दख्खनचे नैसर्गिक सौंदर्य मुस्लिम मनाला इतके भावले की या भागाला स्वर्ग म्हणून संबोधायला सुफींनी सुरुवात केली.खुल्द म्हणजे स्वर्ग.खुल्ताबाद म्हणजे जन्नत का शहर.
औरंगाबाद सुद्धा त्या काळी नैसर्गिक साधन संपत्तीने अत्यंत देखने आणि समृद्ध शहर होते.खांब नदिच्या तिरावर नैसर्गिक सौंदर्याच्या आधारे अत्यंत सुंदर नक्षीकाम, बांधकाम करत त्या भुभागाला शहर बनवायला घेतले ते मलिक अंबर यांनी.म्हणून ते पहिले शहर , " शहर ए अंबरी " अर्थात मलिकांबराबाद होय. मलिक अंबर यांनी बांधकाम करत या निसर्गसुंदर दख्खन भुमीला ३० दरवाजाच्या आत स्वर्गीय आविष्कार बहाल केला होता.नंतर औरंगजेब यांच्या काळत ते शहर ५२ दरवाजांच्या आत संपन्न बनले.बाजुला सुंदर बागा आतुन जानारी खांब नदी आणि त्या नदी तिरावर वसला तो छोटा ताज महाल म्हणजे " बिबी का मकबरा ". शंभर एक्कर च्या परिसरात वाढवलेल्या नैसर्गिक जंगली बागेतील अनेक हत्ती अगदी बांधलेल्या महालाच्या बाजुच्या ओट्यापर्यंत येत असत.आजच्या जिल्हाधिकारी निवासाच्या मागे हे अवशेष आजही पहायला मिळतात.
जमीनीच्या अंतर्गत एक महल आणि वर दोन मजली महल अशा अनेक वास्तू आज ब्राम्हणी छावणीने पाडुन जमीनदोस्त करायला सुरुवात केलेली आहे.त्याकाळातील गरिबांच्यासाठी सुरु केलेले लंगर आजच्या ब्राम्हणवाद्यांच्या डोळ्यात इतके खुपत होते की त्यांनी कर्मठ भक्तांना हताशी धरुन ते भव्य लंगर बांधकाम पाडले आहे.
मलिक अंबर यांनी बांधलेल्या ३० दरवाज्यापैंकी भडकल गेट हा एक भव्य दरवाजा आज पहाता आला.हा दरवाजा ६३ फुट उंचीचा आहे.
भारतात कला साहित्याचा नक्षीकाम आणि कारागिरीचा सर्वाधीक विकास याच काळात झालेला आहे.
अनेक वास्तू ,शहरे , गावे मलिक अंबर यांनी वसलेले आहेत.त्यापैकी फुलंब्री (फुल ए अंबरी ) हे शहर सुद्धा मलिक अंबर यांनी वसवलेले आहे.
ब्राम्हणी छावणीने आधी वास्तू जमीनदोस्त केल्या , मग इतिहास विकृत लिहीला, आता शहरांची नावे बदलून त्यांना भांडणे लावायची आहेत. सर्व मिटवायचे आहे.
संपूर्ण शहर फिरुन इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवण्याचे काम मलिक अंबर यांचे १६ वे वारसदार ॲड.ए.आर.अंबरी यांनी केले.त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. ग्रंथप्रकाशक, प्रचारक मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांची भेटही अंबरी साहेबांच्या मुळे झाली.
हा मलिकांबराबादचा अविस्मरणीय दिवस राहिला.
नितीन सावंत परभणी
दिनांक २० जुन २०२१
No comments:
Post a Comment