Tuesday, 19 October 2021

ll नवत्रोत्सव रात्र आठवी llll वैशालीची जनपद कल्याणी - आम्रपाली ll

 ll नवत्रोत्सव रात्र आठवी ll
ll वैशालीची जनपद कल्याणी - आम्रपाली ll

                           नितीन सावंत परभणी 
                           9970744142

          संभोगागृह अर्थात सभागृह हा काळानुरूप अर्थ बदलत आलेला एकाच वास्तूचा शब्द. स्त्रीसत्ताक गणव्यस्थेत स्त्री ही राज्यकर्ती होती व तिच्यासमोर सभा व समीती भरली जायची. स्वैरसंभोग ही त्या काळाची नैसर्गिक उपज होती.गणवृध्दीसाठी जास्तीत जास्त लेकरे जन्माला घालने हा धर्मपुर्व धर्म होता.इतिहासात आम्रपालीला गणिका म्हटले गेले आहे. ती गणिका म्हणजे गणाची मालकीन, गणाच्या जमिनीचे मापून, मोजून (गणना) करुन आपल्या कुलात समान वाटप करणारी अर्थात गणराज्ञी होय. परंतू आजघडीला पुरूषसत्ताक ब्राम्हणी राजक व्यवस्थेने तिला वेश्या बनवून दुष्ट नेनीवेत ढकलले आहे.आज गणिका म्हणजे वैश्या असा आर्थ लावला जातो. तिने बौद्ध भिख्खुंच्या विश्रांतीसाठी आंब्याचे वन दान दिले होते आणि ती आपला रथ हाकताना राजेराजपुत्रांच्या बरोबरीने हाकायची या अधिकाराने ती मालकीन होती, बंद खोलीतली केवळ उपभोगाची वस्तू नव्हे.वैश्या नव्हे.

                       वैशाली हा अराजक संघगण होता आणि आम्रपाली त्या संघगणाची नगरवधू होती म्हणजे त्या गणाला लोकशाही मार्गाचा दर्जा बहाल करनारी, तो गण उध्वस्त न होऊ देणारी, त्या नगराचे ऐक्य अबाधीत ठेवनारी ती जनपदकल्याणी होती. स्त्रीसत्तेचे महत्व कमी होत असताना आणि पुरुषसत्ताक राजवटी उभ्या रहात असतानाच्या काळामधील आम्रपाली आहे. म्हणजे तीचा गण वा संघगण लोकशाहीप्रधान आहे, मात्र ती लोकशाही टिकून ठेवण्यास ती निमीत्तमात्र आहे.स्त्रीयांचे गणप्रमुख म्हणून असणारे हक्क आधिकार कमी होण्याच्या काळातील ती मावळतीची गणीका.
                      या अराजक संघगणात पुष्करणीत पुरुषांना अभिषिक्त सिचन विधीद्वारे गणसभासदत्व मिळविण्याची गरज उरलेली नाही तर ते आता सहज सभासद होतात. येथे मातृसत्ताक व्यवस्था क्षीण झाल्याचे दिसुन येते . परंतु तिचे अवशेष मात्र पहायला मिळतात. जसे महामाया ही एका वनात झाडाच्या फांदिला धरुन प्रसूत झाली. तिने तिच्या गणाच्या पुष्करणी जवळ जावून बुद्धाला जन्म दिला .आम्रपाली सुद्धा आंबवनात पुष्करणीजवळ सापडली म्हणून तिचे नाव आम्रपाली पडले.

                      अनेक राजे राजपुत्रांच्या जेवनाचे आमंत्रण नाकारीत, बुध्द वैशाली गणाची गणराणी आम्रपालीकडे जेवायला गेले ते ती वेश्या होती म्हणून नव्हे तर ती लोकशाही पद्धतीने संघगण चालवण्यास मदत करीत असे म्हणून. अराजक संघगणात जमीन ही एका व्यक्तीच्या मालकीचे नव्हे तर संपूर्ण संघाच्या मालकीची असे म्हणून अराजक संघगणात गणसभासदांच्या परवानगी शिवाय जमीन दान देता येत नसे येथे मात्र आम्रपाली बुद्धाला आंब्याचे वन दान देते म्हणजे गणाची ती जनपदकल्याणी असल्याने तिला तसे करता येते. 

                      प्रत्येक स्त्रीसत्तेच्या राज्याची एक वेगळी शेती होती त्यावरून त्या गणराणीची ओळख होई.
जसे सिंधू नदीच्या खोऱ्यात निर्ऋती गाळपेराच्या भाताची शेती करे.
गोदिवरीच्या किनाऱ्यावर शूर्पणखा सरकती (shifting) शेती करे 
तेरणा मांजरेच्या परिसरात तुळजाई कदंबाच्या वनात वास करी आणि गाळपेराच्या भातशेती बरोबर, सरकती शेतीही करे.
तर पंचगंगेच्या किनाऱ्यावर अंबाबाई अामराईची मालकीन होती.
                या आपल्या महान गणराण्या आज कोण्या न कोण्या मार्गाने मिथके बनून दुष्ट - सुष्ट किंवा व्यक्तीगत - सामूहिक नेनीवेत बंदिस्त आहेत.त्यांना या ब्राम्हणीकरनाच्या कैदेतून अब्राम्हणी बहुप्रवाही विधायक भौतीकवादी अन्वेषनाच्या पद्धती वापरून व जानीव नेणिवेच्या तर्कशास्त्राच्या आधारे मुक्त केले पाहीजे.
                   तिचा उद्धार तथागतांनी तर केलाच पण ती पुन्हा एका नव्याने मुक्त झाली मिथकांच्या कैदेतून वैश्येचे उलटे चाक फिरून ती जनपदकल्याणी बनली . ती नगरवधूची उलटीबाजू स्त्रीसत्तेचा वारसा ठरली.याचे श्रेय कॉ शरद पाटील यांना जाते. 

नितीन सावंत परभणी 
9970744142

No comments:

Post a Comment