Tuesday, 2 March 2021

ग्रामसंस्कृतीला संजीवनी पुरवनारे लोकलावंत

ग्रामसंस्कृतीला संजीवनी पुरवनारे लोकलावंत 

आमचा कुठलाही लोककलावंत घ्या, मग तो पिंगळा असो नाहीतर वासुदेव असो,गोंधळी असो नाहीतर राइंदर असो.नवनाथाच्या वेषातील डवरी गोसावी असो नाहीतर जोतीषी असो, हा लोककलावंत जे काही सांगतो ते इहलोकीचे जीवन सुखसंपन्न होइल , भरभराट होइल याबद्दलचा तुमचा आशावाद वाढवतो.पॉझिटीव्हनेस सांगतो.अनेक खचलेल्या, हारलेल्या शेतकरी , कष्टकरी , श्रमीकाला हे कलावंत मोटिव्हेशन पुरवतात. 
यंदा सुगी लै हुइल , घरात पाळणा हलेल , लेकीचं लगिन होइल , घरातले आजार कमी होतील , दु:ख दारिद्र्य घरतील दैना जाइल  , यंदा वारि घडेल वगैरे. तसे हे कालावंत एकेकाळीचे दुरदर्शनच.रोगराई होइल , साथीचा रोग आलाय काळजी घ्या , कुठल्या भागात चांगली सुगी आलीय , कुणाचे पोर लग्नाला आलेय असे अनेक सांगावे सांगनारे हे कलावंत होते.
यांच्या कलाप्रकाराने ग्रामीण भागाला नवसंजीवनी पुरवीली गेलीय.हजारो वर्षे ग्रामीण भाग यांच्याकडून जगण्याचा प्रेरणेचा जीवनरस घेत आला आहे.यांच्याच सांस्कृतिक संचितामुळे कधीही शेतकरी वर्गाने आत्महत्या केलेलेल्या नाहीत.हेही दिवस जातील हा संदेश ही कलावंत मंडळी देत असे. 
यांचे ठोकताळे आणि अंदाजही प्रचंड पर्फेक्ट असत . आजचे तुमचे वैधानिक हावामान खाते हजारो वेळा दरवर्षी चुकते.आमच्या ग्राम संस्कृतीचे हे दुत कधी चुकत नसत. यांनी इहलोकीचे जीवन सुखकरच बनवले.उत्पादन वाढवले.
      याउलट ब्राम्हणांनी लालूच दाखवली ती मृत्यूनंतरच्या जीवनाची.स्वर्ग मिळेल , मोक्ष मिळेल किंवा पुनर्जन्म चांगला मिळेल वैगरे. त्याचबरोबर आम्हाला दान नाही दिले तर नर्कात जाल , पाप करु नका , वगैरे.
परंतू लोककावंतांनी मात्र कधीही भिती घातलेली नाही.

    आज घडीला त्या लोककलावंतांच्या प्रती आदराच्या भावनेतून उतराई होण्याची वेळ आली असताना, त्यांची टिंगल करणे , ते कसे विज्ञानवादी नाहीत, यडे आहेत हे दाखवने म्हणजे खाल्लेल्या ताटात हागणे होय.तुमच्या माय बापाला यांनीच निराश होऊ दिलेले नव्हते.त्याचे उपकार आपण या कलावंतांची टिंगल करुन त्यांना हिन लेखून फेडनार आहात का ?
    पाश्चिमात्य विज्ञानाच्या जोरावर एवढ्या उड्या मारनार का ? बरे ही वैज्ञानिक कमाई तुमचीही नव्हे. 
     ग्रामीण भागात आज सांस्कृतिक संचित आटल्यामुळेच आत्महत्या वाढलेल्या आहेत.
रात्रभर चालनारे गोंधळ बंद झाल्याने , बहुरूपी करमणूक करण्यासाठी गावी येने बंद झाल्यामुळे , सोंगे घेनारे , भरुडकार वगैरे आज कमी झाल्यामुळे तुम्ही परात्मतेची राख  स्वताला फासुन घेत आहात.
मरा एकलकोंड्यान्नो.. 
लोककलावंतांची टिंगल ,त्यांची अवहेलना तुम्हाला तुमच्या ग्रामसंस्कृतीला भस्म करनार आहे.सोइरिकी न जमने हा शाप लागलाच आहे तुम्हाला. आजुन लै उध्वस्त व्हायचे बाकी आहे..
सुंब जळालेय पण पिळ काही जाइना ..

नितीन सावंत परभणी
9970744142

No comments:

Post a Comment