♦️घटस्थापनेचा पहिला दिवस
सितायण - सिताजयंती
सिता,सदैव दु:ख आणि यातना भोगलेले एक पौराणिक पात्र. रामायण हे रामायण नव्हे तर ते सितायण आहे.सदैव पती आज्ञेत राहिलेली रामायणाची नायिका म्हणजे सिता होय.मर्यादेची रेषा सदैव तिलाच घालून दिलेली आहे.पदोपदी परिक्षाही तिच्याच वाट्याला येते.ती चारित्र्यसंपन्न असल्याचे तिनेच सदैव सिद्ध करयाचे, कारण ती स्त्री आहे.पुरुषांना चारित्र्य संपन्नतेच्या कुठल्याही कसोट्या येथील धर्मव्यवस्थेने ठेवलेल्या नाहीत.
सिता म्हणजे जमीन,सिता म्हणजे भुमाता.प्राच्यविद्यापंडीत कॉ.शरद पाटील म्हणतात,अ-हल्या म्हणजे नांगरलेली जमीन म्हणून सिता ही भुकन्या ठरते.ती विदेहच्या स्त्रीराज्याची गणपुत्री आहे.तिचा काळ वंशसमाजाचा , मातृसत्ताक स्त्रीसत्ताक गणव्यवस्थेचा. साधारणतः इ.स.पु. ९०० ते १००० चा. सिता ही जिने शेतीच्या शोध लावला त्या अद्यगणमाता निऋतीच्या त्रिअंबेच्या ज्ञातीची वारसदार.आईकडून मुलिकडे जाणारे राजपद सितेकडे जावू नये म्हणून आणि ती गणराज्ञी होऊ नये म्हणून तथा सर्वराज्य तिच्या ताब्यात जावू नये म्हणून,जनकाने सितेला पुरुषसत्ताक गणव्यवस्थेच्या रामाला बहाल केले.तिचे लग्न लावुन देवुन तिला रामाच्या गणात नांदायला पाठवले होते.कुलाचा पवित्र त्र्यंबक धनुष्य मोडुन तो मातृसत्ताक स्त्रीसत्ताक गण जनकाने पितृसत्ताक बनवायला रामाची मदत घेतली.अशी रामायणाची कथा आहे.पितृसत्ताक पुरुषवर्चस्वाच्या राज सत्तांची सुरुवात राम करतो तर मातृसत्ताक स्त्रीसत्ताक समाजव्यवस्थेच्या राज्यांच्या मावळतीची सिता पहिली प्रतिनिधी ठरते.
नवरात्रोत्सव हा निऋतीपुत्री दुर्गेचा उत्सव मानला जातो.हा सण शाक्तसंस्कृतीचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो.भारतीय संस्कृतीतला सर्वात जुना हा सण आहे.या नवरात्रोत्सवाची सुरुवात घटस्थापनेने होते.ही घटस्थापना म्हणजे भुमातेचे पुजन होय. शेतीच्या शोधाचे श्रेय निऋतीला जाते.तिचे स्मरण करणारा हा सण आहे. दुर्गा ही निऋती मुलगी.तिच्याही नावे हा सण साजरा होतो.पश्चिम बंगाल मधे सर्वात मोठा नवरात्रोत्सव होतो.देशभरात सर्वत्र स्त्रीराज्ये होती.स्त्रीराज्यांत सुरु झालेले हे सण पुढे स्त्रीयांनी पिढीदरपिढीगत जीवंत ठेवले आहेत.आजही घटस्थापनेच्या पुर्वी तयारीसाठी स्त्रीया घर सारवतात.संपूर्ण घर स्वच्छ करुन घेतात. रंगरंगोट्या करतात.आणि त्यानंतर घरात घटस्थापना करतात.त्या दिवाळीसारखीच आपल्या सणाची जय्यत तयारी करतात.अनेक स्त्रीराज्यातून हा सण पिढीदरपिढीगत मार्गक्रमण करत आल्याने त्यावर अनेक परंपरांची पुटे चढलेली आहेत.रेणुकामातेच्या चरित्रातही घट किंवा पाण्याचा घडा घेवुन येतानाची कथा आहे.रेणु म्हणजे माती.ओलीताची सरकती शेती करणारी ती रेणुका.रेणुकेच्या धडावर नंतर बसवलेले डोके मातंग स्त्रीचे असल्याची एक लोककथा असल्याने नवरात्रोत्सवात मातंग स्त्रीयांची परडी भरल्याशिवाय सवर्णस्त्रीया जेवन सुद्धा करत नाहीत.देशभरात जेवढ्या मातृदेवता , स्त्रीदेवता किंवा लोकदेवता आहेत , त्या सर्व एकेकाळी जन्माला येवुन गेलेल्या शुर,धाडसी , समन्यायी , समतावादी ग्रेट स्त्रीया होत्या.त्यांची आठवण कोण्यान कोण्या मार्गाने जपून ठेवण्यासाठी त्यांच्या नावे सणवार उत्सव सुरु झाले आहेत. लिखानाची कला अवगत नसल्याने भारतीय स्त्रीयांनी आपल्या पुर्वजांचा इतिहास आकरहिन दगडांत , लोककथांत , मिथकांत जीवंत ठेवला आहे.मरीआई , पोचीमाय , यल्लम्मा, यडुआई , तुळजाई , रेणुका , सटवाई ,यमाई , मावळाई , इंद्रायणी, शितलाई , जाखाई , जोखाई , शाकंभरी, सप्तशृंगी, त्रिपुरसुंदरी, भवानी , रंडी , चंडी ,काली , दुर्गा यांसारख्या असंख्य स्त्रीदेवता पुर्वाश्रमीच्या आपल्याच पुर्वज आहेत.