Friday, 7 May 2021

नेतृत्वहीन सर्वहारांच्या चळवळी...

 नेतृत्वहीन सर्वहारांच्या चळवळी...

भांडवलशाहीतला संपूर्ण व्यवहार नफ्या तोट्याचा विचार करुन असतो.जनता , समाज, माणसे  भांडवलशाहीत फक्त आणि फक्त ग्रहाक म्हणून पाहिले जातात.आपला माल खपवण्यासाठी इझीली उपलब्ध होनारा समुदाय त्यांना सतत हवा असतो.साम्राज्यशाहीत तर संपूर्ण देशच्या देशच उध्वस्त केले जातात.भांडवलशाहीत,साम्राज्यशाहीत माणुसकी,मुलाहिजा वगैरे नसतो. सामंतशाहीत एखाद्या राजाला दयामाया तरी यायची त्यातून एखादी व्यक्ती , एखादे गाव किंवा राज्य मोठ्या हानीतून वाचत असे.
परंतू या भांडवलशाहीत नैतिक मुल्यांना बाजारु स्वरुप आल्यामुळे ती नैतिक अनैतिकता येथे रद्दबातल असते.

आत्ता भारताचा विचार करायचा झालाच तर येथे शेतकरी जाती , माजी अस्पृश्य जाती , भटके विमुक्त जाती , आदिवासी जमाती हे सर्वजन संकटात सापडले आहेत.प्रचंड वेगाने जंगले , डोंगर , नद्या , जलाशये बळकावल्यामुळे आदिवासी , भटक्या विमुक्तांचे अत्यंत हाल होताना आपण पहात आहोत की नाही ? ह्या जाती संकटात नाहीत का ? 

त्यानंतर माजी अस्पृश्य जातींचे शोषण पिडन आजुन थांबले आहे का ? गावगाड्यात भौतिक सेवा सुविधा आणि सामाजिक दर्जा सुधारल्याचे खात्रीपूर्वक चित्र आजुन दिसते आहे का ? अस्पृश्यता पूर्णपणे संपली का ? नाही ना.येथेही आजूनही शोषण पिडन तसेच चालु आहे.

अगदी याच धर्तीवर शेतकरी जातीही अत्यंत संकटात सापडल्या आहेत. आरक्षण असनार्या शेतकरी जाती आणि आरक्षण नसनारी मराठा ही शेतकरी जात सुद्धा आर्थिक सार्वहरा वर्गचौकटीत समान शोषन पिडन घेवून वावरत आहे.भांडवलशाहीच्या जगात भुमीहीन , अल्पभूधारक, शेतमजूर हा सर्वहरा समूह काय मराठेत्तरांचाच आहे का ? किंवा विशिष्ट जातींचाच आहे का ? 

आशा वेळेला समान दुख आणि शोषण पिडन घेवून वावरणाऱ्या आर्थिक सर्वहरा आणि सामाजिक सर्वहरा जातींची क्रांतीदोस्ती करण्याची हीच वेळ असताना संकटात सापडलेल्या , मुक्तीदाता शोधणाऱ्या सर्वहारा जातींना तुमचे तुम्ही बघा , आम्हाला काय घेनेका देने म्हनने म्हणजे संबंध देशाच्या तुटत चाललेल्या एकसंघपणाला स्वताहून हातभार लावणे होय. संबंध देशात आराजकता , आंधाधूंदी माजवण्यासाठी आपण होऊन त्यात तेल ओतने होय.

जागोजागी, गावोगावी, सर्वहरांचे समूह वाट पहात आहेत मुक्तीदात्यांची , कुशल नेतृत्व करणाऱ्या लिडरची.आणि नेतृत्वाच्या बाबतीत मात्र  सर्वच चळवळीत अपयशी ठरलेल्या आहेत.मोठ्या समुहाचे नेतृत्व करण्यासाठी आजूनही मोठ्याप्रमाणावर नेतृत्व गुण विकसत झालेला लिडर वर्ग पुढाकार घेताना दिसत नाही.जातींच्या डबक्यातील नेतृत्व इतरांशी जवळीक न करु शकल्याने संकटाच्या वेळी कुनीच दोस्त नसल्यामुळे निमभांडवली निमसरंजामी व्यवस्थेचे नियंते जागोजागी एकांगी समुहाला ठोकून हतबल करताना आपण पहात आहोत. 
सर्वांचे नेतृत्व करायला , सर्वांशी क्रांतीदोस्ती करायला पुढे यारे बुद्धीजीवी आणि नेतृत्व करु इच्छिनार्यांन्नो ..

नितीन सावंत परभणी 
9970744142 
*********************************************
सर्वांचे व्यापक नेतृत्व करणारा राजा , माजी अस्पृश्य जातीत नेतृत्व तयार झाल्यानंतर तुम्हाला तुमचा नेता मिळाला आहे असे सांगून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पुढील नेतृत्व सुपूर्द करनारा लाडका शाहुराजा ..

No comments:

Post a Comment