Thursday, 12 August 2021

♦️आपण एकसंघ कधी बनलोच नाहीत

 ♦️आपण एकसंघ कधी बनलोच नाहीत... 

           राष्ट्रवादाची प्रबळ भावना इतर राष्ट्रांसारखी भारतीयांत मोठ्याप्रमाणावर नाही.तसे पुरावे पावलापावलावर दिसून येतील.हे आपले आहे.आपल्या सर्वांचे आहे , देशाचे आहे असे कधीही आपल्याला वाटत नाही.

१)सरकारी रोडसाठी टाकलेली खडी रात्रीला उचलून नेने.  
२)सरकारी शाळेकडे,शाळेच्या आजूबाजूला हगायला जाने.
३)बसच्या सिट फाडने,किंवा बसमधे सिटखाली थुंकणे.
४)सरकारी कार्यालयांत भितींवर थुंकणे.सरकारी कार्यालयांत धुम्रपाण करणे.तेथील वस्तू ,टेबल कापटे अगदी रफ पध्दतीने वापरने. 
५)त्याला काय होतय म्हणून सतत कुठले न कुठले नियम मोडणे,पायदळी तुडवने,
६) आपल्या घरातील,लाइट गेल्यानंतर शेजारी कशीकाय आहे यावर दुख व्यक्त करणे.किंवा त्यांचीही लाइट गेल्यानंतर,गेल्याचे दुख न बाळगता त्यांचीबी गेली म्हणून संतोष मानने.
७) एखादी लाभार्थी योजना त्यांनाच कशीकाय ? त्यांनाही नको,कुनालाच नको अशी भावना बाळगणे.
८) करोडोंचा फंड न वापरता वापस पाठवने , सरकारी संपत्ती वाळु , खनिजे उपसने, लुटने .
९) कचरा , घान कुठेही टाकायला लाज न वाटने. 
१०) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्तेच्या जोरावर कर्तबगारी गाजवलेल्या खेळाडुंबद्दल तो भारतीय असल्याची भावना,पुरेशी न वाटता त्याची जात,धर्म, प्रांत,भाषा किंवा त्याचा कोच तरी आपला आहे का याचा शोध घेने. 

         आशा अनेक उदाहरणांच्या द्वारे "#भारत_माझा_देश_आहे" असे कुनीही मनापासून मानतानाचे दिसत नाही.मग कशीकाय रुजेल लोकशाही ? सगळे जन मिळून आपापल्या अस्मितांच्या द्वारे भारतभुमीचे लचके तोडत आहेत . उलट मात्र 
 प्रतिगामी छावणी राष्ट्रवादाचा वापर खुबीने करुन सत्तेत आहे. प्रतिगामी छावणी कशीकाय करते राष्ट्रवादाचा वापर ? 
तर प्रतिगामी छावणीने एकसंघतेसाठी व्यापक आस्मितेची बाळगुट्टी पाजली ती धर्माची.धर्म वाजवा , देश वाचवा हे त्यांचे सुत्र.कुनापासुन वाचवा तर मुसलमानांपासुन वाचवा,हा त्यांचा राष्ट्रवाद. धर्मीक अस्मितावादाला आलिकडील काळात राष्ट्रवादाची शेपटी जोडुन ते राजकीय क्षेत्रात अजोड उभे राहिलेले आहेत.तरी त्यांचा राष्ट्रवाद स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही कुठे होतात या एकाच प्रश्नाने थेट जमिनदोस्त होतो. 

        त्यामुळे या भक्त जनतेला राष्ट्रवादाचा नवा पर्याय सुद्धा एकत्र करु शकेल का याची शास्वती नाही.जे लोक शेजारच्या आणि आपल्या अंगणात फरक करतात.सडा टाकताना,अंगणात पाणी मारताना आपल्या अंगणांच्याच बॉंड्रीपर्यंत पाणी टातात ते काय भारत माझा देश आहे ही एकसंघ भावना बाळगतील.#सारे_भारतीय_माझे_बांधव_आहेत, हे तर केवळ स्वप्नाळू पुस्तकी विधान .

नितीन सावंत परभणी 
9970744142

No comments:

Post a Comment