Saturday, 13 October 2018

ll हुसेन हुसेन धुल्ला ll

कौतिक ही उद्धव ज.शेळके यांच्या कांदबरीची नाईका.शिंपी समाजाचे ग्रामीण वऱ्हाडी जीवन या कादंबरीत चित्रीत आहे.

यात एकदा शेतीचे काम जास्तवेळ करता यावे.आपल्या लहान मुलीने त्रास देवु नये म्हणून कौतिकने आपली मुलगी यसोदी ला रोजच्यापेक्षा जास्त अफु चारला.ज्यामुळे यसोदी हालचालच करेनासी झाली म्हणून कौतिकने भीतीपोटी आकाशाकडे हात करत नवस बोल्ला होता तो असा की " देवा शादुलबुवा,मह्या यडीबांगडीच्या हातानं काही चुकभूल झाली असनं त मले उचलून ने एक्का रातीतून,पन मह्य फय अस्स कच्च तोडुन नोको नेवू ... लागनं त मी तुह्या नावानं पाच बस्तरवार करिन पुडच्या बस्तरवार पासुन "

नंतर कौतिकने मोहरमच्या दिवसी आपला दोन नंबरचा मुलगा नामाला पाच घरे मागायला लावून हा नवस फेडल्ला.तो प्रसंग असा ...

मोहरमच्या दिवशी कौतिकने नामाला आंघोळ घातली. घासून पुसुन अंग स्वच्छ केल.डोक्याला खोबरेल तेल चोपडलं.भांग पाडुन दिला.नवं कुडत घालायला सांगितले.चड्डी नेसायला लावली.नंतर महादेवाच्या मालातल्या कोऱ्या करकरीत दुपट्ट्याची झोळी कीली.ती नामाच्या खांद्यावर अडकून दिली.तांबडा पिवळा नाडा गळ्यात घातला.हतात वाटी दिली.समजावून सांगितलेलं सारं काही त्याच्या डोक्यात शिरलं की नाही,हे पहाण्यासाठी विचारु लागली.
" किती घर मांगसिन ? "
" पाच."
" अन् काय मन्सिन?"
"हुसेन हुसेन धुल्ला " नामा लाजुन म्हनाला,
पण काओ मा,पाच घरं नाई हिंडलो त ? "
" नाई बाप्पा,हिंडाच लागते.त्याच्यात कायची लाज आये.आपल्या देवाचं आफुन नाई त कोनं कराव् ..."
" पन गुजी - जानराव हासन्नाओ."
" हासू हसले त.आमच्या शादलबुवानं आमाले असंच फकीर व्हाले सांगितलं मना.मंग कोनी नाई हसत... "
मग तू आगूदर त्याईले सांगनं,का हासू नोका मनू .. "
" हो जा सांगतो."
"आगूदर सांगनं. "
" सांगतो मंतो तं." पहिल्यांदा खेकसुन बोलल्यवर मग कौतिक शांतपणे म्हनाली.
" आन् कोनी काई देल्लं त थें हाती नौको घेऊ.वाटीत घेऊन झोईत टाकजो."

खांद्यावर झोळी घातलेला नामा लाजतमुरकत शेजारची पाच घरं हिंडला.पैकी कुणी गहू, कुणी तांदूळ,कुणी जोंधळे दिले.वर एकेक- दोनदोन पैसे. शेवटी सारं घेवून नामा सुटकेच्या अनंदात घरी आला.

कौतिकानं सारं धान्य एकात दळून काढलं. खिचडाच तो. भिक्षावळीतल्या पैशांचं गुळ दुध आणलं.खिचड्याच्या पिठाचे रोडगे झाले. महादेवने गुळदुधात कुस्करले. त्याचे लाडु बांधले.शादलबुवाला त्या लाडवांचा नैवेद्य दाखवला.ऊद जाळला. अबीर वाहिला.नंतर महादेवनं शादलबुवापुढं डोकं टेकलं नामालाही टेकायला लावलं. शेवटी कौतिक आली. तिनं यसोदिला उघडं केलं. शादलबुवापुढं उपडं केलं.तिच्या नामाच्या व स्वताच्या गळ्यापोटाला अंगारा लावला. स्वता डोकं टेकुन नमस्कार करताना पुटपुटली.
" बाप्पा शादलबुवा,मले यडीबांगडीले काई नाई समजत. चुकलंमाकलं थें पोटात घाल. ह्या सर्वा तुहाच फापटपसारा आये.तारसीन त तारजा आन् मारसीन त मारत जा ! "

कौतिकचे कुटुंब म्हणजे शिप्यांचे आर्थिक सर्वहरा जातीतले शेतमजूर कुटुंबआहे.तिची संकटकालीन नेनीव  कोण्यातरी सुफी मुस्लिम संताचा धावा करते.आणि त्या मुस्लिम संतालाच ती जगाचा सर्वेसर्वा करुन टाकते.हे सर्व जग तुझाच फापटपसारा आहे. तुच सर्व निर्माण केले आणि तुच विनाश करणार अशी तिची भूमिका आहे. आमच्या या कौतिकच्या तत्वज्ञानातला सर्वेसर्वा शादलबुवा आहे.

नितीन सावंत परभणी
9970744142

No comments:

Post a Comment