Thursday, 17 March 2022

संत चोखोबाराय चरित्र प्रकरण - 3 रे ll भुवरी वैकुंठ माननारा संत ll

 संत चोखोबाराय चरित्र 
प्रकरण - 3 रे 

ll भुवरी वैकुंठ माननारा संत ll 

बहुत हिंडलो देशांतर l परी मन नाही स्थिर झाले कोठे ll
बहुत तीर्थे फिरोनिया आलो l मनासवे झालों वेडगळाची  ll
बहुत प्रतिमा ऐकिल्या पाहिल्या । मनाच्या राहिल्या वेरझारा ll
चोखा म्हणे पाहता पंढरी भूवैकुंठ l मनाचे हे कष्ट दूर केले ll 
                -  संत चोखोबाराय 

                          संत चोखोबारायांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणराजा गावचा, पण कर्मभुमी मात्र पंढरपुर.त्यांचे बालपण मेहुणराजा गावीच गेले होते. चोखोबांच्या  बालपणीचे कुठलेही पुरावे किंवा अभंग उपलब्ध नाहीत. अनेक संत, महापुरुषांच्या जीवनचरीत्रात त्यांच्या बालपनीचे चमत्कारीक, काल्पनीक प्रसंग असतात, काहीतरी मांडणी असते.परंतू संत चोखोबारायांच्या बालपणीचे कुठलेही उल्लेख उपलब्ध नाहीत.चोखोबा अस्पृश्य जातीतून आल्याने त्यांच्या  जीवनचरीत्रातील बालपनीच्या प्रसंगांची कोण दखल घेणार ? त्यामुळे त्यांचे बालपण कसे गेले असेल कळायला मार्ग नाही. पूर्वी ज्ञान मिळवीण्याचे सर्वात मोठे माध्यम म्हणजे भ्रमण होते. अनेक तिथे, क्षेत्रे फिरणे गावे, नवे परिसर पहात रहाणे, माणसांचा स्वभाव, बोली जाणून घेणे.यातून माणुस प्रगल्भ होत असे. संत चोखोबारायांनीही अनेक तिर्थे, क्षेत्रे पाहिली. खुप ठिकाणी ते फिरले स्वतःचा भूप्रदेश सोडून इतर भाषिक राज्यांतही ते गेले असावेत म्हणुनच तर त्यांनी 'देश देशांतर ' हा शब्द वापरला आहे. पण त्यांना भावले ते पंढरपुरच. चोखोबांनी स्वत:चे जन्मगाव का सोडले असावे ? याबद्दल अंदाज बांधण्याजोगी एक परिस्थती आहे.
                          संत चोखोबाराय पंढरपूरला आले असताना त्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात समतेची मांडणी करणारे, अस्पृश्यता जाहीर नाकारणारे संत नामदेवांचे किर्तन ऐकायला मिळाले. किर्तन संपल्यानंतर संत चोखोबारायांनी नामदेवांशी चर्चा केली.संत जातभेद मानत नसतात,असे म्हनत संत नामदेवांनी तर चोखोबांना मिठीच मारली होती.यामुळे चोखोबा भारावुन गेले.आपणही या संत मंडळात सामील व्हावे म्हणून पुढील काळात चोखोबाराय सहकुटुंब पंढरपूरला आले. यासंदर्भात पुरावे म्हणून नामदेव आणि संत चोखोबारायांच्या अभंगात याप्रकारे वर्णन सापडते.  संत चोखोबाराय म्हणतात

माझे सुख मज दाखविलें । पावन केले तीही लोकी ll
आजी सोनियाचा दिवस धन्य झाला । प्रत्यक्ष भेटला नामदेव ll
माझे मज दिले माझे मज दिलें । माझे मज दिले प्रेमसुख ll 

