महाराष्ट्राची जडणघडण - कारागिरांचे योगदान.
भारतीय इतिहासात वंशसमाजातून जातीसमाजाकडे झालेले स्थित्यंतर इतके वेगाने किंवा कमी काळात सहजासहजी झालेले नाही.
भारतीय शोषण शासनाच्या संस्था वेळोवेळी वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या इतिहासात दिसून येतील.
इंग्रजांच्या आगमणाने भारतात वर्गव्यवस्था आली,त्याआधी भारतात जातीव्यवस्था आणि तिच्याही आधी वर्णव्यवस्था कार्यरत होती.
वर्णव्यस्थेची स्थित्यंतरे द्विवर्णव्यवस्था ( क्षत्रिय - ब्रम्हण ), त्रैवर्णव्यवस्था ( क्षत्रिय , ब्राह्मण आणि दास ),चातुर्वर्ण्य व्यवस्था ( ब्राम्हण क्षत्रिय वैश्य शुद्र ) अशी झालेली आहेत.
यातही ही वर्णव्यवस्था विविध प्रकारच्या संघगणात वेगळे रुप धारण करुन कार्यरत होती.
बुद्धपुर्व कालखंडात समाजव्यवस्थेतीची झालेली स्थित्यंतरे कॉ शरद पाटील पुढीलप्रमाणे देतात.
१) शोषणविरहीत समाज व स्त्रीसत्ताक गणराज्ये - द्वैवर्णीक समाजव्यवस्थेला जन्म देतात.
२)दासप्रथाक मात्रवंशक राजर्षीशासित गणराज्यांत त्रैवर्ण्यव्यवस्था आणि शोषणव्यवस्था उदयाला येते. कार्यरत होते.
३)दासप्रथाक पितृवंशक राजर्षीशासित गणराज्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था जन्माला घालतात.
४)दासप्रथाक अराजक संघगण व बुद्धकाळात जातीव्यवस्था उदयाला येते.
म्हणून वंशसमाज - वर्णसमाज - जातीसमाज आणि आज जातवर्गीय समाज हे ढोळमानाने केलेले सोपे वर्गीकरण.
बुद्धोत्तर कालखंडात, इसवीसनाच्या ५ शतकापर्यंत जातीव्यवस्थेत रूपांतरीत होणारे विविध प्रवाही समूह देशाची उत्पादन वाढ करत होते.
ज्यामध्ये गण , पाषांड , पुग , व्रात व श्रेणी होत.
गण हे सुतारांचे वा ब्राम्हणांचे समूह होत.
पाषांडी हे अब्राम्हणी परंपरेच्या बोद्ध व जैनांचे समुह होते.
पुग हे विविध जातींचे विविध व्यवसाय करणारे मात्र एकाच ठिकाणी रहाणारे समुह होते.
पुग मुख्यतः व्यापाऱ्यांचे होते. तर श्रेणी मुख्य कारागिरांच्या होत्या.
पक्क्या मालाचे उत्पादन कारागिरांच्या श्रेणी करत तर त्या मालाचे क्रयविक्रय व्यापाऱ्यांचे पुग करत.
भारतातील अत्यंत महत्वाच्या वास्तू , शिल्पे , मंदिरे , विहारे , लेण्या , शिलालेख , स्तुप , स्तंभ , हे श्रेणी व पुगांच्या दानधर्मातून किंवा पुढाकाराने बनलेले आहेत.
ह्या पुग समूह इतके श्रीमंत असत की त्या छोट्या राजांना , सामंतांना कर्ज देत असत.आडचणीला पैशांची मदत करत असत.
महाराष्ट्रातील जडणघडणीत अनेक श्रेणी गावगाड्यात उतरल्याचे आजही पुरावे उपलब्ध आहेत.
घिसाडी ( गाडी लोहार ) यांच्या श्रेणी राजर्षी शाहु महाराजांच्या काळापर्यंत महाराष्ट्रात उतरत होत्या.नंतर त्यांच्यातील एक एककारागीर कुटुंब गावगाड्यात शेतीच्या कामासाठी आवजारे बनवून देण्यासाठी दाखल होत असे.शेतकरी लोक यांच्या आगमनाची अतुरतेने वाट पहात असत.विळे,कोयते , खुरपे , खोरे , टिकास , फावडे , गाडीचे लोखंडी चाक , शिवळा , दाराच्या कड्या , इत्यादीं वस्तू हे घिसाडी बनवत असत.
घिसाड्यांच्या ( गाडी लोहारांच्या ) आगमनानेच शेतीच्या कामाची सुरुवात व्हायची.
हेच आमचे गावड्याचे कामगार , यांनी महाराष्ट्र फुलवला , पिकवला , बहरवला ,आकार दिला. त्याबद्दल त्यांना गावगाड्यात काय मिळाले ?
त्यांना गावगाड्यात मानसन्मान तरी मिळाला का ?
कधी स्वागत केले का ग्रामपंचायतीने ? या कामगारांना गावात हक्काची जागा दिलीय का ? आगीसमोर तप्त लोखंडाला आकार देण्यात उगड्यावर पिढ्यानपिढ्या खर्ची पडल्या .
हल्ली लॉकडाऊनच्या काळात आनेक गावांत घिसडी कुटुंबाला गावात प्रवेश दिलेला नाही.
त्यांना एखाद्या ठिकाणी राशन मिळालेच तर चक्कीवर दाळु सुद्धा दिले नाही.ह्या कारागीर कामगारांची आजही दैना चालु आहे.बेइमान समाज गरज संपल्यानंतर त्यांना गावातही घेत नाही.सर्वाधिक भक्ती चळवळींचा वारसा असनारे राज्य आहे म्हने हे.
#महाराष्ट्रदिन
#कामगारदिन
#घिसाडी
नितीन सावंत परभणी
9970744142
१ मे २०२१
No comments:
Post a Comment