सावरकर पुरंदरेचे वंशज आणि फुले शाहु आंबेडकरांचे वारसदार
त्यांच्यात त्यांच्या लेखक, संशोधक, वक्ते,साहित्तिक, शाहिर एवढेच काय लहानांपासून मोठ्यापर्यंत कदर करण्याची , सन्मान देण्याची सवय आहे,परंपरा आहे.तुमचे काय ?
ब्राम्हणी परंपरेत त्यांची विषमतावादी व्यवस्था मजबूत करण्यासाठी जे जे झटले , झटतात त्यांना ते वाऱ्यावर सोडुन देत नाहीत.
आयुष्यभर तर सन्मान तर करतातच पण मेल्यानंतरही त्यांचे नाव जतन करुन ठेवण्यासाठी ते सतत झटतात.
ड्याम फुटुन पुण्यात पाणी शिरल्यानंतर मेलेल्या ब्राम्हणांच्यासाठी दरवर्षी ते कार्यक्रमाचे आयोजन करुन शहीदांना आदरांजली ते वहातात.यात ते कविता कथा रचतात.साधारण लोकांच्यासाठी ते एवढे करु शकतात तर सावरकर ते बा.मो.पुरंदरे हे तर त्यांचे महाबलाढ्य प्रतिके. ती जपण्यासाठी ते कार्यरत रहानारच ना ?
प्रश्न तुमचा आहे ? तुम्ही लेखक साहित्तिक वक्ते शाहिरांच्याप्रती किती संवेदनशीलता दाखवता ? त्यांचा किती आदर करता ? तुमच्यातील वैचारिक , बुद्धीजीवींना किती सहकार्य, साहाय्य करता ? तुमच्या विचारधारेप्रती आणि पूर्वजांच्याप्रती तरी तुम्हाला आस्था प्रेम तरी आहे का ? राष्ट्रपिता जोतीराव फुलेंची नात आणि सुन भुकने मंदिराच्या दारात मेल्या.जपले का फुलेंचे कुटुंब ? कुटुंब सोडा हो , शाळा तरी जपली का सावित्रीमाईंची ?
बहुजन , पुरोगामी,फुले शाहु आंबेडकरवादी म्हणवून घेतो आपण मग आपल्या पुर्वजांच्याप्रती त्यांच्या विचारधारेप्रती प्रामाणिक,सजग, सतर्क, क्रियाशील का बरे रहात नाहीत ? ऐच्छिक हवे तसे का वागतो आपण ?
महापुरुषांची कुठली कुठली प्रतिके आपण जपलीत बरे ? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक संस्थांची काय आवस्था आहे आज ? आण्णाभाऊ साठेंचा शेवट किती वाताहातीत झाला तेव्हा जवळीक साधायला का कुनी आलेले नाही ?
आज घडीला बहुजन काही कफल्लक नाही राहिलेले. असे म्हणतात "एकेकाळी ज्यांचे हतावर पोट होते आज स्वातंत्र्यानंतर त्यांच्या गांडिवर चरबी चढली आहे." आसा वर्ग किती संवेदनशीलता दाखवतो आपल्या विचारधारेप्रती , पुरोगामी चळवळीप्रती ?
सावरकरांच्या , पुरंदरेच्या समाजाने त्यांना काहीही कमी पडु दिलेले नाही.ते सुखाने मेले.फुले शाहु आंबेडकरांचा समाज कुठे आहे ? हा प्रश्न आहे . ब्राम्हणांच्या घरात जन्माला आला, पुरंदरेचे सोने झाले !
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment