नितीन सावंत परभणी
9970744142
यांची एक कविता
काल मलाही आचानक सितामाय भेटली.
अनवानी एकटीच जरा उदासच वाटली.
जवळ गेलो चौकशी केली
म्हनल माय खुशाल का ?
उदास चेहरा कोरडे ओठ म्हनली जरा बसाल का ?
काय बोलणार मी ओटा धरला लगेच..
माय जरा पटकण आवर काम हाइत लैच...
बाबा माझ चुकलच परिक्षा उगीच दिली.
धिटपणा पाहिजे होता आतुनच मी मेली.
रामाच्या पायाने दगडाची आहिल्या झाली.
त्याच रामापाइ राजा ही सिता मातीत गेली.
कोर्ट नाय कचेरी नाय गप्प गुनान गेले वनात.
धोब्याचे ऐकणारा राम तुमच्या कसा मनात.
ना सितेची जयंती ना सितेची ऱ्याली.
रामाच्या बोभाट्यची मर्यादाचा झाली.
सुर्पनखेचे नाक रावनाची बहीण.
गुन्हा काय सांग बा मी ही जयंतीत येइल.
चप्पला देवून गाधी सांभाळ हेच बंधू प्रेम का ?
शंबुकाचा खून कारण काय कळेल का ?
कोनता न्याय कोनती निती कोनते रामराज्य .
बायका पोरे वनात हेच का रामराज्य .
माझे भाग्य खोटे माझी तिथी खोटी.
आर्यपुत्र राम त्याचीच जयंती मोठी.
सोड बा ढोंग सोड रामराज्य .
बळी तुझा आदर्ष येवू दे त्याचे राज्य .
सितामाय रडली आश्रू आले गाली.
बळीराज्याची आता तिनेच घोषणा केली.
इडा पिडा टळो दे आणि बळीचे राज्य येवू दे !!
इडा पिडा टळु दे आणि बळीचे राज्य येवू दे !!
********************************
No comments:
Post a Comment