Thursday, 7 October 2021

ll नवरात्रोत्सव तिसरा दिवस ll♦घटस्थापना आणि हिंगुळजा ♦

ll नवरात्रोत्सव तिसरा दिवस ll
♦घटस्थापना आणि हिंगुळजा  ♦

                  
              नवरात्रोत्सव हा मातृसत्ताक गणव्यवस्थेचा सर्वात मोठा सण आहे.शक्ती म्हणजे स्त्री. म्हणून शक्तीचे उपासक ते शाक्त. नवरात्र उत्सवात मातृदेवतेची आराधना केली जाते.या सर्व मातृदेवता एकेकाळच्या गणराण्या होत्या.सिंधुनदीच्या किनाऱ्यावर निर्ऋतीचे राज्य होते. गोदावरीच्या किनाऱ्यावर शूर्प-णखा कृषीप्रधान स्त्री-राज्य चालवत होती.पंचगंगेच्या किनाऱ्यावरच्या अंबवनाची गणराणी अंबाबाई होती. आपल्या चार लेकींना (ज्ञाती) समान चार भागात म्हणजे ९६ कुळात शेती वाटुन देणारी तुळजाई,हा तेरणा-मांजरेचा देश समतेवर चालवत होती. या शाक्त परंपरेत भेदाभेद नाही, की असमानता नाही.प्राच्यविद्यापंडीत कॉ शरद पाटील म्हणतात "शाक्तांची ठाणी अस्पृश्य (मातंग) वस्तीत सापडतात." म्हणजे बहुतांश स्त्रीदेवतांच्या मुख्या पुजारीण मातंग स्त्रीया होत्या. 
             अगदी त्याच प्रमाणे आजही नवरात्रोत्सवात मातंग स्त्रीची परडी भरल्याशिवाय वरच्या जातीतल्या स्त्रीया जेवन सुद्धा करत नाहीत.गावात गोंधळी आला तर तो आधी मातंगाच्या घरी वाजवतो,मग इतरांच्या.कवडी हे प्रजननाचे प्रतीक आहे. नवनिर्मीतीचे प्रतीक म्हणून कवडी ही शाक्त संस्कृतीत पुजनीय मानली गेली आहे.आपली आई आपल्याला सर्वकाही देते.ती कशाचीही कमी पडू देत नाही. ती धान्य भरभरून देते या अर्थाने परडी (धान्य देण्याचा टोकरा) पुजनीय मानली जाते. लेकरे जगत नसतील,वाचत नसतील तर मातंग आईच्या पदरात घातले जातात. ते पोर मातंगवाड्यात जेवते,रहाते, दुध पिते, मग पुन्हा आपल्या मुळ घरी दिले जाते. हे वंशसमाजातील लोकोत्सव असल्याने येथे भेदभाव नव्हता.पुढे जाती समाजात मातंग अस्पृश्यतेत लोटले गेले. 
                     या नवरात्रोत्सवात अशा अनेक अब्राम्हणी परंपरा आपल्या दिसतील.ज्यांमधे इतिहास आहे. तुम्हाला काही मिथके दिसतील,त्याला तत्काळ नकार देण्याऐवजी मिथकांची सोडवणूक केली पाहिजे.मिथके उलगडली पाहिजेत. या नवरात्रोत्सवाला ब्राम्हणी छावनीत लोटुन आपल्याला काहीही साध्य होनार नाही.आता अब्राम्हणी- करणाची प्रक्रिया जोमाने राबवली पाहिजे.

                   नवरात्रोत्सवात आपण आनेक गणराज्ञ्यांचा , गणमातेचा आढावा घेत आहोत. त्यात आज बघुया हिंगुलांबीका किंवा हिग्लाजमाता. 

                   हिंग्लाजमाता :
    ही पाकिस्तानातील बलुचिस्तान भागातील मकराण येथे वास्तव्याला असनारी गणराज्ञी.कराची पासुन २५० किमीवर उत्तर पश्चिम भागात ही वास्तव्यास आहे. आजही तिला आकारहीन दगडात पुजले जाते. म्हणजे तिचा काळ मुर्तीकलेचा शोध लागण्याच्या आधीचा.ती ५६ शक्तीपिठांपैकी एक आहे. हिंगोल नदीच्या किनाऱ्यावर तिचे साम्राज्य उदयाला आले.हिंगुलांबीका ,हिंगुळादेवी हे सुद्धा तिचे उपनावे आहेत.आजच्या काळातील पाकिस्तानी जनता तिला नानी देवी सुद्धा म्हणतात. हिंगुळा म्हणजे रक्तवर्णी.रक्तवर्णी का तर चोर दरोडेखोरांपासुन , परकीय आक्रमणापांसुन प्रजेचे व्यापाऱ्यांचे संरक्षण करताना रक्त सांडणारी लढाऊ राणी. भारताचा जगभर होनारा व्यापार याच हिंगुळादेवीच्या परिसरातून खैबरखिंडीमार्गे होत असे.उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरचा व्यापर युरोपात होत असल्याचे पुरावे उपलब्ध झालेले आहेत.त्यामुळे परकीय आक्रमणे थोपवनारी ही युद्धराज्ञी.या देवीच्या हतात जास्तित जास्त आयुधे आहेत.म्हणजे सरक्षंण देवता.व्यापर करणाऱ्या लोकांना संरक्षण देनारी ही राज्ञी पुढे व्यापारी लोकांची देवता बनली.आणि त्या व्यापाऱ्यांनी तिला देशभरात नेले.जिथे जिथे व्यापारी केंद्रे होती तिथे तिथे या हिंगुळजेचे ठाणे स्थापन केले गेलेत.मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात या हिंग्लाजमाता देवींची मंदिरे आहेत.आज व्यापारी जातींपैकी स्पेशली भावसार समाज या देवीचा उपासक आहे.हिंगोली जिल्हाचे नाव सुद्धा या देवीच्या नावे आहे.कोल्हापूरचा गडहिंग्लाज तालुका सुद्धा याच देवीचे नामनिर्देशन करतो.नाथ सांप्रदायाचा आणि गुरु गोरक्षनाथ यांचा वावर या परिसरात दीर्घकाळ राहिलेला आहे.सुकन्या आगाशे नावाच्या लिखिकेने मागोवा मिथकांचा या ग्रंथात या संदर्भात लिखान केले आहे. 

नितीन सावंत परभणी 
9970744142

No comments:

Post a Comment