Saturday, 30 October 2021

*मुळशी पॅटर्न*('सरंजामशाही ते सर्वहारा' एक प्रवास)

 *मुळशी पॅटर्न*
('सरंजामशाही ते सर्वहारा' एक प्रवास)

             आजपर्यंतच्या शोषण व्यवस्था राबवणाऱ्या शाह्यांमध्ये 'ब्राम्हणशाही' सगळ्यात भयानक मानली जाते पण भारतात इंग्रजांच्या आगमनाने भांडवलशाही आवतरली आणि 'खाउजा' धोरण लागू झाल्यापासून 'भांडवलशाही' कंपलसरी कर्दनकाळ बनली.विषम हितसंबंधांवर आधारलेली जातीव्यवस्था ही ब्राम्हणशाहीची देन तर समान हितसंबंधांवर आधारलेली वर्गव्यवस्था ही भांडवलशाहीची देन आहे. 

              भारतात ही भांडवलशाही आवतरली ती उच्चभ्रू मिरासदार शेतकरी जातींचे बोट धरून,राजे रजवाडे आणि सरंजामदारांना खुश ठेवूनच.उच्चजातीयांची सरंजामशाही आणि उच्चवर्गीयांची भांडवलशाहीची युती होऊन येथे मुळशी प्याटर्न सुरु होतो. 

आज भारतात ब्राम्हणशाही आणि भांडवलशाही असे दुहेरी संकट मिळून 'ब्राम्हो-भांडवलशाही' च्या अजगराच्या रूपाने 'साम्राज्यवाद' पसरवत येथील मालकाला नोकर करण्यासाठी वेळप्रसंगी संपविण्यासाठीच दिवसरात्र कार्यरत आहे.नव्हे ते त्यांच्यासाठी अपरिहार्य आहे. 

महाराष्ट्रा सारख्या राज्यात प्रस्थापित व्यवस्थेचा लाभार्थी असलेला एक उच्चभ्रू सरंजामी वर्ग ज्यावेळी भांडवलशाहीच्या जाळ्यात अडकून जगण्यासाठी लाचार होवून हातपाय हलवतो (?) नाही हातपाय जोडतो येथून त्याचा *सरंजामी तोरा ते सर्वकाही गमावुन बसलेला सर्वहारा* असा प्रवास केलेला कुणब्याच्या पोराचा विद्रोही रस्त्यावरुन हत्याराच्या जोरावर नवीन प्रवास सुरु होतो तो 'भाईगीरी'चा.हि भाईगिरी, माफियाराज,शुटर किलर,हे भांडवलशाहीचे संरक्षक कवच बनतात. 

इथूनच चालु होतो नवा पॅटर्न ... 'मुळशी पॅटर्न' ...

मुळात हा मुळशी प्याटर्न नव्हेच.हा भांडवलशाहीचा जागतीक प्याटर्न आहे.भांडवलशाही कुठल्याही देशात पाय रोवताना हेच धोरण आजमावते ... 

आधी बडे सरंजामदार व शेतकरी जातींतील उच्चभ्रू मिरासदार हताशी धरायचे,त्यांना भांडवली व्यवस्थेची गोडी लावायची,भांडवली वस्तु,शौक,व्यसणांत बुडवायचे आणि त्यांच्या द्वारे छोटे जमिनदार,शेतकरी संपवायचे.त्यानंतर ह्या बड्या मासळ्या सुद्धा भांडवलशाही खाऊन घेते आणि मग एकहाती जागतिक साम्राज्यशाहीचा प्रवास सुरु होतो ... 

नियंत्रण भुमीपुत्र असणाऱ्यांच्या किंवा कुण्याही एकजातीयांच्या हतात रहात नाही ... ते भांडवलशाहीत 'मित्तल' वगैरेंच्या हाती जाते तर साम्राज्यशाहीत 'अमेरिकेच्या' हाती ... येथे फक्त 'शिंदेंचा' त्याच्या बायको पोरींच्या समोर उड्डानपुलावर शरिराच्या तुकड्यांचा ढिग पडतो ... गरिबांच्या जमीनी लुबाडनारे 'शिंदे' आणि लुट झालेला 'रावल्या' दोघेही मरतात ... 

