Saturday, 24 July 2021

आत्याबाई

 #आत्याबाई  

                      माझ्या परिचयात एक आत्याबाई आहेत. बहुतांश जन त्यांना याच नवाने ओळतात. जास्त बोलण्याच्या सवयीतून, इतरांच्या सुखदुःखाच्या चौकश्या करण्यातून, त्यांच्याकडे जास्त माहिती, ज्ञान जमा व्हायला लागल्याने त्या छोट्यामोठ्या समस्यांची सोडवणूक बसल्या बसल्या करु लागल्या. त्यामूळे आपल्या गावगाड्यात, पंचक्रोशीत त्या लोकप्रिय बनल्या आहेत. 

                       यातून ग्रामीण भागातील अनेक लोक त्यांच्याकडे सल्ला घ्यायला येतात. अनेकांच्या कुटूंबातील अडी-अडचणी सोडवण्यात आत्याबाईचा एक विशेष आसा हतकंडा आहे. त्यात त्या तरबेज आहेत. न्याय करताना त्या निरपेक्ष न्याय करतात. जवळजवळ त्यांचा न्यायनिवाडा दोन्ही पक्षाला मान्य होतो. या सर्व पायपीटीतून हळूहळू त्यांचे नेतृत्वगुण विकसीत झाले आहेत. कुटूंबातील कारभारात त्या प्रमुख बनल्यामुळे घरालाही पुढे नेण्यात त्यांचा मुख्य रोल आहे.

                त्या फार शिक्षीत नाहीत. मोबाईल नंबर कागदावर लिहुन घेवून , झाडांच्या, मंदिरांच्या खानाखुणांच्या आधारे गल्ल्या कॉलण्यांचे पत्ते त्या लक्षात ठेवतात. लांबलचक नावे असलेल्या नगरांची कॉलण्यांची नावेही त्यांना उच्चारता येत नाहीत. त्यांना चळवळ माहीत नाही. त्यांन जात्यंतक आंदोलनही माहित नाही. त्यांना समाजातील युरोपीयन वर्गीय मॉडेल माहिती नाही की मार्क्सचा द्वंद्वात्मक भौतिकवाद माहिती नाही. तरी त्या ग्रामीण भागातील सरंजामशाहीतले जात्यांतर्गत द्वंद्व सोडवत असतात. पितृसत्ताक वर्चस्ववादाला, त्याच्या हुकूमाला वेळोवेळी पायदळी तुडवत असतात. त्यांचा एक अनुभव आहे. त्यांचा अनुभवातून तयार झाला असा एक कयास आहे. त्या कमालीची व्यवहारीक आहेत.
      
                      त्या काही दिसायला नर्मदा बचाव वाल्या मेधाताईसारख्या नाहीत; बांगड्या घालयच्या की नाही, कुंकु लावायचे की नाही, या भानगडीत आडकुन पडलेल्या आदर्श स्त्रीवादीही नाहीत. काबाडकष्ट करुन गावगाड्यातील चार दोन कुटुंबियांना माणुसकीचा, प्रगतीचा रस्ता दाखवणाऱ्या आहेत. आडल्या नडल्यांना मदत करणे, दुबळ्याच्या पाठीशी उभे रहाणे, खचलेल्यांना परंपरागत कुलदैवताची, दंतकथातील उदाहरणे देवून धीर देणाऱ्या त्या एक बेस्ट काऊंसलर आहेत. उत्तम मार्गदर्शक आहेत. सल्लागार आहेत.

                     धाडसी स्वभाव, बहुतेक जगरहाटी फेस केल्यामुळे बनला. कोणत्याही भांडणात उतरल्यामूळे स्वभाव असा बनला असावा. गावातील सरपंचाच्या घरी जाण्यापासून ते कलेक्टर, तहशीलदार ते एसपी ऑफीस पर्यंत जायची तयारी ठेवणाऱ्या. प्रचंड सकारात्मक उर्जा बाळगणाऱ्या, प्रयत्नाची पराकाष्ठा करणाऱ्या, आत्याबाई आहेत.
 
गावखेड्यातल्या आत्या, नानी, खाला, दासी

                  ग्रामीण भागात आशा अनेक अत्याबाई , नानी , खाला , दादी , आक्का , भाबी आहेत. त्या गावगाड्यातल्या जातीतल्या असो, जाती-जातीतल्या असो, घरा-घरातल्या असो, नवरा-बायकोच्या वादाच्या असो; न्यायाच्या बाबतीत न्यायाधिशापेक्षाही अधिक न्याय देणाऱ्या असतात. त्यामूळेच लोक त्यांना मान देतात , दबतात , त्यांचा शब्द लोक पाळतात.

                         गावोगावी असणाऱ्या या आत्याबाईवजा महिलांचा संपूर्ण गावात एक विशेष प्रभाव असतो. त्या भर रस्त्यावर कुनालाही रागावून बोलु शकतात , कितीही मोठा असु द्या त्याला त्या सरळ करु शकतात. गावगाड्यातील ह्या बेस्ट सोशल वर्कर आहेत. सासुरवाशीण सुनांसाठी त्या मुक्तीदात्या असतात. शोषण - पीडनाचे सर्व स्तर त्या आपल्या कुवतीनुसार नाकारतात.
             
संत जनाबाई : अशीच एक आत्या

                  मध्ययुगीन भारतात संत जनाबाई आशाच एक आत्याबाईच होत्या. 
त्यांनीही डोईचा पदर कंबरेला खोसुन , भर बाजारात येवून प्रबोधनासाठी हातात टाळ विना घेतला होता. कुनी आगावची बाई म्हनेल म्हणून त्यांनी आधीच घोषणा केली होती, की कुनाला मनगटावर तेल घालून काय बोंबलायचे आहे तर बोंबला मला काही फरक पडत नाही.तुम्ही फारच टिका करणार असाल तर मीच घोषणा करते की मी विठ्ठलाचे घर निघायला तयार आहे. त्याची वेश्या होइल. हा समर्पणभाव आहे. कशासाठी अो? समाजसुधारण्यासाठीच ना!

                     काॅ. शरद पाटील यांनी अशा बायकांची ऐतिहासिक परंपरा इतिहासाच्या गर्भातून शोधून काढली. सिंधुकाळात मातृसत्ताक व स्त्रिसत्ताक समाजाचा ते उल्लेख करतात. त्यामध्ये एक कुलामधून दूसऱ्या मुलामध्ये अौषधोपचार व मातृसत्तेच्या धर्माचे प्रबोधन करणाऱ्या अशाच आत्याबाईंना त्यांनी शोधले. त्यांना कुल-टा म्हणतात. जो शब्द नंतर पुरुषसत्ताक समाजात बदनाम केला गेला.

              आत्याबाई या चालतबोलत न्यायालय आणि त्याची परंपरा मातृसत्तेतून अशी येते. सामाजिक चळवळीच्या गावीही नाही. 

                मानव मुक्ती मिशन अशा १०० आत्याबाईंचा मेळावा घेऊन त्यांना बोलते करणार. त्यांच्या अनुभवाचे डाक्यूमेंटेशन करणार. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा प्रसार होण्यासाठी त्यावर ग्रंथ निर्माणकरणार. त्यांना नवीन कायद्यांचे ज्ञान देणार. आत्याबाई संस्था गावगाड्यात भक्कम करण्याचा हा छोटा प्रयत्न राहील, मानव मुक्ती मिशनचा.

नितीन सावंत परभणी 
संस्थापक अध्यक्ष 
मानव मुक्ती मिशन
9970744142 
दि. २२ जुलै २०२१ 

#गुरुपौर्णिमा

No comments:

Post a Comment