                        ते सहकुटूंब पंढरपुरला स्थाईक झाले. आपली बायको सोयरा, स्वतः चोबोबा हे दोघा सदस्यांचे  कुटूंब पंढरपुरात येऊन राहिले. त्या आधी बऱ्याचदा चोखोबा पंढरपुरला येऊन गेले असावेत किंवा नियमीत वार्षिक वारी तरी ते करत असावेत. त्यांना इतर तिर्थक्षेताना भेदभावाची वागणूक मिळायची पण पंढरपुरात ब्राम्हण वगळता सर्वांनी समतेने वागवल्याने, ब्राम्हण वगळता  इतरांनी भेदभाव न केल्याने,चोखोबाराय बायकोसह पंढरपूरात स्थाईक झाले.
                      म्हणूनच संत चोखोबारायांच्या वरिल स्वलिखीत अभंगातून काही गोस्टी निर्देशित होतात त्या आशा की , संत चोखोबाराय अनेक तीर्थक्षेत्रे फिरुन आले होते.त्यांचा देशभर वावर राहिलेला होता.त्यांचे अनुभव विश्व व्यापक होते.ते प्रगल्भ होते.सर्वत्र फिरुन आभ्यास करुन ते जमीनीवरच स्वर्ग असतो या मतावर येवुन पोहंचलेले होते.त्यांच्या दृष्टीने पंढरपूर हेच जमीनीवरले वैकुंठ आहे.भुवरिल वैकुंठ सोडुन स्वर्गातील वैकुंठास जाण्याची गरज नाही असा त्यामागचा एक अप्रत्यक्ष विचार संत चोखोबाराय सुचवतात. 
                                
                   नामदेवांनी वाळवंटात आपले कीर्तन संपल्यानंतर संत नामदेवांनी चोखोबारायांना, जनाबाई, गोरा कुंभार, सावता महाराज, ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपान, निवृती सर्वांची ओळख करून दिली. चोखोबारायांनी इंट्री नामदेवांच्या संत मंडळात झाली. त्यानंतर चोखोबारायांनी, मेहुणाराजा गाव  सोडले आणि बायकोसह पंढरपूरी स्थाईक झाले. कारण संतांचा सहवास त्यांना उंचीवर  नेणार होता. चोखोबाराय पुढील काळात आधिकाधीक प्रगल्भ बननार होते.
                    चोखोबा जरी पंढरपुरात येऊन राहिले तरी त्यांची बहिण निर्मळा आणि मेव्हणा बंका मेहुणराजा गावीच राहिले. पुढे संत सोयराबाईंच्या बाळंतपणासाठी आपल्या बहीणीला म्हणजे निर्मळाला आनयला चोखोबाराय मेहुणराजाला गेले असता विठ्ठल सोयराबाईचे बाळंतपण करायला आल्याची अख्याईका आहे. म्हणजे संत कर्ममेळा यांचा जन्म पंढरपुरातच झाला होता.

                          या  सर्व संतांच्या विद्रोही वातावरणात कर्ममेळा यांना अस्पृश्यतेच्या विरोधात विद्रोही भुमीका प्रखरपणे घेता आली. आपली मते त्यांना निर्भयपणे मांडता आली.
                          आशाप्रकारे जातीव्यवस्था अस्पृश्यतेचा प्रखर अनुभव घेतलेले संत चोखोबाराय पंढरपुरातील बहुजन संतमेळ्यात सहभागी झाले. इतर तिर्थे- क्षेत्रांपेक्षा त्यांना पंढरपुर दिलास देणारे, आपलेसे करणारे वाटले. त्यांनी आणि सोयराबाईनी पंढरपुर कायमस्वरूपी स्विकारले. यातून हे अस्पृश्य जातीतून आलेले  कुटुंब सर्व संतांचे लाडके बनले. सर्व संतांची चोखोबारायांच्या घरी ये-जा सुरू झाली. नामदेवांच्या मार्गदर्शनाखाली त्या काळाच्या मर्यादा लक्षात घेता सर्व संत मंडळ सर्वच प्रकारच्या विषमतेवर हल्ला चढवायला लागले होते.ही बाब क्रांतिकारी होती.आजही आहे. 