कुलटा , रंडकी , चंडकी , भटक भवानी , मऱ्यामाईचा गाडा यांसारख्या शिव्यांत देखील पितृसत्ताक समाजव्यवस्थेने त्यांचा नकारात्मक इतिहास जीवंत ठेवला आहे.ज्याला विधायक सकारात्मक पध्दतीने अभ्यासावे लागते.या सर्व स्त्रीया लोकदैवता कुठल्या न कुठल्या कला किंवा विद्येत पारंगत होत्या.कुनी फळे भाज्यांचा शोध लावला तर कुनी अस्त्रशस्त्रांचा , कुनी औषधोपचार करण्यात पारंगत होते तर कुनी प्रशासणात.म्हणून चौदा विद्या आणि चौसष्ट कलांच्या मुख्य जनक या स्त्रीया आहेत.मध्यप्रदेशातील मुरैना येथील ६४ योगीनींचे गोलाकार सभागृह आज घडीला आपली संसदेची प्रतिकृती आहे.मोदी सरकार जानीवपुर्वक ती प्रतिकृती नष्ट करुन नवी संसद बांधत आहेत.मातृसत्ताक सामाजव्यस्थेचे मारेकरी आणि पितृसत्ताक सामजव्यवस्थेचे वाहक आजचे राज्यकर्ते आहेत.भारतीय इतिहासाचे कालचक्र विकृत आणि उलटे फिरले आहे.स्त्रीयांचे पुजन आणि सन्मान करणाऱ्या देशात पुढील काळात सतीप्रथेच्या नावाखाली जीवंत जाळण्यात आले.संपूर्ण कारभार करण्याऱ्या स्त्रीला भोगवस्तू दासी बनवण्यात आले.सृजनाचा स्त्रोत नवनिर्मीतीची प्रमुख असलेल्या स्त्रीला धर्मग्रंथ नरकाचे द्वार मानतात. कॉ शरद पाटील म्हणतात नदी स्त्री आणि अग्नी सदैव पवित्र असते.स्त्री तर दर मासिक पाळीला अधिक पवित्र होत जाते.आसाम कडे आजही स्त्रीचा पहिला मासिक पाळी दिवस उत्सव म्हणून साजरा केला जातो.परंतू ब्राम्हणी परंपरेने मात्र मासिक पाळी अपवित्र म्हणून सांगितले. विटाळ म्हणून स्त्रीला बेदखल केले गेले. वारकरी परंपरेत संत सोयराबाई यांनी विटाळाचे अभंग लिहुन तर महानुभावांच्यात चक्रधर स्वामींनी मराठीतून उपदेश करुन विटाळ धुडकावुन लावला.
निऋतीच्या त्रिअंबेच्या ज्ञातीच्या शाखेतील पुढील वंशजा सिता आहे.मातीच्या गाळात कडधान्य मिसळून त्यावर पाण्याने भरलेले गाडगे ठेवले जाते.हेच सिता-पुजन आहे.सितेच्या अागमनाचा हा सोहळा आहे.हिच सिता जयंती आहे.घट म्हणजे गाडगे.स्त्रीच्या गर्भाशयाच्या आकाराकडे बघुन गोलाकार गाडगे पवित्र मानने सुरु झाले होते.त्याला कुंभ असेही म्हणतात.कुंभाला अकार देतो तो कुंभार.घट किंवा कुंभ हे सृजनाचे नवनिर्मितीचे प्रतिक मानले जाते.लग्नसोहळ्यात देखील धान्य उगवलेले गाडगे वधूवरांच्या सोबत असते.पतीपत्नीने संसारातून विभक्त होण्यालाही घटस्फोट म्हणतात.घडा फुटने हे अशुभ आहे.म्हणून दोघांनी विभक्त होने म्हणजे घटस्फोट होय. गर्भाशयातून आई जेव्हा बाळाला जन्माला घालते त्याप्रमाणे घटातून पाझरलेल्या पाण्यावर धान्य उगवते नवनिर्मिती होते. ही कल्पना घटस्थापनेमागे आहे.सृजनाचा सर्वोत्तम आविष्कार म्हणजे घटस्थापना आहे.नुकत्याच नांगरलेल्या जमीनीत पेरणी करणे म्हणजे सिता जयंती होय.सिता म्हणजे काळी जमीन.पेरणीस युक्त जमीन.
हजारोवर्षापासून आमच्या मायमाऊल्यांनी सितेची व्यथा एका सणाच्याद्वारे सांभाळून ठेवली.सितेचे दु:ख आपल्या उरी कवटाळून ठेवले. म्हणूनच आजही खेड्यातली मायमाऊल्या जात्यावर दळताना म्हनतात,
ऱाम म्हणून राम नाही ग सिता मातेच्या तोलाचा l
सिता मोठी हिरकणी राम हलक्या दिलाचा ll
सितेसारखे दुख: वेदना ,शोषन , पिडन कोण्याही स्त्रीच्या वाट्याला न येवो ! याप्रकारचा संदेश ग्रामीण महिला देत आल्या आहेत. तांत्रिक श्रृतीला गतिमान करण्याचा हाच काळ आहे .
म्हणून सिता जयंती सर्वत्र साजरी करावी.स्त्रीयांनी यात पुढाकार घ्यावा.
निऋतीच्या हस्ते शेतीच्या शोधाने सुरु होणाऱ्या घटस्थापनेच्या आणि सिता जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा !..
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment