मग संपूर्ण भिख्खूसंघ हा मुंडण केलेला दिसतो.दाखवला जातो.पन बुद्ध मात्र सुंदर केसांचा बुचुडा बांधलेले दाखवले जातात.म्हणजे केवळ दगडीमुर्ती कोरताना ती सुंदर दिसावी कुरुप वाटु नये म्हणून मुर्तीकारांनी बुद्धाच्या डोक्यावर कुलुपे कुलुपे असनारा कुरुळ्या केसांचा बुचुडा तयार केला. लहान मुलांचे केस सौंदर्याचे प्रतिक आहेत.म्हणून बुद्धाला मुर्तीत त्या लहान मुलांच्या कुरुळ्या केसांचा बाज चढवलेला दिसतो .

संपूर्ण आयुष्यभरात बुद्धाने धम्मात स्वतःच्या जीवनचरित्रावर चर्चा होऊ दिलेली नाही . ते धम्मच मुख्य प्रधान मानायचे व्यक्ती नव्हे.बुद्ध म्हनायचे मोहात पडू नका.कुठल्याच तृष्णेत आडकू नका.मग ती तृष्णा व्यक्तीची सुद्धा असू शकते.शास्ता मार्गदाता म्हनुनही कुनाला सर्वस्व मानू नका. रुपाची तृष्णा,व्यक्तीची तृष्णा ही सुद्धा गुलामीकडे नेते.म्हणून बुद्ध असे पर्यंत तुम्हाला कुठेही बुद्धमूर्ती दिसनार नाहीत.बुद्धांच्या पश्चात बुद्ध जे नका करु म्हनाले ते करायला सुरुवात झाली.बुद्ध म्हनाले मुर्तीपुजा करु नका.जगभरात बुद्धी मुर्ती उभ्या राहिल्या.लोक धम्मदायाद व्हायचे सोडून अमिष (मुर्तीला बळी पडले ) दायाद झाले.

बुद्धमूर्ती सौंदर्याचे प्रतीक आहे .त्याने असक्ती निर्माण होते.व्यक्ती गुंतततो .आडकतो,मोहित होतो.आणि बुद्ध म्हनायचे मुक्त व्हा ! आडकू नका ! पक्षाप्रमाणे स्वच्छंद व्हा.म्हणून बुद्धविचार सोडून बुद्धमुर्तीची असक्ती हा बुद्धाचा अपमान आहे.हा धम्म नव्हे.तो फक्त सिद्धार्थवादी झाला.धम्मवादी नव्हे.तुम्हाला सिद्धार्थाचे भक्त पावला पावलावर दिसतील,भेटतील पन धम्माचे आचरणकर्ते महतप्रयासाने शोधुनही सापडतील की नाही मोठा प्रश्न आहे .
आणि आभूषने तर बुद्धांनी कधीही घतलेली नाहीत.आभूषणे घातलेला सुंदर बुद्ध हा मार आहे.बुद्ध नव्हे . लोक हुशार आहेत बुद्धाला दागदागिने  घातले की यांनाही सुखासीन जगायला आभूषणे वापरायला मोकळीक मिळते.जैनांचे नाहीका महावीर त्याग करा म्हनाले.त्यांच्या चेल्यांनी महाविरांच्या मुर्तीला खुप सजवले दागदागिने घातले.म्हणजे जैनांना तसे वागायला मोकळीक.जे महाविर त्याग करा म्हनाले त्यांच्या धर्माचे लोक सर्वात जास्त संपत्तीला चिकटून बसले.भोगी बनले.तुम्हाला हवा तसा महावीर नाही.तुम्हाला हवा तसा बुद्ध नाही.बुद्ध बुद्धच आहेत.

नितीन सावंत परभणी
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

No comments:

Post a Comment