                          प्रस्थापीत श्रौतस्मार्त आर्थात विषमतावादी वैदिक धर्माच्या विरोधात , त्या धर्मातील ब्राम्हणी प्रतिकांच्या विरोधात, संत नामदेवांनी विठ्ठलाला प्रेरणा म्हणुन उभे करत एल्गार पुकारला होता.काशी, मथुरा, द्वारका अशी तिर्थक्षेत्रे फिरत बसण्यापेक्षा आपले कार्य हेच ईश्वर मानावे ही प्रयत्नवादी भुमीका संत नामदेवांनी पुढे ठेवली होती. मग नामदेवांना मिळालेले सर्वच संत आपले दैनंदिन कामे करत भक्तीमार्गाच्या द्वारे अभिव्यक्त व्हायला लागले होते. शेतीची कामे करत संत सावता महाराज संत मेळ्यात सामील होत असत. संत गोरोबाकाका आपला कुंभारकीचा व्यावसाय करुन नामदेवांच्या मेळ्यात येत असत.असे विविध संत कार्य हाच ईश्वर हा संदेश देत होते. त्यामुळे संत चोखोबाराय यांना मंदिरातील ईश्वर नाकारनारे हे संत खुप भावले. 
                           चोखोबारायांचा मात्र व्यावसाय नव्हता तर लादलेली गुलामी होती. त्यामुळे त्यांना तो व्यावसाय मिरवता आला नाही, तर त्या गुलामीची घृणा वाटली. आपण जगत असलेले जगणे अमानवीय निकृष्ठ दर्जाचे आहे याची जाणीव होणे हे जागृत, डोळस माणसाचे लक्षण, चोखोबारायांना या गुलामीची जाणीव होती.
                    गुलामीचे जीने संपूनही व्यक्ती स्वातंत्र्य बहाल करणाऱ्या लोकशाहीत उच्चजातीय राजकारण्यांच्या दारात पैसे मागत मत विकणारे गुलाम पाहिले की गुलामीची जाणीव असणारा डोळस चोखोबा ग्रेट वाटु लागतो.
      
                                आम्ही अस्पृश्य का आहोत ? आमच्याच वाट्याला हे अमानवीय जगणे का यावे ? आम्हाला लोकांनी दुर हो , असे का म्हणावे? आमची घृणा, तिरस्कार का करावा ? आम्हाला इतर माणसांसारखे माणुस का मानले जात नाही ? विटाळावाचुन कोण चुकला आहे ? विटाळ काय फक्त आम्हालाच आहे का ?  आमचा जन्म काय उष्टे खाण्यासाठीच झाला आहे काय ? हे प्रश्न चोखोबारायांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या सदस्यांचे  आहेत. असे प्रश्न पडणे , हे प्रश्न व्यवस्थेला जाहीरपणे विचारणे, डोळस, वैचारीक, प्रगल्भ माणसाचे लक्षण आहे.संत चोखोबारायांचे संपूर्ण कुटुंब डोळस होते.प्रगल्भ होते.वैचारिक होते.शिवाय व्यवस्थेचे मानवनिर्मित दहाक भोग हे कुटुंब भोगत होते.त्यांनी कुठलीही चुक केलेली नसताना, त्यांना जन्मानेच वाईट मानुन त्यांचे मानवी चांगुलपण ही समाजव्यवस्था नाकारत होती.मुक्त जगण्याचे त्यांचे हक्क आधिकार काढुन घेतले जात होते.काश्मिरी ब्राम्हणांच्यापेक्षा भयानक हाल या देशात अस्पृश्य जातींचे केले जात होते.त्या अस्पृश्य जातींचा छोटासा आवाज हे कुटुंब बनले होते.अस्पृश्यांची कैफियत मांडण्यासाठी, हे कुटुंब आवाज उठवायला निघाले होते. 
              अमानवीय प्रथा नाकारण्याचे धाडस चोखोबारायांच्या कुटुंबीयांनी  केले होते. त्यामुळेच ते इतिहाहापुरूष ठरले.अजरामर झाले.

नितीन सावंत परभणी 
9970744142

No comments:

Post a Comment