म्हणजेच मरतात फक्तं भूमिपुत्रच.भांडवलशाही शाबुतच रहाते.आपापसात भांडुन सरंजामशाही संपते. 

महाराष्ट्रात भांडवलशाही पहिल्यांदा अवतरली ती पश्चिम महाराष्ट्रात.तिकडेच तिने आपले पाय रोवले.तिकडले नेतेही भांडवली व्यवस्थेचे पुरस्कर्ते तथा प्रचारक राहिलेल्याने भांडवलशाहीने या बड्यांच्या साह्याने हजारो एक्कर जमीनी कवडीमोल भावाने खरेदी केल्या.प्रसंगी शेतकऱ्यांवर गोळीबार सुद्धा केले गेले. 

त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातच वर्ग बनतानाचे चित्र दिसु लागले आहे. मराठवाडा आणि विदर्भात जातीव्यवस्था कायम असल्याने अजुन वर्ग बाण्याची प्रक्रिया सुरु व्हायला अवकाश आहे.म्हणून बबन नावाच्या मराठी चित्रपटाने पश्चिम महाराष्ट्रातील एकजातीय वर्गीय संघर्ष टिपुन वर्ग बनतानाचे चित्र सुंदर उभे केले आहे. 

भांडवलशाहीमुळे बनलेला उच्चवर्ग त्याच जातीतल्या निम्नवर्गाला आपल्या बरोबरीने बसु दे नाही.हा संघर्ष बबनचा तर भांडवलशाहीत सरंजामशाहीची हार हा संघर्ष मुळशी प्याटर्नचा.जमीनी गमावलेल्या शेतकऱ्यांच्या पोरांचे भांडवलशाहीतले भविष्य म्हणजे मुळशी प्याटर्न.

मुळशी प्याटर्न ह्या मराठी चित्रपटात भांडवलशाहीचा चेहरा म्हणून पोलीस आहेत ते या सरंजामशाहीतल्या छोट्या जमीनदार वर्गातुन भाई बनलेल्या तरुणांना आपापसात लढून मारतात.ते एवढे बघे आहेत की त्यांना ही तरुणाई सुधरवायची नाही.तर आपापसात लढाई लावून त्यांना हे फक्त बघायचे आहे.त्यामुळेच पोलीस यंत्रणा ही दमन यंत्रणा आहे ती शेतकऱ्यांच्या विरोधातील किंवा त्यांच्या पोरांच्या विरोधातील.ही दमन यंत्रणा भांडवलशाहीला पोषक आहे.तर गरिबांना शोषक .

फ्यांड्री आणि सैराट ही सामाजिक सर्वहरांची कहाणी.त्यात त्यात माजीअस्पृश्य जातींचे चित्रण आहे.तर बबन आणि मुळशी प्याटर्न हा आर्थीक सर्वहरांचे वास्तववादी चित्रण आहे.आर्थिक सर्वहरा आर्थात शेतकरी जातींचे शोषण पिडण हे दोनही चित्रपट अगदी यथोचीत करतात.

येथे शेतजमीन गमावलेला शेतकरी हमाली स्विकारतो पन वास्तवात मात्र शेतकरीवर्ग हमाली ऐवजी आत्महत्या स्विकारतो आणि सर्वकाही गमावलेल्या शेतकरी जातींच्या पोरांची नेनीव त्याला भांडवलशाहीत बापासारखाच नेतृत्व करणारा बनु पहाते. पन सरंजामशाहीतली समान न्याय करणारी पाटीलकी भांडवलशाहीत गुंडगिरी बनते. ज्याचा बाप सरंजामशाहीत न्याय करणारा गावचा पाटील असतो तर हा पोरगा भांडवलशाहीत तिच मुक्त नेनीव घेवून भाई बनतो. 

हा काळ निमभांडवली निम सरंजामशाहीचा जातवर्गीय आहे.मुळशीतील संपूर्ण सरंजामशाही जाऊन काही काळातच संपुर्ण भांडवलशाही लागु होनार आहे.नव्हे होत आहे.मराठवाडा आणि विदर्भात हे आजुन व्हायचेय.

मानव मुक्ती मिशन

No comments:

Post a Comment